Tuesday, 16 May 2023

ज्येष्ठ शास्त्रज्ञ श्रीमती माधुरी बापट यांचा विचार करायला लावणारा लेख! 👇

 🌷अवश्य वाचा🌷


ज्येष्ठ शास्त्रज्ञ श्रीमती माधुरी बापट यांचा विचार करायला लावणारा लेख!

👇

*सुवर्ण मध्य !*

👇


अलिकडेच लिहिलेल्या माझ्या एका 'पोस्ट'ला ब-यापैकी प्रतिसाद मिळाल्याने ही 'पोस्ट' लिहायचं ठरवलं. काही वर्षापूर्वी माझ्या बहिणीच्या दहा वर्षाच्या नातवाने मला त्याच्या सायन्सच्या घरच्या अभ्यासात मदत मागितली. आता तो बारावीला आहे. 

..

विषय होता आधुनिक संशोधनाचे माणसावर होणारे वाईट परिणाम. माझ्या शिकवण्याचाच हा एक भाग असल्याने मी उत्साहाने त्याला मदत केली. विमाने, मायक्रोवेव्ह ओव्हन, मोबाईल फोन्स, वाय फाय, मेडिकल एक्स रेज, रेफ्रिजरेटर, प्रेशर कुकर, इलेक्ट्रिक कॅन ओपनर, कॅन फूड , कंप्यूटर मौस, वगैरे वगैरे. यातील प्रत्येकाचाच होणारा वाईट परिणाम ऐकून त्याची आई, माझी भाचे सून म्हणाली, ‘म्हणजे कुठल्याच गोष्टी सुरक्षित नाहीत का?’ माझे उत्तर होते, ‘कुठल्याही गोष्टीत चांगले वाईट असणारच. त्याचा उपयोग आपण मर्यादित ठेवला तर त्यापासून इजा व्हायची शक्यता कमी. त्याच्या आहारी गेलं तर धोका संभवतो.’

..

माझे वडील म्हणायचे माणसानं थोडं शहाणं नि थोडं खुळं असावं. प्लास्टिकचा त्यांना तिटकारा होता. प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी विशेषत: लूक वॅार्म, पिण्यानं त्यातील ॲस्ट्रोजेन सदृश मॅालिक्यूल रक्तात जातो. जो पुरुषांच्यात बायकीपणा व बायकांच्यात कॅन्सर निर्माण करू शकतो.

..

विमाने तीस चाळीस हजार फुटांवरून उडत असतांना नेहमीपेक्षा दहा वीस पटीने सूर्याकडून वा इतरत्र आलेली वाईट रेडिएशन्स ( गॅमा, एक्स रे, अल्ट्रा व्हायोलेट वगैरे) आपल्या शरीरात शिरतात. मी स्वत: एका फ्लाईटमध्ये गायगर कौंटर नेला होता व ३५,०००फुटावर असतांना नेहमीपेक्षा वीसपट रेडिएशन कौंट्स बघितले होते. ज्याने कॅन्सर होऊ शकतो. बहुतेक सर्व पायलट्स, एअर होस्टेसेस कॅन्सरने दगावतात. 

..

न्यूक्लिअर फिजिक्सचा कोर्स शिकवतांना मी विद्यार्थ्याना एक सर्व्हे भरायला देत असे. तुमच्या लाईफ स्टाईलवर आधारीत वर्षात किती रेडिएशन तुमच्या शरीरात जाते, हे अजमावण्यासाठी. यात तुम्ही कुठे रहाता म्हणजे समुद्रसपाटीपासून किती उंचीवर, सिगरेट ओढता का, विमानाने किती तास प्रवास करता, किती एक्स रे काढून घेता यासारख्या गोष्टीवरून ठरवता येते.माझी एक विद्यार्थिनी तीस वर्षापूर्वी कोसोव्हच्या युद्धात दर दोन आठवड्याने मिलिटरी विमानाने सैनिकांना औषधे वगैरे पोहोचवण्यासाठी जात असे. तिने तो सर्व्हे भरला नाही. म्हणाली, ‘मी कॅन्सरने मरणार हे मला माहीत आहे. पण आपल्या सैनिकांसाठी मी ते खुशाल सहन करीन.’

..

भारतात विमानाचा प्रवास तेवढा पॅाप्युलर नाही. पण अमेरिकेत काही लोक सतत विमानाने प्रवास करतात. दर तासाला १० मिलीरिम एवढे रेडिएशन शरीरात जाते. वर्षात ३६० मिलीरिमची मर्यादा घातलेली आहे. त्यातले अर्धे तर नैसर्गिक रीत्याच शरीरात घुसते. अगदी उन्हात रोज तासाभरापेक्षा जास्त वेळ घालवू नये. दर वर्षी अमेरिकेतूम भारताच्या एक दोन वार्या करणारी मंडळी आहेत. प्रत्येक वारीत ४०० मिलीरिम रेडिएशन शरीरात जाते. मी स्वत: सरासरी तीन वर्षात भारताची एक वारी करते.

..

मायक्रोवेव्ज ह्रदयाला वाईट असतात. एम. एस. साठी मी लाईव्ह मायक्रोवेव्ज वापरून माझा प्रॅाजेक्ट केला होता. तेव्हा माझ्या ॲडव्हयझरने मला सांगितले होते, ‘Don’t get pregnant while working on your project.’ शिवाय त्यात पदार्थ चांगले शिजत नाहीत. त्यामुळे त्यातील बॅक्टेरिया वगैरे मरत नाहीत. कारण पाण्याचा मॅालीक्यूल २.५ गीगॅ हर्ट्झ फ्रीक्वेन्सीने कंप पावून ते गरम होते. त्या वेव्ज ह्रदयाला हानिकारक असतात. म्हणून मायक्रोवेव्ह ओव्हनचा उपयोग कमीत कमी करावा.

..

कॅन फूड टाळावे. त्यातील प्रिझर्व्हेटिव्ज वाईट असतात व अलुमिनम रक्तातून मेंदूत जाऊन अल्झायमर होऊ शकतो. इलेक्ट्रिक कॅन ओपनर तर सर्वात वाईट. मायक्रोवेव्हपेक्षाही जास्त रेडिएशन्स त्याने शरीरात घुसतात.

..

मोबईल फोन्स रेडिओ फ्रिक्वेन्सीवर चालतात. ती जरी तेवढी घातक नसली तरी वर्षानुवर्षे वापरल्याने कॅन्सर होऊ शकतो. तीस वर्षापूर्वी ते टेस्ट करणार्या मोटरोलातील एका शास्त्रज्ञाला कानाजवळ कॅन्सर झाला. भारतात मोबाईल व मायक्रोवेव्ह ओव्हन वापरायचे प्रमाण खूपच वाढलेले आहे, असं माझ्या लक्षात आलं.

..

केवळ इन्शुरन्स पैसे भरतो म्हणून सतत मेडिकल एक्स रेज काढून घेऊ नयेत. त्यानेही कॅन्सर उद्भवू शकतो. केवळ डॅाक्टर म्हणतात म्हणून दिलेल्या औषधाचा पूर्ण डोस घेण्या आधी वा एखादी सर्जरी करण्याआधी दुसर्या डॅाक्टर वा सर्जनचे मत अजमावावे. विशेषत: जनरल अनॅस्थेशिया द्यावा लागणार असेल तर. ॲंजियोप्लास्टीचे पण प्रमाण फार वाढले आहे. बहुतेकवेळा प्रॅापर डाएट, व्यायाम, वगैरेनी ती टाळता येते.

..

सतत फ्रिजमधील पाणी वा अन्न खाल्याने तसच प्रेशर कुकरमध्ये शिजवलेले अन्न खाल्ल्याने वजन वाढते. १९८४ सालापासून मी कंप्यूटरवर टाईप करत आहे. त्याने माझ्या दोन्ही मनगटातील नर्व्हज दाबल्या जाऊन दोन्ही हाताच्या बोटात नम्बनेस आलेला आहे. तो ॲार्थोपेडिक सर्जनकडून शस्त्रक्रिया करून बरे होईल असं डॅाक्टरचं म्हणणं आहे. टी. व्ही. व कंम्प्युटर स्क्रीनकडे सतत बघून डोळ्यांची वाट लागते हे सर्वश्रुतच आहे.

..

अर्थात कामासाठी नोकरीसाठी लोकांना काही गोष्टी कराव्याच लागतात. ते वेगळे. ही सगळी माहिती तुम्हाला घाबरवून टाकण्यासाठी दिलेली नाही तर तुमच्यात एक प्रकारची जाणीव, जागृती यावी म्हणून दिलेली आहे. जुनं ते सोनं म्हणून त्याला कवटाळून रहाणं जेवढं वाईट तेवढंच केवळ आधुनिक म्हणून त्याच्या फशी पडणंही बरोबर नाही. अति तेथे माती म्हटल्याप्रमाणे कुठलीही गोष्ट एका टोकाला जाऊन करू नये. आपणा सर्वांना सुवर्ण मध्य शोधता यावा हीच सदिच्छा!

..

पंचवीस वर्षांपूर्वी एकदा माझे बी. पी. वगैरे एकदम पर्फेक्ट आलेले बघून माझ्या अमेरिकन डॅाक्टरने मला विचारले. ‘यावेळी तू वेगळं काय केलस?’ तेव्हा त्याला सांगितलं होतं, ‘काल आमचा उपास होता. (आषाढी एकादशीचा) मी फोनला हात लावला नाही, टी. व्ही. बघितला नाही की कारमध्ये बसले नाही. फक्त भक्तीगीते ऐकली, ध्यान धारणा केली.’ त्यावर तो म्हणाला होता, ‘असं दर रवीवारी करत जा. तुला औषधाची कधी गरजच पडणार नाही.


*- माधुरी बापट*

===


[संक्षिप्त परिचय: श्रीमती माधुरी बापट यांनी पुणे विद्यापीठातून न्यूक्लिअर फिजिक्समध्ये एम. एस्सी. केल्यानंतर ओहायो येथील राईट स्टेट युनिव्हर्सिटीतून प्लाझ्मा फिजिक्समध्ये

एम. एस. डिग्री.

..

त्यानंतर अमेरिकेत सलग ३५ वर्षे भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका, ७ वर्षे गणिताच्या व ३ वर्षे खगोलशास्त्राच्या ही प्राध्यापिका. काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त व त्यानंतर सातत्याने लेखन व संशोधन.]

Job job job

 B. Sc. (फिजिक्स, मॅथेमॅटिक्स) कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन पदवीधर (कमीत कमी ६०% टक्के मार्क) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी. भारतीय हवामान खात्यात अधिकारी म्हणून नियुक्तीसाठी जाहिरात, एकूण ९९० पदे, मराठी मुलांच्या निदर्शनास ही जाहिरात आणावी. फक्त लेखी परीक्षा असते. पगार ही उत्तम आहे. All india posting असते. पण साधारण ३ वर्षांनंतर आपले चॉईस स्टेशन मिळते.

           दक्षिण व उत्तर भारतातील मुले ही परीक्षा आवर्जुन देतात व त्यांचीच भरती मोठ्या संख्येने होते.

त्यासाठी ही जाहिरात जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत पोहचवा. 


*नम्र विनंती आहे की, अधिकाधिक मराठी मुलांनी या परीक्षेला बसावे.*


https://incois.gov.in/jobs/imd0822/home.jsp

 मराठी मुलापर्यंत पोहोचवा.

🙏

Monday, 15 May 2023

*🦅 गरुड 🦅 आदर्श राहा

 *🦅 गरुड 🦅*:- 


*गरुड पक्षी ज्याला आपण गरुड किंवा शाहीनसुद्धा म्हणतो.* 


*ज्या वयात इतर पक्ष्यांची पिल्ल आवाज करायला शिकतात त्या वयात मादी गरुड तिची पिल्ल पंजामध्ये पकडते आणि उंच उडते.* 

*इतर कुणालाही पक्ष्यांच्या जगात असे कठोर आणि घट्ट प्रशिक्षण नसते.*


*मादी गरुड तिच्या पिल्लाला सुमारे 12 कि.मी. वरपर्यंत नेते.* 

*जेवढ्या वर विमान उडत असते एवढ्या वर जाण्यास मादी गरुड ७/८ मिनट घेते.* 

*येथून त्या चिमुरड्या पिल्लाची कठोर परीक्षा सुरू होते.* 


*त्याला येथे सांगितले जाते आपण कशासाठी जन्माला आलो आहोत?* 

*आपले जग काय आहे?* *आपली उंची किती आहे?* 


*आणि नंतर मादी गरुड आपल्या पंजातून त्या पिल्लाला खाली सोडते.*

*वरुन खाली पडत असताना 2 कि.मी. अंतरानंतर खाली येताना, त्या पिल्लाला कळतच नाही की त्याच्या बरोबर काय घडतं आहे.*


*अंदाजे 7 किमी च्या अंतरानंतर पिल्लाचे पंख हळू हळु उघडण्यास सुरुवात होते.* 

*सुमारे 9 किमी अंतरावर त्यांचे पंख आगमनानंतर पूर्णपणे उघडले जातात.* 

*जीवनाचा हा पहिला टप्पा असतो जेव्हा पिल्लू आपले पंख फडफडू लागतो.* 


*आता ते पिल्लू जमिनीपासून फक्त सुमारे 3000 मीटर अंतरावर आहे, परंतु अद्याप त्याने पूर्णपणे उड्डाण करणे शिकलेले नाही.* 

*आता तो पृथ्वीच्या अगदी जवळ येतो आहे.* 

*आता त्याचे अंतर पृथ्वीपासून फक्त 700/800 मीटर अंतरावर आहे.* 

*परंतु त्याचे पंख अद्याप इतके मजबूत झाले नाहीत की, तो उडू शकेल.* 


*पृथ्वीपासून सुमारे /०० मीटर अंतरावर, त्याला आता असे वाटले आहे की, कदाचित हा त्याच्या जीवनाचा शेवटचा प्रवास आहे.* 

*मग अचानक एक पंजा त्याला पकडतो*

*हा पंजा त्याच्या आईचा आहे, जी त्याच्या उजवीकडे उडत असते.* 


*आणि उडण शिकल्याशिवाय त्याचे प्रशिक्षण सतत चालू राहते.*


*हे प्रशिक्षण कमांडोसारखे आहे, तेव्हा जाऊन जगाला 'गरुड'(बाज) मिळतो.* *आणि तो गरुड नंतर आपल्यापेक्षा दहापट जास्त वजन असलेल्या प्राण्याचीसुद्धा शिकार करतो.*


हिंदीमध्ये एक म्हण आहे ... "बाज के बच्चे मुंडेरो पर नहीं उड़ते ..."


नक्कीच, *आपल्या मुलांना आपल्याशी जवळीक ठेवा, जगाच्या समस्या त्यांच्या समस्यांसमोर आणा त्यांना लढायला शिकवा.* 

*त्यांना गरज नसतानाही संघर्ष करण्यास शिकवा.*


*आजच्या वर्तमान सुविधा आणि आई-वडिलांनी केलेल्या लाडकाची सवय यामुळे आपल्या मुलांना "ब्रॉयलर कोंबडी" सारखे बनविले आहे.* 

*ज्यांचे पाय मजबूत आहेत परंतु चालु शकत नाही. पंख वजनदार आहेत पण उडू शकत नाही.*


*कुंडीत असणार रोपट आणि जमिनीवरील रोपट ह्यात खूप फरक असतो.*


*पालकांनो, आपल्या मुलांना नरम नाही कठोर बनवा.*


*शस्त्रे आणि धर्मशास्त्र दोन्ही शिक्षा द्या, हेच आपले प्रथम कर्तव्य आहे.*


*एअर कंडीशनर मध्ये बसायला तेव्हाच द्या जेव्हा तो उष्णतेमध्ये राहू शकेल.* 


*वाहनाची चावी तेव्हाच द्या जेव्हा तो कित्येक किलोमीटर चालताना कंटाळणार नाही.

निलगिरी तेलाचे आश्चर्यचकीत फायदे !!*

 *निलगिरी तेलाचे आश्चर्यचकीत फायदे !!* 


अनेक प्रकारचे तेल आहेत ज्याचा उपयोग त्वचा आणि केसांसाठी तसेच आरोग्यासाठी केला जातो. पण, एक विशिष्ठ प्रकारचे तेल आहे जे तूमच्या प्रत्येक समस्येवर फायदेशीर ठरू शकते. त्या तेलाचे नाव आहे निलगिरी तेल.


निलगिरीच्या तेलामध्ये जिवाणूरोधक, कवक रोधक आणि रोग प्रतिबंधक तसेच अँटिव्हायरस, सुज, अंगदुखी आणि सर्दी खोकला यावर उपयुक्त ठरणारे गुण आहेत. जे की अशा समस्यांवर इलाज करणाऱ्या औषधांसाठी चांगले घटक मानले जातात.


याच तेलाचे काही आश्चर्यचकीत करणारे फायदे जाणून घेऊयात.


हिवाळ्यातील समस्यांसाठी निलगिरीचे तेल लाभदायक आहे. हे तेल सर्दी, पडसं, खोकला, नाक वाहत राहणे, गळ्यामध्ये होणारी खिचखिच, अस्थमा, ब्रोंकाइटिस आणि साईंसायटीसच्या इलाजासाठी मदत करते.


प्रवास झाल्याने किंवा जास्त चालल्याने पाय खूप सुजतात. अशावेळी झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्यावर नीलगिरीच्या तेलाचा मसाज करावा.याने सुज कमी येते आणि दुखणेही कमी होते.


ज्यांना झोप येत नाही, ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे, अशा लोकांसाठी निलगिरी तेल एखाद्या चमत्कारासारखेच आहे. कारण, तेल लावताच तूम्हाला शांत व गाढ झोप लागते.


पायाच्या दुखण्यावर आता गोळी खाण्याची गरज नाही. पाय आणि गुडघे पाठदुखीवर निलगिरी तेल फायद्याचे ठरते. डोळ्यांची नजर कमजोर झाली असेल तर त्यावरही हे तेल कमालीचे गुणकारी ठरत आहे.


जर नीलगिरीचे तेल छातीवर लावले, तर ते जडपणाची समस्या दूर करते. यामुळे शरीराला ऑक्सिजन अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकेल. त्याच्या अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे ते फुफ्फुसातील जळजळ आणि संसर्ग दूर करण्यासाठी देखील मदत करते.


डोकेदुखी, थकवा किंवा तणाव झाल्यास त्या तेलाचे दोन थेंब कपाळावर लावा आणि हलक्या हातांनी पसरवा. यानंतर, काही काळ झोपा. भरपूर विश्रांती घ्या. अरोमा थेरपीमध्ये देखील हे तेल वापरले जाते.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,*


*माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद 🙏🏻*



यामुळे प्या रोज हळदीचे पाणी*

 *यामुळे प्या रोज हळदीचे पाणी*


अनेक जणांना सकाळी पाणी पिण्याची सवय असते. कारण यामुळे पोट स्वच्छ होण्यास मदत होते. मात्र तुम्ही जर फक्त पाणी पीत असाल तर थांबा. कारण कोमट पाण्यात हळद मिसळून पिलात तर पोट साफ होण्याबरोबरच अनेक फायदे होतात. म्हणून पाण्यात हळद टाकून पिल्यास अजून काय फायदे होतात त्यावर एक नजर...


🎯 _*कसे तयार करावे हळदीचे पाणी*_


हळदीचे पाणी पिण्यासाठी एक ग्लास कोमट पाणी घ्या. यामध्ये अर्धा लहान चमचा हळद पावडर, अर्धा लिंबूचा रस आणि एक चमचा मध मिसळा.


*हळदीचे पाणी पिण्याचे फायदे*_

👉 अनेक रिसर्चनुसार हळद पाणी रोज खाल्याने पचनसंस्था सुधारते.

👉 हळदीत अँटीऑक्साइड कॅन्सरच्या कोशिकांपासून सरंक्षण करण्यास मदत करतात.

👉 हळदीचे पाणी प्यायल्याने रक्त न गोठता साफ होण्यास मदत होते.

👉 हळदीचे पाणी नियमितपणे प्यायल्यास फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत होते.

👉 हळदीमध्ये करक्युमिन नावाचे रसायन शरीरातील सूज कमी करण्यासाठी औषध म्हणून काम करते.

👉 तुम्ही सकाळी गरम पाण्यात हळद टाकून पिल्यास तुमची बुद्धी तल्लख होण्यास मदत होते.

👉 हळदीत करक्युमिन गुडघ्याचे दुखणे आणि सूज दूर करण्यात मदत करते.

👉 दररोज हळदीचे सेवन केल्याने ग्लुकोजची लेव्हल कमी राहते. तसेच टाइप 2 च्या डायबिटीजचा


 धोकाही टळतो.

👉 शरीराच्या शुद्धीकरणासाठी गरम पाण्यात लिंबू, हळद आणि मध टाकून पिल्यास यामुळे शरिरातील विषारी पदार्थ बाहेर टाकल..



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



पर्यावरण संरक्षणासाठी अभिनव उपक्रम


 

 मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देणार


                                                                                    - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे



गृहनिर्माण सहकारी संस्थांची परिषद आणि सर्वोत्कृष्ट गृहनिर्माण सहकारी संस्था पुरस्कार -2023



            मुंबई दि. 14 : - मुंबईतील इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देणार असून यासाठी आवश्यकता वाटल्यास प्रचलित नियमांत बदल करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.


            गोरेगांव येथील नेस्को मैदानावर आयोजित गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेत ते बोलत होते . यावेळी सर्वोत्कृष्ट गृहनिर्माण सहकारी संस्था पुरस्कार -2023 यांचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.


            यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर , मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे (म्हाडाचे) मुख्याधिकारी मिलींद बोरिकर उपस्थित होते.


            मुख्यमंत्री पुढे म्हणाले, जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न मोठा आहे.या विषयावर या परिषदेत चर्चा करण्यात आली. काही कायदे आणि नियम यांचा फेर आढावा घेणे आवश्यक आहे. त्यात बदल होणे गरजेचे आहे. शासन स्तरावरून या सूचनांची सकारात्मक दखल घेतली जाईल. त्याच बरोबर गृहनिर्माण संस्थांनी “सेल्फ रिडेव्हलपमेंट” हे धोरण राबविण्याचे ठरविले आहे. यात स्वयं पुनर्विकासाचा सर्व सामान्यांना लाभ होणार आहे. यासाठी ‘स्वयं पुनर्विकास महामंडळ ‘ स्थापन व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावर शासन निश्चितच सकारात्मक विचार करेल असेही श्री शिंदे म्हणाले.


            गृहनिर्माण संस्थेला दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजदर कमी करणे, बाॅम्बे पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवरील चाळीचा प्रश्न, ज्या इमारतींना ओ सी प्रमाणपत्र मिळाले नाही अशा इमारतींचा पुनर्विकास, यासारख्या अनेक मागण्यांवर शासन तोडगा काढेल असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी पुरस्कार मिळालेल्या गृहनिर्माण संस्थाचे अभिनंदन केले तसेच वर्षा बंगल्यावर चहापानाचे आमंत्रण मुख्यमंत्र्यांनी दिले.


            दि. डिस्ट्रीक्ट को-ऑपरेटीव्ह फेडरेशन हे भारतातील सर्वात मोठे फेडरेशन असून 24 हजार गृहनिर्माण संस्था यांचे सदस्य आहेत. गेल्या पंचाहत्तर वर्षांपासून सातत्य राखत उत्तम कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या शिखर संस्थेचे तसेच मुंबै बॅंकेचे कौतुक केले


            यावेळी बोलतांना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, गृहनिर्माण संस्थाच्या जागेसंबधी महसूल विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या विविध मागण्या या परिषदेत करण्यात आल्या. या मागण्यांवर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.


            विदर्भात नझुलच्या जमिनीसंदर्भात लागू केलेला निर्णय इतर ठिकाणी लागू करता येईल, जमिनीवर भरावयाच्या करासंदर्भातही काही महत्वपुर्ण निर्णय घेतला जाणार आहे. यानुसार वारंवार कर भरण्याची आवश्यकता राहणार नाही असा प्रस्ताव मांडत आहोत. सर्व परवानग्या आणि मंजुऱ्यांसाठी एक खिडकी योजना आणली आहे. मुंबईत सहकार भवन साठी जागा द्यावी ही मागणी या परिषदेत करण्यात आली , त्यासाठी गोरेगाव येथे जागा देण्याचे आश्वासन श्री विखे पाटील यांनी यावेळी दिले. परिषदेच्या भव्य आणि यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.


 


गृहनिर्माण संस्थांना पुरस्कार


            स्वच्छता, पर्यावरण रक्षण, सौदर्यीकरण आणि आरोग्यविषयक जन जागृती या निकषांवर आधारित हजारो संस्थांच्या प्रवेशिकांमधून निवडक काही संस्थांना यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. एक लाख रूपयाचा धनादेश, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी असे या पुरस्काराचे स्वरूप होते. निवडक पाच संस्थांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर इतर संस्थांना संचालक मंडळाच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले . यात छेडा हाईट्स, रहेजा विस्टा, स्प्लेंडर कॉम्प्लेक्स, विशाल सह्याद्री आणि संजोग को. ऑप. सं

स्थांचा समावेश होता.


0000


Featured post

Lakshvedhi