Monday, 15 May 2023

झोप शांत लागण्यासाठी उपाय :

 झोप शांत लागण्यासाठी उपाय :


झोपण्यापूर्वी पाय धुवून घ्या. पायाच्या तळव्यांचा मसाज करणे चांगले असते.

झोपताना सैल आणि आरामदायक कपडे घालावेत, ज्यामुळे शरीरात हवेचा संचार होईल.


झोपण्यापूर्वी काही वेळ दीर्घ श्वसन करा. तसेच ध्यान अवश्य करा.


दक्षिणेकडे पाय करून झोपू नका. गुरू, देवता, त्यांच्या मूर्ति, चित्र, वस्तू तसेच आदराच्या स्थानाकडे पाय करू नये.


स्वयंपाक घरात झोपू नये. तसेच बेडरूममध्ये खाद्यपदार्थ ठेवू नये.


बेडरूममध्ये ताजी खेळती हवा यायला हवी याकडे लक्ष द्या.


कधीही अंधाऱ्या, दमट आणि ओलसर खोलीत झोपू नये.


झोपताना डोकं थोडं उंच ठेवा. त्याकरिता पातळ उशीचा वापर करा.


उन्हाळ्यात छतावर किंवा मोकळ्या आकाशाखाली झोपू शकता. मात्र थंडी किंवा पावसाळ्यात नको.


थेट सूर्यप्रकाशात झोपणे योग्य नाही. मात्र वातावरण चांगले असल्यास टिपूर चांदण्याखाली तुम्ही झोपू शकता.


दुपारी का झोपू नये | दिवसा झोपणे योग्य आहे का? 


आयुर्वेदानुसार दिवसा झोपल्याने शरीरातील कफ वाढतो. रक्ताभिसरणात अडथळे येतात. त्यामुळे डोकं जड वाटतं, श्वास घ्यायला त्रास होतो. आळस, सर्दी-खोकला, डोकेदुखी, अपचन, खाज, फोडं, घश्याचा त्रास, रक्ताची कमतरता इत्यादी आजार संभवतात. या सर्व कारणांमुळे दुपारी झोपू नये. तरीही काही व्यक्तींना दुपारी झोपण्याची गरज असते. त्यांच्या बद्दल जाणून घेऊया.


दुपारी फक्त ह्यांनीच झोपावे :


दुपारी जेवण झाल्यावर लगेच झोपू नये. मात्र न झोपता केवळ पडून रहावे असे जरूर वाटते. जड जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती घेणे आरोग्यासाठी चांगले असते. मात्र बसून थोडी डुलकी घेणे (५-१०मिनिटे) जास्त योग्य असते. दुपारच्या जेवणानंतर असे केल्याने वात, कफात संतुलन साधले जाते.

लहान मूल व वृद्ध व्यक्ती.


रात्र पाळी करून येणारी व्यक्ती.

जे अति शारीरिक वा मानसिक काम करतात असे लोक.


ज्यांना वेदना, मार, आघात, क्षय आदी व्याधी आहेत असे लोक.


ज्यांना अतिशय तहान लागते, तसेच डायरिया, पोटदुखी, श्वासाचे विकार, उचक्या, किंवा मासिक पाळीत खूप वेदना होतात.


ज्यांना क्रोध, भय, उदासीनता घेरून असते.

मोठ्या प्रवासानंतर, खूप जड वजन उचलल्यानंतर, अति संभोगानंतर, जास्त मद्यपान केल्यानंतर, खूप वेळ गायन किंवा अभ्यास केल्यानंतर.


पंचकर्म चिकित्सेनंतर.

उच्चतम तापमान असते अश्या दाहक उन्हाळ्यात दिवसा थोडी झोप घेणे योग्य असते.


दुपारी कोणी झोपू नये?


कफकारक प्रकृतीच्या व्यक्ती.

शरीरात कफाचे संतुलन बिघडले असल्यास.

अतिशय स्थूल व्यक्तींनी.


जर शरीरात विषाक्त तत्व वाढलेले असल्यास दुपारी झोपू नये.


निद्रानाश उपाय | गाढ निद्रेसाठी अजून काही उपाय :


पूर्णपणे आच्छादलेली सुंदर शय्या.

खोलीत मंद सुगंधाचा दरवळ आणि मधुर संगीत.


स्वच्छ, शांत, मोकळी आणि आरामदायी खोली.


योग्य वेळेत झोपण्याची आणि जागे होण्याची सवय.


तेलाने अभ्यंग मालिश करून स्वतःला शिथिल करा.


वरील काही निद्रानाशासाठी उपाय आहेत. आयुर्वेदिक वैद्याच्या सल्ल्यानुसार, व्यक्तीगत पातळीवर चांगली झोप येण्यासाठी नैसर्गिक (हर्बल) उपाययोजना केली जाऊ शकते


केवळ माहिती साठी


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



माँ एक अस्मा,सारे जहामे

 


Sunday, 14 May 2023

तुमच्या दुकानात देव मिळेल कां?*

 *तुमच्या दुकानात देव मिळेल कां?

*पाच वर्षांचा एक छोटा मुलगा हातात एक रुपया घेऊन एका किराणा दुकानात जाऊन ऊभा राहिला.* 


*दुकानदाराने त्या मुलास विचारले बाळा काय हवं तुला?* 


*त्या मुलाने दुकानदारास विचारले* 

*तुमच्या दुकानात देव मिळेल का?* 


*हे ऐकून दुकानदार संतापला आणि त्या मुलावर जोराने ओरडून त्याने त्या मुलाला दुकानातून हाकलून दिले.* 


*तो मुलगा दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, असे करत करत ३० - ४० दुकाने फिरला.* 


*प्रत्येक दुकाना समोर जाऊन एकच विचारायचा तुमच्या दुकानात देव मिळेल का?* 


*शेवटच्या दुकानात एक म्हातारे आजोबा बसले होते, त्यांना पाहून ह्या लहान मुलाने विचारले, बाबा तुमच्या दुकानात देव मिळेल का?* 


*त्या आजोबांनी विचारले बाळा तुझ्याकडे किती पैसे आहेत?* 


*मुलाने प्रांजळपणाने सांगितले एक रुपया आहे माझ्याकडे. त्यांनी मुलाला जवळ घेत विचारले, बाळा तुला कशाला देव हवा आहे? तु देव विकत घेऊन करणार काय ?* 


*प्रश्न ऐकून मुलाला खूप बरं वाटले. त्याच्या अशा पल्लवीत झाल्या, बाबा असे विचारतात म्हणजे नक्कीच यांच्या दुकानात देव असणार आहे.* 


*तो म्हणाला ह्या जगात मला माझ्या आई शिवाय कोणीच नाही. रोज माझी आई कामाला जाते आणि माझ्यासाठी जेवण घेऊन येते. पण काल पासून ती हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे. जर उद्या माझी आई मेली तर मला जेवण कोण देणार?* 

*डॉक्टर म्हणाले की आता फक्त देवच तुझ्या आईला वाचवू शकतो.*

*म्हणून मी देव शोधतो आहे बाबा.* 

*आहे ना तुमच्या दुकानांत देव?* 


*दुकानदाराने त्या मुलाला विचारले किती पैसे आहेत तुझ्याकडे?* 


*फक्त एक रुपया बाबा.* 

*बरं, नको काळजी करू.*

*एक रुपयात देखील देव भेटेल!*


*दुकानदाराने तो एक रुपया घेतला आणि एक ग्लास फिल्टरचें पाणी त्या मुलाच्या हातात दिले आणि म्हणाला की हे पाणी घेऊन जा आणि तुझ्या आईला पाज. हे पाणी प्यायला दिले की आई तुझी ठीक होईल.* 


*दुसऱ्या दिवशी एक स्पेशालिस्ट डॉक्टर हॉस्पिटल मध्ये आले आणि आईचें ऑपरेशन झाले. कांही दिवसात ती ठीक ही झाली.* 


*डीस्चार्ज च्या दिवशी हॉस्पिटलचें बिल बघून ती बाई चक्रावली! पण डॉक्टर धीर देत म्हणाले. काळजी करू नका. एका वयस्कर व्यक्तीने हे सर्व बिल भरले आहे आणि सोबतच एक चिट्टीही ठेवली आहे.* 


*चिठ्ठी उघडून वाचताच, माझे धन्यवाद मानू नकोस, तुला वाचवले ते परमेश्वरानेच. मी फक्त निमित्त होतो. तुला धन्यवाद द्यायचेच असतील तर आपल्या छोट्या अज्ञान बाळाला दे, जे बाळ एक रुपया घेऊन देव शोधत फिरत होते.* 

*यालाच म्हणतात विश्वास ...* 

*देवाला शोधण्यासाठी करोडो रुपये दान करावे नाही लागत! श्रद्धा, भाव, विश्वास असला की एक रुपयातही देव मिळतो.* 


*तात्पर्य:* 

*भक्ती साधी भोळी असू दे. फक्त मनापासुन नामस्मरण केले की देव कोणत्या न कोणत्या रूपात येऊन नक्की मदत करतो ....!*

🛕⛪🕋🕍🕌

🌼🌺🌸🌼🌺🌸🌼🌺🌸🌼🌺🌸

कांदिवलीतील रोटी बँक उपक्रम ‘मानवतेचे प्रमुख केंद्र’ बनेल


 कांदिवलीतील रोटी बँक उपक्रम ‘मानवतेचे प्रमुख केंद्र’ बनेल -

आ. अतुल भातखळकर यांचा विश्वास, मुंबईतील पहिल्या वहिल्या उपक्रमाचे लोकार्पण

फोटो

मुंबई : कांदिवली पूर्व विधानसभेत निर्माण करण्यात आलेल्या ‘रोटी बँक’ तसेच मोफत ग्रंथालय, पाणपोई, सुशोभिकरण, सार्वजनिक शौचालय अशा विविध प्रकल्पांचे लोकार्पण आज होत आहे. येणाऱ्या काळात हे केंद्र ‘मानवतेचे एक प्रमुख केंद्र’ बनल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला. कांदिवली पूर्व विधानसभेतील आकुर्ली रोड येथे आ. भातखळकर यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या ‘रोटी बँक’ या मुंबईतील पहिल्या वहिल्या उपक्रमाच्या लोकार्पणानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खा. गोपाळ शेट्टी, त्रिवेणीबेन आचार्य यांसह मान्यवर उपस्थित होते.

आ. भातखळकर म्हणाले, जात, पात, धर्म, भाषा यापलिकडे गोरगरिब व्यक्तींची सेवा करणे, मानवतेची सेवा करणे, असे संस्कार आमच्यावर झाले आहेत. स्व. दिनदयाळ उपाध्याय यांनी ‘अंत्योदय’ची कल्पना मांडली. समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करणे ही आपली आर्थिक निती असायला हवी, या त्यांच्या विचाराच्या आधारावर येणाऱ्या काळात आम्ही जरूर काम करू. ‘रोटी बँक’ हा उपक्रम कांदिवली पूर्वमध्ये अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात येईल, असेही ते म्हणाले.

यावेळी खा. शेट्टी म्हणाले, लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आतापर्यंतच्या २१ वर्षांच्या काळात एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर विविध प्रकल्पांचे लोकार्पण होताना मी पहिल्यांदाच पाहिले आहे. याचा मला अभिमान आहे. कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्रात जेव्हा आपण फिरत असतो तेव्हा एक बाब निदर्शनास येते की, प्रत्येक अर्धा किमी अंतरावर आ. भातखळकर यांच्या माध्यमातून झालेले विविध प्रकल्प नजरेस पडतात. आमदार झाल्यानंतर ज्या वेगात त्यांनी काम केले, ते अभिमानास्पद आहे. या रोटी बँकच्या माध्यमातून समाजातील गोरगरिबांची सेवा होणार आहे, याचा मला आनंद आहे. यावेळी त्रिवेणीबेन आचार्य यांचेही भाषण झाले. यावेळी अनुकंपा संस्थेच्या प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. यावेळी गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.

उद्योजक

 *🔰फ्रोझन मटार व्यवसाय तुम्हाला करील मालामाल, खर्चाच्या 10 पट कमाई होईल !*


*📍या व्यवसायासाठी 10 लाखापर्यंत Mudra योजनेअंतर्गत (Mudra) बिनव्याजी कर्ज उपलब्धआहे.*


*✅फ्रोझन मटार मशीन खरेदी करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा*


👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻


*https://bit.ly/42NBzJU*

*https://bit.ly/42NBzJU*

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन


            सातारा दि.13 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर येथे आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.


            यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई आदी उपस्थित होते.


            पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी डॉक्टर आणि रुग्णांशी संवाद साधला. आरोग्य शिबीरामध्ये किमान 10 हजार नागरिकांच्या आरोग्य तपासणीची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, आयएमए, कृष्णा रुग्णालय कराड यांची पथके तैनात करण्यात आली होती.


            शिबिरात रक्त लघवी तपासणी, दंत चिकित्सा, नेत्र रोग, बालरोग, तातडीची सेवा, औषधे, लॅबोरेटरी, एनसीडी, रक्तदाब, मधुमेह, कर्करोग तपासणी, औषध विभाग, कान, नाक, घसा, त्वचारोग, किडनी विकार, शस्त्रक्रिया, अस्थिरोग, स्त्रीरोग, मानसोपचार तपासणी असे कक्ष तयार करण्यात आले होते. 40 तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ला

भला.


भूजल तील मासेमारी

 


Featured post

Lakshvedhi