Thursday, 2 June 2022

 वॉर्सा - मुंबई थेट विमानसेवेमुळे व्यापारपर्यटनाला चालना मिळेल : पोलंड राजदूत

 

            मुंबई, दि. 1 : पोलंड गणराज्याचे भारतातील राजदूत प्रो. ऍडम बुराकोवस्की यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

            दिनांक ३१ मे रोजी पोलंडची राजधानी वॉर्सा येथून मुंबई पर्यंत थेट विमानसेवा सुरु झाल्यामुळे भारत व पोलंड देशांमधील व्यापार व पर्यटनाला चालना मिळेल, असे राजदूत बुराकोवस्की यांनी यावेळी राज्यपालांना सांगितले. पोलिश एअरलाईन्सची ही विमानसेवा आठवड्यातून तीनदा असेल असे त्यांनी सांगितले.

            पोलंड - भारत राजनैतिक संबंध १९५४ साली सुरु झाले असले तरी मुंबई येथील दूतावास सन १९३३ पासून सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पोलंडमध्ये ४०,००० भारतीय राहत असून ते विविध क्षेत्रात चांगले योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.

            शिक्षण क्षेत्रात देखील पोलंड भारताशी सहकार्य करण्यास इच्छूक असून आजच मुंबई विद्यापीठाच्या प्रकुलगुरूंची भेट घेतल्याचे राजदूतांनी सांगितले.

महाराष्ट्राशी जुने संबंध

            पोलंड येथून काही निर्वासित दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कोल्हापूर येथे आले होते त्यामुळे पोलंडचे महाराष्ट्राशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. पोलंड सरकारच्या वतीने कोल्हापूर येथे एक स्मारक तयार करणार असून या संदर्भात संभाजी छत्रपती यांच्याशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.   भारतातील काही चित्रपट पोलंड येथे चित्रित झाल्याचे त्यांनी सांगितले.

            बैठकीला पोलंडचे मुंबईतील वाणिज्यदूत डेमियन इरझिक हे देखील उपस्थित होते.

०००

Polish Ambassador meets Maharashtra Governor

      "Direct flights between Warsaw - Mumbai will promote business, tourism": Ambassador Burakowski

      The Ambassador of the Republic of Poland to India Prof Adam Burakowski today said that the establishment of direct air connectivity between Warsaw and Mumbai will promote business and tourism between Poland and India.

      The Polish Ambassador was speaking to Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai on Wed (1 Jun). The Consul General of Poland in Mumbai Damian Irzyk was also present.

      The Ambassador told the Governor that the first direct flight from the Polish capital of Warsaw landed in Mumbai on 31st May. The flights by Polish airlines will operate thrice a week, he added. 

      The Ambassador told the Governor that there are 40,000 Indians living in Poland and contributing to various walks of life. He said Poland has a very strong bond with Maharashtra as Kolhapur had offered home to Polish refugees in the second world war. He said Poland will be creating a small museum in Kolhapur, he added.

0000


 


 खेलो इंडिया युथ गेम्स हरियाणा 2022

कबड्डी संघ हरियानाकडे रवाना

क्रीडा मंत्री सुनील केदार, क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडून शुभेच्छा.

            मुंबई, दि. 1 : खेलो इंडिया युथ गेम्समध्ये मागील तीन स्पर्धांवर महाराष्ट्रातील खेळाडूंचे वर्चस्व राहिले आहे. राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने याहीवर्षी त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे त्यांची कामगिरी उंचावली आहे. क्रीडा मंत्री सुनील केदार आणि क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र या वर्षी हॅट्ट्रीक करेन, असा विश्वास व्यक्त करून संघातील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या

             हरियाना येथे होणाऱ्या चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्ससाठी सराव शिबिरानंतर महाराष्ट्राचा कबड्डी संघ रवाना झाला. बालेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेत पदक मिळवण्याचा संघाने निर्धार केला.

            क्रीडा विभागाचे सहसंचालक चंद्रकांत कांबळे हे स्पर्धेचे नोडल ऑफिसर आहेत. क्रीडा अधिकारी अरूण पाटील हे मुख्य व्यवस्थापक आहेत. सोबत अन्य पदाधिकारी देखील संघासोबत आहेत.

            या वर्षीच्या स्पर्धेत ३७१ खेळाडू सहभागी झाले आहेत. २१ क्रीडा प्रकारांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. हरियाणातील पंचकुला या मुख्य मैदानावर या स्पर्धा होत आहेत. ४ जून रोजी स्पर्धेचे उदघाटन होईल. १३ जून रोजी स्पर्धेची सांगता होणार आहे.

            मागील तीन स्पर्धांवर महाराष्ट्रातील खेळाडूंचे वर्चस्व राहिले. राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे त्यांची कामगिरी उंचावली आहे. गीता साखरे (पुणे) या मुलींच्या कबड्डी संघाच्या प्रशिक्षक, राजेश पाडावे (मुंबई) मुलांच्या संघाचे प्रशिक्षक आहेत. क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे हे संघ व्यवस्थापक आहेत.

--------

सहभागी क्रीडा प्रकार

            राज्यातील तब्बल २१ क्रीडाप्रकारातील संघ खेलो इंडिया स्पर्धेत सहभागी होणार आहेत. एकूण ३५६ खेळाडू आहेत. खेळाचे नाव व कंसात सहभागी खेळाडूंची संख्या कब्बडी (२४), बॅडमिंटन (४), कुस्ती (३३), गटका (१६), थांग ता (५), योगासन (२२), वेटलिफ्टिंग (२०), जिम्नॅस्टिक (४५), सायकल ट्रॅक ( ६), शुटिंग (७), टेनिस (६), मल्लखांब (१२), जलतरण (२८), खो-खो (२४), बास्केटबॉल (१२), अॅथलेटिक्स (३६), टेबल टेनिस (८), बॉक्सिंग (१६), ज्युदो (१४), सायकल रोड रेस (६), आर्चरी (१२). असे २१ संघ स्पर्धेत उतरले आहेत.

 पूर नियंत्रणासाठी समन्वय ठेवा

- जलसंपदा मंत्री जयंत पाटील

          मुंबई, दि. 1 : आगामी पावसाळ्यात पूराचे नियोजन करताना महसूल, पोलीस, जलसंपदा यांसह सर्वच विभागांनी परस्पर समन्वय ठेवावा, अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.

            जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज संभाव्य पूर नियंत्रणासाठी केलेल्या आणि करावयाच्या उपाययोजना यांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी सचिव विलास राजपूत, सहसचिव तथा मुख्य अभियंता अतुल कपोले, आदी उपस्थित होते.

            जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले, धरणाच्या जलाशयात येणारे पाणी व केला जाणारा विसर्ग यावर सातत्याने लक्ष ठेवून राहायला हवे. धरणातून पाणी किती सोडण्यात येणार आहे याबाबतची माहिती सतत विविध विभागांना द्यायला हवी. कमी कालावधीत जास्त पाऊस झाला आणि अचानकपणे धरणातून जास्त पाणी सोडण्याची आवश्यकता भासल्यास त्याची पुरेशी माहिती दिली जावी. पुराची परिस्थिती निर्माण झाल्यास पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठीचे नियोजन करुन ठेवायला हवे.

            वारंवार पूर येणाऱ्या भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. ज्या जिल्ह्यात आंतर राज्य मुद्दे आहेत तिथे त्या त्या राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्कात राहावे, अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.

            विदर्भात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे या भागात मोठ्या प्रमाणात पूर येतो. हा पूर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व पर्याय अंमलात आणावे, नदीनाल्यांमधील गाळ काढण्याचे काम पूर्ण करावे, शेजारच्या राज्यांशी संपर्कात राहून तिथल्या धरणाच्या पाण्याच्या नियोजनावर लक्ष ठेवावे, असे त्यांनी सूचित केले.

कर्नाटक जलसंपदा मंत्र्यांशी अलमट्टी धरणाबाबत चर्चा करणार

            पश्चिम महाराष्ट्रातील पूर नियंत्रणात ठेवण्यासाठी अलमट्टी धरणाच्या पाण्यावर विशेष लक्ष केंद्रित करावे लागते. त्याअनुषंगाने या विषयी आपण कर्नाटक राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले तसेच पूर नियंत्रणासाठी सांगली जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून पावसाचा अंदाज पाहून खबरदारीचे पावले उचलले जाईल, असेही त्यांनी आश्वस्त केले.

            मागील वर्षी कोयना भागात मोठ्या प्रमाणात भूस्खलनाच्या घटना घडल्या होत्या. यंदा भूस्खलनाच्या घटना घडू नये याची दक्षता घ्यावी असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

            बैठकीस गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मीना, गोंदिया जिल्हाधिकारी नयना गुंडे, भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम, वर्धा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार, सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह आदी उपस्थित होते.




 

 *Self discipline begins with the mastery of thoughts.If we don’t control what we think, we can not control what we do.*

*Good morning*😊



 

 


वळीव ते मान्सून, पावसातील फरकाची गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी २२)

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याचे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले. त्यावर एका खासगी हवामान संस्थेने आक्षेप घेतला आणि मान्सूनचे आगमन झालेलेच नाही, असा दावा केला. यामध्ये तुमच्या-माझ्यासारख्या सामान्यांचा गोंधळ उडतो. पण मान्सूनपूर्व वादळी पाऊस आणि प्रत्यक्ष मान्सूनच्या सरी यामधील फरक लक्षात घेतला तर कदाचित आपणही त्याचा अर्थ लावू शकू... वादळी पाऊस ते मान्सून हे पावसाचे स्थित्यंतर अनुभवणे, हा तर रोमांचक अनुभव. या जून महिन्यात त्याची संधी चालून आली आहे, ती घ्यायची का? हे तुम्हीच ठरवा!

सविस्तर वाचण्यासाठी लिंक-

https://www.bhavatal.com/PreMonsoon-Monsoon

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी भवतालाच्या गोष्टी या खास मालिकेतील ही बावीसावी गोष्ट)

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी एक पर्याय- bhavatal.com

(इतरांसोबतही शेअर करा)

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


 🌹 

                  *अदभुत !*


भारतात चोरीमुळे प्रसिद्ध झालेले एक प्राचीन मंदिर आहे. अलीकडच्या इतिहासात चार वेळा, चोरांनी मंदिराची मूर्ती चोरली पण ती परत केली कारण ते त्यासोबत फार दूर जाऊ शकत नव्हते.

त्यांनी दिलेल्या कारणांमुळे कथा आणखीनच वेधक बनवतात.

मृदंग सैलेश्वरी मंदिर हे केरळ राज्याच्या दक्षिणेकडील मुझाकुन्नू - कन्नूर जिल्ह्यात स्थित एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर परशुराम ऋषींनी स्थापन केलेल्या 108 मंदिरांपैकी एक आहे.

मंदिराला “मृदंग सैलेश्वरी” असे नाव पडण्यामागे एक कथा आहे.

मृदंग हे प्राचीन भारतातील तालवाद्य आहे. प्राचीन हिंदू शिल्पकलेमध्ये, मृदंग हे अनेकदा गणेश आणि नंदी, शिवाचे वाहन आणि अनुयायी या हिंदू देवतांच्या निवडीचे साधन म्हणून चित्रित केले जाते. मृदंग हे देव वाद्य किंवा देवांचे वाद्य म्हणूनही ओळखले जाते. असे मानले जाते की या ठिकाणी स्वर्गातून मृदंगाच्या आकारातील खडकाचा तुकडा, कदाचित एक उल्का पडली आणि ऋषी परशुरामांनी देवीचे अस्तित्व जाणवून तिला खडकात बोलावले आणि तिच्यासाठी मंदिराची स्थापना केली.

मृदंग शैलेश्वरी मंदिर हे दक्षिण भारतीय शास्त्रीय नृत्य कथकलीचे जन्मस्थान मानले जाते. या मंदिरात देवी शक्ती काली, सरस्वती आणि लक्ष्मी या तीन रूपात विराजमान आहे.

काही वर्षांपूर्वी केरळ राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक श्री. अलेक्झांडर जेकब यांनी मागील काही वर्षांत या मंदिरात झालेल्या चार दरोड्यांच्या कथा सार्वजनिक केल्या. मंदिरातील मूर्तीची अंदाजे किंमत सुमारे दीड कोटी आहे. मंदिराभोवती कोणतीही सुरक्षा नसल्याने ते चोरांचे सोपे लक्ष्य होते.

मंदिरातील पहिली फोड १९७९ मध्ये झाली. चोरट्यांनी मंदिरातून मूर्ती नेली, परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरापासून काही मीटर अंतरावर मूर्ती टाकून दिल्याचे आढळून आले. पोलिसांना गुन्हेगार शोधता आले नाहीत. विधीनुसार मूर्तीचे पुनर्वसन करण्यात आले. हा विधी ४१ दिवस चालतो आणि त्यासाठी विशिष्ट मंत्रांचे ४१ लाख वेळा पठण करावे लागतात.

काही वर्षांनी कथेची पुनरावृत्ती झाली. मात्र यावेळी पोलिसांना मूर्ती सापडली नाही आणि कोणताही सुगावा न लागल्याने तपास रखडला. मंदिराच्या अधिकाऱ्यांनी अष्टमंगला देवप्रश्न विचारण्याचा निर्णय घेतला. कारणे शोधण्यासाठी आणि उपचारात्मक कृतींचे नियोजन करण्यासाठी अष्टमंगला देवा प्रश्न केले जाते.

देवप्रश्नाने, मूर्ती तामिळनाडूच्या दिशेने प्रवास करत होती, परंतु देवीची शक्तिशाली मूर्ती तिच्या स्वतःच्या दैवी सामर्थ्याने तिच्या निवासस्थानी परत येईल, अशी गणना केली गेली.

अंदाजानुसार, 42 व्या दिवशी, पोलिसांना तामिळनाडूजवळील पलकत येथे एका महामार्गाजवळ एक बेबंद मूर्तीची माहिती मिळाली, ज्यामध्ये एक चिठ्ठी शिल्लक आहे. चिठ्ठीत लिहिले होते – “मूर्ती मृदंग शैलेश्वरी मंदिरातील आहे, आम्ही ती पुढे नेण्यास सक्षम नाही. कृपया ते मंदिरात परत करा.” 41 दिवस चालणार्‍या धार्मिक विधींसह मागील वेळेप्रमाणे पुन्हा मूर्तीचे पुनर्संचय करण्यात आले. मात्र यावेळीही पोलिसांना चोरट्यांचा माग काढता आला नाही.

ही दुसरी वेळ असल्याने तेथे पोलिस पहारा देऊन मंदिराची सुरक्षा वाढवण्याची सूचना पोलिसांनी केली. परंतु देवी स्वतःचे रक्षण करू शकते असे सांगून मंदिर प्रशासनाने हा प्रस्ताव नाकारला.

लवकरच चोरांनी तिसऱ्यांदा धडक दिली, यावेळी कर्नाटक राज्यातील टोळी. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्यांनी वायनाडच्या जंगलातून कर्नाटककडे जाण्याचा मार्ग आखला. पुढचे तीन दिवस पोलिसांना सुगावा लागला नाही, पण या वेळी, मंदिराचे अधिकारी आणि स्थानिक लोक या दोघांनाही विश्वास होता की देवी परतीचा मार्ग शोधेल, जरी पोलिस दोषींना शोधण्यात अपयशी ठरले तरी.

तिसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास, केरळमधील वायनाडमधील कलपट्टा येथील एका लॉजमधून पोलिसांना एक निनावी कॉल आला. फोन करणार्‍याने टोळीतील एक सदस्य म्हणून स्वतःची ओळख करून दिली आणि मूर्तीच्या स्थानाची माहिती दिली. त्यांना मूर्ती सोबत नेणे शक्य नसल्याचे कारण देत त्यांनी पोलिसांना मूर्ती मंदिरात परत करण्याची विनंती केली. पोलिसांना लॉजवर मूर्ती सापडली, फुलं वाहिलेल्या आणि मूर्तीजवळ दिवा लावलेला होता. नेहमीच्या विधीनंतर मूर्ती पुन्हा अभिषेक करण्यात आली.

मृदंग सैलेश्वरी मंदिरात पजशीराजाची मूर्ती

दुसऱ्या एका दरोड्याच्या प्रयत्नात पोलिसांनी अकस्मात यश मिळवले. तामिळनाडूतील मूर्ती चोरांची टोळी कोचीनमधील दुसऱ्या मंदिरातून मूर्ती चोरण्याचा प्रयत्न करताना पकडण्यात आली. त्यांनी काही वर्षांपूर्वी मृदंग शैलेश्वरीची मूर्ती चोरल्याची कबुली दिली होती. त्याच प्रकारे, तिसऱ्या दरोड्याच्या प्रयत्नामागील लोक देखील केरळमधील कासारगोड येथील मंदिरातून मूर्ती चोरण्याचा प्रयत्न करताना चुकून पकडले गेले. त्यांनी मृदंग शैलेश्वरी मंदिरावरील तिसऱ्या दरोड्यातील आपला सहभाग कबूल केला.

साहजिकच, चोरांनी मृदंग शैलेश्वरी मूर्ती अर्ध्यावर सोडून देण्यामागचे कारण पोलिसांनाही जाणून घ्यायचे कुतूहल होते, दोन्ही टोळ्यांनी एकच कारण सांगितल्याने पोलीस चक्रावून गेले.

जेव्हा त्यांनी मूर्तीला स्पर्श केला तेव्हा त्यांची दिशा समजण्याची शक्ती गमावली आणि प्रत्येकाने गोंधळलेल्या मनःस्थितीत प्रवेश केला आणि दिशाचे सर्व भान गमावले आणि त्यामुळे ते पुढे जाऊ शकले नाहीत आणि त्यांना अर्ध्यातच मूर्तीचा त्याग करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

तीन अयशस्वी प्रयत्नांनंतरही मूर्ती चोरण्याचा मोह चोरांच्या टोळीला आवरला नाही. यावेळी ही टोळी केरळ राज्यातील अल्पसंख्याक समाजातील अनुभवी चोरांची टोळी होती. मूर्तीच्या अलौकिक शक्तींवर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांनीही मूर्तीचा त्याग केला. नंतर पकडले असता त्यांनी मूर्ती सोडून देण्याचे तेच कारण सांगितले.

आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा आपण आपल्या बुद्धिमत्तेने आणि आपल्या वैज्ञानिक ज्ञानाने देखील तर्क करू शकत नाही ! 

☺️ 

।।।।।।

Featured post

Lakshvedhi