Tuesday, 6 September 2022

भेटी लागे ;जीवा लागलीस आस


 आमदार भातखळकर यांच्या विविध गणेश मंडळाना भेटी

          कांदिवली पूर्व विधानसभेतील विविध गणेश मंडळांना आमदार अतुल भातखळकर यांनी भेटी दिल्या. ठिकठिकाणी तरुण मंडळांनी उभारलेले देखावे पाहून मंडळाच्या कार्यकर्त्यांचे आमदार भातखळकर यांनी कौतुक केले.

           कांदिवली पूर्व मधील हनुमान नगर, पोईसर, अशोक नगर, स्टेशन रस्ता, म्हाडा लोखंडवाला तसेच मालाड पूर्व मधील दत्त मंदिर रोड, राणीसती रोड, पुष्पा पार्क, धनजीवाडी यासह विविध ठिकाणच्या गणेश मंडळांना आमदार भातखळकर यांनी भेट दिली. श्री गणरायाची आरती करून गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या. अनेक घरगुती गणेशाचेही दर्शन घेतले. गणेश मंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.

       श्री गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील ठाकूर कॉम्प्लेक्स, पायोनियर शाळेजवळ तसेच लोखंडवाला येथील कृत्रिम विसर्जन तलावाची पाहणी करून आढावा घेतला. विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये, याबाबत प्रशासनाला सूचना केल्या.

       गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील कोकण वासियांसाठी केवळ दोनशे रुपयांमध्ये गावी जाण्यासाठी दहा एसटी बसेसची सोय करून देण्यात आली. याचा लाभ कोकणवासीयांनी घेतला.


    

वाह गणेशजी, देखिये टेक्नॉलॉजी

 बघा देश किती प्रगती करतोय. 😆😆

इथे कोल्हापूरकरांनी गणपती विसर्जनाची मशीन पण आणली.


कोल्हापूर येथील स्वयंचलित गणेश विसर्जन यंत्रणा.

बदल गया इंसान




 

प्रथम तुज पाहता


 

भवताल,हाफकिन संस्था


 हाफकिन नावाचा माणूस की संस्था?... याची गोष्ट

(भवतालाच्या गोष्टी ५५)

सध्या ‘हाफकिन’ हे नाव वेगळ्याच कारणासाठी गाजत आहे. ती ‘व्यक्ती की संस्था?’ याबाबत राज्याच्या आरोग्यमंत्र्यांचे कथित अज्ञान दाखवून देणारी बातमी व त्याबाबतच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत. या निमित्ताने का होईना ‘हाफकिन’ ची चर्चा होत आहे हे चांगलेच. कारण या नावाच्या व्यक्तीने १२५ सव्वाशे वर्षापूर्वी आपल्यासाठी प्लेगची पहिली लस विकसित केली आणि लाखो लोकांचे प्राण वाचवले. तेव्हापासून आजपर्यंत या माणसाचे आणि या नावाच्या संस्थेचे लसनिर्मिती आणि औषधनिर्मितीच्या क्षेत्रातील योगदान थक्क करणारे आहे. त्याची याच संस्थेच्या माजी संचालकांनी सांगितलेली ही गोष्ट!

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-

https://bhavatal.com/Haffkine

(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ५५ वी गोष्ट.)

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com

इतरांसोबत शेअरही करा.

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


राष्ट्रीय पुरस्कार

 महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार' प्रदान

            नवी दिल्ली, 05 : महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२२ चे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. यामध्ये मुंबईतील छत्रभूज नरसी मेमोरियल स्कूलच्या मुख्याध्यापिका कविता सांघवी, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील दामू नाईक तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहायक शिक्षक शशिकांत कुलथे आणि याच जिल्ह्यातील पारगाव जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद, क्लस्टर प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ वाळके यांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.


        येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय शिक्षक दिना’च्या निमित्त केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार' वितरण समारोहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शालेय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी, डॉ. सुभाष सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंह, अपर मुख्य सचिव (उच्च व तंत्रशिक्षण ) राकेश रंजन, यासह वरिष्ठ अधिकारी मंचावर उपस्थित होते.


       याप्रसंगी देशभरातील एकूण 45 शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ने गौरविण्यात आले. राज्यातील तीन शिक्षकांचा यात समावेश आहे. मानचिन्ह व प्रशस्ती पत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.


            मुंबईतील छत्रभूज नरसी मेमोरियल शाळेच्या मुख्याध्यापिका कविता सांघवी या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा, विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला वाव मिळावा, यासाठी वेगवेगळे प्रयोग प्रत्यक्ष राबवितात. यासह वर्ष 2020 मध्ये ‘नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणा’ची घोषणा करण्यात आली. प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना हे कसे उपयोगी ठरेल यावर त्या भर देतात. श्रीमती सांघवी यांनी 'ग्लोबल आउटलुक' नावाचा स्टीम-आधारित अभ्यासक्रम तयार केला आहे. त्या उत्तम प्रशासकही आहेत. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील या नाविण्यपूर्ण कामाची दखल घेत त्यांना आज राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


            बीड जिल्ह्यातील पारगाव जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद, क्लस्टर प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ वाळके यांनी लोकसहभागातून शाळेसाठी 15 लाख रूपयांपेक्षा अधिक निधी उभारून शाळेचा कायापालट केला. शाळेच्या भौतिक सुविधेत वाढ झाली, शाळेत रेकॉर्डिंग स्टुडियो, म्युझिक स्टुडियो उभे केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळू लागला. विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्यांचा विकास व्हावा, यासाठी रोबोटीक, कोडींग, ड्रोन संदर्भातील प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञान अर्जित करीत नसून ते जीवनाचे ज्ञान अर्जित करण्यावर भर देत असल्याचे श्री. वाळके त्यांनी सांगितले. श्री. वाळके यांनी त्यांना मिळालेला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारामंध्ये सर्वांचा वाटा असल्याचे व्यक्त केले.


            बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याच्या दामू नाईक तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहायक शिक्षक शशिकांत कुलथे हे ज्या शाळेत शिकवितात त्या शाळेतील बहुतेक विद्यार्थी हे बंजारा समाजातील आणि ऊसतोड कामगार कुटूंबातील आहेत. स्थालांतरित कुटूंबातील विद्यार्थी या शाळेत शिकत असल्यामुळे श्री. कुलथे यांनी या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह तयार केले. शाळेमार्फत येथील विद्यार्थ्यांना जेवण पुरविले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांची गळती शून्यावर आली आहे. या शाळेत येणाऱ्या बहुतेक विद्यार्थ्यांची भाषा ‘गोलमाटी’ असल्याने त्यांना प्रमाण मराठी भाषा यावी यासाठी गोलमाटी आणि मराठी भोषेचे सचित्र पुस्तकाचे लेखन करून बोलीभाषेकडून प्रमाण भाषेकडे येण्याचा प्रयत्न श्री. कुलथे यांनी केला. यासह ते संगीताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कवितेत गोडी निर्माण करण्याचा प्रयत्नही करतात. आज शाळेतील विद्यार्थी मराठी, इंग्रजीतून आयसीटी, जॉयफुल शिक्षण प्रणाली अंतर्गत येणाऱ्या उपक्रमांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होत असल्याचे श्री. कुलथे यांनी यावेळी सांगितले.



धोरण शिक्षणाचे

 नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांची प्रगती

- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

 

            मुंबईदि. 5 : देशाने ‘नवीन शैक्षणिक धोरण 2020’ चा अवलंब केला असून या धोरणामुळे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती होईल. असे मत केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले. श्री. शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत पोवई येथील ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन आज करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते.

            यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसखासदार पूनम महाजनखासदार मनोज कोटकएल अँड टी चे अध्यक्ष ए.एम नाईकसीईओ एस.एम. सुब्रमण्यमचेरिटेबल ट्रस्टचे जिग्नेश नाईकप्राचार्य मधुरा फडकेशिक्षक आदी उपस्थित होते.

            मंत्री श्री. शाह म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण बहुआयामी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा लाभ होणार आहे. शिक्षकांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे मानवतावादीआध्यात्मवादी विचार देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांचा मनात रुजवावेत. एक उत्तम शिक्षक कसा असावायांचा बोध घ्यायला हवा. शिक्षकांनी  बालकांना समाजातील उत्तम नागरिक बनवावे. पंचतंत्र सारख्या बोधकथांच्या माध्यमातून विद्यार्थी घडवावेत, असेही आवाहन श्री. शाह यांनी केले.

            भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी एल अँड टी ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अशा या राष्ट्रनिर्माण कार्यात ए. एम. नाईक यांचे योगदान महत्त्वाचे असल्याने भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण या नागरी पुरस्काराने गौरविले आहे. आता श्री. नाईक यांनी पायाभूत सुविधांसोबतच व्यक्तिनिर्माण करुन   राष्ट्रनिर्माण करावे, अशा शुभेच्छा दिल्या.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेनवीन शैक्षणिक धोरणामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबर त्यांचे चांगले चारित्र्य निर्माण होणार आहे. या धोरणामुळे समाजातील सर्व वर्गातील व्यक्तींना समान संधी उपलब्ध होतील. विद्यार्थी हे हिऱ्यासारखे मौल्यवान असून त्यांना पैलू पाडण्याचे कार्य शिक्षक करतात, असे सांगून शिक्षक दिनानिमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.


Featured post

Lakshvedhi