Saturday, 25 March 2023

महाड तालुक्यातील सिंचन व जलविद्युत प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार

महाड तालुक्यातील सिंचन व जलविद्युत प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार

 

पुनर्वसनाला गती देण्याचे उपमुख्यमंत्र्याचे निर्देश.

            मुंबई, दि. 24 : महाड तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या सिंचन व जलविद्युत प्रकल्पांमुळे बाधित गावकऱ्यांच्या पुनर्वसनाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले. यामुळे तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.


            तालुक्यातील विविध सिंचन व जलविद्युत प्रकल्पग्रस्तांच्या अडीअडचणींसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक झाली. या बैठकीला सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, आमदार भरत गोगावले, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, विभागीय आयुक्त डॉ. महेद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी योगेश म्हसे, कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता मिलींद नाईक, काळ विद्युत प्रकल्प कमिटीचे अध्यक्ष दीपक कोतेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


            यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या जाणून घेतल्या. ते म्हणाले, महाड तालुक्यातील सिंचन व जलविद्युत प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची कार्यवाही वेगाने झाली पाहिजे. प्रकल्पबाधितांना न्याय मिळाला पाहिजे ही राज्य शासनाची भूमिका आहे. कोथेरी प्रकल्पाचे काम ऑक्टोबरमध्ये सुरू करावे. शिरगाव येथील प्रकल्पग्रस्तांना स्वेच्छा पुनर्वसन अनुदान मंजूर करण्याचे, निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी प्रशासनाला यावेळी दिले.


            महाड तालुक्यातील नागेश्वरी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा अहवाल शासनास प्राप्त झाला आहे. या अहवालास येत्या दोन महिन्यांत मान्यता देण्यात येईल. या प्रकल्पातील भूसंपादनाचा मोबदला तातडीने जमा करावा आणि धरणाचे काम सुरु करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.


            काळवली- धारवली योजना या प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडून तपासून शासनास सादर करावा. तसेच सांभरकुंड प्रकल्पाची वन जमीन मान्यता केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. त्याचा पाठपुरावा करावा. जमिनीच्या वाढीव सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी प्रशासनाला यावेळी दिले.


            सिंचन व जलविद्युत प्रकल्पांना लागणारी जमीन देण्यास तयार आहोत. पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावून धरणाचे काम सुरु करावे. पुनर्वसनाच्या क्षेत्रात सर्व सोयीसुविधा असाव्यात. प्रकल्पबाधितांना प्रधानमंत्री आवास योजना किंवा राज्य शासनाच्या घरकुल योजनेतून घरे मिळावीत अशा विविध मागण्या समितीने केल्या होत्या. यावर राज्य शासन कार्यवाही करेल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी प्रकल्पबाधितांना आश्वस्त केले.

भिक्षेकरी समाजबांधवांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासन प्रयत्नशील

 भिक्षेकरी समाजबांधवांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासन प्रयत्नशील.


- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा


अहमदनगरच्या भिक्षेकरी पुनर्वसन व स्वावलंबन वसुधा प्रकल्पाचे उद्घाटन.

            मुंबई, दि. 24 : वसुधा प्रकल्पाच्या माध्यमातून भिक्षेकरी पुनर्वसन व स्वावलंबनाच्या उद्देशाने वर्तुळाकार अर्थव्यवस्थेवर आधारित गोशाळा व इतर समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असून याचा पहिला प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा येथे सुरू होत आहे. यामुळे भिक्षेकरी समाजबांधवांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, यापुढेही असे प्रकल्प राज्यभर सुरू करण्याचा मानसही महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला. विधिमंडळ दालनात आयोजित ऑनलाईन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.


            राज्यशासनाच्या महिला व बाल विकास विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने वसुधा प्रकल्प अर्थात भिक्षेकरी पुनर्वसन व स्वावलंबनाच्या उद्देशाने वर्तुळाकार अर्थव्यवस्थेवर आधारित गोशाळा व इतर समाजपयोगी उपक्रमांचा ऑनलाईन उद्घाटन सोहळा पशुसंवर्धन मंत्री श्री.विखे-पाटील आणि महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते झाला


            महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या माध्यमातून या प्रकल्पाला गती मिळेल असा विश्वास मंत्री श्री. लोढा यांनी व्यक्त केला.


            श्री.लोढा म्हणाले, महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात घायपतवाडी येथे महिला व बाल विकास विभाग यांचे अखत्यारीतील भिक्षेकरीगृह उपक्रम सुरु आहे. आजमीतीला सर्वसाधारपणे ५० भिक्षेकरी येथे स्थित असून शासकीय अनुदानाद्वारे त्यांना अन्न व निवारा यासारख्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी मदत केली जात आहे. पर्यावरण संवर्धनपूरक उपक्रमांच्या अंमलबजावणीमधून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. विविध विभागाद्वारे सुरु असणाऱ्या शासकीय योजनांचा एकत्रित लाभ या समाजघटकांना देता येणार असून पुनर्वसनाचे अनोखे मॉडेल या प्रकल्प द्वारे उभे राहू शकेल, असेही मंत्री श्री.लोढा म्हणाले.


वसुधा पथदर्शी प्रकल्प राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल - राधाकृष्ण विखे-पाटील


                  वसुधा पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल असे सुतोवाच पालकमंत्री श्री. विखे-पाटील यांनी केले.


            देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने ‘सबका साथ सबका विकास’ यामाध्यमातून सर्वांगीण विकासाच्या दिशेने आम्ही एक एक पाऊल पुढे टाकत आहोत. भिक्षेकरी समाज बांधवांना सन्मानाने जगता यावे, कष्टाची भाकरी मिळून त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे, असे मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.


            यावेळी महिला व बाल विकास विभागाच्या सचिव आय. ए. कुंदन, आयुक्त आर. विमला, अहमदनगर जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, महिला आर्थिक विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदू जाखड, जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे आदी मान्यवर आणि श्रीगोंदा तालुक्यातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.


****

खपली गहू / Emmer Wheat

 🌱🌱 *खपली गहू / Emmer Wheat*🌱🌱


*खपली गहू हे भारतीयांना मिळालेले एक वरदान आहे*


*एक वैशिष्ट्यपूर्ण अशी गव्हाची जात.* सध्याच्या काळात बाजारात सहज उपलब्ध नसल्यामुळे ह्या उपयुक्त गव्हाचा वापर कमी झाला आणि विसर पडला आहे. 


*मानवी शरीरासाठी खुप उपयुक्त असा हा खपली गहू* ... ह्या गव्हाच्या इतिहासाचा मागोवा घेतला तर *खपली गव्हाची जात ही ५००० हजार वर्षांपूर्वी ची आहे असे आढळते.*


*निसर्गत:च खपलीमध्ये कणखरपणा आहे. खपली गहू मधुमेह, हृदयविकार, आतड्यांचा कॅन्सर, बद्धकोष्ठता इत्यादी आजारांत आहारासाठी योग्य आहे.* *धारवाड कृषी विद्यापीठात केलेल्या एका अभ्यासानुसार खपलीचा आहारात वापर केल्यामुळे मधुमेही रुग्णांच्या Total lipid,Triglycerides and LDL Cholesterol मध्ये लक्षणीय घट झाली.* म्हणजेच या आजारातील धोका बर्‍यापैकी कमी झाला. याशिवाय *परदेशात केलेल्या अशाच संशोधनात Type 2 मधुमेह व वयानुसार कमी होणार्‍या दृष्टिर्‍हासात खपलीचा आहारातील उपयोग चांगला दिसून आला. खेळाडूंच्या दैनंदिन आहारातील खपलीचा उपयोग क्षमता टिकवून धरण्यासाठी उपयोगी पडतो.*


काही भागाताल जुनी मंडळी अजुनही खपली गहू खातात. या लोकांना पुरणाची पोळीही खपली गव्हाचीच लागते. *सध्या शहरातील रहाणाऱ्या लोकांना ह्या गव्हा बद्दल फारशी ओळख पण नाही ये आणि दुर्दैवाने तो सहज उपलब्ध पण नाही.*


*आयुर्वेद*

*आयुर्वेदात गव्हाचे वर्णन बळ देणारा, विर्य वाढवणारा, बृहण करणारा म्हणजे पोषक तसेच स्थिरत्व देणारा असे केले आहे.* 


🌱 *या गव्हाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे पोळीला लालसरपणा असतो आणि ती अधिक चविष्ट लागते. आज मात्र खपली गव्हाचा वापर अतिशय कमी होत चालला आहे.*

🌱 *काही वर्षांनी कदाचित तो मिळायचाच बंद होण्याची भीती आहे.* 


*खपली गव्हा पासून पुरणपोळी,खीर व लापशी सारखे छान पदार्थ बनतात. काळाच्या ओघात तो लुप्त होऊ लागला आहे. आजकाल मधुमेहासाठी डॉ कटाक्षानं खपली गहू खा म्हणून सांगत आहे, हा *गहू प्राचीन भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा होता. गव्हाची ही जात साधारणपणे ५००० वर्षांपूर्वीपासून भारतात होती. असे म्हणतात. अनेक आयुर्वेदिक डॉक्टर हाच गहू वापरायला सांगतात कारण याने माणसाच्या स्वादुपिंडावर विपरीत परिणाम होत नाहीत* आणि *मधुमेह व इतर विकार होत नाहीत . मधुमेह असल्यास तो नियंत्रणात येतो.*


*सध्या हा गहू फारच कमी ठिकाणी मिळतो . Hybrid गव्हाची चपाती आणि खपली गव्हाची चपाती यात खूप फरक आहे.*


*खपली गव्हाची काही प्रमुख वैशिष्ट्ये*


*१) खपली गहू प्रामुख्याने पौष्टिक, वात-पित्तशामक, शक्ति वाढविणारा आहे.*

*२) खपली मधुमेह, हृदयविकार, आतड्यांचा कर्करोग,बद्धकोष्टता, हाडांची झीज भरून काढणारा, दातांच्या तक्रारी इत्यादी आजारांत आहारासाठी योग्य आहे.*

*३) खपली पचावयास हलका आहे. शेवया, कुरडया, बोटुकली, खीर, रवा, पास्ता इ. पदार्थ बनवले जातात.*

*४) या गव्हापासून बनविलेली चपाती/पोळ्या चवीला इतर गव्हाच्या जातीपेक्षा गोडसर असते.*

*५) या गव्हामध्ये १२ ते १५ टक्के प्रथिने, ७८ ते ८३ टक्के कर्बोदके आणि तंतूचे प्रमाण १६ टक्के आहे.*

 *७) ह्या गव्हात ग्लुटेन ची मात्रा अतिशय कमी, त्यामुळे मधुमेही रुग्णांना उपयुक्त आहे.*


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




_*

कलौंजि..आरोग्य संदेश

 💫💫 कलौंजि..


  हा एक असा मसाला आहे कि,, म्रुत्यु शिवाय,, सर्व आजार नामशेष करतो,. हिचा दैंनदिन जीवनात वापर म्हणजे ,, निरोगि,, सुद्रूढ,, आयुष्य.. प्रत्येक भाजित चव तर आणतोच, पण पोटात जाऊन औषधि काम करतो..

     ##* कलौंजि गरम पाण्यासोबत घेतल्यास, अस्थमा बरा होतो. सर्दि, दमा, खोकला, यावर गुणकारि केसांकरता फायदेशिर आहे


##* टक्कल पडत असेल तर, कलौंजि तेल आँलिव्ह तेलात मिसळून लावावे, आळा बसून केस जाण्याचे थांबते,, व नविन केस उगवतात, ,, मधूमेहाचि,, हि शत्रूच आहे,, रोज जेवणानंतर एक चमचा कलौंजि पावडर पाण्यासोबत घेतल्यास शर्करा नियंत्रित राहते,।


##*. कलौंजित, आयर्न, सोडिअम, कँलशिअम, पोटँशिअम, व फायबर विपुल प्रमाणांत असते, एमीनो अँसिड, व प्रोटिन देखिल भरपूर प्रमाणात आहे, तीव्र डोकेदुखिवर कलौंजीचे तेल मस्तकावर चोळल्यास आराम पडतो,. स्म्रूतिभ्रंश, अल्जायमर, होउ देत नाही,.


##* उच्च रक्तदाब, संतूलित राहतो, कोलेस्ट्रोलचे प्रमाण व्यवस्थित राहते,. कलौंजित ,,पोटँशिअम, चे प्रमाण जास्त असल्याने , डायबेटिस, नियंत्रणात राहतो, एक ग्लास द्राक्षांच्या रसात कलौंजि तेल मिसळून घेतल्यास

,, कँसर,, सारखी व्याधि वर विजय मिळवता येतो..



##* दिवसांतून किमान २,३., ग्रँम, कलौंजिचे सेवन करावे,. वजन कमी होते,. टाचांना भेगा आल्यास कलौंजिचे तेल लिंबाच्या रसात मिसळून लावावे, भेगा भरून येतात,. रोग प्रतिकार शक्ती वाढते,. बद्धकोष्ठ, बवासिर, आतड्यांचि दुर्बलता दूर करते..


##* कलौंजि गुणधर्माने उष्ण, तिक्त, आहे,. तेव्हा वात, कफ विकारांवर, फायदेशिर आहे,. विशेषतः हिवाळ्यात याचे सेवन दूधातून तेल टाकून केल्यास रक्ताभिसरण चांगले होते, चरबिची गाठ वितळते,

    कच्चि पपयी,५ ग्रँम, गूळ५ ग्रँम, व ४ थेंब कलौंजि तेल मिसळून घेतल्यास मूत्रखडा विरघळून बाहेर पडतो,.


##* कर्णदूखिवर कलौंजीचे तेलाचे थेंब कानात टाकल्यास कानाचे दूखणे बरे होते,, , बाळाला दूध पाजणार्या स्रियांनि एक कप दूधात २ थेंब कलौंजि तेल टाकुन घेतल्यास बाळाला भरपुर दूध मिळते,.

  डोक्यांत होणार्या कोंड्यावर ३०० ग्रँम कलौंजि तेल, ३०० ग्रँम, आँलिव्ह आँईल, व ३० ग्रँम मेंदि पावडर घेउन ते शिजवून मग गाळून डोक्याला लावावे.,


##*कलौंजिचे वरिल उत्तम फायदे बघता, रोजच्या आहारात याला स्थान द्यावेच..##*##*##


..... आयुर्वेद अभ्यासक... सुनिता सहस्रबुद्धे....


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




_

फू बाई फू

 



माझे जीवन गाणे

 







सूचना

 लक्ष द्या TRAI मोबाइल टॉवर लावण्यासाठी NOC प्रस्तावित करीत नाही.जर कुणी धोक्याने आपणास या प्रकारे पत्रासह संपर्क करीत असेल तर हा विषय संबंधित मोबाइल सेवा प्रदात्याला सूचित केला जाऊ शकतो

Featured post

Lakshvedhi