Saturday, 6 May 2023

पांढरी किंवा पिवळी कावीळ वरील उपाय

 पांढरी किंवा पिवळी कावीळ वरील उपाय : केळीतील अतिशय सोपे औषध घरगुती उपाय !

आरोय टीप्स

 पांढरी किंवा पिवळी कावीळ वर उपाय केळीतील अतिशय सोपे औषध घरगुती उपाय !


मेडिकल सायन्सने कितीही जरी प्रगती केलेली असली तरी कावीळ हा रोग आहे तो आयुर्वेदिक उपायाने जेवढ्या लवकर बरा होतो तेवढ्या लवकर दवाखान्यामध्ये तो कधीही बरा होत नाही.


कावीळ साठी तुम्हाला माहीत असेल की ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे औषध तुम्हाला दिली जातात काही ठिकाणी नाका मध्ये ड्रॉप टाकले जातात काही ठिकाणी तुम्हाला दह्यामध्ये औषध दिल जात तर काही ठिकाणी केळीमध्ये औषध दिलं जातं.


तर हे केळी मधल औषध आहे ते तुम्हाला सांगणार आहे केळी मधलं औषधे सगळ्यात सोप आहे आणि सर्वांना करता येईल अस आहे आणि सहज उपलब्ध होणार आहे म्हणून हा उपाय कोण घेणार आहोत


पावसाळ्याचे दिवस आहेत तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कावीळ होण्याचं जास्त प्रमाणामध्ये जाणवते. कारण कावीळ पाण्यामधून जास्त प्रमाणामध्ये होत असते. रक्तामधील बिलिरुबिन पातळी वाढली तर आपली त्वचा रंग बदलून ती पिवळसर दिसायला लागते आणि आपण त्याला कावीळ झाली असे म्हणतो.


कावीळ ही ही दोन प्रकारची असते. एक पांढरी कावीळ आणि दुसरी पिवळी कावीळ. कोणतीही कावीळ असू देत या औषधाने ती सहज रित्या निघून जाते.


त्याची लक्षणे काय असतात तर खूप अशक्‍तपणा जाणवतो डोकेदुखी ताप भूक कमी होणे बद्धकोष्ठतेचा त्रास होणे मळमळ होणे त्याचबरोबर तुमचे डोळे आणि तुमची जीभ पिवळसर रंगाची होणे ही काविळीची सामान्य लक्षण असतात. पित्तरस रक्तामध्ये मिसळला तर आपल्या त्वचेला जास्त पिवळा रंग येत असतो आणि जीवाणूंचा संसर्ग होऊन यकृताला सूज येते आणि तेव्हा आपल्याला या आजाराचे स्वरूप आहे ते गंभीर होत असत.


त्याला इंग्रजीमध्ये हिपॅटायटीस असं म्हणतात टायफाईड होऊन या आजारामुळे त्याला बाधा होऊन कावीळ होऊ शकते. तर कावीळ एक सामान्य आजार आहे सर्वांना होऊ शकतो त्याचा वेळेवर जर उपाय केला तर कावीळ कुठल्याही प्रकारची असली तरी ती सहजपणे बरी होते.


कावेळीसाठी केळीमध्ये दिले जाणारे औषध सर्वत्र प्रसिद्ध औषध असते. हे औषध कसं करायचं आपल्याला कोणी सांगत नाही. आपल्याला औषध दिलं जातं औषध देणारा कडे जातो आणि हे औषध काय आहे ते दोन-तीन दिवस आपण घेऊन येतो केळीमध्ये आणि आपण खात असतो तर हे इतकं सामान्य औषध आहे की तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की एवढ्या सामान्य गोष्टींमधून कावीळ आहे सहजपणे बरी होते.


 या उपायासाठी आपल्याला फक्त अर्ध केळ लागणार आहे. केळीच्या बऱ्याच जाती आहेत गावठी आणि जवारी. त्याच्यामध्ये कुठलीही केळीची जात या उपायासाठी चालते तुम्हाला जर गावठी केळी असेल तर अतिउत्तम. तरी त्यासाठी आपल्याला फक्त अर्ध केळ लागणार आहे. हे केळ पिकलेले असावा


 या उपायासाठी आपण अर्ध केळी घेऊया तुम्ही पाहिले असेल ज्या ठिकाणी तुम्ही हे औषध घेतलेल आहे त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला अर्ध्या केळीमध्ये औषध दिलं जातं. तर अर्धी केळी आपल्याला मधून कापून घ्यायचे आहे यामध्ये एक ग्रॅम चुना घालायचा आहे एक ग्राम म्हणजे एका गव्हाच्या धान्यात दाण्या एवढा घालायचा आहे.


केळ सोलून ते मधोमध कापून त्यामध्ये चुना लावल्यानंतर याची चव असते ती थोडीशी कडसर लागते. तेव्हा आपल्याला ते चांगल्या पद्धतीने असो मिक्स करून घ्यायचा आहे आणि ज्या माणसाला काविळ झालेली आहे त्या माणसाला उपाशी सकाळी उपाशीपोटी खायला द्यायच आहे.


अशा पद्धतीने तुम्ही औषधे घेतलेल असेल. केळीमध्ये दिलं जाणारं कावीळचे औषध सलग जर तुम्ही पाच दिवस घ्यायचं आहे हे उपाय उपाशीपोटी करायचा आहे तर कितीही प्रमाणात तुम्हाला कावीळ झालेली असेल तर ती सहजरीत्या उतरते.


कावीळ झाली असेल तर सलग पाच दिवसांमध्ये या पद्धतीने औषध तुम्ही घेऊन पहा. तुम्ही एखाद्या ठिकाणी केळी मध्ये दिलेले औषध पाहिला असेल तर या पद्धतीने तुम्ही कावीळ वर उपाय करा. कावीळ सहजरीत्या उतरून जाते. हे सहज रित्या उपलब्ध होणार आणि सर्वांना करता येणारा साध सोप औषध आहे. तुम्हाला पहिल्या दिवसापासून याचा फरक जाणवेल


 यासाठी तुम्हाला काही पथ्य पाळायची आहेत. तुम्हाला पूर्ण विश्रांती घ्यायची आहे आणि विश्रांती घेत असताना तुम्हाला तिखट वगैरे पदार्थ तेलकट आहे तूपकट हे पदार्थ खायच टाळायचे आहे. दारू पूर्णपणे टाळायची. त्याचबरोबर मांसाहार करणे पूर्णपणे टाळायच आहे. जरी कावीळ पाच दिवसांमध्ये उतरली तरी21 दिवसांपर्यंत तुम्हाला हे पथ्य पाळायचे आहेत.


कोणत्याही प्रकारची काय वेळ झाली असेल तर अर्धा केळी मध्ये चुना घालून सलग पाच दिवस हा उपाय केला तर कावीळ सहजरित्या उतरून जाईल. तर हा उपाय अवश्य करून बघा आणि याची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांना जरूर द्या.


.. अतिशय मौल्यवान माहिती.. 👆


*⭕️

एरंडेल तेल*

 *एरंडेल तेल*



एरंडेल तेलाला आयुर्वेदात अमृताची उपमा देण्यात आली आहे. एरंडेल तेलाचे आरोग्यविषयक अनेक उपयोग आहेत ते कोणते ते आपण पाहूया.


१. पोट साफ होण्यासाठी


एरंडेल तेल घेतल्याने पोटात न दुखता जुलाब होऊन पॉट साफ होते. वृद्धांच्या पोट साफ न होण्याच्या तक्रारीतही हे रोज घेता येते. सुट्टीच्या आदल्या दिवशी रात्री गरम पाण्यात एक चमचा एरंडेल तेल घ्यावे.


२. डोळ्यांच्या विकारांवर


रांजणवाडी किंवा डोळ्याच्या इतर तक्रारींवर यासाठी एरंडेलाचा थेंब बोटावर घेऊन तो काजळासारखा पापण्याच्या आत फिरवावा. तसेच एरंडेल तेल पापण्यांना लावल्याने पापण्यांची देखील दाट होतात.


३. आमवात आणि सांधेदुखी


युरिक ऍसिड वाढणे आमवात, सायटिका, गाऊट, गुडघेदुखी हे हल्लीच्या तरुण वयात देखील होऊ लागले आहेत. ज्यांना या समस्या आहेत त्यांनी आहारात रोज सकाळी रात्री थोडं तेल ज्वारीच्या पिठात घालावे व त्याची भाकरी करून दिवसातून दोन्ही वेळा खावी. ८-१५ दिवस करून पाहावे. दुखऱ्या सांध्यांना सुंठ पावडर एरंडेलचा लेप लावल्यास आराम पडतो.


४. लहान मुलांसाठी


लहान मुलांना मधातून किंवा कणकेची पोळी करताना त्यात एरंडेल व चिमूटभर सुंठ पावडर टाकून ती द्यावी. हे असे महिन्यातून किमान एकदा तरी मुलांना द्यावे. पूर्वी नुकत्याच जन्मलेल्या बाळालाही मध एरंडेलाचे चाटण देण्याची पद्धत होती.


५. गर्भवतींसाठी


गर्भवतींनी ‘सिझेरियन’ टाळायचे असेल तर नववा महिना लागताच रोज एक चमचा एरंडेल घ्यावे.( हे घेताना एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या.


६. रक्तदोषात गुणकारी


अंगावर बारीक पुरळ उठते, खाज सुटते, अंगावर गजकर्ण, नायटे उठलेले असतात. अशा वेळी एरंडतेल एक चमचा, दोन चमचे तूप व एक चमचा मध एकत्र करून पोटात देत जावे.


७. उत्तम झोप साठी  


अनेक व्यक्तींना बिछान्यावर पडल्यानंतर ताबडतोब झोप लागत नाही. सतत विचार सुरु राहणे यामुळे झोप अजिबात येत नाही. असा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी रोज डोक्यास व तळपायास सावकाशपणे एरंडेल तेल काशाचे पात्राने चोळून तेल जिरावावे नक्कीच गुण येतो.

*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*


एकावे ते नवलच

 ✨ इंग्रजांनी रोवलेला एक वैशिष्ट्यपूर्ण ‌दगड(पोलपोस्ट) जो मनकांहळ्ळी, जिल्हा हासन, कर्नाटक येथे आहे. या दगडाच्या उजव्या बाजूला पडलेले पावसाचे 🌧️पाणी कावेरी नदीतुन पुर्व दिशेला वाहत जाऊन बंगालच्या उपसागरात जाते/जाऊन मिळते आणि डाव्या बाजूला पडलेले पावसाचे🌧️पाणी नेत्रावती नदीतुन पश्चिमेला अरबी समुद्रास जाऊन मिळते. निसर्गाची अजब-गजब किमया जी वर्षांनुवर्षे अविरतपणे सुरू आहे. ह्या नैसर्गिक आणि अद्भुत कलाविष्कारास सविनय नमन🙏. ज्या व्यक्ती ने निरिक्षण पुर्वक हे शोधून काढले त्यालाही नमन 🙏आणि सरतेशेवटी ज्याने ही माहिती पाठविली त्याचेही अभिनंदन👌👏.👍👍💐💐💐


Friday, 5 May 2023

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून 8 हजारांहून अधिक रुग्णांना 60कोटी 48 लाखांची आर्थिक मदत

 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून

8 हजारांहून अधिक रुग्णांना 60कोटी 48 लाखांची आर्थिक मदत


               मुंबई, दि. 5 : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने गेल्या 10 महिन्यांत 8 हजार 192 रुग्णांना एकूण 60 कोटी 48 लाख रुपयांची मदत दिली आहे.


            मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून जुलै महिन्यात 194 रुग्णांना 83 लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात 276 रुग्णांना 1 कोटी 40 लाख, सप्टेंबर महिन्यात 336 रुग्णांना 1 कोटी 93 लाख, ऑक्टोबर महिन्यात 256 रुग्णांना 2 कोटी 21 लाख, नोव्हेंबर महिन्यात 527 रुग्णांना 4 कोटी 50 लाख,डिसेंबर महिन्यात 1031 रुग्णांना 8 कोटी 52 लाख, जानेवारी 2023 मध्ये 1060 रुग्णांना 8 कोटी 89 लाख तर फेब्रुवारी 2023 मध्ये 1237 रुग्णांना 10 कोटी 27 लाख, मार्च 2023 मध्ये 1469 रुग्णांना 11 कोटी 95 लाख तर एप्रिल मध्ये विक्रमी 1984 रुग्णांना 9 कोटी 93 लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

जलद न्यायासाठी पर्यायांचा स्वीकार गरजेचा

 जलद न्यायासाठी पर्यायांचा स्वीकार गरजेचा


राज्यस्तरीय वकिल परिषदेत न्यायमूर्ती भूषण गवई यांचे मत


 धाराशिव, दि. 5 - न्यायव्यवस्थेवरील वाढता कामाचा ताण आणि न्यायासाठी लढा देणाऱ्या पक्षकारांना वेळेत न्याय मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी आधुनिक काळातील साधणे, तंत्रज्ञानाचा स्वीकार करून काम करणे गरजेचे आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले.

       शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात महाराष्ट्र आणि गोवा वकिल परिषदेच्यावतीने शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वकिल परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र व गोवा वकिल परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. मिलिंद पाटील होते. यावेळी व्यासपीठावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला, न्यायमूर्ती नितीन सांबरे, पालक न्यायमूर्ती अरूण पेडनेकर, ई-कमिटीचे माजी उपाध्यक्ष तथा माजी न्यायमूर्ती आर. सी. चव्हाणा, भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर अनिल सिंग, राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल डॉ. बिरेंद्र सराफ, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे चेअरमन मनन कुमार मिश्रा, माजी न्यायमूर्ती व्ही. के. जाधव, कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष सुरेंद्र तावडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.  


      पुढे बोलताना न्यायमूर्ती गवई म्हणाले की, सर्व कायद्यांची भूमी असलेल्या भारतीय राज्यघटनेमुळे आपला देश एकसंघ आहे. राज्यघटनेच्या निर्मितीत महत्वाचे योगदान असलेले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबवडे गावाचा तालुका असलेल्या मंडणगड येथे अजूनही न्यायालय नाही. डॉ. आंबेडकर यांच्या वकिली व्यवसायाला 3 एप्रिलला शंभरी पूर्ण झाली. देशाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे. याचेच औचित्य साधून न्यायव्यवस्थेत सकारात्मक आणि आधुनिकता आणली जात आहे. राज्यातील कोल्हापूर येथे खंडपीठाची निर्मिती आणि डॉ. आंबेडकर यांच्या गावाचा तालुका असलेल्या मंडणगड येथे न्यायालय सुरू होण्यासाठी कार्यवाही सुरू आहे, असे नमूद केले.


      कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. मिलींद पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी धाराशिवच्या 60 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तींच्या उपस्थितीत वकिल परिषद घेण्याचा मान बार कौन्सिलला मिळाला असल्याचे समाधान व्यक्त केले. यावेळी अ‍ॅड. जयंत जायभावे, भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर अनिल सिंग यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात राज्यातील 14 ज्येष्ठ विधीज्ञांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र व गोवा वकिल परिषदेच्यावतीने 384 विधिज्ञ मंडळांतील वकिलांना ई-फायलिंगची अडचण दूर करण्यासाठी देण्यात येणाऱ्या संगणक संचाचे मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.


    कार्यक्रमास राज्यातील जवळपास दोन हजार वकिल उपस्थित होते. शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहचावा

न्याय सर्वांसाठी या तत्वाला साजेसे काम न्यायव्यवस्थेतील सर्व घटकाकडून अपेक्षित आहे. न्यायालयात असंख्य प्रकरणे प्रलंबित आहेत. त्याला आधुनिकतेची जोड म्हणून ई-फायलिंगचा पर्याय अंमलात आला आहे. त्यामुळे याचा फायदा न्यायापासून वंचित असलेल्या समाजातील शेवटच्या घटकाला होणे गरजेचे आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला यांनी व्यक्त केले.


तंत्रज्ञानाचा नकारात्मक वापर निरर्थक


         समाजात तंत्रज्ञानाचा चांगल्या आणि चुकीच्या गोष्टींसाठी वापर होत आहे. दुर्दैवाने चुकीच्या गोष्टीसाठी याचा अधिक वापर होत आहे. परिणामी मानवी बुध्दीमता कृत्रिम तंत्रज्ञानाच्या वापराने अधिक कमकुवत होत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वाईट वापर होत असल्यामुळे गूगलचे सहसंचालक डॉ. हिन्टेन यांना राजीनामा द्यावा लागला. तर सकारात्मक बाबतीत स्वातंत्र्य संग्रामाचा लढा अधिक विस्ताराने मांडण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली असती तर ती अधिक विस्ताराने आणि नवीन माहितीच्या आधारे मांडता आली असती. परंतु आजही स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्याबाबत लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रत्येक आवृत्तीत तोच मर्यादीत मजकूर आढळतो आहे. त्यामुळे चांगल्या गोष्टीसाठी, बुध्दीमत्तेच्या विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, असे आवाहन कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी केले. 


********

राज्यात 6 मेपासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरांचे आयोजन

 राज्यात 6 मेपासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरांचे आयोजन


- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा


            मुंबई, दि. 5 : कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थी, युवक-युवतींसाठी राज्यातील 36 जिल्ह्यांत जिल्हास्तरावर तसेच राज्यातील सर्व 288 मतदारसंघांत शनिवार 6 मे ते 6 जून 2023 या कालावधीत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत असून त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या करिअरविषयक विविध संधींची माहिती या शिबिरांमधून दिली जाणार आहे. यामध्ये विद्यार्थी, युवक-युवतींसह पालकांचेही करिअरविषयक समुपदेशन केले जाणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.


            राज्यातील ग्रामीण, शहरी अशा सर्व भागातील विद्यार्थी, युवक-युवती व पालकांनी या शिबिरांमध्ये सहभागी व्हावे व बदलत्या काळास अनुसरुन ठिकठिकाणी सुरु झालेल्या विविध शैक्षणिक, व्यावसायिक इत्यादी अभ्यासक्रमांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन मंत्री श्री. लोढा यांनी केले आहे.


           सर्व जिल्ह्यांमध्ये नियोजित ठिकाणी शिबीरांचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. या करिअर शिबीरांच्या माध्यमातून विद्यार्थी, युवक-युवती व पालकांना विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणार आहे. करिअर शिबीराच्या ठिकाणी विविध स्टॉलच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येणार आहे. इयत्ता दहावीनंतर करिअर कसे निवडावे, दहावी नंतरच्या शिक्षणाच्या विविध संधी, बारावी नंतरच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा, व्यक्तिमत्व विकास यासोबतच इतर विविध विषयांबाबत मार्गदर्शन देण्यात येणार आहे. आयटीआय व्यवसाय अभ्यासक्रम, इंजीनियरिंग व तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रम, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ व त्यातील विविध अभ्यासक्रम, शैक्षणिक कर्ज व शिष्यवृत्तीविषयक विविध योजना, रोजगार व स्वयंरोजगारविषयक विविध योजना, स्थानिक शैक्षणिक संस्था, परदेशातील उच्च शिक्षण आदींविषयी मार्गदर्शन देण्यात येणार आहे.


            या संधीचा लाभ घेण्यासाठी स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी (आयटीआय) संपर्क साधावा, तसेच सोबत जोडलेल्या क्यूआर कोड (QR CODE) च्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, युवक-युवतींनी नोंदणी करून शिबीरात सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन., व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी यांनी केले आहे.


मुंबईत कुर्ला येथे आयोजन


            छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे उद्या शनिवार दिनांक 6 मे रोजी कुर्ला येथील डॉन बॉस्को इंडस्ट्रीयल ट्रेनिंग सेंटर येथे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होईल. दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. भविष्यात रोजगाराच्या संधी, व्यक्तिमत्व विकास, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी, नवीन तंत्रज्ञान आधारित प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी याबाबत वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.

लोकप्रतिनीधींच्या मतदारसंघांतील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

 लोकप्रतिनीधींच्या मतदारसंघांतील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा.

राज्यात सुरू असलेली विकासकामे 'मिशन मोडवर' पूर्ण करावित.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

            मुंबई, दि. 5 : राज्यात सुरू असलेली आणि प्रस्तावित विविध विकासकामे मिशन मोडवर पूर्ण करावित. जेणेकरून सामान्य नागरिकांना त्याचा लाभ मिळू शकेल, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विविध विभागांच्या सचिवांना दिले.


            खासदार गजानन किर्तीकर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अमित साटम, आमदार संजय गायकवाड या लोकप्रतिनीधींच्या मतदारसंघांमधील विविध विकास कामांविषयी आढावा घेणारी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यावेळी उपस्थित होते.


            लोकप्रतिनिधींच्या मतदार संघांमध्ये सुरू असलेले रस्ते, उद्याने, जलसिंचन प्रकल्प, वळण रस्ते, उड्डाणपूल ही विकासकामे कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी मिशन मोडवर काम करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ह्या सर्व विकासकामांचा प्रत्यक्ष फायदा सामान्यांना मिळाला पाहिजे. त्यासाठी आवश्यक त्या प्रक्रियांना गती देऊन कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


            मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खेळांची आणि मनोरंजनाची मैदाने देखभाल तत्वावर हस्तांतरित करण्यास शासनाने दिलेली स्थगिती उठवावी, अशी मागणी यावेळी खासदार श्री. किर्तीकर, श्री. शेट्टी यांनी केली. याबाबत सविस्तर चर्चा बैठकीत करण्यात आली. यासंदर्भात एक धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना दिले. वर्सोवा अंधेरी येथील खाडीतील गाळ काढणे, त्या ठिकाणी नवीन मच्छ‍िमार जेट्टी बांधणे याविषयी चर्चा झाली.


            आमदार संजय गायकवाड यांच्या बुलढाणा मतदारसंघातील विविध विषयांबाबत यावेळी चर्चा झाली. बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेमुळे सुमारे ४३ हजार हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार असून त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे या योजनेला गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना दिले.


            बुलढाणा शहरालगत कृषी महाविद्यालय स्थापन करणे, मोताळा तालुक्यात नवीन एमआयडीसी स्थापन करणे, बुलढाणा शहराला रिंग रोड मंजूर करून बुलढाणा-खामगाव रस्त्यावरील बोथा अभयारण्यात उड्डाणपूल बांधणे, राजूर घाटात एकेरी वाहतूक करणे, आदी विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.


०००००

Featured post

Lakshvedhi