Sunday, 26 March 2023

मशिद आणि दर्ग्यांच्या जागांवरील अतिक्रमणाबाबत मोजणी करून हद्द निश्चित करणार

 मशिद आणि दर्ग्यांच्या जागांवरील अतिक्रमणाबाबत

मोजणी करून हद्द निश्चित करणार

- मंत्री शंभूराज देसाई

            मुंबई, दि. 25 : मशिद आणि दर्गा यांच्या जागांवर सरकारी कार्यालये वा इमारतींचे अतिक्रमण झालेले नाही. मशिद आणि दर्गा यांच्याजवळ सरकारी कार्यालये असल्याने त्यांच्या हद्दी जवळ असल्याने काही तक्रारी असतील, तर संबंधित ठिकाणी जागेची मोजणी करून हद्दी निश्चित करण्यात येतील, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.


            सदस्य अबू आजमी यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.


            अहमदनगर शहरातील मशिद व दर्ग्यांच्या जागांसंदर्भात अतिक्रमण झालेले नाही, असे मंत्री श्री.देसाई यांनी स्पष्ट केले.


००००

कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशनबरोबर लवकरच बैठक घेणार

 कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशनबरोबर लवकरच बैठक घेणार


- मंत्री दादाजी भुसे


            मुंबई, दि.25: कर्नाटक राज्याला वीज निर्मितीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील जमिनी अधिग्रहीत करुन कोळसा उत्खननाकरिता देण्यात आल्या आहेत. कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन हे काम करीत असून काही प्रश्न प्रलंबित असल्याने लवकरच या विषयाबाबत बैठक घेण्यात येईल, असे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत सांगितले.


            सदस्य किशोर जोरगेवार यांनी कोळसा उत्खननाकरिता घेण्यात आलेल्या जमिनी आणि त्यांना मिळणारा मोबदला या कामांबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री श्री.भुसे म्हणाले की, कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशनबरोबर 15 डिसेंबर 2016 रोजी करार करण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून येथील शेतकऱ्यांच्या जमिनीला मिळालेला मोबदला याबाबत तक्रारी असल्याने यासंदर्भात लवकरच एक सविस्तर बैठक घेण्यात येईल.



स्मृतिगंध .....

 *स्मृतिगंध .....* 👌🏼👌🏼


मला आठवतंय,...

*खूप मोठं होईपर्यंत आम्ही लहानच होतो !*

सगळंच स्वस्त होतं तेव्हा, बालपण सुद्धा .... 👌😊🙋‍♀️ 

भरपूर उपभोगलं त्यामुळे.... उन्हापावसात, मातीत, दगडात, घराच्या अंगणात, गावाबाहेरच्या मैदानात... कुठेही गेलं तरी बालपणाची हरित तृणांची मखमल सर्वत्र पसरलेली असायची...

     

*आता तसं नाही...*

लहानपणीच खूप मोठी होतात मुलं ! 

खूप महाग झालंय बालपण.... !

    

*पूर्वी आईसुद्धा खूप स्वस्त होती,* 

फुल टाईम ' *आईच* ' असायची तेव्हा ती ......!

 *आम्हाला सकाळी झोपेतून उठवण्यापासून ते रात्री कुशीत घेऊन झोपवण्यापर्यंत सगळीकडे आईच आई असायची* ....

  

*आता 'मम्मी' थोडी महाग झालीय* 

जॉबला जातेयं हल्ली. संडेलाच अव्हेलेबल असते....! 


मामा चे गाव तर राहिलच नाही ....

मामा ने सर्वाना मामाच बनवल....🤔

प्रेमळ मामा आणि मामी आता राहिलेच नाहीत पूर्वीसारखे....आधी मामा भाच्यांची वाट पहायचे ....

आता सर्वाना कोणी नकोसे झालाय ....

 *हा परिस्थितीचा दोष आहे* ...

   

*मित्र* सुद्धा खूप स्वस्त होते तेव्हा... 

हाताची दोन बोटं त्याच्या बोटांवर टेकवून नुसतं *बट्टी* म्हटलं की कायमची दोस्ती होऊन जायची....👍 शाळेच्या चड्डीत खोचलेला पांढरा सदरा बाहेर काढून त्यात *ऑरेंज गोळी* गुंडाळायची आणि दाताने तोडून अर्धी अर्धी वाटून खाल्ली की झाली पार्टी... !!!👍


*आता मात्र घरातूनच वॉर्निंग असते,* 

*"डोन्ट शेअर युअर टिफिन हं !"* 

मैत्री बरीच महाग झालीय आता. 

   

*हेल्थला आरोग्य म्हणण्याचे दिवस होते ते ....!!!* 


सायकलचा फाटका टायर आणि बांबूची हातभर काठी एवढ्या भांडवलावर अख्ख्या गावाला धावत फेरी घालताना तब्येत खूप स्वस्तात मस्त होत होती.....


*घट्ट कापडी बॉलने आप्पाधाप्पी खेळताना* पाठ इतकी स्वस्तात कडक झाली की पुढे कशीही परिस्थिती आली तरी कधी वाकली नाही ही पाठ... 💪

इम्युनिटी बूस्टर औषधं हल्ली खूपच महाग झालीत म्हणे ....!!!

   

*ज्ञान, शिक्षण वगैरे सुद्धा किती स्वस्त होतं.....* 

फक्त वरच्या वर्गातल्या मुलाशी सेटिंग लावलं की वार्षिक परीक्षेनंतर त्याची पुस्तकं निम्म्या किंमतीत मिळून जायची..... 

वह्यांची उरलेली कोरी पानं काढून त्यातून एक रफ वही तर फुकटात तयार व्हायची.... 👍


*आता मात्र पाटीची जागा टॅबने घेतलीय,* 

ऑनलाईन शिक्षण परवडत नाही आज !

   

एवढंच काय, तेव्हाचे 

*आमचे संसार सुद्धा किती स्वस्तात पार पडले....* 

शंभर रुपये भाडं भरलं की महिनाभर बिनघोर व्हायचो. .. 😊

सकाळी फोडणीचाभात/पोळी किंवा भात आणि मस्त चहा असा नाष्टा करून ऑफिसमध्ये जायचं, जेवणाच्या सुट्टीत (तेव्हा लंच ब्रेक नव्हता) डब्यातली भेंडी/बटाटा/गवारीची कोरडी भाजी, पोळी आणि फार तर एक लोणच्याची फोड... !!

 रात्री गरम खिचडी, की झाला संसार... 😊

 ना बायको कधी काही मागायची ना पोरं तोंड उघडायची हिंमत करायची..... 


*आज सगळंच विचित्र दिसतंय भोवतीनं ....!!* 

Live-in पासून ते Divorce, Suicide पर्यंत बातम्या बघतोय आपण ...., मुलं बोर्डिंगमधेच वाढतायत, सगळं जगणंच महाग झालेलं .....!! 

   

*कालपरवापर्यंत मरण तरी स्वस्त होतं.....* 

पण आता ....

 तेही आठ दहा लाखांचं बिल झाल्याशिवाय येईनासं झालंय....😔

    

*म्हणून म्हणतोय... जीव आहे तोवर भेटत रहायचं.. आहोत तोवर आठवत रहायचं......* 

नाहीतर आठवणीत ठेवायला सुद्धा कोणी नसणार ....ही जाणीव पण झाली तर रडत बसण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल हो..

म्हणून जमेल तेवढे नातेवाईक किंवा मित्र गोळा करून ठेवा .... 😊

नाहीतरी ह्या *स्मृतीगंधा* शिवाय आहे काय आपल्याजवळ.. हो ना .....!!!


🌹 😊 💖 😊 🌹 🙋‍♀️

निकष पात्र सर्व आदिवासी जमातींना जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण

 निकष पात्र सर्व आदिवासी जमातींना जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण


- आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित


            मुंबई, दि. २५ : राज्यात १ लाख ८ हजार ७५९ आदिवासींना जात वैधता प्रमाणपत्र दिले गेले आहे. निकष पात्र करणाऱ्या सर्व आदिवासी जमातींना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी विधानसभेत सांगितले.


            सदस्य समाधान अवताडे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री डॉ. गावित म्हणाले की, लोकसंख्येच्या प्रमाणात जिथे आवश्यक आहे, तिथे जात पडताळणी कार्यालय उघडले आहेत.जात वैधता समितीची संख्या सातत्याने वाढविण्यात आली आहेत. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत सोलापूर जिल्ह्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी, डोंगर कोळी यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणीबाबत सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या अहवालानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.

जब जब लोग परेशान हो जाते हैं, काफ़ी हद तक इंसान हो जाते है

 *☝जब जब लोग परेशान हो जाते हैं, काफ़ी हद तक इंसान हो जाते है.*👏 

*🌹हरीओम🌹* 


*👉Never apply any terms & conditions in ur Relations Otherwise Relations will be changed into *CONTRACTS.*

*🌹 🌹*


*☝रिश्ते मुनाफ़ा नहीं देते. मगर ज़िन्दगी को अमीर बना देते हैं 👀* 

*🌹जय हो🌹* 


*👇People don't lack strength often what they lack is willpower will to build new habits will to break old habits👆*

*🌹Have A Wonderful Day 🌹*

जीवन गाणे

 









मातंग समाजापर्यंत शासनाच्या योजनापोहोचविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा

 मातंग समाजापर्यंत शासनाच्या योजनापोहोचविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. 25 : राज्यातील मातंग समाजापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले.


            मातंग समाजाच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक झाली.


या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे सचिव डॉ. सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, मातंग समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले.


            मातंग समाज योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी जिल्ह्यांमध्ये जनजागृती शिबीरे आयोजित करावी. समाजाच्या विविध मागण्यांबाबत संघटनांसोबत जिल्हानिहाय बैठका घेवून समस्या सोडवाव्यात. योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्यांची यादी तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामाजिक न्याय विभागाला दिले.


            सद्यस्थितीत मातंग समाजाच्या विकासाच्या योजनांसाठी निधी उपलब्ध आहे. शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, रोजगार व स्वयंरोजगार, कर्ज पुरवठा आदी सोयीसुविधा मातंग समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी विभागाला 

Featured post

Lakshvedhi