Sunday, 29 May 2022

 *अगर आप को मालूम हो जाए कि यह भजन कौन गा रहा है तो आप आश्चर्यचकित हो जाएंगे!*

 यह और कोई नहीं है, *यह हमारे देश के प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी हैं।*

 धन्य है वह देश जहाँ का प्रधानमंत्री ऐसी धार्मिक आस्था व संस्कृति को जानने और समझने वाला हो...*

*बहुत ही गर्व की बात है। एकदम प्रोफेशनल सिंगर की तरह गाया है।* 

🌸🌸🌸

🚩🚩🚩🙏🙏


🙏

 *👉सुख म्हणजे नक्की काय असतं!*


सोलापूर इथल्या एका संस्थेने माझं दोन दिवसांचं मोटीवेशनल शिबिर आयोजीत केलं होतं. विविध वयोगटांतले आणि विविध व्यवसायातले शिबिरार्थी उत्साहाने सामील झाले होते. शिबिराच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा विषय होता आनंदाने कसं जगावं? मी साऱ्या शिबिरार्थींना एक कॉमन प्रश्न विचारला आणि नोटपॅडमधल्या कागदावर आपापलं उत्तर लिहून द्यायला सांगितलं. प्रश्न अगदी साधा होता,


सुख म्हणजे काय?


उत्तरं अगदी भन्नाट होती. एकाने लिहीलं, निरोगी दीर्घायुष्य म्हणजे सुख. एकाने लिहिलं, घरात पत्नीने तोंड बंद ठेवणं म्हणजे सुख. एक उत्तर होतं, सकाळी उठल्यावर संडासला साफ होणं म्हणजे सुख. एकाचं उत्तर होतं, म्हातारपणी मुलं आधाराला जवळपास असणं म्हणजे सुख. कुणाचं उत्तर होतं, भरपूर पैसा गाठीशी असणं म्हणजे सुख. तर कुणी लिहीलं होतं की शरीर धडधाकट असणं म्हणजे सुख. सुखाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या होत्या.


साऱ्या शंभर शिबिरार्थींच्या सुखाच्या कल्पना जेव्हा मी एकत्र केल्या तेव्हा लक्षात आलं, प्रत्येकजण कोणत्या तरी एका बाबतीत दु:खी आहे. म्हणजे कुणाची बायको भांडखोर आहे, कुणाला बद्धकोष्ठाचा त्रास आहे, कुणाची मुलं त्यांच्यापासून दूर आहेत.... आणि ती उणीव त्या प्रत्येकाला टोचते आहे. म्हणजे उरलेल्या नव्व्याणव टक्के बाबतीत तो सुखी आहे. म्हणजेच काय तर प्रत्येकजण नव्व्याणव टक्के सुखी आहे आणि फक्त एक टक्का दु:खी आहे. हे केवळ एक टक्का दु:ख आपण चघळत बसतोय आणि उरलेल्या ९९% सुखाकडे दुर्लक्ष करतोय. आहे की नाही गंमत. मी जेव्हा त्या साऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली तेव्हा सारेच चकीत झाले.


हीच तर सुखाची गंमत आहे. आपण सुखात असतो. पण आपण सुखात आहोत हेच आपल्याला माहित नसतं. जेव्हा काही कारणामुळे त्या गोष्टीची आपल्या आयुष्यात उणीव निर्माण होते तेव्हा आपल्याला कळतं, अरे... एवढा वेळ आपण सुखात होतो.


लहान असताना वाटतं, लहानपण म्हणजे परावलम्बित्व. केव्हा एकदा मोठे होतोय आणि स्वत:च्या पायावर उभे रहातोय. मोठं झाल्यावर वाटतं, किती टेन्शन रे बाबा. प्रत्येक गोष्टीत टेन्शन. जागा शोधायचं टेन्शन. कर्जाचे हप्ते भरायचं टेन्शन. ऑफीसमध्ये साहेबांना तोंड द्यायचं तेन्शन. त्यापेक्षा बालपण किती सुखाचं होतं. ग्रुह्स्थाश्रमात प्रवेश केल्यावर वाटतं, संसारसंगे बहु कष्टलो मी! केव्हा एकदा मुलं मोठी होतायत आणि या जबाबदाऱ्यांतून मोकळा होतोय. मुलं मोठी होतात तेव्हा आपण व्रुद्ध झालेलॊ असतो. आणि गात्रं कुरकुर करु लागतात. तेव्हा वाटतं, अरे तो बहराचा काळ किती सुखाचा होता.


माझे एक ज्येष्ठ मित्र रवीन्द्र परळकर अलीकडे बऱ्याच दिवसांनी मला भेटले. शिळोप्याच्या गप्पा झाल्या. म्हटलं,


“थोडे वाळलेले दिसताय. बरं नव्हतं की काय?”


तर ते म्हणाले, “प्रोस्टेट्च्या त्रासाने आजारी होतो. काय झालं, एक दिवस रात्री लघवी कोंडली. प्रोस्टेट ग्लॅंड वाढल्यामुळे त्याचा भार ब्लॅडरवर आला होता आणि लघवीलाच होईना. ओटिपोटावर भार असह्य झाला. मी वेदनांनी गडाबडा लोळू लागलो. अख्खी रात्र पेनकीलर घेऊन काढली. दुसऱ्या दिवशी फॅमिली डॉक्टरना घरी बोलवलं तर ते म्हणाले युरॉलॉजिस्टकडे घेऊन जा. युरॉलॉजिस्टकडे जाऊन ॲडमिट व्हायला दुपारचे अकरा वाजत आलेले. म्हणजे गेले पंधरा सोळा तास मला लघवीला झालं नव्हतं. वेदना असह्य होत होत्या. ब्लॅडर फुगून पोटातच फुटायची भिती निर्माण झाली होती. शेवटी एकदाचं मला ॲडमिट करुन घेण्यात आलं. आणि ब्लॅडर पंक्चर करुन सर्व युरीन बाहेर काढण्यात आली. त्या क्षणी माझ्या मनात विचार आला. आपल्याला दिवसातून वेळेवर लघवीला होणं ही सुद्धा किती सुखाची गोष्ट आहे.”


परळकरांचं उदाहरण हे सुखाच्या शोधात दु:खी असलेल्या प्रत्येकाचं प्रातिनिधिक उदाहरण आहे. हातपाय धडधाकट आहेत. दोन घास पोटात जातायत हे सुख नव्हे काय? परवर्दिगार मेहर्बान होऊन पावसा पाण्यापासून रक्षण करतोय हे सुख नव्हे काय? घराबाहेर पडल्यावर मागे एक वाट पहाणारं दार आहे हे सुख नव्हे काय? ’एका लग्नाची गोष्ट’ या प्रशांत दामलेंच्या नाटकातलं गाणं मला आठ्वतय,,


*मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं*

*काय पुण्य असतं की ते, घरबसल्या मिळतं*


मित्र हो, जाणीवांच्या खिडक्या सताड उघड्या ठेऊन विचार कराल तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही खूप सुखी आहात.  

*चला तर मग, सगळ्या तक्रारी उडवून लावा, सारी निराशा झटकून टाका आणि आनंदाने जगू लागा.*

➖➖🙏🏻🌹🌹🙏

 *वृद्धत्व पायापासून वरच्या दिशेने सुरू होते!*

आयुषचे माजी महासंचालक डॉ.जी.डी.लवेकर यांनी पाठवले आहे.

*पाय सक्रिय आणि मजबूत ठेवा !!*

▪️जसे वर्षे घालवतो तसे रोज म्हातारा होत असतो,पाय नेहमी सक्रिय आणि मजबूत असले पाहिजेत.

जसजसे सतत म्हातारे होत असतो/वृद्ध होत असतो,तस तसे केस राखाडी होण्याची/ त्वचा निस्तेज/ चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याची भीती बाळगू नये.

*दीर्घायुष्य* प्रदीर्घ तंदुरुस्त आयुष्याच्या लक्षणांपैकी लोक प्रिय यूएस मॅगझिन"प्रिव्हेन्शन" द्वारे सारांशित केले आहे,पायां चे मजबूत स्नायू *सर्वात महत्त्वाचे आणि आवश्यक* म्हणून शीर्षस्थानी सूचीबद्ध आहेत.कृपया दररोज चालत जा.

▪️जर फक्त २ आठवडे पाय हलवले नाही तर पायाची खरी ताकद १० वर्षांनी कमी होईल.

*फक्त चाला*

▪️डेन्मार्कमधील कोपनहेगन विद्यापीठाच्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की वृद्ध,तरुण २ आठवड्यांच्या *निष्क्रियता* दरम्यान,पायां च्या स्नायूंची ताकद *एक तृतीयांश* कमकुवत होऊ शकते* जे २०-३० वर्षांच्या वृद्धत्वाच्या समतुल्य आहे !!

*म्हणून फक्त चाला*

▪️पायाचे स्नायू कमकुवत झाल्यामुळे नंतर पुनर्वसन व व्यायाम केले तरीही ते बरे होण्यास बराच वेळ लागेल.

म्हणून *चालण्यासारखा नियमित व्यायाम खूप महत्त्वाचा आहे*

▪️संपूर्ण शरीराचे वजन/भार शिल्लक राहून पायांवर विश्रांती घ्या.

*पाय हे १ प्रकारचे खांब* आहेत,जे मानवी शरीराचे संपूर्ण भार सहन करतात.

*रोज चाला.*

▪️मजेची गोष्ट म्हणजे,माणसा च्या ५०% हाडे, ५०% स्नायू २ पायांत असतात.*चालत जा*

▪️मानवी शरीरातील सर्वात मोठे व मजबूत सांधे,हाडे देखील पायांमध्ये असतात.

*10K पावले/दिवस*

▪️मजबूत हाडे,मजबूत स्नायू, लवचिक सांधे *लोह त्रिकोण* बनवतात जो सर्वात महत्वाचा भार वाहतो म्हणजेच *मानवी शरीर"*

▪️७०% मानवी क्रियाकलाप व व्यक्तीच्या जीवनातील ऊर्जा बर्न दोन पायांनी केली जाते.

▪️हे माहीत आहे का?जेव्हा एखादी व्यक्ती तरुण असते तेव्हा तिच्या *मांडीत ८०० किलो वजनाची छोटी गाडी उचलण्याइतकी ताकद असते*

*पाय हे शरीराच्या हालचाली चे केंद्र आहे*

▪️दोन्ही पायांना मिळून मानवी शरीराच्या ५०% नसा, ५०% रक्तवाहिन्या आणि ५०% रक्त त्यामधून वाहत असते.

▪️हे शरीराला जोडणारे सर्वात मोठे रक्ताभिसरण नेटवर्क आहे. *म्हणून रोज चाला*

▪️फक्त जेव्हा पाय निरोगी असतात तेव्हाच रक्ताचा प्रवाह सुरळीत होतो,त्यामुळे ज्यांच्या पायाचे स्नायू मजबूत असतात त्यांचे हृदय नक्कीच मजबूत असते.* चाला.

▪️ वृद्धत्व पायापासून वरच्या दिशेने सुरू होते

▪️एखादी व्यक्ती मोठी होते, मेंदू,पाय यांच्यातील सूचनांच्या प्रसारणाची अचूकता व गती कमी होते,ती व्यक्ती तरुण असताना कमी होते.*कृपया चालत जा*

▪️याशिवाय,तथाकथित हाडां चे खत कॅल्शियम कालांतराने लवकर/नंतर नष्ट होते,ज्यामुळे वृद्धांना हाडे फ्रॅक्चर होण्याची अधिक शक्यता असते.वृद्धां मध्ये हाडांचे फ्रॅक्चर सहजपणे अनेक गुंतागुंत निर्माण करू शकतात. विशेषत: मेंदूच्या थ्रोम्बोसिससारखे घातक रोग.

▪️हे माहीत आहे का ? साधारणपणे १५% वृद्ध रूग्ण जास्तीत जास्त मरतात. १ वर्षा च्या आत मांडीचे हाड फ्रॅक्चर ! *रोज न चुकता चाला*

*पायांचा व्यायाम,वयाच्या ६० वर्षानंतरही कधीही उशीर होत नाही*

▪️पाय कालांतराने हळूहळू म्हातारे होत असले तरी,पाय/पायांचा व्यायाम करणे हे आयुष्यभराचे काम आहे.

*10,000 पावले चाला*

▪️केवळ नियमितपणे पाय बळकट केल्याने पुढील वृद्धत्व टाळता येते/कमी करता येते. *३६५ दिवस चाला*

▪️पायांना पुरेसा व्यायाम मिळावा,पायाचे स्नायू निरोगी राहतील याची खात्री करण्या साठी कृपया रोज किमान ३०- ४० मिनिटे चाला.

*तुम्ही ही महत्त्वाची माहिती तुमच्या 40+ मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर केली पाहिजे, कारण प्रत्येकजण दररोज वृद्ध होत आहे*


🚶🏻‍♀️🚶🏻‍♂️🚶🏻‍♂️🚶🏻‍♂️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️



🙏🙏 So walking every day 👍


 



 राज्यपालांनी केले 'एक आठवडा देशासाठी' या उपक्रमाचे कौतुक.

डॉक्टरांनी वर्षातील किमान एक पक्षमास देशकार्यासाठी द्यावा  

                                        राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

            मुंबई दि:29 - सेवा शब्द उच्चारणे अतिशय सोपे आहे, परंतु सेवा करणे अतिशय कठीण काम आहे. समाज आपल्याला खूप काही देत असतो. त्यामुळे आपण समाजाचे फार मोठे देणे लागतो. यास्तव, डॉक्टरांनी तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर्षभरातील किमान एक महिना किंवा एक पक्षमास देशासाठी दिल्यास त्यांना आत्मिक आनंद लाभेल व त्यांचा अनुभव देखील वाढेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

            'सेवांकुर भारत' या संस्थेच्यावतीने वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी या हेतूने सारागूर, म्हैसूर 'एक आठवडा देशासाठी' या शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. शिबिरात सहभागी झालेल्या ९५ वैद्यकीय विद्यार्थ्यांनी तसेच डॉक्टरांनी राज्यपाल कोश्यारी यांची नुकतीच राजभवन येथे भेट घेऊन आपले अनुभवकथन केले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

यावेळी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. इंदिरा हिंदुजा, डॉ. यतींद्र अष्टपुत्रे, डॉ. अश्विनीकुमार तुपकरी, डॉ. आरती आढे, महादेव पडवळ आदी उपस्थित होते.

            सेवांकुर भारत या संस्थेने औरंगाबाद येथे सुरुवात करुन आज देशभरातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच डॉक्टरांचे संघटन झाल्याबद्दल राज्यपालांनी संस्थेचे अभिनंदन केले. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आठवडी शिबीर आयोजित करून 'सेवांकुर'च्या माध्यमातून समाजसेवेची भावना रुजवली जाते हे स्तुत्य कार्य असून सेवांकुरच्या कार्याचा वटवृक्ष व्हावा, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

            डॉक्टरांनी डॉक्टरी पेशाचे ज्ञान घेताना उत्तम वक्ते, उत्तम शिक्षक तसेच उत्तम नेते देखील झाले पाहिजे असे सांगून उत्तम नेतृत्वगुण अंगी येण्यासाठी अधिक सेवा करणे आवश्यक असते, असे राज्यपालांनी सांगितले.

            यावेळी डॉ. आरती आढे, डॉ. प्रशांत गायकवाड, डॉ. शालिवाहन गोपछडे, डॉ. रोहित गट्टेवार,

डॉ. प्रीती होळंबे तसेच शिबिरात सहभागी झालेल्या इतर वैद्यकीय विद्यार्थी व तज्ज्ञांनी शिबिरातील अनुभव कथन केले. राज्यपालांशी झालेल्या भेटीच्या वेळी शिबिरात सहभागी झालेल्या ६९ वैद्यकीय महाविद्यालयांमधील ९५ वैद्यकीय विद्यार्थी उपस्थित होते.

0000

Maharashtra Governor calls upon doctors to giveone fortnight for service to nation

            Date 29 - Governor Bhagat Singh Koshyari had an informal interaction with the medical students and doctors from Maharashtra participating in a social service camp 'One Week for the Nation' organised by Sevankur Bharat at Raj Bhavan Mumbai on Sat (28 May) . The Camp was held at Saragur near Mysore in Karnataka recently.

            Speaking on the occasion, Governor Koshyari called upon doctors and medical students to give at least one fortnight in a year to serve the society, especially in rural and tribal areas.

          He said service to society will give the doctors inner joy and satisfaction. The Governor called upon medical students to develop the art of public speaking, teaching and leadership qualities. Ninety five medical students from 69 Colleges of Medicine, Homoeopathy, Ayurveda and other streams were present. Medical students and Consultants shared their experiences of the Camp on the occasion.

            Well known gynaecologist Dr Indira Hinduja, Mahadev Padwal, Dr Yatindra Ashtaputre, Dr Ashwinikumar Tupkari, Dr Arti Adhe

Saturday, 28 May 2022

 15 ऑगस्ट पासून एक रुपयामध्ये 10 सॅनिटरी नॅपकिन.....

                                                                                               - मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती 

            मुंबई, दि. 28: मासिक पाळी स्वच्छता दिनी महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दारिद्र्यरेषेखालील महिला तसेच बचत गटाच्या महिलांसाठी एक रुपयांमध्ये 10 सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील 60 लाख महिलांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार आहे. ही योजना 15 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

ग्रामीण भागातील महिलांसाठी योजना ......

            मासिक पाळी हा महिलांच्या आरोग्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व जागतिक प्रश्न आहे. गेल्या वर्षात मासिक पाळीच्या वेळी काळजी न घेतल्याने व सफाई कमीमुळे जगभरातील आठ लाख महिलांचा मृत्यू झाला आहे. स्त्रियांच्या होणाऱ्या मृत्यूमागे हे सर्वात मोठे कारण असून, हा प्रश्न कमी करण्यासाठी दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी नाममात्र एक रुपयामध्ये ग्रामविकास खात्याकडून ही नवीन योजना राबवण्यात येणार आहे. 

जगातील व राज्यातील आकडेवारी.......

            भारतात दरवर्षी 120 दशलक्षाहून अधिक महिलांना मासिक पाळीचा त्रास होऊन आजारांचा सामना करावा लागतो. भारतात 320 दशलक्ष मासिक पाळी होणाऱ्या स्त्रियांपैकी केवळ 12 टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन वापरतात. यामुळे चार वर्षे भारतात 60,000 हून अधिक स्त्रियांना गर्भाशयाचा कर्करोगामुळे होणारा मृत्यू पैकी दोन तृतीयांश मृत्यू मासिक पाळीबद्दलच्या समजूतीमध्ये निष्काळजीपणामुळे होतो. हीच आकडेवारी महाराष्ट्रात पाहायला गेले तर केवळ 66 टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन वापरतात. याबद्दलही शहरी भागाचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण भागातील फक्त 17.30 टक्के स्त्रियांपर्यंत सॅनिटरी नॅपकिनची सुविधा पोहोचत असते. या समस्येच्या मुळाशी गेले असता सॅनिटरी पॅड वापरण्याबाबत जागृकता नसणे, सॅनेटरी पॅड खरेदी करण्याची समस्या उद्भवणे अशा अनेक प्रश्नांना स्त्रिया सामोरे जात असतात

दारिद्र्य रेषेखालील 19 वर्षावरील सर्व महिलांसाठी योजना.....

            सध्या महाराष्ट्रात आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेत फक्त 19 वर्षाखालील युवतींना सहा रुपयात सहा नॅपकिन्स असलेले कीट पुरवण्यात येतात. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही. म्हणून हा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत दारिद्र्यरेषेखालील सर्व युवती व महिलांना या समस्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना व बचत गटांमधील महिलांना एक रुपये नाममात्र किमतीमध्ये सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेची सुरुवात 15 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे

योजनेची ठळक वैशिष्ट्ये......

1. राज्यातील ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिला व आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेतील सर्व महिला वगळून इतर दारिद्र्यरेषेखालील सर्व वयोगटातील युवती व महिलांना दर महिना एक रुपये नाममात्र शुल्कात 10 सॅनिटरी नॅपकिन असलेले एक पाकीट महिलांना मिळणार.

2. स्थानिक पातळीवर गावस्तरावरच गावातील ग्रामसंघामार्फत महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून दिले जाणार

3.शासन स्तरावर दर करार करण्यात येणार

4. योजनेअंतर्गत महिलांना सॅनिटरी नॅपकीन किट याचा वापर करण्याबाबत, वैयक्तिक स्वच्छते संदर्भात जागृती व प्रचार करणार. 

 5. सॅनिटरी नॅपकिन व्यवस्थापन व विल्हेवाट

6. या योजनेत जवळपास 60 लाख पेक्षा जास्त लाभार्थी महिला असल्याने सॅनिटरी नॅपकिनचे विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक गाव स्तरावर मशीन बसवण्यात येणार आहे. या मशीनमार्फत महिलांनी सॅनिटरी नॅपकिन ची विल्हेवाट लावावी, यासाठी जनजागृतीही करण्यात येणार आहेत. ही सर्व मशीन जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यांच्या स्वनिधीतून तसेच शासकीय निधी देणग्या तसेच सीएसआर निधीच्या माध्यमातून बसविण्यात येणार आहे.


             

जरा विसावू या वळणावर

 *विसावा...!*


*"मेल्यावरही आपल्या तिरडीला विसावा देतात ते म्हणजे काय....?"* 

सगळं आयुष्य धावपळीत गेलं, शेवटी जाताना शेवटचा निरोप द्यायला जे जिवलग स्नेही नातेवाईक आप्तेष्ट आलेले असतात त्यांच्या सोबतचा शेवटचा *विसावा* असतो तो... 

स्मशानभूमीच्या थोडं अलीकडे तिरडीला जमिनीवर टेकवून देतात,

#सोबत भाकरीचा घास तुकडा असतो, का तर जिवंतपणी कुठेही प्रवासाला जाताना वाटेत भूक लागली तर खायला शिदोरी सोबत ठेवायचास...

#आता आयुष्यातील तुझा हा शेवटचा प्रवास आहे आणि ही शेवटची तुझ्या सोबत असणारी शिदोरी! त्यामुळे दोन क्षण उसंत घे आणि शिदोरी खा आणि कायमस्वरूपीचा रामराम कर तुझ्या ह्या शरीर रुपी प्रवासाला...

#आयुष्यभर जे शौक पाणी केलं जसे की, सिगारेट, बिडी, काडी, दारु, तंबाखू , सुपारी अगदी हेही ठेवलं जातं विसाव्याच्या ठिकाणी ठेवतात......का तर शेवटच्या *विसावा* तुझ्या आवडत्या गोष्टी सोबत घ्यावास म्हणून ...

 थोडक्यात काय तर मित्रांनो, *मेल्यावरही विसावा मिळतो,* जाळायच्या अगोदर! 


*तर मग जिवंतपणी इतकी सगळी धावपळ, मरमर सुरु आहे तेव्हा मनाचा, शरीराचा थकवा दूर करण्यासाठी जरासा विसावा घ्यायला काय हरकत आहे.?* जिवंतपणी हा *विसावा* घ्यायचं ठिकाण असते ते म्हणजे जिवलग मित्रांचं... मित्र म्हणजे एनर्जी बूस्टर असतात, 

कसल्याही परिस्थिती *मैं हु ना* म्हणून जगायला बळ देत राहतात.. 

#आपल्या आयुष्यातील अनेक सुख दुःख आपण आपल्या जवळच्या मित्रांशी बोललो तर मन हलकं आणि रिफ्रेश होते आणि ह्या जिवलग मित्रांचा *विसावा* प्रत्येकाच्या आयुष्यात असावा. अगदी कधीही कसलीही परिस्थिती आली तरीही सरतेशेवटी पर्यन्त सोबत असणारा साथ देणारा , तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारा , तुम्हाला ऐकून घेणारा तुम्हाला समजून घेणारा.. तो मित्रमैत्रिणींचा *विसावा* असला की, आयुष्यात कसल्याही संकटांना समोर जायला बळ येतं, आपल्या आयुष्यातील छोट्यातला छोटा आनंद द्विगुणित होतो, मनाला, शरीराला जेव्हा एकटे एकटे वाटतं न तेव्हा आपल्या मित्रांच्या काफ़िल्यात गेलं की अगदी रिलॅक्स वाटतं!

      # आज आयुष्य नक्कीच खूपच धावपळीचे झाले आहे, यात प्रश्नच नाही. पण ह्याच धावपळीत शरीरासोबत मनही थकत असतं. मनालाही विसावा हवा असतो आणि तो *विसावा* असतो आपलं जिवलग मित्र, आप्तस्नेही, त्यांच्यासोबत घातलेले सगळे क्षण आयुष्य खऱ्या अर्थाने जगायला लावतात इतके सुंदर ते असतात...

#शेवटचा घास तुकडा आपल्या नावाने रस्त्यावर ठेवला जातो, तोच आपण आज ह्या क्षणी जिवंत आहोत तेव्हाच मित्रांसोबत जेवलो तर चार घास नक्कीच जास्त जातात.....

*आपल्या आवडत्या सगळ्या गोष्टी, सगळे शौक जिवंत आहोत तोपर्यंत इथेच जरासा ''विसावा'' घेऊन जगून घ्यायला काय हरकत आहे? नंतरचा विसावा फील करून घ्यायला कुठे आपल्या फिलिंग्स जिवंत असणार आहेत..?* 


*माझ्या सर्व मित्रांना समर्पित...*💐🙏🏻💐

Featured post

Lakshvedhi