Monday, 15 May 2023

मुंबईतील सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव

 मुंबईतील सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव

                                - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गेटवे ऑफ इंडिया येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव दिमाखात साजरा


 


          मुंबई, दि. 14 : मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्ग (कोस्टल हायवे) ला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ही घोषणा केली.


      या महोत्सवाला पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आरोग्य मंत्री प्रा. डॅा.तानाजी सावंत, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार यामिनी जाधव, राजमाता जिजाऊ यांचे वंशज विजयराव जाधव, संयोजक व्यासपीठावर उपस्थित होते.


गड, किल्ल्यांच्या जतन,संवर्धनासाठी राज्य शासन कटिबद्ध


मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य, बलिदान नव्या पिढीला दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे. राज्यातील गड, किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मृतिस्थळ वढू बुद्रुक आणि तुळापूर या दोन्ही जागांचा विकास आराखडा राबविण्यात येत आहे. हा ऐतिहासिक ठेवा येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे. मुंबईतील कोस्टल हायवे परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळा उभारला जाईल. मराठा समाज बांधवांना सर्व सोयीसुविधा देण्याची जबाबदारी राज्य शासनाची असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.


छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा भव्यदिव्य करणार


         छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मुंबईतल्या गेटवे ॲाफ इंडिया येथे पहिल्यांदाच साजरी होतेय याचा आनंद आहे. महोत्सवाच्या माध्यमातून त्यांचे स्मरण प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायक असून शिवशंभुरायांचे कार्य, योगदान जतन करणे ही आनंदाची बाब आहे. छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव देशभरात पोहचवला जाईल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा भव्यदिव्य करण्याची तयारी देखील राज्य शासन करित असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. 


         यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढणार

 राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढणार


                                                - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा


महाराणा प्रतापसिंह यांचा इतिहास अजरामर - केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह


            औरंगाबाद दि 14 (जिमाका)- सर्वसामान्य, शेतकरी-कष्टकऱ्यांचे हे सरकार असून त्यांच्या कल्याणाचे विविध निर्णय घेऊन जनतेला न्याय देण्याचे काम हे सरकार करीत आहे. राजपूत समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे, राजपूत समाजाच्या पुढील ‘भामटा’ हा शब्द काढण्यात येईल आणि केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. दरम्यान, महाराणा प्रतापसिंह हे स्वाभिमानी राजे होते, त्यांनी प्राण पणाला लावून राष्ट्राप्रती असणारा स्वाभिमान जपला. जनतेचा राजा म्हणून ओळख असलेल्या महाराणा प्रताप सिंहांचा इतिहास अजरामर आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी केले.


            औरंगाबाद शहरात सकल राजपूत समाजाच्या वतीने आज ‘वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह होते. कार्यक्रमास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार जयकुमार रावल आदी मान्यवर उपस्थित होते.


            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराणा प्रतापसिंह आणि शिवाजी महाराज हे साहसी होते. महाराणा प्रतापसिंह यांनी सवंगड्यांना देखील युद्धाचे धडे दिले. सर्वसामान्य जनतेला आपलंसं केलं. महाराणा प्रतापसिंह यांनी अकबराच्या सैन्याला जेरीस आणले. हे दोन्ही धर्मवीर राजे आपल्या भूमीत होऊन गेले. यांचा आदर्श घेऊन आपण पुढे जात आहोत, असे सांगून राजपूत समाजाच्या मागण्या सोडविण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.


            राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढून टाकण्याची मागणी राज्य सरकारने मान्य केल्याची घोषणा करून आता यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल. राजपूत समाजाचे आर्थिक महामंडळ स्थापन करण्यात येणार असून महाराणा प्रताप यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


लढवय्ये महाराणा प्रतापसिंह स्वाभिमानाचे प्रतिक- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह


राष्ट्रीय स्वाभिमानाची भावना महाराणा प्रतापसिंह यांच्यात होती. त्यांनी आपले जीवन जंगलात व्यतित केले. असे हे लढवय्ये महाराणा प्रताप सिंह स्वाभिमानाचे प्रतिक आहेत. पाचशे वर्षांपूर्वी महाराणा प्रताप जेवढे महत्त्वाचे होते आजही तेवढेच महत्त्वाचे आहेत, आणखी हजारो वर्षांनंतरही ते महत्वाचे असतीलच. महाराणा प्रताप यांच्या कार्यकाळाला मुघल काळ न म्हणता महाराणा प्रताप काळ म्हणून ओळखले जावे, अशी अपेक्षाही केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी व्यक्त केली.


 


राजपूत समाजाला योजनेपासून वंचित ठेवणार नाही -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            राजपूत समाजाचे या देशाच्या इतिहासात मोठे योगदान आहे. प्राण गेले तरी चालेल पण देशसेवा महत्वाची मानणारा हा समाज आहे. अशा या समाजाला आता कोणत्याही योजनेपासून वंचित ठेवले जाणार नाही. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी येत्या 15 दिवसात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.

मेडिटेशन आणि विचार.....*

 *मेडिटेशन आणि विचार.....* 


आजकाल जो उठतो, तो मेडिटेशन करण्याचा सल्ला देतो. मन शांत राहावं, म्हणून आपण तसा प्रयत्न करून पाहतोही, पण ते कुठे एका जागी थांबते? डोळे बंद करून ध्यानधारणेचा प्रयत्न केला असता, असंख्य विषय मनात थैमान घालत असतात. अशाने मन शांत होण्याऐवजी जास्तच अशांत होतं. 


मेडिटेशन करणाऱ्या प्रत्येकाला हा प्राथमिक अनुभव येतोच. कारण, मेडिटेशन ही काही एका दिवसात शिकण्याची गोष्ट नाही. त्यासाठी प्रयत्नपूर्वक सराव करावा लागतो. तो कसा करायचा, ते जाणून घेऊया.


मन शांत करणे, ही सर्वात अवघड गोष्ट आहे. अशातच, आजच्या मल्टी टास्किंग युगात आपलं मन इतक्या कामात, गोष्टींत अडकलेले असते, की तिथून सोडवून ते ध्यानमग्न करणे, म्हणजे शिवधनुष्यच! मात्र, सरावाने आणि सकारात्मकतेने कोणतीही गोष्ट साध्य करता येते. प्रयत्ने कण रगडीता....


 *सकाळची वेळ निवडा...* 

वरील गोष्टी आत्मसात झाल्या, की ध्यानधारणेच्या सरावाला सुरुवात करता येईल. त्यासाठी सकाळची वेळ निवडा. उठल्यावर, मोबाईल न पाहता शांत चित्ताने, डोळे मिटून स्वतःचे अवलोकन करा. सकाळी डोक्यात विचारांचे ट्रॅफिक नसते. त्यामुळे मन एकाग्र होण्याच्या दृष्टीने मार्ग मोकळा असतो. तरीदेखील विचार येत असतील, तर येऊ द्या. काहीवेळाने तेही निघून जातील. हळू हळू एखाद्या नदीच्या शांत डोहाप्रमाणे मनातील तरंग थांबतील आणि मन ध्यानधारणेसाठी तयार होईल.


 *ध्यानधारनेच्या वेळी संगीत लावू नका...* 

मुळातच सगळ्या गोष्टीतून मन अलिप्त करण्यासाठी ध्यान धारणा केली जाते. कोणत्याही प्रकारचे संगीत ऐकत ध्यानधारणा केली असता, मन गाणे ऐकण्यात रमेल आणि गाण्याशी संबंधित विचार मनात डोकावू लागतील. अशा वेळी कोणतेही संगीत न ऐकता आपल्याला श्वासाचे संगीत ऐकायचे आहे, हे लक्षात ठेवा.


*डॉ. अमित भोरकर,*

*सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


झोप शांत लागण्यासाठी उपाय :

 झोप शांत लागण्यासाठी उपाय :


झोपण्यापूर्वी पाय धुवून घ्या. पायाच्या तळव्यांचा मसाज करणे चांगले असते.

झोपताना सैल आणि आरामदायक कपडे घालावेत, ज्यामुळे शरीरात हवेचा संचार होईल.


झोपण्यापूर्वी काही वेळ दीर्घ श्वसन करा. तसेच ध्यान अवश्य करा.


दक्षिणेकडे पाय करून झोपू नका. गुरू, देवता, त्यांच्या मूर्ति, चित्र, वस्तू तसेच आदराच्या स्थानाकडे पाय करू नये.


स्वयंपाक घरात झोपू नये. तसेच बेडरूममध्ये खाद्यपदार्थ ठेवू नये.


बेडरूममध्ये ताजी खेळती हवा यायला हवी याकडे लक्ष द्या.


कधीही अंधाऱ्या, दमट आणि ओलसर खोलीत झोपू नये.


झोपताना डोकं थोडं उंच ठेवा. त्याकरिता पातळ उशीचा वापर करा.


उन्हाळ्यात छतावर किंवा मोकळ्या आकाशाखाली झोपू शकता. मात्र थंडी किंवा पावसाळ्यात नको.


थेट सूर्यप्रकाशात झोपणे योग्य नाही. मात्र वातावरण चांगले असल्यास टिपूर चांदण्याखाली तुम्ही झोपू शकता.


दुपारी का झोपू नये | दिवसा झोपणे योग्य आहे का? 


आयुर्वेदानुसार दिवसा झोपल्याने शरीरातील कफ वाढतो. रक्ताभिसरणात अडथळे येतात. त्यामुळे डोकं जड वाटतं, श्वास घ्यायला त्रास होतो. आळस, सर्दी-खोकला, डोकेदुखी, अपचन, खाज, फोडं, घश्याचा त्रास, रक्ताची कमतरता इत्यादी आजार संभवतात. या सर्व कारणांमुळे दुपारी झोपू नये. तरीही काही व्यक्तींना दुपारी झोपण्याची गरज असते. त्यांच्या बद्दल जाणून घेऊया.


दुपारी फक्त ह्यांनीच झोपावे :


दुपारी जेवण झाल्यावर लगेच झोपू नये. मात्र न झोपता केवळ पडून रहावे असे जरूर वाटते. जड जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती घेणे आरोग्यासाठी चांगले असते. मात्र बसून थोडी डुलकी घेणे (५-१०मिनिटे) जास्त योग्य असते. दुपारच्या जेवणानंतर असे केल्याने वात, कफात संतुलन साधले जाते.

लहान मूल व वृद्ध व्यक्ती.


रात्र पाळी करून येणारी व्यक्ती.

जे अति शारीरिक वा मानसिक काम करतात असे लोक.


ज्यांना वेदना, मार, आघात, क्षय आदी व्याधी आहेत असे लोक.


ज्यांना अतिशय तहान लागते, तसेच डायरिया, पोटदुखी, श्वासाचे विकार, उचक्या, किंवा मासिक पाळीत खूप वेदना होतात.


ज्यांना क्रोध, भय, उदासीनता घेरून असते.

मोठ्या प्रवासानंतर, खूप जड वजन उचलल्यानंतर, अति संभोगानंतर, जास्त मद्यपान केल्यानंतर, खूप वेळ गायन किंवा अभ्यास केल्यानंतर.


पंचकर्म चिकित्सेनंतर.

उच्चतम तापमान असते अश्या दाहक उन्हाळ्यात दिवसा थोडी झोप घेणे योग्य असते.


दुपारी कोणी झोपू नये?


कफकारक प्रकृतीच्या व्यक्ती.

शरीरात कफाचे संतुलन बिघडले असल्यास.

अतिशय स्थूल व्यक्तींनी.


जर शरीरात विषाक्त तत्व वाढलेले असल्यास दुपारी झोपू नये.


निद्रानाश उपाय | गाढ निद्रेसाठी अजून काही उपाय :


पूर्णपणे आच्छादलेली सुंदर शय्या.

खोलीत मंद सुगंधाचा दरवळ आणि मधुर संगीत.


स्वच्छ, शांत, मोकळी आणि आरामदायी खोली.


योग्य वेळेत झोपण्याची आणि जागे होण्याची सवय.


तेलाने अभ्यंग मालिश करून स्वतःला शिथिल करा.


वरील काही निद्रानाशासाठी उपाय आहेत. आयुर्वेदिक वैद्याच्या सल्ल्यानुसार, व्यक्तीगत पातळीवर चांगली झोप येण्यासाठी नैसर्गिक (हर्बल) उपाययोजना केली जाऊ शकते


केवळ माहिती साठी


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



माँ एक अस्मा,सारे जहामे

 


Sunday, 14 May 2023

तुमच्या दुकानात देव मिळेल कां?*

 *तुमच्या दुकानात देव मिळेल कां?

*पाच वर्षांचा एक छोटा मुलगा हातात एक रुपया घेऊन एका किराणा दुकानात जाऊन ऊभा राहिला.* 


*दुकानदाराने त्या मुलास विचारले बाळा काय हवं तुला?* 


*त्या मुलाने दुकानदारास विचारले* 

*तुमच्या दुकानात देव मिळेल का?* 


*हे ऐकून दुकानदार संतापला आणि त्या मुलावर जोराने ओरडून त्याने त्या मुलाला दुकानातून हाकलून दिले.* 


*तो मुलगा दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, असे करत करत ३० - ४० दुकाने फिरला.* 


*प्रत्येक दुकाना समोर जाऊन एकच विचारायचा तुमच्या दुकानात देव मिळेल का?* 


*शेवटच्या दुकानात एक म्हातारे आजोबा बसले होते, त्यांना पाहून ह्या लहान मुलाने विचारले, बाबा तुमच्या दुकानात देव मिळेल का?* 


*त्या आजोबांनी विचारले बाळा तुझ्याकडे किती पैसे आहेत?* 


*मुलाने प्रांजळपणाने सांगितले एक रुपया आहे माझ्याकडे. त्यांनी मुलाला जवळ घेत विचारले, बाळा तुला कशाला देव हवा आहे? तु देव विकत घेऊन करणार काय ?* 


*प्रश्न ऐकून मुलाला खूप बरं वाटले. त्याच्या अशा पल्लवीत झाल्या, बाबा असे विचारतात म्हणजे नक्कीच यांच्या दुकानात देव असणार आहे.* 


*तो म्हणाला ह्या जगात मला माझ्या आई शिवाय कोणीच नाही. रोज माझी आई कामाला जाते आणि माझ्यासाठी जेवण घेऊन येते. पण काल पासून ती हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे. जर उद्या माझी आई मेली तर मला जेवण कोण देणार?* 

*डॉक्टर म्हणाले की आता फक्त देवच तुझ्या आईला वाचवू शकतो.*

*म्हणून मी देव शोधतो आहे बाबा.* 

*आहे ना तुमच्या दुकानांत देव?* 


*दुकानदाराने त्या मुलाला विचारले किती पैसे आहेत तुझ्याकडे?* 


*फक्त एक रुपया बाबा.* 

*बरं, नको काळजी करू.*

*एक रुपयात देखील देव भेटेल!*


*दुकानदाराने तो एक रुपया घेतला आणि एक ग्लास फिल्टरचें पाणी त्या मुलाच्या हातात दिले आणि म्हणाला की हे पाणी घेऊन जा आणि तुझ्या आईला पाज. हे पाणी प्यायला दिले की आई तुझी ठीक होईल.* 


*दुसऱ्या दिवशी एक स्पेशालिस्ट डॉक्टर हॉस्पिटल मध्ये आले आणि आईचें ऑपरेशन झाले. कांही दिवसात ती ठीक ही झाली.* 


*डीस्चार्ज च्या दिवशी हॉस्पिटलचें बिल बघून ती बाई चक्रावली! पण डॉक्टर धीर देत म्हणाले. काळजी करू नका. एका वयस्कर व्यक्तीने हे सर्व बिल भरले आहे आणि सोबतच एक चिट्टीही ठेवली आहे.* 


*चिठ्ठी उघडून वाचताच, माझे धन्यवाद मानू नकोस, तुला वाचवले ते परमेश्वरानेच. मी फक्त निमित्त होतो. तुला धन्यवाद द्यायचेच असतील तर आपल्या छोट्या अज्ञान बाळाला दे, जे बाळ एक रुपया घेऊन देव शोधत फिरत होते.* 

*यालाच म्हणतात विश्वास ...* 

*देवाला शोधण्यासाठी करोडो रुपये दान करावे नाही लागत! श्रद्धा, भाव, विश्वास असला की एक रुपयातही देव मिळतो.* 


*तात्पर्य:* 

*भक्ती साधी भोळी असू दे. फक्त मनापासुन नामस्मरण केले की देव कोणत्या न कोणत्या रूपात येऊन नक्की मदत करतो ....!*

🛕⛪🕋🕍🕌

🌼🌺🌸🌼🌺🌸🌼🌺🌸🌼🌺🌸

कांदिवलीतील रोटी बँक उपक्रम ‘मानवतेचे प्रमुख केंद्र’ बनेल


 कांदिवलीतील रोटी बँक उपक्रम ‘मानवतेचे प्रमुख केंद्र’ बनेल -

आ. अतुल भातखळकर यांचा विश्वास, मुंबईतील पहिल्या वहिल्या उपक्रमाचे लोकार्पण

फोटो

मुंबई : कांदिवली पूर्व विधानसभेत निर्माण करण्यात आलेल्या ‘रोटी बँक’ तसेच मोफत ग्रंथालय, पाणपोई, सुशोभिकरण, सार्वजनिक शौचालय अशा विविध प्रकल्पांचे लोकार्पण आज होत आहे. येणाऱ्या काळात हे केंद्र ‘मानवतेचे एक प्रमुख केंद्र’ बनल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला. कांदिवली पूर्व विधानसभेतील आकुर्ली रोड येथे आ. भातखळकर यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या ‘रोटी बँक’ या मुंबईतील पहिल्या वहिल्या उपक्रमाच्या लोकार्पणानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खा. गोपाळ शेट्टी, त्रिवेणीबेन आचार्य यांसह मान्यवर उपस्थित होते.

आ. भातखळकर म्हणाले, जात, पात, धर्म, भाषा यापलिकडे गोरगरिब व्यक्तींची सेवा करणे, मानवतेची सेवा करणे, असे संस्कार आमच्यावर झाले आहेत. स्व. दिनदयाळ उपाध्याय यांनी ‘अंत्योदय’ची कल्पना मांडली. समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करणे ही आपली आर्थिक निती असायला हवी, या त्यांच्या विचाराच्या आधारावर येणाऱ्या काळात आम्ही जरूर काम करू. ‘रोटी बँक’ हा उपक्रम कांदिवली पूर्वमध्ये अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात येईल, असेही ते म्हणाले.

यावेळी खा. शेट्टी म्हणाले, लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आतापर्यंतच्या २१ वर्षांच्या काळात एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर विविध प्रकल्पांचे लोकार्पण होताना मी पहिल्यांदाच पाहिले आहे. याचा मला अभिमान आहे. कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्रात जेव्हा आपण फिरत असतो तेव्हा एक बाब निदर्शनास येते की, प्रत्येक अर्धा किमी अंतरावर आ. भातखळकर यांच्या माध्यमातून झालेले विविध प्रकल्प नजरेस पडतात. आमदार झाल्यानंतर ज्या वेगात त्यांनी काम केले, ते अभिमानास्पद आहे. या रोटी बँकच्या माध्यमातून समाजातील गोरगरिबांची सेवा होणार आहे, याचा मला आनंद आहे. यावेळी त्रिवेणीबेन आचार्य यांचेही भाषण झाले. यावेळी अनुकंपा संस्थेच्या प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. यावेळी गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.

Featured post

Lakshvedhi