Saturday, 27 May 2023

पित्त (ऍसिडिटी

 🛑 *पित्त (ऍसिडिटी )*🛑

===========

आम्लपित्त



https://chat.whatsapp.com/HbXbrXHDBms0IucijhSlEZ



🛑 हल्ली जिकडे तिकडे ऍसिडिटी या शब्दाने उच्छाद मांडला आहे. ऍसिडिटी किंवा पित्ताचा त्रास नाही असे म्हणणारा माणूस औषधाला सुद्धा सापडणार नाही. हि ऍसिडिटी म्हणजे नेमकं काय? 

ते आहि आपण पाहू. 

आपल्या अन्नाच्या पचनासाठी जठरात असणाऱ्या हायड्रोक्लोरिक ऍसिड ,पेप्सीन ,ग्यास्ट्रीन इ. 

या स्रावांचं प्रमाण वाढत म्हणजे पित्त होत ......

 ऍसिडिटी होते. हे प्रमाण वाढविण्यासाठी आपला चुकीचा आहार,विहार,सवयी ,ताणतणाव 

,प्रवास,वाद,दगदग,धावपळ या गोष्टी कारणीभूत ठरतात.खालील आहारविहारासंबंधी चुकीच्या सवयी पित्त वाढवतात.

पित्त का व कसे वाढते ते आपण समजून घेऊ ....

🛑१) घाईघाईने जेवल्याने जठरात अन्न कोंबून कोंबून भरले जाते व ते नीट न पचल्याने ग्यासेस तयार होतात व जठरात फंड्स नावाची जागा वायू खेळण्यासाठी असते तीच जागा अन्नाने भरल्याने पचनाला जागा उरात नाही व पित्ताची निर्मिती होते. जस प्रवासाला जाताना बॅगेत वाटेल तसे कपडे कोंबले तर कमी कपडे बसतात शिवाय ते चुरगळतात .,पण तेच इस्त्री करून नीट घडी करून भरल्यास जास्त कपडे बसतात .

🛑२)जेवणानंतर लगेच आडवे झाल्याने काही वेळा अन्ननलिका जिथं संपते तिथली कार्डियाक स्पिंक्टर हि झडप उघडून अन्न वर फेकले जाते व आंबट गुळण्या घशाशी येतात ,म्हणून दुपारी जेवणानंतर झोपू नये व रात्री जेवणानंतर कमीतकमी २ तासांनी झोपावे.

🛑३)आम्लधर्मी पदार्थाचे अतिप्रमाणात सेवन दही हिरवी मिरची,तूरडाळ,मांसाहार,अंडी,डालडा,मैदा,बेकारी पदार्थ,चहा,कॉपी,फास्ट फूड,तंबाखू जन्य पदार्थ,,दारू,सुपारी,बेसनाचे,उडीद डाळीचे पदार्थ,इत्यादींनी पित्त अधिकच खवळते. हे जड पदार्थपचनासाठी जठरातून जास्त ऍसिडिक स्त्राव सोडले जातात व परिणामी ऍसिडिटी वाढते.

🛑४)अति गोड पदार्थांनी ऍसिडिटी वाढते ,कारण हेच कि अति गोड पदार्थ पचायला जड असल्याने जठर आत उष्णता व ऍसिडिक स्त्राव वाढवते.

🛑५)जसा आहार तशी प्रकृती .उष्ण,तीक्ष्ण,आम्लधर्मी पित्ताशी सामान गुणधर्माचे पदार्थ खाल्यास समानाने समानाची वृद्धी होऊन पित्त वाढतेच.

🛑६)पित्त वाढण्याला झोपेची अनियमितता कारणीभूत ठरते. रात्रीची जागरणे ,पार्ट्या, उशिरा उठणे,दुपारची झोप याने हमखास पित्ताचा त्रास बळावतो. पिष्टमय पदार्थाच्या पचनासाठी ५-६ तास,तेलकट पदार्थांच्या पचनासाठी ८-१० तास, प्रथिनांच्या पचनासाठी ६-८ तास वेळ लागतो. क्षारयुक्त,अल्कली पदार्थांच्या पचनासाठी ४ तास झोप पुरेशी होते. पण जस अन्न तशी झोप घ्यावयाची हे माहीतच नसते. व त्यामुळे पित्त वाढते.

🛑७)अतिरुचकर पदार्थ , तेलकट पदार्थांच्या सेवनाने जास्त तहान लागते व पाणी जास्त प्यायले गेल्याने अन्नाचे पचन नीट होत नाही परिणामी पित्त वाढते.

🛑८)जास्त प्रमाणात अन्न घेतल्यामुळेही पित्त वाढते.

वरील सर्व गोष्टी वाचून आपल्या सहज लक्षात आलं असेल कि आम्लता आरोग्याचा व तारुण्याचा महान शत्रू आहे. यासाठी रोजच्या आहारात २/३ पदार्थ अल्कली व फक्त १/३ आम्लधर्मी असायला हवेत. आता अल्कालाईन पदार्थ कोणते?-तर फळे,पालेभाज्या,दूध,ताक,कोबी,बदाम,पिस्ते,गाईचे तूप इत्यादी... तसेच क्षारयुक्त व सत्त्वयुक्त फळांच्या सेवनाने पित्त कमी होते.यासाठी लंघन करून पोटाला विश्रांती द्यावी लागते. कारखान्यात शटडाऊन वीक असतो,मग आपण काही तास तरी पोटाला विश्रांती नको का द्यायला ...

कारल्याचा रस ,आवळ्याचा रस आल्याचा रस तुमच्या पचनाला मदत करतील. तुमच्या लिव्हर वरचा ताण कमी करतील. परंतु या सर्व गोष्टी तात्पुरत्या काम करतील ,त्यामुळे महत्वाचे आहाराचे व विहाराचे नियम पाळलेले सर्वात उत्तम. तुमच्या रोजच्या जेवणातील लसूण,पांढरा कांदा,सलाड,मेथीची भाजी,मोडाचे मूग अश्या पदार्थातून तुमच्या मोठ्या आतड्याला चोथा (फायबर )मिळून पचनास मदत होईलच शिवाय पोट हि साफ होईल. पण ज्यांना पित्ताचा खूपच त्रास आहे त्यांनी कांदा व लसूण कच्चा खाऊ नये ,जेवणातून शिजवून खावा. शरीरातील आम्लता कमी करण्यासाठी तुम्हाला पथ्य पाळावेच लागेल. चहा ,कॉपी,व्यसने, बंद करावी लागतील. शिळे,शीतकपाटात ठेवलेले अन्नपदार्थ पुन्हा पुन्हा गरम करून खाल्ल्याने खूप प्रमाणात आम्लता वाढते हा महत्वाचा मुद्दा अनावधानाने सांगायचं राहिलाच ... जे आपण वारंवार करतो. चहा कॉपी हे सुद्धा व्यसनच आहे ...

ऍसिडिटी वाढण्याचे महत्वाचे कारण म्हणजे व्यायामाचा,कष्टाचा आभाव...तेव्हा रोज व्यायाम ,सायकलिंग,पोहणे,योग,एरोबिक्स,सूर्यनमस्कार...इत्यादी. पैकी काहीतरी केलं पाहिजे. जेवणानंतर १०-१५ मिनिटे वज्रासनात बसने...व नंतर शतपावली करणे जरुरी आहे. पचनशक्ती सुधारण्यासाठी पवनमुक्तासन,धनुरासन,भुजंगासन,वज्रासन आदी आसने योग्यतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने करावीत .

🛑 9वरीलप्रमाणे आरोग्य नियम 

पाळावे बाहेर चे खाने बंद करावे


🛑10 रोज रात्री झोपताना 1

त्रिफळा पावडर 2 ग्लास कोमट पाणी सोबत घेतले तर 

अँसिडिटी कमि होते



बाभळिच्या ###शेंगांचे औषधिय..व गुणकारी.. फायदे* 👇

 *####बाभळिच्या ###शेंगांचे औषधिय..व गुणकारी.. फायदे* 👇


... आयुर्वेदात अशा अनेक वनौषधी आणि वनस्पती आहे, ज्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे यातिल बाभुळिच्या शेंगांना फार मौल्यवान मानले जाते. खुपच गुणकारी आहे तर बघू या फायदे 👇

  ..... (१)..गुडघेदुखित बाभळीच्या शेंगांचे चूर्ण उपयुक्त आहे.. व्रुध्दापकाळात सांधेदुखी, ही सामान्य समस्या आहे आणि गुडघेदुखी तर चाळिसिनंतर चालू होते. तेव्हा. या शेंगांचे चूर्ण सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर घ्यावे हे चूर्ण कोणत्याही आयुर्वेद शाॅपला नक्कीच मिळेल, याने काही दिवसांतच ,, गुडघेदुखी,, समूळ नष्ट होते..


....(२).. डोकेदुखी दूर होते.. वाढता ताण-तणाव, चिंता, धावपळ, यामुळे. सतत डोकेदुखी असणं ही समस्या घरोघरी आढळून येते, अशा वेळी बाभुळ शेंगाचि पावडर कोमट पाण्याबरोबर घ्यावी, लगेच आराम मिळतो..


....(३) स्त्रियांसाठी शेंगांचे चूर्ण फायदेशीर आहे... आजकाल बहुतेक महिलांना ल्यूकोरिया चा त्रास होतो, श्वेतप्रदर,. . पांढरे पाणी जाणे, हि समस्या बहुतेक महिलांना होतो. तेव्हा. या शेंगांचे चूर्ण सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर घ्यावे. याने आराम मिळतो नक्कीच..


......(४).. पुरुषांसाठी या शेंगांचे चूर्ण फायदेशीर ठरते.. बाभळीच्या शेंगांचे चूर्ण पुरुषांना देखील फायदेशीर आहे. ज्यांना धातूक्षयाचा त्रास असेल. त्यांनी हि पावडर. नियमितपणे कोमट पाण्याबरोबर घेतल्यास फायदा होतो.. वंध्यत्व दूर होते..


.......(५).. पाठदुखी कंबरदुखी या त्रासात आराम देण्यासाठी बाभळीच्या शेंगांचे चूर्ण फायदेशीर आहे.. एकाच स्थितीत बराच वेळ बसल्यामुळे पाठदुखी कंबरदुखी चा त्रास होतो, आजकाल बहुतेक लोक बसून काम करतात त्यामुळे पाठदुखी देखिल सामान्य समस्या आहे, तेव्हा हि पावडर उपयुक्त ठरते, जेवणानंतर एक चमचा भरून चूर्ण कोमट पाण्याबरोबर घ्यावे. याने छान आराम मिळतो नक्कीच.. जमल्यास हि पावडर दूधासोबत घेतल्यास स्नायू बळकट होतात..


..... जूलाबाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी. बाभळीच्या शेंगांचे चूर्ण फायदेशीर आहे.. बरेच वेळा , बाहेरच्या खाण्यामुळे, पोट खराब होऊन पातळ जुलाब होतात, अतिसार होतो, गळल्यासारखे होते,. यांच्यावर शेंगांचे चूर्ण हे रामबाण औषध आहे, थोडं चूर्ण पाण्यासोबत घेतल्यास आराम मिळतो


...(७). . अशक्तपणा, कमजोरी वाटणे, यावर..जर तुम्ही शारिरीक दृष्ट्या अशक्त असाल तर , तुम्ही. बाभळीच्या शेंगांचे चूर्ण पाण्यात किंवा दुधात मिसळून रोज एक वेळा सेवन करू शकता. आणि वाटलं तर मधात मिसळून चाटण म्हणून घ्या.. 


..... तेव्हा वरिल फायदे बघता .. बाभळीच्या शेंगांचे चूर्ण.. अतिशय मौल्यवान औषध आहे.. आणि सहज आयुर्वेद दुकानात मिळतं.. जरुर हि पावडर घरात असू द्यावि..


.........###आयुर्वेद##अभ्यासक....... सुनिता सहस्रबुद्धे... निरामय आयुर्वेद व होमिओपॅथी प्रचार!!!


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


इंद्रवज्र निसर्गाचा आविष्कार

 


सावधान गृहिणींनी

 મુલુંડ માં બનેલી ઘટના please be careful


Congratulations

 It gives me immense pleasure to announce that our Karate Student's of *"Japan Shitoryu Karate - Do, India"* which is affiliated with *AISKU, APSKF, & WSKF* represented India at the International Karate Championship in Abu Dhabi, UAE at the Al Jazira Club on 21st May 2023 where participants from 42 countries fought for the identity of their respective Countries.

Our Team India under the auspicious Guidance of 

 *Kyoshi C. S. Arun Machaiah* and Coach

 *Kyoshi Rahul S. Tawde* 

gave a splendid performance and brought glory to our Country.

The results are as follows;


 *Mit Y. Pawar* 

Kata : 1st Place

Kumite : 1st Place


 *Shreeyans R. Tawde* 

Kata : 1st Place

Kumite : 3rd Place


 *Saisha N. Mumbaikar* 

Kata : 2nd Place

Kumite : 1st Place


 *Tuaha T. Gondekar* 

Kata : 3rd Place

Kumite : 3rd Place


 *Omkar V. Babar* 

Kata : 1st Place

Kumite : 2nd Place


We wish them every success in Fu





ture.

राज्य शासनाच्या फ्लॅगशिप कार्यक्रमांची गतीनेअंमलबजावणी करावीl

 राज्य शासनाच्या फ्लॅगशिप कार्यक्रमांची गतीनेअंमलबजावणी करावीl

                          - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

        अहमदनगर, दि.26 : - राज्यातील जनतेच्या हितासाठी राज्य शासनामार्फत अनेक महत्त्वाकांक्षी (फ्लॅगशिप )कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या सर्व कार्यक्रमांची प्रशासनाने गतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विविध योजनांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.


            या बैठकीस महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार सुजय विखे-पाटील आमदार बबनराव पाचपुते, आमदार प्रा.राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, आमदार प्राजक्त तनपुरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्याने 651 कोटी रुपये खर्च करत 1 हजार 35 गावांमधून 32 हजार कामांद्वारे 2 लाख 98 हजार हेक्टर जमीन संरक्षित सिंचनाखाली आली आहे. या अभियानामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादकता वाढून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्यात यश मिळाले आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या टप्पा 2 मध्ये जिल्ह्यातील 257 गावांची निवड करण्यात आली आहे. टप्पा दोन मधील कामे करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच अंतिम आराखडा तयार करावा. तसेच ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या योजनेमध्ये लोकसहभाग वाढवत कामांना अधिक गती देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.


            प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जिल्ह्याने उत्कृष्ट काम केल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक करत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आता मोदी आवास योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेसह शबरी, रमाई, प्रधानमंत्री आवास योजना एकत्रित करून १० लाख घरे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार जिल्ह्याने त्यांचे उद्दिष्ट वाढवून समाजातील सर्व घटकांना न्याय देऊन पात्र गरजूंना लाभ देण्यासाठी मोहीम राबवावी, असेही ते यावेळी म्हणाले.


            सर्वसामान्यांना विविध दाखल्यांसाठी शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागू नयेत यासाठी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. दोन महिन्यात जनतेपर्यंत मोठ्या प्रमाणात त्यांच्यासाठीच्या योजना पोहोचवायच्या असून जिल्ह्याचे दीड लाख दाखले वाटपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.


            सौर कृषि वाहिन्यांचा पथदर्शी प्रकल्प सर्वप्रथम अहमदनगर जिल्ह्यात राबविण्यात आला आहे. कृषीवाहिन्या या शंभर टक्के सौर कृषि वाहिन्यांमध्ये करण्यासाठी जिल्ह्यात मोठा वाव आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याचे आवाहन करत याद्वारे शेतीला दिवसा विनाव्यत्यय वीज देता येणार आहे. सरकारी जमिनी उपलब्ध नसणाऱ्या गावात शेतकऱ्यांच्या पडीक जमिनी भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहेत. या जमिनीला महावितरणमार्फत प्रति एकर, प्रतिवर्ष ५० हजार रुपये भाडे दिले जाणार असल्याने मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेच्या अंमलबजावणीसाठी वेगाने कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.


            जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटीची रक्कम शासनाकडून देण्यात आली आहे. ही रक्कम येत्या 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासनाला यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिले.


            यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियान टप्पा २.०, मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व शहरी, जलजीवन मिशन, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, शासन आपल्या दारी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या योजनांसह नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा व दिलेल्या मदतीचा आढावा घेतला.


            पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, जिल्ह्यातील विकासकामांना समन्वयाद्वारे गती देण्यात येत असून जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात

 झालेल्या कामांमुळे श


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्तीसमाधान शिबिरात आज ११२ तक्रारींचे निराक

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्तीसमाधान शिबिरात आज ११२ तक्रारींचे निराकरण


        मुंबई,दि. २६ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात खार (पश्चिम) एच पश्चिम वॉर्ड येथे आज ६३५ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ११२ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित तक्रारी देखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

       यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.       

     हा उपक्रम ३१ मे २०२३ पर्यंत दुपारी ३ ते 5.30 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येवू शकणार आहे.

Featured post

Lakshvedhi