Tuesday, 23 May 2023

ईएसआयसी' रुग्णालयांसाठी जागा, आवश्यक सुविधा देणार

 'ईएसआयसी' रुग्णालयांसाठी जागा, आवश्यक सुविधा देणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत


राज्य कामगार विमा महामंडळाची आढावा बैठक


            मुंबई, दि. 22 : असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून 'ईएसआयसी' (कर्मचारी राज्य विमा महामंडळ) रुग्णालयांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच अन्य आवश्यक सोयीसुविधाही लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


            केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत बीकेसी येथील 'ओएनजीसी' संकुल येथे महाराष्ट्र आणि पश्चिम विभागीय राज्य कामगार विमा महामंडळाची आढावा बैठक झाली. यावेळी कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार मनोज कोटक, खासदार गोपाल शेट्टी, खासदार राहुल शेवाळे, आमदार माधुरी मिसाळ, केंद्रीय कामगार विभागाच्या सचिव आरती आहुजा, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कामगारांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य शासन कामगारांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवित आहे. श्रम प्रतिष्ठेला महत्व देण्यात येत आहे. कामगार क्षेत्रासंदर्भातील समस्या दूर करण्यासाठी तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. ई-श्रम पोर्टल यामध्ये अत्यंत महत्वाचे ठरत आहे. या नोंदणीमुळे कामगार विविध योजनांचा लाभ घेवू शकतात. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचे एकत्रिकरण व समन्वय साधून कामगारांना लाभ देण्यावर भर देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


'ई-श्रम कार्ड'साठी शिबीर आयोजित करावेत - केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव


            केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी केंद्र शासन विविध योजना राबवत आहे. यासाठी ई-श्रम कार्ड अत्यंत महत्वाचे असून ते उपलब्ध करून देण्यासाठी शिबीर आयोजित करावेत. स्वनिधी योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना,अटल पेन्शन योजना यांसारख्या योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी प्रामुख्याने राबविण्यात येत असल्याचेही मंत्री श्री. यादव यांनी सांगितले.


            कामगार मंत्री सुरेश खाडे म्हणाले, असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत विविध योजना पोहोचवण्यासाठी ई-श्रम कार्ड अत्यंत उपयुक्त असून या माध्यमातून कामगार विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. यावेळी नियोक्ता आणि कर्मचारी प्रतिनिधी यांचेसोबत त्रिपक्षीय बैठकही झाली. यावेळी विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


‘ई-श्रम’ कार्ड


            केंद्र शासनामार्फत असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने ‘ई-श्रम’ पोर्टल तयार करण्यात आले आहे. नोंदणी अंतर्गत असंघटित कामगारांना खाते क्रमांक (युनिव्हर्सल अकाऊंट नंबर) दिला जातो. ‘ई-श्रम’ कार्डच्या रुपाने असंघटित कामगारांना ओळख मिळत आहे. असंघटित कामगार, फेरीवाले, टॅक्सी ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर, स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींना याचा लाभ होत आहे.

नालेसफाईच्या कामांची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

 

नालेसफाईच्या कामांची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

पावसाळ्यापूर्वीची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावी


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            ठाणे, दि. 22 (जिमाका) :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील नालेसफाई आणि रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई, रस्त्यांची कामे ही दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.


            कॉनवूड जंक्शन येथील चौक सुशोभीकरण व रस्त्याचे काम, पवार नगरमधील रस्त्यांची कामे, टिकुजीनी वाडी ते नीलकंठ रस्ता, घोडबंदर रोडवरील आनंद नगर येथील नाला, कोरम मॉल मागील नाला आणि ज्ञानसाधना महाविद्यालय येथील परबवाडीजवळील नाल्याची पाहणी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली. आमदार प्रताप सरनाईक, माजी महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजित बांगर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.


            कॉनवूड जंक्शन येथील रस्त्याच्या कामापासून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पाहणी दौरा सुरू केला. येथील काम रेंगाळल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करून काम का रेंगाळले याचा संबंधितांकडून खुलासा घ्यावा व खुलासा असमाधानकारक असल्यास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच ठाणे शहरातील रस्त्यांच्या कामांची पाहणी करत असताना टिकूजीनी वाडी सर्कल येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाची मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी तेथील कंत्राटदाराने कामगारांना कोणतीही सुरक्षा साधने, हॅन्ड ग्लोव्हज, हॅल्मेट इत्यादी दिली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी याची तातडीने दखल घेऊन कंत्राटदारावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. रस्त्यांची कामे होणे हे जितके महत्त्वाचे आहे, तेवढेच ते बनवणारे कामगार सुरक्षित राहणे महत्वाचे असल्याचे सांगून त्यांनी या कंत्राटदाराला तत्काळ ही सामुग्री देण्याबाबत सांगितले. तसेच त्यांच्यावर याबाबत कारवाई करण्याचे निर्देशही पालिका आयुक्तांना दिले.


            यावेळी घोडबंदर रोडवरील आनंद नगर येथील स्वामी समर्थ मठात भेट देऊन दर्शन घेतले. ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाच्या इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण कोरम मॉल येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले.


सफाई कामगाराशी साधला संवाद


            ठाण्यातील नालेसफाई पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवार नगर येथील सायकल ट्रॅकची सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याबरोबर संवाद साधून कामाची माहिती घेतली. तसेच येथील रस्त्याच्या कामाची पाहणीही मुख्यमंत्र्यांनी केली.


... तर एक लाखांचा दंड


            यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, पावसाळ्यापूर्वीची कामे पाहण्यासाठी हा दौरा केला आहे. महापालिका क्षेत्रात जवळपास 134 किमीच्या रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या सर्व रस्त्यांची कामे चांगल्या दर्जाची झाली पाहिजेत. रस्त्यांच्या कामांचा दर्जा तपासण्यासाठी आयआयटीला त्रयस्थ संस्था म्हणून परिक्षण करण्याचे काम दिले आहे. रस्त्यांच्या कामांचे नमुने त्यांच्याकडे पाठविण्यात येतील. नवीन रस्त्यांमध्ये खड्डे पडले तर एका खड्ड्याला एक लाख रुपये दंड अशी टेंडरमध्ये अट टाकण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कामांचा दर्जा राखला जाईल. ही कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी महापालिका आयुक्त व संबंधित अधिकारी पाठपुरावा करत आहेत.


            पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण व्हायला हवीत. पावसाळ्यात खड्ड्यांचा त्रास लोकांना होऊ नये, यासाठी महापालिकेने नियोजन केले आहे. पावसाळ्यात ज्या ठिकाणी खड्डे पडणार नाहीत, नाले तुंबणार नाहीत, असे चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येईल. निष्काळजीपणा आढळेल व नागरिकांना त्रास होईल, अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


            ठाणे महापालिका क्षेत्रात मास्टिकचे, काँक्रिटीकरणाची, सुशोभिकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. उद्याने चांगली राहावीत, यासाठीही सूचना दिल्या आहेत. महापालिकेला राज्य शासनाकडून जवळपास 600 कोटी रुपये दिले आहेत. ठाणेकरांना कुठलाही त्रास होऊ नये, याची काळजी घेतली आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

गुरुकुल वैदिक विद्यालय

 


जर कोणत्याही हिंदू बांधवाला आपल्या मुलाला हरिद्वार गुरुकुलममध्ये शिकवायचे असेल तर आचार्य पाणिग्रही चतुर्वेदा संस्कृत वैदिक विद्यालय हरिद्वार येथे 15 मार्च ते 15 जुलै 2023 या कालावधीत मुलाखत होईल.  "मुलगा सहावी पास झाला असावा."  गुरुकुलममध्ये निवास, जेवण आणि पेये सर्व मोफत आहेत.  आणि दरमहा 8000 रुपये शिष्यवृत्ती देखील दिली जाते!  चार वेद, व्याकरण, साहित्य, इंग्रजी इत्यादी आधुनिक विषयांतही मुलांना शिक्षण दिले जाते.  आणि माणूस वेदांमध्ये पारंगत होतो.  आचार्य (M.A.) पर्यंतचा अभ्यासही निर्देशित केला जातो.  हा संदेश तुमच्या सर्व हिंदू गटांमध्ये टाका आणि तुमच्या अद्भुत सनातन धर्म शाळेचा जास्तीत जास्त प्रचार करण्यासाठी प्रत्येक हिंदूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा.

  आता आमच्याशी संपर्क साधा!

   हिरालाल जी 9654009263


  हा संदेश फक्त हिंदूंसाठी आहे, तो "प्रत्येक हिंदू" पर्यंत पोहोचू द्या.


  *सनातन धर्माच्या सत्याला वंदन* 🙏🏻

Monday, 22 May 2023

सावरकरांची जन्मभूमी भगूर येथे त्यांचे स्मारक व्हावे

 सावरकरांची जन्मभूमी भगूर येथे त्यांचे स्मारक व्हावे


                                                                 - राज्यपाल रमेश बैस


मेजर कौस्तुभ राणे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार मरणोत्तर प्रदान

            मुंबई, दि. 22 : “स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूर येथे त्यांचे भव्य स्मारक व्हावे. तसेच 'ने मजसी ने' व 'जयोस्तुते' या सावरकरांच्या काव्यरचना शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट कराव्यात”, अशा सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केल्या.


            स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे देण्यात येणारे 2023 वर्षाचे 'स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार' राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते रविवारी (दि. 21) स्मारकाच्या दादर येथील सभागृहात प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांना यावेळी 'स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार' मरणोपरांत प्रदान करण्यात आला. मेजर राणे यांच्या आई वीरमाता ज्योती राणे यांनी हा पुरस्कार राज्यपालांकडून स्वीकारला.   


            राज्यपालांच्या हस्ते आयआयटी कानपूरचे संचालक डॉ. अभय करंदीकर यांना 'स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार' देण्यात आला, तर नागपूर येथील 'मैत्री परिवार' या संस्थेला 'स्वातंत्र्यवीर सावरकर समाजसेवा पुरस्कार' देण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर विचारांच्या प्रचार व प्रसार कार्यासाठी प्रदीप परुळेकर यांना 'स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती चिन्ह' पुरस्कार देण्यात आला.


            स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी प्रास्ताविक केले तर स्मारकाचे अध्यक्ष व निवृत्त पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी आभार मानले. ज्योती राणे यांनी यावेळी कृतज्ञता सोहळ्याला उत्तर दिले. स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, विश्वस्त मंजिरी मराठे व स्वप्निल सावरकर आदी उपस्थित होते.


0000


 


Shahid Major Kaustubh Rane presented Swatantryaveer Savarkar Award posthumously


            Mumbai Date 22 : Maharashtra Governor Ramesh Bais presented the 'Swatantryaveer Savarkar Award for Bravery' to Major Kaustubh Rane posthumously. The award instituted by the Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak was accepted by Major Rane's mother Jyoti Rane in Mumbai on Sunday (21 May).


            The Governor also presented the 'Swatantryaveer Savarkar Smriti Chinha' award to Pradeep Parulekar for his work of promotion and propagation of the thoughts of Savarkar. The 'Swatantryaveer Savarkar Award for Social Service' was given to 'Maitri Parivar Sanstha' for its work of tribal welfare. The Director of IIT Kanpur Dr Abhay Karandikar was presented the 'Swatantryaveer Savarkar Science Award'.


            President of the Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak and former DGP Pravin Dixit, Executive Chairman Ranjit Savarkar, trustee Manjiri Marathe and Swapnil Savarkar and invitees were present. Veermata Jyoti Rane replied to the felicitation. 


 


 

बिइरसा र्सा मुंडा उत्कृष्ट पेसा ग्रामपंचायत’ निवडीसाठी 29 मे पर्यंत मागविले अर्ज

 बिइरसा र्सा मुंडा उत्कृष्ट पेसा ग्रामपंचायत’ निवडीसाठी 29 मे पर्यंत मागविले अर्ज


            मुंबई, दि. २२ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार, जि. पालघर यांच्या कार्यक्षेत्रातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा तालुक्यात मागील तीन वर्षे पेसा निधीची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या उत्कृष्ट पेसा ग्रामपंचायतींची निवड करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत पेसा ग्रामपंचायतींमधून प्रकल्पस्तरावर दहा ग्रामपंचायतींची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी २९ मे २०२३ पर्यंत विवरण पत्रासह अर्ज मागविण्यात आले आहेत, असे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी आयुषी सिंह यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


            विवरणपत्र प्रकल्प कार्यालयात नि:शुल्क उपलब्ध आहेत. २९ मे २०२३ पर्यंत पेसा ग्रामपंचायतींनी विवरणपत्रासह अर्ज सादर करावेत, अर्ज प्रकल्प कार्यालयात सादर करणे तसेच अर्जावर ग्रामसेवक व सरपंचांची स्वाक्षरी असणे बंधनकारक राहील. ग्रामपंचायत पेसा क्षेत्रातील असणे तसेच पेसा अधिसूचनेमध्ये नाव असणे आवश्यक आहे. अर्जासमवेत विवरणपत्र पूर्ण भरणे आवश्यक आहे. अन्यथा अर्ज बाद करण्यात येईल.


            प्रकल्पस्तरावरुन निवड समितीमार्फत निवड झालेल्या दहा ग्रामपंचायतींची नावे विभागस्तरावर, अपर आयुक्तस्तरावर सादर करण्यात येतील. तेथे निवड समितीमार्फत निवड झालेल्या पेसा ग्रामपंचायतीला दहा लाख रुपयांचा प्रोत्साहनपर निधी, प्रशस्तीपत्र आणि पदक प्रदान करण्यात येईल. विभागस्तरावर निवड झालेल्या पेसा ग्रामपंचायतींची नावे राज्यस्तरावर सादर करण्यात येतील. तेथे निवड समितीमार्फत निवड करण्यात येणाऱ्या पेसा ग्रामपंचायतींकडून १५ लाख रुपयांचा आराखडा मागवून या आराखड्यास राज्यस्तरीय समितीद्वारे मंजुरी प्रदान करण्यात येईल, असेही प्रकल्पाधिकारी आयुषी सिंह यांनी म्हटले आहे.

शासन आपल्या दारी’ला मिळणार महालाभार्थी पोर्टलची जोडअभियानाची व्याप्ती वाढवा, सर्वांना सहजपणे लाभ मिळावेत

 ‘शासन आपल्या दारी’ला मिळणार महालाभार्थी पोर्टलची जोडअभियानाची व्याप्ती वाढवा, सर्वांना सहजपणे लाभ मिळावेत


                                                                             – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 


            मुंबई, दि. २२ : ‘शासन आपल्या दारी’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महालाभार्थी पोर्टलचा उपयोग करून घेण्यात येणार असून यामुळे या योजनेची व्याप्ती वाढणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे याबाबत आज एक सादरीकरण करण्यात आले. जास्तीत जास्त नागरिकांना सहज सुलभ लाभ मिळावेत म्हणून या पोर्टलचा देखील उपयोग व्हावा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महत्त्वाच्या सूचना केल्या.


            बैठकीस मुख्य सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करिर, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


प्रारंभी या अभियानाची जबाबदारी सांभाळणारे मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव डॉ. अमोल शिंदे यांनी सादरीकरण केले व ही योजना कशारीतीने राबविण्यात येत आहे त्याची माहिती दिली. तर एमकेसीएलतर्फे विवेक सावंत यांनी महालाभार्थी पोर्टलचे सादरीकरण केले.


            ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात सुरु असून एकाच ठिकाणी एका छताखाली नागरिकांना वेगवेगळे लाभ मिळावेत अशा रीतीने याची योजना करण्यात आली आहे. आता याशिवाय महालाभार्थी पोर्टलमधून नागरिक स्वत: किंवा प्राधिकृत केंद्रावर आपली माहिती भरून सुद्धा योजनेचा लाभ घेऊ शकणार असल्याने याची व्याप्ती वाढेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.


असे काम करणार पोर्टल


            महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांनी ‘महालाभार्थी’ हे पोर्टल तयार केले आहे. नागरिकाने या पोर्टलमध्ये स्वतःची माहिती सादर केल्यानंतर, कोणत्या शासकीय योजनांसाठी हा नागरिक पात्र ठरू शकेल याची एक संभाव्य यादी उपलब्ध होते. या प्रत्येक योजनेसाठी नागरिकाने कोठे संपर्क साधणे अपेक्षित आहे व आवश्यक कागदपत्रे कोणती, याचीही माहिती नागरिकास मिळते. यामुळे नागरिक सहजपणे संबंधित योजनांसाठी अर्ज करू शकतो.


जिल्हा स्तरावर अशी होणार कार्यवाही


            जिल्ह्यातील एमएससीआयटी केंद्र, सीएससी केंद्र, इतर संगणक प्रशिक्षण केंद्र यांना यासाठी प्राधिकृत करण्यात येईल. या केंद्रांच्या नावांना प्रसिद्धी दिली जाईल, जेणेकरून नागरिक जवळच्या केंद्रावर जाऊन ‘महालाभार्थी’ पोर्टलवर नोंदणी करून लागू होणाऱ्या शासकीय योजनांची माहिती विनामूल्य मिळवू शकतील.


            ‘महालाभार्थी’ पोर्टलवर नोंदणीसाठी केंद्रावर येणाऱ्या नागरिकास केंद्राद्वारे अर्जाचा छापील नमुना दिला जाईल. नागरिकाने स्वतः किंवा स्वयंसेवकाच्या मदतीने हा अर्ज आधार क्रमांकाच्या आधारे महालाभार्थी पोर्टलवर नागरिकाचे खाते तयार करण्यात येईल.


            संबंधित केंद्राच्या प्रमुखाला महालाभार्थी पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. पोर्टल वापरण्याचे प्रशिक्षण त्यांना देण्यात येईल.



 


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे पत्र


            माहिती भरल्यानंतर पोर्टलद्वारे संबंधित नागरिकास लागू होणाऱ्या संभाव्य योजनांची माहिती देणारे, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे पत्र तयार करून या पत्राची प्रत नागरिकास देण्यात येईल. हे पत्र घेऊन नागरिक संबंधित कार्यालयात जाऊन, योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून योजनेसाठी अर्ज करू शकेल. किंवा, ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन योजनेचा अर्ज भरेल. या कामी स्वयंसेवक नागरिकास मदत करतील. त्यामुळे नागरिकास आपल्याला लागू योजना व आवश्यक कागदपत्रे यांची योग्य माहिती सहजपणे मिळेल


स्वयंसेवकांची जबाबदारी:


            नागरिकांना जवळच्या प्राधिकृत केंद्रावर जाण्यासाठी प्रोत्साहन देणे. अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नागरिक घेऊन जातील याची दक्षता घेणे, छापील अर्ज भरण्यासाठी नागरिकांना मदत करणे, केंद्रावर येणाऱ्या नागरिकांच्या सुविधेसाठी प्रयत्न करणे. नागरिकाला योजनांची माहिती देणारे पत्र मिळाल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष योजनांचा लाभ मिळावा यासाठी पाठपुरावा यासाठी स्वयंसेवक नागरिकांना मदत करतील.


वाढता प्रतिसाद


            ‘शासन आपल्या दारी’ योजनेसाठी लाभार्थींचा प्रतिसाद वाढत असून संपूर्ण महसूल यंत्रणा तसेच इतर विभागही हिरीरीने यात उतरले आहेत, आणि त्यांच्यात स्पर्धा निर्माण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. विशेषत: गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात दोन महिन्यांत एक लाख लाभार्थी झाले असून, कल्याणमध्ये दीड लाख लाभार्थींना लाभ देण्यात येत आहे. पाटण येथे योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला. याठिकाणी देखील लाभार्थींचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या अभियानासाठी १५ हजार १४६ योजना दूत नेमण्यात आले असून मुख्यमंत्री सचिवालयात ‘मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष’ आणि जिल्हा पातळीवर ‘जिल्हा जनकल्याण कक्ष’ सुरु करण्यात आले आहेत. या कक्षांच्या माध्यमातून अभियानाच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यात येते, समन्वय ठेवण्यात येतो अशीही माहिती देण्यात आली.  

घामाचा वास येणे✍

 घामाचा वास येणे✍

शरीरात त्वचेवर असलेल्या बँक्टेरीया व क्लोरोफीलच्या कमतरतेमुळे ही वास येत असतो.

उपाय-

१)कायाकल्प क्वाथ,गिलोय घनवटी दोन दोन गोळ्या

२)शितसुधा रस रोज घेणे.

३)गुलाब जल व लिंबूरस अंगाला लाऊन आंघोळ करणे.

४)बेसन व बेकींग सोडा एकत्र करुन महीनाभर अंगाला लावणे.

५)गहू रोपरस घेणे दोन चमचे

६)तुरटीच्या पाण्याने अंघोळ करणे.

७)मध व लिंबू रस ज्या पोरशन ला घाम येते तेथे लावणे.

पथ्य-मीठ,गोड पदार्थ, व मटण,मास कमी करणे,लालमटण खाऊ नये.तसेच कांदा,लसुण कमी करणे.

काय खावे-हिरवा भाजीपाला जास्त खाणे .

गजानन


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



*

Featured post

Lakshvedhi