Tuesday, 22 March 2022

 विधानसभा प्रश्नोत्तरे/प्रश्न क्रमांक ४३५७७


रत्नागिरीमधील पेढे परशुराम बायपास रस्त्याच्या

कामाची निविदा प्रक्रिया मे अखेर पूर्ण करणार

- अशोक चव्हाण

            मुंबई, दि. 22 : रत्नागिरीतील पेढे परशुराम बायपास रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामाची निविदा प्रक्रिया मे 2022 अखेर पूर्ण करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभेत दिली.

            रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

            सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, जुलै मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती यामध्ये रस्ते खराब झाले. त्यामुळे या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी पूरहानी उपाययोजनेतंर्गत 8 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कामांची पाहणी करून याबाबतीत कार्यवाही करण्यात येत आहे लवकरच या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होवून कामे पूर्ण करण्यात येतील.

0000

विधानसभा प्रश्नोत्तरे/प्रश्न क्रमांक ३९८९६

जत शहरामधील रस्त्यांची कामे सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणार

- अशोक चव्हाण

            मुंबई, दि. 22 : सांगली जिल्ह्यातील जत शहरातील रस्त्यांची कामे सप्टेंबर 2022 पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभेत दिली.

            विधानसभा सदस्य विक्रमसिंह सावंत यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले,गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ वरील जत शहरातील एक कि.मी लांबीमध्ये काँक्रिट रस्ता व गटर पर्यंत पेव्हींग ब्लॉकच्या बाजूपट्टीचे काम ऑगस्ट २०२१ मध्ये पूर्ण झाले आहे. रस्ता वाहतूकीस सुस्थितीत असून या ठिकाणच्या २० मीटर लांबीतील गटरचे काम वगळता ९८० मीटर लांबीतील गटरचे काम पूर्ण झाले आहे.ही कामे सप्टेंबर २०२२ अखेर पूर्ण होतील असे नियोजन करण्यात आले असल्याचे मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.

0000

वृत्त क्र. 936

निवेदन :

कळमेश्वर नगरपरिषदच्या सिटी सर्वेमधील हरकत

तीन महिन्यात निकाली काढणार

- बाळासाहेब थोरात

          मुंबई, दि. 22 : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर नगरपरिषद अंतर्गत झालेल्या सिटी सर्वेमध्ये 90 हरकती प्राप्त झाल्या आहेत. या हरकती तीन महिन्यात निकाली काढण्यात येतील, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विधानपरिषदेमध्ये दिली.

          याबाबत म.वि.प नियम 93 अन्वये सूचना विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केली होती. त्यावर महसूल मंत्री श्री. थोरात यांनी निवेदन केले.

          मंत्री श्री. थोरात म्हणाले, कळमेश्वर नगरपरिषदेच्या अंतर्गत सिटी सर्वे करण्यात आला आहे. त्यानंतर काही सूचना, हरकती मागविण्यात आल्या. यामध्ये 90 हरकती प्राप्त झाल्या आहेत. या लवकरच निकाली काढून पुन्हा तपासणी केली जाईल.

 विधानसभा लक्षवेधी

घोडबंदरच्या गौरव एनक्लेव सोसायटीतील कुटुंबांना

नियमित घरभाडे देण्यासाठी मनपा आयुक्त बैठक घेणार

- एकनाथ शिंदे

            मुंबई, दि. 22 :- मीरा भाईंदर येथील गौरव एनक्लेव को-ऑप. हौसिंग सोसायटीची इमारत पुनर्विकासासाठी रिकामी केल्यामुळे संबंधित विकासकाने येथील रहिवाशांना करारानुसार नियमितपणे भाडे देणे आवश्यक आहे. ते भाडे मिळवून देण्यासाठी विकासकाबरोबर बैठक घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना देण्यात येतील, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले.

            विधानसभेत रवि राणा, गीता जैन या सदस्यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना नगरविकासमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर भागात गौरव एनक्लेव को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीची तळमजला अधिक ७ मजली इमारत १९९५ मध्ये बांधण्यात आली आहे. सदर इमारत धोकादायक ठरल्याने ती २०१३ मध्ये पाडण्यात आली, त्यानंतर सीआरझेडचा भाग वगळून या इमारतीला २०१९ मध्ये २१ मजल्याची परवानगी महानगरपालिकेने दिली, मात्र या इमारतीसंदर्भात काही वाद उद्भवल्याने २०१९ मध्येच या इमारतीच्या बांधकामाची परवानगी रद्द केली. सदर विकासक उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने त्यात स्थगिती दिली, ही स्थगिती आजही कायम आहे, असेही नगरविकासमंत्र्यांनी सांगितले.

            दरम्यान, या विकासकाने नगरविकास विभागाकडे अपील केले होते. वादग्रस्त सर्वे क्रमांक असतील ते बाजूला ठेवून नियमाप्रमाणे कागदपत्रे तपासून महानगरपालिकेने नगररचना नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत, यामुळे २३३ वंचित कुटुंबांना घरे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असे सांगून महानगरपालिका आयुक्तांनी विकासक आणि या इमारतीतील रहिवाशांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक घ्यावी आणि विकासकाकडून येथील रहिवाशी कुटुंबांना नियमितपणे घरभाडे मिळवून देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील असेही शेवटी नगरविकासमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


विधानसभा प्रश्नोत्तरे/प्रश्न क्रमांक ४१९५६

राज्यातील बंद सेतू सुविधा केंद्रे तीन महिन्यांत सुरू होणार


                                                               - दत्तात्रय भरणे

            मुंबई, दि. 22 : राज्यात सध्या बंद असलेल्या सेतू सुविधा केंद्रांची व तहसिल कार्यालयांची माहिती घेवून तीन महिन्यांच्या आत हे सेतू सुविधा केंद्र पुन्हा सुरू करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात येतील, अशी माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली.

            लातूर जिल्ह्यातील तहसिल कार्यालयात सर्वच एकात्मिक नागरी सेतू सुविधा केंद्र ३१ डिसेंबर २०२१ रोजी पासून बंद आहेत. त्यामुळे नागरिकांच्या गैरसोयीबद्दल प्रश्न विधानसभा सदस्य धीरज देशमुख यांनी विधानसभेत विचारला होता. या चर्चेत नमिता मुदंडा यांनी भाग घेतला.

            लातूर जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांना सर्व प्रकारच्या सेवा विहित कालावधीत व विहित शुल्क आकारून देण्याबाबत सूचना देण्यात येतील. राज्यात देखील 12 जिल्ह्यातील तहसिलअंतर्गत सेतू सुविधा केंद्र बंद आहेत अशा तक्रारींची माहिती घेवून सदर सेतू सुविधा केंद्र तीन महिन्यात पुन्हा सुरू करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात येतील, अशी माहिती श्री. भरणे यांनी विधानसभेत दिली.                

 विधानसभा प्रश्नोत्तरे/प्रश्न क्रमांक ३९६४५

नवीन बांधकाम केलेल्या इमारतींच्या कर वसुलीबाबत धोरणात्मक निर्णय घेणार

- एकनाथ शिंदे

            मुंबई, दि. 22 : नवीन बांधकाम केलेल्या इमारतीतील रहिवाश्यांना पाणीपट्टी,मालमत्ता कर तसेच मलनि:सारण कर आकारणीसाठी समिती गठित करुन रहिवाशी आणि विकासकाची भूमिका काय असेल याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.

            मुंबईतील लोअर परळ येथील फ्लोरेन्स टॉवर,परळ भोईवाडा जेरबाई वाडिया येथील मातोश्री संस्थेस सहा इमारतींच्या गृहनिर्माण संस्थांना मालमत्ता कर,पाणीपट्टी कर,विद्युत देयक व इतर देय कर भरण्याबाबत मुंबई महापालिकेच्या कर विभागाने नोटीस पाठविली आहे ही नोटीस विकासकांना पाठविण्यासंदर्भात विधानसभा सदस्य सुनिल प्रभू यांनी प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत विधानसभा सदस्य आशिष शेलार, सदा सरवणकर, अतुल भातखळकर, अमीन पटेल, अजय चौधरी यांनी भाग घेतला.

            नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईतील लोअर परळ येथील फ्लोरेन्स टॉवर,परळ भोईवाडा जेरबाई वाडीया येथील मातोश्री संस्थांप्रकरणी विकासकांनी अंशत: भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त होईपर्यंतचा इमारतीच्या बांधकामाखालील जमिनीचा मार्च २०२२ पर्यंतचा संपूर्ण मालमत्ता कर मुंबई महापालिकेस भरलेला आहे. बांधकामाखालील जमिनीच्या मालमत्ता कर वसुलीकरिता इमारतीमधील रहिवाशांकडे मागणी नोटीस पाठविलेल्या नाहीत. मुंबई शहर व उपनगरात दिनांक १५ मे २०१५ पासून अशंत: भोगवटा प्रमाणपत्र दिलेल्या परंतु पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र न आलेल्या इमारतींची संख्या ७२८ इतकी आहे. या इमारतीपैकी २८१ विकासकांकडून मुंबई महापालिकेस मालमत्ता कर थकीत आहे. नवीन बांधकाम केलेल्या इमारतीतील ग्राहक तथा रहिवाशांना पाणीपट्टी, मालमत्ता कर तसेच मलनि:सारण कर आकारणी करण्याबाबत तसेच विकासकाची भूमिका स्पष्ट करण्याची समिती गठित करुन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही नगरविकास मंत्री श्री. शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

 एमपीएससीने 2019 मध्ये निवड केलेल्याकर सहायक व लिपिक-टंकलेखकांच्या नियुक्त्या पंधरा दिवसात होणार.

                                         - दत्तात्रय भरणे

            मुंबई, दि. २२ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०१९ मध्ये गट 'क' साठी घेण्यात आलेल्या कर सहाय्यक आणि लिपिक-टंकलेखक पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना पंधरा दिवसात नियुक्ती देण्यात येईल, अशी माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली.

            महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट 'क' मध्ये सन २०१९ मध्ये कर सहायक,लिपिक टंकलेखक व दुय्यम निरीक्षक या तीन पदांसाठी पदभरती प्रक्रिया वेगवेगळ्या कारणांमुळे प्रलंबित आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणा-या पदभरती विहित वेळेत केल्या जाव्यात तसेच या प्रक्रिया एका ठराविक कालबध्द वेळेत करण्यासंदर्भात विधानसभा सदस्य डॉ.विनय कोरे यांनी प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत सदस्य सर्वश्री चंद्रकांत पाटील, प्रकाश आबिटकर, नाना पटोले, योगेश सागर यांनी भाग घेतला.

            राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासन निर्णय काढला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दि.९ सप्टेंबर २०२० रोजी अंतरिम आदेशान्वये एसईबीसी आरक्षणासह स्थगिती दिली होती

            प्राप्त माहितीनुसार कर सहायकांची- १२६ आणि लिपीक टंकलेखकाच्या -१७९ पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना पंधरा दिवसात नियुक्ती देण्यात येण्याबाबत तसेच ३३ दुय्यम निरीक्षक मधील १७ जणांना नेमणूक आदेश दिले असून उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून सर्वांच्या वेळेत नेमणूका करण्यात येतील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गेल्या सहा महिन्यात साधारणत: तीनशे परीक्षांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत, असेही सामान्य प्रशासन राज्यमंत्री श्री.भरणे यांनी सांगितले.





 

वास्तू विशेष.

 *🙏🌸श्री ब्रम्हांडनायक परिवार 🌸🙏*

*‼️श्री स्वामी समर्थ महाराज माऊली ‼️*

*कॉपी पेस्ट फक्त👈👈👈👈*

👇👇👇

*आपल्या घराचा उंबरठा स्वच्छ असेल तर घरात लक्ष्मी कायम स्वरूपी वास्तव्य करेल..* 

दाराच्या चौकटीच्या खालील लाकडाच्या किंवा दगडाच्या भागाला सामान्य भाषेत उंबरा किंवा उंबरठा, डेहरी म्हणतात. वास्तू शास्त्रात याचे खूप महत्त्व आहे. याबद्दल खास 5 गोष्टी आणि याचे 5 फायदे. 

 

 *वास्तू उपचार -* 

1 वास्तुनुसार उंबरा किंवा उंबरठा भंगलेला किंवा तुटलेला नसावा.

2 विखुरलेला किंवा या दृच्छिक उंबरठा नसावा. यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतं.

3 दाराची चौकट उंबरा बळकट आणि सुंदर असावा

4 बऱ्याच ठिकाणी उंबरा नसतो हा एक वास्तू दोष असतो. कोणीही आपल्या घरात शिरकाव करताना आधी उंबऱ्याला पार करूनच घरात यावे.

 

 *धन प्राप्ती -* 

1 घराची स्वच्छता करून दररोज उंबऱ्याची पूजा करावी. जे दररोज नियमानं पूजा करतं त्यांचा घरात लक्ष्मी कायम स्वरुपी वास्तव्य करते.

2 दिवाळीच्या व्यतिरिक्त काही विशेष प्रसंगी उंबऱ्यावर तुपाचा दिवा लावावा. असे केल्यानं घरात लक्ष्मीचं येणं सोपं होणार.

3 एखाद्या खास प्रसंगी घराच्या बाहेर उंबऱ्याच्या जवळ स्वस्तिक बनवावं आणि हळद-कुंकू वाहून निरांजन ओवाळावी.

4 देवाची पूजा केल्यावर उंबऱ्याच्या दोन्ही बाजूस सतिया किंवा स्वस्तिक बनवून त्याची पूजा करावी. सतियावर तांदुळाचा ढिगारा रचून त्यावर एक-एक सुपारी वर कलावा बांधून ठेवा. या उपायाने धनप्राप्ती होते. 

 

 *असं करू नये -* 

1 उंबऱ्यावर कधीही पाय ठेवून उभे राहू नये.

2 उंबऱ्यावर कधीही पाय मारू नये.

3 आपल्या पादत्राणांची घाण किंवा पायाची घाण उंबऱ्यावर स्वच्छ करू नये. 

4 उंबऱ्यावर उभारून कोणाचेही पाया पडू नये.

5 उंबऱ्यावर उभारून कोणाही पाहुण्यांचे स्वागत करू नये किंवा त्यांना निरोप देऊ नये. नेहमीच पाहुण्यांचे आतिथ्य घराच्या आतून आणि त्यांना निघण्याचा निरोप उंबऱ्याचा बाहेरून द्यावा.

*🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻*

Featured post

Lakshvedhi