Wednesday, 19 April 2023

भारतीय पत्र परिषदेच्या दोन दिवसीय बैठकीचा समारोप

 भारतीय पत्र परिषदेच्या दोन दिवसीय बैठकीचा समारोप.

            मुंबई, दि. १८ : भारतीय पत्र परिषदेच्या (प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया) अध्यक्ष न्या. रंजना प्रकाश देसाई यांच्‍या अध्यक्षतेखालील चौकशी समितीच्या दोन दिवसीय बैठकीचा समारोप आज सह्याद्री अतिथीगृह येथे झाला. या समितीने माध्यम स्वातंत्र्य आणि पत्रकारिता मूल्यांच्या उल्लंघनासंबंधी ३६ प्रकरणांची सुनावणी घेतली. १४ प्रकरणांमध्ये समितीने शिफारशी केल्या असून उर्वरित प्रकरणे राखून ठेवली आहेत, अशी माहिती भारतीय पत्र परिषदेने दिली आ

हे.


 


!

फक्त 3 लवंग 3 मिनिटात कसलीही रांजणवाडी बरी : डोळ्यांची सूज, उपाय !

 फक्त 3 लवंग 3 मिनिटात कसलीही रांजणवाडी बरी : डोळ्यांची सूज,  उपाय !

 फक्त 3 लवंग 3 मिनिटात कसलीही रांजणवाडी बरी : डोळ्यांची सूज, जळजळ   उपाय !.

👇

खूप जणांना रांजणवाडी होत असते. खरंतर डोळ्यांचा कोणता आजार दुर्लक्षित करू नये. म्हणून रांजणवडी या विषयावर घरगुती उपाय आज सांगणार आहे. अत्यंत साधा सोपा घरातील एक वस्तू वापरून आपल्याला उपाय करायचा आहे.


 या उपायासाठी आपल्याला लवंग लागणार आहे लवंग आपल्या घरामध्ये असतेच. तुमची रांजणवडी अगदी काही क्षणांमध्ये बरी होईल इतकी शक्ती या घरगुती उपायांमध्ये आहे. घरगुती उपाय आपण समजून घेणारच आहोत पण तत्पूर्वी रांजणवाडी येण्याची कारण काय आहेत ते आपण पाहिले.


प्रतिकारशक्ती कमी होणे अयोग्य आहार-विहार यामुळे शरीरात विषारी तत्व चाटतात जर टाकाऊ पदार्थ बाहेर पडले नाही तर शरीराची प्रतिकार शक्ती आपोआप कमी होत असते. यामुळेसुद्धा रांजणवाडी येते पापण्यांच्या केसांच्या मुळाशी जीवाणूंचा संसर्ग झाला तर रांजणवाडी येत असते तर यावर आपण घरगुती उपाय पाहणार आहोत.


 आपण एक कप पाणी उकळायला ठेवणार आहोत. पाणी उकळून झाल्यानंतर कोमट होऊ द्यायचे आहे. या या कोमट पाण्याने तीन ते चार लवंगा उगाळून घ्यायचे आहेत. आपल्याला उगाळून त्याचा लेप तयार करायचा आहे. आपल्याला दिवसातून दोन वेळा या रांजणवाडी वर लावायचे आहे रांजणवाडी ची सूज वेदना जळजळ होणे या सर्व समस्या त्वरित कमी होणार आहेत. काही क्षणातच सर्व समस्या कमी होती आणि हे तुम्हाला निश्चितच जाणवेल


लवंगामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि हा जो रोग किंवा आजार आहे तो जीवाणूंचा संसर्ग झाल्यामुळे होत असतो आणि म्हणून जिवाणू विरोधात लढण्यासाठी लवंग निश्चितच मदत करत असते.


दुसरा महत्वाचा उपाय तुम्ही मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपल्याला तीन ते चार पेरूची पाने घ्यायची व्यवस्थित मिठाच्या पाण्याने धुऊन घ्या व्यवस्थित परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवा आणि मग त्याला कोरडी करा. एक कप गरम पाणी करा आणि हे पाणी कोमट होऊ द्या. त्या पाण्यामध्ये ही पेरू चे पान  बुडवायचे आणि ते पान तुमच्या डोळ्यावर ठेवायचा आहे.


थोडं गार झाल्यानंतर नंतर ते पान डोळ्यावरून काढून टाका आणि दुसरे पान घ्या ते कोमट पाण्यामध्ये बुडवा आणि ते पुन्हा आपल्या डोळ्यावरती ठेवा असे एक एक पान भिजवून डोळ्यावरती ठेवा असे दहा मिनिटं आळीपाळीने पेरुची पाणी कोमट पाण्यात बुडवून डोळ्यावर ती ठेवा अकराव्या मिनिटाला तुमच्या डोळ्यावर आलेली सूज जाईल तसेच खाज वेदना आणि जळजळ थांबणार आहे रांजणवाडी डोळ्याला होणारा त्रास पूर्णपणे थांबणार आहे यामुळे रांजणवाडी ची समस्या बंद होईल.


 हे घरगुती उपाय करा परंतु त्याबरोबरच पिष्टमय पदार्थ साखरेचे पदार्थ मांसाहारी चरबीयुक्त पदार्थ मसालेदार पदार्थ खाऊ नका. तसेच कॉफी चहा अतिरिक्त प्रमाणात मीठ हे रांजणवाडी असताना असे पदार्थ वर्ज्य करा.


तुम्हाला नेहमी नेहमी रांजणवाडी येण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही कवचफळे धान्य भाज्या व फळे यांचा समावेश आपल्या आहारामध्ये निश्चित करा. त्याच बरोबर डोळ्यांचे व्यायाम करत राहा. डोळ्यांवर ताण कमी होण्यासाठी  व्यायाम करा. शरीराची स्वच्छता योग्य आहार आणि डोळ्यांचे व्यायाम करा आपला आरोग्य सुधारा. या गोष्टींचे पालन केले तर रांजणवाडी कधीच. तुम्हाला होणार नाही..


..

आयुर्वेद अभ्यासक... सुनिता सहस्रबुद्धे...



*⭕️

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना बार्टी, टीआरटीआय, महाज्योतीच्या धर्तीवर

 मराठा समाजातील विद्यार्थ्यांना बार्टी, टीआरटीआय, महाज्योतीच्या धर्तीवर


सारथीमार्फत शैक्षणिक सवलती, सुविधांसाठी सर्वंकष समान धोरण आणणार


- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील


            मुंबई, दि. १८ : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. बार्टी, टीआरटीआय,महाज्योतीच्या धर्तीवरच सारथीमार्फत सवलती आणि सुविधा देण्यासाठी सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.


            उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सह्याद्री राज्य अतिथीगृह, मुंबई येथे झाली.


            यावेळी ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम (सा. उ. वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम, आमदार प्रवीण दरेकर, आमदार भरत गोगावले, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे उपस्थित होते.


            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.पाटील म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (राज्यसेवा पूर्व परीक्षा) प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची संख्या यापूर्वी 250 होती ती वाढवून आता 750 करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना प्रतिमाह 8 हजार रुपये 8 महिन्यांसाठी देण्यात येत आहे.


            केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) पूर्व परीक्षा प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 250 वरून 500 करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांचे शिकवणी शुल्क (ट्युशन फी) दीड ते दोन लाख रुपये भरण्यात येत आहे. तसेच त्यांना निर्वाह भत्ता म्हणून प्रतिमहिना 13 हजार रुपये 10 महिन्यांसाठी देण्यात येते. बार्टीच्या धर्तीवर पीएचडी फेलोशीप संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.


            मराठा समाजाच्या मुला-मुलींसाठी वसतिगृहाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे.मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या पुनर्विलोकन याचिकेवर प्रभावी बाजू मांडण्यासाठी अनुभवी व ज्येष्ठ वकिलांच्या नियुक्तीकरिता टास्क फोर्स समिती गठित करण्यात येत आहे.


            मराठा समाजातील ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध होत नाही त्याच्याकरिता स्वाधार योजना सुरू करण्यात येत आहे या विद्यार्थ्यांना प्रतिमहा 6 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


            अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, कौशल्य विकास विभाग व अन्य विभागामार्फत मराठा समाजातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण बीज भांडवल व अन्य सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


            वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना अंतर्गत स्वयंरोजगारासाठी कोणत्याही व्यवसायाकरिता 20 मे 2022 पूर्वी पात्रता प्रमाणपत्र धारकांना बँकेमार्फत घेतलेल्या कर्जावरील 15 लाखांच्या मर्यादेत व्याज परतावा जास्तीत जास्त 5 वर्षाकरिता 12 टक्के अथवा साडे चार लाखाच्या मर्यादेत व्याज परतावा देण्यात येत आहे. तसेच या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी सहकारी/नागरी बँकांच्या पदाधिकारी यांच्या सोबत बैठक घेण्यात येईल, असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.


००००

विदर्भ वगळता राज्यातील शाळा 15 जून पासून तरविदर्भातील शाळा 30 जून पासून सुरू होणार - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

 विदर्भ वगळता राज्यातील शाळा 15 जून पासून तरविदर्भातील शाळा 30 जून पासून सुरू होणार

- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

 

            मुंबईदि. 18 : विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू होण्याच्या तारखांविषयी संभ्रम राहू नये आणि त्यांना सुट्यांचे नियोजन करता यावे यासाठी यावर्षीपासून राज्य मंडळाच्या शाळा 15 जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. उन्हाची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा 30 जून रोजी सुरू होतील असेही त्यांनी सांगितले.

            शालेय शिक्षण विभागांतर्गत घेण्यात आलेल्या विविध निर्णयांबाबत श्री.केसरकर यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यावेळी ते बोलत होते.

            मंत्री श्री.केसरकर म्हणालेशाळेत दाखलपात्र बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियानांतर्गत यावर्षी देखील मुलाच्या शाळेतील पहिल्या पावलाचे स्वागत केले जाणार आहे. शाळापूर्व तयारीचा पहिला मेळावा 26 एप्रिल पासून आणि दुसरा मेळावा जून महिन्यात घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्राचा नव भारत साक्षरता कार्यक्रम राज्यातही राबविला जाणार आहे. यासाठी स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. यावर्षीपासून शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश तसेच वह्याबूट आणि सॉक्स हे शासनातर्फे दिले जाणार आहेत. पुस्तकांमध्ये प्रत्येक धड्यानंतर टिपण (नोटस्) काढण्यासाठी आता एक पान कोरे ठेवले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी होईलअसा विश्वास श्री.केसरकर यांनी व्यक्त केला.

            येत्या वर्षापासून शाळांमध्ये 'आजी आजोबा दिवससाजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे श्री.केसरकर यांनी सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण दिले जाणार असल्याचे ते म्हणाले. राज्यातील अघोषित व घोषित विनाअनुदानित शाळांना अनुदान उपलब्ध करून देण्याचा तसेच त्रुटीपूर्ततेनंतर अनुदानासाठी पात्र ठरलेल्या अघोषित शाळांना नैसर्गिक तुकड्यांना सरसकट 20 टक्के अनुदानासाठी पात्र घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. शिक्षक व सेवकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात आली असून शिष्यवृत्तीच्या रकमेत देखील मोठी वाढ करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

            मंत्री श्री.केसरकर म्हणालेविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. शाळांमध्ये इंटरॅक्टीव्ह टीव्ही लावले जाणार आहेत. आदर्श शाळांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असून पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांना मराठीकडे आकर्षित करण्यासाठी उच्च शिक्षणही मराठीमध्ये दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. इयत्ता बारावीच्या परीक्षा पुढील वर्षी होणार नाहीत हे खरे नसून पालक आणि विद्यार्थ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नयेअसे आवाहन त्यांनी केले.

00000

शरीराला आवश्यक असणाऱ्या खनिजा विषयी सविस्तर माहीती पहा.....*

 *शरीराला आवश्यक असणाऱ्या खनिजा विषयी सविस्तर माहीती पहा.....*


*कॅल्शिअम कशात असतं?*

शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर.

*कमतरतेमुळे काय होतं?*

हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे.

*कार्य काय असतं?*

शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं.


*लोह कशात असतं?*

खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी.

*कमतरतेमुळे काय होतं?*

शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो.

*कार्य काय असतं?*

शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असते.


*सोडिअम कशात असतं?*

मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं.

*कमतरतेमुळे काय होतं?*

रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे.

*कार्य काय असतं?*

शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो.


*आयोडिन कशात असतं?*

शिंघाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ आणि लसूण.

*कमतरतेमुळे काय होतं?*

थायरॉइडची समस्या, केस गळणे, डिप्रेशन किंवा बैचेनी येणे.

*कार्य काय असतं?*

शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून मेंदूला बचावण्याचं काम करतो.


*पोटॅशिअम कशात असतं?* सर्व प्रकारची धान्य, डाळ, संत्र, अननस, केळं, बटाटा, लिंबू, बदाम.)

*कमतरतेमुळे काय होतं?*

अ‍‍ॅसिडिटी, त्वचेवर सुरकुत्या किंवा मुरुमं येणं, त्वचा रोग, केस पिकणे.

*कार्य काय असतं?*

शरीरात तंतू आणि यकृत यांना सुरळत ठेवण्याचं कार्य करतं.


*फॉस्फरस कशात असतं?*

दूध, पनीर, डाळी, कांदा, टोमॅटो, गाजर, जांभळं, पेरू, काजू, बदाम, बाजरी आणि चणे.

*कमतरतेमुळे काय होतं?*

ऑस्टिओपोरोसिस, गतिमंद होणे, मानसिक थकवा, दंत रोग.

*कार्य काय असतं?*

मेंदूला ताजंतवानं ठेवण्याचं काम हे खनिजं करतं.


*सिलिकॉन कशात असतं?*

गहू, पालक, तांदूळ, कोबी, काकडी, मध,

*कमतरतेमुळे काय होतं?*

कॅन्सर, त्वचारोग, बहिरेपणा, केस गळणे.

*कार्य काय असतं?*

जननेंद्रियांची कार्यक्षमता वाढवून शरीरातील तंतूना मजबूत करतात.


*मॅग्नेशिअम कशात असतं?* बाजरी, बीट, खजूर, सोयाबीन, दूध, लीची, कारलं.

*कमतरतेमुळे काय होतं?*

उदास होणे, आळस येणे, तणाव असणे, झोप न लागणे, बैचेनी, सोरायसिस, फोडं, नपुंसकता किंवा वांझपणा.

*कार्य काय असतं?*

पेशीचं कार्य सुधारतं. रेचक म्हणून काम करतं.


*सल्फर कशात असतं?*

दूध, पनीर, डाळ, टोमॅटो, बटाटा, आलं, मिरची, सफरचंद, अननस, सुरण.

*कमतरतेमुळे काय होतं?*

प्रतीकारशक्ती कमी होते, केस गळतात, वजन वाढतं, मधुमेहाला आमंत्रण मिळतं.

*कार्य काय असतं?*

इन्सुलिनचं रेचन म्हणून कार्य करतं.


*क्लोरिन कशात असतं?*

पाणी, बीट, कोबी, मीठ, दूध, लिंबू, आवळा, मध.

*कमतरतेमुळे काय होतं?*

अ‍‍ॅसिडिटी, अल्सर, कॅन्सर, आणि अ‍‍ॅलर्जी.

*कार्य काय असतं?*

सोडिअम आणि पोटॅशिअमला पाचक बनवण्यासाठी सहायता करतं, त्याचप्रमाणे शरीरातील आम्लक्षाराचं संतुलन राखलं जातं.


*खाद्यपदार्थामधील खनिजं शरीराला मिळावीत म्हणून काय केलं पाहिजे...*

*फळं किंवा भाज्या कापल्यानंतर कधीच धुवू नयेत. असं केल्याने त्यातील खनिजं पाण्यावाटे नष्ट होतात.


*डाळ, तांदूळ किंवा धान्यदेखील उकडण्यापूर्वीच स्वच्छ धुऊन घ्यावेत.


*काही धान्य, फळं तसंच भाज्यांच्या सालींमध्ये खनिजांचा मोठा प्रमाणावर साठा असतो. त्यामुळे अशा सालींचा आहारात समावेश करावा.


*दुधात खनिजांचा भरपूर स्रेत असतो म्हणूनच दूध जास्त प्रमाणात उकळू नये. दूध जास्त प्रमाणात उकळल्याने त्यातील खनिजं नष्ट होतात.


*फळं कापून खाण्याऐवजी शक्यतो आहे तशीच खावीत. उदाहरणार्थ, चिकू किंवा सफरचंद ही फळं संपूर्ण खावीत.


*डॉ. सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(

Tuesday, 18 April 2023

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्यापन्नास टक्के अनुदान व बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्यापन्नास टक्के अनुदान व बीज भांडवल योजनेसाठी

अर्ज करण्याचे आवाहन

 

            मुंबई, दि. १८ : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ राबवित असलेल्या पन्नास टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन महामंडळाच्या मुंबई शहर/उपनगर जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

            जिल्हा कार्यालय मुंबई व उपनगर अंतर्गत २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ५० टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजना या दोन्ही योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविण्यात येतात.  सदर योजनेअंतर्गत्‍ कर्ज प्रस्ताव सादर करणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध नागरिकांनी यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

            १८ वर्षावरील व वार्षिक उत्पन्न ३ लाखापर्यंत उत्पन्न असलेले नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात. ५० टक्के अनुदान योजनेअंतर्गतप्रकल्प मर्यादा ५० हजारापर्यंत असणे गरजेचे आहे. प्रकल्प मर्यादेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १० हजार पर्यंत अनुदान देण्यात येते व उर्वरीत रक्कम बँकेमार्फत देण्यात येते.

             तसेचबीज भांडवल योजनेअंतर्गत प्रकल्प मर्यादा ५० हजार ते ५ लाखापर्यंत असणे गरजेचे आहे. प्रकल्प मर्यादेच्या २० टक्के बीज भांडवल कर्ज महामंडळामार्फत ४ टक्के दर साल दर शेकडा व्याजदराने देण्यात येते. तरबँकेचे कर्ज ७५ टक्के देण्यात येते. नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येतो. महामंडळाचे व बँकेच्या कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हफ्त्यानुसार ३ ते ५ वर्षाच्या आत करावी लागते. अर्जदारास ५ टक्के स्वत:चा सहभाग भरणे गरजेचे असणार आहे.

            इच्छुकांनी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित गृहनिर्माण भवनकलानगरमुंबई उपनगरबांद्रा पूर्वमुंबई -५१ या ठिकाणी अर्ज सादर करावेत.

Featured post

Lakshvedhi