Tuesday, 31 August 2021

 राज्य सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही

तर कोरोनाच्या विरोधात

                                 - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाण्यातील ऑक्सीजन प्रकल्पाचे लोकार्पण

 

       ठाणेदि 31 (जिमाका): राज्य सरकार हे कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहेकोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाहीत्याला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे पालन करावेच लागेल,असे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले कीकेंद्राने देखील या सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करून राज्य सरकारला काळजी घ्यायला सांगितले आहे. 

          कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर गोकुळाष्टमीचा सण साधेपणाने साजरा करत आरोग्य उत्सव’ साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत संस्कृती प्रतिष्ठानच्यावतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन न करता आरोग्य उत्सव’ आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आज ठाणे शहरातील ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. 

          कार्यक्रमास नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेखासदार संजय राऊतआमदार सर्वश्री प्रताप सरनाईकरवींद्र फाटकमहापौर नरेश म्हस्के यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधीमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंहठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आमदार श्री. सरनाईक यांच्यावतीने दोन ऑक्सीजन प्रकल्पांची उभारणी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी  मीरा भाईंदर येथे पहिल्या प्रकल्पाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. 

          मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणालेदहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत याची जाणीव आहे. पण आज गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे. हे संकट दिसत असतांना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खुप दुर्देवी आहे. हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही हे ही त्यांनी लक्षात घ्यायला हवे. हा जनतेच्या जीविताचा प्रश्न आहे. मात्र कोरोना निर्बंधासाठीचे  नियम मोडून आंदोलने केली जात आहेत. आंदोलन करायचेच असेल तर कोरोना विरुद्ध कराअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

          कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. केंद्र सरकारनेही हेच सांगितले आहे.  त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी असे राज्याला पत्र पाठवून कळवले आहे. जे आंदोलन करू इच्छितात त्यांना केंद्र सरकारचे  हे पत्र आपल्याला दाखवायचे आहेअसे सांगून मुख्यमंत्री म्हणालेसध्या आमदार सरनाईक कोरोना विरोधात जे आंदोलन करताहेत तसे करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. चांगल्या कामासाठी नेहमीच निधी मिळाला आहे येथून पुढेही निधी मिळेल याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. जनतेचे प्राण वाचवण्यासाठी प्राणवायूचा प्रकल्प सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी श्री. सरनाईक यांचे अभिनंदन केले.

 

तिसरी लाट रोखण्यासाठी कोरोना निर्बंधाचे पालन करा

                                                 - पालकमंत्री एकनाथ शिंदे

 

          नगरविकास मंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणालेकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची सर्वांधिक गरज भासली. उत्पादनापेक्षा मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आता मात्र जिल्हा नियोजन विकास निधी आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगर परिसरातील महापालिकांमध्ये ऑक्सिजन निर्मितीचे पीएसए प्लांट उभारले आहेत. त्यामाध्यमातून गरजू रुग्णांना ऑक्सिजन पुरविण्यासाठी मदत होईल. सध्या  कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून येत असल्याचे सांगत संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोना निर्बंधाचे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

कोरोना लढाईतील ठाणेकरांच काम मार्गदर्शक

                                              - खासदार संजय राऊत

 

          खासदार श्री. राऊत यावेळी म्हणालेजे कोरोना प्रतिबंधासाठीचे नियम पाळत नाहीत ते त्याच्या संसर्गाला आमंत्रण देतात. रुग्ण वाढले की ऑक्सिजनची मागणी वाढते त्यावेळी अशा प्रकारच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची गरज भासते. कोरोना लढाईत ज्याप्रकारे काम ठाणेकरांनी काम केलं आहे ते मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार श्री. सरनाईक यांनी प्रास्ताविक केले. नगरसेविका परिषा सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

 

ऑक्सिजन प्रकल्पाविषयी

          आमदार सरनाईक यांनी आपल्या ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघातील ठाणेकर नागरिकांच्या सोयीसाठी कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट उभारला आहे.

          प्रताप सरनाईक फाउंडेशन व विहंग चॅरिटेबल ट्रस्टने - ठाणे शहरातरेमंड कंपनी समोरविहंग पाम क्लब येथे हा कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. ठाण्यातील हा ऑक्सिजन प्लांट सुरु होत असून दिवस-रात्र या प्लांटमधून शहराला ऑक्सिजन सेवा मिळणार आहे. त्यासाठी प्रशिक्षित ऑपरेटरकर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. हवेतून ऑक्सिजन निर्माण करून त्याचे फिल्टरेशन करून ते सिलेंडरमध्ये भरले जाणार आहे. या  प्लांटमधून  120 सिलेंडर ऑक्सिजन दिवसाला मिळणार आहे. हे ऑक्सिजन जनतेला विनामूल्य उपलब्ध होणार आहे.

          हा ऑक्सिजन  प्लांट लोकांसाठी 24 तास सुरु राहील. रिकामे सिलेंडर घेऊन येणाऱ्या नागरिकांना भरलेले ऑक्सिजन सिलेंडर येथून दिले जाईल. तसेच ज्यांच्याकडे सिलेंडर नसेल त्यांना डिपॉजिट घेऊन मोफत ऑक्सिजन सिलेंडर देण्याची ही योजना आमदार सरनाईक यांनी तयार केली आहे. दररोज निर्माण होणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा पालिकासरकारी हॉस्पिटल तसेच गरज पडल्यास खासगी हॉस्पिट्लनाही केला जाईल. कोरोना पूर्णपणे हद्दपार होईपर्यंत व त्यानंतरही ही ऑक्सिजन सेवा सुरु राहणार 

 रस्ते अपघातजीवितहानी रोखण्यात वाहतूक नियमनाची

अत्याधुनिक यंत्रणा उपयुक्त ठरेल

                                              - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

§  मोटार वाहन विभागाच्या वायुवेग पथकात 76 नवीन इंटरसेप्टर वाहने दाखल

§  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

 

          मुंबई,दि.31: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवरचालकांवर कारवाई करण्यासाठी परिवहन विभागाच्या माध्यमातून अत्याधुनिक नियमन यंत्रणा उभारण्यात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे. ही यंत्रणा रस्ते अपघातजीवितहानी रोखण्यासाठी उपयुक्त ठरेल असे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. 

          राज्यातील परिवहन विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांना वायुवेग पथकांसाठी अत्याधुनिक अशा 76 वाहनांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एमएमारडीए मैदानवांद्रे कुर्ला संकुल येथे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास परिवहन मंत्री ॲड. अनिल परबपरिवहन राज्यमंत्री सतेज  उर्फ बंटी डी. पाटीलपरिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या वाहनांची पाहणीही केली. 

          मुख्यमंत्री म्हणाले कीकोरोना महामारीमध्ये अनेक लोकांचे प्राण गेले त्याप्रमाणे रस्त्यांवरील वेगवान धावणा-या वाहनांच्या अपघातात बळी जाणा-यांची संख्या हजारात आहे. भरधाव वेगाने वाहने चालवू नयेत असे आवाहन करूनही नियमांचे पालन न केल्याने अपघातांचे प्रमाण वाढते. यावर आळा घालण्यासाठी अद्ययावत यंत्रसामुग्रीने सुसज्ज वाहने दाखल झाली असून यामाध्यमातून अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात महाराष्ट्र राज्य देशात अव्वल स्थानी असल्याचा अभिमान आहेअशी भावना श्री. ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. 

          परिवहन विभागाने अद्ययावत यंत्रणा कार्यरत केल्याचे समाधान व्यक्त करून या यंत्रणेच्या वापरातून अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि जीवितहानी रोखणे हा राज्य शासनाचा हेतू निश्चितच साध्य होईलअशी अपेक्षा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी व्यक्त केली. 

          कारण नसतांना उगाचच वेगापायी वाहनचालक आणि सोबतींचेही प्राण जातात. अनेकदा वाहन अपघातात निष्पाप नागरिकांचा बळी जातो. ही प्राणहानी न होता त्यांना वाचवणे हेच शासनाचे कर्तव्य आहे. कोरोना महामारी किंवा अपघातात मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाला अधिक सक्षम करण्यासाठी शासन नेहमीच सहकार्य करेल असेही श्री.ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 

 

          परिवहन मंत्री श्री. अनिल परब म्हणालेदेशातील रस्त्यांवरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासंदर्भात केंद्र व राज्य शासनाचे मार्गदर्शक तत्वे ठरवून दिलेले आहेत. गेल्या वर्षभरात दुदैवाने महाराष्ट्रात अपघातांचे प्रमाण वाढले होते. हे प्रमाण कमी करण्यासाठी वायुवेग पथकांना अत्याधुनिक यंत्र सामुग्रीने सुसज्ज असलेली 76 वाहने उपलब्ध करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. या वाहनांच्या माध्यमातून अपघातांचे प्रमाण आणि बेशिस्त वाहतुक नियंत्रणात येईल. भविष्यात महाराष्ट्र अपघात रोखण्यात यश मिळेल. तसेच अपघाताच्या प्रमाणाबाबतीत राज्याचे स्थान खाली आणण्यासाठीही वाहनांचा उपयोग होईलअसेही श्री. परब यांनी यावेळी सांगितले. वायुवेग पथकाच्या माध्यमातून वेगवान आणि बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करता येणार आहे. 

 

वायुवेग पथक व वाहनांविषयी : 

          राज्यामध्ये वाहन तपासणीसाठी परिवहन विभागाची एकूण 92 वायुवेग पथके आहेत. राज्य रस्ता सुरक्षा निधीतून महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा कंपनीची स्कॉर्पिओ S५ या मॉडेलची 76 वाहने खरेदी केली आहेत. या वाहनांमध्ये रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी स्पीड गनब्रेथ अॅनालायझरव टींट मीटर उपकरणेइंटिग्रेटेड कॅमेरे बसविण्यात आली आहेत.

                                                            00000

 *तैमूर*


  (विनंती - लेख अवश्य वाचा)


*समरकंद म्हणजेच सध्याचा उझबेकिस्तान .. तिथला क्रूर शासक तैमूर ..!! हिंदुस्थान जिंकून इथे धर्मप्रसार करावा या उद्देशाने तो भलंमोठं सैन्य घेऊन निघाला ..!!* 


*अफगाणिस्तानातील गझनवी शासकांना त्याने हरवले. सर्वांना माहीतच आहे की, तो अत्यंत क्रूर, निर्दयी, दुष्ट होता ..!!*


*हाच तो तैमुर, ज्याचे नाव तो पराक्रमी (!) होता म्हणून, करिना कपूरने स्वतःच्या मुलाचे नाव तैमुर ठेवले .. त्याच तैमुरला, एका रणरागिणीने अक्षरश: जेरीस आणले होते ..!!*


*ती होती रामप्यारीबाई चौहान ..!!*


*तैमुर च्या अत्याचाराचे किस्से वाचून, कुणाचाही थरकाप उडेल ..!! अफगाणिस्तान चा प्रदेश जिंकून, हाच तैमुर, हरिद्वार, हरियाणा, दिल्लीच्या रोखानें, पंजाब उध्वस्त करून निघाला .. वाटेत येणाऱ्या लहान मोठ्या राजांनी प्रतिकार केला देखील .. पण, तैमुरच्या विशाल सेनेपुढे कुणाचाही टिकाव लागू शकला नाही ..!!* 


*राजे महाराजे थकले तरी, भारतीय जनता मात्र हार मानणारी नव्हती ..!!* 


*उत्तर भारतात त्याकाळी असणाऱ्या विविध जातींच्या प्रमुखांनी, देश धर्माच्या रक्षणासाठी एक समिती तयार केली ..!!* 


*आमने सामने लढून आपला निभाव, तैमुर समोर लागणार नाही, ह्याची त्यांना पूर्ण कल्पना असल्यानें, त्यांनी गनिमी काव्याने लढायचे ठरवले ..!!* 


*जोगराजसिंग परमार ह्यांना त्या सर्वानी आपल्या नवीन सैन्याचे प्रमुख बनवले ..!!गावोगावचे तरुण लढण्यासाठी आले ..!!* 


*पण आजपर्यंत कोणीही शस्त्र हाती धरलेले नसल्यानें, त्या सर्वांचे प्रशिक्षण जरुरीचे होते ..!!* 


*तरीही त्यांचा आपल्या नेत्यावर पूर्ण विश्वास होता. जोगराजसिंग ह्यांनी, त्या सर्व 'सेनेला' प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली ..!!*


*इसवी 1305 मध्ये, हरिद्वार जवळील कुंजासनहाटी गावात जन्मलेले जोगराजसिंग एक छोटे संस्थानिक होते ..!! इस्लामी आक्रमकांनी त्यांचे संस्थान लुटून, जाळून नष्ट करून टाकले होते ..!!* 


*त्यामुळे जोगराजसिंग गावोगावी फिरून, ह्या 'हिरव्या' संकटाशी लढायला युवकांना प्रेरित करत होते ..!!* 


*त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, तब्बल ८०,००० युवकांची सेना, देशभरातून तयार झाली होती ..!!*


*सर्व जाती-जमातींची महापंचायत, पुन्हा एकदा विचार-विनीमयास बसली .. त्यांच्यासमोर वेगळाच प्रश्न उभा झाला होता .. गावो-गावच्या युवतीही लढायला तयार झाल्या होत्या .. सर्वानी एक मताने ठराव मंजूर केला की, स्त्री सेना तयार करून, त्यांनाही लढण्याचे प्रशिक्षण द्यायचे ..!! अशाप्रकारे, तब्बल ४५,००० युवतींची 'स्त्री सेना' तयार झाली ..!! त्यांची सेनापती होती रामप्यारीबाई चौहान ..!!*


*कोण होती ही रामप्यारी बाई चौहान ..??*


*उत्तरप्रदेश मधील सहारनपूर गावात, रामप्यारीबाई चौहानचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला ..!!*


*लहानपणापासून इस्लामी आक्रमकांच्या भयकथा ऐकून, रामप्यारी चे मन पेटून उठत होते ..!!* 


*अन्यायाचा प्रतिकार करायचा तर, शरीर मजबूत हवे ..!! शरीर मजबूत करण्यासाठी व्यायाम केला पाहिजे .. त्यासाठी रामप्यारी रोज सुर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर, आपल्या शेतात जाऊन, सर्व प्रकारचे व्यायाम करत असे .. व्यायाम करून आपले शरीर तिने दणकट बनवले होते ..!!* 


*गांवकरी त्याबद्दल तिच्यावर टीका करीत पण तिचे आई-वडील मात्र तिच्या मागे ठामपणे उभे राहिले होते .. एकदा पंचायती समोर तिने गावक-यांना ह्याचे महत्त्व पटवून सांगितले ..!!* 


*इस्लामी आक्रमकांचा मुकाबला करायचा असेल तर, आपणच आपले शरीर मजबूत केले पाहिजे .. तिने सांगितलेला हा उपाय सहजसाध्य होता, आणि सर्वाना पटला होता ..!!*


*मग काय .. गावोगावी अशी व्यायाम शिबीरे होऊ लागली ..!!*


*सुरुवातीला फक्त आठ मुलींपासून सुरू झालेली ही सेना अल्पावधीतच ४५,००० रणरागिणींपर्यत पोहोचली ..!!*


*हा काळ होता अंदाजे इसवीसन १३३० चा ..!! एका पायाने लंगडा तैमुर, दिल्ली उध्वस्त करून पुढे सरकत होता ..!!*


*पुढील ठिकाणी येताच त्याला नवल वाटले .. लुटालूट करायला तो ज्या, ज्या गावात जाई, ते गाव अगोदरच रिकामे केलेले असे .. सर्व धनधान्य बाड-बिस्तरा घेऊन गावकरी गायब झालेले असत ..!!* 


*लुटायचे, मारायचे, बाटवायचे .. पण कुणाला ..??*


*गावकरी विहिरीतील पाण्यात देखील कचरा आणि घाण टाकून जात .. ह्या गोष्टींमुळे, तैमुर च्या सैन्याची उपासमार होऊ लागली .. गावकरी कुठे गेले हे शोधण्यासाठी सैन्य पुढे जाई .. त्यावेळी गनिमी कावा करून, अचानक गावकरी सैन्यावर हल्ला करत आणि पळून जात ..!! दिवसा आमने सामने लढाई करायला काहीवेळ पुरुष सैनिक पुढे येत आणि हल्ला करून पळून जात ..!! रात्रीच्या वेळेत जाळपोळ आणि छुपे हल्ले ठरलेले ..!! ह्या गनिमी हल्ल्यांनी तैमुर हैराण झाला .. सैन्य देखील उपाशी राहू लागले तशी सगळ्यांची चिडचिड ही वाढू लागली ..!!* 


*रोजच्या रात्रीच्या गनिमी काव्याने सैन्य पुरते नामोहरम झाले. रामप्यारीच्या मर्दानी युवती रात्रीच्या वेळी छुपे हल्ले करत आणि हे हल्ले करत असताना त्या काळजी घेत असत, की तैमुर च्या सैन्याला झोप मिळणार नाही ..!! हरदाई जाट, देवीकौर राजपूत, चंद्रो, ब्राम्हणी, रामदायी त्यागी ह्यांच्याकडे ह्या रात्रीच्या छुप्या हल्ल्याची जबाबदारी होती ..!!* 


*एखादी तुकडीच्या तुकडी वेगळी पाडून कापून काढणे .. तंबूला आगी लावणे, आगींमुळे हत्ती पिसाळणे, सततचे जागरण ह्यामुळे, तैमुर चे सव्वा लाख सैन्य, अक्षरश: जेरीस आणले गेले ..!!* 


*बरेच सैनिक तडफडून मरण पावले .. मेरठ वर हल्ला केल्याचा तैमुरला आता पस्तावा होऊ लागला .. नेमक्या ह्याचवेळी, लपून बसलेले जोगराजसिंग चे सैनिक, अचानकपणे चहुबाजूंनी चालून आले ..!!* 


*त्यांनी सैनिकांच्या तुकड्या केलेल्या होत्या .. त्यामुळे सतत नव्या दमाचे सैन्य लढायला तयार असे ..!!* 


*तीच कहाणी स्त्री सेनेची होती ..!! रामप्यारी ने दिवसा व रात्री लढण्यासाठी, आपल्या सेनेच्या तुकड्या केलेल्या होत्या. एक तुकडी झाडांवर बसून, तैमुरच्या सैन्यावर शर-वर्षाव करे तर दुसरी तुकडी, तैमूरच्या मेलेल्या सैनिकांची शस्त्रे व दारुगोळा घेऊन त्यांच्यावरच चालवत ..!!*


*पुरुष तुकडीचा म्होरक्या हरवीरसिंग गुलिया, लढाईच्या ऐन धुमाळीत, तैमुरच्या दिशेने निघाला ..!! तैमुरच्या अंगरक्षकाना उडवून, बाहेरील कडे फोडून तो आत जातोय हे रामप्यारी ने पाहिले मात्र, ती आपल्या तुकडीसहित, त्या धुमाळीत त्याच्या रक्षणार्थ उतरली, आणि सपासप सैनिक कापत, रामप्यारी बाईची स्त्री सेना, तैमुरच्या जवळ पोचली ..!!* 


*चपळाईने लढणाऱ्या स्त्री सैनिकांना पाहून, तैमुरचे सैनिक पुरते गोंधळले .. हरवीरसिंगच्या रक्षणार्थ आलेल्या ह्या स्त्री सेनेचा धोका, खिजराखानने ओळखला .. त्याने तैमुरचा घोडा खेचून, सटकण्याचा प्रयत्न केला .. त्यात तो काहीसा यशस्वीही होत होता तोच, २२,००० सैनिकांची दुसरी आणि अंतिम तुकडी घेऊन, ताज्या दमाने जोगराजसिंग मैदानात उतरले .. घमासान लढाई पेटली .. तैमुर चक्क पळून जात होता .. रामप्यारी ने त्याला पाहिले व पळणाऱ्या तैमूरचा  पाठलाग चालू केला ..!!* 


*रामप्यारी घोड्यावर आणि तैमुर देखील घोड्यावर ..!! तैमुर ने चिलखत घातले होते. चिलखतातून दिसणा-या तैमुरच्या काखेच्या उघड्या भागावर, रामप्यारी ने दौड घेतानाच, बाण चालवले. रामप्यारी ने त्याला गाठून त्याच्यावर तलवार देखील चालवली .. पण विष लावलेले बाण शरीरांत शिरल्याने तैमुर बेशुद्ध होऊन घोड्यावरून पडला ..!!* 


*खिजराखान ला मागे येताना बघून रामप्यारी मात्र जंगलात नाहीशी झाली ..!!* 


*ह्या जबरदस्त प्रतिहल्ल्याने घाबरून, तैमुर भारतावरील आक्रमण व त्याचे मनसुबे गुंडाळून, समरकंद ला पळून गेला ..!! गळा, छाती तसेच बगलेतील जखमांमुळे, तैमुर लवकरच मेला ..!!* 


*अशा ह्या 'पळपुट्याचे' तिकडे शूर योद्धा आणि महान धर्मप्रसारक म्हणून पुतळे ऊभे आहेत ..!!* 


*देश, धर्म, संस्कृतीच्या रक्षणासाठी, एकीकरण व स्त्री सक्षमीकरण करून प्रत्यक्ष युध्दात उतरणाऱ्यांना भारतीय लोक विसरले ..!!* 


*पण त्यांनी पळपुटेपणा केलेला तैमुर मात्र लक्षांत ठेवला ..!!*


*तैमुरसारख्या नराधमाला समोर गाठून, त्याला विदीर्ण करणारी रामप्यारीबाई चौहानला देखील भारतीय लोक पार विसरून गेले .. कारण हा खरा इतिहास आम्हाला कधीच शिकवलाच गेला नाही ..!!*


*तैमुर आला हे शिकवलं गेलं, पण तो घाबरून पळाला, हे आम्हाला कधीच शिकवलं गेलं नाही ..!!*


*रामप्यारीबाई ला मानाचा मुजरा ..!!* 🙏🇮🇳

 गाेव्याचे मुख्यमंत्री व देशाचे माजी दिवंगत संरक्षण मंत्री *मा.श्री मनोहर पर्रीकर* साहेब   यांचे अखेरचे शब्द ..


*" राजकीय क्षेत्रात मी उत्तुंग  यशाची शिखरं गाठली....*

*इतरांच्या दृष्टीकोनातून माझं आयुष्य आणि यश हे समानार्थी शब्दही झाले....*


*तरीही, माझ्या कामाव्यतिरिक्त, आनंद जर म्हणाल तर तो मला क्वचितच मिळाला. अखेरीस काय तर, ज्याला मी सरावून गेलो ती माझी राजकीय प्रतिष्ठा माझ्यासाठी केवळ एक सत्यपरिस्थिती मात्र बनून राहीली.*


*आज या क्षणी, आजारपणामुळं अंथरूणाला खिळलेलं असताना मी माझं सारं आयुष्य आठवून पहातोय. ज्या प्रसिद्धी आणि संपत्तीला मी सर्वस्व मानलं आणि त्यातच वृथा अहंकार जपला ते सगळंच आज मृत्युद्वारी उभं असताना धूसर होत असल्याचं आणि म्हणूनच निरर्थकही असल्याचं मला प्रकर्षानं जाणवतंय.*


*आज क्षणाक्षणानं मृत्यु जवळ येत असताना, हिरवा प्रकाश दाखवणारी अन् आयुष्यमान वाढवणारी वैद्यकीय उपकरणं माझ्या अवतीभवती दिसत असताना, त्यात असलेल्या यंत्रांचा ध्वनीही मला ऐकू येत असताना, निकट येत असलेल्या मृत्यु जवळ श्वासोच्छवासही मला जाणवतोय…*


*आता माझ्या लक्षात आलंय, भविष्यासाठी पुरेल एवढी पुंजी साठवून झाल्यानंतर, संपत्तीव्यतिरिक्त इतर काहीतरी अधिक महत्वाचं आपण करायला हवं असतं:*

*त्यात कदाचित् नातीगोती जपणं किंवा समाजसेवा करणे.*


*सातत्यानं केवळ राजकारणा मागे धावण्यामुळे माणूस  'आतून' फक्त आणि फक्त पिळवटतच जातो... अगदी माझ्यासारखा..."*


*आयुष्यभर मी, जी संपत्ती आणि राजकीय मानमरातब कमावले ते मी कदापिही सोबत नेऊ शकणार नाही...*


*जगात सगळ्यात महागडा बिछाना कोणता असतो ते ठाऊक आहे ?*

तो आहे, *'आजारपणाचा बिछाना' ..!* 


*आपली गाडी चालवण्यासाठी चालक भाड्यानं मिळतो, आपल्यासाठी पैसे कमावून देणारे मंत्री ठेवता येतात... पण आपलं आजारपण सहन करण्यासाठी आपण इतर कोणालाही ..कधीही नेमू शकत नाही...*


*हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण एकच गोष्ट अशी आहे की, जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही...आणि ती असते  "आपलं आयुष्य" " काळ " " समय ".*


*शस्त्रक्रीयेच्या टेबलावर असलेल्या व्यक्तीच्या मनात 'आपलं केवळ एकच पुस्तक वाचायचं राहिलंय' ही जाणिव असते...ते पुस्तक असतं "निरोगी जगण्याचं पुस्तक".*


*सध्या तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही स्थितीतून-वयातून जात असलात तरीही, एक ना एक दिवस काळ अश्या वळणावर आणून उभं करतो की समोर नाटकाचा शेवटचा अंक लख्खपणे दिसू लागतो....*


*स्वत:कडे दुर्लक्ष  करू नका... स्वत:च स्वत:चा आदर ठेवा. इतरांनाही प्रेमानं वागवा...*


 *लोक माणसं वापरायला शिकतात, आणि पैसे जपायला शिकतात. वास्तविक पैसा वापरायला हवा, आणि माणसं जपायला हवीत... आपल्या आयुष्याची सुरुवात ही आपल्या रडण्याने होते, आपल्या आयुष्याचा शेवट हा इतरांच्या रडण्याने होतो, मधला जो आयुष्यातील वेळ आहे तो भरपुर हसून भरून काढा, आणि त्यासाठी सदैव आनंदी रहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा...!!! "*


*- मनोहर पर्रीकर*


°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°


           ( संप्रेषित )

 थाइलैंड में एक पर्वत के नीचे पानी का एक छोटा झरना है  जिसके बाजु वाले पर्वत पे *ओम् ( ॐ)* का उच्चारण करने पर पानी का फ़व्वारा  बन कर पर्वत से भी उपर तक उछलता है.. 


  ये किसी  साधु सम्प्रदाय ने बनाया है । 


पानी का वज़न + गुरुत्वाकर्षण से भी इतना ऊपर पानी सिर्फ़ आवाज़ के तरंग से कैसे जा सकता है? ये कोई विज्ञानी ही बता सकता हे .. 


क्योंकि ऐसा सिर्फ़ *ओम् ( ॐ* )बोल ने पर ही होता हे !!         ये भी एक अजूबा हे ....!💐

 🍂अतिशय छान आहे एकदाच वाचा 


                 *देवाचा मित्र*

एक छोटा मुलगा रणरणत्या उन्हात फुलांचे गजरे विकत होता. ऊन खूप होते. तो मुलगा घामाघूम झाला होता. त्याचे अनवाणी पाय भाजत होते. सारखा तो पाय वर-खाली करत होता. तरीही चिकाटी न सोडता तशा रखरखत्या उन्हात पाय भाजत असताना तो गजरे विकत होता. त्याचे भाजणारे पाय बघून एका सज्जन माणसाला फारच वाईट वाटले. त्याने समोरच असलेल्या दुकानातून त्या मुलासाठी एक चप्पल खरेदी केली आणि त्या मुलाला दिली. त्या मुलाला तो म्हणाला ही चप्पल घाल. तुला मी भेट देतोय. यामुळे तुझे पाय भाजणार नाहीत. मुलगा लहान होता. त्याला त्याचे अप्रूप वाटले. त्याने लगेचच चप्पल घालून बघितली. त्याला खूप छान वाटले. तो आनंदी झाला. आनंदात त्या मुलाने त्या माणसाचा हात धरला व त्याला म्हणाला, ""काका, तुम्ही देव आहात का?‘‘ या प्रश्नावर तो सज्जन गृहस्थ आपले दोन्ही हात कानाला लावून म्हणाला, ""अरे नाही रे बाबा, मी देव नाही.‘‘ मुलगा पुन्हा तसाच निरागस हसला म्हणाला, ""काका - तुम्ही देव नाही मग नक्कीच देवाचे मित्र असणार.‘‘ मी कालच देवाला प्रार्थना केली होती. माझे पाय खूप भाजतात. मला चप्पल हवीय. देवानेच तुम्हाला पाठवले. तुम्ही देवाचे मित्रच असणार, हे वाक्य ऐकताच त्या सज्जन माणसाने त्या मुलाला जवळ घेऊन दोन वाक्ये बोलून तेथून त्या मुलाचा निरोप घेतला. संपूर्ण वाटेत त्या सज्जन माणसाच्या मनात एवढाच विचार घोळत होता, आपल्याला देव होता येत नाही; पण देवाचा मित्र होणे मात्र सहज शक्य आहे. खरोखर मित्रांनो आपल्यापैकी कुणीही देवाचा मित्र होऊ शकतो.

.

*स्वामी विवेकानंद म्हणायचे ज्याला चालत्या-बोलत्या माणसातला देव कळत नाही, त्याला दगडातला देव काय कळणार? 


देवाचा मित्र व्हा🍃


🐬 देवाचा मित्र होण्यासाठी शुभेच्छा

Monday, 30 August 2021

 मेसेज निट वाचून समजून घ्या खरोखर प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी विचार करायला लावणारा हा मेसेज आहे...


     .


  

     प्यादी मरण्यासाठीच का ❓?????


 अनेक  दिवसांपासून डोक्यात असलेला_

       _*' प्रश्न '*_

       _आहे की _


*.* *बुद्धिबळात* दोन्ही बाजूकडून *प्यादीच*

       पुढे का असतात ?


     _*.* *उभा-आडवा* मारा करु शकणारे *बलदंड_

         _*¤हत्ती,*_


     _*.* कानाकोपऱ्यातून *तिरप्या* चालीने वेध घेऊ_

     _*.* शकणारे *काटक*_

         _*¤उंट,*_


     _*.* उलटसुलट *अडीच घरां* पल्याड जाऊन हल्ला_

     _*.* चढवू शकणारी_

         _*¤घोडी,*_


     _*.* सर्वशक्तिमान_

         _*¤वजीर*_

     _*.* आणि_

     _*.* महामहीम_

         _*¤बादशहा*_

     _*.* एवढी सारी  *मातब्बर*_ 

       _मंडळी *मागच्या रांगेत*_


     _*.आणि तोफेच्या तोंडी*

     _*.*कोण तर*

     _*.* स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व नसलेली,_

     _*.* किरकोळ देहयष्टीची,_

     _*.* एक-एक घर पुढे सरकणारी_

      _□ *प्यादी !*_


     _*.* *हा म्हणजे झाडाने सावलीत बसण्यातला*_

        _*प्रकार झाला !*_


     _*.* बरं,_

     _*.* इतर सर्व मोहरे प्रकरण अंगाशी आले तर_

        _*मागे* फिरु शकतात._

     _*.* प्याद्यांना ती *मुभा* नाही._


     _*.* एवढंच काय_

     _*.* जीवाच्या आकांताने_

     _*.* एखाद्या प्याद्याने शत्रुचा प्रदेश पादाक्रांत करून_

     _*.* अंतिम रेषा गाठलीच_

     _*.* तरी_


     _*.* *पुनरुज्जीवन प्रतिष्ठितांचेच* होणार._

     _*.* तसा रिवाजच आहे !_


     _*.* थोडक्यात काय तर_

     _*.* प्यादी जन्माला येतात_

     _*.* ती *बळी* जाण्यासाठीच._

     _*.* *प्याद्यांनी* फक्त *लढायचं,*_

     _*.* तेही समोरच्या *प्याद्यांविरुद्धच.*_ 

     _*.* *का ?*_

     _*.* ते विचारायचं नाही._


     _*.* सरपटत-फरफटत प्यादी लढणार,_

       _झगडणार, मरणार._


     _*.* स्मारकं मात्र *प्रतिष्ठितांचीच* उभारली जाणार._


     _*.* इतिहासाची पानही डामडौल्यांचीच नोंद घेणार._


     _*.* उदोउदोही मानकर्‍यांचाच होणार._

     _*.* कारण, तसाच *रिवाज* असतो!_


     _*.* *कार्यकर्त्यांनी समजून घ्या !*_

     _*.* *आणि जर इच्छा झालीच*_

     _*.* *राजकारणातून बाजूला होऊन व्यवसायाकडे*__*वळा..........*_

*स्वतः कडे, स्वतःच्या कुटूंबाकडे, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या*

*भक्त व गुलाम बनून आयुष्याचं मातेर नका करून घेऊ.*

*कुठलाही राजकीय पक्ष , राजकीय नेता तुम्हाला प्यादी म्हणूनच वापरत असतो.*

*अशी प्यादी आजकाल सोशल मीडिया वर जास्तच कार्यरत असतात.*

*म्हणून स्वतः प्यादी बनायचं की नाही हे ठरविता आलं तरच शिक्षणाचा उपयोग आहे.*


*कृपया प्यादी बनू नका...बुद्धिवादी व्हा....*


     _*.* *हेच शिक्षित माणसाचे*_

           _*लक्षण*🙏

Featured post

Lakshvedhi