Sunday, 9 October 2022

मुख्यमंत्र्यांची तळमळ..

 रात्रीचे आठ… अन् मंत्रालयात आलेल्या सामान्य माणसाला

भेटण्याची मुख्यमंत्र्यांची तळमळ..

            मुंबई, दि.8: मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर अभ्यागतांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या सामान्य नागरिकाला आस असते ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीची. मुख्यमंत्री देखील या जनतेची भेट घेतल्याशिवाय मंत्रालय सोडत नाही. काल, शुक्रवारी 7 ऑक्टोबरला रात्री साडे आठ पर्यंत मुख्यमंत्री श्री.शिंदे सामान्यांना भेटत होते. योगायोगाने काल मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारला शंभर दिवस झाले त्यावेळी सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मुख्यमंत्र्यांची तळमळ दिसून आल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

            मी सामान्यांचा मुख्यमंत्री आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे कायम सांगत असतात. त्याची प्रचिती त्यांच्या कार्यशैलीतून दिसून येते. सामन्यांमध्ये त्यांच्याविषयी असलेले कुतूहल, आपुलकी आणि आपल्यातले मुख्यमंत्री यामुळे त्यांना भेटायला आलेल्यांमध्ये शहरी, ग्रामीण भागातील महिला, पुरुष, युवा वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. हल्ली मंत्रालयात अभ्यागतांची वाढती संख्या ही विशेषतः मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी जास्त आढळून येत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांना भेटण्यासाठी नागरिक येत आहेत. त्यांची निवेदने स्वीकारून म्हणणे ऐकून घेतले जाते.

            शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे मंत्रालयात आगमन झाले. त्यानंतर त्यांनी नियोजित परिवहन विभाग, मीरा भाईंदर महापालिका विकास कामांचा आढावा, कोळी बांधवांच्या समस्यांबाबत बैठका घेतल्या. त्यानंतर विले पार्ले येथे नियोजित कार्यक्रम होता. त्यासाठी मंत्रालयाबाहेर पडण्यापूर्वी त्यांनी अभ्यागतांच्या भेटी घेतल्या. तोपर्यंत सायंकाळचे पावणे आठ वाजले होते. आपल्याला भेटायला समिती कक्षाबाहेर किमान दीडशे ते दोनशे नागरिक उपस्थित असल्याचे त्यांना कळले. 

            नियोजित कार्यक्रम असला तरी सामान्यांना न भेटताच कस जायचे म्हणून त्यांनी सगळ्यांना भेटायचे ठरवले. त्यानंतर सहाव्या मजल्यावरील समिती कक्षात मुख्यमंत्री आले. त्यांनी प्रत्येकाची भेट घेतली. निवेदने स्वीकारली त्यावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी सूचनाही लिहिल्या. मुख्यमंत्री एवढ्या उशिराही मुख्यमंत्री भेटताहेत हे पाहून त्यांना भेटून बाहेर पडणाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते. नंतर रात्री नऊच्या सुमारास मुख्यमंत्री मंत्रालयातून नियोजित कार्यक्रमाला रवाना झाले.

००००



'ईद-ए-मिलाद'च्याशुभेच्छा

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 'ईद-ए-मिलाद'च्या शुभेच्छा

 

            मुंबईदि. 8:- प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव 'ईद-ए-मिलादनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

            ईद-ए-मिलादाच्या पुर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, प्रेषित पैगंबर यांनी समाजाला शांतीबंधुभावाची शिकवण दिली. या शिकवणीचा आदर करून त्यांना अभिप्रेत समाज निर्मितीचे प्रयत्न करूया. उत्सवाचे हे पर्व सुख,समृद्धी आणि समाधान घेऊन येवोयासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.'

वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राचे वैभव

 वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राचे वैभव

पंढरपूरसह देहू-आळंदीचाही विकास करणार

                                      -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            पुणे दि.8: वारकरी संप्रदाय ही मोठी शक्ती असून या संप्रदायाने भजन व किर्तनाच्या माध्यमातून मानवकल्याण आणि विश्वशांतीचा संदेश दिला. मानवाला सद्विचार देणारा वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचे वैभव आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            मृदंग ज्ञान शिक्षण संस्थेव्दारे आळंदी येथे आयोजित संत दासोपंतस्वामी आळंदीकर यांचा गुरुपूजन सोहळा, संस्थेचा रौप्य महोत्सव सोहळा आणि मृदंग दिंडी महोत्सवाप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार दिलीप मोहिते, महेंद्र थोरवे, मारोती महाराज कुरेकर, दासोपंत स्वामी आळंदीकर, महंत पुरुषोत्तम दादा महाराज, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, महाराष्ट्राला महान संत परपरा आणि वारकरी परंपरा लाभली आहे. ज्ञानोबा माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराजांसारख्या महान संतांची परंपरा हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. अन्य कुठल्याही प्रांताला हे भाग्य लाभले नसेल. म्हणून आपण सर्व भाग्यवान आहोत. वारकरी परंपरेत भजन, किर्तनाला मोठे स्थान आहे, ही एक ज्ञान आराधना असून त्यात भक्ती आणि ज्ञानोपासनेचा संगम आहे. विश्वशांती आणि मानवकल्याणाचा संदेश दिला जातो.

वारकरी संप्रदायाकडून समाजात सकारात्मकता पेरण्याचे काम

            भजन, किर्तनात अभंग, ओव्या, भारुड याचा अर्थ उलगडून सर्वसामान्य माणसाला कळेल अशा सोप्या भाषेत पोहोचवले जाते. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून मानसिक समाधान मिळते, चांगली ऊर्जा मिळते. मनातील राग, लोभ, द्वेष, मत्सर बाजूला सारला जातो. जीवनातील नकारात्मकता घालवून त्याठिकाणी सकारात्मकता पेरण्याचे, मन ताजेतवाने करण्याचे काम किर्तन-प्रवचनाने होते. समाजप्रबोधनाच्या माध्यमातून माणसाच्या मनात चांगले विचार बिंबविण्याचे कार्य वारकरी संप्रदाय करतो. आपल्या आयुष्यात पांडुरंगाची पूजा करण्याची संधी मिळाली तो दिवस आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस होता, असे त्यांनी सांगितले.

पंढरपूरसह देहू-आळंदीच्या विकासावरही भर

            मुख्यमंत्री पद वारकरी, शेतकरी, कष्टकरी, कामगार, शोषित- पिडीत लोकांच्या कल्याणासाठी वापरून राज्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, पंढरपूरचा विशेष कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वारकऱ्यांना सर्व सुविधा मिळाव्यात आणि परिसर स्वच्छ रहावा यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. देहू-आळंदीचादेखील याच पद्धतीने विकास करायचा आहे. याठिकाणी लाखो भाविक येतात. येथे येणाऱ्या वारकऱ्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यात येतील. इंद्रायणी नदी स्वच्छ करण्यासाठी प्रशासनाला सुचना करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

            मृदंग ज्ञान शिक्षण संस्थेत अनेक शिष्य मृदंग वादनाचे शिक्षण घेत आहेत. कर्नाटक, आंध्र प्रदेशातही या संस्थेचे शिष्य भजन किर्तनाला साथसंगत करीत आहेत. ही कौतुकास्पद बाब असल्याचे श्री.शिंदे म्हणाले. 

            मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संत दासोपंतस्वामी आळंदीकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मारुतीमहाराज कुरेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. 

            कार्यक्रमापूर्वी श्री.शिंदे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यांनी मृदंग दिंडीमध्ये पायी चालत सहभाग घेतला.

००००



Saturday, 8 October 2022

सवधनिया, सुरक्षित

 



पैलवान आला

 


विनाशकाले विपरीत बुद्धी


विनंती साखर सोडा*

 *विनंती साखर सोडा*

डॉ. म्हणतात लापरवाही वगळता कोणीही कर्करोगाने मरणार नाही. *सर्वप्रथम साखर खाणे कमी करावे शरीरात साखर नसल्यास, कर्करोगाच्या पेशीचा नैसर्गिक मृत्यू होतो.*

साखर तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला.

 "त्याआधी *भारतीय लोकं शुद्ध देशी गुळाचेच सेवन करत होते* आणि कधीही आजारी पडत नव्हते."

*साखर हे एक प्रकारचे विष आहे जे अनेक रोगांना निमित्त ठरते . हे कसे काय  घडते याबद्दल आपण जरा माहिती घेऊ या...*

(१) साखर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये *गंधकाचा सर्वाधिक वापर केला जातो. गंधक म्हणजे काय तर फटाक्यांमधील मसाला.!*

(२) गंधक हा अत्यंत जड धातू असून *एकदा का गंधक शरीरात गेले की ते शरीराबाहेर पडतच नाही.*

(३) साखर ही कॉलेस्ट्रॉल वाढवते. *कॉलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.*

(४) साखरेमुळे शरीराचे *वजन अनियंत्रित वाढते व त्यामुळे अंगी स्थूलपणा येतो.* 

(५) साखर ही *रक्तदाब वाढवते.*

(६) साखर ही *मेंदूला झटका येण्याचे एक मुख्य कारण आहे.*

(७) साखरेतील गोडपणाला आधुनिक चिकित्सा पद्धतीत सुक्रोज म्हटले जाते. *माणसे व जनावरे हे दोघेही सुक्रोज पचवू शकत नाहीत.*

(८) साखर तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये *तेवीस (23) हानीकारक रसायने वापरली जातात.*

(९) साखर ही *मधुमेह होण्याचे एक मुख्य कारण आहे.*

(१०)  साखर हे *पोटातील जळजळीचे एक मुख्य कारण आहे.*

(११)  साखर ही *शरीरातील ट्राइ ग्लिसराइड* वाढवते.

(१२)  साखर हे *अर्धांगवायुचा किंवा पक्षाघात झटका* अथवा *लकवा* होण्याचे एक मुख्य कारण आहे.

(१३) *कृपया आपणास जितके शक्य होईल तितके साखर सोडून गुळाचा वापर आजच्या आज करणे सुरू करा.*

*आपण कितीही व्यस्त असलात तरी, कृपया हे वाचण्यासाठी वेळ काढलात त्या बद्दल धन्यवाद.*🙏🌹

*वरील हितकारक माहिती आपल्या ओळखीची लोकं, आपले मित्र, नातेवाईक आणि इतर गटांना अवश्य पाठवा.*

Featured post

Lakshvedhi