Friday, 17 February 2023

सुन्दर गुंफण पतिपत्नी ची

 👌 खूप छान कथा..👌

पती व पत्नी कायद्याने दोघे वेगळे 

झाल्यावर त्याने राहतं घर विकायला काढलं.


ब्रोकरच्या थ्रू तिच्या वडिलानीच ते घर 

विकत घेतलं......


पून्हा घराची 

एक किल्ली त्याच्या हातात देत म्हणाले... 


'मी माझ्या लेकीला ओळखतो .....


तसा तुलाही.. ...


सगळ्या गोष्टी भावनेच्या भरात करतोस... 


अगदी माझ्या लेकीशी लग्न सुद्धा......


पून्हा भावनेच्या भरात 

एकत्र यावसं वाटलं तर?


तसं व्हायला नको...


म्हणून 

ही रिकामी वास्तू तुझ्या हवाली करतो......


कधी वाटलं तर येऊन बसत जा.....


"भरल्या घरा पेक्षा 

रिकामं घर जास्त बोलतं आपल्याशी......"


भावनेपेक्षा विचार 

जास्त ठाम असतात......


विचारांवर ठाम झालास 

तर ......

घेतल्या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही.. ...


निर्णय ठाम झाला की 

माझी किल्ली मला परत दे. .....


नाहीतर येऊन 

माझी मुलगी परत घेऊन जा......'


आणि खरच तो ढळत्या दुपारी 

रिकाम्या घरात बसायला लागला......


कलंडणारी ऊन्ह आपल्या घरात 


अशी ऐसपैस पसरतात 

त्याला माहीतच नव्हतं... ...


मावळतीचा वारा 

अख्ख्या घराचा ताबा घेतो .. ..


याची त्याला कल्पनाच नव्हती...


एक चूकून राहिलेलं 'कालनिर्णय' होतं 

भिंतीवर हवेमुळेफडफडत होतं ....


त्या फडफडण्याचा 

आवाज सुद्धा त्याला नवा होता... ...


त्याने जवळ जाऊन 

बघितलं ......कसल्या कसल्या नोंदी 

त्यावर तिने करून ठेवल्या होत्या...


कसली बीलं देण्याची तारीख, 

दूधाचा हिशोब, कामवालीचे खाडे,

पेस्ट कंट्रोलची तारीख...


सिलेंडर संपल्याची तारीख, 

ग्राहकचं सामान येण्याची तारीख...


इस्त्रीचे कपडे त्याचा हिशोब 

या कशातच तो सहभागी नव्हता... ..


अगदी तिच्या 

महिन्याच्या तारखा... 


तारीख पुढे गेलीतर....


त्याला गलबलूनच आलं ....


या कशा कशातच

आपण सहभागी नव्हतो.. ...


ती एकटीचा डाव 

खेळत राहीली आणि आपण फक्त.......


तक्रार करत राहिलो.....


त्याला त्या 'कालनिर्णय' 

समोर उभं राहणं शक्य होईना. .....


तो बेडरूम मधे आला 

त्याने खिडकी उघडली .....


खिडकीत तिने 

हौसेनं लावलेली शेवंती होती ......


वाळून वाळून 

झूरायला आलेली ....


तिला भिजवयला 

तो आतूर झाला,......


कातर झाला...


पाणी घालायला 

भांड नव्हतं .......


त्याने कूंडीच 

सींक मधे नेली यथेच्छ पाणी शिंपडलं.....


तहानलेली शेवंती 


गटा गटा पाणी प्यायली.. ....

आणि तोच तृप्त झाला......


तेवढ्यात लँच कीने 

दार उघडल्याचा आवाज आला .......


ती आली होती......


 शेवंतीसारखीच... .....


तिला समोर बघून 

तो उनमळून गेला... ...


काय अवस्था 

करून घेतली आहे हिने... ....


हिच्या आयुष्यातलं आपलं स्थान 

आपल्या लक्षात कसं आलं नाही?... ....


की आपण लक्षात घेतलं नाही?

जिद्दीला पेटून भांडते तेंव्हा 

ती कुठल्याही टोकाला पोहोचते 

हे काय आपल्याला लग्नाआधी माहीत नव्हतं?.....


दोघांची नजरा नजर झाली... 


दोघे क्षणभरासाठी स्तब्ध.....


ती म्हणाली, 


"मी ही शेवंतीच न्यायला आले होते... "


तो गलबलून म्हणाला, 


"आत्ताच पाणी दिलय... ...


तिचं निथळणं संपेपर्यंत थांब ना......"


आणि ती थांबली......


..अगदी... कायमची...!!!


पाहताक्षणी एखादी 

व्यक्ति आवडणं हे 'आकर्षण'असतं.....


परत पहावसं वाटणं हा 'मोह'असतो....


त्या व्यक्तिच्या जवळून जाण्याची 

इच्छा असणं ही'ओढ'असते.....


त्या व्यक्तिला 

जवळून जाणणं हा 'अनुभव' असतो.....


आणि त्या व्यक्तिला 

तिच्या गुणदोषांसह स्विकारणं .......


हेच खरं "प्रेम" असतं.....


हेच खरं "प्रेम" असतं.....


नात्याची सुंदरता 

एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.....


कारण एकही दोष नसलेल्या 

माणसाचा शोध घेत बसलात.......


तर आयुष्यभर एकटे राहाल......


विश्वास उडाला की आशा संपते......


आणि काळजी घेण सोडल की प्रेम......


म्हणुन, विश्वास ठेवा,....


आणि काळजी घ्या.....

आपल्या जीवनसाथी ची.... व आपल्या कुटुंबाची .....

आयुष्य खुप सुन्दर आहे..... 

💐👍💐👍💐 👌👌👌👌

लेखकाचे नाव माहिती नाही.

काय ते सोनेरी दिवस होते

 शाळेत असताना टीचर कडून हातावर छडी पडल्यावर मी नेहमी माझ्या हाफ पँट वर हात पुसून दुसरा हात पुढे करत असे....कारण मी साफसफाईच्या बाबतीत खूप जागरूक होतो 😎


माझे सगळे टीचर मला क्लासमध्ये उभा रहायला सांगून शिकवत असत...कारण माहितीये? ....ते सगळे माझी खूप इज्जत करत असत.😎


माझ्या शालेय दिवसांमध्ये, माझे शिक्षक बर्‍याचदा माझ्या आई पप्पा ना घेऊन यायला सांगत असत , कारण ते काहीही direct सांगायला मला घाबरत असत...🤣🤣🤣


मी जे काही लिहायचो ते वाचायला माझ्या शिक्षकांना खूप आवडत असे, माझ हस्ताक्षर त्यांना खूप आवडत असे त्याच कारणास्तव ते बराचवेळी मला एकच उत्तर 10 वेळा लिहून आणायला सांगत असत...😅


कितीतरी वेळेस शिक्षक मला न विचारता त्यांचा किमती chalk माझ्या दिशेने कॅच पकडण्यासाठी फेकत असत...ही गोष्ट वेगळी की ती कॅच सुटून मलाच chalk लागत असे. 

उद्देश एकच होता की मी चांगला fielder बनावा हीच काय ती अपेक्षा होती त्यांची माझ्याकडून 😦


परीक्षेच्या वेळी बहुतेक वेळा मला 3-4 शिक्षक z टाइप सुरक्षा देण्यासाठी माझ्या बेंच च्या आजुबाजूला पूर्ण exam संपेपर्यंत उभे राहत असत.😮‍💨🤣


कितीतरी वेळा मला बेंच वर उभं करून मला सन्मानित करण्यात येत असे,  


कारण मी बाकी मुलांना व्यवस्थित दिसून त्यांनी माझ्याकडून प्रेरणा घेण्यात यावी आणि मला वर्गातल्या सर्व मुली व्यवस्थित दिसायला हव्यात हा मुख्य उद्देश असायचा शिक्षकांचा.🤣


शिक्षकांना माझ्या आरोग्याची विशेष काळजी होती 

माझ्या शरीराला vitamin D आणि मोकळी हवा मिळवी ह्यासाठी मला बर्‍याच वेळा सकाळच्या कोवळ्या उन्हात मैदानाला 10 फेर्‍या मारायला सांगितल्या जात असत.

जेंव्हा की बाकी मुलं वर्गात घाम गाळत , गुदमरून शिकत असत.🤣


मी इतर मुलांपेक्षा हुशार असल्याने माझे बहुतेक सगळे शिक्षक मला नेहमी म्हणत असत.... 

तू शाळेत का येतोस...तुला ह्याची गरज नाहिये...🤣


वाह !!! काय ते सोनेरी दिवस होते 😮‍💨

घरे बिघडवणाऱ्या आजच्या TV. मालिकांपासून सावध राहा

 *घरे बिघडवणाऱ्या आजच्या TV. मालिकांपासून सावध राहा*

*पंडित कांबळे*

_________________

आपण कोणते कार्यक्रम पाहतो. ते कार्यक्रम घरातील सर्वानी एकत्र पाहण्यासारखे आहेत का ? त्या सर्व मालिकामध्ये काय दाखवले जात आहे. याचा जर विचार केला तर


1) अनैतिक संबंध

2) घटस्फोट

3) सासू आणि सुनेची भांडणे

4) घरातील इतर व्यक्ती नको फक्त पाहिजे नवरा बायको

5) एकमेकींच्या चुगल्या करणे

6) बायकोला सासू सासरे नको पण तिचे आई वडील पाहिजे.

आणि हे तुमच्या बरोबर झाले पाहिजे का ?

तुमच्या घरात असेच घडले पाहिजे का?


तुमच्या बायकोने/ नवऱ्याने, तुमच्या सासू सास-याने असे वागले पाहिजे का ?


म्हणतात ना आपण जे पाहतो, आपण जे ऐकतो, ते कोठे ना कोठे, कोणत्यातरी माध्यमातून आपल्या जीवनात घडत असते.


 आपल्या या जीवनात आपल्यावर नकळत पणे हे "स्टोरी रायटर" आपल्यावर करत असलेल्या हा अन्याय अत्याचार हे आपल्या लक्षातच नाही येणार.


आणि त्यांना हेच उलटे कार्य का सुचते?


 भारतातील कुटुंब व्यवस्था उध्वस्त करून संस्कृती संकटात टाकणे हा एक छुपा विकृत अजेंडा आहे या.

  आपल्या महापुरुषांच्या विचारांच्या 

आदानप्रदाना ऐवजी या असल्या विकृत सिरीयल्स दाखविल्या जातात.


काही अपवादात्मक मालिका सोडून.


त्यामुळे आपण या पुढे अशा प्रकारच्या सिरीयल पाहू नये आणि आपला वेळ व्यर्थ वाया घालवू नये ही अपेक्षा.


 सिरीयल मध्ये काय दाखवतात असे तर प्रेम ,घटस्फोट,अनैतिक सबंध, सवती मत्सर, भाऊबंदकी, कटकारस्थाने, विश्वासघात, स्टंटगिरी, काही सिरियल मधे तर मुलं सुना आल्या तरी बापाचे अनैतिक संबंध असलेली त्याच घरात येउन राजरोस राहते. मुलं त्यांचे आजी आजोबा हे सर्व एकत्रपणे राहून सहन करत असतात 

अन आपण सुग्रास अन्न खात खात हे असले अविचारी कथानक पहात असतो.

 हे असेच दाखवले जाते आणि संध्याकाळी 6 ते 7 ला चालू होतो टीव्ही, तो रात्री 11 ते 12 पर्यत तेच चालू असते. ज्यांना कोणाला या वेळेत शक्य नसेल त्यांचे करीता दुपारी परत प्रक्षेपण आहेच.


लहान मुलांसमोर काय पाहिले पाहिजे याचे भान ही आपल्याला नसते. 


या सिरीयल पाहण्यात आपण इतका वेळ घालवतो .


आपण विनाकारण आपले स्वतःच्या समस्या या रडक्या तोंडाच्या सिरियल घरात सकाळ संध्याकाळ च्या वेळी पाहुन स्वतः चे ब्रेन वॉश का करून घेतोय?


स्वतःच्या विचारात काहीही अनावश्यक घाणेरडे निगेटिव्ह गोष्टी का भरून ठेवतोय?


या सर्व विकृत गोष्टी पाहून व वेळ वाया घालवून काय सिध्द करणार आहोत?


 काय मिळवणार आहोत?


 आणि नाहीच या गोष्टी बघितल्या तर काय आभाळ कोसळणार आहे का ?


उलट आपला वेळ इलेक्ट्रिसिटी, पैसे, चारित्र, ऊर्जा, उत्साह आणि आत्मबल सकारात्मकता इत्यादी वाचेल.....!


आणि वर्षानुवर्ष हे बघत बसण्यापेक्षा त्या ऐवजी योगा-प्राणायाम-ध्यान इत्यादी सलग एकाच ठराविक वेळी नित्य नेमाने केल तर नक्कीच फायदाच होईल.


कधी आपण सहकुटुंब बसुन आपल्या महापुरुषांचे आत्मचरित्र वाचतो का ?


कधी आपण महापुरुषांनी केलेल्या कार्यावर सहकुटुंब चर्चा करत असतो का ?


याचे उत्तर आपण आपलेच शोधले पाहिजे.


अजुन ही वेळ गेली नाही.

नाहीतर हे अश्या विकृत सिरीयलच्या माध्यमातून आपल्याला असे गुंतवून ठेवतील.

 वेळीच सावध व्हा.


आणि असल्या विकृत सिरियल पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःच्या मुलांकडे, घरांकडे, उदयोगधंद्याकडे लक्ष द्या.


आपल्या कामात गुणवत्ता आणि दर्जेदारपणा निर्माण करा.


ते कलाकार व त्यांची टीम त्यांचे करिअर बनवतात. प्रचंड पैसा कमावतात , रिसाॅर्ट मधे जाउन खर्चीक शुटींग करु शकतात कारण त्यांना त्यांच करिअर करायचंय.


जाहीरातदारांना त्यांचं प्राॅडक्ट विकायचय, अनेक सिरियल मध्ये तर प्रायोजकत्व घेणारे कंपनीच्या चाॅईसचे पात्र निवडलेले असतात.


आणि आपण आपला अमूल्य वेळ गमवितो हे सर्व पाहत असतो हे लक्षात घ्या!.


  त्यांचा मुख्य प्रेक्षक महिलावर्ग आहे .अनेक कुटुंबातील माहिला या मालिकांच्या इतक्या आहारी गेल्यात की सिरियल बघताना नातेवाईकांचा फोन आला तर त्यांना अडथळा वाटतो .


 अनेक मालिकांतील दृश्य आणि डायलॉग्स तरुण मुला -मुली समक्ष बघताना संकोच वाटतो.


   वर उल्लेख केलेल्या मालिकांतून लहान, शाळकरी बालकांवर , महाविद्यालयीन युवक - युवतीवर कोणते संस्कार करावेत असा प्रश्न नाही का तुम्हाला पडत ?

    मालिकानिर्माते विवेकी, चिकित्सक, राष्ट्रप्रेमी, समाजशील, संशोधक, नैतिकताधिष्ठित, समता, ज्ञानाधिष्ठित असा नवसमाज निर्माण करणाऱ्या मालिका बनवतंच नाहीत.


 ज्या राष्ट्रसंतांनी व राष्ट्रपुरुषांनी मानवतावादी समाजनिर्माणाचे, राष्ट्रउभारणीचे कार्य केले त्यांच्या कार्यावर हे कमाईदार T.V. वाले मालिका बनवतंच नाहीत . 

    अपवादाने बनविल्याच तर त्यामध्ये मसाला भरून अनेक काल्पनिक गोष्टी घुसडतात . आणि अशा मालिका थोडयाफार प्रमाणात बनविल्या तरी त्यांना प्रेक्षकवर्ग मिळत नसल्यामुळे अनेक मालिका मध्येच बंद पडल्या कारण प्रेक्षक वर्गाला मसालेदार, चटपटीत आणि अदभूत चमत्कार दाखवणाऱ्या मालिकांच्या अधीन केले गेले आहे . 

  बघा , हे आपल्याला पटतंय का ? 


   हे चिकित्सात्मक / विश्लेषण ,विचार योग्य वाटत असतील तर कुटुंबात यावर चर्चा करा आणि विविध मार्गाने समाजात Share करा आणि अयोग्य वाटत असतील तर खुशाल टीका / निंदा करा . 

मी क्रिएटिव मिडियाचा द्वेष्टा नक्कीच नाही, परंतू मनोरंजनाच्या नावावर आपल्या संस्कृतीचा आणि संस्कारांचा गळा घोटणं मला मान्य नाही

जिंदगी इमतीहान लेती है




डे


जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही





 

जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

 जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


जिल्ह्यातील 270 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण


          जळगाव, दि. 16 (जिमाका वृत्तसेवा) : - जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोकर, ता. जळगाव येथील कार्यक्रमात सांगितले.


          जळगाव जिल्ह्यातील निम्न तापी प्रकल्पातील भोकर येथे तापी नदीवरील 150 कोटी रुपयांच्या उंच पुलाचे भूमिपूजन कोनशिला अनावरण करुन व जिल्ह्यातील 270 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार सर्वश्री. संजय सावकारे, किशोर पाटील, सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, चंद्रकांत पाटील, लता सोनवणे, माजी आमदार स्म‍िता वाघ, चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.


          मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले की, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी- कष्टकरी यांना केंद्रबिंदू मानून राज्य शासन काम करीत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्या काही योजना, प्रकल्प आवश्यक आहेत. त्यांना तत्काळ मंजुरी देण्यात येत आहे. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर खेत पाणी, हर घर जल या योजनांवर राज्य शासन प्रामुख्याने लक्ष देत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता राज्य शासनाने राज्यातील 22 जलसिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून यामुळे राज्यातील 5 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल उपसा सिंचन योजनेला 100 कोटी व निम्न तापी प्रकल्पाला 100 कोटींची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर निम्न तापी प्रकल्पाचा तापी नदीवरील या पुलामुळे 70 किमी वळसा वाचणार आहेत. त्यामुळे हा पूल सर्वांसाठी वरदान ठरणारा आहे. हर घर नल, जलजीवन मिशन अंतर्गत राज्यात 38 हजार गावात कामे सुरु आहेत. जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळावी याकरिता अमरावतीच्या धर्तीवर जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यासाठी एमआयडीसीचे विभागीय कार्यालय जळगाव येथे सुरु करण्यासाठी बैठक घेण्यात येईल. तसेच मुक्ताईनगर, धरणगाव, चोपडा, पाचोरा, एरंडोल येथे एमआयडीसी सुरु करण्यात येईल. जळगाव जिल्ह्यात वारकरी भवन व लोककला भवन उभारण्यासाठी सकारात्मक विचार करु शिवाय जिल्ह्यातील वाहतुकीसाठी 100 बसेस, पाळधी येथे बालकवी ठोंबरे स्मारक, बहिणाबाई चौधरी स्मारक, धरणगाव येथे उपजिल्हा रुग्णालय व नशीराबाद येथे ग्रामीण रुग्णालय मंजुरीबाबत आणि केळीचा पोषण आहारात समावेश करण्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.


          यावेळी बोलतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यांसह दोन राज्यांना जोडणाऱ्या या पुलाचे स्वप्न आज पूर्ण होत आहे याचा विशेष आनंद आहे. जलजीवन मिशन अतंर्गत राज्यातील 38 हजार गावांमध्ये कामे सुरु असून या कामांच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यात येत आहे. केळीचा पोषण आहारात समावेश करावा. केळी प्रक्रिया उद्योग सुरु करावा. टोकरेकोळी समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे, कापसाला हमी भाव देण्याची मागणीही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली.


          ग्रामविकास मंत्री श्री. महाजन म्हणाले की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामे सुरु आहेत. जळगावात मेडिकल हबचे काम सुरु होत आहे. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


          कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी पाडळसे प्रकल्पाचा बळीराजा योजनेत समावेश करुन काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली.


या कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण


* भोकर, ता. जि. जळगाव येथे तापी नदीवरील उंच पुल व जोड रस्त्याचे भूमिपूजन (रु. 150 कोटी)


* शिवाजी नगर येथील कि.मी. 420/9/11 वरील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण- रु. 25 कोटी.


* मोहाडी (जळगाव) येथे 100 खाटांचे स्त्री रुग्णालयांचे बांधकाम करणे- रु.75 कोटी 31 लाख.


* म्हसावद येथील रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजन रु. 35 कोटी.


* जळगाव म.न.पा. हद्दीतील व वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन - रु. 42 कोटी.


* बांभोरी येथील गिरणा नदीवरील मोठया पुलाचे बांधकाम-रु. 40 कोटी.


* धरणगाव तालुक्यात विविध ठिकाणी रस्ते डांबरीकरण व पुलाचे बांधकाम-रु. 57 कोटी.


* जळगाव व धरणगांव तालुक्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र विकास कामे- रु. 25 कोटी.


* जळगाव येथे धर्मादाय आयुक्त कार्यालय इमारत बांधकाम-रु. 4 कोटी.


* धरणगाव येथे पशुसंवर्धन दवाखाना इमारत बांधकाम-रु. 4 कोटी.


00000



 

राज्यपालांना निरोप

 मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांना निरोप

            मुंबई, दि. 17 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे निरोप भेट घेतली. यावेळी उभयतांनी राज्यपालांना पुढील वाटचालीसाठी व आरोग्यदायी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


००००

CM and Dy CM call on outgoing Governor

            Mumabi, 17th Feb : Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis called on the outgoing Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai. They felicitated the Governor and wished him a long and healthy life.


0000



इस्रो प्रदर्शन


 

Featured post

Lakshvedhi