Friday, 12 August 2022

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण.

 नागरी संरक्षण दल व ‘एमआयडीसी’च्यावतीने

कामगारांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण.

       मुंबई, दि. 11 : औद्योगिक क्षेत्रात घडणाऱ्या छोट्या - मोठ्या अपघातांना प्रतिबंध बसावा, यासाठी नागरी संरक्षण दल व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) यांच्या संयुक्त विद्यमानाने औद्योगिक कामगारांसाठी तीन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण घेण्यात आले. ठाणे व बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील उद्योग क्षेत्रातील कामगार तसेच कर्मचारी या प्रशिक्षणात सहभागी झाले होते.

          'राज्य मिशन २०२२ -२०२३' अंतर्गत संचालक, नागरी संरक्षण यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी संरक्षण दलाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण रबाळे अग्निशमन केंद्र येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ येथे ३ ते ५ ऑगस्ट २०२२ दरम्यान प्रशिक्षण पार पडले.

            देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य वर्षात औद्योगिक जडणघडणीमध्ये व प्रतिबंधक उपाययोजनाद्वारे प्रशिक्षीत कामगार वर्ग तयार करण्याकरिता नागरी संरक्षण दलाच्या वतीने हे प्रशिक्षण घेण्यात आले. सामान्य नागरिकांबरोबरच, सर्व उद्योगधंदे व कारखान्यामधील कामगार कर्मचारी यांना आपत्ती व्यवस्थापनविषयक प्रशिक्षण घेता यावे व सर्व कर्मचारी प्रशिक्षीत व्हावेत, याकरीता नागरी संरक्षण दल प्रयत्नशील आहे. या प्रशिक्षणात प्रामुख्याने आग प्रतिबंध व सुरक्षा उपाययोजना, प्रथमोपचार व सीपीआर, विमोचन या विषयावर व्याख्याने व प्रात्यक्षिके पार पडली.

       "राज्य मिशन २०२२-२०२३ अंतर्गत नागरी संरक्षण विभागातर्फे सुरक्षा उपाययोजनांकरिता जास्तीत जास्त औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी वर्गाला प्रशिक्षण देण्याचा मानस आहे. यावेळी नागरी संरक्षण संचालनालय तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिवन गाणे गात


 राज्यभरातील कारागृहांत उमटले “जीवनगाणे गातचं जावे”चे सूर...

एकाच दिवशी एकाच वेळी 36 कारागृहात विशेष कार्यक्रमांचे आयोजन.

राज्याच्या गृह विभागाच्या सहकार्यातून सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा अनोखा विक्रम.

            मुंबई, दि. 11 : छोट्या मोठ्या चुकांमुळे कैदी बनून आयुष्य जगणाऱ्या बनलेल्या अनेकांसाठी आजचा दिवस विशेष ठरला.. निमित्त होते, “जीवन गाणे गातचं गावे”... या अनोख्या कार्यक्रमाचे... स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत, राज्यातील 36 प्रमुख कारागृहांत सांस्कृतिक, प्रबोधनात्मक व समुपदेशनात्मक कार्यक्रमाचे आज आयोजन करून, सांस्कृतिक कार्य संचालनालयाने एक विक्रम केला.

            "जीवन गाणे गातच जावे..." या विशेष कार्यक्रमाचे एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात कारागृहात आयोजन होण्याची ही घटना, देशाच्या व राज्याच्या इतिहासात प्रथमच घडली. व्यावसायिक कलाकारांसोबतच, कारागृहातील कैद्यांनीही या कार्यक्रमात सादरीकरण केले हे या कार्यक्रमांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य!

            राज्यात सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. या महोत्सवात अनेक अभिनव उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक म्हणजे राज्यातील प्रमुख कारागृहात सांस्कृतिक, समुपदेशनात्मक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करणे. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्या मार्गदर्शनाखाली बिभीषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत या कार्यक्रमासाठी एकूण 36 कला समूह निवडण्यात आले होते. एक महिन्यापासून या कार्यक्रमाचे नियोजन सुरू होते. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी गृह विभागाच्या मदतीने सूक्ष्म नियोजन केले होते. या कार्यक्रमांत 1000 हून अधिक कलाकार सहभागी झाले होते. बहुतांश कार्यक्रमासाठी संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, न्यायाधीश उपस्थित होते. कारागृहातील कैद्यांसाठी झालेल्या कार्यक्रमात, सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला, प्रबोधन, समुपदेशन, योग क्रिया याबरोबरच इतर कार्यक्रम ही आयोजित केले होते.

कारागृहातील कैद्यांचे उत्कृष्ट सादरीकरण

            "जीवन गाणे गातच जावे..." या कार्यक्रमात कारागृहातील अनेक कैद्यानी सादरीकरणात सहभाग घेतला. काही कैद्यांनी अप्रतिम वादन, गायन, काव्यवाचन आणि नृत्य करून त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव दिला. कैद्यांमधील कलाकार पाहण्याची दुर्मिळ संधी यावेळेस सर्वांना मिळाली. अशा कार्यक्रमांचे आयोजन वारंवार करावे, अशी अपेक्षाही अनेकांनी केली. जाणते आजाणतेपणाने झालेल्या चुकांमुळे, शिक्षा भोगावी लागत असल्याचे काही कैद्यांनी स्पष्ट केले. मात्र आजच्या कार्यक्रमामुळे नवी दिशा मिळाली असून, भावी आयुष्यासाठी त्याचा चांगला उपयोग होईल, अशी आशाही अनेकानी व्यक्त केली. कार्यक्रमाचे शीर्षक "जीवन गाणे गातच जावे..", यामुळे ही एक नवी ऊर्जा मिळाली असून, जीवनात नवा अध्याय सुरू करणार असल्याची भावनाही काही कैद्यांनी बोलून दाखवली.

राज्याच्या गृहविभागाचे सहकार्य.

            राज्याच्या गृह विभागाने या उपक्रमासाठी सर्व सहकार्य केले. तुरुंग प्रशासन आणि गृह विभाग यांनी केलेल्या सहकार्यामुळे हे कार्यक्रम होऊ शकले. राज्याच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत तुरुंग प्रशासनाला आदेश देऊन सहकार्य करण्याबाबत कळविले होते. अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा पुणे, सुनील रामानंद यांनी वैयक्तिक लक्ष घालून याबाबत संबंधितांना योग्य ते निर्देश दिले. हेमंत पवार संशोधन अधिकारी, कारागृह व सुधार सेवा यांनी याबाबत योग्य तो समन्वय ठेवून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

कलाकारांच्या प्रतिक्रिया

             कारागृहातील कैद्यांसाठी कार्यक्रम करणे हे कलाकारांसाठी आव्हान होते व हा एक वेगळा अनुभव होता असे अनेक कलाकारांनी नमूद केले. या कार्यक्रमांमधून मनोरंजन व प्रबोधन करण्याची संधी मिळाल्याबद्दल अनेक कलाकारांनी शासनाचे आभार मानले.

            कारागृहातील अधिकारी व कर्मचारी यांनी, असे कार्यक्रम कारागृहात प्रथमच होत असल्याबद्दल शासनाचे अभिनंदन करून आभार मानले. तसेच असे कार्यक्रम वारंवार आयोजित करावेत जेणेकरून कैद्यांचे प्रबोधन आणि समुपदेशन होऊ शकेल आणि त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वादी घेता येईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

            या कार्यक्रमाच्या धर्तीवरच पुढील महिन्यात राज्यातील 36 जिल्ह्यातील वृद्धाश्रमांतही अशाच प्रकारचे कार्यक्रम होणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक यांनी स्पष्ट केले आहे.

            भायखाळा जिल्हा करागृह येथे महिला बंद्यांकरिता आयोजित करण्यात आलेल्या याकार्यक्रमाच्या वेळी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहसंचालक श्री. संदीप शेंडे व 

पाणी रे पाणी


 

ताईचे रक्षबनंधन


 

रक्षा बंधन

ये राखी बंधन हैं ऐसा




 

अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा"

 राज्यभरात "अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा" मोहिमेचे आयोजन

             मुंबई, दि. 11 : स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे राज्यशासनातर्फे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 12 ऑगस्ट 2022 रोजी राज्यभरात अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या सर्व विभागांनी आपल्या स्तरावर "अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा" घ्यावी, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

        “ प्रिय मित्रानो., तरुणाई ही कोणत्याही राष्ट्राची ऊर्जा असते आणि तरुणांच्या शक्तीचे समाज आणि देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी नशामुक्त भारत अभियानात सहभागी होणे अत्यंत गरजेचे आहे. देशासमोरील हे आव्हान स्वीकारून आज आपण नशामुक्त भारत अभियानांतर्गत एकजूट होऊ आणि केवळ समाज, कुटुंब, मित्रच नव्हे तर आपण स्वतः ही नशामुक्त होऊया कारण बदलाची सुरुवात स्वतःपासूनच झाली पाहिजे.” अशी प्रतिज्ञा घेवून आपला जिल्हा / राज्य (नाव) नशामुक्त करण्याचा दृढ संकल्प करण्याचे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

खेलो

 *अनाथालय से ऑस्ट्रेलिया टीम के कैप्टन तक की यात्रा!*



 "जन्म देने के बाद लड़की को फेंकने वाले माता-पिता अंदर ही अंदर रो रहे होंगे क्योंकि वे अपनी पैदा हुई बेटी से भी नहीं मिल सकते"

 महाराष्ट्र के पुणे शहर में एक अनाथालय है, जिसे 'श्रीवास्तव अनाथालय' कहा जाता है। 13 अगस्त 1979 को शहर के एक अनजान कोने में एक लड़की का जन्म हुआ, माता-पिता को नहीं पता था कि यह एक मजबूरी है, कि उन्होंने सुबह-सुबह इस अनाथालय के पालने में अपने जिगर का एक टुकड़ा फेंक दिया, प्रबंधक अनाथालय की प्यारी सी बच्ची का नाम 'लैला' रखा गया।

 उन दिनों हरेन और सू नाम का एक अमेरिकी जोड़ा भारत घूमने आया था। उनके परिवार में पहले से ही एक लड़की थी, भारत आने का उनका मकसद एक लड़के को गोद लेना था। वे एक सुन्दर लड़के की तलाश में इस आश्रम में आए। उन्हें एक लड़का नहीं मिला, लेकिन सू की नज़र लैला पर पड़ी और लड़की की चमकीली भूरी आँखों और मासूम चेहरे को देखकर उसे उससे प्यार हो गया।

 कानूनी कार्रवाई करने के बाद, लड़की को गोद ले लिया गया, सू ने अपना नाम लैला से बदलकर 'लिज' कर लिया, वे वापस अमेरिका चले गए, लेकिन कुछ वर्षों के बाद वे सिडनी में स्थायी रूप से बस गए।

 पिता ने बेटी को क्रिकेट खेलना सिखाया, घर के पार्क से शुरू होकर गली के लड़के के साथ खेलने तक का यह सफर चला। क्रिकेट के प्रति उनका जुनून अपार था, लेकिन उन्होंने अपनी पढ़ाई भी पूरी की। उसे एक अच्छा मौकि मिला, उसने अपनी पढ़ाई पूरी की और आगे बढ़ गई। पहले वो बोलती थीं, फिर उनका बल्ला बोलने लगा और फिर उनके रिकॉर्ड बात करने लगे.

 1997- न्यू-साउथ वेल्स द्वारा पहला मैच

 2001- ऑस्ट्रेलिया का पहला ODI

 2003- ऑस्ट्रेलिया द्वारा पहला टेस्ट

 2005- ऑस्ट्रेलिया द्वारा पहला टी20

 आठ टेस्ट मैच, 416 रन, 23 विकेट

 125 वनडे, 2728 रन, 146 विकेट

 54 टी-20, 769 रन, 60 विकेट

 वनडे में 1000 रन और 100 विकेट लेने वाली पहली महिला क्रिकेटर

जब आईसीसी की रैंकिंग प्रणाली शुरू हुई तो वह दुनिया के नंबर एक ऑलराउंडर थे।

 ऑस्ट्रेलियाई कप्तान! बहुत खूब!

 ODI और T-20 - चार विश्व कप में भाग लिया।

 2013 में उनकी टीम ने क्रिकेट विश्व कप जीता, उसके अगले दिन इस खिलाड़ी ने अंतरराष्ट्रीय क्रिकेट को अलविदा कह दिया।

  इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल (ICC) ने लीजा स्टालगर को अपने हॉल ऑफ फेम में शामिल किया है।

 इसलिए कहा जाता है कि हर इंसान अपनी किस्मत लेकर आता है, माता-पिता ने लड़की को एक अनाथालय में छोड़ दिया, लेकिन नियति उसे पहले अमेरिका ले गई और फिर उसे ऑस्ट्रेलियाई क्रिकेट टीम का कप्तान बना दिया और उसे दुनिया के महान क्रिकेटरों में से एक बना दिया।

Featured post

Lakshvedhi