Wednesday, 12 April 2023

निलगिरी तेलाचे आश्चर्यचकीत फायदे !!*

 *निलगिरी तेलाचे आश्चर्यचकीत फायदे !!* 


अनेक प्रकारचे तेल आहेत ज्याचा उपयोग त्वचा आणि केसांसाठी तसेच आरोग्यासाठी केला जातो. पण, एक विशिष्ठ प्रकारचे तेल आहे जे तूमच्या प्रत्येक समस्येवर फायदेशीर ठरू शकते. त्या तेलाचे नाव आहे निलगिरी तेल.


निलगिरीच्या तेलामध्ये जिवाणूरोधक, कवक रोधक आणि रोग प्रतिबंधक तसेच अँटिव्हायरस, सुज, अंगदुखी आणि सर्दी खोकला यावर उपयुक्त ठरणारे गुण आहेत. जे की अशा समस्यांवर इलाज करणाऱ्या औषधांसाठी चांगले घटक मानले जातात.


याच तेलाचे काही आश्चर्यचकीत करणारे फायदे जाणून घेऊयात.


हिवाळ्यातील समस्यांसाठी निलगिरीचे तेल लाभदायक आहे. हे तेल सर्दी, पडसं, खोकला, नाक वाहत राहणे, गळ्यामध्ये होणारी खिचखिच, अस्थमा, ब्रोंकाइटिस आणि साईंसायटीसच्या इलाजासाठी मदत करते.


प्रवास झाल्याने किंवा जास्त चालल्याने पाय खूप सुजतात. अशावेळी झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्यावर नीलगिरीच्या तेलाचा मसाज करावा.याने सुज कमी येते आणि दुखणेही कमी होते.


ज्यांना झोप येत नाही, ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे, अशा लोकांसाठी निलगिरी तेल एखाद्या चमत्कारासारखेच आहे. कारण, तेल लावताच तूम्हाला शांत व गाढ झोप लागते.


पायाच्या दुखण्यावर आता गोळी खाण्याची गरज नाही. पाय आणि गुडघे पाठदुखीवर निलगिरी तेल फायद्याचे ठरते. डोळ्यांची नजर कमजोर झाली असेल तर त्यावरही हे तेल कमालीचे गुणकारी ठरत आहे.


जर नीलगिरीचे तेल छातीवर लावले, तर ते जडपणाची समस्या दूर करते. यामुळे शरीराला ऑक्सिजन अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकेल. त्याच्या अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे ते फुफ्फुसातील जळजळ आणि संसर्ग दूर करण्यासाठी देखील मदत करते.


डोकेदुखी, थकवा किंवा तणाव झाल्यास त्या तेलाचे दोन थेंब कपाळावर लावा आणि हलक्या हातांनी पसरवा. यानंतर, काही काळ झोपा. भरपूर विश्रांती घ्या. अरोमा थेरपीमध्ये देखील हे तेल वापरले जाते.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,*


*माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद 🙏🏻*


_*(

अरे संसार संसार, गाऊन आता आधार


 

तांदळाच्या.. पाण्याचे.. पेजेचे.. आरोग्यदायि फायदे*

 *तांदळाच्या.. पाण्याचे.. पेजेचे.. आरोग्यदायि फायदे*



१) तांदळाच्या पेजेत काळे मीठ टाकुन प्यायल्यास भूक वाढते.

२) तांदळाच्या पेजेत मध मिसळून प्यायल्याने एनर्जि मिळते. थकवा दूर होतो.

३) तांदळाचि पेज व गूळ एकत्रित करून प्यायल्यास

 रक्ताचि कमतरता दूर होते.

४) तांदळाच्या पेजेत लिंबूचा रस टाकल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.

५) तांदळाच्या पेजेत दहि टाकून प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

६) केळे व तांदळाचि पेज एकत्र करून प्यायल्याने जुलाब बंद होतात, 

७) तांदळाच्या पेजेत तूप मिसळून प्यायल्याने वजन वाढते.

८) तांदळाच्या पेजेत मीठ व जीरे मिसळून प्यायल्यास

 डायजेशन सुधारते.

९) भाताच्या पेजेत कार्बोहायड्रेटस् चे प्रमाण अधिक असते त्यामूळे उर्जा मिळते बाहेर जातांना पिउन जावे दिवसभर ताजेतवाने वाटते.

१०) वायरल संसर्गाने उलट्या, मळमळ होत असेल तर जेवणाऐवजि पेज घ्यावि, आजारपणात आलेली कमजोरि दूर होते.

११) उच्च रक्तदाब कमी होतो ः। तांदळाचे पाणी घेतल्यास हाय ब्लडप्रेशर कमि होते. कारण यात पोटँशिअम मुबलक प्रमाणात असते.

१२) तांदळच्या पाण्याने चेहरा धुतल्यास तजेलदार, मूलायम होतो, काळे डाग निघून जातात.

१३) केसांकरता उत्तम टाँनिक आहे. याच्या पाण्याने केस धुतल्यास कोंडा निघून जातो, केस रेशमि, चमकदार, व मजबूत होतात. रूक्षता निघून जाते

 दुतोंडि केसांचि समस्या दूर होते, कारण यात मुबलक विटामिन, मिनरल असतात.

१४) तांदळाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास कँसरच्या पेशि आटोक्यात राहतात.

१५) तांदळाच्या पाण्यात फायबर भरपूर प्रमाणात असल्याने मेटाबाँलिज्म वाढते, पचनक्रिया सुरळित चालते. त्यामुळे आरोग्य चांगले राहते.

२६) डायरियात डिहायड्रेशन होते अश्या वेळि तांदळाचि पातळ पेज प्यायला द्यावि. ताकद येते.

१७) सर्दि, पडसे, ताप, वायरल इंनफेक्शन मध्ये

 तांदळाचे पाणि प्यायल्यास प्रतिकारशक्ति वाढून हे आजार दूर होतात.




*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा

*

जाखमाता मंदिर, नारंगी, रामराज अलिबाग रायगड सोहळा


 

मुळव्याध पासुन सुटका पाहिजे का?*

 *मुळव्याध पासुन सुटका पाहिजे का?*


मूळव्याध चा त्रास आजकाल खूप जास्त प्रमाणात वाढत आहे, संडासवाटे रक्त पडणे, मुळव्याधचा त्रास होणे हे आपण घराच्या घरी १० मिनिटांत थांबू शकतो   


*१. लिंबू व सैंधव मीठ*

 १.२ लिंबू घ्या, त्याला मधून चिरा.

 १.२ त्यावर सैंधव मीठ टाखा.

 १.३ ते लिंबु चोखून चोखून .

 १.४ आंबट लागल्यास   मीठ परत -परत टाखा व लिंबू चोखून चोखून खा (लिंबु संपे पर्यंत).         

 १.५ हे एकदा जरी केलं तरी १० मिनिटात रक्त पडणे बंद होईल.

 १.६ हा उपाय १० दिवस सकाळ-संद्याकाळ जेवल्यानंतर केला तर मूळव्याध पूर्ण बरा होतो. 


*मुळा*

नावाप्रमाणे मूळव्याधीवर मुळा हा रामबाण उपाय मानला जातो. मुळा खाल्ल्याने मूळव्याध असलेल्या रुग्णाला आराम मिळतो. थंडावा मिळतो आणि पचनक्रिया सुधारते.


*सर्वसाधारण उपचार* 

मूळव्याधीवर सुद्धा त्रिदोष, व्यक्तीची प्रकृती, रोगाची तीव्रता वगैरे अनेक गोष्टींचा विचार करून नेमक्या औषधांची योजना करावी लागते, तरीही यावर सर्वसाधारणतः केले जाणारे उपचार याप्रमाणे-

◼️रात्री झोपताना कपभर गरम पाण्यात दोन-तीन चमचे गायीचे साजूक तूप टाकून घ्यावे.


◼️मोडाच्या ठिकाणी वेदना असल्यास बेलफळाचा गर व पाठाचूर्ण मिसळून घ्यावे किंवा सुंठ व पाठाचूर्ण एकत्र करून घ्यावे.


◼️सुरण ही भाजी मूळव्याधीत औषधच होय. सुरण वाफवून केलेली भाजी, फुलका, तूप व ताक असा आहार काही दिवस घेतल्यास उत्तम फायदा होतो.


◼️रक्त पडत असल्यास घरचे ताजे लोणी व नागकेशर हे मिश्रण दिवसातून दोन-तीन वेळा घ्यावे.


◼️मोडाच्या ठिकाणी आग होत असल्यास दूर्वांच्या रसात भिजवलेली कापसाची घडी मोडाच्या ठिकाणी ठेवावी.


◼️मोड सुजला असून दुखत असल्यास गोवरीच्या विस्तवावर तूप टाकून त्याची धुरी घ्यावी किंवा खजुराच्या बीचे चूर्ण करून त्याची धुरी घ्यावी.


◼️कफज मूळव्याध असून मोडाला खाज येत असल्यास जेवणापूर्वी तसेच जेवणानंतर सुंठ व ओव्याची पूड टाकून ताक प्यावे.


◼️मोडाच्या ठिकाणी वेदना व आग होत असल्यास त्यावर कोरफडीचा गर ठेवावा.


◼️तीळ वाटून गरम करून शेकल्यास मोडाच्या ठिकाणची वेदना कमी व्हायला मदत होते.


◼️व्याधीवर शस्त्रकर्म किंवा क्षारकर्म केले तरी मुळातल्या मंद अग्नीवर योग्य उपचार करून मूळव्याधीवर खरे उपचार करणे व पथ्य पाळणे आवश्यक असते; अन्यथा पुन्हा त्रास उद्भवू शकतो.


मूळव्याध असो किंवा फिशर, भगंदर असो, एक तर या सर्व रोगांचा त्रास फार भयानक असतो. शिवाय संकोचापायी यांचे वेळेवर योग्य निदान केले जात नाही, परिणामतः उपचारही मिळत नाहीत. त्रास फारच असह्य झाला तर पटकन गुण यावा म्हणून शस्त्रकर्माकडे झुकण्याचा कल वाढतो. क्वचित एखाद्या व्यक्तीमध्ये शस्त्रकर्म, क्षारसूत्र वगैरे उपचारांची आवश्यकता असली तरी केवळ बाह्योपचार रोगाला बरे करण्यास असमर्थ असतात याचेही भान ठेवायला हवे. मंद अग्नी, अपचनाची प्रवृत्ती आणि आतड्यांमधला कोरडेपणा, उष्णता हे सर्व बरे केल्याशिवाय या त्रासापासून कायमची सुटका होऊ शकत नाही, हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे या प्रकारचा कोणताही त्रास होऊ नये म्हणून पहिल्यापासूनच आहार-आचरणात काळजी घ्यायला हवी. तरीही त्रास झालाच तर वेळेवर योग्य उपचार घेऊन तो मुळापासून बरा करण्यावर भर द्यायला हवा.


*पथ्याच्या गोष्टी* 

तांदूळ, गहू, यव, ज्वारी, दुधी, पडवळ, तोंडली, सुरण, परवर, आंबट चुका, घोसाळी, मूग, तूर, लोणी, तूप, ताक, आले, सुंठ, मनुका, आवळा.


*अपथ्याच्या गोष्टी* 

नाचणी, मका, उडीद, वाल, पावटा, चवळी, शेंगदाणे, रताळे, तळलेले तिखट पदार्थ, शेंगदाणे, लोणची, पापड वगैरेंचा अतिरिक्त वापर.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,*


 *⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा*



बार्टीच्या प्रशिक्षणाच्या सर्व योजना सुरु सामाजिक न्याय विभागाचा खुलासा

 सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही योजना बंद केलेल्या नाहीत,

बार्टीच्या प्रशिक्षणाच्या सर्व योजना सुरु

सामाजिक न्याय विभागाचा खुलासा

 

            मुंबईदि. 11 : सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही योजना बंद केलेल्या नाहीत. सर्व योजना सुरु आहेत. बार्टीच्या प्रशिक्षणाच्या व इतर सुरु असलेल्या कोणत्याही योजना बंद करण्यात आलेल्या नाहीतअसा खुलासा सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी केला आहे.

            अलिकडे काही प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांच्या अनुषंगाने प्रमुख मुद्द्यांचा तपशील व त्याबाबतची वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे :

अधिछात्रवृत्ती देण्याची मागणी बाबत

            ‘बार्टीकडे असलेल्या निधीची तरतूद व उपलब्धता लक्षात घेता बार्टीच्या नियामक मंडळाने प्रतिवर्षी २०० विद्यार्थी संख्या निश्चित केल्यानुसार बार्टी मार्फत देण्यात येणा-या अधिछात्रवृत्तीकरिता प्राप्त अर्जापैकी बार्टीच्या धोरणाप्रमाणे 200 विद्यार्थाची गुणवत्तेच्या आधारावर अधिछात्रवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहेव बार्टीमार्फत लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या धोरणांप्रमाणे बार्टीच्या नियामक मंडळाच्या बैठकीत प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेतले जातात. महासंचालक हे बार्टीचे प्रशासकीय प्रमुख असून बार्टीच्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यरत आहेत. केंद्र सरकार व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सर्वच योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहेव कोणतीही योजना बंद करण्यात आलेली नाही.

प्रशिक्षण संस्थांची निवड बाबत

                 बार्टीच्या माध्यमातून सध्या आयबीपीएसबँकिंग व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण देणा-या 30 संस्थांचा करार कालावधी संपुष्टात आलेला असून कोविडच्या पार्श्वभूमीवर निविदा प्रक्रिया न राबवता एक वर्ष मुदतवाढ देण्याचा तत्कालिन परिस्थितीत सन २०२१ मध्ये निर्णय घेण्यात आला होता. शासनाच्या मार्गदर्शक धोरणाप्रमाणे रूपये 10 लक्ष पेक्षा अधिक रकमेच्या खर्चांच्या योजनांसाठी ई निविदा प्रक्रिया राबविणे बंधनकारक आहे. सध्या सुरू असलेले प्रशिक्षण हे 46 संस्थांमार्फत राबवावयाचे झाल्यास पुढील पाच वर्षात रूपये एक हजार कोटी पेक्षा अधिकचा खर्च येणार असल्याने ई निविदा प्रक्रिया राबविल्याशिवाय प्रशिक्षण संस्थाची निवड करणे शासनाच्या मार्गदर्शक धोरणाच्या विपरीत होणार आहे. पारदर्शक पद्धतीने प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची निवडगुणवत्ता पूर्ण प्रशिक्षण व विद्यार्थी हित याबाबीचा विचार करुन बार्टीचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम अधिक खंबीरप्रभावीपणे राबविण्याचे निश्चित केले आहे.

शासकीय वसतिगृहातील भोजन ठेकेदार यांच्या विरुद्ध कार्यवाही

            भोजन ठेका पुरवठादार यांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात येत होती. मात्रराज्यात काही ठिकाणी त्या संदर्भात भोजनाचा दर्जावेळेवर भोजन उपलब्ध करुन न देणे अशा स्वरुपाच्या तक्रारी असल्याने व त्याची विभागाने स्थानिक स्तरावर तपासणी केली असता त्यात तथ्य आढळून आल्याने काही भोजन ठेका पुरवठादारांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. दोषी ठेकेदारांचा समावेश काळ्या यादीत करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार त्यांना दर्जेदार सकस आहार मिळावा म्हणून नव्याने स्पर्धात्मक पद्धतीने राज्यस्तरावर भोजन ठेका देण्याची टेंडर प्रक्रिया करण्यात येत आहे.

            सामाजिक न्याय विभागाने समाजातील सर्व वंचित घटकांच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेतराज्यातील सर्व क्षेत्रिय अधिकारी यांच्या माध्यमातून अनेक नावीन्यपूर्ण योजनांची प्रभावी व यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे व येणाऱ्या काळात देखील तितक्याच गतिमान पद्धतीने व पारदर्शक पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी कार्यरत आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या सामाजिकआर्थिकशैक्षणिक व सांस्कृतिक विकासासाठी सामाजिक न्याय विभाग सदैव कार्यरत असून कायम प्रयत्नशील आहे.

****

जिवन गाणे

 🙏🌹🌹🙏

*हृदयात नेहमीच जे परोपकाराची भावना बाळगतात, त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती, यश आणि समृद्धी मिळते.*


*💐🙏🏻💐

शुभ सकाळ

💐🙏🏻💐*🌹🌹🙏


*मनात भरून आलेलं आभाळ मोकळं व्हायला कधी कधी, आपल्या माणसाने केलेली साधी विचारपूस पण पुरेशी असते..!!* 


*"आयुष्य जगताना खच्चीकरण करणाऱ्या लोकांपेक्षा......!* 

*साथ व स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत चालत रहा…...*

*अशक्य ही शक्य होईल.

 *सुप्रभात*

🙏🌹🌹🙏

 पैशांची गरज भासली तर ते

 व्याजानेही मिळतात पण,

 माणसाची साथ व्याजाने

 मिळण्याची सुविधा अजुन

 तरी सुरु झालेली नाही. 

  म्हणून नाती जपा.

आनंदात काय परकेसुद्धा सामील होतात

 पण, न बोलवता दु:खात जे सामील होतात

 तेच खरे आपले असतात.....!!!?💐

 *आपल्या कानावर जे काही येतं व "ऐकतो" त्यावर केव्हाही त्वरित "विश्वास" ठेवुनये, कारण "खोटे" हे "सत्याच्या" तुलनेत फार वेगाने "पसरत" असतं..!!!*


              🙏🙏 * 🙏🙏

Featured post

Lakshvedhi