Friday, 21 April 2023

अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल कंपनी महाराष्ट्रात करणार80 हजार कोटींची गुंतवणूक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल कंपनी महाराष्ट्रात करणार80 हजार कोटींची गुंतवणूक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस                

यांच्याशी कंपनीच्या शिष्टमंडळाची प्राथमिक चर्चा

            मुंबई, दि. 21 : अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल इंडिया लि. ही स्टील निर्मितीमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपनी असून कंपनीची महाराष्ट्रात हजारो कोटींची गुंतवणूक आहे. स्टील निर्मिती आणि प्रक्रिया, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कंपनी आणखी 80 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. याबाबत आज सह्याद्री अतिथीगृह येथे कंपनीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राथमिक चर्चा केली.


            महाराष्ट्रात स्टील उद्योगात आणखी गुंतवणूक करण्याची कंपनीने इच्छा व्यक्त केली. यासाठी पाच हजार एकर जमीन बंदराजवळ, रस्ते, रेल्वेचे जाळे तयार असलेल्या ठिकाणी हवी असल्याची मागणी त्यांनी राज्य शासनाकडे केली. शिवाय बीकेसी बांद्रा येथे कंपनीच्या कॉर्पोरेट मुख्यालयासाठी जागा देण्याची विनंती केली.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीमा परिसरात सुमारे एक हजार एकर जमीन प्राथमिक टप्प्यात देण्यास तत्वता मान्यता दिली. याबाबत जागा निश्चिती, उर्वरित जमीन आणि भूसंपादन प्रक्रियेसाठी मेरिटाईम बोर्ड, एमआयडीसी आणि कंपनी प्रतिनिधींनी स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घ्यावा. कंपनीच्या गुंतवणुकीमुळे राज्यातील हजारो तरूणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.


            उद्योग विभागाचे प्रधान सचिव श्री. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. रंजन धर यांनी कंपनीची गुंतवणुकीविषयीची माहिती दिली. ही कंपनी आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य देणारी असून कंपनीने कोविडमध्ये लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा केला होता. भारतात स्टील उत्पादन वाढीसाठी कंपनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे. खोपोली, तळेगाव, सातारडा (सिंधुदुर्ग) येथे कंपनीमध्ये हजारो तरूणांना रोजगार मिळाला आहे. आणखी हजारो तरूणांना रोजगार मिळणार असून कंपनी शिक्षण, आरोग्य, विमानतळाच्या पायाभूत सुविधामध्येही काम करणार असल्याचे श्री. धर यांनी सांगितले.


            बैठकीला वाहतूक आणि बंदरे विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी, विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्र सिंह कुशवाह, अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल इंडिया लि. चे विक्री संचालक आलेन लेगरीस, रंजन धर, ऋषिकेश कामत, उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, कंपनीचे राजेंद्र तोंडापूरकर आदी उपस्थित होते.


000

Bhaktimay नृत्य कला ही सादर



ना.मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेत मे महिन्यात बैठक

 पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या अंतर्गत सहा राज्य येतात. यात राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, गोवा या राज्यांचा तसेच दमण दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. त्यामुळे ना. मुनगंटीवार यांना सर्व सहा राज्यांमधील लोककलावंतांसाठी काम करण्याची उत्तम संधी प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे या माध्यमातून महाराष्ट्रातील लोककलांना राष्ट्रीय पातळीवर अधिक मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यावरही ना. मुनगंटीवार यांचा भर असणार आहे.


ना.मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेत मे महिन्यात बैठक


पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालकांनी नियुक्तीच्या संदर्भातील पत्रात आगामी बैठकीचेही निमंत्रण दिले आहे. २०२३-२०२४ या वर्षात आयोजित करावयाच्या कार्यक्रमांचे नियोजन या बैठकीत होईल. ही बैठक ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेत मे महिन्यात होणार आहे.

एरंडेल तेल*

 *एरंडेल तेल*



एरंडेल तेलाला आयुर्वेदात अमृताची उपमा देण्यात आली आहे. एरंडेल तेलाचे आरोग्यविषयक अनेक उपयोग आहेत ते कोणते ते आपण पाहूया.


१. पोट साफ होण्यासाठी


एरंडेल तेल घेतल्याने पोटात न दुखता जुलाब होऊन पॉट साफ होते. वृद्धांच्या पोट साफ न होण्याच्या तक्रारीतही हे रोज घेता येते. सुट्टीच्या आदल्या दिवशी रात्री गरम पाण्यात एक चमचा एरंडेल तेल घ्यावे.


२. डोळ्यांच्या विकारांवर


रांजणवाडी किंवा डोळ्याच्या इतर तक्रारींवर यासाठी एरंडेलाचा थेंब बोटावर घेऊन तो काजळासारखा पापण्याच्या आत फिरवावा. तसेच एरंडेल तेल पापण्यांना लावल्याने पापण्यांची देखील दाट होतात.


३. आमवात आणि सांधेदुखी


युरिक ऍसिड वाढणे आमवात, सायटिका, गाऊट, गुडघेदुखी हे हल्लीच्या तरुण वयात देखील होऊ लागले आहेत. ज्यांना या समस्या आहेत त्यांनी आहारात रोज सकाळी रात्री थोडं तेल ज्वारीच्या पिठात घालावे व त्याची भाकरी करून दिवसातून दोन्ही वेळा खावी. ८-१५ दिवस करून पाहावे. दुखऱ्या सांध्यांना सुंठ पावडर एरंडेलचा लेप लावल्यास आराम पडतो.


४. लहान मुलांसाठी


लहान मुलांना मधातून किंवा कणकेची पोळी करताना त्यात एरंडेल व चिमूटभर सुंठ पावडर टाकून ती द्यावी. हे असे महिन्यातून किमान एकदा तरी मुलांना द्यावे. पूर्वी नुकत्याच जन्मलेल्या बाळालाही मध एरंडेलाचे चाटण देण्याची पद्धत होती.


५. गर्भवतींसाठी


गर्भवतींनी ‘सिझेरियन’ टाळायचे असेल तर नववा महिना लागताच रोज एक चमचा एरंडेल घ्यावे.( हे घेताना एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या.


६. रक्तदोषात गुणकारी


अंगावर बारीक पुरळ उठते, खाज सुटते, अंगावर गजकर्ण, नायटे उठलेले असतात. अशा वेळी एरंडतेल एक चमचा, दोन चमचे तूप व एक चमचा मध एकत्र करून पोटात देत जावे.


७. उत्तम झोपसाठी  


अनेक व्यक्तींना बिछान्यावर पडल्यानंतर ताबडतोब झोप लागत नाही. सतत विचार सुरु राहणे यामुळे झोप अजिबात येत नाही. असा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी रोज डोक्यास व तळपायास सावकाशपणे एरंडेल तेल काशाचे पात्राने चोळून तेल जिरावावे नक्कीच गुण येतो.




*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




स्मरणशक्ती वाढवण्यासाठी..!*

 *स्मरणशक्ती वाढवण्यासाठी..!* 


मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचे सेवन करतात. मात्र, ही औषधे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.


स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता. हे पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होऊ शकते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात पुढील गोष्टींचा समावेश करा.


*भोपळ्याच्या बिया (Pumpkin seeds)* 


भोपळ्याच्या बिया आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. या बियांचे नियमित सेवन केल्याने शरीर निरोगी राहते आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. कारण भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, विटामिन सी इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे भोपळ्याचे बियांचे सेवन करणे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.


*हळद (Turmeric)* 


हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. हळदीमध्ये आढळणारे कर्क्यूमिन मेंदूला तीक्ष्ण बनवतात. त्याचबरोबर हळदीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. हळदीच्या सेवनाने शरीर मोसमी आजारांपासून दूर राहते.


*सुकामेवा (Dry fruits)* 


स्मरणशक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही सुक्यामेव्याचे सेवन करू शकतात. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि आयरन आढळून येते, जे स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यास मदत करते. सुक्या मेव्याचे सेवन केल्याने लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही बदाम आणि अक्रोडाचे सेवन करू शकता.


*ब्रोकोली (Broccoli)* 


ब्रोकोली आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ब्रोकोलीमध्ये फायबर, पोटॅशियम, आयरन, सोडियम यासारखे घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्याचबरोबर ब्रोकोलीमध्ये विटामिन के आढळून येते, जे स्मरणशक्ती वाढवते.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



अननस खाण्याचे 6 आयुर्वेदिक फायदे.....*

 *अननस खाण्याचे 6 आयुर्वेदिक फायदे.....*


*१). वजन कमी करण्यास उपयुक्त...*

अननसात फॅटचे प्रमाण नाममात्र असते. त्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. अननसमध्ये आढळणारे घटक लठ्ठपणाविरोधी घटक म्हणून काम करतात. हे लिपोजेनेसिसची प्रक्रिया देखील नियंत्रित करतात. ज्यामुळे शरीरातील 🧍🏻‍♂️चरबीचे प्रमाण कमी होते. इतकेच नाही तर ते लिपोलिसिसच्या प्रक्रियेला गती देते. ज्यामुळे चरबी आणि इतर लिपिड अधिक त्वरीत नष्ट होतात.


*२). हृदयासाठीही फायदेशीर...*

अननसाचे नियमित सेवन करणे देखील हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे केवळ हृदयाला विविध प्रकारच्या नुकसानीपासून वाचवते असे नाही तर त्यात असलेले ब्रोमेलेन हृदयाच्या पेशींना मरण्यापासून रोखते. हे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवते. ज्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित राहते. याशिवाय, ते मृत ऊतकांचा आकार देखील कमी करते. ज्यामुळे रक्ताभिसरणात कोणताही अडथळा येत नाही.


*३) सर्दी आणि फ्लू मध्ये फायदेशीर...*

अननसमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी देखील आढळते. ज्यामुळे ते सर्दी आणि फ्लूमध्ये खूप फायदेशीर आहे. जेव्हा सर्दी असते तेव्हा श्लेष्माचा पडदा अनेकदा फुगतो आणि जास्त श्लेष्मा जमा होऊ लागतो. अननसमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करतात.


*४) रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयुक्त...*

अननसमध्ये व्हिटॅमिन सी, मॅंगनीज, थायामिन, रिबोफ्लेविन, पायरीडॉक्सिन, कॉपर यांसारखे अनेक सूक्ष्म पोषक घटक आढळतात. ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. यासोबतच कौमेरिक अॕसिड, फेरूलिक अॕसिड, क्लोरोजेनिक अॕसिड, इलाजिक अॕसिड अशी अनेक नैसर्गिक रसायने अननसात आढळतात. जे शरीराला आतून मजबूत बनवण्यास मदत करतात.


*५). रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास होते मदत...* 

अननस खाल्ल्यानेही रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त आणि सोडियमचे प्रमाण कमी असल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तथापि, जर तुम्ही रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी औषधे घेत असाल, तर हा त्याचा पर्याय नाही आणि ते घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.


*६) कर्करोग रोखण्यासाठी उपयुक्त...*

कर्करोग हा एक असा आजार आहे, ज्याचा यशस्वी आणि पूर्णपणे प्रभावी उपचार आजही जगभरातील डॉक्टर शोधत आहेत. तथापि, अननसमध्ये असे अनेक घटक आढळून आले आहेत जे कर्करोगापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहेत. अननसात आढळणारे ब्रोमेलेन हे एन्झाइम शरीरात कर्करोगाच्या पेशी तयार होण्यास प्रतिबंध करते, असे एका संशोधनातून दिसून आले आहे. एवढेच नाही तर ते मृत पेशींना नैसर्गिकरित्या साफ करते. ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.


*वैद्य तुषार साखरे,*

*सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺



विद्यापीठांनी नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, शैक्षणिक वेळापत्रक, गुणांकन कार्यपद्धतीचे नियोजन करावे

 विद्यापीठांनी नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, शैक्षणिक वेळापत्रक, गुणांकन कार्यपद्धतीचे नियोजन करावे


- चंद्रकांत पाटील


            मुंबई, दि. २० : नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या शैक्षणिक उपाययोजना करून विद्यापीठांनी शैक्षणिक वेळापत्रक व गुणांकन कार्यपध्दतीचे अचूक नियोजन करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.


            कैवल्यधाम, लोणावळा येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने दिनांक १९ व २० एप्रिल २०२३ रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणीच्या अनुषंगाने गठीत केलेल्या सुकाणू समितीच्या समवेत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री. पाटील यांचे अध्यक्षतेखाली चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.


            मंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यातील विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थांमध्ये गुणात्मक बदल करण्यासाठी परीसस्पर्श सारखी योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. विद्यार्थी हिताला अधिक प्राधान्य देऊन विद्यापीठे व महाविद्यालयांनी मेजर, मायनर व जेनेरिक विषयाच्या अनुषंगाने अभ्यासक्रम रचना, ॲकॅडेमिक बँक क्रेडीट्सची नोंदणी, प्रवेश प्रक्रियेचे स्वरुप यांचे योग्य नियोजन करावे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाच्यावतीने आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.


            राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वसमावेशक, कौशल्याधिष्ठित असल्याने शैक्षणिक क्षेत्रातील सर्व घटकांपर्यंत धोरणाची वैशिष्ट्ये, कार्यपद्धती व शासनाद्वारे करण्यात येत असलेले प्रयत्न माध्यमांपर्यंत पोहचविण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच, विद्यापीठ, महाविद्यालय यांच्या नॅक मूल्यांकन व एनआयआरएफ गुणांकनाबाबत डॉ. आर. एस. माळी यांनी मार्गदर्शन केले.


            उच्च शिक्षण क्षेत्रात गुणात्मक विकास, उद्योगजगताशी समन्वय, बहुविद्याशाखीय शिक्षणपद्धतीचा अंगीकार होण्यासाठी कला शिक्षणाची सुविधा इतर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन शिक्षण क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, माध्यम क्षेत्राचा सहभाग, नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीबाबत या चर्चासत्रात दिशानिश्चिती करण्यात आली. तसेच कौशल्य आधारित अभ्यासक्रमाची रचना होण्यासाठी व्यवसाय व उद्योग क्षेत्रातील तज्ञांचाही या चर्चासत्रात प्रत्यक्ष सहभाग होता.


            राज्यातील अकृषी विद्यापीठे, संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालयांत आगामी शैक्षणिक वर्ष २०२३- २४ पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू करण्यासाठी करावयाची कार्यवाही व त्याअनुषंगाने धोरणात्मक निर्णय या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली.


            यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, विकासचंद्र रस्तोगी, सुकाणू समितीचे प्रमुख डॉ. नितीन करमळकर व इतर सदस्य, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सर्व उपसचिव, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, मराठा चेम्बर्स ऑफ कॉमर्स अध्यक्ष दिपक करंदीकर, उद्योजक रामभाऊ भोगले, संजीव मेहता, माध्यम क्षेत्रातील तज्ञ श्रीरंग गोडबोले, आयटी तज्ञ, दीपक हार्डीकर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे संजय नलबलवार हे उपस्थित होते.


            यावेळी सुकाणू समितीने राज्य शासनास सादर केलेला अंतरीम अहवाल स्वीकृत करण्यात आला.


0000

Featured post

Lakshvedhi