Friday, 26 May 2023

सहकार मंत्र्यांच्या कार्यालयातून एक फोन अन्…शेतकऱ्याच्या खात्यात ५० हजारांचे अनुदान जमा

 सहकार मंत्र्यांच्या कार्यालयातून एक फोन अन्…शेतकऱ्याच्या खात्यात ५० हजारांचे अनुदान जमा


 


            मुंबई,दि. २६: महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपयांच्या अनुदानापासून वंचित असलेल्या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सहकार मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयाच्या एका फोनवरून अनुदान मिळण्यास मदत झाली आहे.


            राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याचा निर्णय घेतला. या अनुदानाचा लाभ राज्यातील सुमारे १४ लाखांहून शेतकऱ्यांना मिळत आहे. मात्र, ग्रामीण भागातील काही शेतकऱ्यांपर्यत हा प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ पोहोचत नसल्याने शेतकरी थेट सहकार मंत्र्यांकडे निवेदने/तक्रार अर्ज देत आहेत. त्याची सहकार मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयातील अधिकारी यांनी दखल घेवून तातडीने कार्यवाही देखील करीत आहेत.


            यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बेलोरा येथील एक नियमित कर्जफेड करणारे वयोवृद्ध शेतकरी नथ्थु जाधव यांनी अनुदान मिळत नसल्याने याबाबत चौकशी व्हावी यासाठी थेट सहकार मंत्र्यांच्या नावे मंत्रालयातील कार्यालयात निवेदन/ तक्रार अर्ज दिले. बुधवारी (दि.२४) मंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी यांनी याची दखल घेत तात्काळ विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून माहिती घेतली. यात शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानाच्या लाभासाठी पात्र होते, मात्र बॅंक खात्याच्या आधार प्रमाणीकरणानंतर नावातील फरकामुळे हे अनुदान अडले होते. ही तांत्रिक अडचण लक्षात येताच ती तत्काळ दूर करून शेतकऱ्याला लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना त्यांनी सहकार विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर त्याच दिवशी काही क्षणातच शेतकरी जाधव यांच्यासह १२ शेतकऱ्यांच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या खात्यात ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान जमा झाले. सदर अनुदान शेतकऱ्यांना मिळाले की नाही याचा पाठपुरावा करून खात्री देखील मंत्री कार्यालयाने करुन घेतली.


            हा प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळाल्याने वयोवृद्ध शेतकरी नथ्थु जाधव यांनी समाधान व्यक्त करुन सहकार मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांचे आभार मानून त्यांच्या कामाचे कौतुकही केले. या उदाहरणातील तत्परतेतून विभागाची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. राज्य शासनाचे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारे प्रोत्साहनपर अनुदान नक्कीच बळीराजाला प्रोत्साहन देणारे ठरेल.


            “राज्य शासन आणि सहकार विभाग महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करीत आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत १३ लाख ९० हजार इतक्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनाने ५ हजार ५५ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. शासनाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सहकार विभाग आणि आपल्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना नेहमी दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत शिबीर आयोजित करण्याच्या सूचना दिल्या जातील,” अशी प्रतिक्रिया सहकार मंत्री अतुल सावे यांनी दि

ली.  


00000


केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय विभागाचा घेतला आढावा

 केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय विभागाचा घेतला आढावा


            मुंबई, दि.२६: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय विभाग व इतर विभागातील अधिकाऱ्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेऊन विकासकामांचा आढावा घेतला.


           सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी सामाजिक न्याय विभागातील योजनेची यावेळी माहिती दिली. या बैठकीला झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाचे उप मुख्य अभियंता श्री.मिटकर, म्हाडाचे निवासी कार्यकारी अभियंता श्री. सानप, सामाजिक न्याय विभागाचे अवर सचिव सतीश खैरमोडे उपस्थित होते

.  


पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थराज्यातील ५० गावांमध्ये सामाजिक सभागृह

 पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थराज्यातील ५० गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता


ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन


 


               मुंबई दि.२६ : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यातील ५० गावांमध्ये भव्य व सुसज्ज सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.   


            नुकत्याच झालेल्या बैठकीत श्री महाजन यांनी या ५० गावात सामाजिक सभागृह उभारण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली . या माध्यमातून जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, जालना, नंदुरबार, पुणे, नांदेड, यवतमाळ, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, अमरावती, नागपूर आदी जिल्ह्यांतील गावांची निवड करण्यात आली असून लवकरच बांधकाम करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात येणार असल्याची माहितीही श्री महाजन यांनी दिली.


            विविध जिल्ह्यातील पहूरपेठ, वाकोद, पहुरकसबे, ता. जामनेर, लोहारा, कुऱ्हाड. ता, पाचोरा, म्हसावद ता.जळगाव, अहिरवाडी, ता रावेर. शिरसाळा, ता.बोदवड, चहार्डी ता. चोपडा, पाळधी, ता.धरणगाव, निमगाव घाना, ता.अहमदनगर, मोहरी ता.पाथर्डी, आस्तेगाव. ता.राहता, मुकिंदपूर ता.नेवासा, पट्टनकोडोली, ता. हातकंणगले, आदमापूर ता. भुदरगड (गारगोटी), वाशी, ता. करवीर, घाणेवाडी ता. जालना, टेंभुर्णी, ता जाफराबाद, चिंचोली निपाणी, ता. भोकरदन, आनंदगाव, ता. परतुर, म्हसावद ता. शहादा, नागरे ता. पुरंदर, जाडकरवाडी ता. आंबेगाव, माळेगांव, रीसनगांव ता.लोहा, शेळगाव छत्री, ता. नायगाव(खै), वझरगा.ता देवलूर, नरसी, ता.नायगांव, पोफळी ता.उमरखेड, मंगलादेवी ता.नेर, चिखलगाव, ता.वणी, धनगरवाडी, ता.दारव्हा, मारवाडी बु. ता. पुसद, भरणे, ता.खेड, कांबळेश्वर, ता.फलटण, टाकेवाडी, ता.माण, वाठार स्टेशन, ता.कोरेगाव, तरंदल (धनगरवाडी) ता. कणकवली, खेडी, ता. सावली, बेम्बाळ, ता. मूल, थुतरा ता. कोरपना, तेमुर्डा ता. वरोरा, भंगाराम तळोधी, ता.गोडपिंपरी, नवरगाव ता.सिंदेवाही, वाठोडा शुक्लेश्वर ता.भातकुली, घोराड ता.कळमेश्वर, रोहणा -इंदरवाडा ता.नरखेड, बेला ता.उमरेड, केळवद, ता.सावनेर या ५० गावांचा समावेश आहे.


            पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ बांधण्यात येणाऱ्या सामाजिक सभागृहासाठी निवडण्यात आलेल्या गावातील ग्रामपंचायतींच्यावतीने सभागृह बांधण्यासाठी जागेची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. याठिकाणी सुसज्ज ५० सामाजिक सभागृह बांधण्यात येणार आहेत.

अवश्य वाचा व स्वतःला खूप हायफाय समजणाऱ्यांना अवश्य पाठवा*

 *अवश्य वाचा व स्वतःला खूप हायफाय समजणाऱ्यांना अवश्य पाठवा*


ज्येष्ठ शास्त्रज्ञ श्रीमती माधुरी बापट यांचा विचार करायला लावणारा लेख!

👇

*सुवर्ण मध्य !*

👇

अलिकडेच लिहिलेल्या माझ्या एका 'पोस्ट'ला ब-यापैकी प्रतिसाद मिळाल्याने ही 'पोस्ट' लिहायचं ठरवलं. काही वर्षापूर्वी माझ्या बहिणीच्या दहा वर्षाच्या नातवाने मला त्याच्या सायन्सच्या घरच्या अभ्यासात मदत मागितली. आता तो बारावीला आहे. 

..

विषय होता आधुनिक संशोधनाचे माणसावर होणारे वाईट परिणाम. माझ्या शिकवण्याचाच हा एक भाग असल्याने मी उत्साहाने त्याला मदत केली. विमाने, मायक्रोवेव्ह ओव्हन, मोबाईल फोन्स, वाय फाय, मेडिकल एक्स रेज, रेफ्रिजरेटर, प्रेशर कुकर, इलेक्ट्रिक कॅन ओपनर, कॅन फूड , कंप्यूटर मौस, वगैरे वगैरे. यातील प्रत्येकाचाच होणारा वाईट परिणाम ऐकून त्याची आई, माझी भाचे सून म्हणाली, ‘म्हणजे कुठल्याच गोष्टी सुरक्षित नाहीत का?’ माझे उत्तर होते, ‘कुठल्याही गोष्टीत चांगले वाईट असणारच. त्याचा उपयोग आपण मर्यादित ठेवला तर त्यापासून इजा व्हायची शक्यता कमी. त्याच्या आहारी गेलं तर धोका संभवतो.’

..

माझे वडील म्हणायचे माणसानं थोडं शहाणं नि थोडं खुळं असावं. प्लास्टिकचा त्यांना तिटकारा होता. प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी विशेषत: लूक वॅार्म, पिण्यानं त्यातील ॲस्ट्रोजेन सदृश मॅालिक्यूल रक्तात जातो. जो पुरुषांच्यात बायकीपणा व बायकांच्यात कॅन्सर निर्माण करू शकतो.

..

विमाने तीस चाळीस हजार फुटांवरून उडत असतांना नेहमीपेक्षा दहा वीस पटीने सूर्याकडून वा इतरत्र आलेली वाईट रेडिएशन्स ( गॅमा, एक्स रे, अल्ट्रा व्हायोलेट वगैरे) आपल्या शरीरात शिरतात. मी स्वत: एका फ्लाईटमध्ये गायगर कौंटर नेला होता व ३५,०००फुटावर असतांना नेहमीपेक्षा वीसपट रेडिएशन कौंट्स बघितले होते. ज्याने कॅन्सर होऊ शकतो. बहुतेक सर्व पायलट्स, एअर होस्टेसेस कॅन्सरने दगावतात. 

..

न्यूक्लिअर फिजिक्सचा कोर्स शिकवतांना मी विद्यार्थ्याना एक सर्व्हे भरायला देत असे. तुमच्या लाईफ स्टाईलवर आधारीत वर्षात किती रेडिएशन तुमच्या शरीरात जाते, हे अजमावण्यासाठी. यात तुम्ही कुठे रहाता म्हणजे समुद्रसपाटीपासून किती उंचीवर, सिगरेट ओढता का, विमानाने किती तास प्रवास करता, किती एक्स रे काढून घेता यासारख्या गोष्टीवरून ठरवता येते.माझी एक विद्यार्थिनी तीस वर्षापूर्वी कोसोव्हच्या युद्धात दर दोन आठवड्याने मिलिटरी विमानाने सैनिकांना औषधे वगैरे पोहोचवण्यासाठी जात असे. तिने तो सर्व्हे भरला नाही. म्हणाली, ‘मी कॅन्सरने मरणार हे मला माहीत आहे. पण आपल्या सैनिकांसाठी मी ते खुशाल सहन करीन.’

..

भारतात विमानाचा प्रवास तेवढा पॅाप्युलर नाही. पण अमेरिकेत काही लोक सतत विमानाने प्रवास करतात. दर तासाला १० मिलीरिम एवढे रेडिएशन शरीरात जाते. वर्षात ३६० मिलीरिमची मर्यादा घातलेली आहे. त्यातले अर्धे तर नैसर्गिक रीत्याच शरीरात घुसते. अगदी उन्हात रोज तासाभरापेक्षा जास्त वेळ घालवू नये. दर वर्षी अमेरिकेतूम भारताच्या एक दोन वार्या करणारी मंडळी आहेत. प्रत्येक वारीत ४०० मिलीरिम रेडिएशन शरीरात जाते. मी स्वत: सरासरी तीन वर्षात भारताची एक वारी करते.

..

मायक्रोवेव्ज ह्रदयाला वाईट असतात. एम. एस. साठी मी लाईव्ह मायक्रोवेव्ज वापरून माझा प्रॅाजेक्ट केला होता. तेव्हा माझ्या ॲडव्हयझरने मला सांगितले होते, ‘Don’t get pregnant while working on your project.’ शिवाय त्यात पदार्थ चांगले शिजत नाहीत. त्यामुळे त्यातील बॅक्टेरिया वगैरे मरत नाहीत. कारण पाण्याचा मॅालीक्यूल २.५ गीगॅ हर्ट्झ फ्रीक्वेन्सीने कंप पावून ते गरम होते. त्या वेव्ज ह्रदयाला हानिकारक असतात. म्हणून मायक्रोवेव्ह ओव्हनचा उपयोग कमीत कमी करावा.

..

कॅन फूड टाळावे. त्यातील प्रिझर्व्हेटिव्ज वाईट असतात व अलुमिनम रक्तातून मेंदूत जाऊन अल्झायमर होऊ शकतो. इलेक्ट्रिक कॅन ओपनर तर सर्वात वाईट. मायक्रोवेव्हपेक्षाही जास्त रेडिएशन्स त्याने शरीरात घुसतात.

..

मोबईल फोन्स रेडिओ फ्रिक्वेन्सीवर चालतात. ती जरी तेवढी घातक नसली तरी वर्षानुवर्षे वापरल्याने कॅन्सर होऊ शकतो. तीस वर्षापूर्वी ते टेस्ट करणार्या मोटरोलातील एका शास्त्रज्ञाला कानाजवळ कॅन्सर झाला. भारतात मोबाईल व मायक्रोवेव्ह ओव्हन वापरायचे प्रमाण खूपच वाढलेले आहे, असं माझ्या लक्षात आलं.

..

केवळ इन्शुरन्स पैसे भरतो म्हणून सतत मेडिकल एक्स रेज काढून घेऊ नयेत. त्यानेही कॅन्सर उद्भवू शकतो. केवळ डॅाक्टर म्हणतात म्हणून दिलेल्या औषधाचा पूर्ण डोस घेण्या आधी वा एखादी सर्जरी करण्याआधी दुसर्या डॅाक्टर वा सर्जनचे मत अजमावावे. विशेषत: जनरल अनॅस्थेशिया द्यावा लागणार असेल तर. ॲंजियोप्लास्टीचे पण प्रमाण फार वाढले आहे. बहुतेकवेळा प्रॅापर डाएट, व्यायाम, वगैरेनी ती टाळता येते.

..

सतत फ्रिजमधील पाणी वा अन्न खाल्याने तसच प्रेशर कुकरमध्ये शिजवलेले अन्न खाल्ल्याने वजन वाढते. १९८४ सालापासून मी कंप्यूटरवर टाईप करत आहे. त्याने माझ्या दोन्ही मनगटातील नर्व्हज दाबल्या जाऊन दोन्ही हाताच्या बोटात नम्बनेस आलेला आहे. तो ॲार्थोपेडिक सर्जनकडून शस्त्रक्रिया करून बरे होईल असं डॅाक्टरचं म्हणणं आहे. टी. व्ही. व कंम्प्युटर स्क्रीनकडे सतत बघून डोळ्यांची वाट लागते हे सर्वश्रुतच आहे.

..

अर्थात कामासाठी नोकरीसाठी लोकांना काही गोष्टी कराव्याच लागतात. ते वेगळे. ही सगळी माहिती तुम्हाला घाबरवून टाकण्यासाठी दिलेली नाही तर तुमच्यात एक प्रकारची जाणीव, जागृती यावी म्हणून दिलेली आहे. जुनं ते सोनं म्हणून त्याला कवटाळून रहाणं जेवढं वाईट तेवढंच केवळ आधुनिक म्हणून त्याच्या फशी पडणंही बरोबर नाही. अति तेथे माती म्हटल्याप्रमाणे कुठलीही गोष्ट एका टोकाला जाऊन करू नये. आपणा सर्वांना सुवर्ण मध्य शोधता यावा हीच सदिच्छा!

..

पंचवीस वर्षांपूर्वी एकदा माझे बी. पी. वगैरे एकदम पर्फेक्ट आलेले बघून माझ्या अमेरिकन डॅाक्टरने मला विचारले. ‘यावेळी तू वेगळं काय केलस?’ तेव्हा त्याला सांगितलं होतं, ‘काल आमचा उपास होता. (आषाढी एकादशीचा) मी फोनला हात लावला नाही, टी. व्ही. बघितला नाही की कारमध्ये बसले नाही. फक्त भक्तीगीते ऐकली, ध्यान धारणा केली.’ त्यावर तो म्हणाला होता, ‘असं दर रवीवारी करत जा. तुला औषधाची कधी गरजच पडणार नाही.


- माधुरी बापट

===


[संक्षिप्त परिचय: श्रीमती माधुरी बापट यांनी पुणे विद्यापीठातून न्यूक्लिअर फिजिक्समध्ये एम. एस्सी. केल्यानंतर ओहायो येथील राईट स्टेट युनिव्हर्सिटीतून प्लाझ्मा फिजिक्समध्ये

एम. एस. डिग्री.

..

त्यानंतर अमेरिकेत सलग ३५ वर्षे भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका, ७ वर्षे गणिताच्या व ३ वर्षे खगोलशास्त्राच्या ही प्राध्यापिका. काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त व त्यानंतर सातत्याने लेखन व संशोधन.]

*थायराँईड.....**थायराँईड साठी उपाय व उपचार...*

 *थायराँईड.....**थायराँईड साठी उपाय व उपचार...*


*उपाय...१*

ऊपाशी पोटी 

1 चमचा जवस पावडर दिवसात ३ वेळा.

1 चमचा धणे पावडर १ वेळा.

1 एक चमचा बडिसोप १वेळा.

पावडर न करता खाऊ शकता किंवा कोमट पाण्यासोबत पावडर करुन घेऊ शकता सकाळी 

रोज खायची 3 महिने 

 उपाशी पोटी.


 *उपाय...२*


 सकाळी 

अंघोळ करतांना तोंडात कोमट पाणी पुर्ण भरुन घ्या व अंघोळ होई पर्यंत तसेच पाणी ठेवा त्यांने थायरॉईड ग्रंथी ॲक्टिव होऊन सुरळीत काम करते.


*उपाय...३*


अनुलोम विलोम प्राणायाम 7 मिनिटे.

उज्जायी प्राणायाम 10 मिनीटे.

कपालभाती 10 मिनिटे.

रोज सकाळी संध्याकाळी हे प्राणायाम करा.


*उपाय...४*


वजन वाढले असेल तर 

भोपळ्याचे (लौकी) ज्युस 20ml प्यावे.

एक ग्लास कोमट पाणी 20 मिली कोरफड ज्युस त्यात 10 तुळशीचा रस टाका.


*उपाय...५*


दररोज तांब्याच्या भांड्यातीलच पाणी प्यायचे.


*उपाय...६*


 नारळाच्या झाडाच्या ४ मूळ्या पेन च्या आकाराच्या घेऊन याचा काढा बनवुन रोज संध्याकाळी 21 दिवस प्यायचे.


*उपाय...७*


रात्री ब्रश करुन झोपा, सकाळी उठल्याबरोबर आपल्या लाळेने थायराँईड ग्रंथीला स्पर्श करुन सावकाश १० १२ वेळा चोळायचं आहे.


*उपाय...८*


थायराँईड ग्रंथीला स्पर्श होईल अशी सुती कापडाची गरम पाण्याची पट्टी करुन रात्री ३० मिनिटे ठेवायची. 


*उपाय...९*


रोज रात्री झोपतांना सोन्याचा दागिना थायराँईड ग्रंथीला स्पर्श होईल अशा पद्धतीने रात्रभर ठेवा.


*उपाय...१०*


आपल्या आहारातुन पांढऱ्या मिठाचा वापर बंदच करुन त्या ऐवजी 

सैंधव मिठ व काळ्या मिठाचा वापर करावा.


*उपाय़...११*


मूठभर वारुळाची माती, मूठभर कडुलिंबाचा पाला त्यामध्ये टाकून माती शिजवून घ्यावी व आपल्या थायरॉईड ग्रंथी जवळ रोज रात्री झोपताना कोमट असताना 21 दिवस ठेवावे.


*उपाय़...12*


अति ताणतणाव आपल्या आजाराचे मुळ कारण असल्यामुळे तणावरहीत जीवन, पुरेशी झोप आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. योगा प्राणायाम ध्यान आहार याने आपला आजार आपण १०० % बरा करु शकता.


 3 महिन्यात कुठल्याही प्रकारचा थायरॉईडचा त्रास 100% कमी होईल आणि आराम मिळेल.


*राजु गोल्हार आरोग्य संवाद गृप, अौरंगाबाद,*

*सुनील इनामदार,संग्रहक.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


A मु ल

 अमूल की लस्सी या जो पैकेट वाला तरल पदार्थ पीने से पहले एक बार जरूर चेक कर लेवे। वह कितना भी बड़ा ब्रांड क्यों ना हो एक बार जरूर चेक कर लेवे।                  अगर आप का शरीर स्वस्थ है, तो यह जहां आपका है। जागरूक रहें सतर्क रहें सावधान रहें।🙏🏻🙏🏻😨😨😨


व्यापाऱ्यांच्या राज्यव्यापी संघटनेचा वर्धापन दिवस राज्यपालांच्या उपस्थितीत साजरा

 व्यापाऱ्यांच्या राज्यव्यापी संघटनेचा वर्धापन दिवस राज्यपालांच्या उपस्थितीत साजरा


केंद्र व राज्य शासनाप्रमाणे स्थानिक शासनाने व्यापार सुलभीकरण करावे


- राज्यपाल रमेश बैस


 


            मुंबई, दि. 26 : देशाला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट प्राप्त करण्यामध्ये व्यापाऱ्यांची भूमिका महत्वाची आहे. व्यापाऱ्यांचा संबंध स्थानिक प्रशासनाशी अधिक येतो. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाप्रमाणे स्थानिक शासनामध्ये 'व्यापार सुलभीकरण' (इज ऑफ डुईंग बिझनेस) करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.


            फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फॅम) या व्यापारी संघटनांच्या शिखर संस्थेचा ४५ वा स्थापना दिवस राज्यपाल श्री. बैस यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. २५) बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.


            कार्यक्रमाला पर्यटन, महिला व बालकल्याण तसेच कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, फेडरेशनचे अध्यक्ष जितेंद्र शाह, महासचिव प्रितेश शहा, मानद अध्यक्ष विनेश मेहता, वरिष्ठ उपाध्यक्ष आशिष मेहता व राजेश शहा तसेच व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 


            आज सर्वच क्षेत्रात महिला पुढे येत असताना किरकोळ व्यापार क्षेत्रात महिलांचे प्रमाण कमी आहे, महिलांनी व्यापार क्षेत्रात अधिक प्रमाणात यावे, यासाठी व्यापारी संघटनांनी अनुकूल वातावरण तयार करावे, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.    


            नोकरीच्या मागे न लागता युवकांनी व्यापाराकडे वळावे, असे आपण सांगत असतो. मात्र, व्यापारी वर्गासाठी स्थानिक पातळीवर अडचणी येत असतात. व्यापार संघटनांनी आपल्या अडचणींबाबत उपाययोजना सुचविणाऱ्या शिफारसी शासनाकडे कराव्या, असे राज्यपाल श्री. बैस यांनी सांगितले.   


            राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व्यापाऱ्यांच्या समस्या ऐकून घेण्यास तसेच महिन्यातून एकदा व्यापारी संघटनेस भेटण्यास तयार आहे, असे सांगून शासन व्यापाऱ्यांना सर्व प्रकारे मदत करण्यास कटिबद्ध असल्याचे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.


            फॅमचे अध्यक्ष जितेंद्र शाह यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याची माहिती दिली.


            राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते फॅम संघटनेच्या ध्वजाचे, स्मरणिकेचे तसेच संघटना गीताचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यापारविषयक धोरणावर आधारित नृत्य नाट्याचे सादरीकरण करण्यात आले. 


०००००



 


Maharashtra Governor attends Foundation Day of


Federation of Traders Associations


 


            Maharashtra Governor Ramesh Bais presided over the 45th Foundation Day of the Federation of Associations of Maharashtra (FAM), the apex organisation representing various trade associations across Maharashtra at Birla Matushri Sabhagar in Mumbai on Thursday (25 May).


            Speaking on the occasion the Governor stressed the need to improve the Ease of Doing Business at the local level. He called upon the organisation of traders to encourage more women to assume leadership roles in trading bodies.


            Minister of Tourism, Women and Child Welfare and Skills Mangal Prabhat Lodha said he will hear the grievances of the traders associations once in a month and try to resolve them.


            President of FAM Jitendra Shah, Director General Pritesh Shah, Chairman Emeritus Vinesh Mehta, Senior Vice Presidents Ashish Mehta and Rajesh Shah and representatives of traders organisations were present.


            The Governor released the Flag, Souvenir and FAM anthem on the occasion. A dance drama depicting the policy of Chhatrapati Shivaji Maharaj towards traders was shown on the occasion.


0000

Featured post

Lakshvedhi