Saturday, 28 January 2023

लहानपणी शिक्षण घेतलेल्या शाळेतून मुख्यमंत्र्यांनी घेतला पंतप्रधानांच्या 'परिक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सहभाग

 लहानपणी शिक्षण घेतलेल्या शाळेतून मुख्यमंत्र्यांनी घेतला

पंतप्रधानांच्या 'परिक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सहभाग

विद्यार्थ्यांनो हसत खेळत परिक्षेला सामोरे जा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. 27 : ज्या शाळेतून शिक्षण घेतले तेथूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले.


            ठाणे येथील किसन नगरमधील महापालिकेच्या शाळा क्रमांक २३ मध्ये मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आपल्या आठवणी जागवतानाच विद्यार्थ्यांना आणि पालकांना परिक्षेला सामोरे जाताना ताण घेऊन नका असा सल्ला दिला. त्याचबरोबर ‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल पंतप्रधानांचे त्यांनी आभारही मानले.


            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थांना दिलेले संस्कार त्यांना नक्की उपयुक्त ठरतील. तणावमुक्त, खेळात रमणारा, वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होणारा विद्यार्थी घडावा अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.


            परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे यंदाचे सहावे वर्ष. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच विद्यार्थ्यांना परीक्षा हा उत्सव असून त्यांतून येणाऱ्या परिणामांची भीती बाळगण्याची गरज नसल्याचा संदेश दिला. तसेच अभ्यास कसा करावा, अवघड विषय कसे हाताळावे, तणावाचा सामना कसा करावा, पालकांनी विद्यार्थांशी नक्की कसे वागावे, याबाबत मार्गदर्शन केले.


मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच शाळेला भेट


            मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच श्री. शिंदे आपल्या शाळेत आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता. पंतप्रधानांच्या संवादानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शाळा क्रमांक २३ च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, देशालाच एक कुटंब मानून, त्याच्या प्रमुखाच्या नात्यानं प्रचंड कामाच्या व्यापातही परिक्षा याविषयावर सातत्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधणारे पंतप्रधान आपल्याला लाभले याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान श्री. मोदी यांचे आभार मानले. पंतप्रधान श्री. मोदी यांनी विद्यार्थांना दिलेले हे संस्कार त्यांना नक्की उपयुक्त ठरतील. त्यांचे विचार ऐकणारे विद्यार्थी त्यातून नक्कीच प्रेरणा घेतील आणि परिक्षेदरम्यान येणारा तणाव दूर सारून आपल्या क्षमता हेरून आपले आयुष्य घडवतील अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. 


            परिक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी सुमारे १५० देशांतील विद्यार्थ्यांनी, ५१ देशातील शिक्षकांनी आणि ५० देशातील पालकांनी नोंदणी केली आहे. देशातील सुमारे ३८ लाख ८० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. जगभरातील कोट्यवधी लोक आज या ‘परिक्षा पे चर्चा’मध्ये सहभागी होत आहेत, ही अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            शिक्षण क्षेत्रात राज्य शासनाच्या माध्यमातून सुधारणा केल्या जात आहेत असे सांगतानाच विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी, आत्मबल, आत्मविश्वास असला पाहिजे. अपयशामुळे खचून जाऊ नका, यश हमखास मिळतेच असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी आयुष्यात आलेल्या अपयशानंतर खचलो नाही, असे सांगितले.


‘एक्झाम वॉरियर्स’ पुस्तक जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत


            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले ‘एक्झाम वॉरियर्स’ हे पुस्तक ठाणे महानगरपालिकेच्या तसेच राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.


मुख्यमंत्री रमले शाळेच्या आठवणीत


            शाळा क्रमांक २३ विषयी आठवणी जाग्या करतानाच आपले वर्गशिक्षक रघुनाथ परब यांची आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली. त्यावेळी शाळेची आतासारखी इमारत नव्हती तर चाळीत ही शाळा भरायची. शाळेची स्वच्छता स्वत:च करायचो. त्यात वेगळा आनंद होता, असे सांगत मुख्यमंत्री आठवणीत रमले.


            कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी शाळेची पाहणी केली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील संगणक लॅब, वर्ग खोल्या, तसेच पिण्याच्या पाण्याच्या जागेची पाहणी केली. बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी मुलांशी संवाद साधला. यावेळी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर उपस्थित होते.


०००००

आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मृती दिनानिमित्त मंत्रालयातील चित्रप्रदर्शनास पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट.

 आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मृती दिनानिमित्त मंत्रालयातील

चित्रप्रदर्शनास पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट.

            मुंबई, दि. 27 : महाराष्ट्रात राहणाऱ्या ज्यू बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच त्यांची प्रार्थनास्थळे आणि संस्थांच्या देखभालीसाठी शासन नक्कीच प्रयत्न करेल, असे मत पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.


        संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने 27 जानेवारी हा ‘आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट दिन’ म्हणून घोषित केला आहे. त्यानिमित्त मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात पर्यटन विभाग आणि इस्त्रायल कॉन्सुलेटतर्फे चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, इस्त्राइलचे वाणिज्यदूत कोबी शेनॉन तसेच वाणिज्यदूत कार्यालयाचे इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते

मराठी चित्रपटांना अर्थसहाय्य मंजूर करण्यासाठी चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना.

 मराठी चित्रपटांना अर्थसहाय्य मंजूर करण्यासाठी

चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना.

            मुंबई, दि. 27 : दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य मंजूर करण्यासाठी, चित्रपटांचे परीक्षण करुन दर्जा निश्चित करण्यासाठी चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने निर्गमित केला आहे.


            ही पुनर्रचित समिती आता अर्थसहाय्याची शिफारस करेल. या समितीमध्ये अविनाश नारकर, सुकन्या कुलकर्णी, योगेश सोमण, संतोष पाठारे, अलका कुबल, तेजस देऊसकर, विद्या करंजीकर, दिग्पाल लांजेकर, महेश कोळी, अभिजीत साटम, समीर आठल्ये, सचिन परब, डॉ. जयश्री कापसे, शैलेंद्र पांडे, श्रीरंग देशमुख हे 15 अशासकीय सदस्य असतील. तर महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील. या समितीचा कार्यकाळ शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीन वर्ष अथवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत यापैकी अगोदर जे घडेल तोपर्यंत असेल.


            चित्रपट परिक्षणाकरिता 33 टक्के सदस्यांची उपस्थिती आवश्यक राहील. समिती सदस्यांनी केलेल्या शिफारशींवर योजनेतील तरतुदीनुसार महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यामार्फत कार्यवाही करण्यात येईल.

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका, पुस्तके पाठविण्यासाठी २ मार्च पर्यंत मुदतवाढ.

 यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका, पुस्तके पाठविण्यासाठी २ मार्च पर्यंत मुदतवाढ.

            मुंबई, दि. 27 : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२२ करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका व पुस्तके दि. १ जानेवारी, २०२३ ते ३१ जानेवारी २०२३ पर्यंत मागविण्यात आली आहेत. तथापि, या पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके सादर करण्याच्या कालावधीस एक महिना अधिकची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता या पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके स्वीकारण्याचा अंतिम दि. २ मार्च, २०२३ हा असणार आहे.


            विहित कालमर्यादेनंतर (१ जानेवारी, २०२३ ते २ मार्च, २०२३) येणाऱ्या प्रवेशिका व पुस्तके स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत, असे सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

गणांक गणेशमूर्ती प्रदर्शनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन.

 गणांक गणेशमूर्ती प्रदर्शनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन.

            ठाणे, दि. 27 (जिमाका) : ठाण्यातील हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे महाराष्ट्र मूर्तिकार संघटना व आशुतोष म्हस्के यांच्यावतीने आयोजित 'गणांक' या गणेशमूर्ती प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. मूर्तिकार हे समाजाचे महत्वाचे घटक असून त्यांच्या मागण्यांबाबत बैठक घेऊन सकारात्मक विचार करू, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


            यावेळी महापालिका आयुक्त अभिजित बांगर, माजी आमदार रवींद्र फाटक, निमंत्रक आशुतोष म्हस्के, श्री. मूर्तिकार कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देसाई, प्रा. प्रदीप ढवळ आदी उपस्थित होते.


            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रदर्शनातील चित्रांची पाहणी केली. गणांक श्रमसाधना गौरव पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.


            मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष श्री. देसाई यांनी मागण्यांचे निवेदन दिले.

ऐरोली-काटई नाका रस्ता प्रकल्पातील पारसिक डोंगरातील डावा बोगदा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खुला

 ऐरोली-काटई नाका रस्ता प्रकल्पातील पारसिक डोंगरातील

डावा बोगदा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खुला


पारसिक बोगद्यामुळे लोकांच्या प्रवासातील वेळेत बचत होईल

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            ठाणे, दि. 27 (जिमाका) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ऐरोली काटई नाका रस्ता प्रकल्पांतर्गत पारसिक डोंगरामधील मुंब्रा ते ऐरोली बोगद्याच्या डाव्या बाजूच्या मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले असून नियंत्रित स्फोट पद्धतीचा वापर करून हा बोगदा दोन्ही बाजूने खुला करण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रकल्पातील डाव्या बाजूच्या बोगद्याच्या भुयारीकरणाचे काम आता पूर्ण झाले असून हा बोगदा दोन्ही बाजूने खुला झाला आहे. या प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, नवी मुंबई व ठाणे परिसरातील नागरिकांच्या प्रवासाच्या वेळेत बचत होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.


            यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, एमएमआरडीचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांच्यासह अधिकारी, अभियंते उपस्थित होते.


            यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईतील अंतर कमी करणाऱ्या ऐरोली ते काटई भुयारी मार्गातील डाव्या बाजूकडील बोगदा दोन्ही बाजूकडून जोडण्यात आला आहे. या ऐरोली काटई प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, ऐरोली, नवी मुंबई, ठाणे, मुंबई परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. या रस्त्यामुळे सात किमी अंतर कमी होणार आहे. नवी मुंबई येथून डोंबिवली, कल्याण,अंबरनाथ, बदलापूर येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या वेळेत कमालीची बचत होणार असून इंधनाचीही बचत होणार आहे. प्रवासाचा वेळ वाचल्यामुळे नागरिकांच्या कार्यक्षमतेतही वाढ होईल.


            राज्य शासनाच्या वतीने अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. शिळफाटा ते कल्याण व कल्याण ते भिवंडी असा थेट एलिव्हेटेड उड्डाणपूल करणार आहोत. तसेच कल्याण ते तळोजा मेट्रो असा दुमजली रस्ता व मेट्रो असलेल्या मार्गाचे नियोजन आहे. याशिवाय मानकोली -डोंबिवली या खाडी पुलाच्या कामामुळे अंतर कमी होईल. ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी चेंबूर फ्रिवे जेथे उतरतो त्या ठिकाणाहून थेट फाऊंटनपर्यंत शहराच्या बाहेरुन बायपास करतोय. ज्या ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते अशा ठिकाणी असे अनेक प्रकल्प राबवित आहोत. मुंबई व मुंबई महानगर परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून क्रॉसिंग असलेल्या ठिकाणी डबलडेकर टनेल ही संकल्पना राबविणार आहोत. जेणेकरून मुंबई आणि एमएमआरमधल्या लाखो प्रवाशांची वाहतूक कोंडीमधून सुटका होईल व त्यांचे जीवन सुसह्य होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


असा आहे प्रकल्प


            ऐरोली काटई नाका प्रकल्प हा तीन भागात विभागाला गेला असून भाग-१ अंतर्गत चा रस्ता हा ठाणे बेलापूर रोड ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ आहे. सदर भागाची लांबी ३.४ कि.मी. इतकी असून त्यामध्ये १.६९ कि.मी. लांबीचा दुहेरी बोगदा व उर्वरित रस्ता व उन्नत मार्ग आहे. या प्रकल्पात असलेला बोगदा हा चार ४+४ मार्गिकेचा आहे. ( त्यामध्ये १+१ रेफ्युजी मार्गिका आहे.)


            या बोगद्यांच्या भुयारीकरणाचे काम हे New Austrian Tunneling Method (NATM) कंट्रोलिंग ब्लास्टिंग या तंत्रज्ञान पद्धतीने करण्यात येत आहे. सद्यस्थितीत बोगद्याचे ६७ टक्के काम पूर्ण झाले असून प्रकल्पाची उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत.


            सद्यःस्थितीत प्रवाशांना महापे किंवा ठाणे येथून मार्ग काढून जावे लागत आहे. या प्रकल्पामुळे कल्याण- डोंबिवली आणि नवी मुंबई मधील अंतर ७ कि.मी. ने कमी होईल. त्यामुळे वेळेची आणि इंधनाची बचत होईल. या प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल.


            एमएमआरडीचे महानगर आयुक्त श्री. श्रीनिवास म्हणाले की, "पारसिक टेकड्यामधील भुयारीकरणाचे काम हे खूप अवघड आहे. आज डाव्या बाजूच्या बोगद्यात शेवटचा ब्लास्ट करून तो दोन्ही बाजूंनी खुला झाला आहे. ह्या बोगद्याच्या दुसऱ्या बाजूच्या भुयारीकरणाचे काम देखील लवकरच पूर्ण होईल. दोन्ही बाजूंचे काम पूर्ण झाल्यावर प्रकल्पातील महत्त्वाचा आणि अवघड टप्पा पार होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर शिळफाटा रस्त्यावरील अवजड वाहतूक कमी होईल आणि काटई नाका ते ऐरोली दरम्यानचा प्रवास 30 मिनिटांनी कमी होईल. ज्याचा फायदा मुंबईहून कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना होईल.


००००००

संकल्प पूर्ती

 जास्त ताणू नका , लाईटली घ्या* 


*प्रत्येकांनी एकमेकाला*

*थोडं समजून घ्या* 

*खूप जास्त ताणू नका*

*सगळेच लाईटली घ्या ll*


*थोडं फार मागे पुढे*

*होतच असतं*

*शंभर टक्के perfect* 

*कुणीच नसतं ll*


*माणुसकीही सर्वांकडे* 

*असलीच पाहिजे*

*वागण्यातून नम्रता*

*दिसलीच पाहिजे ll* 


*छोट्या छोट्या गोष्टी वरून*

*कशाला करायचं बंड*

*आपण गोड बोललंकी* 

*समोरचा होतो थंड ll*


*कधी कधी सारा विषय* 

*फारच क्षुल्लक असतो* 

*माणूस मात्र विनाकारण* 

*टेंन्शन मध्ये बसतो ll*

 

*कसाही प्रसंग असला तरी*

*राहिलं पाहिजे शांत*

*आपल्या सहनशीलतेचा*

*होऊ देऊने अंत ll*


*घर असो , ऑफिस असो*

*वा असो Whats app*

*भेटून घ्या , बोलून घ्या* 

*पडू देऊ नका gap ll*


*भाषा असली स्वीट*

*की सगळं होतं नीट*

*कुणाचाच कुणाला* 

*येत नाही वीट ll*


*झालं गेलं विसरून जा*

*घ्या हातात हात*

*निमित्ताने भेटलो आपण*

*द्या हासून साथ ll*

        🤝😄🤝😄🤝



*पुढील संपूर्ण एका वर्षासाठी आजपासून नवीन संकल्प करा. ते डायरीत लिहून ठेवा. मित्र परिवारात जाहीर करा. वारंवार ते संकल्प आठवा.*

१) प्रथम स्वतः वर प्रेम करा.

२) वडिलधा-यांना मान द्या.

३) बचत करायला शिका.

४) निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करा.

५) चांगला मित्र परिवार वाढवा.

६) व्यसनांपासून दूर रहा.

७) भक्तीमार्ग अवलंबा.

८) समाजसेवा करा.

९) आपल्या मागे आपली आठवण काढणारी माणसे आहेत, याची सदैव जाणीव ठेवा.

१०) सल्ला घेऊनच प्रत्येक काम करा.

११) आजच्या तरूण पणावरच उद्याचे  

वृद्धत्व अवलंबून आहे. हे विसरू नका.

१२) मागा म्हणजे मिळेल, आणि शोधा म्हणजे सापडेल. या प्रमाणे वागल्यास पुढेच जाल.

१३) यशोगाथांचे वाचन करा.

१४) नैसर्गिक जीवन जगा.

१५) आयुष्य फार लहान आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.


🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺


 *👏आदर्श जीवन जगण्यासाठी जरुर वाचा..*


💎1) चूक झाली तर मान्य करा.

💎2) समोरच्याचे मत विचारात घ्या.

💎3) चांगल्या कामाची स्तुती करा.

💎4) आभार मानायला विसरू नका.

💎5) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा.

💎6) सतत हसतमुख रहा.

💎7) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा.

💎8) कुणाच्याही व्यंगावर हसु नका.

💎9) स्वतःची कुवत व ताकद ओळखा.

💎10) टिका तक्रार यात वेळ घालवु नका.

💎11) कृती पुर्व विचार करा.

💎12) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका.

💎13) क्रोधावर नियंत्रण ठेवा.

💎14) मैत्री भावना कायम मनी राहु द्या.

💎15) नेहमी सत्याची कास धरा.

💎16) इतरांना चांगली वागणूक द्या.

💎17) सुखाचा गुणाकार व

दुखाचा भागाकार करा.

💎18) विचार करून बोला.

💎19) वाहन चालवताना स्वतः ची काळजी घ्या व फाजील आत्मविश्वास टाळा.

🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌹

Featured post

Lakshvedhi