Friday, 22 October 2021


 

 आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठासाठी

बोधचिन्ह (LOGO) स्पर्धेचे आयोजन

 

            मुंबईदि. 22 : राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह (LOGO) ठरविण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली असूनआकर्षक, कल्पक आणि रचनात्मक बोधचिन्ह 31 ऑक्टोबर 2021 पूर्वी isumharashtra@gmail.com या ई-मेलवर पाठवावी. या स्पर्धेची अधिक माहिती https://sports.maharashtra.gov.in/  या संकेतस्थळावर उपलब्ध असून स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे करण्यात आले आहे.  

            ऑगस्ट 2021 महिन्यात बोधचिन्ह  स्पर्धा घेण्यात आली होती. योग्य प्रवेशिका प्राप्त न झाल्याने सदर स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. नव्याने बोधचिन्ह (LOGO) तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. नव्याने आयोजित स्पर्धेमध्ये या पूर्वी झालेल्या स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक देखील सहभागी होऊ शकतात.

            अल्प व मध्यम मुदतीचे अभ्यासक्रम सुरु करून उत्तम क्रीडा मार्गदर्शक तयार करणेक्रीडा क्षेत्रात कुशल मनुष्यबळविज्ञान व तंत्रज्ञान यामाध्यमातून क्रीडा क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी विविध अभ्यासक्रम "आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ’’ महाराष्ट्र शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी पुणे येथे सुरु करण्यात आले आहे.

            या स्पर्धेच्या सहभागाच्या दृष्टीने नियम व अटी साठी शासनाच्या http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. प्रवेशिका पाठवण्याचा अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर2021 आहे. स्पर्धेचे नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत..

            निवड समितीच्या शिफारशीनुसार प्रथम क्रमांकाचे बोधचिन्ह LOGO) सादर करणा-या प्रवेशिकेस रु. १,००,०००/- (रुपये एक लक्ष मात्र) इतके रोख पारितोषिक प्रदान करण्यात येईल. बोधचिन्ह (LOGO) स्व‍िकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणे याबाबतचे सर्व अधिकार आयुक्तक्रीडा व युवक सेवापुणे यांना राहतील. बोधचिन्ह (LOGO) पाठवताना कोरल ड्रॉ, Psf, JPEG स्वरुपात पाठवावेबोधचिन्हावर कोणत्याही प्रकारे नांवक्रमांक किंवा ओळख दिसून येईल अशा कोणत्याही बाबी नमूद केल्यास ती प्रवेशिका अपात्र ठरेल. बोधचिन्ह (LOGO) तयार करताना ते मूळ स्वरूपात व स्वतः तयार केलेला असावा.

            स्पर्धकाने बोधचिन्ह (LOGO) डिझाईन पाठवताना त्याचे नांवनिवासाचा संपूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक व आपला ई-मेल पाठविण्यात आलेल्या ई मेलमध्ये नमूद करावा. बोधचिन्ह (LOGO) पाठवतांना क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या isumaharashtra@gmail.com या ई मेल वर पाठवावाअन्य ई-मेलवर पाठविण्यात आलेल्या प्रवेशिका ग्राह्य असणार नाहीत. अधिक माहितीसाठी क्र.९७३०२००६५६ श्री.उदय पवारतालुका क्रीडा अधिकारीपुणे, यांना संपर्क करावा.

            या स्पर्धेत जाहिरात क्षेत्रात कार्यरत एजन्सीजडिझाईनिंग क्षेत्रात काम करणाऱ्या एजन्सीज तसेच ग्राफीक क्षेत्रात काम करणा-या एजन्सीज देखील भाग घेऊ शकतील. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचा बोधचिन्ह (LOGO) क्रीएटीव्ह असावासेल्फ मेड असावात्यात रचनात्मकता असावी. तसेच त्यातून उद्देश स्पष्ट होणे आवश्यक आहे. केवळ भारतीय व्यक्तीस स्पर्धेत सहभागी होता येईल. या स्पर्धेत परदेशात राहणारे मूळ भारतीय असणाऱ्या व्यक्तीस देखील सहभागी होता येईल. लोगो ( बोधचिन्ह ) A/ 4 साईझ कागदावर असावे.

            आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ मिशन (Mission) संशोधनप्रशिक्षण व कौशल्य विकास यामधील गुणवत्ता गाठणे.  क्रीडा विद्यापीठ दृष्टीकोन (Vision) : खेळ व तंदुरुस्तीच्या विकासासाठी पर्यावरणपूरक नैसर्गिक यंत्रणा तयार करणे. क्रीडा विद्यापीठ ध्येय (Motto): क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र व भारत हे क्रीडा शिक्षणास प्राधान्य देणारे ठिकाण म्हणून परिचित व्हावे.

क्रीडा विद्यापीठ उद्दीष्टे (Objectives) :

भारतामधील अव्वल खेळाडूंना अद्ययावत वैज्ञानिक दृष्टीकोन समोर ठेऊन पाठिंबा देणे.

क्रीडा कामगिरीसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर संशोधन करणे.

प्रशिक्षित क्रीडा व्यावसायिकांचा विकास करणे.

क्रीडा क्षेत्रात रोजगार निर्मिती करणे.

क्रीडा प्रशिक्षक व संबंधितांना नियमित प्रशिक्षण उपलब्ध करुन देणे.

आधुनिक स्पर्धात्मक खेळांबरोबरच पारंपारिक देशी खेळांचा विकास करणे,

समाजातील दुर्बल घटकांना क्रीडा नैपुण्यासाठी विशेष प्राधान्याने संधी उपलब्ध करून देणे.

खेळाडू क्रीडा तज्ञकीडा मार्गदर्शकक्रीडा प्रशासक इ. च्या सहकार्याने खेळाचा दर्जा उंचावणे.

०००


 


 ते 14 नोव्हेंबर विधि सेवा सप्ताहाचे आयोजन

 

            मुंबई, दि. 21 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतभर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरणाची 25 वर्षे पुर्ण झाल्यानिमित्ताने 7 ते 14 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विधि सेवा सप्ताह आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विधि  सेवा प्राधिकरणाने दिली आहे.

            राज्यातील सर्व खेड्यांपर्यंत मोफत विविध सेवा व विधि सेवेमार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना, त्या योजनांमधील लाभार्थी याची माहिती राज्यातील प्रत्येक गावापर्यंत व प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी विधि सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.

            2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत राज्यात जिल्हानिहायतालुकानिहाय कार्यक्रमांची आखणी करण्यात आली असूनयामध्ये विधि साक्षरता शिबिरेशासनाच्या विविध योजनांची माहितीभित्तीपत्रकेअशा कार्यक्रमांचा समावेश असूनसंबंधित कार्यालये जिल्हा विधि सेवा प्राधिकरणासोबत समन्वय साधून हे कार्यक्रम आयोजित करणार असल्याची माहिती राज्य विधि सेवा प्राधिकरण यांनी दिली आहे.

०००

 नागरी संरक्षण स्वयंसेवकांच्या नोंदणी व पुनर्नोंदणीबाबत आवाहन

 

            मुंबई, दि. 20 : नागरी संरक्षण दलाने आतापर्यंत अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी राज्य व राज्याबाहेर विमोचन व मदतकार्य केलेले आहे. नागरी संरक्षण दलाची व्याप्ती नागरी संरक्षण शहरापुरती मर्यादित न ठेवता वाढविण्याचे धोरण आहे. आपत्कालीन उपाययोजनेच्या दृष्टीकोनातून मुंबईठाणेपुणेनाशिकरायगड व पालघर या सहा नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण स्वयंसेवकांची नोंदणी व पुनर्नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती नागरी संरक्षण संचालनालयाचे संचालक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

            नागरी संरक्षण दलामध्ये सामील होऊन देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी व पुनर्नोंदणी करावी असे आवाहन नागरी संरक्षण संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

            राज्यातील मुंबईठाणेपुणेनाशिकरायगड व पालघर या नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण स्वयंसेवकांची नोंदणी व पुनर्नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरु केली आहे. तरीज्या नागरिकांना नागरी संरक्षण दलामध्ये स्वंयसेवक म्हणून सदस्य व्हावयाचे आहे त्यांनी या विभागाची वेबसाईट http://maharashtracdhg.gov.in वर भेट द्यावी नागरी संरक्षण स्वंयसेवक नोंदणी व पुनर्नोंदणी फॉर्मस् दिलेल्या अटीशर्तीसह डाऊनलोड करुन घ्यावेत. नोंदणी / पुनर्नोंदणी फॉर्म भरुन आपल्या क्षेत्रातील संबंधित नागरी संरक्षण कार्यालयाशी संपर्क साधून स्वतः सादर करावेत आणि पुढील प्रक्रियेबाबतची माहिती घ्यावी. स्वयंसेवक म्हणून आपले योगदान देशसेवेसाठी द्यावे, असे आवाहन नागरी संरक्षण संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

०००

 


 कोणाच्याही दबावात न येता अनधिकृत बांधकामे रोखा

तातडीने युद्ध पातळीवर कारवाई करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिकेस स्पष्ट निर्देश

-----------

·       वॉर्डनिहाय पथके नेमून डेब्रीज टाकण्याचे प्रकार रोखा

·       मुंबई हे देशातले सुंदरस्वच्छ शहर बनविण्यासाठी मैदानात उतरा

 

          मुंबई दि. 20 : अनधिकृत बांधकामांवर मुंबई पालिकेने युद्ध पातळीवर तातडीने कारवाई करावीयामध्ये कोणाचाही दबाव सहन करू नकाआम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या बैठकीत सूचना दिल्या. पूर्व आणि पश्चिम महामार्गालगत देखील मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकल्या जातात असे निदर्शनास आले आहेयाठिकाणी कॅमेरे लावून असे करणाऱ्यांवर  तातडीने कारवाई करावी. कोविडमध्ये आपण खूप चांगली कामगिरी केली आहे. आता रस्तेपदपथस्वच्छतानागरी सुविधांच्या बाबतीत पूर्णपणे लक्ष केंद्रित करून कालबद्ध रीतीने ती कामे पूर्ण करा आणि मुंबई शहराचा देशात आदर्श निर्माण करा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीस महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहलसहायक आयुक्तउपायुक्तप्रभाग अधिकारीपालिका रुग्णालयांचे वैद्यकीय अधिष्ठाता तसेच टास्क फोर्सचे सदस्य देखील उपस्थित होते.

            मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत स्पष्ट निर्देश दिले कीमुंबईत अनधिकृत बांधकामे सहन केली जाणार नाहीत. प्रभाग अधिकाऱ्यांनी अतिशय जागरूकपणे आणि कर्तव्यकठोरपणे यावर तातडीने कारवाई करावी. कुणाचाही दबाव आला तरी सहन करू नका. आम्ही आपल्या पाठीशी आहोत. मुंबईतील रस्ते दुरुस्ती कामांची निविदा प्रक्रिया व्यवस्थितपणे आणि पारदर्शक पद्धतीने कराकुणालाही बोट उचलण्याची संधी मिळाली नाही पाहिजे हे पहा असेही ते म्हणाले.

            आपल्याला शहर सुंदर आणि उच्च दर्जाच्या सुविधा असलेले करायचे आहे. त्यामुळे रस्तेपदपथदुभाजकरस्त्यांच्या कडेचे कठडे<span lang="MR" style="font

 वातानुकूलित मिनी बस सेवेमुळे सर्वसामान्य

 प्रवाशांच्या वेळ आणि पैशांची बचत

- पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे

 

                                                                    ·         वातानुकूलित मिनी बेस्ट बससेवेचा शुभारंभ

 

          मुंबईदि. 21 मुंबईतील ऐतिहासिक घडामोडी अनुभवलेल्या काळाचौकी परिसरासतील गं. द. आंबेकर मार्गावरुन दादर रेल्वे स्थानकापर्यंत थेट वातानुकूलित मिनी बेस्ट बससेवेच्या सुविधेमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या वेळ आणि  पैशाची नक्कीच बचत होणारअसा विश्वास  पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

            गं. द. आंबेकर मार्गावरील श्रावण यशवंते चौक ते दादर रेल्वे स्थानक या दरम्यान वातानुकूलित मिनी बेस्ट बस सेवेचा शुभारंभ पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

            चाकरमानीकामगारमहिलावर्गास काळाचौकी ते दादर हा प्रवास सार्वजनिक वाहनाने टप्प्याटप्प्याने करावा लागत होता. गं. द. आंबेकर मार्गावरील या थेट बेस्ट बससेवेमुळे नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. या बससेवेसाठी पाठपुरावा करणाऱ्या सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांचे अभिनंदनही  राज्यमंत्री कु. तटकरे यांनी केले.

            काळाचौकी येथून गं. द. आंबेकर मार्गे  भोईवाडानायगाव दादर परिसरांत जाण्याकरिता अद्यापपर्यंत बस सेवा उपलब्ध नव्हती. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार श्रावण यशवंते चौक ते दादर स्टेशन अशी ए-64  ही मिनी वातानुकुलीत बेस्ट बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या बस सेवेमुळे नागरिकांना गं. द.आंबेकर मार्गावर बेस्ट बसने प्रवास करणे आता शक्य होणार आहे.

            यावेळी बेस्ट समिती सदस्य बबन कनावजे, विजय वाडकरराष्ट्रीय मिल मजदुर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहितेउमेश येवले  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ए-64 या मिनी बसच्या पहिल्याच तिकीटाने प्रवास केल्याचा आनंद

            श्रावण यशवंते चौक ते दादर स्टेशनपर्यंत धावलेल्या पहिल्या वातानूकुलित मिनी बसच्या पहिल्याच तिकीटाने प्रवास करण्याचा मान पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांना मिळाला. या मिनीबसच्या शुभारंभप्रसंगी सर्व प्रवाश्यांसोबत राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या कार्यालयापर्यंत प्रवास केल्याचा आनंद त्यांनी यावेळी व्यक्त केला. येथील प्रवाशांच्या आनंदात सहभागी होता आले यासाठी बेस्टचे व कार्यक्रम आयोजकांचे आभारही कु. तटकरे यांनी मानले.

0000

 


 


 सणासुदीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक कार्यवाही करावी

-अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

         

          मुंबईदि. 21; सणासुदीच्या दिवसांमध्ये राज्यातील जनतेला सकसनिर्भेळ आणि भेसळमुक्त  मिठाई व इतर अन्न पदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून कडक कार्यवाही करावी असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामाचा त्यांनी बांद्रा येथील कार्यालयात आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंगसर्व सह आयुक्त प्रत्यक्ष व इतर जिल्हास्तरीय अधिकारी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

            डॉ.  शिंगणे पुढे म्हणाले,  जिल्हा स्तरावरील अधिका-यांनी मिठाई व इतर खाद्य पदार्थांच्या उत्पादकांसोबत बैठक घ्यावी. त्यांना योग्य ते निर्देश द्यावेत. मिठाई व इतर पदार्थांवर तयार करण्याची आणि संपण्याची दिनांक टाकणे आवश्यक आहेयाबाबत जन जागृती करावी.त्याचबरोबर दुध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ तपासणी वाढवावी आणि त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्यात यावाअसे निर्देश त्यांनी दिले.

            औषध प्रशासनातर्फे तपासणीत ज्या औषध विक्री दुकानात फार्मसिस्ट नाहीत अशा दुकानांचे परवाने रद्द करणेआयुर्वेदॲलोपॅथी व इतर औषध निर्मितींचा दर्जा सातत्याने तपासला जाणे आणि  विभागातील पदभरती इत्यादि विषयांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

            यावेळी 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2021 या कालावधीत अन्न व औषध प्रशासनने केलेल्या कामाची माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून आयुक्त श्री. सिंग यांनी दिली. या कालावधीत दध या अन्न पदार्थाच्या कारवाईत रुपये 4,60791 किमतीचा माल जप्त करण्यात आला. दुग्धजन्य पदार्थाच्या कारवाईत रुपये 39,50,386 किमतीचा माल जप्त करण्यात आला. तर धाडी जप्तीत 526.10 लाख किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. सणासुदीच्या तोंडावर घेण्यात आलेल्या  मोहिमेत खवामावामिठाईखाद्य तेलतुपरवा मैदाबेसन मसाले अशा भेसळ युक्त  वस्तुंचा रुपये 31,11,514 किमतीचा साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.

0000


 

Featured post

Lakshvedhi