Friday, 12 November 2021

Mera bharat mahan.

 हे फार भन्नाट आहे.... आधी व्हिडीओ बघा आणि मग वाचा...


पद्म पुरस्कार म्हटलं की तिथेच अर्ध्या गोष्टी संपतात... एखाद्या गोष्टीसाठी आयुष्य खर्ची करणाऱ्या व्यक्तीच्या नावाआधीच पद्म असणारा पुरस्काराचं प्रीफिक्स लागतं... इथे मुद्दा तो नाहीय... तर मुद्दा आहे पुरस्कार स्वीकारण्याआधी त्यांनी जे केलं त्याचा... आपण बदलतोय याचा... आपण त्यांना स्वीकारतोय याचा...


राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार स्वीकारणे हा कोणत्याही भारतीयासाठी अभिनानाचा आणि आयुष्यभर लक्षात राहणारा क्षणच असतो, मग ते भारतीय अगदी त्यांच्या क्षेत्रातील दिग्गज असले तरी ते भारावून जातात. सामान्यपणे राष्ट्रपतींशी हस्तांदोलन करुन पुरस्कार स्वीकारला जातो. मात्र तृतीयपंशी म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या जोगाम्मा या राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार घेण्यास गेल्या तेव्हा त्यांनी केलेली कृती पाहून त्या सभागृहामध्ये असणाऱ्या पंतप्रधानांपासून ते सभागृहातील इतर मान्यवरांनीही टाळ्या वाजवून त्यांच्या कृतीचं कौतुक केलं.


जोगाम्मा या तृतीयपंथी आहेत. आता तृतीयपंथी म्हटल्यावर ते आपल्याकडे जेवढ्या वाकड्या नजरेने पाहत नाही तेवढे पूर्वग्रह दुषीत ठेऊन त्यांच्याकडे पाहणाऱ्यांमध्ये आपण सर्वसामान्य आहोत. म्हणजे तुम्हीच नाही मी सुद्धा तुमच्यातलाच आहे त्यांच्याकडे ते आपल्यातले नाही या नजरेने पाहणारा. पण इथे जोगाम्मा यांनी तुमच्या माझ्यासारख्या थिल्लर लोकांची पर्वा न करता स्वतःचं आपलेपण या सर्वोच्च मंचावरही जपलं... त्या राष्ट्रतींसमोर पुरस्कार घ्यायला गेल्या. राष्ट्रपती पुरस्कार देणार इतक्यात त्यांनी साडीचा पदर एका हातात धरुन तो गोलगोल फिरवला नंतर राष्ट्रपतींपासून काही अंतरावरुन हात वर खाली फिरवून त्यांच्या पायाशी असणाऱ्या पायरीवर बोटं मोडून त्यांनी नजर काढली... 


आता हे नजर काढणं वगैरे इललॉजिकल वाटू शकतं पण तृतीयपंथी ज्यासाठी ओळखले जातात ते त्यांनी केलं. याकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून न पाहता प्रेम या भावाने पहावं. देशातील सर्वात मोठ्या पदावर असणारी म्हणजे पंतप्रधानांच्याही वर असणारी व्यक्ती समोर असताना न घाबरता, संकोच मनात न ठेवता आपल्या आपल्या स्टाइलने आणि सगळ्यात युनिक पद्धतीने त्यांनी प्रेम व्यक्त केलं... हे रिपिट मोडवर पाहिलं ना यात फार फार सारे रिड बिटवीन द लाइन्स आहेत आणि तेच पाहताना आणि याचा आशय लक्षात घेतल्यास उगा डोळे पाणावल्यासारखे होतातय...


खरं तर आपण फार खुजे आहोत या जोगाम्मांसमोर... आपल्याला आपलं असणं स्वीकारता येत नाही तर एवढ्या मोठ्या स्टेजवर व्यक्तं होणं लांबचं राहिलं.... असं निस्वार्थी आणि भरभरून दिलेलं प्रेम पाहून राष्ट्रपतीही भावूक झाले असतील यात शंका नाही....


पद्म पुरस्कार सोहळ्यांच्या इतिसाहात कायम लक्षात राहिल असा हा क्षण वाटतोय मला तरी....


शेवटी मॉरल ऑफ द स्टोरी काय तर


तुम्ही कोणीही असला आणि तुमच्या क्षेत्रात आणि त्याहून मुख्य म्हणजे स्वत:शी प्रमाणिक राहिलात तर हे असं स्वछंदी जगता येतं आणि त्या स्वच्छंदीपणाचा आनंद वाटता येतो... जसा या जोगाम्मा यांनी वाटलाय....


Thursday, 11 November 2021

 यवतमाळ येथील घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडून गंभीर दखल

जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना सखोल चौकशीचे आदेश

 

            मुंबई, दि. 11 : काल (बुधवारी) रात्री यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात घडलेल्या घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गंभीर दखल घेतली असून यवतमाळचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

          यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या अशोक पाल या विद्यार्थ्यावर रात्री आठ ते नऊच्या सुमारास अज्ञात इसमांनी केलेल्या हल्ल्यात हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता.  रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

          ही घटना अतिशय गंभीर असून याबाबत यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांचा अहवाल तातडीने मागविण्यात आला असून या दुर्दैवी घटनेत झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. या घटनेच्या मुळाशी जाऊन खोलवर चौकशी केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.देशमुख यांनी दिली.

००००

 दिलखुलासकार्यक्रमात पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची मुलाखत

 

         मुंबईदि. 11 :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासया कार्यक्रमात पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एअरया ॲपवर शुक्रवार दि. १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

              अहमदनगर जिल्ह्यातील राहीबाई यांनी दुर्मिळ होत जाणाऱ्या असंख्य देशी बियाण्यांचे जतन आणि संवर्धन केले आहे. ते करीत असताना त्यांना आलेल्या अडचणी, त्यावर त्यांनी कशी मात केलीबीजबँकेची केलेली उभारणी आदी विषयांची माहिती श्रीमती राहीबाई पोपेरे यांनी 'दिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे.

000000

 महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बॅंकेचा शतकोत्तर दशपूर्ती सोहळा

राज्य सहकारी बॅंक : सामान्य माणसाला

स्वबळावर उभे करणारे शक्तीकेंद्र

माजी केंद्रीय कृषिमंत्रीज्येष्ठ नेते खासदार शरद पवार

सहकार चळवळीला नवीन दृष्टीकोन देण्याची गरज

- केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी

               मुंबई दि. 11 : राज्य सहकारी बँकेत लक्षणीय बदल झाला आहे. ही बँक सुदृढ होणे म्हणजेच राज्यातील सहकार सुदृढ होणे आहे. याचाच अर्थ राज्यातील शेवटच्या माणसाला स्वबळावर उभे करण्यासाठी एक शक्तीकेंद्र म्हणून बँक काम करत असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्रीज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले.

            महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा 110 वा शतकोत्तर दशपूर्ती सोहळा केंद्रीय कृषिमंत्रीज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी श्री. पवार बोलत होते. या सोहळ्याला विधानपरिषदेच्या  उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यातील जिल्हा बँकांचे अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते.

            खासदार श्री.पवार म्हणालेराज्यातील सहकार क्षेत्राला उभारी देण्यासाठी या राज्य सहकारी बँकेने मोठे योगदान दिलेले आहे. बँकेचा 11 दशकांचा प्रवास हा महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाचे पान आहे.  वैकुंठभाई मेहताविठठ्लदास ठाकरसीधनंजय गाडगीळ हे बँकिंग क्षेत्राशी बांधिलकी असणारे आणि या क्षेत्रातील कर्तृत्ववान अशा या व्यक्ती आहेत.  या प्रत्येक व्यक्तीचे सहकार क्षेत्रात योगदान आहे. अनेक संस्था या बँकेमार्फत राज्यात उभ्या राहिल्या आहेत. मधल्या काळात बँकेची परिस्थिती पाहता सहकार क्षेत्राला चिंता वाटावी असे चित्र निर्माण झाले. मात्र आता राज्य सहकारी बँकेत लक्षणीय बदल झाला आहे. ही बँक सुदृढ होणे म्हणजेच राज्यातील सहकार सुदृढ होणे आहे. याचाच अर्थ राज्यातील शेवटच्या माणसाला स्वबळावर उभे करण्यासाठी एक शक्तीकेंद्र म्हणून बँक काम करत आहे. त्यामुळे या बँकेच्या उभारणीसाठी ज्यांनी योगदान दिले अशा व्यक्तींची तैलचित्रे इथे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नव्या पिढीला या सर्वांची ओळख या माध्यमातून होईल. या तैलचित्रांसोबतच त्यांच्या योगदानाचे टिपणही आवश्यक आहे. बँकेची ही उत्तम वाटचाल पाहता लोकांच्या दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास श्री.पवार यांनी व्यक्त केला.

             केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील विकासाचा अनुभव आपण घेतला आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राची मुहुर्तमेढ करणाऱ्या व्यक्तिंच्या तैलचित्राचे अनावरण ही अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे मुल्यमापन केल्यास ग्रामीण जनजीवनातील घडलेले सामाजिक आणि आर्थिक बदल यातून सहकारातील दृष्टीकोन लक्षात येईल. देशाच्या जीडीपीमध्ये उत्पादन क्षेत्रात 22 ते 24 टक्के, सेवाक्षेत्रात 25 ते 54 टक्के आणि कृषी क्षेत्रात 8 ते 12 टक्केच योगदान राज्यांचे आहे. कृषी क्षेत्रातील योगदान वाढण्याची गरज आहे. पूर्वीच्या काळात गरीबी, भूकबळी आणि बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणावर होती. त्या जनतेला आर्थिक सक्षम, समृद्ध करण्याकरिता सहकाराचा विचार देशाला मिळाला. देशात 115 जिल्ह्यांचा विकासदर कमी असून त्या ठिकाणी सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मागासलेपणा आहे. येथील दरडोई उत्पन्न, विकास दर आणि कृषी विकास दर नगण्य असल्यामुळे देशाच्या विकासदराचा उच्चांक गाठण्यात अडचणी येत आहे. सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी आणि परिवर्तन घडवून आणणे हेच सहकार चळवळीचे यश मानले जाईल.

            सहकार चळवळीला नवीन दृष्टीकोन देण्याची गरज आहे. वैशिष्टे जोपासून काळानुरुप बदल घडवून आणण्याची आवश्यकता आहे. सहकार चळवळीच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी उपलब्ध ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यास महाराष्ट्र आणि देशाचे रुप पालटेल, असेही श्री.गडकरी यांनी सांगितले.

            बँकेचे पहिले संस्थापकसंचालकांच्या स्मृतींना उजाळा देत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले110 वर्षांच्या मोठ्या कालखंडाची परंपरा असलेली महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही सर्व जिल्हा बँकांची शिखर बँक म्हणून काम करते. विकास सोसायट्याजिल्हा बँका आणि राज्य सहकारी बँका यांच्या माध्यमातून कर्जपुरवठा केला जातो. महाराष्ट्राच्या विकासामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा फार मोठा वाटा आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यामधल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन घडविण्यात या बँकेचे योगदान मोठे आहे. अलिकडच्या काळामध्ये सहकार क्षेत्रात बदल होत आहेत. हे बदल आत्मसात करुन पुढे जात असताना भविष्यात या बँकेच्या माध्यमातून राज्यातील विकास सोसायट्याजिल्हा बँका आणि नाबार्डच्या माध्यमातून संगणकीकरण करण्याचे आव्हान सर्वांपुढे आहे.राज्य सहकारी बँकेच्या पाठीशी शासन नेहमीच असेलभविष्यात चांगले काम नक्कीच घडेल. राज्याच्या आर्थिक विकासामध्ये राज्य सहकारी बँकेचा मोलाचा वाटा असल्याचे श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

            

 सर्पदंश आणि त्यावरील उपचारांबाबत जागृती करणे गरजेचे 

- गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

 

            मुंबईदि. 11 : ग्रामीण भागात सर्पदंश ही आजही एक मोठी समस्या आहे. सर्पदंशाने होणारे मृत्यू कमी होण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सजग झाले पाहिजे. त्याचबरोबर सर्पदंशाबाबत व त्यावरील उपचारांबाबत जनजागृती करणे गरजेचे आहेअसे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले.

            विघ्नहर मेडिकल फाउंडेशनच्या वतीने आयोजित शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्पाच्या मिशन इम्पॉसिबल माहितीपटाचे अनावरण सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमास आमदार अतुल बेनकेअपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यासप्रधान सचिव डॉ.निलीमा करकेट्टाआयसीएमआरच्या संचालिका डॉ.गीतांजली सचदेवआयएमएचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे आदी उपस्थित होते.

            गृहमंत्री श्री.दिलीप वळसे-पाटील म्हणालेग्रामीण भागात सर्पदंश ही एक मोठी समस्या आहे. सर्पदंशाबाबत काही गैरसमजुती आहेत. या दूर करण्यासाठी शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्प उपयुक्त ठरेल. सर्पदंशावरील लशी महाग आहेत. सर्पदंशाबाबत जनजागृतीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याची आवश्यकता आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने असे कार्यक्रम आयोजित करावेत असेही त्यांनी यावेळी सूचित केले.

            सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री.टोपे यांनी सांगितले कीसर्पदंशाने होणारे मृत्यू कमी करण्याचे आव्हान आहे. जुन्नरआंबेगावमंचर तालुक्यातील सर्पदंशाने होणारे मृत्यू कमी करण्यात यश आले आहे. मात्र राज्यभरात अशा प्रकारे काम करायला हवे. यासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. त्यासाठी प्रशिक्षण संस्था तयार करण्यासंदर्भात विचार करण्यात येईल.

            सर्पदंशाने होणारा मृत्यू नोटीफाईड डिसीज म्हणून समावेश करण्यात येईल. सर्पदंशावर होणा-या उपचारासाठी महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा वाढवण्याचा विचार केला जाईलअसेही श्री. टोपे यांनी सांगितले.

            डॉ. सदानंद राऊत यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले कीसर्पदंशामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांना विशेषत: करुन शेतकरी शेतमजूर यांना या समस्येला सामोरे जावे लागते. यावर मात करण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल.

            यावेळी माजी आमदार बाळासाहेब दांगटडॉ. डी. सी. पटेलडॉ. प्रियंका कदमअशोक हांडेडॉ. संदेश राऊत आदी उपस्थित होते.


 राज्यातील सर्व नागरिकांना 30 नोव्हेंबरपर्यंत

कोविड प्रतिबंधात्मक लशीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची व्हीसीमध्ये माहिती

 

            मुंबई, दि. 11 : राज्यातील सर्व पात्र नागरिकांना येत्या 30 नोव्हेंबर पर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लशीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहेअशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

            केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज सर्व राज्यांचा कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा आढावा घेतला. या बैठकीत श्री. टोपे मंत्रालयातून दूरदृश्यप्रणालीव्दारे सहभागी झाले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास उपस्थित होते.

            श्री. टोपे यांनी सांगितले कीराज्यातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने व्यापक प्रयत्न केले जात आहेत. लसीकरणाची गती वाढावी यासाठी मिशन कवच कुंडलमिशन युवा स्वास्थ्य सारखे अभियान राबविण्यात आले. याचा लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी फायदा झाला. आता लसीकरणाची शिबीर आणि वेळही वाढवली जात आहे. लसीकरणाच्या मोहिमेत आरोग्यमहसूलनगरविकासशिक्षण अशा विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी एकत्रित काम करीत आहेत.

            लसीकरणाबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. यासाठी ओपिनियन लीडर्सधर्मगुरु यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेतअसेही त्यांनी सांगितले.

            कोविड प्रतिबंधात्मक कोवैक्सिन लशीच्या दोन मात्रांमध्ये २८ दिवसांचे अंतर निश्चित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कोविशिल्ड लशीच्या दोन मात्रांमध्ये ८४ दिवसांचे अंतर निश्चित करण्यात आले आहे. कोविशिल्ड लशीच्या दोन मात्रा मधील अंतर कमी केले तर लसीकरणाच्या वेगाला गती देता येईल. याबाबत विचार केला जावा अशी विनंती श्री टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मांडविया यांना केली.

            मुंबई मध्ये लोकल ट्रेन मध्ये प्रवास करायचा असेल तर लशींच्या दोन्ही मात्रा घेणे अनिवार्य करण्यात आले आहेअशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. यावर ही अतिशय चांगली कल्पना आहेअसे श्री. मांडविया यांनी सांगितले.

            या आढावा बैठकीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारविविध राज्यांचे आरोग्य मंत्रीआरोग्य विभागाचे सचिवलसीकरण अधिकारी सहभागी झाले होते.


 


000000

 महाराष्ट्र मंत्रालय को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या मंत्रालय शाखेचे

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

अनेकांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन आणणाऱ्या

सोसायटीचे कार्य कौतुकास्पद

                                             -  सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

 

मुंबईदि. 11 : अनेकांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन आणणाऱ्या महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने घेतलेली भरारी कौतुकास्पद असून नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करीत सोसायटीकडून यापुढेही अधिक दर्जेदार सेवा पुरवली जाईलअसा विश्वास सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मंत्रालय विस्तार शाखेचे आज सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालेयावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास मुंबईचे जिल्हा उपनिबंधक जे.डी. पाटीलसहकारी संस्था उपनिबंधक प्रशांत सातपुतेसोसायटीचे अध्यक्ष प्रकाश डांगेमानद सचिव प्रकाश खांगळमहाव्यवस्थापक रामचंद्र तावडे आदी उपस्थित होते.

93 वर्षांपूर्वी मुहुर्तमेढ रोवलेल्या महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने नवी मुंबईत स्वतःची चार मजली इमारत उभी केली आहे. अनेक ठिकाणी शाखा स्थापन करुन एटीएममोबाईल ॲपच्या माध्यमातून आपल्या खातेदारांना सेवा उपलब्ध करुन दिली. कोरोनाच्या काळात या सोसायटीमधील कर्मचाऱ्यांनी दर्जेदार सेवा पुरवून आपले कर्तव्य बजावल्याबद्दल सहकारमंत्री श्री. पाटील यांनी सोसायटीचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष श्री. डांगे यांनी तर मानद सचिव श्री.खांगळ यांनी आभार मानले.

महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीविषयी….

10 मे 1929 रोजी जुने सचिवालय येथे 100 शासकीय कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना केली. मंत्रालयकोकण भवनकुर्लागोरेगाव आणि पालघर येथे सोसायटीच्या शाखा असून सुमारे साडेपाच हजारांपेक्षा अधिक कर्मचारी बॅंकेचे सभासद आहेत. पावणे दोनशे कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या या सोसायटीने सभासदांसाठी एसएमएसमोबाईल ॲपसंकल्प भवन आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या असून कोविड विषाणू प्रादुर्भावाच्या काळात सोसायटीने मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 10 लाख रुपयांचे आर्थिक योगदान दिले आहे.

 

००००

 

Featured post

Lakshvedhi