Sunday, 16 October 2022

दिव्यां गाना मार्गदर्शनपर शिबिर

 विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून  मातृत्व अपंग सेवाभावी संस्था पेण यांच्या वतीने सदर संस्थेने दिव्यां गाना मार्गदर्शनपर शिबिर आयोजित केले होते.त्यामध्ये संस्थेने दिव्यांगाना स्वबळावर नोकरी प्राप्त करण्याचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संस्थेने घेतली आहे.सदरची संस्था गेल्या ५ वर्षापासून दिव्यांगानसाठी अविरत पणे  कोणतेही शुल्क न घेता प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र रजि नं.०६|२०१७दि.०६|०१|२०१७.सर्व दिव्यांगाना अहवान करण्यात येते की, ज्या दिव्यांग बांधवांना नोकरीची गरज आहे.त्यांनी तात्काळ कागदपत्रांसह सबंधित संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.सचिन ह.गायकवाड.यांच्याशी दिनांक ३० ऑक्टोबर २०२२ पर्यंत संपर्क साधावा.

शैक्षणिक पात्रता:१० वी पास.

वयोमर्यादा:१८ ते ४५ वर्ष .

आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे:

१.दिव्यांग सर्टिफिकेट ४०% च्या वर असणे आवश्यक आहे.

२.आधारकार्ड 

३.रेशनिंगकार्ड  

४.शाळेचे सर्टिफिकेट.

५.अर्ज स्वीकारण्याची शेवटची मुदत:३०|१०|२०२२.

पुढील भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा.

१.सचिन गायकवाड:९९२३९६४२९९.

2.पूजा सुर्यवंशी:८१४९०९५४७४.

3.भक्ती राऊत:८०८७६८८२४१.

४.सिद्देश तांबेकर:८२६२०४७५४८.

अंधेरी पोटनिवडणूक विशेष

 अंधेरी पोटनिवडणूक विशेषदि. १५ ऑक्टो. २०२२

 

अंधेरी पूर्व मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

 

            मुंबई उपनगरदि. १५ : भारत निवडणूक आयोगाने १६६ - अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

            या पोटनिवडणुकीसाठी सर्वसामान्य केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून श्री.देवेश देवल (आय. ए.एस.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९३७२-८८६-७१७ हा असून कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२२-३१४००५३६ आहे. ते इंडियन ऑईल रेस्ट हाऊसबांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समुंबई येथे सकाळी १० ते ११ या कालावधीत जनतेला भेटतील.

            पोलीस केंद्रीय निरीक्षक म्हणून श्री.कोया प्रवीण (आय.पी.एस.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ८३५५-८७३-९२६ हा असून कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२२-३१४००५७३ आहे. ते इंडियन ऑईल रेस्ट हाऊसबांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समुंबई येथे सकाळी ११ ते दुपारी १२ या कालावधीत जनतेला भेटतील.

            त्याचप्रमाणे निवडणूक खर्च केंद्रीय निरीक्षक म्हणून श्री.सत्यजित मंडल  (आय.आर.एस.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९५९१-३८३-९१५ हा असून कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२२-३१४००५६१ आहे. ते इंडियन ऑईल रेस्ट हाऊसबांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समुंबई येथे सकाळी १० ते ११ या कालावधीत जनतेला भेटतीलअशी माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी दिली आहे.

            येत्या ३ नोव्हेंबर २०२२ रोजी अंधेरी पूर्व या विधानसभा मतदार संघात मतदान होत असून या भागातील सर्व मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा आणि लोकशाही सुदृढ करावीअसे आवाहनही श्रीमती चौधरी यांनी यानिमित्ताने केले आहे.

 

मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ग्लोबल सोल्युशन

 मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ग्लोबल सोल्युशन समिट' ला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

मुंबई महानगराचा संपूर्ण कायापालट करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

मुंबई दि.१५ : मुंबई महानगर क्षेत्रात विविध पायाभूत सुविधांची विकासात्मक कामे प्रगतीपथावर आहेत. 'स्वच्छ मुंबई-सुंदर मुंबई' तसेच 'खड्डेमुक्त आणि झोपडपट्टीमुक्त मुंबई' करुन संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्राचा कायापालट करण्यास शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.

            मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ग्लोबल सोल्युशन समिट – २०२२ चे आज वरळी येथे आयोजन करण्यात आले होते, मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या परिषदेस खासदार राहुल शेवाळे आणि डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार कालिदास कोळंबकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवासन, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, कन्स्ट्रक्शन टाईम्सचे राममूर्ती आदी मान्यवर उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, ज्या देशातील रस्ते चांगले असतील त्या देशाची वेगळी ओळख निर्माण होते, तेथील विकासाची गती अधिक असते. यामुळे उद्योगधंद्यांना अधिक चालना मिळते. दळणवळण सुलभ झाले तरच सर्वागीण विकास होण्यास मदत होते, त्यासाठी मुंबई शहरातील ४५० कि.मी. रस्ते सिमेंट काँक्रीट करण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. त्याचे काम नामांकिंत कंपन्यांना देण्यात येणार असून कालमर्यादेपूर्वी आणि गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्यांना कामे दिली जातील. उर्वरित ४५० कि.मी.च्या कामांची निविदा येत्या मार्च महिन्यात काढण्यात येणार आहे. अशाप्रकारे मुंबईतील १०० टक्के रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            आज आयोजित समिटमधून आलेल्या सूचनांचा शासन सकारात्मक विचार करुन या माध्यमातून विकासाची कामे करण्यात येतील. असे सांगून सध्या ३३७ कि.मी.मेट्रोचे कामे सुरु असून ही संपूर्ण कामे २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. ही कामे झाल्यानंतर १९ लाख प्रवासी मेट्रोमधून प्रवास करतील, यामुळे रस्त्यावर होणारी वाहतूक सुरळीत होऊन इंधनाच्या बचती बरोबरच पर्यावरणात काही प्रमाणात सुधारणा होईल आणि प्रवासी वातानुकूलित आणि आरामदायी प्रवास करू शकतील, असेही श्री. शिंदे म्हणाले.

            मुंबई महानगरातील कोळी बांधवांसाठी पुनर्विकासाचे कामे करत असताना मुंबईतील १४३ कोळीवाड्यातील नागरिकांच्या सल्ल्याने विकासाचे कामे करण्यात येणार आहेत. कोळी बांधव हे मुंबईचे मूळ रहिवासी आहेत. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगारासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

            धारावी झोपडपट्टी पुनर्विकासात आलेल्या समस्या काही प्रमाणात सोडवण्यात आल्या आहेत. धारावी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. या ठिकाणी साधारणत: 8 लाख नागरिक राहतात. विविध व्यवसाय करतात. त्यांचेही जीवनमान उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाणार आहे. धारावी पुनर्विकासासाठी विविध तज्ज्ञाचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. त्यांच्या कौशल्याचा उपयोग करून विकास करण्यात येणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

            मुंबई- गोवा मार्गाची कामे सुरू आहेत, आता मुंबई -सिंधुदुर्ग रस्त्याचे कामे करण्यात येणार आहेत. यामुळे कोकण पर्यटनाला चालना मिळणार आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे लोकार्पण लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            मुंबईच्या विकासात सर्वांचे योगदान महत्त्वाचे असून एमएमआरडीए, एमएसआरडीसी, म्हाडा आणि मुंबई महानगरपालिकेने समन्वयाने विकासाचे कामे करण्याची आवश्यकता आहे. तसेच सर्व विकासात्मक कामे करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन करतानाच शहराच्या विकासात अनेक बांधकाम उद्योजकांचे मोठे योगदान आहे. या उद्योगांना विविध सवलती देण्याचा प्रयत्न केला जाईल. मुंबई शहरातील नागरिक स्थलांतर होऊ नये, यासाठी मुंबई शहरातच बांधकाम उद्योजकांनी नागरिकांना कमी किमतीत घरे देण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

000


 

औषध म्हणजे


काय बाय सांगू


 

पवन पुत्र

 श्री हनुमानजींचा हवेत उडण्याचा वेग किती होता?



जाणून घ्या हनुमानजींच्या हवेत उडण्याचा वेग किती असावा, तुम्ही अंदाज लावू शकता की रात्री 9:00 ते 12:00 पर्यंत लक्ष्मणजी आणि मेघनाद यांच्यात युद्ध झाले होते. रात्री बाराच्या सुमारास लक्ष्मणजींना मेघनादांनी सोडलेला बाण लागला आणि ते बेशुद्ध झाले.


प्रभू रामजींना लक्ष्मणजींच्या बेशुद्धीबद्दल माहिती मिळाली, त्यानंतर चर्चेनंतर हनुमानजी आणि विभीषणजींच्या सांगण्यावरून सुशेन वैद्य यांना लंकेतून १ तासात म्हणजे रात्री १:०० च्या सुमारास घेऊन आले.


सुशेन वैद्य यांनी तपास करून सांगितले असेल की ही चार औषधे हिमालयाजवळील द्रोणागिरी पर्वतावर सापडतील, जी त्यांना पहाटे 5:00 वाजता सूर्योदयापूर्वी आणायची होती.  यासाठी रात्री 1:30 वाजता हनुमानजी हिमालयाकडे रवाना झाले असावेत.


अडीच हजार किलोमीटर दूर असलेल्या हिमालयाच्या द्रोणागिरी पर्वतावरून ते औषध आणण्यासाठी हनुमानजींना साडेतीन तासांचा अवधी मिळाला होता.  त्यातही त्यांचा अर्धा तास औषध शोधण्यात गेला असेल.  अर्धा तास कालनेमी नावाच्या राक्षसाने घालवला असेल ज्याने त्यांची दिशाभूल केली होती आणि अर्धा तास भरतजींनी त्यांना खाली पाडण्यासाठी आणि परत पाठवण्यासाठी खर्च केला असेल. म्हणजेच तिथे पोहोचण्यासाठी फक्त दोन तासांचा अवधी मिळाला होता.


अवघ्या दोन तासात हनुमानजी 5 हजार किमी प्रवास करून द्रोणागिरी पर्वत हिमालयातून परत आले होते, म्हणजेच त्यांचा वेग ताशी अडीच हजार किलोमीटर असावा.


आजच्या अत्याधुनिक मिराज विमानाचा वेग 2400 किलोमीटर प्रति तास आहे, त्यामुळे हनुमानजी महाराज त्याहून अधिक वेगाने गेले आणि मार्गातील तीन-तीन अडथळे दूर करून सूर्योदयापूर्वी परत आले. हे त्यांच्या विलक्षण शक्तींच्या सामर्थ्यामुळे शक्य झाले.


पवनसुत हनुमान की जय!!

सियावर रामचंद्र जी की जय!!

जय श्री राम!!❤️🙏

डोळे,साथ आली आहे.


 

Featured post

Lakshvedhi