Sunday, 26 December 2021

 मोरगाव, थेऊर, सिद्धटेक, महड व पाली येथील

देवस्थान विकासासाठी सर्वंकष कार्यवाही करावी

- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हe

            मुंबई, दि. 23 : अष्टविनायक देवस्थानातील मोरगाव, थेऊर, सिद्धटेक, महड व पाली या पाच देवस्थानांच्या विकासासाठी सर्वंकष कार्यवाही करण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

            दि 11 ते 13 डिसेंबर रोजी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी अष्टविनायक देवस्थान आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत या पाच देवस्थानांचा पाहणी दौरा करुन भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधांचा आढावा घेतला. त्यावेळी संबंधीत देवस्थानचे व गावातील पदाधिकारी तसेच शासकीय अधिकारी उपस्थित होते. अष्टविनायक देवस्थानांना जगभरातून अनेक भाविक भेटी देत असतात. कोरोना महामारी कालावधीत या देवस्थानांना भाविकांना भेट देता आली नाही. कोरोनासंदर्भातील निर्बंध शिथिल केल्यानंतर अनेक भाविक अष्टविनायक दर्शनासाठी येत आहेत. भाविकांना आवश्यक सोयीसुविधा आणि त्यांच्या व्यवस्थेसंदर्भात पुणे, अहमदनगर व रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निर्देश दिले असल्याचे उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

            पुणे जिल्ह्यातील मोरगाव देवस्थानच्या आढावा बैठकीत भक्त निवासाची व्यवस्था करावी, अन्नछत्र सुरू करावे. थेऊर देवस्थान मंदिर परिसराबाबत थेऊर फाटा ते थेऊर या रस्त्याची दुरुस्ती व मंदिराजवळील रस्ते दुरुस्ती करावेत, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांना देण्यात आले आहेत.

            अहमदनगर जिल्ह्यातील सिद्धटेक येथील दौंड ते सिद्धटेक मंदिरापर्यंतचा रस्ता दुरुस्ती, भीमा नदीच्या घाटाचे सुशोभीकरण, मंदिर परिसरात हायमास्ट दिवे लावणे, उपलब्ध 40 कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या आराखड्याचे प्रारूप सादर करावे, असे निर्देश अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहेत.

            रायगड जिल्ह्यातील महड देवस्थानतील सुविधांबाबत झालेल्या बैठकीत महड फाटा ते महड देवस्थान मार्गावर हायमास्ट दिवे लावण्यासाठी उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी पाच लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह बांधावे, तलावाचे सुशोभिकरण करणे, खोपोली ते पाली हा रस्ता दुरुस्त करावा तसेच पाली देवस्थानमध्ये ग्रामीण पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून भाविकांना शुद्ध पाणी उपलब्ध करावे, बायपास रस्ता पूर्ण करावा, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, रायगड यांना देण्यात आले, असल्याचेही डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

0000


 'पढेगा भारत' जिओ टीव्ही एज्युकेशन चॅनेलचे उद्घाटन

देशाला पुढे नेण्याची क्षमता शिक्षणातच - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे, दि. 25 : देशाला पुढे नेण्याची क्षमता शिक्षणात आहे. शिक्षण क्षेत्रात लावल्या जात असलेल्या नित्यनूतन शोधातूनच आपल्याला प्रगती साधायची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

पिंपरी येथील आचार्य अत्रे रंग मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते जिओ टीव्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'पढेगा भारत' चॅनेलचे उद्घाटन झाले. कार्यक्रमास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, राष्ट्रीय विमुक्त जाती भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते, पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेच्या महापौर उषा ढोरे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, माजी खासदार डॉ. अमर साबळे, 'पढेगा भारत' च्या अध्यक्षा वेणू साबळे आदी उपस्थित होते.

कल्पना करायची असेल तर उच्च दर्जाची करावी, असे सांगून राज्यपाल म्हणाले, साहसाचा संकल्प केला तर आपल्या हातून उत्कृष्ट दर्जाचे काम घडू शकते. माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी साहसवादाचे कृतीशील उदाहरण घालून दिले. आता पाश्चात्य देशांपेक्षा आपल्या संस्कृतीकडे जग आपल्याकडे आशेने पाहत आहे. मुले ही आपल्यासाठी देवासमान असून त्यांना आपल्याला पुढे न्यायचे आहे. त्यासाठी आभासी 'डिजिटल' सोबतच प्रत्यक्ष अशा 'व्हिजिटल' अशा दोन्ही पद्धतींचा अवलंब करावा लागेल, असेही श्री. कोश्यारी म्हणाले.

'पढेगा भारत' हे चॅनेल शिक्षणासाठी महत्वपूर्ण माध्यम ठरेल, असा विश्वास व्यक्त करून सांस्कृतिक संवर्धनासाठी आर्टिफिशीयल इंटेलिजन्स बरोबरच अध्यात्मिक इंटेलिजन्सलाही महत्त्व द्यावे लागेल, असेही राज्यपाल यावेळी म्हणाले.

डॉ. कराड म्हणाले, सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असून त्यात जो अधिक स्पर्धात्मक राहील तोच पुढे जाईल. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत. शिक्षणाच्या माध्यमातूनच आपली प्रगती होणार असून ‘पढेगा भारत’ने हे ज्ञानदानाचे पवित्र काम उत्कृष्ट पद्धतीने करुन चांगले डॉक्टर, प्राध्यापक, तंत्रज्ञ, उद्योजक आदी सर्वच क्षेत्रातील लोक घडवावेत. दूरचित्रवाणी हे दृकश्राव्य माध्यम असून त्याचा शिक्षणासाठी अधिक चांगला उपयोग होईल, असेही ते म्हणाले.

डॉ. माशेलकर म्हणाले, अल्प खर्चात उच्च दर्जाचे शिक्षण हे उद्दिष्ट असले पाहिजे. शिक्षणाचा विस्तार, वेग, शाश्वतता, गुणवत्ता याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 'राईट टू एज्युकेशन' बरोबरच 'राईट एज्युकेशन' आणि 'राईट वे ऑफ एज्युकेशन' हे आताच्या काळात महत्त्वाचे ठरणार आहे. कृतिशील, गतिशील शिक्षणाद्वारे ज्ञानाबरोबरच व्यक्तिसंवर्धन आणि मूल्यवर्धन घडवायचे आव्हान आपल्याला पेलायचे आहे. तंत्रज्ञानाच्या सहकार्याने हे शक्य होत आहे. बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान आणि आत्मविश्वास यातूनच नवी पिढी घडणार आहे, असेही ते म्हणाले.

श्री. इदाते म्हणाले, गौतम बुद्धांची प्रज्ञा, शील आणि करुणा ही तत्वे आत्मसंवर्धनासाठी महत्त्वपूर्ण आहेत. शिक्षणातील महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींचे कार्य मार्गदर्शक आहे. त्या मार्गावर चालत अमर साबळे यांनी सुरू केलेले ‘पढेगा भारत’ अभियान शिक्षणाला व्यापक स्वरूप देईल असेही ते म्हणाले.

डॉ. नितीन करमळकर म्हणाले, कोवीड काळात शिक्षण ठप्प झाले आणि आपण ऑनलाइन शिक्षणाकडे वळून त्याचे स्वरूप व्यापक केले. शालेय शिक्षण ते उच्च दर्जाच्या स्पर्धा परीक्षा एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्याचा हा चांगला प्रयत्न आहे. केवळ डिजिटल नव्हे तर दर्जेदार शिक्षण यातून मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

 वेणू साबळे यांनी स्वागत करून पढेगा भारतच्या कामाचा आढावा घेतला व नवीन चॅनेलची माहिती दिली. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, जिओ चे प्रतिनिधी दीपक शिवले आदी उपस्थित होते.

00000

महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचा उद्घाटन समारंभ

अध्यापक विकास संस्था नवा दृष्टीकोन देणारी ठरेल - उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे दि. 25 : शिक्षण क्षेत्रात वेगाने घडत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर अध्यापकांनी नवे ज्ञान आणि तंत्रज्ञान स्वीकारणे गरजेचे असून अध्यापकांना त्यासाठी आवश्यक नवा दृष्टीकोन देण्यास महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, आजचा विद्यार्थी इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी जोडला गेला आहे. तो अभियांत्रिकी, वैद्यकीय, चित्रपट, नाटक, कला, संस्कृती, नवे शोध आदी क्षेत्राबाबत अधिक जागरूक आहे. शिक्षक आणि संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांच्या पुढे राहण्यासाठी नवा दृष्टीकोन स्वीकारण्याची गरज आहे. अध्यापक विकास संस्थेच्या माध्यमातून नव्या युगातील आधुनिक ज्ञान आणि प्राध्यापकांच्या नेतृत्व गुणांचा विकास करणे शक्य होईल. चांगले शिक्षक घडविण्यासाठी ही संस्था उपयुक्त ठरेल.

गुरु-शिष्य परंपरेचा गौरवशाली वारसा महाराष्ट्राने समृद्ध केला

देशाला गुरु-शिष्य परंपरेचा गौरवशाली वारसा लाभला आहे. हा वारसा समृद्ध करण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासारख्या ध्येयनिष्ठ गुरुजनांनी शिक्षणांची गंगा शेतकरी, कष्टकरी बहुजन समाजाच्या घरापर्यंत नेण्याचे काम केले, महिलांना शिक्षणाचे दरवाजे खुले केले. ध्येयनिष्ठ शिक्षणसेवेची परंपरा आजचे शिक्षकही पुढे नेत आहेत.

माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी विद्यार्थ्यांना नवा वैज्ञानिक दृष्टीकोन देण्याचे कार्य केले. जयंत नारळीकर, जि.प. शाळेचे शिक्षक रणजित सिंह डिसले यांच्यासारख्या अनेक शिक्षकांचे कार्य मौलिक आहे. बदलत्या काळाची गरज लक्षात घेता अध्यापकांनी ही परंपरा पुढे नेण्यासाठी एका विषयापुरते मर्यादीत न रहाता ज्ञानकक्षा रुंदावण्याचा प्रयत्न करावा. ज्ञानासोबत नव्या संकल्पना मांडण्यासाठी आणि जगातील इतर भाषा, संस्कृती शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

बुद्धीवंतांना अधिक ज्ञानवान करणारी संस्था

अध्यापक विकास संस्थेमुळे शिक्षणाचा दर्जा सुधारेल, शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र सुधारणा घडून येतील. जगातील नव्या ज्ञानाचा उपयोग प्राध्यापकांना झाल्यास त्याचा फायदा नव्या पिढीला होईल. संस्थेची इमारत प्रशिक्षणार्थींचा उत्साह वाढविणारी आहे. संस्थेत गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देताना त्यात सातत्य राखणे महत्वाचे आहे. संस्थेत असलेल्या सुविधा आणि दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामुळे ही संस्था अध्यापकांना अधिक ज्ञानवान करणारी ठरेल, असेही श्री. पवार म्हणाले.

पुणे येथे सारथी संस्था, सहकार भवन, कृषी भवन, कामगार भवन, नोंदणी भवन, शिक्षण आयुक्तालय आदी संस्था पुढील 50 वर्षांचा विचार करून उभारण्यात येत आहे. अध्यापक विकास संस्थेतही भविष्याचा विचार करून अधिक उन्नत सुविधा निर्माण कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्र सुदृढ होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल - उदय सामंत

श्री. सामंत म्हणाले, प्राध्यापकांना प्रशिक्षण देणारी देशातील ही पहिली संस्था आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्याला आधुनिक शिक्षण मिळावे या उद्देशाने अध्यापक विकास संस्थेची स्थापना करण्यात आली. अनेक नामवंत संस्था या संस्थेसोबत काम करीत आहेत. इन्फोसिसने सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचे मान्य केले आहे. देशातील हा अशा प्रकारचा पहिलाच सामंजस्य करार आहे. प्राध्याकांसमवेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही आधुनिक स्वरुपाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा 60 कोटींचा प्रकल्प असून त्याचा हा पहिला टप्पा आहे. हा प्रकल्प देशपातळीवर आदर्शवत ठरेल असा विश्वास श्री.सामंत यांनी व्यक्त केला.

उच्च शिक्षणाशी संबंधित सर्व कार्यालये संस्थेच्या इमारतीत एकाच ठिकाणी असतील. संस्थेतील अद्ययावत स्टुडिओमधून राज्य व संघ लोकसेवा आयोग परीक्षेविषयी विद्यार्थ्यांना आणि खाजगी संस्थेतील प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यात येईल. आधुनिकरित्या प्रशिक्षित प्राध्यापक चांगले ज्ञानदान करतील आणि राज्यातील शैक्षणिक क्षेत्राला त्यामुळे अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ऑक्स्फर्डला ‘पुणे ऑफ वेस्ट’ म्हणून ओळखले जाईल - आदित्य ठाकरे

श्री. ठाकरे म्हणाले, शिक्षक हे आजच्या काळातील तंत्रज्ञान आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाप्रमाणे त्यांनाही अद्ययावत करणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. पुढची पिढी घडविण्याचे कार्य शिक्षक करतात. नवा देश, नवी पिढी घडविण्यासाठी शिक्षक आणि शिक्षण महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या माध्यमातून असे कार्य होईल आणि त्यातून देशाला नवी दिशा दिली जाईल. देशासह जगभरातील प्राध्यापक या संस्थेला भेट देण्यासाठी पुण्यात येतील. आज शिक्षण पद्धतीत केले जाणारे बदल आणि निर्माण करण्यात येणाऱ्या सुविधा लक्षात घेता येत्या काळात ऑक्स्फर्डला ‘पुणे ऑफ वेस्ट’ म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास श्री. ठाकरे यांनी व्यक्त केला. नव्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा वाढविण्यावर भर देण्यात यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

खासदार बापट यांनी संस्थेच्या उभारणीबाबत समाधान व्यक्त करून ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांना संस्थेचा उपयोग व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रास्ताविकात संस्थेचे कार्यकारी संचालक निपुण विनायक यांनी संस्थेची माहिती दिली. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात शिक्षकांचे प्रशिक्षण हे महत्त्वाचे अंग आहे. राज्यातील 4 हजारपेक्षा अधिक महाविद्यालये आणि दीड हजार तंत्र शिक्षण महाविद्यालयातील सुमारे 1 लाख प्राध्यापकाना प्रत्येक टप्प्यावर प्रशिक्षण देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. राज्यातील सर्व विद्यापीठे संस्थेचे उपकेंद्र राहतील आणि त्याद्वारे प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मान्यवरांच्या हस्ते जे.जे. महाविद्यालयाने तयार केलेल्या संस्थेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. बोधचिन्ह तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कारदेखील उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. गडचिरोली येथील युवकांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देणाऱ्या नागपूर येथील ज्ञान फाऊंडेशन संस्थेचे संस्थापक अजिंक्य कोटावार यांना पर्यावरण मंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते 'यंग सोशल इनोव्हेटर' म्हणून गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला आमदार अतुल बेनके, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, संचालक उच्च व तंत्रशिक्षण विभाग डॉ. धनराज माने, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ, तंत्रशिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनोद मोहितकर, विद्यापीठातील अधिकारी, पदाधिकारी, प्राचार्य

 *मालवणी चिमटो* 👌

*बायको* : काय हो तुम्ही जेव्हा माका बघुक इल्लात तेव्हा मी कुठल्या रंगाची साडी घातलेलय काय आठवता का काय तुमका? 

*नवरा* : 🙄नाय गो बाय, आत्महत्या करुची वेळ इली कि कोण बघता येणारी ट्रेन कोकण कन्या हा कि जनशताब्दी ?

😁😁🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️


 

Suprabhat

 


Saturday, 25 December 2021

Toll tax lootmar

 श्री Nitin Gadkari जी

आपण रस्ते विकासाच्या बाबतीत घेत असलेल्या अथक परिश्रमाला काळीमा लावणारे अनेक प्रकार कळत नकळत सुरू असतात. टोलवर लुटणे आहेच, आता स्पीडगनने लुटणे सुरू झाले आहे. कृपया लक्ष द्यावे ही विनंती. 


*********************


स्पीडगन : सापळा लावून वाहन धारकांना लुटीचा नवा फंडा 

धुळे ,औरंगाबाद , बीड , सोलापूर हा प्रवास खाजगी वाहनाने करून बघा ! पाच सहाशे रुपये टोल भरावा लागतो . पण तुम्हाला कल्पनाही नसेल, की रस्त्याच्या कडेला काना कोपर्‍यात , घाट उतारावर कायद्याची झुल पांघरून कुणी रस्ते लुटारू दबा धरून बसला आहे . आपण आपल्या प्रवासाच्या आनंदात मग्न असतो आणि भामट्या प्रवृतीने उतारावर लपून, दबा धरून बसलेल्याने चक्क तुमचा खिसा दोन हजार रुपयांत कापलेला असतो . तुम्हाला त्याची खबरही नसते . संपूर्ण प्रवासात असे उतारावर चार दबा धरून बसलेले भामट्या प्रवृत्तीवाले भेटले तर चक्क आठ हजारात तुमचा खिसा कापू शकतात . राज्यभर अनेक महामार्गांवर हा प्रकार आता सुरु झाला आहे . विषय आहे तो , महामार्गावरील आरटीओंच्या ऑटोमेटिक स्पीडगन वाहनांचा . गेल्या काही दिवसांपासून वाहन चालक या स्पीडगन मुळे चांगल्रेच परेशान झाले आहेत . अलिकडे शासनाने वाहतूक नियमात मोठे बदल केले आहेत . दंडांच्या रकमा प्रचंड वाढविल्या आहेत . त्याचे चटके पुढे सर्वांनाच असह्य होणार आहेत . त्याची झलक आता कुठे सुरु झाली आहे . या महामार्गांवर आता जागोजागी आरटीओ च्या गाड्या उभ्या राहतात. त्यात मागे एक ऑटोमॅटिक स्पीडगन कॅमेर्‍या सह लावलेली असते. येणाऱ्या वाहनावर ही गन रोखली, की तिचा वेग आणि गाडी नंबर त्यात रेकोर्ड होतो . गाडी ओव्हर स्पीड असली, की त्याची माहिती ऑनलाईन त्यांच्या सर्व्हरला जाते . त्याबाबतचा दणकून दोन हजार रुपये दंड त्या वाहनाच्या क्रमांकावर चार्ज होतो . इकडे गाडीमालक किंवा ड्रायव्हरला खबरही नसते . याच प्रकारे इतर वाहन नियम मोडणाचांचे मोबाईल फोटोही सर्व्हरला जातात . त्यावरही जबर दंड त्या वाहन नंबरच्या खात्यावर लावला जातो . हा दंड ऑन लाईन भरावा लागतो किंवा रांग लावून भरावा लागतो . जेव्हा केव्हा गाडीची विक्री किंवा अन्य काम आरटीओ ऑफिसला निघते तेव्हा ही भल्या मोठ्या दंडाची यादी गाडी मालकाच्या हातात पड़ते . तो दंड भरल्या शिवाय काम होतच नाही . दंड भारला नाही तर कोर्टच्या चकरा व अन्य कारवाई वाटच पाहात असते .

बहुतेक वाहन धारकांची ओरड आहे , की हे ऑटो स्पीडगन वाले वाहन ठरवून कोपर्‍यात , अडचणीच्या जागी , उतारावर , घाटउतारावर लावलेले असते . उतारावर वेग आपोआप वाढतो शिवाय वाहन चालकास ते दिसू नये व बेसावध शिकार जाळ्यात अडकवावी , असा उद्देश त्यामागे दिसून येतो . शहरात देखील चौकातील किंवा नो एन्ट्रीचा वाहतूक पोलिस कुठेतरी टपरीआड लपून बसतो . नवख्या वाहन धारकास नो एन्ट्रीत आधी घुसू देतो व मग लागलीच रस्त्यावर अवतीर्ण होवून शिटी मारतो . नंतरचे आपण सर्वांना ठाउकच असते . मध्यंतरी अशा ट्रॅफीक हवालदारां जवळ ओरिजिनल शासकीय व खाजगी बनावट अशी दोन प्रकारची पावती पुस्तके असण्याचाही विषय गाजला होता . एका वाहतूक कर्मचार्‍याने तर कोर्टातच वाहतूक विभगाच्या प्रचंड वसूलीचा लेखाजोखा मांडला होता . पर राज्यातील वाहन क्रमांकाच्या गाडीला शिट्टी मारून थांबविणे हा तर या मंडळीचा जन्मसिद्ध अधिकारच आहे . ट्रकवाले तर जागोजागी लुट करण्यासाठीच असतात . असा चेकपोस्ट वाले, एसटीबी वाले , वाहतूक पोलिस व अन्य सर्वांचा समज असतो . बन्याचदा कागदपत्रे पूर्ण असले तरी एन्ट्री द्यावी लागते . मग काही वेळा हे ड्रायव्हर्सही एन्ट्री घेणार्‍यांना इंगा दाखवितात . हे वैतागलेले ट्रक ड्रायव्हर्स एकत्र होवून एन्ट्री गोळा करणाऱ्या एसटीबी वाल्यांना हायवेवर पळवून - पळवून मारतात . त्याचे व्हिडिओ शुटींग करून सोशल मीडियावरही टाकतात . पुढे आरटीओ , एसटीबी वाले उभे असले तर ड्रायव्हर लोक येणाऱ्या दुसऱ्या ड्रायव्हरांना 'आगे कुत्ता खडा है , ठोला खडा है ! ' असे म्हणून इशारा देवून सावध करतात . वाहन धारक हा मनसोक्त लुटीसाठीचेच ग्राहक असतो , असा शासकीय वसुलीसाठी शासनाचा व खाजगी वसुलीसाठी सर्व यंत्रणांचा पक्का समज असतो . आता हायवेवर जागोजागी लपून छपून ऑटोमॅटिक स्पीडगन लावून वसूलीचा नवा फंडा सुरु करण्यात आला आहे . सुरक्षित प्रवासासाठी स्पीडगन लावण्यासही काही हरकत नाही . पण याप्रकारे घाट उतारावर व जाळे अंथरूण सावज अडकविण्याची जी घाणेरडी प्रवृती आहे, ती हरकत योग्य आहे . वास्तविक या ऑटो स्पीडगन ची मोहिम सुरुकरण्या अगोदर हायवेवर दर दहा किमीवर स्पीड लिमिटचे फलक लावणे आवश्यक होते . हायवेवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्पीड लिमिट असतात . सरळ रस्त्यावर वेगळे स्पीड लिमिट . शहरी , ग्रामीण वस्ती सुरु होते तेव्हा वेगळे स्पिड लिमिट , डोंगराळ भागात , घाटात वेगळे स्पिड लिमिट , शैक्षणिक संकुल लगत वेगळे स्पिड लिमिट , कॅन्टॉनमेंट एरीयात वेगळे स्पिड लिमिट , अभयारण्य परिसरात वेगळे स्पिड लिमिट असते . आपण गाडी चालवत आहोत त्या सेक्शन मध्ये मान्यताप्राप्त स्पीड लिमिट काय आहे ? हे गाडी चालकास कळण्यासाठी जागो जागी फलक लावणे यांना आवश्यक वाटत नाही काय ? जर असे फलकच लावलेले नसतील व चालकाला आपण चालवत असलेल्या सेक्शन मध्ये स्पीड लिमिट काय आहे , हे माहितच नसेल तर लिमिटच्या वर एक दोन किमी गेले तरी सापळा लावून त्याच्याकडून एकतर्फी भरमसाठ वसूली करणे कितपत योग्य ठरेल . स्पीडगनवाले लहान गाडी ९० किमी , ट्रक व दुचाकी ७० किमी वर दंड वसूल करतात असे म्हटले जाते . राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण वाले आमचा रस्ता शंभर एकशे दहा स्पीडवर गाडी चालविण्यासाठी बनला आहे असे म्हणतात . केंद्रिय रस्ते मंत्री ना . नितीन गडकरी तर औरंगाबादहून सोलापूर चार तासात पोहोचणार असे म्हणतात . देशभरातच ते असे कुठून कुठे किती कमी वेळात पोहोचणार याचे मंत्री म्हणून अधिकृत आकडे जाहिर करतात . त्या आकड्यांचे व अंतराचे गणित लावले तर ते सर्व शंभर व शंभर च्या वरचेच स्पीडचे आकडे असतात . हे कसे काय ? हे स्पीडगन वाले बरोबर आहेत , की मंत्री महोदय ? हे कुणी ठरवावे ? नागरिक स्पीडगन वाल्या अधिकाऱ्यांना विचारतात , की जागोजागी स्पीड लिमिटचे फलक न लावताच तुम्ही सापळे लावल्यागत ही वसुली कां करतात ? त्यावर ते उतर देतात , की " असे स्पीड लिमिटचे जागोजागी फलक लावण्यासाठी आम्ही टोल प्लाझा वाल्यांना पत्रे दिली आहेत . " मग प्रत्यक्ष असे फलक लावले जाण्याआधीच तुमची वसूली कां सुरु आहे ? या प्रश्नाचेही उत्तर त्यांनी दिले पाहिजे . पण काही नाही ! सर्व एकतर्फी मामला आहे! आधीच प्रचंड वैतागलेल्या जनतेला अजुन किती वैताग देणार ? सहन शक्तीची किती परिक्षा पाहणार ? 

पोस्ट सौजन्य: श्री.सचिन श्रीकांत भिडे🙏

 मी वैद्यांकडे गेलो आणि विचारलं, " *Omicron Corona* वर कोणता *काढा* आहे का हो?"

त्यांनी सांगितले,

"हो आहे की, ३-४आठवडे घरातच *काढा*,

घरच्यांसाठी वेळ *काढा*,

अडीनडीपुरतीच बँकेतून cash *काढा*

आणि....

व्यायाम म्हणून दिवसातून दोन वेळा कंबर वाकवून घरातील केर *काढा*

😁😁😁

Featured post

Lakshvedhi