Saturday, 19 February 2022

 राष्ट्रीय अन्न सुरक्षा  योजनेच्या जिल्हानिहाय उद्दीष्टांमध्ये सुधारणा

अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

 

अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींना मिळणार लाभ

 

    मुंबई,दि.19 : राष्ट्रीय अन्न सुरक्षा  योजनेअंतर्गत राज्यात सात कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातंर्गत जिल्हानिहाय  उद्दीष्टांमध्ये सुधारणा केल्यानंतर राज्यात 25 लाख 05 हजार 300 अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारकांना  तर कोटी 92 लाख 16 हजार  प्राधान्य कुटुंब लाभार्थींना सवलतीच्या दरात अन्नधान्य योजनेचा लाभ मिळणार आहे. अशी माहिती अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक हक्क संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

           राज्यासाठी 76.32 टक्के ग्रामीण(469.71लक्ष) व 45.34 टक्के शहरी ( 230.45लक्ष) असे एकूण कोटी लाभार्थी संख्या निश्चित करण्यात आली आहे.

        शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली (RCMS) वरील माहितीच्या आधारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातंर्गत जिल्हानिहाय  उद्दीष्टांमध्ये सुधारणा केल्यानंतर सध्या राज्यात अंत्योदय अन्न योजना  शिधापत्रिकाधारकांची संख्या नाशिकजळगाव,नंदूरबारअमरावतीयवतमाळचंद्रपूरगडचिरोली या सात जिल्ह्यात सर्वाधिक आहे. नाशिक जिल्हयातील अंत्योंदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक लाख 78 हजार 563, तर  प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी संख्या 29 लाख 80 हजार 804,जळगांव जिल्हयात अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक  1 लाख 35 हजार  192 तर प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी संख्या  22 लाख 19 हजार 690 ,नंदूरबार जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक लाख 06 हजार 857 प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यी संख्या लाख 41 हजार 360,अमरावती जिल्ह्यातील अत्योंदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक  1 लाख 25 हजार 632,   तर प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी संख्या 14 लाख  8 हजार 878 ,यवतमाळ जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक लाख 32 हजार 603  तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी संख्या 14 लाख 69 हजार 136 ,चंद्रपूर जिल्हयातील अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक लाख 40 हजार 621  तर प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी संख्या 10 लाख 74 हजार 240,गडचिरोली जिल्हयातील अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक लाख 02 हजार 338 तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी संख्या लाख 57 हजार 869 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.  राज्यात एकूण 25 लाख 05 हजार 300 अंत्योदय शिधापत्रिकाधारक तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी संख्या कोटी 92 लाख 16 हजार   यांना सवलतीच्या दरात योग्य व गरजू व्यक्तींना अन्नधान्य योजनेचा लाभ मिळणार आहे.

           अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्यांचा सुधारित इष्टांक देण्याच्या दृष्टीने शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली (RCMS) वर (Digitisation) संगणकीकरण करण्यात आलेल्या अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका व प्राधान्य कुटुंब लाभार्थी संख्येच्या राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम२०१३ अंतर्गत जिल्हानिहाय सुधारित इष्टांक देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. सुधारित इष्टांक देताना जिल्हा शहर  अथवा गाव हे घटक विचारात न घेता राज्य हा घटक विचारात घेऊन निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 नुसार पात्र असलेल्या शिधापत्रिकेवरील ज्येष्ठ महिलेच्या नावावर कुटुंबप्रमुख असा शिक्का मारण्याची खबरदारी यंत्रणेला घ्यावी लागणार आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत जिल्हानिहाय इष्टांक वाढीबाबतचा शासन निर्णय दिनांक 18 फेब्रुवारी 2022 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in  संकेतस्थळावर उपलब्ध आहे.    

 

                                                                                   

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 जय जय जय शिवाजी ’ च्या गजराने महाराष्ट्र सदन दुमदुमले

नवी दिल्ली दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळयातील ढोल-ताशांचे दिमाखदार सादरीकरण आणि जोडीला ‘जय भवानी, जय शिवाजी’ या उत्स्फुर्त घोषणांमुळे आज राजधानीतील ल्युटियन दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचा परिसर दुमदुमला.

शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती दिल्लीच्या वतीने कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आज शिवजयंती सोहळयाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र सदनाच्या केंद्रस्थानी कोल्हापूर येथील छत्रपती परिवारातील युवराज्ञी राजे संयोगिता राजे छत्रपती ,युवराज राजे शहाजी राजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवात सहभाग घेतला. यानंतर पालखी पुजन करण्यात आले.  

महाराष्ट्र सदनाच्या केंद्रस्थानी स्थापित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळयाला छत्रपती परिवारातील सदस्य, खासदार सदाशिवराव लोखंडे, माजी केंद्रीय राज्यमंत्री हसंराज अहिर, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्तांसह वरिष्ठ अधिका-यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  

सदनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळयाजवळ आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर कुमार बिस्वास, गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त डॉ. निधी पांडे, महाराष्ट्राचे माजी मंत्री विनोद तावडे यांच्यासह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी-कर्मचा-यांनी व दिल्ली राजधानी क्षेत्र, हरियाणा, उत्तर प्रदेशातून या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 

ढोल ताशांचे सादरीकरण ठरले आकर्षण

            ढोल ताशांच्या गजराने सदनाचे वातावरण दुमदुमले होते आणि सोबतीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेने वातावरण निणादून गेले होते. नाशिक येथील 30 वादकांच्या ढोल पथकात सहभागी तरुणाईंचा उत्साह व सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. या वाद्यवृदांच्या सादरीकरणाने उपस्थितांना ठेका धरायला लावला.

                     संसद भवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

            संसद भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास अभिवादन करण्यात आले.यावेळी युवराज राजे शहाजी राजे छत्रपती, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.


 



 *चेहरे अजनबी हो जायें,* 

 *तो कोई बात नहीं*

 *लेकिन....* 

 *रवैये अजनबी से हो जाये ,* 

 *तो बड़ी तकलीफ देते हैं!*                    

   *༺सुप्रभात आप का दिन मंगलमय हो༻*

 शिवजयंती निमित्त राज्यपालांचे शिवरायाला अभिवादन

मुंबई, दि. 19 :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

यावेळी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, उपमहापौर ॲड. सुहास वाडकर, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष किसन जाधव, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ संजीव कुमार आदी उपस्थित होते.

सनई चौघडा वादकांना शाबासकी

शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन चौथऱ्यावरून खाली येताना राज्यपालांनी सनई चौघडे वाजविणाऱ्या कलाकारांजवळ थांबून उत्तम वादन केल्याबद्दल त्यांना शाबासकी दिली व बक्षीस दिले. 

कार्यक्रमाचे आयोजन बृहन्मुंबई महानगरपालिका व श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्यावतीने करण्यात आले होते. 

अभिवादन सोहळ्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे क्रीडा भवन येथे महानगरपालिकेतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील उपस्थित राहिले. यावेळी संगीत कला अकादमीतर्फे शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर सुहास वाडकर, माजी महापौर श्रद्धा जाधव, खा. अरविंद जाधव, किसन जाधव आदी उपस्थित होते. 

 Governor garlands statue of Shivaji Maharaj on Shiv Jayant

 Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari garlanded the equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Chhatrapati Shivaji Maharaj Park in Mumbai on the occasion of Shiv Jayanti on Saturday (19th Feb).

 Guardian Minister of Mumbai Aslam Sheikh, Mayor of Mumbai Kishori Pednekar, Member of Parliament Arvind Sawant, Deputy Mayor Adv Suhas Wadkar, former Mayor Shraddha Jadhav, Chairman of Shri Chhatrapati Shivaji Maharaj Smarak Samiti Kisan Jadhav, Additional Municipal Commissioner Dr Sanjeev Kumar and citizens were present.

 The Governor later participated in the Shiv Jayanti celebrations organised by the Brihanmumbai Municipal Corporation at Krida Bhavan and listened to the patriotic songs on the life of Chhatrapati Shivaji Maharaj presented by the Sangeet Kala Academy of BMC


शिवछत्रपतींना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरe

शिवजन्मोत्सवाच्या दिल्या शुभेच्छा

            मुंबई, दि. 19 :- छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. राज्य चालवताना आमच्यासमोर शिवरायांचा आदर्श असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनपर संदेशात म्हटले आहे. त्यांनी राज्यातील जनतेला शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. 

            वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

            अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्यावर अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारते. स्वराज्यावर अनेक संकटे आली, काही स्वकीयांकडून तर काही परकीयांकडून, पण महाराज कधीही झुकले नाहीत. त्यांचे शौर्य, व्यक्तिमत्व, रयतेच्या हितासाठी केलेले कार्य, दूरदृष्टी याचे दाखले आजही दिले जातात. 

            महाराजांचे वेगळेपण हे की, ते युगपुरुष होते , त्यांची दूरदृष्टी, आदर्श राज्यकारभार, रणनीती याचे आज आपल्यासमोर उदाहरण आहे. त्यांचे आज्ञापत्र वाचले तर शिवराय किती प्रजा दक्ष होते याची कल्पना आल्याशिवाय राहणार नाही. त्यांचे व्यवस्थापन कौशल्य, समयसूचकता ही वैशिष्ट्ये आजच्या व्यवस्थापनशास्त्रालाही अभ्यासण्यासारखी आहेत. 

            शिवराय सर्वांचे होते. स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी बांधलेल्या सेनेत अठरा पगड जातीचे लोक होते, जात-धर्म-भाषा यांच्या भिंती ओलांडून शिवरायांवर प्रेम करणारे लोक होते. शिवरायांच्या युद्ध नितीमुळे भारतीय लष्कर त्यांना आज आपले दैवत मानते. 

            राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करून आपण हा पराक्रमी इतिहास पुढील अनेक पिढ्यांच्या मार्गदर्शनासाठी जतन करण्याचे कामही हाती घेतले आहे. शिवछत्रपतींची शिकवण डोळ्यासमोर ठेऊन आमचे सरकार काम करीत आहे आणि पुढे देखील करणार आहे,अशी ग्वाही यानिमित्ताने देतो. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त परिवहन मंत्री

अनिल परब यांचे मंत्रालयात अभिवादन

            मुंबई, दि.19 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परिवहन व संसदीय कार्य मंत्री अनिल परब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंत्रालयातील प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

            यावेळी परिवहन मंत्री परब यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता जिजाऊ यांच्या मंत्रालयातील प्रतिमेला पुष्प अर्पण करून वंदन केले. याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव विठ्ठल भास्कर यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त

विधान भवनात अभिवादन

मुंबई, दि. १९ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्यास विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी याप्रसंगी सचिव महेंद्र काज, अवर सचिव रविंद्र जगदाळे, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

000


 



Featured post

Lakshvedhi