Friday, 2 September 2022

चलो अलिबाग


 

शिस्त लावली च पाहिजे


 

प्रदर्शन

 फोर स्टोरीज’ कला प्रदर्शनास उपमुख्यमंत्र्यांची भेट

महाराष्ट्राला कला, संस्कृतीचा समृद्ध वारसा

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            मुंबई, दि. 1 : महाराष्ट्राला कला, संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. कला ही मोठी संपत्ती आहे. त्याची किंमत करता येत नाही. कलाकारांच्या चांगल्या विचारातून रेखाचित्र रेखाटले जाते. साहित्य, कला यातून साकारलेले समृद्ध विचार आपण कधीच खोडू शकत नाही. ते कायमस्वरूपी मनात राहतात, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            मुंबईत जहांगीर कला दालनात भरविण्यात आलेल्या ‘फोर स्टोरीज’ या कला प्रदर्शनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी माजी आमदार राज पुरोहित, माजी खासदार विजय दर्डा, सौ. अमृता फडणवीस, कलाकार जयश्री भल्ला, रचना दर्डा, बीना ठकरार, लोकमत वृत्तपत्र मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी, अनेक कलाकार उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, कला, संस्कृती, चालीरिती यावरून त्या त्या राज्याची ओळख असते. चित्रप्रदर्शन पाहिल्यानंतर लक्षात येते की, किती समृद्ध विचाराने ह्या चित्रकथा रेखाटलेल्या आहेत. कलाकार आपल्या कलेतून कला, संस्कृती जपत असतो. त्याची किंमत करता येत नाही. याठिकाणी चार कलाकारांनी एकत्रित या प्रदर्शनात विविध चित्रकथा रेखाटलेल्या आहेत.

            माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह वास्तुविशारद जयश्री भल्ला, छायाचित्रकार रचना दर्डा आणि बीना ठकरार यांनी रेखाटलेली चित्रे या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.

            माजी खासदार श्री.दर्डा म्हणाले, या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणारी रक्कम नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील शहीद पोलिसांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देण्यात येणार आहे. हे प्रदर्शन दि. ५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

Thursday, 1 September 2022

हासासासासा

 *मालवणी टॅलेंट* मास्तर : मुलांनो मला सांगा राम वनवासाला कधी निघाले 😚                      

बंडया : मास्तर राम वनवासाक 9:15 वाजता निघाले 😙

मास्तर : 9:15 वाजता ते कसे...😗

बंड्या : *वनवास* यो शब्द उलटो वाचा.....😎

मास्तर शाळा सोडून वनवासाच्या तयारीत लागलेत

😉😀😆😜😆😜🤣🤣😅😅

N joy नो ग्राफी


पुरस्कार

 दिलखुलास’ कार्यक्रमात ‘बाल साहित्य पुरस्कार’ विजेत्या

डॉ. संगीता बर्वे यांची मुलाखत.

            मुंबई, दि. 01 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘बाल साहित्य पुरस्कार’ विजेत्या डॉ. संगीता बर्वे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर शुक्रवार दि. 2 सप्टेंबर, शनिवार दि. 3 सप्टेंबर आणि सोमवार दि. 5 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक श्रीदत्त गायकवाड यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            प्रसिद्ध लेखिका, कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांना ‘पियूची वही’ या कादंबरीकरिता मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमीचा ‘बाल साहित्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांचा आजवरचा लेखन प्रवास त्यांच्या मुलाखतीतून जाणून घेतला आहे. बाल साहित्याचा प्रवाह विस्तारण्याचे मोठे काम त्यांनी केले आहे. कविता, गीतलेखन, अनुवाद, बालसाहित्य आदी विषयांची सविस्तर माहिती, लेखिका डॉ. संगीता बर्वे यांनी 'दिलखुलास' या कार्यक्रमातून दिली आहे.

000000

सुखकर्ता दुःखहर्ता पोलिस

 


Featured post

Lakshvedhi