Wednesday, 2 March 2022

उघडा डोळे

 *🍁खूप छान विचार*🌺🙏

============

👏👏👏👏👏👏👏👏

*बैलांच्या अंगावर बसून जेंव्हा कावळा गोचीड खातो तेंव्हा बैलाला असे वाटते की कावळा आपल्यावर उपकार करीत आहे तो त्याला आपला सखा मित्र वाटतो आणि संपूर्ण शरीर त्याच्या स्वाधीन करून निवांतपणे पाय पसरवून पडून राहतो.*

              *तोच कावळा जेंव्हा गोचीड सोडून बैलाच्या मांसाचे लचके तोडायला लागतो.तेंव्हा मात्र बैल सावध होऊन आपल्या शिंगांने त्याला धुडकावून लावतो.खरेतर कावळा त्यावर उपकार वगेरे काही करीत नव्हता तो त्याच्या अंगावरचे गोचीड खाऊन आपले पोट भरत होता.जेंव्हा गोचीड संपले तेंव्हा त्याने बैलाचे मांस खायला सुरवात केली.*

              *मित्रांनो,असे कावळे आपल्या जीवनात ही पुष्कळ आहेत.त्यांना आपल्या मांसाचे लचके तोडण्याअगोदरच ओळखा आणि दूर करा.कारण,ते स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्यासोबत मित्र बनण्याचे नाटक करीत असतात.त्यांना आपल्या विषयी सहानुभूती वगेरे काहीही नसते.*

      *पैशाने पुर्ण झालेली स्वप्न,*

          *मरेपर्यत टिकतात..*

      *कष्टाने पुर्ण झालेली स्वप्न,*

          *इतिहास घडवतात..*     

 *घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा कारण जग एक बाजार आहे ....*

 *""परंतु घरी जाताना एक हृदय घेऊन जा कारण तिथे एक कुटुंब आहे ""....*                                        

*कुणाच्या नशिबाला हसू नये*

               *नशिब कुणी विकत घेत नाही*      

*वेळेचे नेहमी भान ठेवावे*..

           *वाईट वेळ सांगून येत नाही*.!

*बुद्धी कितीही तल्लख असली तरी*

          *नशिबाशिवाय जिंकता येत नाही*, 

 *बिरबल बुद्धीवान होता तरीही तो*           

             *राजा होऊ शकला नाही*.!

     *समाधान ही अंत:करणाची* *सर्वात सुंदर संपत्ती आहे.*

*ज्याला ही संपत्ती मिळाली,तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे.*

*"अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती* *आपल्या अंतःकरणातील तीन गोष्टी ओळखेल*

*हसण्यामगील दुःख*

*रागवण्या मागील प्रेम*

*आणि शांत रहाण्यामागील कारण*.

*कपडे* नाही 

माणसाचे *विचार*

*Branded* पाहिजे...!

*चुकीच्या* बाजूला उभा राहण्यापेक्षा 

*एकटं* उभं रहाणं केव्हाही चांगलं.

   *आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!* 

*आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. खोट्या राजकारणी लोकांच्या अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने प्रथम स्वतःचा व परिवाराचा जीव वाचवा...!!!*

*जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*. 


🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

Mera Bharat mahan


 

 




 🌷 *वास्तुशास्त्रातील प्रभावी तोडगा*🌷


*दर शनिवारी,अमावस्या,पौर्णिमा....या दिवशी गोमूत्र आणि हळद एकत्र करून त्याचा पट्टा मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर लावावा* 

*वास्तूतील निगेटीव्ह एनर्जी जाते*

🙏 *श्री स्वामी समर्थ*🙏

 





 प्रसंगावधानाने महिलेचे प्राण वाचवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे शालेय शिक्षण मंत्र्यांकडून अभिनंदन

मुंबई, दि. 1 - मंत्रालयात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला शालेय शिक्षण मंत्री कार्यालयातील कर्मचारी विजय डुबल आणि सागर मिरगळ यांनी प्रसंगावधान दाखवून वाचवले. या दोघांच्या धाडसी पणामुळे महिलेचे प्राण वाचले. त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो असे सांगून शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

            वैयक्तिक कारणास्तव रूपा मोरे या सोमवारी मंत्रालयात आल्या होत्या. तिसऱ्या मजल्यावर असताना त्यांनी अचानक खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. याच मजल्यावर शालेय शिक्षण मंत्री यांचे कार्यालय आहे. या कार्यालयातील कर्मचारी श्री.डुबल आणि श्री.मिरगळ यांना अनपेक्षितपणे घडणारी ही बाब लक्षात आल्याने त्यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ या महिलेस उडी मारण्यापासून रोखल्याने अनर्थ टळला. त्यांच्या या प्रसंगावधानाचे मंत्रालयात कौतुक होत आहे.

0000 

 राष्ट्रीय लोकअदालत 12 मार्च रोजी

· राज्यात सर्व जिल्ह्यांत व तालुक्यात आयोजन

            मुंबई, दि. 01 : विधी सेवा प्राधिकरण अधिनियम, 1987 मधील तरतुदी अंतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तालुका, जिल्हा व उच्च न्यायालयात एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय लोकअदालत दि. 12 मार्च 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे, असे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांनी कळविले आहे.


0000

Featured post

Lakshvedhi