Sunday, 30 April 2023

पूर्णब्रह्म -भाजलेल्या वांग्याचे फायदे.....*

 *भाजलेल्या वांग्याचे फायदे.....*


वांग्याचे भरीत तुम्ही अगदी चवीने खात असाल परंतु यामधील औषधी गुणांची तुम्हाला माहिती आहे का? वांग्यामध्ये खोकला, संक्रमित आजारांना दूर ठेवण्याची क्षमता आहे. भारतातील जवळपास सर्व भागांमध्ये वांग्याची शेती केली जाते. आदिवासी भागांमध्ये विविध आजारांवर उपचार करण्यासाठी वांगे वापरले जाते. वांग्याच्या सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता, अपचन, डायबिटीज इत्यादी समस्या दूर होतात. येथे जाणून घ्या, वांग्याचे काही खास उपाय आणि फायदे…


*खोकल्यावर गुणकारी...* 

पाताळकोट येथील आदिवासी वांगे चुलीवर भाजून त्यावर चवीनुसार मीठ टाकतात. यांच्या माहितीनुसार अशा पद्धतीने वांगे खाल्ल्यास खोकला बरा होण्यास मदत होते आणि कफ बाहेर पडतो.


*भूकेला शांत करते...* 

वांग्यामध्ये भरपूर प्रमाणात डाएटरी फायबर्स आढळून येतात, जे वजन कमी करू इच्छित असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरतात. वांग्याचे सेवन केल्याने शरीरातील फायबर्सचे प्रमाण वाढते आणि यामुळे कॅलरीज कमी होऊ शकतात. फायबर्सचे पोटातील प्रमाण वाढल्यामुळे भूक शांत होते.


*उच्च रक्तदाबाची समस्या ठीक होते...*

आदिवासी लोकांच्या माहितीनुसार वांग्याचे सेवन उच्च रक्तदाब आणि हृदयाचे आजार ठीक करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. आधुनिक विज्ञानानुसार शरीरातील आयर्नचे जास्त प्रमाण नुकसानदायक ठरू शकते. वांग्यातील नासुनीन नावाचे रसायन शरीरातलं अतिरिक्त आयर्न नियंत्रित करते. या कारणामुळे हृदय संचालन सामान्य राहते आणि उच्च रक्तदाबही नियंत्रणात राहतो.


*शांत झोप लागते...*

भाजलेल्या वांग्यावर चवीनुसार मध टाकून रात्री खाल्ल्यास शांत झोप लागते. आदिवासी लोकांच्या माहितीनुसार वांग्याच्या सेवनाने अनिद्रेची समस्या दूर होते. रक्ताची कमतरता दूर होते.


*अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते...* 

वांग्याचे सूप तयार करून त्यामध्ये हिंग आणि चवीनुसार लसुन टाकून सेवन केल्यास पोट फुगणे, गॅस होणे, बद्धकोष्ठता, अपचन इ. समस्या दूर होण्यास मदत होते.


*डायबिटीज रुग्णांसाठी फायदेशीर...*

वांग्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते आणि यामधी कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे विरघळत नाहीत. यामुळे टाइप 2 डायबिटीज ग्रस्त रुग्णांनी नियमित वांग्याचे सेवन केल्यास साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळेल.


नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

   

*नितीन जाधव,*

*सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत


 


            मुंबई, दि.३० :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतिहासातील सर्वात मोठी भरती प्रक्रियेतील महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत पार पडली असल्याचे लोकसेवा आयोगाने म्हटले आहे.


            महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३० एप्रिल, २०२३ रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ आयोजित करण्यात आली. या परीक्षेकरिता एकूण ४,६७,०८५ उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. त्यांच्या बैठक व्यवस्थेकरिता राज्यातील ३७ जिल्हा केंद्रावरील एकूण १,४७५ परीक्षा उपकेंद्रे निश्चित करण्यात आली होती. या पूर्व परीक्षेकरिता साधारणपणे ८०% उपस्थिती असल्याचे दिसून आले असून परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यात आली आहे.


            महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ परीक्षेमधून राज्य शासनाच्या विविध विभागातील एकूण ८,१६९ पदे भरली जाणार आहेत. आयोगामार्फत आतापर्यंतची ही सर्वात मोठी भरती असून अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची संख्या देखील आयोगाच्या इतिहासातील सर्वोच्च संख्या आहे.



000000


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे अभिवादन

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे अभिवादन


 


            मुंबई, दि.30: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अभिवादन केले.


 


            यावेळी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

लाल तांदूळ....👇 आरोग्यदायी


 *लाल तांदूळ....👇*रात्या तांदुळ (लाल तांदुळ) विकणे आहे..!
100/- रूपये प्रति किलो.
डायबिटीस, कॅन्सर इ. आजारांवर उपयुक्त..!
ईच्छुक ग्राहकांनी संर्पक साधावा :- 8975932044


   तांदूळ जगभरातील बरेच लोक खातात, आपल्या देशाच्या विशालतेत पांढरा पाॅलिश केलेला तांदूळ विशेषत: लोकप्रिय आहे,पण लाल तांदूळ हा दर्शनार्थि

 अप्रिय असला तरी, त्यांचे गुणधर्म अफाट आहे. लाल तांदळात ग्रुप बी चे अनेक जीवनसत्वे असतात. त्यामुळे नखे, केस, आणि त्वचा निरोगी राहते. तसेच हे धान्य मौल्यवान खनिजे सम्रुद्ध आहे. आयोडिन, फाॅस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे, लोह, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.

.........यात असलेले मॅग्नेशियम मायग्रेन व दमा विरूद्ध लढायला तयार करते. व मज्जासंस्था मजबूत होते. ह्रुदयविकार, हार्टअटक येत नाही, कॅल्शियम सह हा पदार्थ हाडांना मजबूत करतो.आॅस्टिओपोरोसिस व आर्थस्ट्रिसिसच्या विकासाला प्रतिबंध करतो.

             लाल तांदळाच्या कवचात असलेलं पोटॅशियम सांध्यातील मीठ काढून टाकण्यास मदत करते. आणि त्यांच्यातील वेदना, जळजळ कमी होते.. हे धान्य एक शक्तिशाली अॅंटिआॅक्सिडंट आहे. आपण नियमितपणे याचा वापर केल्यास शरीरात कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात, विशेषतः कोलन व स्तनाचा कर्करोग,) पॅरासिनाईडस्, या प्रकारचे तांदूळ एक वैशिष्ट्यपूर्ण लाल रंग देतात. सुरकुत्या कमी होतात.

       लाल तांदुळ अतिशय पौष्टिक आहे, खुप सहज पचते, व शरिरावर भार टाकत नाही.हा तांदूळ मधुमेह रुग्णांना खूपच फायदेशीर आहे. रक्तातील साखर नियंत्रणात राहते. कोलायटिस असलेल्या व्यक्तीला फायदेशीर आहे. कारण हा पचायला हलका आहार आहे..


               


  लाल तांदळात कोलेस्टेरॉल कमी करण्याचि क्षमता आहे,. तसेच फायबर अधिक प्रमाणात असते त्यामुळे स्थूलता कमी होते, वजन नियंत्रणात राहते, व भात खाल्ल्याचे समाधान मिळतं., पोटातली जळजळ कमी होते, अॅसिडिटि समूळ नष्ट होते. यात असलेल्या.. cardiovascular diseasesचा धोका कमी होतो...serotonin आणि लाल रक्त पेशिंच्या वाढिसाठि आवश्यक असलेले व्हिटॅमिन बी६ यात असतं. Dnaच्या निर्मितीसाठी मदत होते..

       हार्मोन्स असंतुलन दूर होतं, उच्च रक्तदाब नियंत्रणात येतो, बाळंतिणीला दूध येतं याच्या सेवनाने.

मुत्रपिंडाचा विकार असणाऱ्यांनी लाल तांदळाचा भात नियमित पणे घेतल्यास आराम मिळतो.वर नमूद केल्याप्रमाणे हे धान्य खरोखरच बी व्हिटामिन चे स्टोअरहाउस आहे. तेव्हा हा तांदूळ जरी दिसायला फारसा चांगला नसला तरी गुणधर्म बघता, तुम्ही रोज तुमच्या आहारात समावेश करावा. व निरोगी राहावे...


 सुनिता सहस्रबुदे.

व्यायाम व्यायाम हे, आनंद का नाम है

 *😨😱🥱 अदभुत.........अद्भुत ऐसी रंगोली जो इंसान के तन से बनी हो ऐसी रंगोली आपने कभी नहीं देखी होगी पूरी वीडियो देखें और आनंद लें.......👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻*


अस्वस्थ करणारे गॅसेस आणि आयुर्वेद उपचार

 अस्वस्थ करणारे गॅसेस आणि आयुर्वेद उपचार

डॉ. आनंद ओक 

पोट जाड वाटू लागणे, पोटाचा आकार वाढणे, पोट गच्च होणे, किंवा तडस लागल्याप्रमाणे चढणीला लागणे, ढेकर येणे, गुद्द्वारावारे गॅस सरकणे सामान्यपणे वरील तक्रारी कमी-अधिक प्रमाणात प्रत्येकास जाणवतातच. काहींना पोटात दुखते, छातीत दुखते, श्‍वास घेण्यास त्रास वाटतो, अस्वस्थ वाटू लागते. काय आहे हा त्रास? क्षु ल्लक स्वरूपाचे असूनही वारंवार उद्भवल्यास मात्र माणसाचे स्वास्थ पूर्णपणे बिघडवू शकतात. अशा तक्रारीपैंकी एक तक्रार म्हणजे पोटातील गॅसेस! ‘पोटात वायू धरणे’ असेही संबोधन यास वापरले जाते.


प्रत्येकाला कधी ना कधी तरी ही तक्रार झालेली असते. तसेच प्रत्येक वेळी डॉक्टरी उपचार करावे लागतातच असेही नाही. तरी देखील चौघात बसणे अशक्य करणार्‍या, मनस्वास्थ्य बिघडविणार्‍या या तक्रारीची शास्त्रीय माहिती प्रत्येकास असणे महत्त्वाचे वाटते. गॅसेस उत्पन्‍न होण्याची कारणे ः वास्तविक अन्‍नाचे पचन होत असताना अल्प प्रमाणात गॅस प्रत्येकातच उत्पन्‍न होत असतात; पण पचन क्रिया व्यवस्थित असल्यास ते आपोआप जीरूनही जातात. परंतु, पाचक शक्‍ती म्हणजेच पाचकस्रावांचे प्रमाण कमी असल्यास किंवा आतड्याच्या हालचालीस कोणत्याही कारणाने बाधा आल्यास गॅसेसचा त्रास सुरू होतो. पोटातील विविध अवयवांच्या वेगवेगळ्या आजारांमुळे पाचकरस व जठराची आतड्यांची हालचाल बिघडत असते. व गॅसेस उत्पन्‍न होत असतात. 


जठराचा दाह/सूज (गॅस्टायटीस) आतड्याचा दाह (कोलायटीस), अमिबियासीस, पित्त वाढणे हे विकार सामान्यपणे गॅसेसचा त्रास उत्पन्‍न करतात तर काही वेळा पित्तशयाची सूज, पित्तशयातील खडा, मूतखडा हे विकारही गॅसेस उत्पन्‍न करतात. बद्धकोष्ठता किंवा संडास साफ न होणे यामुळे गॅसेस वाढतात. वार्धक्यामुळे आतड्यांची शक्‍ती कमी झाल्याने हालचाल मंद असते. त्यामुळे गॅसेस उत्पन्‍न होतात. लहान बालकात आतड्याची शक्‍ती पुरेशी वाढलेली नसल्यामुळे गॅसेसचा त्रास होतो. 


वरील कारणांबरोबरच गॅसेस उत्पन्‍न करणारे पदार्थ जास्त किंवा वारंवार खाण्यात आल्याने गॅसेस होतात. तसेच जेवल्यानंतर लगेच झोपणे, कोणताही व्यायाम न करणे व सतत खाणे यामुळे गॅसेस उत्पन्‍न होतात. काही रुग्णांत मानसिक ताण काढल्यानंतर गॅसेसचा त्रास वाढल्याचेही वाढल्याचेही आढळते. अचानक झालेला पिण्याच्या पाण्यातील बदल अथवा अशुध्द पाणी पिण्यात आल्यानेही गॅसेसचा त्रास होतो. 

गॅसेस जास्त वाढविणारे पदार्थ ः बटाटा, शाबुदाणा, अंडी, मांसाहार, अतिप्रमाणात भात, पुरणपोळी, इडली, ढोकळा, उत्ताप्पा, भेळ, ब्रेड, उसळी, (कडधान्ये), इत्यादी पदार्थ गॅसेसचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात. तसेच अतिप्रमाणात वारंवार काहीही खात राहणे व व्यायाम व फिरणे न करणे यामुळे सर्वच पदार्थांनी गॅसेस वाढतात. यामुळेच गॅसेसचा त्रास असणार्‍यांनी वरील पदार्थ नेेहमी टाळणे महत्त्वाचे असते.


4) गॅसेसची लक्षणे ः 


पोट जाड वाटू लागणे, पोटाचा आकार वाढणे, पोट गच्च होणे, किंवा तडस लागल्याप्रमाणे चढणीला लागणे, ढेकर येणे, तेवढ्यापुरते बरे वाटणे, गुद्द्वारावारे गॅस सरकणे सामान्यपणे वरील तक्रारी कमी अधिक प्रमाणात प्रत्येकास जाणवतातच. काहींना मात्र पोटात दुखू लागते, छातीत दुखते, श्‍वास घेण्यास त्रास वाटतो, छातीत चमका येतात, अस्वस्थ वाटू लागते. दरम्यान हृदयविकारात अशीच लक्षणे उत्पन्‍न होत असल्याचे पाहीलेले किंवा वाचलेले, ऐकलेले असते. त्यामुळे “हे हार्टचे दुखणे तर नाही ना?” अशी शंका मनात उत्पन्‍न होते. आणि एकदा अशी शंका उत्पन्‍न झाल्यावर “चिंते” मुळे छातीत धडधडू लागते. श्‍वास घेण्यास घेण्यास अधिकच त्रास वाटू लागतो, घाम येतो. मग डॉक्टरकडे नेल्यावर इ सी जी काढला जातो; पण तो ‘पूर्णपणे’ नॉर्मल असल्याचे कळते. गॅसेसचे औषध घेतल्यावर झटक्यात बरे वाटते. पण ‘शुल्लक वाटणारे गॅसेलसचे दुखणे मनात “भीती” मात्र निर्माण ठेवते. काहीजणात पाठीत दुखणे, कंबर दुखणे, डोके दुखणे या तक्रारी जाणवतात. 


5) गॅसेसचे दुष्परिणाम ः 


जडत्व, कोणतेही काम नकोसे वाटणे, मरगळ, निरुत्साहीपणा, कार्यक्षमता कमी होणे, पचन कमी झाल्यामुळे पोषकांश कमी मिळतात. सततचे गॅसेस दुर्लक्षित राहिल्यास त्याचा तब्येतीवरही परिणाम होतो. 


6) गॅसेसवरील उपचार ः


गॅसेसचा त्रास सुरू झाल्यावर अनेकजण जाहिरातीमधून कळलेल्या विविध औषधे तात्पुरती घेत असतात. गॅसेस सरकवण्याची क्रिया या औषधांनी झाल्यामुळे तात्पुरता आरामही मिळतो. पण “आपल्याला गॅसेस कोणत्या कारणांनी उत्पन्न होत आहेत? हे कळणे महत्त्वाचे असते. ते कारण दूर होणे गरजेचे असते. त्यामुळे गॅसेसचा त्रास झाल्यावर तज्ज्ञ डॉक्टरला दाखवून या कारणांचा शोध घेऊन त्या कारणाबरहूकूम उपचार करावे लागतात. 


वनस्पती औषधांपैकी सुंठ, मिरी, पिंपळी, हिंग, शेंदेलोण, पांदेलोण, जिरे, लसून, चिंचाक्षार, यवक्षार, सज्जीक्षार, लिंबू रस, शंखभस्म इत्यादी घटकांच्या सुंयक्‍त कल्पाचा रुग्णाच्या प्रकृतीनुसार वापर केला जातो. गॅसेस कमी करणारी ही औषधे अग्‍निमांद्य दूर करून पचनशक्‍ती देखील वाढवितात. या उपचारांच्या जोडीलाच क्षार किंवा लवणयुक्‍त तीळ तैल रोज रात्री 10 ते 15 मिनिटे हलक्या हाताने पोटाला लावावे व लगेच 10 मिनिटे पोट शेकावे. यामुळे उत्तमप्रकारे वातशमन होते. तसेच पोटातील स्नायुंची शक्‍ती वाढून आतड्याची गती सुधारते. काही वेळा गॅसेसचा त्रास जास्त प्रमाणात असल्यास मात्र, बस्तीचाही उपयोग करावा लागतो. तसेच गॅसेसचे कारण म्हणून सांगितलेल्या मूळ विकारांचे म्हणजे आतड्याची सूज इत्यादींचे उत्तम उपचार आयुर्वेदिक औषधांनी होतात. त्यामुळे गॅसेसवरील उपचाराबरोबरच मूळ विकाराचे देखील आयुर्वेदिक उपचार घ्यावेत.



Saturday, 29 April 2023

संसारातील गोडी सखरेविना थोडी.

 *#चिमुटभर_गोडी* ....*


" भाजीत चिमूटभर साखर घाल गं म्हणजे उग्रपणाही कमी होतो आणि पदार्थाची गोडीही वाढते " 


 स्वयंपाक करताना आजी म्हणायची भाजीमध्ये चिमटीभर साखर किंवा गूळ हवा म्हणजे पदार्थाची चव वाढते 

 मला नवल वाटतं आजीवर्गाचं 

त्यांना बरोबर माहित असायचं कशात काय घातलं म्हणजे गोडी वाढते 

पूर्वी घरोघरी कर्ता पुरूष म्हणजे करारी ,थोडा तापट, घराला धाकात ठेवणारा असायचा.


 कुणाचं कश्यावरून बिनसलं आणि आजोबांचा आवाज चढला की आजी ," हो हो बरोबर आहे तुमचं" म्हणून होणारा वाद टाळायची नंतर सावकाशीने आजोबांना मुद्दा पटवून द्यायची . 


चिमूटभर समजूतदारपणा दाखवला की कलह टळतो असं म्हणायची. 

घरातील मूल चुकलं तरी त्यावेळेस आवाज चढवायचा नाही ,कारण मूलही मग आक्रमक होतं आणि ऐकत नाही.


 सावकाशीने समजावून सांगायचे ज्यावेळेस ते समजून घेईल ,चिमूटभर माया दाखवली तर सांगण्याचा परिणाम होतो असं आई पण म्हणायची . 

म्हणूनच त्यांचे संसार विना कलह झाले.


कामवाल्या बाई बाबतही असच तिने कधी दांडी मारली ,कधी उशीरा आली तरी ती पण एक संसारी बाई आहे ,आपल्यापेक्षा तिला आव्हानं असतात जास्त मग अश्यावेळेस 

 का गं आज उशीर झाला ? बरी आहेस ना ?काळजी घे गं बाई.


चल दोन घास खाऊन घे म्हटलं की ती बाई कायम आपल्याला बांधून राहिल 

थोडी माणूसकी खूप मोठं काम करते . 


थोडा विश्वास ,थोडं प्रेम ,थोडी आपुलकी या गोष्टी माणसं जोडायला हव्यातच संसारात.


आजी नेहमी म्हणायची आपण ४ पावलं मागे आलो तरी लहान होत नाही आपण . 


एखादे वेळेस माघार घेणं हे माणूस म्हणून २ पावलं आपल्याला पुढे घेऊन जातं.


आताची सतत 

अरे ला कारे 

करायची सवय पाहिली की आपण खूप काहीतरी गमावतो आहोत असं वाटतं .


*ही एक चिमूट आयुष्यात बदल करू शकते.*


थोडा चिमूटभर अहंकार कमी केला तर आपण आयुष्यात चिमुटभर आनंदाची नक्कीच भर घालू शकतो .😊👍✌️

Featured post

Lakshvedhi