Friday, 10 February 2023

जिवन गाणे

 🚩🚩🚩❤️🚩🚩🚩

✍️ शुभ दिवस 

*”कौन हिसाब रखे किसको कितना दिया,* *और किसने कितना बचाया,* *इसलिए ईश्वर ने आसान गणित लगाया~* *सबको खाली हाथ भेज दिया,* *खाली हाथ ही बुलाया..!!!”*

देवानदिलंय त्यातलं

                 थोडसं

   इतरांना देऊन पहावं

 देव होता नाही आलं तरी

    थोडस माणूस होऊन

  माणसासाठी जगावं !

*आपण गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने जगण्यासाठी जन्माला आलो आहे, म्हणून आपलं आयुष्य मनोसोक्त जगा*

कुणीतरी येणार येणार ग

 😀आदरणीय गडकरी जी,

महामार्गावर काय होतंय माहीत आहे का, 

*"घरी कुणीतरी वाट पाहत आहे"* 

असा फलक लावल्यामुळे लोक उत्सुकतेपोटी 

गाड्या भरधाव चालवतात आणि अपघात 

होतात आणि शिवाय घरी कोणीच आलेलं नसतं.


त्यापेक्षा *"घरी बायको वाट पहात आहे"* 

असा फलक लावा, नाही लोकांनी वेग 

निम्मा केला तर बघा. 

रमत गमत उद्या परवा पोहोचतील .

🤣😂🤣😂

खट्याळ म्हार्तराची खट्ट काव्य

 


तुझ्या प्रित्तीत झाली खुली

 


Boss (to employee): How much is your salary?

 Boss (to employee): How much is your salary?


Employee: Rs. 7,00,000 p.a.


Boss: You are not working properly. I am going to increase your salary by one rupee and make it Rs. 7,00,001/-…


Now pay tax of 35,000..!


Employee: Sir, please don’t increase my salary…. don’t punish me sir..!!


#NewITSlabs 


🤣😁😜😬

Thursday, 9 February 2023

बृहन्मुंबई शहरात 19 फेब्रुवारीपर्यंतजमावबंदी आदेश लागू

 बृहन्मुंबई शहरात 19 फेब्रुवारीपर्यंतजमावबंदी आदेश लागू


            मुंबई, दि. 9 : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उप आयुक्त (अभियान) यांनी संपूर्ण बृहन्मुंबई शहरात 19 फेब्रुवारी 2023 पर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे.


           या आदेशानुसार पाच किंवा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संमेलन, मिरवणूक, कोणत्याही मिरवणूकीत लाऊडस्पीकर, वाद्ये, बँड आणि फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे.


            सर्व प्रकारचे विवाह समारंभ इ., अंत्यसंस्कार सभा आणि स्मशानभूमी/ दफन स्थळांच्या मार्गावर मिरवणूक, कंपन्या, क्लब, सहकारी संस्था, इतर संस्था आणि संघटनांच्या कायदेशीर बैठका, सामाजिक मेळावे, क्लब, सहकारी संस्था, इतर सोसायट्या आणि संघटना यांचे सामान्य व्यवहार करण्याच्या बैठकांना या बंदीतून वगळण्यात आले आहे.


             चित्रपटगृहे, नाटकगृहे किंवा सार्वजनिक करमणुकीच्या कोणत्याही ठिकाणी किंवा त्याभोवती चित्रपट, नाटक किंवा कार्यक्रम पाहण्याच्या उद्देशाने भरविलेले संमेलन, सरकारी किंवा निमशासकीय कार्ये पार पाडण्यासाठी सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची कायदे न्यायालये आणि कार्यालयांमध्ये किंवा त्याभोवती लोकांचे संमेलन, शैक्षणिक उपक्रमांसाठी शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये किंवा त्यांच्या आसपासची संमेलने, कारखाने, दुकाने आणि आस्थापनामध्ये सामान्य व्यापार, व्यवसाय आणि आवाहनासाठी संमेलने, अशी इतर संमेलने आणि मिरवणुकी, ज्यांना विभागीय पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई आणि त्यांचे पर्यवेक्षक अधिकारी यांनी परवानगी दिली आहे, अशा बाबींना या जमावबंदीतून सूट देण्यात आली आहे, असे आदेश बृहन्मुंबई पोलीस उप आयुक्त (अभियान) विशाल ठाकूर यांनी काढले आहे.

000

कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण.

 कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण.


मुंबई आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका.

            ठाणे, दि. ९ : मुंबई-ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर प्रवाशांची वाहतूक कोंडीपासून सुटका करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्यावतीने उभारण्यात आलेल्या ठाणे शहरातील कोपरी येथील रेल्वे ओलंडणी पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या पुलाच्या रुंदीकरणामुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील सीमेवरील वाहतूक कोंडी दूर होऊन ती सुरळीत होणार आहे.


            यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक, संजय केळकर, माजी आमदार रविंद्र फाटक, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवासन, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस आयुक्त जय जित सिंह आदी यावेळी उपस्थित होते.


            या पुलाचे रुंदीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे. कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाच्या कामाचा संपूर्ण खर्च एमएमआरडीएमार्फत करण्यात आला आहे. पुलाच्या रेल्वे मार्गिकांवरील भागाचे काम मध्य रेल्वे मार्फत करण्यात आले असून या भागाच्या बांधकामासाठी प्राधिकरणकडून रेल्वेला निधी देण्यात आला आहे. या पुलाची लांबी ७८४ मीटर तर रुंदी ३७.०४ मीटर इतकी आहे.


            पूर्व द्रुतगती महामार्गावर हा पूल ५+५ मार्गिकांचा आहे तर ठाणे शहरातील कोपरी रेल्वे ओलांडणी पूल हा २+२ मार्गिकांचा होता. या अरुंद रेल्वे ओलांडणी पुलामुळे सकाळी व संध्याकाळच्या वेळेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. या वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याच्या उद्देशाने प्राधिकरणामार्फत कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचे रुंदीकरण व बांधकाम करण्यात आले आहे. २+२ पथमर्गिकेच्या पुलाचे ४+४ असे अपग्रेड केल्यामुळे मुंबई-ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील वाहतूक कोंडी कमी होऊन त्याचा फायदा पूर्व द्रुतगती महामार्गावरील लहान तसेच अवजड वाहनांना होणार आहे.


            या प्रकल्पात नौपाडा जंक्शन ते ज्ञानसाधना कॉलेजपर्यंत महामार्गाखालून वाहानांच्या रहदारीसाठी २+२ मार्गिकांचा ४० मीटर लांब आणि २१.२ मीटर रुंद भुयारी मार्ग देखील बांधण्यात आला आहे. प्रस्तावित नवीन कोपरी स्टेशनला जाणाऱ्या वाहनांसाठी भुयारीमार्ग, पादचाऱ्यांना पूर्व द्रुतगती महामार्ग ओलांडण्यासाठी पादचारी पूल देखील बांधण्यात आला आहे. तसेच चिखलवाडी परिसरातील पावसाळी पाण्याचा निचरा होण्याकरीता, चिखलवाडी नाल्यापासून साठेवाडी नाल्यापर्यंत पर्जन्य जल वहिनीची (स्ट्रॉम वॉटर ड्रेनची) सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या बंदिस्त नाल्याचे सुधारीकारण देखील करण्यात आले आहे.


            श्री. श्रीनिवासन म्हणाले की, कोपरी पूल हा मुंबई आणि ठाणे या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. जुना पूल हा अरुंद असल्यामुळे अधिक गर्दीच्यावेळी (पीक अवर्स) मध्ये वाहनचालकांना काही मीटरचा प्रवास करण्यासाठी ३०ते ४० मिनिटे लागत. पूर्व द्रुतगती महामार्गावरील दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी होत होती. नवीन रुंद पुलामुळे प्रवाशांचा हा वेळ वाचणार आहे. त्यासोबतच तीन हात नाका परिसरातील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.


०००००

Featured post

Lakshvedhi