Thursday, 18 May 2023

शिवाजी महाराज राज्याभिषेकाच्या ३५० वर्षपूर्ती महोत्सवात सहभागी व्हा




 शिवाजी महाराज राज्याभिषेकाच्या ३५० वर्षपूर्ती महोत्सवात सहभागी व्हा!.

भाजपा कार्यकर्त्यांना,शिवभक्तांना ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

पुणे , ता. १८ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे आमचा आदर्श आहेत. रयतेसाठी कल्याणकारी राजा म्हणून महाराजांची ख्याती आहे; म्हणून राजमाता जिजाऊ यांनी महाराजांना राज्याभिषेकाचा सांगितलेला अर्थ आजच्या पिढीपर्यंत प्रबोधन, कीर्तन आणि विविध उपक्रमातून पोहोचविण्याचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा शिवसेना सरकारने केला आहे. महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे ३५०व्या वर्षांचे निमित्त साधत वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात भाजपा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवि, उपाध्यक्ष माधव भंडारी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

ना. श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, प्रत्येक मराठी माणसाचा श्वास असणाऱ्या महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे ३५०वे वर्ष उत्साहात साजरे करायचे आहे. या माध्यमातून शिवाजी महाराजांचे विचार जगभरात पोहोचावे असा मानस आहे. येणाऱ्या २ जून रोजी रायगडावर राज्य सरकारकडून आयोजित कार्यक्रमाचे सुक्ष्म नियोजन करुन सर्व शिवप्रेमींना सोबत घेऊन हा सोहळा भव्यदिव्य आणि देखणा व्हावा यासाठी शिस्तबद्ध तयारी सुरू आहे. यामध्ये भाजपाचा प्रत्येक कार्यकर्तादेखील सहभागी व्हावा अशी इच्छा आहे.

ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले की, संपूर्ण जगातील लोक या सोहळ्याकडे कुतुहलाने बघत आहेत. शिवाजी महाराज यांचे व्यक्तिमत्व, पराक्रम आणि विचार नव्या पिढीसमोर ठेवण्याची ही एक संधी आहे. महाराजांची जगदंबा तलवार आणि अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी वाघनखे लंडनहुन भारतात आणण्याचा संकल्प केला असून यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. जगभरात पसरलेल्या भारतीयांना शिवाजी महाराज यांच्याबद्दल नितांत आदर आहे, म्हणूनच मॉरिशस येथे महाराजांचा पुतळा उभा करण्यात आला; त्याच धर्तीवर लंडन मध्येही पुतळा उभारावा असा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

शिवराज्याभिषेकाच्या ३५० वर्षपूर्ती निमित्त भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जाणता राजा, १ जून ते ७ जून रायगडच्या पायथ्याशी जाणता राजा, शिवाजी महाराजांच्या शस्त्रांची गेट वे ऑफ इंडिया येथे प्रदर्शनी, गाव, तालुका, जिल्हा व विभाग पातळीवर प्रबोधनकार, कीर्तनकार यांच्या माध्यमातून महाराजांचे विचार घराघरांत व मनामनांत पोहोविले जातील.

एक कोटी शिवभक्त राज्यात तयार करण्याचा मानसदेखील ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. प्रत्येकस्तरावर समित्या करुन त्या समित्यांमध्ये सर्वांना समाविष्ट करुन घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.


भवताल

 मान्सूनच्या स्वागताला, चला केरळला !

- Welcoming Monsoon @Kerala


भारताची ओळख मान्सून

अन् त्याचं प्रवेशद्वार केरळ,

तो तिथं अनुभवाइतकं

रोमांचक दुसरं काय असू शकतं?



मान्सून अनुभवण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी...


विशेष आकर्षण:


• केरळमधील चिंब मान्सूनचा अनुभव

• १८५ वर्षे जुनी वेधशाळा पाहणे

• मान्सून-मॉडेल बनवणाऱ्या वैज्ञानिकाशी गप्पा

• थिरूअनंतपूरम, कोच्ची परिसराला भेटी

• कोवालम, वरकला समुद्रकिनाऱ्यांचा अनुभव

• गर्भश्रीमंत पद्मनाभस्वामी मंदिराला भेट

• कडमकुडी बेट व बॅकवॉटर्सचा अनुभव

• कोच्ची फोर्ट, एलिफंड ट्रेनिंग कॅम्प भेट

• आणि बरेच काही...


कालावधी:


३ जून ते ९ जून २०२३

(सहा दिवस, सहा मुक्काम)


शुल्क:

रु. ४१,५०० / प्रति व्यक्ती

(विमानप्रवास, मुक्काम, नाश्ता-जेवण, स्थळ भेटी यांसह सर्वसमावेशक)


तपशील व नावनोंदणीसाठी लिंक:

https://bhavatal.com/Ecotour/Kerala


संपर्क:

९५४५३५०८६२

९४२०६९६४२३




--



भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com

ती आला घेवुन गेला

 


आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी श्रम विद्या

शैक्षणिक कर्ज योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ


सहकारी बँकांनी सामान्यांच्या समृद्धीसाठी काम करावे


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 


            मुंबई, दि. १७ : राज्यातील सहकारी बँकांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींबरोबरच सर्व सामान्यांच्या उध्दार आणि समृद्धीसाठीही काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


            फोर्ट येथील राज्य सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते. यावेळी आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत, आमदार प्रविण दरेकर, अनंत अडसुळ, अभिजित अडसुळ यांच्यासह राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे यांची प्रमुख उपस्थिती होती.


            मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबामधील इयत्ता बारावीपर्यंत शिकलेल्या मुला-मुलींच्या पदवी शिक्षणासाठी शुन्य ते ४ टक्के व्याजदराने १५ लाखांपर्यंत शेक्षणिक कर्ज देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना' सुरु करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुला-मुलींना मोठा आधार दिला असून त्यांचे अश्रू पुसण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले असल्याचे सांगितले.


            शासनाने शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती मधून बाहेर काढण्यासाठी अस्तित्वात असलेल्या योजनेचा निधी वाढवून मदत केली आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानभरपाई तातडीने देण्यात आली. शेतकऱ्यांना केंद्र शासनाप्रमाणे राज्यानेही वर्षाला ६ हजार रूपये देण्याची सन्मान योजना सुरू केली आहे. अशा विविध योजना राबवून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.


            कर्जाची परतफेड करण्यासाठी १० वर्षे कालावधी म्हणजे नोकरी लागल्यानंतर परतफेड असणार आहे. पाच लाखापर्यंतच्या कर्जासाठी तारणाची व जामीनदारांची आवश्यकता नाही. पाच लाख ते दहा लाखापर्यंतच्या कर्जासाठी तारणाची आवश्यकता नसेल, मात्र एका जामीनदाराची आवश्यकता असेल.


            १० लाख ते १५ लाखांपर्यंतच्या कर्जासाठी तारण द्यावे लागेल तसेच दोन जामीनदारांची आवश्यकता असेल. पाच लाखांपर्यंत शुन्य टक्के, पाच लाखांच्या वर ते १० लाखांपर्यंत २ टक्के तर १० लाखांच्यावर ते १५ लाखापर्यंत ४ टक्के व्याजदर असणारी योजना राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            देशातील सर्व राज्य सहकारी बँकांच्या तुलनेत राज्य सहकारी बॅंकेचा सर्वात जास्त ६ हजार ५४५ कोटींचा स्वनिधी, सर्वात जास्त ४५ हजार ६४ कोटी रुपयांचा व्यवहार, सर्वात जास्त ३ हजार ८७९ कोटींचे नक्त मुल्य, सर्वात जास्त ६०९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा हे या बँकेचे असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.


            यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, विधानपरिषदेचे आमदार प्रविण दरेकर, माजी मंत्री अनंत अडसुळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी प्रास्ताविक केले तर व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे यांनी आभार मानले.


00000

साईबाबा संस्थानमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

 श्री साईबाबा संस्थानमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट


कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 


            मुंबई, दि. १७ : शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.


श्री साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीस बंदरे व खनिकर्ममंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव निरज धोटे उपस्थित होते.


            संस्थानमधील प्रत्येक कर्मचारी हा सेवाभावी वृत्तीने काम करीत असून त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मकतेने विचार करण्यात येईल. हे सर्वसामान्य, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे सरकार असून या सर्व घटकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याची ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.


यावेळी खासदार श्री. लोखंडे आणि संस्थानच्या वतीने श्री साईबाबांची मूर्ती, शाल देऊन मुख्यमंत्र्यांचा आणि उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.


०००००

डोळ्याखालची वर्तुळे घालविण्यासाठी…*

 *डोळ्याखालची वर्तुळे घालविण्यासाठी…* 


1) तणाव, कमी झोप यामुळे डोळ्याच्याखाली काळी वर्तुळे तयार होतात. सतत डोळे चोळणं, ॲलर्जी, झोप न येणं, डोळ्यांखालची निस्तेज त्वचा, वयोमान, डीहायड्रेशन, आनुवंशिकता आणि कधी कधी पिगमेण्टेशनमुळेही डोळ्यांखाली काळी वर्तृळं निर्माण होतात. ते घालवण्यासाठी डॉक्टर आणि त्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या क्रिमचा वापर केला जातो. पण, जर काही घरगुती उपाय केले तर ही वर्तुळे काही प्रमाणात कमी करता येऊ शकतात. त्यासाठी काही घरगुती उपाय पुढीलप्रमाणेः

१. चंदन आणि जायफळाची पेस्ट डोळ्यांभोवती रात्री लावून ठेवा. सकाळी धुऊन टाका. यामुळे डोळ्यांना गारवा मिळून त्याखालील काळी वर्तुळे नाहीशी होतील.

२. टोमॅटो आणि लिंबाचा रस डोळ्यांच्या खाली लावून तो सुखल्यावर चेहरा धुवून घ्यावा. नियमित असे केल्याने डोळ्याखालची वर्तुळे हळू-हळू कमी होतात.

३. बदामाच्या तेलाने जवळपास २० मिनिटे डोळ्यांभोवती मसाज करावा.

४. पुदीन्याचा रस लावल्यानेही काळी वर्तुळे कमी होतात.

५. काकडीच्या किंवा बटाटयाच्या चकत्या डोळ्यांवर ठेवल्यामुळे डोळ्याखालील फुगीरपणा कमी होऊन तिथली त्वचा ताजीतवानी होते.

६. साध्या थंड टी बॅग्ज डोळ्यांभोवती ठेवा. हर्बल टी बॅग्ज वापरू नका.

७. व्हिटॅमिन सी, बी आणि डी यांचा आहारात समावेश करा.

याव्यतिरिक्त, पुरेशी झोप घेणे आणि ताण कमी करणे आवश्यक आहे. तसेच, आपल्या आहारात प्रथिने आणि जीवनसत्वांचा पुरेसा समावेश असायलाच हवा.


*डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी काही उपाय* 

 

◼️सकाळी चहा केल्यानंतर चहाचे (चोथा) छोटे कण फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर थंड झाल्यावर डोळ्यांखाली हलक्या हाताने चोळावा. त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. 

 

◼️टोमॅटोतील अनेक गुण तुमच्या त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात. एक चमच्या टॉमेटोची पेस्ट आणि लिंबाचा रस (काही थेंब) एकत्र करून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण आपल्या डोळ्यांखाली लावावे. दोन मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर थंड पाण्याने डोळे धुवून काढावे. 

 

◼️बदाम तेलात अनेक गुणधर्म आहेत. डोळ्याजवळील त्वचेला याचा लाभ मिळतो. बदाम तेलाचा नियमित वापर केल्यास त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. रात्री डोळ्यांखाली बदाम तेल लावावे. हलक्या हाताने मसाज करावा. सकाळी उठल्यानंतर चेहरा धुवावा.


अपुरी झोप, रात्री उशीरापर्यंत काम, पार्टीमुळे झालेले विशेषत: मद्यसेवन करून झालेले जागरण अशी कारणं तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं तयार करण्यासाठी पुरेशी ठरतात. 

हे खरं असलं तरी, काळी वर्तुळे वाढण्यासाठी अजूनही काही घटक कारणीभूत ठरतात. बहुतेकदा, यासाठी विविध घटक कारणीभूत असून त्यात जनुकीय अनुवांशिकतेचाही समावेश असू शकतो. याबाबत जागतिक पातळीवरील प्रसिद्ध कॉस्मॅटिक सर्जन आणि इन्सेप्टर कॉस्मॅटिक सर्जरी ॲन्ड स्किन इन्स्टीट्युटचे संस्थापक डॉ. मोहन थॉमस यांच्याकडून या काही स्पेशल टीप्स...


*कशी काढता येतील डोळ्यांखालची वर्तुळं...*


पाहा : 

◼️डोळ्यांभोवतीच्या भागात त्वचेचा अत्यंत पातळ आणि नाजूक थर असतो. किंबहुना ही शरीराची सर्वात पातळ त्वचा असते. या भागात अत्यंत अत्यंत निमुळत्या रक्तवाहिन्या आणि धमन्या असतात. या धमन्यांमध्ये प्राणवायू युक्त आणि प्राणवायुरहीत रक्त असतं. पातळ त्वचेमुळे गडद रंगाचे रक्त दिसून येते. त्यामुळेच सकाळच्या वेळी काळी वर्तुळे अधिक स्पष्ट दिसतात.

◼️लाल रक्तपेशींची या निमुळत्या असलेल्या धमन्यांमधून गळती होते. या लाल रक्त पेशींमध्ये हिमोग्लोबिन असते. हे हिमोग्लोबिन शरीराच्या सुरक्षायंत्रणेद्वारे हेमोसिडेरिन या गडद रंगांच्या रंगद्रव्यात विभाजन होते. हे रंगद्रव्य पातळ त्वचेमधून दिसू लागते आणि त्यामुळे काळी वर्तुळे तयार होतात.

◼️ॲलर्जीमुळे डोळ्याभोवती सूज येते आणि त्यामुळे कंड सुटते. डोळे पुन्हा पुन्हा चोळल्यामुळे धमन्यांना इजा पोहोचून लाल रक्तपेशींची गळती सुरू होते.

◼️काळी वर्तुळे ही कित्येकदा अनुवांशिक असू शकतात. अनुवांशिक असल्यामुळे अशा कुटुंबांतील व्यक्तींमध्ये खूप लवकर काळी वर्तुळे दिसू लागतात.

◼️थकवा किंवा अपुरी विश्रांती

◼️अपुरे पोषण


*काळ्या वर्तुळांवरील उपचार :* 

कॉस्मॅटिक सर्जरी इन्स्टिट्युटमध्ये डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांवर पूर्ण उपचार केले जातात. शस्त्रक्रिया करून आणि विना-शस्त्रक्रिया अशा दोन्ही उपचार पद्धती उपलब्ध आहेत. यातील शस्त्रक्रिया वापरून केलेली उपचार पद्धती आधुनिक आहे.


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*


https://chat.whatsapp.com/Chq4o0qlHlK3NJAuvdEIH2


शस्त्रक्रियेचा वापर करून : 

स्वत:च्या शरीरातील चरबीचा वापर करून त्या भागात सुधारणा करण्याच्या पद्धतीमुळे डोळ्यांना उठाव मिळतो. ज्यामुळे निओअँजिओजेनेसिस होतो आणि उतीच्या संख्येत वाढ होते. यामुळे डोळ्यांभोवतीच्या त्वचेला नैसर्गिक झळाळी, भरीवपणा आणि तेज प्राप्त होते.

चरबी रोपण आणि नॅनो चरबी रोपण एकत्र केले तर उत्तम परिणाम साध्य होतात, कारण ते स्थानिक उतींमध्ये सहज मिसळून जातात. पारंपरिक चरबीचे रोपण आणि नॅनो ग्राफ्ट एकत्र करून तयार केलेल्या या नवीन उपचार पद्धतीचा आम्ही पुरस्कार केला आहे. त्याच रुग्णाच्या शरीरातील मूलपेशींपासून (स्टेम सेल) या चरबीतल्या पेशी तयार करण्यात येतात आणि काळी वर्तुळे असलेल्या ठिकाणी त्यांचे रोपण करण्यात येते. स्टेम सेल (मूलपेशी) आणि इतर वाढीस कारणीभूत असणाऱ्या घटकांमुळे नवीन रक्तवाहिन्या तयार होतात त्यामुळे त्या भागाला गुलाबी झळाळी प्राप्त होते.


विना शस्त्रक्रिया : 

◼️रासायनिक साली

◼️फ्रॅक्टोरा – एक क्रांतीकारी उपचारपद्धती

◼️वाढीसाठी आणि कमतरता भरून काढण्यासाठी फिलर्सचा वापर


◼️ *डोळ्यांखाली काळी वर्तुळे कमी करण्यासाठी घरगुती उपाय...*

◼️डोळ्यांखाली काळी वर्तुळे कंप्यूटर, मोबाईलवर जास्त वेळ घालवणे, तणाव, झोपेची कमतरता अशा कारणांमुळे येतात. या काही घरगुती उपायांनी डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होण्यास मदत मिळेल. 

◼️डोळ्यांखाली काळी वर्तुळे कमी करण्यासाठी काकडीचे तुकडे करा आणि डोळ्यावर ठेवा. दिवसातून दोनदा असे करा म्हणजे असे केल्याने डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होतील.

◼️डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी चिंचेचा कोळ बनवून डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांवर “हलक्या हातांनी” लावा. १० मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर दुधाच्या मदतीने ही पेस्ट काढा. काही दिवसांतच तुम्हाला फरक जाणवेल.

◼️बराच काळ व्यवस्थित झोप न घेतल्यामुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळे होतात. त्यामुळे रोज पुरेशी झोप घेतली तरी ही डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होतील.

◼️डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी एक पूर्ण पिकलेल्या टोमॅटोच्या बिया काढून पेस्ट बनवा. एक चमचा पेस्टमध्ये काही थेंब लिंबाचा रस मिसळा हे मिश्रण आपल्या डोळ्याखाली असलेल्या गडद वर्तुळांवर लावा. दहा मिनिटे ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. असे केल्याने डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होण्यास मदत मिळेल. 

◼️डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी रात्री डोळ्याखाली थोडेसे बदाम तेल लावा आणि “हलक्या हातांनी” मालिश करा. सकाळी उठल्यानंतर आपले तोंड धुवा. असे केल्याने डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होतील.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे.

*

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

 ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

            मुंबई, दि.१७ : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला.


            राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत, बंदर विकास मंत्री दादाजी भुसे, सामाजिक न्याय विभागासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


            यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्य शासनाकडून ज्येष्ठांसाठी एसटी प्रवासात सवलत देण्यात आली आहे. या सवलतींचा लाभ ज्येष्ठांनी घ्यावा. ज्येष्ठांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विविध पोलीस स्थानकात ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. हे कक्ष अधिक प्रभावीपणे कार्यरत होण्यासाठी पोलीस विभागाने सर्व स्थानकांना सूचना द्याव्यात, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. तसेच ज्येष्ठांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी आरोग्य विभागाने पुढाकार घ्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


           

Featured post

Lakshvedhi