Wednesday, 9 February 2022

 पाणलोट विकास घटक 2.0 योजना

राज्यात राबविण्याबाबत काटेकोर नियोजन करावे


- मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाkh

            मुंबई, दि. 8 : प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 योजना राज्यात राबविणेबाबत कोटेकोर नियोजन करण्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी निर्देश दिले.

            मंत्रालयात मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली नवीन प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेची (2.0) आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

            जलसंधारण मंत्री श्री.गडाख म्हणाले, योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या निधीचे प्रमाण 60 : 40 आहे. मृदेची धूप कमी करणे व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे या योजनेचे उद्दिष्ट असून सन 2022 पासून अंमलबजावणी सुरु होत आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील एकूण 30 जिल्हयांमध्ये राबविला जाणार असून मंजूर प्रकल्प संख्या 144 आहे. कार्यक्रमाद्वारे एकूण 5.65 लक्ष हेक्टर क्षेत्रावर उपचार केले जाणार असून प्रकल्प मुल्य रु.1333.56 कोटी (5 वर्षासाठी) आहे.

            प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना पाणलोट विकास 2.0 या योजनेच्या मुलस्थानी मृद व जलसंधारणाच्या उपाययोजनांवर, उताराला आडवी पेरणी, मिश्र पिक पद्धत, मृतसरी काढणे, रुंद सरी - वरंबा पध्दतीने पेरणी, बांधबंदिस्ती, गॅबियन बंधारे इ. उपाययोजनांवर भर देण्याचे निर्देश श्री.गडाख यांनी दिले. तसेच क्षमता उपचार नकाशाचा वापर करुन तांत्रिकदृष्ट्या सुयोग्य कामांची निवड करुन अंमलबजावणी करणे, जलशक्ती अभियानाशी सांगड घालून पावसाच्या पाण्याचे साठवण, पुनर्भरण, पाणी साठ्यांचे पुनरुज्जीवन व पुनर्वापरावर भर देणे, उपलब्ध पाण्याच्या सुक्ष्म सिंचनाद्वारे कार्यक्षम वापरावर भर देऊन सिचंन क्षेत्रात वाढ होईल याबाबत विभागाने सुयोग्य नियोजन करण्याबाबतच्या सूचना श्री. गडाख यांनी दिल्या. 

            महिलांच्या बचतगट बळकटीस सहाय्य, लोकसहभाग व पाणलोट समितीच्या माध्यमातून प्रभावीपणे कामकाज होण्याकडे विभागाने लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

            प्रकल्पाच्या गुणवत्तापूर्वक व जलद कार्यान्वयनाकरिता राज्यस्तरीय व प्रकल्पस्तरीय नोडल यंत्रणेच्या बळकटीकरणाबाबत श्री. गडाख यांनी विभागास निर्देश दिले. या बैठकीस जलसंधारण विभागाचे सह सचिव, श्री. सु.कि.गावडे, संचालक, प्रधानमंत्री कृषि सिंचना योजना श्री.शिरोदे उपस्थित होते.

00000

 *लाख दलदल हो,*

*पाँव जमाए रखिये..*

*हाथ खाली ही सही,*

*ऊपर उठाये रखिये..*

*कौन कहता है छलनी में पानी रुक नहीं सकता?*

*बर्फ़ बनने तकहौसला बनाये रखिये.!*

         🙏🙏 ** 🙏🙏

 शेजारी पाजारी.. यातल्या पाजारीचा अर्थ आता समजला.

अडीनडीच्या वेळी डाळ तांदूळ तेल वगैरे देणारे ते शेजारी

आणि

अडीनडीच्या वेळी वाइन वगैरे देणारे ते पाजारी.


🥂🥃🍸😂🍷

Tuesday, 8 February 2022

 आजूबाजूच्या गावातील शेतकरी बांधवांनी आपला गोवंश कत्तलीसाठी न देता आम्हला कळवा आम्ही आपल्याकडून कसायांच्या पेक्षा हजार रु जास्त देऊन गोशाळेत नेऊन मरेपर्यंत सांभाळ करू. संपर्क :- शिवशंकर स्वामी(खाडगांव):- 9921481102 , विशाल भंडारे(सोलापूर) -7666796643, गणेश वाघ(पंढरपूर)-8282824209, समर्थ गेजगे (मिरज):- 8956394011, शुभम जोशी(सांगली)-8329205375, विशाल चव्हाण(सातारा)-8181819484, हेमंत शेळके(सातारा)-8459644178, अभिजीत भंडारे(सातारा)-7499235614,निलेश भंडारे,(सातारा)7499692100

8551889662विशाल साळुंखे (सातारा)ह्या नंबरवर संपर्क साधावा ही नम्र विनंती..!

आपले नम्र -

गो माता फाउंडेशन खांडगाव🚩जय श्रीराम जय गो माता🙏🏻🤝🚩😊

🙏🤝🚩

========================हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा🙏🏻🙏🏻💐💐

Monday, 7 February 2022

 दिलखुलास' कार्यक्रमात प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांची मुलाखत

मुंबई दि. 7: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक सुनील लिमये यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्युज ऑन एआयआर' या ॲपवरून मंगळवार दि. 8 फेब्रुवारी आणि बुधवार दि.9 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार व निवेदक रणधीर कांबळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

          राज्यात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षात झालेली वाढ, त्याची कारणे आणि अशा घटना रोखण्यासाठी वन विभागातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजना, व्याघ्र व त्यांचे व्यवस्थापन, संवर्धन, राज्यात गेल्या दोन वर्षात नव्याने घोषित करण्यात आलेले संवर्धन राखीव, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच ठाणे खाडी अभयारण्य यांचे व्यवस्थापन, कोकणात वनविभागातर्फे एका ठिकाणी कासवाच्या पाठीवर बसवण्यात आलेले रेडिओ कॉलर अशा सर्व निर्णयांची व विविध नाविण्यपूर्ण योजनांची माहिती सुनील लिमये यांनी 'दिलखुलास' या कार्यक्रमातून दिली आहे.

0000


 

 राज्य मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल मुख्यमंत्र्याकडे सादर

मुंबई दिनांक 7: स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भातील राज्य मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला.

            यावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार, मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्यासह आयोगाचे इतर सदस्य व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


    

 ***धडधाकट व ऐतखावू, सुशिक्षित बेरोजगार समजणाऱ्या तरुण मुलांना लाजवीणारी पोस्ट **

&&&&पंक्चरचं दुकान &&&&&

*************************

पंक्‍चर काढण्याचे आगळे वेगळे दुकान

फुलेवाडी पहिल्या बसस्टॉपजवळच्या पंक्‍चर काढण्याच्या एका आगळ्या वेगळ्या दुकानाची ही कथा आहे. ‘नाचता येईना अंगण वाकडे’ या म्हणीप्रमाणे कामे टाळून फिरणाऱ्या तरुणांनी या दुकानातील मतिमंद मुले कशी मन लावून कामे करतात, हे पाहण्याची गरज आहे.

कोल्हापूर - ‘हे पंक्‍चर काढायचे दुकान आहे का, खुळ्याची चावडी’, असे काही लोक मुद्दाम चेष्टेने म्हणायचे... पंक्‍चर काढणाऱ्यांच्या हालचाली चेहऱ्यावरचे भाव पाहून कुत्सितपणे हसायचे. पण हे आठ जण मात्र समोरच्याकडे लक्ष न देता, शांतपणे काम करत राहायचे. एकजण पंक्‍चर झालेले चाक काढायचा. दुसरा पंक्‍चर शोधायचा. तिसरा पंक्‍चर काढायचा. चौथा हवा भरायचा. सुरुवातीला ते थोडे गोंधळायचे. हळूहळू त्यांचा जम बसला आणि आज पंक्‍चर काढायचे हे दुकान एकदम फास्ट आहे. विशेष हे की, येथे काम करणारे हे आठही जण मतिमंद, गतिमंद, मूकबधिर आहेत. पण शहाण्या धडधाकट माणसाला लाजवतील असा त्यांचा या कामात हात बसला आहे.

फुलेवाडी पहिल्या बसस्टॉपजवळच्या पंक्‍चर काढण्याच्या एका आगळ्या वेगळ्या दुकानाची ही कथा आहे. ‘नाचता येईना अंगण वाकडे’ या म्हणीप्रमाणे कामे टाळून फिरणाऱ्या तरुणांनी या दुकानातील मतिमंद मुले कशी मन लावून कामे करतात, हे पाहण्याची गरज आहे.

‘राबणाऱ्याला क्षितिज खूप मोठं’ हा संदेश

कामात रमल्याने या मुलांचे औषधही बंद झाले. सकाळी नऊला ही मुले कामाला येतात. आल्या आल्या कामाला सुरुवात करतात. दुपारी पंगत करून जेवायला बसतात. आपल्या आपल्यात हसतात, गंमत करतात. अधूनमधून खोड्या करतात. पण काम मनापासून करतात. राबणाऱ्याच्या हाताला क्षितिज खूप मोठं अतिं, हाच जणू संदेश ते आपल्या कृतीतून देतात.

श्रावण टायर अँड सर्व्हिसिंग सेंटर या दुकानाचे मालक महेश शामराव सुतार हे स्वतः एम.ए.बी.पी.एड आहेत. नोकरीच्या शोधात फिरत राहिले. पण नोकरी मिळण्यासाठी पदवीबरोबर ‘इतरही’ काही लागते हे लक्षात आल्यानंतर नोकरीचा नाद सोडला आणि वडिलांच्या पंक्‍चर काढण्याच्या दुकानात हवा भरण्याचे काम करू लागले. ते हळूहळू सर्व काम शिकले व त्यांनी आपल्याला नोकरी नाही मिळाली तरी इतरांना आपल्या व्यवसायात नोकरी द्यायचे व त्यासाठी त्यांनी मूकबधिर, अपंग व मतिमंदांना प्राधान्य द्यायचे ठरवले. कारण धडधाकट माणसाला कोणीही नोकरी देईल; पण अपंग, मतिमंदांना शक्‍यतो कोणी नोकरीवर ठेवत नाही. त्यांनी संभाजी रामचंद्र दिवसे, अभय गणेश केसरकर, अनिल मोहन खटावकर, अमिर गुलाब खान, संकेत सपकाळे, सुजित सुतार, किसन मुरलीधर कदम व ओंकार राजू मोरे या मतिमंद, मूकबधिर, अपंगांना कामावर घेतले.

खाणाखुणांनी गिऱ्हाईकाशी संवाद

ही मुले काम कशी करणार? त्यांना काम कसे समजणार, ते गिऱ्हाईकाशी कसा संवाद करणार हा प्रश्‍न होता. पण महेश सुतार यांनी हे आव्हान स्वीकारले व त्यांनी या मुलांना काम शिकवणे सुरू केले. सुरुवातीला थोडा त्रास झाला. पण त्यांनी सर्व मुलांना काम शिकवले. त्यांच्या दुकानात ही मतिमंद, मूकबधिर अपंग मुले पाहून काही लोक कुचेष्टा करायचे. हे दुकान आहे की खुळ्याची चावडी आहे असे म्हणायचे. पण हळूहळू ही मुले मनापासून काम करू लागली. अगदी हौसेने पंक्‍चर काढणे, हवा भरणे, गाडी धुणे, स्वच्छ करणे यात गुंग होऊन गेली. खाणाखुणांनी गिऱ्हाईकाशी संवाद करू लागली.

आज दुकानातली सर्व कामे ही मुले आनंदाने करतात. कधीही कामाला दांडी मारत नाहीत, कामात चूक करत नाहीत; काम करताना तोंडात तंबाखू, मावा, पानपराग असली भानगड करत नाहीत. ही मुले इतके चांगले काम करतात हे त्यांच्या घरातल्यांनाही पटत नाही. कारण काम करण्यापूर्वी ही मुले त्यांच्या घरात अधूनमधून विक्षिप्त वागून घरच्यांना त्रास देत होती. आता ही मुले कामात रमली आहेत. ही मुले घरात पगार किती आणतात यापेक्षा ही मुले कामात रमली याचे त्यांच्या घरातल्यांना खूप समाधान आहे.

Featured post

Lakshvedhi