Friday, 31 December 2021

 समग्र शिक्षा योजनेशी samagrashiksha.org या संकेतस्थळाचा संबंध नाही


· महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचा खुलासा

            मुंबई, दि. 31 : महाराष्ट्र राज्य शासनाशी तसेच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यालयाशी व समग्र शिक्षा योजनेशी https://samagrashiksha.org/ या संकेतस्थळाचा तसेच या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेचा कोणताही संबंध नाही, असे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक, राहुल द्विवेदी यांनी कळविले आहे.

           https://samagrashiksha.org/ या संकेतस्थळावर Sarva Shiksha Abhiyan Recruitment Teacher, SSA Lab Technician, SSA Computer Teacher. Samagra Shiksha Abhiyan Recruitment Karyalaya Staff, Chaprasi या पदांची भरती प्रक्रिया सुरू असल्याचे दिसून येत आहे. हे संकेतस्थळ शासनाचे नाही. तसेच या भरती प्रक्रियेचा राज्य शासनाशी तसेच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यालयाशी कोणताही संबंध नाही. तथापि, या भरती प्रक्रियेच्या संकेतस्थळावरील जाहिरातीमुळे उमेदवारांची दिशाभूल/ फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

            प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व शिक्षा अभियान केंद्र पुरस्कृत योजनेची सन २००२-०३ पासून सन २०१७-१८ पर्यंत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिनस्त महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद शिक्षण परिषद, मुंबई या स्वायत्त संस्थेमार्फत राज्यभर अंमलबजावणी करण्यात येत होती.

           सद्य:स्थितीत सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व शिक्षक शिक्षण या पूर्वाश्रमीच्या केंद्र पुरस्कृत योजनाच्या एकत्रिकीकरणातून दि. ०१/०४/२०१८ पासून समग्र शिक्षा योजनेची अंमलबजावणी या कार्यालयामार्फत राज्यात सुरू आहे. त्यामुळे सन ३१/०३/२०१८ नंतर सर्व शिक्षा अभियान या योजनेची वेगळी अंमलबजावणी राज्यात सुरू नाही, असेही यासंदर्भातील पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

०००००



 मी आणी माझे बॉस दारू पिऊन गाडीने घरी जात होतो.

तेव्हा मी ओरडलो, सर, समोर भिंत बघा. भिंत आहे, भिंत, भिंत बघा...  

आणि धम्म..

आम्ही भिंतीवर जोरात आपटलो. 

दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये मी सरांना विचारलं, मी ओरडून ओरडून सांगत होतो भिंत आहे, भिंत आहे, ऐकलं की नाही तुम्ही ?

सर बोलले, ऐकून काय केलं असतं बेवड्या...

गाडी तर तू चालवत होतास.

🤨🤓😃😃

 *Drive Safely*

 *Believe (विश्वास) आणि Trust (विश्वास)*


दोन्ही शब्दांचा अर्थ "विश्वासच" आहे. पण तरीही दोन्ही विश्वासात अंतर आहे.

एकदा शेजारी शेजारी असलेल्या दोन उंच इमारतींच्या मधे केबल टाकून ती घट्ट बांधून व हातात मोठा बांबू घेऊन एक डोंबारी त्या केबल वरून या इमारती वरून त्या इमारतीवर जात होता. त्याच्या खांद्यावर त्याचा लहान मुलगा होता. दोन इमारतींच्या मधे हजारो माणसे जमा झाली होती व श्वास रोखून त्याची ती जीवघेणी कसरत पहात होती. हलणारी केबल, जोरदार वारा, स्वतःचा आणि मुलाचा जीव पणाला लावून त्याने ते अंतर पूर्ण केलं.

जमलेल्या लोकांनी उत्साहाने टाळ्या, शिट्या वाजवल्या. तोंड फाडून कौतुक केले.

तो इमारतीच्या खाली लोकांमधे आला. लोक त्याच्या बरोबर फोटो. सेल्फी काढू लागले. त्याचं अभिनंदन करू लागले. 

तो डोंबारी सगळ्यांना उद्देशुन म्हणाला 

"मला हे पून्हा एकदा करावसं वाटतं. तूम्हाला विश्वास वाटतो का मी हे पून्हा करू शकेन?"

सगळी माणसं एक आवाजात म्हणाली

"हो, तू हे परत एकदा नक्कीच करू शकतोस."

डोंबारी म्हणाला "तूम्हाला विश्वास आहे मी हे करू शकेन?"

पुन्हा सगळे ओरडले "हो हो आम्हाला विश्वास आहे तू पून्हा हे नक्कीच करू शकशील."

"तुम्हाला नक्की विश्वास आहे ना?"

"हो. तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू खात्रीने करू शकशील."


डोंबारी म्हणाला "ठीक आहे. तुमच्यापैकी कोणीतरी मला तुमचा मुलगा द्या मी त्याला खांद्यावर घेऊन मी या केबल वरून चालतो."

जमावा मधे एकदम शांतता पसरली.

सगळे चिडीचूप झाले.

डोंबारी म्हणाला "काय झाले. घाबरलात का? आताच तर तूम्ही म्हणालात की माझ्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणून?"


*तात्पर्य-* जमावाने जो डोंबाऱ्यावर दाखवलेला विश्वास हा *Belief* आहे.

*Trust* नाही.

तसेच हाच भ्रम सगळ्यांना आहे,

परमेश्वर आहे. पण परमेश्वराच्या सत्तेवर विश्वास नाही.

*You only belive in God, But you don't trust him.*

परमेश्वरावर विश्वास असेल तर

चिंता आणि ताण- तणाव कशाला हवेत. त्याच्या नामाने दगड तरले तर आपण का नाही तरणार? परमेश्वरावर ठाम विश्वास बसण्यासाठी आपण चमत्काराची वाट पाहत बसतो. पण खरा चमत्कार हाच आहे की रोज तो मला नवीन करकरीत कोरा दिवस देतो माझ्या गत चुकांमधून शिकण्यासाठी आणि नवीन क्षितिजे पादाक्रांत करण्यासाठी. माझ्या जीवनात प्रत्येक क्षणाला माझा परमेश्वर माझ्या सोबत असतोच आणि माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाची खबर त्याला असतेच हा विश्वास असला तर आपल्यासाठी जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही.

🙏🏻

 समृद्ध महाराष्ट्र, बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया,

आव्हानांवर मात करूया 

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,नववर्षाच्या शुभेच्छा

· गर्दी टाळण्याचे, आरोग्यदायी संकल्पांचेही आवाहन

          मुंबई, दि. 31 : थांबायचं नाही. पण सतर्क आणि सावध राहायला हवे. कितीही आव्हाने येऊ देत. त्यावर आपण मात करूया. नव्या वर्षात हीच हिंमत बांधुया. आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन वर्ष आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो. त्यासाठी आरोग्यदायी संकल्प करूया, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

          नववर्षाचे स्वागत करताना जगावर आलेल्या कोरोना संकटाचे भान राखावे. गर्दी नकोच आणि आपल्या वागण्यातून, बेफिकिरीतून संसर्ग वाढीला हातभार लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी नववर्ष प्रारंभाच्या पूर्वसंध्येला केले आहे.

          मुख्यमंत्री संदेशात म्हणतात, नवे वर्ष हे आपल्याला नवनवीन संकल्पांसाठी प्रेरणा देते. अनेकजण अडथळ्यांना दूर सारून नवे संकल्प करतात. नव्या उमेदीने उभे राहतात. याच उभारीतून एक-एकजण म्हणता- म्हणता आपला समाज आणि आपण आव्हानांवर मात करण्यासाठी सज्ज होतो. हीच जिद्द बाळगून आपल्याला पुढे जायचे आहे. नवनवीन संकल्पांसाठी सिध्द व्हायचे आहे. कितीही आव्हाने येऊ देत त्यांच्या छाताडावर उभे राहून यशाला गवसणी घालण्याची हिंमत बांधायची आहे. यातूनच आपल्याला समृद्ध महाराष्ट्र आणि पर्यायाने बलशाली भारत घडवायचा आहे. त्यासाठी आणि नवीन वर्ष आरोग्यदायी ठरेल, ते आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येईल याकरिता मनःपूर्वक शुभेच्छा आणि नववर्षाभिनंदन.

0000



 इलेक्ट्रीक वाहन धोरणांतर्गत त्वरीत नोंदणी सूट मर्यादेस

31 मार्चपर्यंत मुदतवाढ

            मुंबई, दि. 30 : इलेक्ट्रीक वाहन धोरणांतर्गत 31 डिसेंबर 2021 पर्यंत असलेली त्वरीत नोंदणी सूट ची मर्यादा दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत वाढविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्याचबरोबर दि. 1 जानेवारी 2022 पासून शासकीय व निमशासकीय यंत्रणा तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत खरेदी करण्यात येणारी वाहने बॅटरी इलेक्ट्रीक वाहने असावीत. तसेच दि. 1 एप्रिल 2022 पासून शासकीय वापरासाठी भाडेतत्वावर घेण्यात येणारी सर्व वाहने ही बॅटरी इलेक्ट्रीक असतील, असेही यासंदर्भातील शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

            राज्याने 23 जुलै 2021 च्या शासन निर्णयानुसार इलेक्ट्रीक वाहन धोरण जाहीर केले आहे. इलेक्ट्रीक वाहन खरेदीस चालना मिळावी म्हणून या धोरणामध्ये विविध प्रकारची प्रोत्साहने जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये त्वरीत नोंदणी सूट या प्रोत्साहनाचा समावेश आहे. तसेच दि. 1 एप्रिल 2022 पासून परिचालित होणारी सर्व शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत व शासनाच्या निधीमधून खरेदी करण्यात येणारी वाहने बॅटरी इलेक्ट्रीक वाहने असावीत असा निर्णय घेण्यात आला आहे.

            इलेक्ट्रीक वाहन धोरण जाहीर झाल्यानंतर या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित असलेले विविध विभाग व यंत्रणांशी समन्वय साधून अंमलबजावणी करण्यात येत आहे. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव आतापर्यंत अपेक्षित नोंदणी होऊ शकली नाही. त्यामुळे त्वरीत नोंदणी सूटचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच इलेक्ट्रीक वाहन खरेदीस प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने शासकीय व निमशासकीय यंत्रणांमार्फत जानेवारी ते मार्च 2022 या कालावधीत खरेदी करण्यात येणारी वाहने ही बॅटरी इलेक्ट्रीक वाहने असणे आवश्यक असल्याने धोरणात तसा बदल करण्यात आला आहे.

०००००



 


'

 Alibag chya लोकांचं एक बरं असतं... 

31st चा प्लॅन कॅन्सल झाला तरी Alibag la असतात.. 

🤣🤣🤣

Bhagwad geeta

 


Featured post

Lakshvedhi