Monday, 24 April 2023

मान्सूनच्या स्वागतला केरळला येणार का?

 मान्सूनच्या स्वागतला केरळला येणार का?


मान्सून अर्थात मोसमी वारे ही भारताची ओळख, अगदी हजारो वर्षांपासूनची. हे वारे आणि त्यांच्यासोबत येणारा पाऊस यांनी भारताला विशिष्ट हवामान दिलं, विविधता दिली, जीवनशैली आणि स्वतंत्र ओळख दिली. मान्सून समजून घेणं, अनुभवणं याच्याइतकी रोमांचक दुसरी गोष्ट नाही. आणि हे सारं केरळमध्ये जाऊन अनुभवणं ही तर केवळ धमाल !


मान्सूनचं केरळात आगमन होतं, त्यावेळी त्याला सामोरं जाण्याचं "भवताल" चं नियोजन आहे. मान्सूनचं स्वागत, तो तज्ञांसोबत समजून घेणं आणि प्रत्यक्ष अनुभवणं... एक्साइटेड असाल तर, २ जून ते ९ जून या तारखा राखून ठेवा. लवकरच जाहीर करत आहोत.


Welcoming Monsoon @Kerala


-


भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com

महागाई नाहीं

 महागाईने त्रस्त नागरिकांची सोने घेण्यासाठी तुफान गर्दी 😀


Sunday, 23 April 2023

आरोग्य संदेश. - बकुळ महत्त्व

 *बकुळ......(Mimasops. Elengi)..*


     दातांच्या रोगांवर बकुळ फार उत्तम औषध आहे. दात हालत असल्यास बकुळीच्या सालिचे चूर्ण लावून दात घासले असता दात घट्ट होतात. बकुळीच्या सालिचे काढ्याने गुळण्या केल्यास म्हणजे वारंवार चुळा भरुन टाकल्यास हिरड्या मजबूत होतात..

.....##धावरे..( सूज) बकुळीची साल गंधासारखी पाण्यात उगाळून त्याचा लेप तिथे दिला असता सूज उतरते. बकुळ थंड आहे. कडकि.... चांगली पिकुन पिवळि झालेली बकुळीची गोड लागणारी फळे नित्यनेमाने १०,१२, खाल्यास थोड्याच दिवसात कडकि, उष्णता कमी होते...


       


      ##बकुळिचे ##सरबत.... युरिन साफ होण्यासाठी, युरिनरी ट्रॅकचे सर्व प्राॅब्लेम दूर करण्यासाठी

..या फळाचे सरबत करून पितात.. क्रुति... चांगलि पिकलेलि बकुळीची फळे २५-३० घेऊन २ कप

  पाण्यात कुस्करून व त्यात ,५० ग्रॅम साखर मिसळून ते गाळून घ्यावे. सरबत प्यायल्यावर तास दोन तासातच युरिन साफ होते.. मूतखड्यात युरिनचि जळजळ होणं थोडि थोडि युरिन होते . अशा वेळी

    हे सरबत फार लागू होते. आणि असे सातत्याने करत राहावे.. मूतखडा विरघळून पडतोच

            बकुळीच्या फुलांचे चूर्ण करून ते तपकिरी सारखं नाकात ओढल्यास डोकेदुखी थांबते..

......

............. आयुर्वेद अभ्यासक....... सुनिता सहस्रबुद्धे...

       

  


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन lakshvedhimm. blogspot.com




स्त्रीला काय हव असतं??

 "स्त्रीला काय हव असतं?? " 💞💞💞💞


  एका विद्वान माणसाला फाशीची सजा सुनावण्यात आली होती.

राजानं त्याला विचारलं, " तुला मी सोडून देईन जर तू माझ्या एका प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलंस तर!"


               प्रश्न असा होता, की ....

   स्त्रीला नेमकं काय हवं असतं?


विद्वान म्हणाला, "राजन, मला या प्रश्नाचे उत्तर द्यायला थोडी मुदत हवी आहे."


  राजानं त्याला एक वर्षाची मुदत दिली.


        विद्वान बराच फिरला, 

         अनेक लोकांची त्यांनं भेट घेतली,

                पण कुणाकडूनही त्याला समाधानकारक उत्तर मिळालं नाही.

   


      शेवटी कुणीतरी त्याला सुचवलं. म्हणालं, 

    "दूर जंगलात एक हडळ राहाते 

        ती नक्की सांगू शकेल ...

          या प्रश्नाचं उत्तर."


   विद्वान तिच्यापाशी जाऊन पोहोचला, 

     आणि त्यानं आपला प्रश्न तिला विचारला. 

          हडळ म्हणाली ...

      "मी सांगेन या प्रश्नाचे उत्तर,

    पण त्यासाठी तुला माझ्याशी विवाह करावा लागेल."


 विद्वानांनं विचार केला, बरोबर उत्तर मिळालं नाही 

  तर जीव ... राजाच्या हातून जाणारच आहे, 

    म्हणून मग त्यानं विवाहासाठी तिला रुकार दिला. 


   लग्न झाल्यानंतर हडळ म्हणाली,

    "तुम्ही माझं म्हणणं मान्य केलं आहे,

    म्हणून मी तुम्हाला खुश करण्याकरता 

         निर्णय घेतला आहे की ...

       १२ तास ... मी हडळ आणि 

 १२ तास सुंदर परी होऊन राहीन.


        आता तुम्ही मला सांगा ...

    दिवसा हडळ होऊन राहू की रात्री ?


           विद्वानांनं विचार केला ... 

      जर ही दिवसा हडळ झाली,

           तर दिवस सरणार नाही, आणि

      रात्री झाली तर रात्र सरणार नाही .


शेवटी तो विद्वान मनुष्य बोलला, 

       "जेव्हा तुला वाटेल तेव्हा

              परी हो, 

  जेव्हा तुला वाटेल तेव्हा हडळ हो.


       त्याचं हे उत्तर ऐकताच हडळ 

  प्रसन्न होऊन म्हणाली, "तुम्ही मला माझ्या मर्जीनं राहाण्याची सूट दिलेली आहे, 

             त्यामुळे मी नेहमीसाठीच 

        परी बनून राहण्याचा निर्णय घेतला आहे.


 आणि हेच ~ तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे."


       🙆🏻‍♀️ स्त्रीला नेहमी ....

    आपल्या मर्जीप्रमाणे वागायचं असतं.


  जर स्त्रीला ....

   तिच्या मर्जीनं वागू देण्याचं स्वातंत्र्य दिलंत, तर ती

👉🏽 परी होऊन राहिल, नाहीतर हडळ. 👈🏽


             


     ◆ निर्णय तुमचा आहे ◆ 

       ◆ खुशीही तुमचीच आहे ◆


   सगळ्या विवाहित पुरुषांना समर्पित...🤐😷


        आता प्रामाणिकपणे सांगा बरं,

            कुणाच्या घरी परी आहे ?

                 💃 😉😂😁

उष्माघाताची ‘ही’ लक्षणे वेळीच ओळखा; प्रथमोपचारासाठी काय खबरदारी घ्यावी जाणून घ्या.....*

 *उष्माघाताची ‘ही’ लक्षणे वेळीच ओळखा; प्रथमोपचारासाठी काय खबरदारी घ्यावी जाणून घ्या.....*


मागील काही दिवसांपासून उष्माघात हा शब्द अनेकवेळा तुमच्या ऐकन्यात आला असेल. त्याचं कारण म्हणजे ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारकडून नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. खारघरमध्ये हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, हा कार्यक्रम भर दुपारी झाल्यामुळे पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित लोकांपैकी १२ जणांना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तेव्हापासून उष्माघात या शब्दाची चर्चा सुरु आहे.


*उष्माघात नक्की आहे तरी काय? आणि त्याचा त्रास कशामुळे उद्भवतो...* 

उष्माघाताचा त्रास जाणवायला लागल्याची लक्षण काय आणि त्यापासून स्वत:च रक्षण कसं करायचं याबाबतची माहिती अनेकांना नसते. तीच महत्वपुर्ण माहीती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही उष्माघातापासून स्वत:चा बचाव करु शकता. तर उन्हामुळे वाढलेल्या अनेक समस्यांवर डॉ. प्रदीप आवटे यांनी महत्वपुर्ण माहिती दिली आहे. ज्यामध्ये उष्माघाताच्या समस्येचाही समावेश आहे.


*उष्माघात ( हिट स्ट्रोक) लक्षणे...*

उष्माघाताची समस्या उद्भवताच शरीराचे तापमान १०६ डिग्री सेल्सियसपर्यंत जाते. तसेच त्वचा गरम आणि कोरडी पडते. नाडीचे ठोके वेगाने आणि जोरात पडतात. घाम न येणे आणि अर्धवट शुध्दीत असणे, ही उष्माघाताची लक्षण आहेत.


*प्रथमोपचार...*

जर एखाद्याला उष्माघाताचा त्रास जाणवायला लागला तर त्या रुग्णाला तात्काळ दवाखान्यात भरती करणे आवश्यक आहे. तसेच त्याला थंड जागी / ए सी मध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे. तसेच या रुग्णाला थंड पाण्याने आंघोळ किंवा स्पॉन्जिग करणं आवश्यक आहे. मात्र यावेळी त्याच्या तोंडाने पाणी देऊ नये.


*उष्माघाताने मृत्यू का होतो...?*

उष्माघात ही अत्यंत गंभीर बाब आहे. शरीराचे तापमान जेव्हा १०६ डिग्री सेल्सियस एवढ्या तापमानास १५ मिनिटाकरता राहते तेव्हा त्याचे अत्यंत विपरित परिणाम शरीरावर होतात. शरीराचे सामान्य तापमान नियंत्रण यंत्रणा काम करत नाही. प्रथिने उष्णतेमुळे खराब होतात. विविध प्रकारचे लायपोप्रोटिन्स आणि फॉस्पोलिपिडस अस्थिर होतात. शरीरातील पातळ पडद्यामध्ये असणारे मेद पदार्थ वितळतात. यामुळे रक्ताभिसरण संस्था अकार्यक्षम होते आणि विविध अवयवांचे कामकाज ठप्प होऊ लागते. या रुग्णाला वेळेवर तातडीची वैद्यकीय सेवा न मिळाल्यास त्याचा मृत्यू ओढवतो.


उष्माघाताच्या समस्येपासून आपला आणि इतरांचा बचाव करायचा असेल तर त्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे उष्णतेपासून बचाव करणे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत, त्यामुळे उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय करावे, काय करु नये या संदर्भातील माहिती असणे आवश्यक आहे.


*उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय करावे, काय करु नये...*


*हे करा...*

पुरेसे पाणी प्या. प्रवासात पाणी सोबत ठेवा.

हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलसर कपडे वापरा. उन्हात गॉगल, छत्रीचा वापर करा.

उन्हात जाताना टोपी/ हॅट खाली ओलसर कपडा ठेवा.

कष्टाची कामे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ४ नंतर करा.

ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.


*हे करु नका...*

शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणं टाळा.

कष्टाची कामे उन्हात करु नका.

पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका.

गडद रंगाचे, तंग कपडे वापरु नका.

दुपारच्या वेळी स्वयंपाक करणे टाळा. स्वयंपाक घर हवेशीर ठेवा.

चहा, कॉफी सारखी ड्रिंक्स टाळा.

खूप प्रथिन युक्त अन्न आणि शिळे अन्न खाऊ नका.


*कुमार चोप्रा,*

*डॉ. सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*

दमा होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार*

 *दमा होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार*

आरोग्य समस्या -arogy

*दमा म्हणजे काय ?*


दमा (अस्थमा) हा श्वसनसंस्थेचा एक गंभीर असा विकार असून यामध्ये रुग्णास अस्थमाचा झटका येत असतो. यामध्ये श्वसनमार्ग अरुंद आणि सुजयुक्त बनतात. त्यातून अधिक प्रमाणात कफाची (Mucus) निर्मिती होते. त्यामुळे श्वास

घेण्यास त्रास निर्माण होतो. घशात कफ साठल्याने श्वासोच्छवासाच्या वेळी घुरघुर किंवा साँयसाँय

असा आवाज योतो.


*अस्थमाची लक्षणे -*


◼️खोकला येतो, रात्रीच्या वेळी किंवा पहाटे खोकला अधिक प्रमाणात येणे.

खोकल्याची उबळ अधिकतेने येत असते मात्र छातीत कफ इतका चिकटलेला असतो की खोकून-खोकून व्यक्ती बेजार होते पण कफ सुटत नाही. श्वास घुटमळल्यासारखे होते, बराच वेळ

खोकल्यावर थोडा जरी कफ पडला तरी काही काळापुरते बरे वाटते. पण पुन्हा खोकला येतोच.


◼️दम लागतो, बैचेनी होते, वारंवार छाती चोंदणे, बोलण्यास त्रास होतो ही लक्षणे अस्थमामध्ये असू शकतात.


*दम्याचा झटका येणे किंवा अस्थमाचा* *अटॅक येणे म्हणजे काय..?* 


दम्याच्या रुग्णांना वरचेवर दम्याचा झटका येत असतो त्याला अस्थमा अटॅक (Asthma attack) असेही म्हणतात अनेकदा दमा रुग्णास 

धुळ, धुर, परागकण, केसाळ पाळीव प्राणी, दमट हवामान, प्रखर सुर्यकिरण, कचरा, हवेतील

प्रदूषित कण व मानसिक ताणामुळेही अस्थमाचा अटॅक येऊ शकतो. अस्थमाचा अटॅक काही मिनिटांपासून ते काही तासापर्यंत राहू शकतो 


*दमा होण्याची कारणे -*


शरीरातील रोग प्रतिकारक शक्तीमधील विकृती ही दमा रोगास प्रमुख कारण असते. खालील कारणे ही दमा रुग्णांमध्ये दमा अटॅक 

निर्माण होण्यास सहाय्यक ठरतात.


◼️ढगाळ वातावरण, हिवाळा व पावसाळा ह्या सारख्या आर्द्र वातावरणामुळे अस्थमा अटॅक

येतो.


◼️धुळ, धुर, धुके, माती, कचरा, बारीक तंतू, परागकण, पाळीव प्राण्यांचे केस, पेंट्स, उग्र

वास असणाऱ्या पदार्थांच्या संपर्कात

आल्यामुळे अस्थमा अटॅक येतो,

सिगरेट किंवा इतर प्रकारचा धूरामुळे,

शारीरीक अतिश्रमामुळे, अतिव्यायामामुळे, हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे.


◼️वायु प्रदुषणामुळे ताप, फ्लू, घसा सुजणे, ब्राँकायटिस, खोकला यासारखे रोग उत्पन्न झाल्याने,


◼️मानसिक ताणतणावामुळे अस्थमा रुग्णांना अस्थमाचा अटॅक येण्याचा धोका अधिक असतो.


*दम्याचा त्रास होऊ नये यासाठी घ्यावची काळजी :* 


◼️अस्थमाचा अटॅक येऊ नये यासाठी

करावयाचे उपाय पुढीलप्रमाणे आहेत.

योग्य आहार, विहार आणि योग्य औषधोपचाराद्वारे दम्याच्या अटॅकपासून दूर राहता येते,

◼️दम्याचा पहिला दौरा आल्यानंतर भविष्यात अशी स्थिती उद्भवू नये म्हणून सतर्क रहावे, धुम्रपान करु नये,

◼️मानसिक ताणतनाव रहित रहावे,

धुळ, धूर, हवेच्या प्रदुषणापासून दूर रहावे,

◼️दमा रुग्णांनी घरात पाळीव प्राणी पाळू नयेत,

◼️पावसाळा आणि हिवाळ्यात विशेष काळजी घ्यावी.

◼️प्रखर उन्हामध्ये जाणे टाळावे,

◼️ थंड पदार्थ खाऊ नये, थंड पाणी घेऊ नये, मोकळ्या हवेत फिरावयास जावे, विटामिन A आणि D युक्त आहार घ्यावा, बदाम, हिरव्या पालेभाज्या आहारात असाव्यात.

◼️डॉक्टरांनी दिलेले उपचार घ्यावेत.



आरोग्य समस्या -भूक मंदावणे / भूक न लागणे*

 *भूक मंदावणे / भूक न लागणे* 


✅️खरा श्रीमंत कोण तर ज्याला व्यवस्थित भूक लागते व ज्याचे पोट नीट साफ होते तो आयुर्वेदानुसार सर्व प्रकारच्या आजारांची सुरूवात ही 'भूक कमी होणे' यामुळे होते. वरकरणी ही गोष्ट छोटी जरी वाटत असली तरी अनेक गंभीर आजारांना जन्म देत असते.


✅ बऱ्याचदा आपली भूक व्यवस्थित आहे की नाही हे कळायला मार्ग नसतो ! वेळ झाली म्हणून जेवायला बसतो. भूक लागलेली नसताना जेवण करतो. त्यातून पुढे अपचन होतं आणि रोजचं हे दुष्टचक्र असच सुरु राहतं.


✅️सामान्यात: माणसाला दोन वेळचं जेवण पुरेसे असते. सकाळ जेव्हा भूक लागेल तेव्हा पोटभर जेवण करणे व सायंकाळी सूर्य मावळायच्या आत जेवण! ही खरी आदर्श जेवणाची पद्धत म्हणता येईल. या व्यतिरिक्त मध्ये मध्ये सारखं काहीतरी खाण्याची लागेलेली 'चुकीची सवय' ही भूक कमी करायला कारणीभूत ठरत असते.


 _

Featured post

Lakshvedhi