Tuesday, 22 February 2022

Dharmik

 *✍️महत्त्वाचे बहुपयोगी नियम.*


१) देवघरातील शंखाला अक्षता वाहू नये.

२) देव पुजेच्या वेळेस ईतरांशी बोलु नये.

३) तर्जनीने (अंगठ्याजवळच्या बोटाने) देवाला गंध वाहू नका. एका दिव्यावर दुसरा दिवा लावू नका.

४) भग्न मूर्तिची पूजा कधीही करू नये.

५) दिव्याची ज्योत कधीही दक्षिण दिशेस करू नये.

 ६) स्त्रियांनी कधीही. तुळस तोडू नये.

एकाच घरात दोन शिवलिंगे, दोन शाळिग्राम, दोन शंख, तीन गणपती कधीही ठेवू नयेत. भस्म लावल्याशिवाय व गळ्यात रुद्राक्षाची माळ धारण केल्याशिवाय, महादेवाची () पूजा करू नये. 

९) देवपूजेसाठी शिळे जल व शिळी फुले व्यर्ज होत, मात्र तुलसीपत्रे व तीर्थोदक, शिळी असली तरी चालतात. 

१०) संकल्पाशिवाय कोणतेही धार्मिक कृत्य करू नये. 

११) शिवमंदिरात झांज', सूर्यमंदिरात 'शंख' व देवीच्या मंदिरात बासरी वाजवू नये.

१२) बेला शुष्क पत्रेही पूजेला चालतात. तसेच शुष्क दवणाही देवाला प्रिय आहे. मात्र सोमवारचा बेल दुसऱ्या दिवशी चालत नाही. 

१३) द्वादशीस तुळस तोडू नये.

१४) जलकमळावाचून अन्य कोणत्याही फुलाच्या कळ्यांनी देवीची पूजा कधीही करू नये.

१५) बेलाचे पान नेहेमी पालथे वाहावे, 

१६) श्री गणेशाला गणेश चतुर्थीशिवाय, अन्य दिवशी तुळस वाहणे, व्यर्ज आहे.

१७) गायत्री किंवा नवार्णव मंत्र आसनावर बसूनच करावा. रस्त्याने जाता येता करू नये.

१८) आपली जपमाला व आसन, दुसऱ्यास वापरण्यास कधीही देऊ नये. १९) मारुतिच्या फोटोशिवाय अन्य कोणत्याही देवदेवतांच्या मूर्तिची व तसबीरींची कधीही दक्षिणेकडे करू नये. (अपवाद, मृतव्यकतींचे फोटो) 

२०) गंध उगाळून झाल्यानंतर ते तबकडीत काढूनच नंतर देवांना लावावे.

२१) गुरुचरित्र, दुर्गासप्तशती व अन्य प्रासादिक ग्रंथाची पाने उलटताना, कधीही बोटाला थुंकी लावू नये.

२२) देवपूजेच्या वेळी स्तोत्रे मोठ्याने एका लयीत म्हणावीत व मंत्र मनात जपावेत.

२३) देवाला नैवेद्य दाखविल्यानंतर तो लगेच खाऊ नये. 

२४) देवघरात देवांच्या तसबीरी लावताना, त्या एकमेकांसमोर लावू नये.

२५) आचमन करतेवेळी तोंडाने आवाज करू नये.

२६) देवाला, एका हाताने कधीही नमस्कार करू नये. 

२७) देवांची आरती करतांना, निरांजन देवाच्या मस्तकावरून नेऊ नये. 

२८) कांदा, लसूण. हे पदार्थ वापरलेले नैवेद्य, देवास दाखवू नये.

२९) देवीचे पूजन केवळ एका उपचाराने, म्हणजे 'कुंकवाने होते.

३०) देवांचे आसन, आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असावे.

३१) देवपूजेतील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आवश्यक आहे.

३२) देवाचा उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा.

३३) देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवून, नंतर अर्पण करावा.

(३४) शंख, घंटेशिवाय देवपूजा करू नये.

३५) देवघरातील देवमूर्तिवर विटाळशीची छाया पडणार नाही याची काळजी घ्यावी.

३६) नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने चौकोन काढून त्यावर तो नैवेद्य ठेवून मगच दाखवावा. ३७) तुलसीपत्र वाहताना ते पालथे व देवाकडे देठ करून वाहावे. दूर्वा वाहाताना दुर्वांची अग्रे आपल्याकडे ठेवावीत. फळे वाहताना फळांचे देठ देवांकडे करावेत.

(३८) देवाला प्रदक्षिणा, नेहमी विषम संख्येत घालावी. जागा नसल्यास स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे, असे गोल फिरावे.

(३९) देवघराला कळस करू नये.

४०) देवपूजा करण्यापूर्वी कपाळी गंध. कुंकुमतिलक, अवश्य लावावा. शरीर शुद्धीसाठी भस्मलेपन करावे.🙏

(नाथभक्त - अरुण भाऊ पगार.)


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

 राज्यपालांच्या हस्ते कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार प्रदान

•       'सुभाष सिक्रेट' पुस्तकाच्या २१ व्या आवृत्तीचे प्रकाशन
        मुंबई, दि. 22 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते वैद्यकीय सेवा व समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ४० डॉक्टर्स व समाजसेवकांना 'कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार' प्रदान करण्यात आले.
        पुणे येथील कर्तव्यम सोशल फाउंडेशनतर्फे हे पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाला फाउंडेशनचे संस्थापक संतोष बारणे व सचिव क्रांतीकुमार महाजन उपस्थित होते.
        राज्यपालांच्या हस्ते यावेळी क्रांतीकुमार महाजन यांनी लिहिलेल्या 'सुभाष सिक्रेट' या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील पुस्तकाच्या २१ व्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.
        स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे १२५ वे जयंतीवर्ष साजरे होत असताना 'सुभाष सिक्रेट' हे पुस्तक नव्याने वाचकांसमोर येत असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला.
        नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा' असा प्रेरणादायी मंत्र देशवासियांना दिला असे राज्यपालांनी सांगितले.
        कोरोना संसर्गाच्या काळात डॉक्टर्स, नर्सेस तसेच इतर कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घालून रुग्णांचे जीव वाचवले तसेच समाजसेवकांनी दया, दान व धर्म या शाश्वत मूल्यांचा परिचय देत जनता जनार्दनाची सेवा केल्यामुळे देश या महासंकटातून सहिसलामत बाहेर पडत आहे, असे राज्यपालांनी सांगितले. 
        आपले काम समाजसेवेच्या भावनेने केल्यास ते काम पुण्यप्रद ठरते, असे राज्यपालांनी सांगितले व सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.
        अध्यक्ष संतोष बारणे यांनी प्रास्ताविक केले तर क्रांती महाजन यांनी पुस्तकामागची भूमिका सांगितली.
        राज्यपालांच्या हस्ते यावेळी उज्ज्वलकुमार भीमराव चव्हाण, डॉ. नेमजी करमशी गंगर, डॉ. शेख अख्तर हसन अली, डॉ. अलका भरत नाईक, सूर्यकांत महादेव गोवळे, अशोक शेषराव शिंदे, डॉ. सुनिल मारूती चव्हाण, सागर रतनकुमार कवडे, यशवंत रामदासजी कुर्वे, भास्कर निंबा अमृतसागर, मोहम्मद रियाज शेख, रामु वसंत पागी, सुनिल नंदलाल सिंग,  दामोदर यशवंत घाणेकर, वसंतराव मारोतराव धाडवे, प्रतिभा जयंत भिडे, डॉ. यतीन त्र्यंबक वाघ, डॉ. वर्षा नितीन देशमुख, भाऊसाहेब संभाजी कोकाटे, डॉ. किशोर संतोष पाटील, डॉ. रमेश उत्तमराव गोटखडे, यशपाल भाऊराव वरठे, डॉ. सुकन्या सुब्रम्हण्यम् भट, डॉ. निलय ग्यानचंदजी जैन, बंडू भाऊराव मोरे, रामदास तुकाराम कोकरे, सोमनाथ रामेश्वर वैद्य, प्रमोद सखाराम धुर्वे, सुरेश मारूती कोते, डॉ. अनिल गोपीनाथ रोडे, रोशन भगवान मराठे, जगन्नाथ सखाराम शिंदे, अमित गणपत गोरखे, श्रीमती जोत्सना शिंदे-पवार, आशिष शिवनारायण श्रीवास व श्रीमती आरती रणजितसिंह सचदेव यांना कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आले.
००००

Maharashtra Governor presents 'Karvatyam
Prerana Puraskar to 40 doctors, social workers

        Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the Kartavyam Prerana Puraskar for outstanding social service to 40 doctors and social workers from across the state at Raj Bhavan Mumbai on Tuesday (22 Feb). The Awards were presented on behalf of the Kartavyam Social Foundation, Pune.
        Chairman of the Foundation Santosh Barne and Secretary Krantikumar Mahajan were present on the dais. The Governor released the 21st edition of Krantikumar Mahajan's book 'Subhash Secret' on the occasion.
        The Kartavyam Prerana Awards were presented to Ujjwal Kumar Bhimrao Chavan, Dr. Nemji Karamshi Gangar, Dr. Sheikh Akhtar Hassan Ali, Dr. Alka Bharat Naik, Suryakant Mahadev Gowale, Ashok Sheshrao Shinde, Dr. Sunil Maruti Chavan, Sagar Ratankumar Kavade, Yashwant Ramdasji Kurve, Bhaskar Nimba Amritsagar, Mohammad Riaz Sheikh, Ramu Vasant Pagi, Sunil Nandlal Singh, Damodar Yashwant Ghanekar, Vasantrao Marotrao Dhadve, Pratibha Jayant Bhide, Dr. Yatin Trimbak Wagh, Dr. Varsha Nitin Deshmukh, Bhausaheb Sambhaji Kokate, Dr. Kishore Santosh Patil, Ramesh Uttamrao Gotkhade, Yashpal Bhaurao Varthe, Dr. Sukanya Subramanyam Bhat,Dr. Nilay Gyanchandji Jain, Bandu Bhaurao More, Ramdas Tukaram Kokare, Somnath Rameshwar Vaidya, Pramod Sakharam Dhurve, Suresh Maruti Kote, Dr. Anil Gopinath Rode, Roshan Bhagwan Marathe, Jagannath Sakharam Shinde,  Amit Ganpat Gorkhe, Smt. Jotsana Shinde-Pawar  Ashish Shivnarayan Srivas and Smt Aarti Ranjit Singh Sachdev.
0000

 राज्यात 27 फेब्रुवारीरोजी पल्स पोलिओ मोहीम

एक कोटी पंधरा लाख बालकांना डोस देणार
        मुंबई दि. 22 : राज्यातील सर्व जिल्ह्यात येत्या रविवारी, 27 फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविली जाणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी योगदान द्यावे, असे आवाहन आरोग्य सेवा आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी केले.
        यंदाच्या वर्षीच्या मोहिमेत एक कोटी पंधरा लाख मुलांना पल्स पोलिओचा डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
        पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 27 फेब्रुवारीला राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाचवेळी राबविण्यात येणार आहे. मोहिमेची पूर्वतयारी करण्यासाठी राज्य कृती दलाची बैठक गोकुळदास तेजपाल रुग्णालयातील मंथन सभागृहात झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.
        बैठकीस आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, अवर सचिव मं.प. कुडतरकर, महिला बालकल्याण विभाग सहाय्यक आयुक्त नितीन मस्के, आदिवासी विकास विभागाचे कार्यासन अधिकारी सचिन खांडेकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. धीरेन कलवाडीया, डॉ. हेमंत बंगोलिया आदी उपस्थित होते.
        डॉ. रामास्वामी यांनी सांगितले की, बालकांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी पल्स पोलिओ आणि मिशन इंद्रधनुष्य लसीकरण अतिशय महत्त्वाचे आहे. या दोन्ही लसीकरणाचे नियोजन करताना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणावर परिणाम होऊ देऊ नका. पल्स पोलिओ आणि मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहीमही मिशन मोडवरच राबविणे आवश्यक आहे.
        पल्स पोलिओ आणि मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहीमेसाठी महसूल, पोलीस, सहकार, शिक्षण, महिला बालविकास आणि नगरविकास विभागाचे जिल्ह्यातील अधिकारी यांना सहभागी करुन घ्यावे. याबाबत लोकांत जागृती निर्माण व्हावी यासाठी जिल्हास्तरावर प्रचार-प्रसिद्धी करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
        डॉ. अर्चना पाटील यांनी लसीकरणाची गरज, मोहिमेची केली जाणारी तयारी याबाबत माहिती दिली. सहाय्यक संचालक डॉ. सचिन देसाई यांनी मोहिमेबाबतच्या तयारीची माहिती सादरीकरण व्दारे दिली.
बैठकीस शालेय शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, शालेय शिक्षण विभाग, पश्चिम रेल्वे, महिला बालकल्याण, ग्राम विकास विभाग, नगर विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेबाबत
राज्यातील सर्व जिल्ह्यात २७ फेब्रुवारीला राबविणार
 एक कोटी पंधरा लाखाहून अधिक बालकांना डोस देण्याचे नियोजन
राज्यासाठी १.५४ कोटी डोस उपलब्ध
राज्यात ९२९५३ बूथ उभारणार
आरोग्य विभागाची २६१२६९ पथके घरोघरी भेट देणार
ट्रान्झिट पथकांची संख्या २९१२१
मोबाईल पथकांची संख्या १५१८२
आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, एएनएम यांचा सहभाग घेणार
मिशन इंद्रधनुष्य लसीकरण
मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात लसीकरण केले जाणार
सात मार्च, चार एप्रिल आणि नऊ मे पासून सलग सात दिवस मोहिम राबविण्यात येणार.
नऊ जिल्हे आणि दहा महापालिका कार्य क्षेत्रात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार
गर्भवती आणि दोन वर्षांखालील मुलांना लस देणार
****
वृत्त क्र

Holo re Holi

 


 राष्ट्रीय लोकअदालत 12 मार्च रोजी

·       राज्यात सर्व जिल्ह्यांत व तालुक्यात आयोजन
 
            मुंबई, दि. 22 : विधी सेवा प्राधिकरण अधिनियम, 1987 मधील तरतुदी अंतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तालुका, जिल्हा व उच्च न्यायालयात एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय लोकअदालत दि. 12 मार्च 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे, असे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांनी कळविले आहे.
0000

 मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटन मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करावे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमाला सन्मानाने बोलवावे


– आ. अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी

          मुंबई शहरातील अंधेरी पूर्व व दहिसर पूर्व तसेच अंधेरी पश्चिम व दहिसर पश्चिम या दोन्ही मेट्रो मार्गीकांचे उद्घाटन पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते करावे अशी मागणी मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

          मुंबई शहराच्या एकात्मिक मेट्रो वाहिन्यांच्या प्रकल्पांमध्ये केंद्र सरकारचे मोठे योगदान आहे. त्याचबरोबर मुंबई शहरातील मेट्रो प्रकल्प चालू करण्यामध्ये माजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा आहे, त्यामुळे या उद्घाटनाच्या कार्यक्रमात त्यांनाही प्रमुख अतिथी म्हणून सन्मानाने बोलवावे अशी मागणी ही आ. भातखळकर यांनी केली आहे. तसेच श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सुरू झालेले अनेक मोठे प्रकल्प ज्यांची उद्घाटने गेल्या दोन वर्षात झाली, त्यावेळेस श्री. देवेंद्र फडणवीस यांना न बोलावून ठाकरे सरकारने आपल्या कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडवले असल्याची टीका ही आ. भातखळकर यांनी केली आहे.

          मेट्रो मार्गीकांचे उद्घाटन पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते करून आणि माजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमाला सन्मानाने बोलावून मुख्यमंत्र्यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवावा असे ही आ. भातखळकर शेवटी म्हणाले.

Featured post

Lakshvedhi