Saturday, 10 September 2022

Botnical गार्डन

 विसापूर येथील बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण २५ डिसेंबर रोजी.

                                             --वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

Ø भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव बॉटनिकल गार्डनला देणार.

            चंद्रपूर, दि,९: चंद्रपूर-बल्‍लारपूर मार्गावरील बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण माजी पंतप्रधान भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या जयंतीदिनी २५ डिसेंबरला करण्‍याच्‍या दृष्‍टीने आवश्‍यक नियोजन करावे असे निर्देश वन व सांस्‍कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

            चंद्रपूर जिल्‍हयातील अपूर्ण असलेले महत्‍वाकांक्षी वनप्रकल्‍प तातडीने पूर्ण करावे यासंदर्भात असलेल्‍या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी चंद्रपूरात घेतलेल्‍या आढावा बैठकीत वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी हे निर्देश दिले. वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी आणि प्रधान मुख्‍य वनसंरक्षक वायएलपी राव यांच्‍यासह झालेल्‍या चर्चेत वनमंत्र्यांनी चंद्रपूर जिल्‍हयातील महत्‍वपूर्ण वनप्रकल्‍पांचा आढावा घेतला.

विसापूर येथील बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण २५ डिसेंबर रोजी

            चंद्रपूर-बल्‍लारपूर मार्गावरील विसापूर येथील बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण दि. २५ डिसेंबर रोजी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या जयंतीदिनी करण्‍याचे नियोजित आहे. ताडोबा-अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पामुळे चंद्रपूर जिल्‍हयाला पर्यटनाच्‍या दृष्‍टीने विशेष महत्‍व आहे. ताडोबा व्‍याघ्र प्रकल्‍पाला भेट देण्‍यासाठी देश-विदेशातील पर्यटक वर्षभर येत असतात. देशातील अत्‍याधुनिक बॉटनिकल गार्डन जवळच विसापूरमध्‍ये तयार होत असल्‍याने या गार्डनची देश-विदेशातील पर्यटकांनाही भुरळ पडणार आहे. वनसंपदा व वनेतर क्षेत्रातील जैविक संवर्धन साठा बघण्‍यासाठी जगभरातील पर्यटक, अभ्‍यासक, विद्यार्थी या गार्डनला भेट देतील. या बॉटनिकल गार्डनमुळे विसापूर आणि सभोवतालची गावे विकासाचे हब म्‍हणून पुढे येतील. त्‍यामुळे जिल्‍हयातील आदिवासी व ग्रामस्थांची जीवनमान उंचावण्‍यासाठी मदत होणार आहे. या बॉटनिकल गार्डनचे काम अंतिम टप्‍प्‍यात आहे. बॉटनिकल गार्डन, कन्‍झर्वेशन झोन आणि रिक्रीएशन झोन अश्‍या तीन विभागामध्‍ये उद्यान तयार होत आहे. या बॉटनिकल गार्डनला भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांचे नांव देण्‍यात येणार असल्‍याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

ताडोबात टायगर व बिबट सफारी सुरू करणार

            ताडोबा-अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍प हे उत्‍तम पर्यटन स्‍थळ म्‍हणून जगाच्‍या नकाश्‍यावर यावे यादृष्‍टीने आपण प्रयत्‍नशील आहोत. ताडोबा-अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पात टायगर व बिबट सफारी सुरू करण्‍याचा प्रकल्‍प अपूर्णावस्‍थेत आहे. टायगर व बिबट सफारीच्‍या माध्‍यमातून येथे येणा-या पर्यटकांना वन्‍यजीव दर्शनाची विशेष सोय उपलब्‍ध होणार आहे. यादृष्‍टीने देखील जलदगतीने कार्यवाही करण्‍याचे निर्देश त्‍यांनी यावेळी दिले.

बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करा

            चंद्रपूर जिल्‍हयातील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र हा रोजगार निर्मितीच्‍या दृष्‍टीने महत्‍वपूर्ण प्रकल्‍प आहे. या प्रकल्‍पाच्‍या ठिकाणी बांबु कामावर फायर रिटारडंट पॉलीश करणे, आग प्रतिबंधक योजनेनुसार कार्यशाळा इमारत व स्‍वयंपाकगृह इमारतीचे बांधकाम करणे तसेच विद्युत विषयक कामे प्रलंबित आहेत. यासाठी नुकताच १४ कोटी रू. निधी मंजूर झालेला आहे. ही कामे जलदगतीने पूर्ण करण्‍याच्‍या दृष्‍टीने कार्यवाही करण्‍याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

वनअकादमी पूर्ण क्षमतेने पुढे नेण्‍याबाबत कार्यवाहीचे निर्देश

            चंद्रपूर येथील वनप्रशासन विकास व व्‍यवस्‍थापन प्रबोधिनी अर्थात वनअकादमीशी संबंधित कामांना गती देत पुढे नेण्‍याची आवश्‍यकता आहे. वनअकादमीत आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्रशिक्षण केंद्राच्‍या निर्मितीची आवश्‍यकता आहे. अकादमीतील रिक्‍त पदांची भरती करणे सुध्‍दा गरजेचे आहे. वनअकादमीचे वनविद्यापीठात रूपांतर करण्‍याच्‍या दृष्‍टीने समिती नेमून त्‍यादृष्‍टीने जलदगतीने कार्यवाही करण्‍याचे निर्देश वनमंत्र्यांनी दिले. देशातील अत्‍याधुनिक अशा स्‍वरूपाची ही वनअकादमी सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण व्‍हावी असेही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले.

            वनविभागाचे प्रधान सचिव श्री. वेणुगोपाल रेड्डी आणि प्रधान मुख्‍य वनसंरक्षक श्री. वायएलपी राव यांच्‍यासह झालेल्‍या चर्चेत वरील विषयांवर विस्तृत चर्चा झाली. हे प्रकल्‍प जलदगतीने पूर्ण करण्‍याच्‍या दृष्‍टीने कालबध्‍द कार्यक्रम तयार करण्‍याचे निर्देश वनमंत्र्यांनी यावेळी दिले. दर पंधरा दिवसांनी चंद्रपूरला येवून सचिवांनी या प्रकल्‍पांबाबत आढावा घेण्‍याचे निर्देशही त्‍यांनी दिले.



मदत शेतकऱ्यांसाठी

 अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी वाढीव दराने 3 हजार 501 कोटी रुपयांची मदत

            मुंबई,दि.9 : राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे एकूण 23 लाख 81 हजार 920 हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून 25 लाख 93 हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 3 हजार 501 कोटी रुपयांची मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा वाढीव दराने वितरीत करण्यात येणार  आहे.

             आपदग्रस्त शेतक-यांना मंजूर मदत तातडीने वितरीत  करण्याचा आदेश मदत व पुनर्वसन विभागाकडून काढण्यात आला आहे.नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधितांच्या मदतीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता.त्यानुसार जिरायत शेतीसाठी पूर्वीचा दर  प्रति हेक्टरी 6800 वरून वाढवून प्रति हेक्टरी 13 हजार 600 रुपये,बागायत शेतीसाठी प्रति हेक्टरी 13 हजार 500 रूपयांवरन 27 हजार रुपये आणि बहुवार्षिक शेतीसाठी पूर्वीचा दर 18 हजार रूपयांवरून 36 हजार रुपये करण्यात आला आहे.जिरायत,बागायत व बहुवार्षिक पिकांच्या बाबतीत यापूर्वी दोन हेक्टरच्या मर्यादेत वाढ करून प्रती तीन हेक्टर अशी वाढ करण्यात आली आहे.

             शेतक-यांसाठीचा मदतीचा निधी संबंधित विभागीय आयुक्तजिल्हाधिका-यांकडे  वर्ग करण्यात आला आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाइन पद्धतीने जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.याबाबतचा शासननिर्णय मदत व पुनर्वसन विभागाने सप्टेंबर  2022  रोजी निर्गमित केला.

शुभ दिवस

 







जनता त्रस्त डी जे मस्त, वाजवा

: विसर्जन आणि हतबल महिला पोलीस 

********************

पुण्यातील टिळक रोड वर माझे ऑफिस. तिथे कालपासून विसर्जन मिरवणूक सुरु आहे ! 

काल पासून मी ऑफिसात अडकून आहे. टिळक रोड क्रॉस करता येत नसतो २ दिवस ! आणि डीजे डॉल्बी इतके जोरात कि कानात हेडफोन लावून काम करत बसलोय! तरी आवाज सहन होत नाहीये !! अगदी खिडकीच्या काचा सुद्धा थरथर करत आहेत⁠⁠⁠⁠!

सकाळी थोडावेळ खाली फुटपाथवर जाऊन मिरवणूक तरी पाहावी म्हणून गेलेलो.  तर एका पोलिसाने कळवळून विचारले कि "इथे जवळ कुठे बाथरूम आहे का हो ? आमच्या लेडी हवालदार ला गरज आहे !"

***

मला शरम वाटली आपल्या शासन व्यवस्थेची !! 

मी  त्यां पोलिसांना आमच्या गेटचे कुलूप उघडून ऑफिसात आणले ! सहा सात लेडी होत्या ! त्यांना ऑफिसची वॉशरूम उघडून दिली !! नंतर त्यांना विनंती करून "बसा पाच मिनिट" असे सांगून त्यांना बसवले, आणि ऑफिसात असलेले पार्लेची  बिस्कीट दिली. पाणी दिले. 

****

त्यावेळी एक लेडी हवालदार म्हणाली, "खाणे पिणे जाऊ द्या, पण रस्त्याच्या कडेला टेम्पररी वॉशरूम सुद्धा उभ्या केल्या नाहीत कुणी ! आणि म्हणे आम्ही यांचे रक्षण करायचे ! कसे करायचे सांगा ना ?"

डोळ्यात माझ्याच पाणी आले, त्यांचे हाल पाहून ! आणि निरुत्तर झालो ! काय उत्तर देणार त्या महिलांना ?

***

डीडी नोट : मला कुणावर टीका करायची नाहीये ! पण लाखो करोडो रुपयाची उधळण डीजे डॉल्बी वर करू शकणारी मंडळी साधी मोबाईल टॉयलेट व्हॅन नाही समाजासाठी उपलब्ध करून देऊ शकत ? (काही ठिकाणी कुणी अशी सोय केली असेल तर त्याला दंडवत. पण माझ्या पाहण्यात तरी नाही आले कधी)

***

यंदाचा तर गणेशोत्सव आता संपेल. किमान पुढच्या वर्षी तरी कोणी "जागे" होऊन यावर विचार करील का ?

( विचार पटला असल्यास शेयर करा ! म्हणजे किमान जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे जाईल ) डीजेच्या आवाजाने आजारी व्यक्ती, लहान मुलं,गरोदर स्ञीया किंवा परीक्षार्थींचे काय होत असेल? 😨😨

Friday, 9 September 2022

शत्रू नाशाय:


 *श्री बगलामुखीदेवी मंदिर.*संकलन - सुधीर लिमये पेण 

दशमहाविद्यांमध्ये श्री बगलामुखी ही एक महाविद्या आहे. श्री बगलामुखीदेवीचे मंदिर कांगडा (हिमाचल प्रदेश) जिल्ह्यातील बनखंडी गावामध्ये आहे. पांडुलिपीमध्ये देवीचे जसे वर्णन आहे, त्याच स्वरूपात देवी येथे विराजमान आहे.

देवीचे हे मंदिर महाभारत काळातील आहे. द्वापरयुगामध्ये पांडवांनी अज्ञातवासात असतांना एका रात्रीत हे मंदिर बांधले आणि पूजाअर्चा केली. या मंदिरात प्रथम अर्जुन आणि भीम यांनी युद्धकलेत यशप्राप्ती होण्यासाठी देवीची उपासना केली होती.

शत्रूनाशिनी देवी बगलामुखी. मंदिरामध्ये विविध प्रकारच्या त्रासांच्या निवारणासाठी शत्रूनाश हवन करवून घेतले जाते. देवीच्या मंदिरामध्ये हवन केल्यानेे मनोवांच्छित फलप्राप्ती होते.

१. श्री बगलामुखीदेवीची उत्पत्ती.

एकदा दानवाने ब्रह्मदेवाचा ग्रंथ चोरून पाताळात लपवून ठेवला. ‘त्याला पाण्यामध्ये मनुष्य किंवा देवता मारू शकणार नाही’, असे वरदान होते. अशा वेळी ब्रह्मदेवाने देवी भगवतीची उपासना केली. यातून श्री बगलामुखीदेवी अवतरली. देवीने बगळ्याचे रूप धारण करून त्या दानवाचा वध केला आणि ब्रह्मदेवाला त्यांचा ग्रंथ परत केला.

सत्ययुगात एकदा सृष्टीत भयंकर वादळ आले. या वादळाला शांत करण्यासाठी भगवान श्रीविष्णूने तपश्‍चर्या करून श्री बगलामुखी देवीला प्रसन्न करून घेतले होते. लंकेवर विजय मिळवण्यासाठी श्रीरामाने शत्रूनाशिनी श्री बगलामुखीदेवीचे पूजन केले आणि त्याला विजय प्राप्त झाला.’

२. सत्वर प्रसन्न होऊन भक्तांची संकटे दूर करणारी श्री बगलामुखीदेवी आणि तिची उपासना यांची वैशिष्ट्ये.

अ. शिव आणि श्री महाकालीदेवी यांच्या खालोखाल ही देवी लवकर प्रसन्न होते, असे म्हणतात. साधना करून लगेच काही प्राप्त करण्यासाठी या देवीचे स्तवन प्रामुख्याने करतात.

आ. बगलामुखी-ब्रह्मास्त्र मंत्रजप अतिशय मारक स्वरूपात म्हणतात. मंत्रजप करतांना म्हणणार्‍याची झोप उडेलच; पण ऐकणार्‍यालाही विलक्षण शक्तीत वावरत असल्याची जाणीव होते. विशेषतः या चैतन्यात त्याचीही झोप उडालेली असते.’ डॉ. अजय जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

इ. बगलामुखी- ब्रह्मास्त्र मंत्रजपाने शत्रूचा संहार होतो.

ई. हा मंत्रजप विन्मुख होत नाही; म्हणजे जे साध्य करण्यासाठी साधना करतात, ते साध्य झाल्याखेरीज रहात नाही; म्हणूनच याला ‘ब्रह्मास्त्र मंत्र’ असे संबोधतात. याचा गैरवापर कुणीही करू नये; म्हणून धर्मशास्त्राने ही देवी अन् तिची साधना यांविषयीची माहिती गुप्त ठेवली आहे.’- श्री. प्रेमप्रकाश सिंह, बीरमित्रापूर, ओडिशा.

उ. ‘श्री बगलामुखीदेवीचा रंग सुवर्णासारखा पिवळा आहे. त्यामुळे देवीला ‘पितांबरी’ असेही म्हणतात. देवीचे वस्त्र, प्रसाद आणि आसन यांपासून प्रत्येक गोष्ट पिवळीच असते. देवीला पिवळा रंग प्रिय आहे; म्हणून देवीच्या पूजनामध्ये पिवळ्या रंगाच्या साहित्याचा उपयोेग होतो. देवीची उपासना करतांना साधकाने पिवळे वस्त्र परिधान केले पाहिजे.

ऊ. श्री बगलामुखीदेवीमध्ये संपूर्ण ब्रह्मांडाच्या शक्तीचा समावेश आहे.

ए. देवीचे अनेक स्वरूप आहेत. या महाविद्यादेवीची उपासना रात्रीच्या वेळी केल्याने विशेष सिद्धी प्राप्त होते.

ऐ. देवीचे भैरव महाकाल आहे. देवी बगलामुखी भक्तांचे भय दूर करून शत्रू आणि अनिष्ट शक्ती यांचा नाश करते.

स्रोत: आंतरजाल, सनातन (हिंदु ) धर्म

एकावर एक फ्री

 सर्वच झाडे ऑक्सिजन देतात

परंतु

मोहाची, काजूची, जांभळाची,

माडाची, ताडाची झाडे त्यातही

स्वतःचं वेगळेपण ठेवतात, ही झाडे

ऑक्सिजन तर देतातच..

सोबत 

इंग्लिश स्पीकिंग कोर्स देखील

करून घेतात...!!!

🤣🤣🤣🤣🤣

आदी वंदू तुज मोरया

 


Featured post

Lakshvedhi