सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 29 January 2023
Saturday, 28 January 2023
सूर्यनमस्कार – एक परिपूर्ण व्यायाम आणि बरंच काही…!*
*जाणून घ्या!*
👇👇👇👇👇👇👇👇👇
*सूर्यनमस्कार – एक परिपूर्ण व्यायाम आणि बरंच काही…!*
दररोज सूर्यनमस्कार करण्याचे शास्त्रीय महत्व, फायदे, मंत्र इत्यादी
https://www.marathidevdoot.com/sun-salutation-a-complete-exercise-and-many-more/
👆👆👆👆👆👆👆👆👆
*सूचना :*
वरील ब्लॉग पोस्ट लिंक हायलाईट होत नसल्यास,
हा मेसेज याच नंबरवर किंवा इतर कोणत्याही नंबर/ग्रुप वर पाठविल्यास त्या मेसेजमध्ये लिंक हायलाईट होईल. तिथूनच ही लिंक आपण ओपन करू शकता.
*धन्यवाद!*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अर्थव्यवस्था आणि स्टॉकमार्केट अभ्यासक यांची पोस्ट
अजय रायगडकर
अर्थव्यवस्था आणि स्टॉकमार्केट अभ्यासक यांची पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अडानीचा Game तसा सोपा आहे..
फक्त ६ टप्प्यात सांगायचा प्रयत्न करतो..👇
Step १ - आपल्या कंपनीचा IPO करायचा.
IPO केला म्हणजे आपल्या कंपनीचे किमान २५% शेअर्स मार्केटमध्ये देवाणघेवाण होते..आणि ती देवाणघेवाण किती किमतीला होते त्यावर पूर्ण कंपनीची किंमत ठरते.
Step २ - IPO त शेअर विकून आलेले पैसे मॉरिशस किंवा केमन आयलंड सारख्या कमी/ शून्य व्याजदर असलेल्या देशातल्या आपल्या किंवा आपल्याच कोणाच्या कंपनीच्या अकाउंटवर घ्यायचे.
म्हणजे सरकारला कराचा एक नवा पैसा द्यायला नको..😐
>>एकाच दिवशी तयार केलेल्या अडानीच्या ?खोट्या कंपन्या (चित्र क्र 1)
Step ३ - हा करमुक्त पैसा २ पद्धतीने वापरायचा..
१) त्याच देशात नवनवीन कंपन्या तयार करायच्या आणि त्यात हा पैसा वळवायचा आणि त्याने भारतातल्या आपल्याच कंपन्यांचे IPO केलेले शेअर्स विकत घ्यायचे..पण इतके शेअर एकच कंपनी घेत असेल तर शंका येऊ शकते म्हणून-
>> पैसा कसा वळवला असू शकतो👇
२) रा मार्ग वापरायचा - ह्यातील काही पैसा त्या देशातील म्युच्युअल फंड कंपन्यांना द्यायचा..आणि त्यांना फक्त अडानीच्या कंपन्यात गुंतवणूक करायला सांगायची..!
>>Normally म्युचुअल फंड किमान २०-३० कंपन्यांत गुंतवणूक करतात..पण ह्या ५ फंड 👇 नी फक्त अडानीच्या कंपनीचेच शेअर्स विकत घेतलेत.
Step ४ - ह्या टप्प्यापर्यंत खूप शेअर्स ह्या ?खोट्या कंपन्यांनी विकत घेतल्याने, अडानीच्या शेअर्सची कृत्रिम टंचाई निर्माण होते आणि मग शेअर्सची किमंत आपोआप वाढायला लागते.त्या वाढत्या किमतीचा ट्रेंड तयार होतो..आणि एकदा का तो झाला की आणि मग ट्रेडर्स पण ह्या वाहत्या गंगेत उडी घेतात..!
कोणत्याही ट्रेडरचा फंडा असतो की जोपर्यंत शेअर्सची किंमत एका विशिष्ट प्रमाणात खाली येत नाही तोपर्यंत ते काही शेअर्स विकत नाही..म्हणून मग ह्या टप्प्यात अडाणीचे काम फक्त हे असते की शेअर्सची किंमत त्या विशिष्ट किमती (support खाली) खाली येऊ द्यायची नाही..आणि एकदा का असे झाले की -
शेअर्सची किंमत वाढत जाते..वाढतच जाते..अशाने मग LIC व भारतीय म्युचुअल फंड सारख्या मोठ्याना पण ह्या गर्दीत उडी मारावीच लागते..त्यांच्याकडे अमाप पैसा असतो..ते असेल त्या किमतीला शेअर विकत घेतच राहतात..आणि मग होतो स्फोट..शेअर्सच्या किमतीचा..न् अदनीचे शेअर्स वर्षात १०-२०+पट वाढतात !
Step ५ - ह्या टप्प्यात अडानी शेअरच्या किंमतीला काहीचच करत नाही..कारण आतापर्यंत ट्रेण्ड तयार झालेला असतो..शेअरची किंमत चॅनलमधे वाढत जात असते..अशा वेळी अदानी मग ह्या ?फुगवलेल्या शेअरची किमंत दाखवतो आणि ते शेअर तारण (Pledging) ठेऊन कर्ज घ्यायला सुरुवात करतो..लाखो कोटीची कर्ज..
ह्या कर्जाच्या पैशातून तो खरेदी करत सुटतो..सरकार..सॉरी..सरकारी कंपन्या..जमीन..बंदरे..विमानतळ.. माणसांची नीतीमत्ता(?!)..माणसे(?!).. सगळं सगळं..जे जे काही विकणे आहे ते ते सर्व तो विकत घेत सुटतो..व शेअर मार्केट मात्र ह्या गोष्टींना बिझनेसचा मोठा Win मानत शेअर्सचा भाव वाढवतच राहते..!
आणि मग कालपरवापर्यंत भारतातल्या पहिल्या १००त कसाबसा बसू शकेल असा अडाणी जगातील पहिल्या ५ श्रीमंत लोकांत जागा मिळवतो..तो वाढलेल्या शेअर्सच्या किमतीवर..सरकारी बँकाच्या कर्जावर..सरकारी LIC ने पडेल त्या किमतीला घेतलेल्या शेअर्सच्या बळावर..!
आता इथून पुढे काय ??
👇👇👇
ते माहीत नाही..पण जगातल्या जवळपास सगळ्या Scam मध्ये होते तसे ते इथेही होऊ शकते..👇
कोणीतरी आधीच श्रीमंत असलेला अजून जास्त श्रीमंत होईल..गरीब असलेला अजून गरीब होईल..फक्त LIC च्या जीवावर रिटायर होऊ पाहणारे काही मध्यमवर्गीय त्यांच्या रिटायरमेंटच्या पैशाला मुकतील..काही बँका ज्यानी शेअर्सच्या तारणावर मोठ्ठं कर्ज दिले त्या तारणवाल्या शेअर्सची किंमत घसरल्याने बुडतील..मोठ्या SBI सारख्या बँकात NPA तयार होतील..ते NPA बुडीत काढण्यासाठी पेट्रोल डिझेल महाग ठेवले जाईल..अन् महागाई वाढत जाईल..श्रीमंत अजून श्रीमंत होत जाईल आणि गरीब अजूनच गरिबीत लोटला जाईल..!
जे म्हणतात..आम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत नाही म्हणजे आम्ही safe आहोत..त्या लोकांना पण अडाणी बुडाला तर चटका नक्कीच बसेल..इतका पैसा LIC ने ह्या शेअर्समध्ये ओतलाय..इतकी कर्ज सरकारी बँकांनी दिलीत..अर्थव्यवस्था म्हणजे पत्तांचा बंगलाच जणू..एक पत्ता जागचा हलला अन् खेळ संपला..😐
टीप - हंडनबर्ग रिसर्च नावच्या एका प्रतिष्ठित संस्थेने अडाणी ग्रुप मधील फेरफार ह्यावर ३३ हजार पानांचा रिपोर्ट तयार केलाय..त्याचा ~ ५० ट्विटचा सारांश वाचून वरील १३ ट्विटचा कोणालाही समजेल असा मराठी थ्रेड लिहायचा प्रयत्न केला आहे तरी त्यात काही त्रुटी (imperfections) असू शकतात..🙏
आगामी आर्थिक वर्षात नवे महिला सन्मान धोरण जाहीर होणार.
आगामी आर्थिक वर्षात नवे महिला सन्मान धोरण जाहीर होणार.
- बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे.
मुंबई, दि. 27 :- आगामी आर्थिक वर्षात नवे महिला सन्मान धोरण लवकरच जाहीर होणार असून या धोरणाची अंमलबजावणी प्रभावी होण्यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे असे मत बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले.
सहयाद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा 30 वा वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात बंदर व खनीकर्म मंत्री दादाजी भुसे बोलत होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, महिला व अत्याचार प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक दीपक पांडे, इंटरनॅशनल जस्टिस मशीनचे संचालक येसुदास नायडू, फेसबुक पॉलिसी लीड विभागाच्या प्रियांका जैन, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी, राज्य महिला आयोगाच्या सदस्या अँड गौरी छाब्रिया, उत्कर्षा रुपवते, दीपिका चव्हाण हे उपस्थित होते.
मंत्री दादाजी भुसे म्हणाले,राज्य महिला आयोग गेल्या तीन दशकांपासून अत्यंत चांगले काम करत आहे. काही चांगल्या बाबी शासनस्तरावर प्रगतीपथावर आहेत.राज्यातील माता भगिनींना आनंद होईल असे महिला सन्मान धोरण प्रगतीपथावर आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे धोरण येत्या आर्थिक वर्षात अंमलबजावणी करताना दिसतील. महिला आयोगाने केलेल्या सुचनांवर शासन नक्की कारवाई करणार आहे. ओमानमध्ये अडकलेल्या महिलांसाठी केंद्र शासनासोबत चर्चा करून यावर नक्कीच तोडगा काढू. आरोग्य विभागाच्या पुढाकारातून "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात पाच कोटींहून अधिक महिलांची तपासणी झाली आहे.
कृषिमंत्री म्हणून देखील काम केले तेव्हा महिला शेतकऱ्यांना कृषीच्या योजना प्राधान्याने राबवल्यामुळे अनेक ठिकाणी महिलांचे नाव सातबाराला लावले गेले. हा अत्यंत सकारात्मक परिणाम होता त्यामुळे बऱ्याच ठिकाणी महिलांचे नाव सातबाराला लागले गेले. महिलांना शिक्षणामध्ये संधी आणि जगण्यामध्ये समान संधी देण्यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे असे मत हे मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले.
संकटग्रस्त महिलांच्या मदतीसाठी राज्य महिला आयोग सदैव तत्पर - रुपाली चाकणकर
संकटग्रस्त महिलांच्या मदतीसाठी राज्य महिला आयोग सदैव तत्पर असून. आयोगापुढे नवी आव्हाने आहेत. कामाच्या ठिकाणी होणारा अत्याचार,सायबर गुन्हेगारी वाढली आहे त्यासाठी फेसबुकने सुरु केलेले 'मिशन ई सुरक्षा' कॅम्पेन महत्त्वाचे आहे. मागील पंढरपूरच्या वारीमध्ये राज्य महिला आयोगाने आरोग्य वारी आपल्या दारी उपक्रम सुरु केला. या सॅनिटरी नॅपकिन प्रथमच पुरवले.गेल्या 13 ते 14 महिन्यात आयोगाने विविध समस्या साडेदहा हजार केसेस दाखल केल्या त्यातील 9 हजारांहून अधिक केसेस निकाली काढल्या असेही श्रीमती रुपाली चाकणकर म्हणाल्या.
श्रीमती रुपाली चाकणकर म्हणाल्या,मानवी तस्करीचे प्रमाण वाढले आहे.पुणे, पिंपरी चिंचवड मधील 85 महिला व युवती ओमानमध्ये अडकल्या आहेत.महाराष्ट्रातील महिला व युवतींची संख्या अडीच ते तीन हजारावर आहे.
नोकरीचे अमिष दाखवत व्हिसा व पासपोर्ट काढून घेतले गेले आहेत.या महिलांवर लैंगिक अत्याचार केले गेले. भारतीय दुतावासासोबत संपर्क साधून पाठपुरावा करून या महिलांना सोडवणे गरजेचे आहे. श्रद्धा वालकर हत्याकांड सारख्या घटना घडू नयेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मिसिंग सेल अॅक्टीव्ह होणे गरजेचे आहे. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी दामिनी पथक व बीट मार्शल शाळेच्या आवारात ठेवा. पुण्यातील ससून रुग्णालयात तृतीय पंथीयांचे स्वतंत्र विभाग सुरु केले आहे. 25 खाटांचे हा विभाग लवकर सुरू केला जावा, अशी सूचनाही श्रीमती रुपाली चाकणकर यांनी केली.
जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून काम करत असताना महिलांबाबतच्या खटल्यात संवेदनशीलतेने उल्लेखनीय कार्य केलेले पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, विधवा प्रथा बंदीचा ठराव करत ऐतिहासिक पाउल उचलणारी हेरवाड ग्रामपंचाय तीचे सरपंच सूर गोंडा पाटील, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
राज्य महिला आयोग आणि मेटा यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या सुरक्षिततेकरिता राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन ई सुरक्षा’ अभियानाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला, आयोगाच्या वर्ष २०२३ च्या कॅलेंडर व डायरीचे प्रकाशन, राज्य महिला आयोग आणि इंटरनॅशनल जस्टीस मिशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बिल्डिंग ब्रिज या टुलकिट पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी यांनी प्रास्ताविक केले. महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, महिला व अत्याचार प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक दीपक पांडे, इंटरनॅशनल जस्टिस मशीन चे संचालक येसुदास नायडू, फेसबुक पॉलिसी लीड विभागाच्या प्रियांका जैन, यांनी मनोगत व्यक्त केले.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...



