Tuesday, 25 October 2022

जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक नीरजा यांची मुलाखत.

 जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक नीरजा यांची मुलाखत.

            मुंबई, दि.25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक नीरजा यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. बुधवार, दि.26 ऑक्टोबर 2022 रोजी सायं 7.30 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

            साहित्याचे विविध प्रकार, कविता, वाचनसंस्कृती व दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा, वाचन संस्कृती रुजविण्यासाठी दिवाळी अंकांची भूमिका, काव्यप्रकार तसेच नवीन साहित्यिक व त्यांचे साहित्य आणि वाचकांची बदलती भूमिका याबाबत ज्येष्ठ साहित्यिक नीरजा यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात उपयुक्त माहिती दिली आहे. ज्येष्ठ निवेदिका स्नेहा आघारकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

०००००

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत

 प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत

मोफत धान्य वितरणासाठी 41 हजार 138 मेट्रीक टन धान्य मंजूर.

            मुंबई, दि. 25 : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी मुंबई-ठाणे क्षेत्रातील ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीकरिता प्रतिसदस्य पाच किलो मोफत अन्नधान्य वितरीत करण्यात येणार आहे. यासाठी प्रतिमाह 16 हजार 385 मेट्रीक टन गहू, 24 हजार 753 मेट्रीक टन तांदूळ असे एकूण 41 हजार 138 मेट्रीक टन धान्य वितरीत करण्यासाठी नियतन मंजूर करण्यात आले असल्याची माहिती नियंत्रण शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांनी दिली आहे.


            गरीब कल्याण अन्न येाजना अंतर्गत मोफत अन्नधान्य वितरणाचे परिणाम, प्राधान्य कुटुंबाकरिता प्रतिमाह प्रति लाभार्थी 3 किलो तांदूळ व 2 किलो गहू तसेच, अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांकरिता प्रतिमाह प्रति लाभार्थी 4 किलो तांदूळ व 1 किलो असे वितरणासाठी प्राप्त झाले आहेत.


            योजनेतील लाभार्थींचे शासनाकडून प्राप्त ड,ई व ग परिमंडळ कार्यालयांचे तांदूळ व गव्हाचे नियतन हे सप्टेंबर करिता अहवालानुसार विक्रीपेक्षा कमी असल्याने संबंधित परिमंडळ कार्यालयांना शासनाकडून प्राप्त नियतनाच्या मर्यादेत नियतन मंजूर करण्यात आले आहे. उर्वरित परिमंडळ कार्यालयांना सप्टेंबर करिता अहवालानुसार विक्रीच्या 100 टक्के प्रमाणे नियतन मंजूर करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.


०००



 


 



अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत

 अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत ६४७ मेट्रिक टन नियतन मंजूर


 मुंबई, दि. २५ : मुंबई - ठाणे शिधावाटप क्षेत्रासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यांसाठी डिसेंबर २०२२ करिता १८५१२ लाभार्थ्यांकरिता २७७ मेट्रीक टन गहू३७० मेट्रीक टन तांदूळ असे एकूण ६४७ मेट्रिक टन नियतन शासनाकडून प्राप्त झाले असल्याची माहिती नियंत्रण शिधावाटप व संचालक नागरीपुरवठा यांनी दिली आहे.

मुंबई व ठाणे शिधावाटप क्षेत्रात डिसेंबरसाठी परिमंडळ अ,,,,फ मध्ये अत्योंदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांसाठी प्रति शिधापत्रिकाधारकास गहू २ रू किलो आणि तांदूळ ३ रू किलो प्रमाणे १५ किलो गहू आणि २० किलो तांदूळ असे एकूण ३५ किलो धान्य वितरीत करण्यात येणार आहेत.

डिसेंबर २०२२ करिता शासनाकडून प्राप्त अंत्योदय अन्न योजनेचे परिमंडळ  ग कार्यालयांच्या विक्रीच्या अहवालानुसार आवश्यकतेपेक्षा कमी असल्याने सदर परिमाडळ कार्यालयास शासनाकडून प्राप्त नियतनाच्या मर्यादेत नियतन मंजूर करण्यात आले आहे. तसेच उर्वरित अ व फ परिमंडळ कार्यालयांना तांदूळ व गव्हाचे सप्टेंबर २०२२ करिता अहवालानुसार १०० टक्के प्रमाणे नियतन मंजूर करण्यात आले आहे.

००००

अनमोल

 


Hamesha खुश रहे


 

ओलावा नात्यांचा

 


लक्ष्मी पूजन

 


Featured post

Lakshvedhi