Wednesday, 25 August 2021

 वेळेत कामे न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका

ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिले निर्देश

 

          मुंबईदि. 24: कार्यादेश दिलेली कामे वेळेत पूर्ण करण्यात विलंब करणाऱ्या  कंत्राटदारांमुळे जनतेला त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अशा कंत्राटदारांची माहिती घेऊन त्यांना काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करावीअसे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या पैठण विधानसभा मतदारसंघातील ऊर्जा विभागाच्या कामाची आढावा बैठक त्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

          पैठण तालुक्यातील दरकवाडीऔरंगपूरवाडीरहाटगाव येथील ३३/११ के.व्ही.चे उपकेंद्र उभारण्याच्या मागणीच्या प्रस्तावाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांना दिली.

          पैठण तालुक्यातील नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम त्वरित करण्यात यावे तसेच सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश डॉ.नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिले.

          यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारेमहावितरणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडे हे प्रत्यक्ष तर औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

000


 

मुंबईत 28 ऑगस्टला रानभाज्याकृषिमाल विक्री महोत्सव

·      मुंबईत मुलुंडमध्ये प्रथमच आयोजन

 

          ठाणे, दि. 24 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून 'विकेल ते पिकेलया मोहिमेंतर्गत 'उत्पादक ते थेट ग्राहकया योजनेच्या अंमलबजावणीसाठी 'रानभाज्यामहोत्सव राज्यात ठिकठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या  विद्यमाने मुंबईत प्रथमच मुलुंड येथे २८ ऑगस्ट २०२१  रोजी रानभाज्या व कृषि माल महोत्सव व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.

          पावसाळ्यात उगवणा-या विविध भाज्यांची लज्जत सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि त्या भाज्यांवर उपजीविका असलेल्या आदिवासी बांधव व शेतक-यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी उत्पादित केलेले भाजीपाला अन्नधान्य तसेच कृषि प्रक्रिया केलेली उत्पादने यांच्या विक्रीसाठी तसेच मुलुंड मधील सर्वच नागरिकांना या उपक्रमाचा लाभ व्हावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

          आदिवासी समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी ज्या वन उत्पादनावर अवलंबून आहे. त्यामध्ये रानभाज्यांचे स्थान महत्वाचे आहे. रानभाज्यांमध्ये कंदभाज्याहिरव्या भाज्याफळभाज्याफुलभाज्या या भाज्या पावसाळ्यात येतात व त्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत. या रानभाज्यांचे महत्व लोकांपर्यंत पोहचविणे आणि त्यातून आदिवासी बांधवांना उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करणे याकरिता ठाणेपालघररायगड व नाशिक जिल्ह्यातून विविध प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

          'विकेल ते पिकेलधोरणांतर्गत शेतकरी ग्राहक थेट संकल्पनेवर आधारीत कार्यक्रम राबविण्यासाठी मुलुंड मधील विविध गृहनिर्माण सोसायट्या गटांना जोडुन देवून माहे सप्टेंबर - ऑक्टोबरपासून भाजीपाला व कृषि उत्पादने विक्री करण्याचे नियोजन आहे.  मुलुंड हायस्कूल हॉलआन्ध्र बँकेच्या जवळचंदन बाग रोडपाच रस्तामुलुंड पश्चिममुंबई ४०००८० येथे दिनांक २८ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत रानभाज्या व कृषि माल महोत्सव व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त सोसायट्यांनी तसेच ग्राहकांनी प्रदर्शन व विक्रीस भेट द्यावीअसे आवाहन ठाण्याचे जिल्हा अधीक्षक अंकुश माने यांनी केले आहे.

00000

 वेळेत कामे न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका

ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिले निर्देश

 

          मुंबईदि. 24: कार्यादेश दिलेली कामे वेळेत पूर्ण करण्यात विलंब करणाऱ्या  कंत्राटदारांमुळे जनतेला त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अशा कंत्राटदारांची माहिती घेऊन त्यांना काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करावीअसे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या पैठण विधानसभा मतदारसंघातील ऊर्जा विभागाच्या कामाची आढावा बैठक त्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

          पैठण तालुक्यातील दरकवाडीऔरंगपूरवाडीरहाटगाव येथील ३३/११ के.व्ही.चे उपकेंद्र उभारण्याच्या मागणीच्या प्रस्तावाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांना दिली.

          पैठण तालुक्यातील नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम त्वरित करण्यात यावे तसेच सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश डॉ.नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिले.

          यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारेमहावितरणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडे हे प्रत्यक्ष तर औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

000


 

मुंबईत 28 ऑगस्टला रानभाज्याकृषिमाल विक्री महोत्सव

·      मुंबईत मुलुंडमध्ये प्रथमच आयोजन

 

          ठाणे, दि. 24 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून 'विकेल ते पिकेलया मोहिमेंतर्गत 'उत्पादक ते थेट ग्राहकया योजनेच्या अंमलबजावणीसाठी 'रानभाज्यामहोत्सव राज्यात ठिकठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या  विद्यमाने मुंबईत प्रथमच मुलुंड येथे २८ ऑगस्ट २०२१  रोजी रानभाज्या व कृषि माल महोत्सव व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.

          पावसाळ्यात उगवणा-या विविध भाज्यांची लज्जत सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि त्या भाज्यांवर उपजीविका असलेल्या आदिवासी बांधव व शेतक-यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी उत्पादित केलेले भाजीपाला अन्नधान्य तसेच कृषि प्रक्रिया केलेली उत्पादने यांच्या विक्रीसाठी तसेच मुलुंड मधील सर्वच नागरिकांना या उपक्रमाचा लाभ व्हावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

          आदिवासी समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी ज्या वन उत्पादनावर अवलंबून आहे. त्यामध्ये रानभाज्यांचे स्थान महत्वाचे आहे. रानभाज्यांमध्ये कंदभाज्याहिरव्या भाज्याफळभाज्याफुलभाज्या या भाज्या पावसाळ्यात येतात व त्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत. या रानभाज्यांचे महत्व लोकांपर्यंत पोहचविणे आणि त्यातून आदिवासी बांधवांना उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करणे याकरिता ठाणेपालघररायगड व नाशिक जिल्ह्यातून विविध प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

          'विकेल ते पिकेलधोरणांतर्गत शेतकरी ग्राहक थेट संकल्पनेवर आधारीत कार्यक्रम राबविण्यासाठी मुलुंड मधील विविध गृहनिर्माण सोसायट्या गटांना जोडुन देवून माहे सप्टेंबर - ऑक्टोबरपासून भाजीपाला व कृषि उत्पादने विक्री करण्याचे नियोजन आहे.  मुलुंड हायस्कूल हॉलआन्ध्र बँकेच्या जवळचंदन बाग रोडपाच रस्तामुलुंड पश्चिममुंबई ४०००८० येथे दिनांक २८ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत रानभाज्या व कृषि माल महोत्सव व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त सोसायट्यांनी तसेच ग्राहकांनी प्रदर्शन व विक्रीस भेट द्यावीअसे आवाहन ठाण्याचे जिल्हा अधीक्षक अंकुश माने यांनी केले आहे.

00000

Tuesday, 24 August 2021

 पारगांव भातोडी गावाच्या सर्वांगिण विकासाचा आराखडा सादर करावा

                                             -  ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार

 

            मुंबईदि. 24अहमदनगर जिल्ह्यातील पारगांव भातोडी या गावाला आदर्श गाव म्हणुन विकसित करण्यासाठी राज्याच्या व केंद्राच्या योजनांचा लाभ घेऊन या गावाच्या विकासासाठी सर्वंकष आराखडा तयार करावाअसे निर्देश ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.

            अहमदनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्व असलेले हे गाव ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी दत्तक घेतले असून या गावाचा विकास आराखडा तयार करण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

              बैठकीला अहमदनगर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ओसवाल अहमदनगर तालुक्याचे गटविकास अधिकारी सचिन घाडगे, तहसीलदार उमेश पाटीलमहावितरणचे अभियंता श्री कोपनरविस्ताराधिकारी श्री खाडेग्रामविकास अधिकारी सचिन पवारपारगांवच्या सरपंच मीनाक्षी शिंदेव्याख्याते गणेश शिंदेतसेच संबधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

            ग्रामविकास राज्यमंत्री श्री. सत्तार म्हणाले,पारगांव भातोडी या गावाचा विकास आराखडा तयार करतांना आधी या गावाच्या सीमा निश्चितीचे काम मंत्रालय स्तरावरून करण्यात येईल. त्याचबरोबर या गावातील तळे सुशोभीकरणकिल्ला तसेच ब्रिटीशकालीन भींतीचे संवर्धन व्हावे यासाठी ग्रामविकासपुरातत्व विभाग व पर्यटन विभागाच्या समन्वयाने काम होणे आवश्यक असल्याचे श्री. सत्तार यांनी सांगितले.

            या ठिकाणी असलेले पुरातन शिव मंदीर,वाघेश्वरी देवीचे मंदीर यांचा जिर्णोद्धार तसेच मशिदी समोरील जागेत मुस्लीम समाजासाठी शादीखाना प्रस्तावित करण्यात आले आहे. गावातील शाळेच्या परिसरात मुलांसाठी खेळण्याची जागाग्रामपंचायतीची नवी इमारतविद्युतीकरण व इतर सुशोभीकरणाचे काम प्रस्तावीत आहे.

            अहमदनगर जिल्ह्यातील पारगांव भातोडी हे ऐतिहासिक गाव आहे या गावाला शहाजीराजांच्या लढाईचा इतिहास आहे. अनेक वर्ष विकासापासून वंचित असणाऱ्या पारगांवला ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार त्यांनी दत्तक घेतले आहे.

            यावेळी व्याख्याते गणेश शिंदे आणि सरपंच मीनाक्षी शिंदे यांनी गावाच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या विविध मागण्या व गावांची सद्य परिस्थिती दर्शवणारे सादरीकरण केले.

 

***


 


 पर्यावरणपूरक उद्योगास अनुदान देण्यासंदर्भात अभ्यास करणार

- पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे

            मुंबईदि. 24 : राज्यशासनाने महाराष्ट्रात प्लॅस्टिक बंदी केली असून येत्या काळात सिंगल यूज प्लॅस्टिक मुक्त करण्याचा निर्धार राज्यशासनाने केला आहे. त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर करुन विविध प्रकारचे साहित्य आणि इतर उत्पादन निर्मिती करणाऱ्या उद्योगासंदर्भातील प्रस्तावाबाबतचा आणि त्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाबाबतचा अभ्यास करण्यात येईल, असे पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

            पर्यावरणपूरक उद्योगास शासनस्तरावर अनुदान मिळण्यासंदर्भात बैठक मंत्रालयात  पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पर्यावरण व वातवरणीय बदल विभागाच्या अधिकाऱ्यांसह सुभाष मालपाणी उपस्थित होते.

            राज्यमंत्री श्री. बनसोडे म्हणाले कीप्लॅस्टिकचा वापर करुन विविध पूरक उद्योगधंदे सुरु करता येत असले तरी याबाबत पुरेसा अभ्यास विभागामार्फत करण्यात येईल.

            श्री.मालपाणी यांनी यावेळी राज्य शासनाच्या विविध विभागांचा निधी मिळण्यासाठी पात्रता प्रमाणपत्र मिळविणे कठीण असल्याचे, याशिवाय नियमित निधी न मिळता यासाठी विलंब लागतो, असे नमूद .

 ब्रम्हगिरीसह संतोषा आणि भागडी येथील उत्खननाबाबत

वस्तुस्तिथीदर्शक अहवाल येत्या आठ दिवसात सादर करावा

- पर्यावरण आणि वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे

           

            मुंबईदि. 24: गेल्या काही दिवसांपासून ब्रम्हगिरीसह संतोषा आणि भागडी डोंगररांग येथे अवैधरित्या उत्खनन होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर वनमहसूल आणि पर्यावरण विभागांनी एकत्ररित्या तेथील परिस्थितीची पाहणी करुन यासंदर्भातील वस्तुस्तिथीदर्शक अहवाल येत्या आठ दिवसात सादर करावा, असे निर्देश पर्यावरण आणि वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

            सह्याद्री ब्रम्हगिरी पर्वतरांगेतील संतोषा भागडी डोंगररांग बेलगाव ढसा व सारुळगाव येथील उत्खननाबाबत पर्यावरण आणि वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीला वनमहसूलपर्यावरण विभागाबरोबरच सेव्ह ब्रम्हगिरी मोहिम राबविणारे स्वयंसेवक उपस्थित होते.

            राज्यमंत्री श्री. बनसोडे म्हणाले कीवनमहसूल आणि पर्यावरण यांनी एकत्ररित्या या सर्व ठिकाणी जाऊन वस्तुनिष्ठ माहिती गोळा करावी. या ठिकाणी पाहणी करीत असताना सेव्ह ब्रम्हगिरी मोहिम राबविणारे स्वयंसेवक यांनी उपस्थित राहावे. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे याबाबतचा अहवाल तातडीने तयार करुन सादर करण्यात यावा. ब्रम्हगिरीच्या पायथ्याशी सुरुंग स्फोट घडवून गौण खनिजांचे उत्खनन करणे ही बाब अत्यंत गंभीर असून या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात येईल असेही श्री. बनसोडे यांनी सांगितले.

            या पाहणीदरम्यान संबंधित समितीने ही गावे इको सेन्सिटिव्हिटी झोन (पर्यावरण दृष्टया संवेदनशील क्षेत्र)बफर झोनमध्ये येत आहे का हे सुध्दा तपासणे आवश्यक आहे. या प्रकरणात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या नियमांची पूर्तता करण्यात आली आहे का हे तपासून याबाबत अहवालात नमूद करण्यात यावे अशा सूचनाही श्री. बनसोडे यांनी दिल्या.

0000

 बैलगाडी शर्यती आणि सराव पूर्ववत

सुरु करण्यासाठी महिनाभरात मार्ग काढणार

- पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

          मुंबई : दि. 24राज्यातील बैलगाडी शर्यतीची प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडी शर्यतीकडे पाहिले जाते. बैलगाडी शर्यतीच्या आवडीमुळे देशी जनावरांचे गाय आणि बैलांचे चांगल्या पद्धीने संगोपन केले जाते. या करीता बैलांचा सराव आणि शर्यत पूर्ववत सुरु करण्यासाठी महिन्याभरात मार्ग काढण्यात येणार असल्याचे, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी  सांगितले.

          मंत्रालयातील त्रिमुर्ती जवळच्या खुल्या प्रांगणात बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु करण्याविषयी आयोजित बैठकीत ते बोलत होत. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटीलगृह राज्यमंत्री (शहरे) सतेज उर्फ बंटी पाटीलआमदार शशिकांत शिंदेनिलेश लंकेकिसन काथोरेअनिल बाबरसंजय जगतापसंग्राम जगतापसंग्राम थोपटे यांच्या सह लोकप्रतिनिधी आणि राज्यातील बैलगाडी मालक आणि संघटनेचे पदाधिकारी तसेच पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

          पशुसंवर्धन मंत्री श्री. केदार म्हणालेसंविधान आणि घटनेचा आदर करुन शर्यतीच्या सरावासाठी कायद्याच्या चौकटीत राहून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल. येत्या महिन्याभरात योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल. ज्या राज्यात बैलगाडी शर्यत सुरु आहे. त्यांचाही आभ्यास करण्यात येईल. तसेच याबाबत गरज भासल्यास नवीन कायदा करण्याचाही विचार करण्यात येणार असल्याचेही श्री.केदार यांनी यावेळी सांगितले.

          राज्यात खिल्लार जातीचे बैल नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या जातीचे संवर्धन होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ही जात फक्त शर्यतीसाठीच नाही तर दुध उत्पादन आणि पैदास वाढविण्यासाठीही महत्त्वाची आहे. यामुळे देशी जनावरांचे संगोपनास प्राधान्य देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. न्यायालयात बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी वरिष्ठ कायदा सल्लागारांचीही मदत घेतली जाणार असल्याचे श्री.केदार यांनी सांगितले.

          जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणालेबैलांना सराव महत्त्वाचा आहे. शर्यती आणि आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. यासाठी सराव सुरु करण्यासाठी दिलासादायक मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्यातील बैलगाडी स्पर्धा पूर्ववत सुरु राहण्यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रयत्न करीत आहेत. स्पर्धा सुरु करण्यासाठी सर्व विधानसभा सदस्य सकारात्मक आहेत. मंत्रालयातील प्रांगणात प्रथमच अशी बैठक पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना घेतल्याबद्दल श्री.पाटील यांनी त्यांचे कौतुक केले.

          गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील म्हणालेशेतकरी आणि बैलगाडी मालक आणि विविध संघटनांची शर्यत  हा जिव्हाळ्याचा विषय आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. बैलांचा सराव सुरु करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या तात्काळ बैठक बोलावून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

          यावेळी राज्यातून आलेल्या बैलगाडी मालक आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या मागण्या व सूचना मांडल्या. उपस्थित आमदारांनी बैलगाडी शर्यतीविषयी मनोगत मांडले.

 कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

- उपमुख्यमंत्री अजित पवार

·       महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा

         

          मुंबईदि. 24 : कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीचा क्रीडाप्रकार आहे. कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठीत्याचा प्रसार-प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी आसोसिएशनच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येतील. तसेच कबड्डीच्या युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहनउपमुख्यमंत्री तथा राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले.

            अखिल भारतीय कबड्डी फेडरेशन-महाराष्ट्र ऑलिम्पीक असोसिएशनशी संलग्न असणाऱ्या महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी असोसिएशनचे कार्याध्यक्ष खासदार गजानन किर्तीकरउपाध्यक्ष दिनकर पाटीलशशिकांत गाडेसहकार्यवाह ॲड आस्वाद पाटीलकोषाध्यक्ष मंगल पांडेसहकार्यवाह रविंद्र देसाईविश्वास मोरेसच्चितानंद भोसलेमनोज पाटील यांच्यासह अन्य सदस्य ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेगेल्या दीड वर्षापासून आपण कोरोना संकटाचा सामना करत आहोत. या संकटकाळात महाराष्ट्रातील सर्वांनी एकजुटीने कोरोना संकटाचा सामना केला आहे. कोरोनाची दुसरी लाट कमी होत असली तरी आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहेत्यामुळे आपल्याला अधिक सतर्कपणे काम करण्याची गरज आहे. कबड्डी महर्षी बुवा साळवी यांनी कबड्डी खेळाला मोठ्या उंचीवर पोहोचवले. कबड्डी खेळाची लोकप्रियता आणखी वाढविण्यासाठी सर्वांनी मिळून विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच कबड्डी खेळाच्या क्रीडा नियमात होणारा बदल आत्मसात करुन ते अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

            यावेळी नियमित कामकाज पूर्ण करण्यात आले व पुढील विशेष सर्वसाधारण सभा मंगळवार दि. २१ सप्टेंबर २०२१ सकाळी ११ वाजता मुंबई येथे घेण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

Featured post

Lakshvedhi