Friday, 30 July 2021

 बरेच लोक मुंबई येथे वैद्यकीय उपचारासाठी जातात.  ही उपयुक्त माहिती आहे.  कृपया ते जतन करा:


  * डीमार्ट * * डी मार्ट चे प्रमोटर  राधाकिशन दमानी यांनी * गोपाळ हवेली * येथे * ए * मेट्रो सिनेमा क्वीन्स रोड मुंबई जवळ एक सुविधा बांधली असून मुंबईत उपचार घेत असलेल्या रूग्णांच्या कुटुंबीयांसाठी rooms 53 खोल्या आहेत.  काल त्याचे उद्घाटन झाले.  हे खूप छान केले गेले आहे.  हितचिंतकांच्या अशा कोणत्याही वास्तविक गरजेचा उल्लेख केला जाऊ शकतो.

  पत्ता:

  गोपाळ हवेली

  50, क्वीन रोड (सिनेमा लेन)

  मेट्रो सिनेमा जवळ

  मुंबई 400 020

  संपर्काची माहिती:

  व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप्लिकेशन.  मोबाईल

  91 88799 86893

  ई-मेल:

  fd@gpalmansion.com

  gm@gpalmansion.com

  दूरध्वनी क्रमांक: 022 22055001/02

  www.gpalmansion.com

  दर आहेत

  खूप वाजवी

  न्याहारी 30

  लंच प्लेट 75

  डिनर प्लेट 75

  800 खोल्या

  स्वयंपाकघर आणि जेवणाचे खूप प्रशस्त.

  कृपया व्यापकपणे सामायिक करा.  तुम्ही सगळे कसे आहात

  मुंबईत आप्त नातेवाईक असल्यास पी.एल.  ही माहिती प्रत्येकासह सामायिक करा.  * आम्ही रुग्णांना आणि नातेवाईकांना विनामूल्य टिफिन प्रदान करतो.  * क्षेत्र - दक्षिण मुंबई

  हॉस्पिटल्स: - जसलोक, सैफी, बॉम्बे, नायर, जेजे, मुंबई सेंट्रल जवळ आणि व्हीटी ....

  संपर्काची माहिती: -

  आपण आम्हाला व्हॉट्सअ‍ॅप देखील करू शकता

  * कल्पेश लोढा 9967236006 *

  * मनोज पटवारी 9820645070 *

  * अमृत जैन 9029373751 *

  कमीतकमी अशा लोकांसह पुढे जा जे अग्रेषित करुन इतरांना मदत करू शकतील.

  * आर.के.  घरगुती वैद्यकीय उपकरणे चॅरिटेबल ट्रस्टने सुरू केली आहेत.

  * * व्हीलचेअर *

  * * सक्शन मशीन *

  * * वॉटरबेड *

  * * एअरबेड *

  * * केर कर *

  वापरण्यास विनामूल्य (परताव्यायोग्य ठेवीसह)

  संपर्क व्यक्ती: -

  * संजय शाह 9322516628 *

  * चिंतन पांड्या: - 7666311942 *

  * जोडा: -17-डी, निसारगा उपट.  आयडीबीआय बँक जवळ, महावीर नगर, कांदिवली पश्चिम मुंबई 67 67 *

  * साई वल्यात्री साक्षरता पॉलीक्लिनिक *

  "कंबर दरबार" शांतीलाल मोदी रोड, भुराभाई हॉल समोर, कांदिवली (प.), मुंबई.

  * टी: 02265811644 *

  * 0222865 9615 *

  * www.kambardarbar.org *

  * दिवसाची वेळ *

  1. * सामान्य ओपीडी * ₹ 1 / - केवळ औषधांसह

  दररोज सकाळी _11-30 आणि संध्याकाळी 4-30_

  २. * एक्स-रे * ₹ 100 / -

  दररोज _9 ते 5-00 वाजता_

  3. * ईसीजी * ₹ 70.00

  दररोज _ * * * 9.00 ते सकाळी 11.00 * _

  *.  * पॅथॉलॉजी * अत्यधिक अनुदानित दर.  केवळ सीबीसी ₹ 20 / -.

  दररोज _8.30 ते 12.00_

  *. * नेत्र तपासणी * २० / -

  दररोज _3.30.30_

  सकाळी _ सकाळी 9 वाजता: बुध, शुक्र, शनि ._

  मोतीबिंदू शस्त्रक्रिया: सर्वोत्कृष्ट भारतीय लेन्ससह विनामूल्य.

  लेझर (फाको) शस्त्रक्रिया:

  5,3०० / - यू.एस.  फोल्डेबल लेन्स आयात करीत आहे

  / 10,000 / - यूकेने फोल्डेबल herफेरिक लेन्स आयात केले.  (बाहेरील दर 40,000 / - आहे

  *. * स्त्रीरोगशास्त्र / आयव्हीएफ / हिस्टेरोस्कोपी *

  _ट्यू / थुर / शुक्र.  1 p.m.

  7. * त्वचेचे विभाजन.  * .00 20.00

  सोमवारी दुपारी ..pm० वाजता_

  8. * ऑर्थोपेडिक * 20.00

  मंगळ _3.30.30__

  9. * मधुमेह आणि कार्डिओ * .00 20.00

  बुधवारी दुपारी 8.30 वाजता_

  10. * मुलाचे विभाजन.  * .00 20.00

  शुक्रवारी _5.30 pm_

  11. कान / नाक / घसा * .00 20.00

  बुधवारी / शुक्र 4-30 संध्याकाळ_

  12. * दंत * नाममात्र शुल्क आरसी शुल्क: ₹ 750 / -.

  दररोज _9.00 ते दुपारी 1.00_दिली दुपारी ०.०० वाजता ते सायंकाळी 00.००_

  १.. * डायलिसिस * बीपीएल रूग्णांसाठी विनामूल्य

  दैनिक (फोन: 28067645)

  14. * ग्रीवाचा कर्करोग * (ग्रीवाचा कर्करोग) चाचणी मोफत

  15. * अँटी कॅन्सर इंजेक्शन * 14 ते 24 वर्षांच्या मुलींसाठी.

  16. * ज्येष्ठ नागरिकांसाठी वास्तविक सुनावणी *, प्रत्यक्ष खर्चाच्या 50%.  जन्मतःच पात्र मुलांसाठी विनामूल्य.

  १.. * उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात नोटबुक आणि इतर हार्डवेअर वस्तू.

  18. * * बी.बी.  एमबीबीएस  सी.ए.  सी.एस.  बी.पी.एच.आर.एम.  एम.सी.ए.  आणि एमबीए निवडले.  विद्यार्थ्यांसाठी पात्र उमेदवारांसाठी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती *.  * भेट *

  www.kambarda bar.org आणि सर्व आवश्यक तारणांसह फॉर्म सबमिट करा.

  कृपया p_zijn zasainani@rediffmail.com ईमेल वर संपर्क साधा

  * कोणत्याही शिफारसी आवश्यक नाहीत.  * कृपया शेअर करा.  ********** प्राप्त केल्यानुसार


*👉🏼 आपल्या ओळखीच्या ग्रुपमध्ये पाठवा कोणाला तरी फायदा होईल 🙏*

 "jai bharat, Jai Maharashtra "🇬🇭                 *   ऋणानुबंधाची फुले कधीच कोमेजत नसतात. .*

*आठवणींच्या सुगंधाने ती सदा दरवळत असतात. .*

*आपली होणारी आठवण हा तोच सुगंध असतो. .*

*जन्मोजन्मीच्या ऋणानुबंधांचा तो दरवळ असतो. .*


  *💐🌹 good day🌹💐

 *बघण्याची नजर प्रामाणिक* 

*असेल तर नजरेला दिसणारी*

*प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते...💯🤞*


lakshvedhimm. blogspot. com📞9876824365,lakshvedhimm@gmail.com

 पूरग्रस्त नागरिकव्यावसायिकदुकानदारांच्या विम्याची

किमान 50 टक्के रक्कम तातडीने मिळावी

.............

विमा कंपन्यांना निर्देश देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी

 

            मुंबई, दि. 29 : ज्या व्यावसायिकदुकानदारांचे आणि नागरिकांचे  पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान 50 टक्के रक्कम तरी तातडीने द्यावीविमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत असे निर्देश विमा कंपन्यांना देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे. नुकसानग्रस्तांना उर्वरित विमा रक्कमही कागदपत्रांची पूर्तता करून लवकरात लवकर मिळावी, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पूरग्रस्त भागातील व्यावसायिक, दुकानदार आणि नागरिकांना त्यांच्या विमा दाव्याची रक्कम लवकरात लवकर मिळण्याच्या अनुषंगाने विमा कंपन्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती  त्यावेळी ते बोलत होते.

            बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवारनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,  उद्योग मंत्री सुभाष देसाईराज्य मंत्री कु.आदिती तटकरेआमदार भास्कर जाधवमुख्य सचिव सीताराम कुंटेवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिकमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंहप्रधान सचिव विकास खारगेमदत पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ पी गुप्तारायगडरत्नगिरीसांगली, कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यासह 11 विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे कीजुलै महिन्यात मुंबई तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील रायगडरत्नागिरीकोल्हापूरसांगली आणि सातारा अशा जिल्हयांना पूराचा मोठा फटका बसला. यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेची हानी झाली. सर्व पूरग्रस्त भागांमध्ये महसूल यंत्रणेस तातडीने पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक दुकानेवाहने आणि घरे यांचे नुकसान झाल्याने लोक विमा कंपन्यांकडून विमा मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. आपण आजच काही विमा कंपन्या तसेच जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली असून या बैठकीत विमा कंपन्यांनी पंचनाम्यांच्या आधारे एकूण विम्याच्या 50 टक्के रक्कम देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र यासाठी केंद्र शासनाकडून विमा कंपन्यांच्या मुख्यालयास आणि आयआरडीएला योग्य ते निर्देश किंवा सूचना मिळणे आवश्यक आहे. यापुर्वी देखील जम्मू काश्मिर आणि केरळमधील मोठ्या पूराच्या वेळेला अशा प्रकारे केंद्र सरकारने विमा कंपन्यांना निर्देश दिले होते असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

बँकांनाही सवलतीच्या व्याजदरात कर्ज द्यावे

            मुख्यमंत्र्यांनी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या प्रतिनिधींसमवेतही बैठक घेतली. या बैठकीच्या अनुषंगाने देखील मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना माहिती दिली. सर्व बँकांनी पूरग्रस्त भागातील शाखांमधून बँकींग व्यवसाय त्वरित सुरु करावाज्या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहेत्यांना वर्किंग कँपिटल- खेळते भांडवलाकरिता सवलतीच्या व्याज दरात कर्ज द्यावेज्या लोकांना कर्जाचे हप्ते भरायचे आहेत. त्यांना काही महिन्यांची सवलत द्यावी अशा सूचना बँकांना दिल्या असून आपल्यास्तरावरून देखील असे निर्देश देण्यात यावेत अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

प्रक्रिया सुटसुटीत करावी

            दरम्यान या बैठकीत मुख्यमंत्री श्री.ठाकरे विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना म्हणाले की,  दावे निकाली काढताना त्यांची नियमावली दाखवून अडचणीत असलेल्या विमाधारक उद्योग व्यावसायिकाना आणखी अडचणीत आणू नयेदावे निकाली काढण्याची पद्धत सुटसुटीत आणि सोपी करावीपॉलिसी घेतानाचे प्रश्न आता दावे निकाली काढताना विचारू नयेत. रोगराई पसरू नये म्हणून पूरग्रस्त भागाची स्वछता लवकरात लवकर करणे अत्यावश्यक आहे त्यामुळे  झालेल्या नुकसानीचे दावे निकाली काढण्यासाठी  नुकसान झालेल्या वस्तू  आणि वाहने  आहे त्या नुकसानग्रस्त स्थितीत ठेवणे शक्य होणार नाही.  त्यामुळे महसूल यंत्रणेने पंचनामे करताना झालेल्या नुकसानीचे सुस्पष्ट छायाचित्रे काढावीतमहसूल यंत्रणेचे हे पंचनामे आणि छायाचित्रे विमा कंपन्यांनी ग्राह्य धरावीत व  त्यावरून नुकसानग्रस्ताना विम्याची रक्कम देण्याची कार्यवाही वेगाने पूर्ण करावी.

दावे तातडीने निकाली काढावेत

            बैठकीत उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले कीविमा कंपन्यांनी विमा दावे तातडीने निकाली काढावेतपुराच्या पाण्याने उद्योग व्यावसायिक आणि विमाधारक नागरिकांची कागदपत्रे  वाहून गेली आहेत त्यामुळे या गोष्टीसाठी त्यांच्याकडे  आग्रह धरू नयेत्यांच्या दाव्याची खातरजमा करून नुकसानीची विमा रक्कम पूर्णत्वाने द्यावी.

            नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विमा दावे तातडीने निकाली काढण्याची आवश्यकता व्यक्त केलीत्यांनी विमा दाव्याची रक्कम मिळवताना नागरिकांना येत असलेल्या अडचणीची माहिती दिली

            राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी विमा कंपन्यांनी विमा दाव्याची 100 टक्के रक्कम प्रदान करावी, यात कपात करू नये अशी मागणी यावेळी केली.

            जिल्हाधिकाऱ्यांनी विमा दावे निकाली काढताना महसूल यंत्रणेचे पंचनामे ग्राह्य धरावेत या मागणीसह त्यांना असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या.

000

 वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती

विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

            मुंबई,  दि. 30 : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विमुक्त जातीभटक्या जमाती व विशेष प्रवर्गातील गरजू लोकांकरीता वैयक्तीक व्याज परतावा व गट कर्ज व्याज परतावा योजना सूरू झाल्या असून, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील उपरोक्त समाजातील सुशिक्षित बेरोजगार व गरजू व्यक्तींनी या योजनांचा लाभ घ्यावाअसे आवाहन वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

            महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विमुक्त जातीभटक्या जमाती व विशेष प्रवर्गातील तसेच मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील रहिवासी असावा. 18 ते 50 वर्ष वयोगटातील गरजूंना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एका कुटूंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येणार आहे. गरजू व्यक्तींनी महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा. अधिक माहितीकरीता गृहनिर्माण भवनखो.क्र.३३कलानगरबांद्रा (पू)मुंबई. दुरध्वनी क्रमांक २५४२८९०७ येथे संपर्क साधावाअसे आवाहन  अरुण माने जिल्हा व्यवस्थापक, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मुंबई शहर व उपनगर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

०००

 

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या

योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. 30 : शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्ग प्रवर्गातील गरजू लोकांकरीता बीज भांडवल योजनावैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनागट कर्ज व्याज परतावा योजना व थेट कर्ज योजना (महामंडळ) सुरू असून मुंबई व मुंबई उपनगर जिल्हयातील उपरोक्त समाजातील सुशिक्षित बेरोजगार व गरजू व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

            महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार इतर मागासवर्ग प्रवर्गातील तसेच मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील रहिवासी असावा. १८ ते ५० वर्षे वयोगटातील गरजूंना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येणार आहे. गरजू व्यक्तीनी महामंडळाच्या www.msobcfdc.org/msobcfdc.in या संकेतस्थळावर करावाअसे आवाहन जिल्हा व्यवस्थापकशामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लि. मुंबई शहर व उपनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

०००


 

एनएसएफडीसी योजनेअंतर्गत स्माईल योजना

 

              मुंबईदि. 30 : कोरोना विषाणुच्या महामारीमध्ये अनुसूचित जातीमधील ज्या कुटुंबप्रमुखाचे कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे निधन झाले आहे. अशा कुटुंबांना आर्थिक व सामाजिक आधार देण्याकरिता एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्यामार्फत ‘स्माईल योजना’ राबविण्याचे विचाराधीन असल्याची माहिती महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक प्रशांत गेडाम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

            अनुसूचित जातीतील 18 ते 60 या वयोगटात असलेल्या कुटुंबप्रमुखाचा कोविड-19 मुळे मृत्यु झाला आहे. अशा कुटुंबाचे पुर्नवसन करण्यासाठी माहिती एकत्रित करण्यात येत आहे. यासाठी संबंधितांनी https://forms.gle/7mG8CMecLknWGt6K7 या लिंकवर अर्ज भरावा. या योजनेची अधिक माहिती www.mahatmaphulecorporation.com  या संकेतस्थळावर नोटीस सेक्शन मध्ये मिळेल.

            या योजनेला अधिकाधिक कुटुंबांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महाव्यवस्थापक महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे

 कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांचा

पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू

- मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

 

·       नृसिंहवाडी व शिरोळ येथील पूरग्रस्तांशी साधला संवाद

·       पद्माराजे हायस्कूल येथील पूरग्रस्त निवारा केंद्राची केली पाहणी

 

            कोल्हापूर दि 30 (जि.मा.का) : कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांनी एकत्र येऊन एकमताने ठराव मंजूर करावायेथील पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावूपूरग्रस्त भागाची पाहणी करत असून याबाबत जिल्हास्तरावर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सविस्तर चर्चा करुन योग्य निर्णय घेतला जाईलअसे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज दिले.

            मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांच्या समवेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफपालकमंत्री सतेज पाटीलआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकरखासदार संजय मंडलिकखासदार धैर्यशील मानेमुख्य सचिव सिताराम कुंटेराज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागरजिल्हाधिकारी राहूल रेखावरमनपा आयुक्त डॉ .कांदबरी बलकवडेजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाणपोलीस अधिक्षक शैलेश बलकवडेशिरोळ नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,  माजी आमदार उल्हास पाटीलमाजी आमदार डॉ. सुजित मिणचेकरमाजी आमदार सत्यजित पाटीलआदी मान्यवर उपस्थित होते.

            नृसिंहवाडी तिर्थ क्षेत्र येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरपरिस्थितीची पाहणी करुन पूरग्रस्त स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला. तसेच पूरग्रस्तांसाठी निर्माण करण्यात आलेल्या पद्माराजे हायस्कूल शिरोळ येथील निवारा केंद्रास भेट देऊन संवाद साधला. नृसिंहवाडी येथे स्थानिकांनी सन 2019 चा पूरसध्या सुरु असलेली कोरोनाची परिस्थिती व आता आलेला महापूर यामुळे येथील सर्वच जनजीवन विस्कळीत झाले असून याबाबत ठोस कार्यवाही व्हावीअशी मागणी स्थानिक पूरग्रस्त नागरिकव्यापारीदेवस्थानचे पदाधिकारी यांनी केली.

0000


 आजच्या महामारी च्या काळात मनुष्य विसरत चाललाय त्यासाठी आठवण करुन देतोय               *चढता सूरज धीरे धीरे...*


आज ज्या गाण्याबद्दल लिहिणार आहे ती एक कव्वाली आहे. साधारणतः १९७० च्या दशकात लिहिली गेलेली आणि गायली गेलेली. पण आज सुद्धा ती ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात. *शायर कैसर रत्नागिरवी यांचे शब्द आणि मशहूर कव्वाल अझीझ नाझा* *यांची गायकी* यांचा सुरेल संगम या कव्वाली मध्ये दिसून येतो. तसे पाहिले तर कव्वाली हा इस्लामिक गायन प्रकार. त्याची भाषाही उर्दू; पण तरीही *भाषेच्या, धर्माच्या भिंती तोडून कव्वालीने भारतीय मनावर पकड मिळवलेली आहे*. कव्वाली म्हटले की माझ्या डोळ्यासमोर येतो तो श्रीरामपूर गावातील सय्यदबाबांचा उरूस. ३ दिवस चालणाऱ्या या उरुसात एक दिवस कव्वालींचा कार्यक्रम असतो. अनेक ठिकाणचे कव्वाल इथे येवून आपापल्या कव्वाल्या सादर करतात. त्या प्रत्यक्ष ऐकणे हा एक खूप छान अनुभव असतो. अशाच उरुसामधून मला कव्वालीची ओळख झाली. तसे चित्रपटातही अनेक कव्वाली हिट झाल्या आहेतच. एक विशिष्ट आवाज, एक विशिष्ट चाल, एक विशिष्ट गायनाची पद्धत म्हणून कव्वालीचा उल्लेख करता येईल. बऱ्याचश्या कव्वाल्या जरी अल्लाहचे गुणगान करणाऱ्या असल्या तरी त्यात काही प्रमाणात विविधताही आढळते. उदा. “झूम बराबर झूम शराबी” ही कव्वाली दारू बद्दल आहे किंवा “ये माना मेरी जां मुहब्बत सजा है” ही कव्वाली प्रियकराचे भाव उत्कटतेने सादर करताना दिसते तर “यारी है इमान मेरा” या कव्वालीत मित्रप्रेम दिसते.


मी निवडलेल्या कव्वालीत मात्र आपल्या जीवनाचे सार सांगितले गेले आहे. म्हणजे माणूस आपल्या काहीश्या यशाने खूप अहंकारी बनतो. इतरांना तुच्छ लेखायला लागतो पण तरीही ते काही शाश्वत नाही. कधी ना कधी त्याचा अंत हा ठरलेलाच. पृथ्वीवर जो जन्माला येतो त्याला एक दिवस इथून जावेच लागते आणि जसे तो येताना काही घेवून येत नाही तसेच जातानाही काहीच नेत नाही. हाचं भावार्थ या कव्वालीत आहे. आता डायरेक्ट मूळ पदावरच येतो... मी निवडलेली कव्वाली आहे “चढता सुरज” ही. आतापर्यंत मी ही कव्वाली अनेकदा ऐकली आहे पण तरीही परत परत ऐकताना कुठेही बोर वाटत नाही. त्याचे कारण म्हणजे त्याची चाल. माणूस आधी चाल ऐकतो आणि नंतर शब्द. जर शब्द कितीही चांगले असले पण चाल व्यवस्थित नसेल तर ते पाहिजे तितके परिणामकारक होत नाहीत. असो... 


सुरुवातीलाच जो शेर आला आहे त्यातच खरं तर सगळा अर्थ शायरने सांगून टाकला आहे. 


*हुये नामवर बेनिशाँ कैसे-कैसे !*

*जमीं खा गई, नौजवान कैसे-कैसे !*

*आज जवानी पर इतराने वाले, कल पछताएगा,*

*चढता सूरज धीरे धीरे, ढलता है ढल जायेगा ॥* 


कितीही मोठे नांव असले, कितीही कीर्ती मिळवली आणि कितीही सत्ता, पैसा, ताकद मिळवली तरीही शेवटी एक दिवस त्यातील काहीच राहत नाही आणि नंतर तर लोकं त्याचे नांवही लक्षात ठेवत नाहीत हेच पहिल्या ओळीत शायरने सुचवले आहे. आता पर्यंत अनेक राजे, महाराजे या पृथ्वीतलावर होऊन गेले पण त्यांच्या मृत्युनंतर आज जर कुणाला त्यांच्याबद्दल विचारले तर कित्येकांना त्यांचे कर्तुत्वचं काय पण नांवही माहित नाही. आणि म्हणून शायर आधीच आपल्याला सावध करत आहे की बाबारे... जरी आज तू तरुण आहेस, बलवान आहेस, धनवान आहेस तरी त्याचा गर्व करू नकोस... नाहीतर उदया तुला पश्चताप करावा लागेल यात संशय नाही. दुनियेची ही रीतच आहे की दिवसा उगावणारा सूर्य देखील संध्याकाळी मावळतोचं. 


*तू यहां मुसाफ़िर है, ये सरा-ए-फ़ानी है,*

*चार रोज़ की मेहमां तेरी जिंदगानी है,*

*ज़र, जमीं, ज़ेवर कुछ न साथ जायेगा ,*

*खाली हाथ आया हैं, खाली हाथ जायेगा ।*

*जान कर भी अनजाना बन रहा है दीवाने ,*

*अपनी उम्र-ए-फ़ानी पर तन रहा है दीवाने ।*

*इस कदर तू खोया है, इस जहां के मेले में,*

*तू खुदा को भूला है, फ़ंस के इस झमेले में ।*


अरे तू इथे फक्त एक यात्रेकरू आहेस. हा मृत्युलोक आहे आणि इथे माणसाचे जीवन हे फक्त काही दिवसांचेचं असते. इथे तुला कितीही लोकं मिळू दे, जमीन मिळू दे, धनदौलत मिळू दे... यातील काहीच शेवटी तुझ्याबरोबर येणार नाही. तू जसा येताना रिकाम्या हाताने आलास तसाच रिकाम्या हाताने जाणार आहेस. हे सगळे तुला माहित नाही असे नाही, पण तरीही हे सगळे तू मान्य करायला तयार होत नाहीयेस. आणि आजची भोवतालची परिस्थिती पाहून वृथा अभिमान करतो आहेस. बरे या सगळ्यात तू इतका गुरफटून गेला आहेस की तुला या सगळ्यांपुढे ईश्वराच्या अस्तित्वाचेही स्मरण राहिले नाही.


*आज तक तो देखा है, पाने वाला खोता है,*

*ज़िंदगी को जो समझा ज़िंदगी पे रोता है,*

*मिटने वाली दुनिया का ऐतबार करता है*,

*क्या समझ के तू आखिर इस से प्यार करता है ?*

*अपनी-अपनी फ़िक्रों में जो भी है, वोह उलझा है,*

*ज़िंदगी हकीकत में क्या है, कौन समझा है ?*

*आज समझलें, कल यह मौका, हाथ न तेरे आयेगा,*

*ओह गफ़लत की नींद में सोने वाले, धोखा खायेगा ।*


आज पर्यत पहात आलो आहे की जो एखादी गोष्ट मिळवतो त्याला एक दिवस ती गमवावी लागतेच. ज्याला ही गोष्ट समजली त्याला जीवनाचे काहीच मोल राहत नाही; आणि मग तो परत या जीवन मृत्यूच्या फेऱ्यात अडकू नये यासाठी प्रयत्नशील होतो. अरे एक दिवस तर या पृथ्वीचेही अस्तित्व संपणार आहे मग असा कोणता विचार करून तू या मोहात अडकतो आहेस? जो तो आपापल्या भविष्याच्या चिंतेत अडकलेला आहे, त्यामुळे हे जीवन काय आहे हे तरी कुणाला कुठे नीटसे उमगले आहे? त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. आजूनही यांवर विचार कर. कारण हे संधी हुकली तर परत तू तुझ्या नेहमीच्या चिंतांमध्ये अडकल्यावर परत संधी मिळेलच याची शाश्वती नाही. अजूनही बेसावधपणे झोपून वेळ दवडू नकोस. नाहीतर तुला सावरण्याचाही वेळ मिळणार नाही... 


*मौत ने जमाने को क्या समां दिखा डाला,*

*कैसे कैसे रुस्तम को खाक में मिला डाला ।*

*याद रख उस सिकंदर के हौसले तो आली थे,*

*जब गया था दुनिया से, दोनो हाथ खाली थे ।*

*अब ना वोह हलाकू है, और ना उसके साथी है*,

*जंग-जु ना पौरस और ना उसके हाथी है ।*

*कल जो तनके चलते थे, अपनी शानों शौकत पर,*

*शम्मा तक नहीं जलती आज उनकी तुरबत पर ।*


मृत्यू ने आता पर्यंत अनेक लोकांचा अंत केला आहे. ज्यावेळेस सिकंदर पृथ्वी जिंकण्यास आला त्यावेळेस त्याच्यात हिम्मत, जुझारुपणा याची काहीच कमी नव्हती, पण ज्यावेळेस त्याचा अंत झाला त्यावेळेस मात्र त्याने जिंकलेल्या गोष्टींपैकी कोणतीच गोष्ट त्याला बरोबर नेता आली नाही. आता तो दुष्ट आणि सगळ्यांचा कर्दनकाळ ठरणारा हलाकू आणि त्याचे साथीदार राहिले नाहीत की शूर लढवय्या पौरस ही राहिला नाही. त्यांची धनदौलतही राहिली नाही. पूर्वी हे जे राजे महाराजे अगदी आढ्यतेने चालायचे आज त्यांच्या कबरीवर साधा दिवाही तेवत नाही. 


*अदना हो या आला हो , सबको लौट जाना है,*

*मुफ़्लिस-ओ-तवंगर का कब्र ही ठिकाना है ।*

*जैसी करनी-वैसी भरनी, आज किया कल पायेगा,*

*सर उठा कर चलने वाले, एक दिन ठोकर खायेगा ।* 


लहान असो वा मोठा, गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकालाच एक दिवस जायचे आहे, सगळ्यांचे शेवटचे ठिकाण हे पंचतत्वात विलीनीकरण हेच तर आहे. तुम्ही जसे कराल, जे पेराल तेच नंतर उगवणार आहे. फक्त तोंड वर करून चालत राहिलात तर ठेच ही लागणारच... त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही हेच शायर जीव तोडून सांगतो आहे.


*मौत सबको आनी है, कौन उससे छूटा है,*

*तू फ़नाह नहीं होगा, ये खयाल झूठा है ।*

*सांस टूटते ही सब रिश्ते टूट जायेंगे,*

*बाप, मां, बहेन, बिवी, बच्चे छूट जायेंगे ।*

*तेरे जितने भाई है, वक्त का चलन देंगे,*

*छीन कर तेरी दौलत, दो ही गज कफ़न देंगे ।*

*जिन को अपना कहता है, कब यह तेरे साथी है ?*

*कब्र है तेरी मंजिल और यह बाराती है ।* 


मृत्यू हा तर सगळ्यांनाच येणार आहे. त्यापासून आज पर्यंत कुणीच सुटलेले नाहीत. जर तुला असे वाटत असेल की तू त्यापासून वाचू शकतोस तर हे पूर्णपणे चूक आहे. एकदा का आत्मा शरीरातून निघून गेला की मग त्या शरीराचे कोणतेच नाते राहत नाहीत. आईवडील असो वा भावंड किंवा बायको मुलं सगळेच दूर होतात. ज्यांना तुम्ही भाऊ म्हणतात तेही इतरांसारखेच बनतात आणि जी काही धनदौलत तुम्ही कमावली आहे ती तर घेऊन टाकतातच, पण त्याच्या बदल्यात आपल्याला फक्त काही मीटरचे कफन देतात. ज्यांना तू स्वतःचे मित्र, परिवार म्हणतो आहेस हे फक्त तेवढ्या पुरतेच आहेत. बाकी ज्या वेळेस तुझा मृत्यू होईल त्यावेळेस फक्त तुला जायचे आहे आणि हे सगळे लोकं फक्त काही पावले बरोबर असतील आणि नंतर आपापल्या मार्गाने निघूनही जातील.


*लाके कब्र में तुझको मुर्दा-पाक डालेंगे,*

*अपनेही हाथों से तेरे मुंह में खाक डालेंगे ।*

*तेरी सारी उल्फ़त को खाक में मिला देंगे* ,

*तेरे चाहने वाले कल तुझे भुला देंगे ।*

*इसलिए ये कहता हूं, खूब सोचलें दिलमें,*

*क्यूं फ़सायें बैठा है, अपनी जान मुश्किल में ?*

*कर गुनाहों से तौबा, आगे वक्त संभल जाए* 

*दम का क्या भरोसा है, जाने कब निकल जाए ।*

*मुठ्ठी बांध के आने वाले... हाथ पसारे जाएगा ।*

*धन-दौलत-जागीर से तुने क्या पाया है, क्या पायेगा ?* 


जे तुझे पार्थिव असेल ते कबरीत टाकून त्यावरच स्वतःच्या हाताने माती टाकणारे हे लोकं नंतर काही दिवसातच तुला पूर्णतः विसरून जातील. आणि यांनाच तू आपले सगेसोयरे म्हणतो आहेस? म्हणून परत एकदा सांगतो... विचार कर... नीट विचार कर... आज जर तू तुझं वर्तन सुधारलं तर उदया तू जेंव्हा देवाच्या दरबारात उभा राहशील त्यावेळेस तुला त्रास होणार नाही. त्यासाठी आजपासूनच त्याची सुरुवात कर... काय माहित उदया कसा येईल? शेवटी तुला मोकळ्या हातानेच जायचे आहे. पैशाने या गोष्टी विकत घेता येत नाहीत. त्यासाठी सद्वर्तनचं महत्वाचे आणि गरजेचे असते. 


खरं तर या कव्वाली मध्ये प्रत्येकाच्या जीवनाचे सारचं दिलेले आहे. जर तुम्ही मरताना काहीच नेऊ शकणार नसाल, तर मग हा सगळा खटाटोप कशासाठी? पण नेमका माणूस हेच विसरून जातो. पैशाच्या आणि संपत्तीच्या मोहात अनेक अनैतिक गोष्टी करतो आणि स्वतःचा शेवट वाईट करून घेतो. असे म्हणतात की माणूस मेल्यावर त्याच्या कर्तुत्वाने जिवंत राहतो पण त्यासाठी त्याने चांगले वर्तन केले पाहिजे. हाच सुंदर संदेश ही कव्वाली आपल्याला देते. जर याप्रमाणे प्रत्येकाने आपले वर्तन सुधारले तर ही पृथ्वी मृत्युलोक न राहता स्वर्ग बनेल.

Thursday, 29 July 2021

 ऊर्जा विभागात स्थापन करणार ‘आपत्ती व्यवस्थापन’ विभाग

ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची चिपळूण दौऱ्यात घोषणा

            रत्नागिरीदि. 29 : महावितरणमहापारेषण व महानिर्मितीच्या यंत्रणेचे नैसर्गिक संकटामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी चिपळूण दौऱ्यादरम्यान दिली.

            गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीनिसर्ग व तौक्ते  चक्रीवादळ व पुरामुळे वीज यंत्रणेचे खूप नुकसान झाले आहे. उघड्यावर वीज यंत्रणा असल्यामुळे प्रथम नैसर्गिक संकटाचा सामना ऊर्जा विभागाला करावा लागतो. यावर  उपाययोजना व संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी आपत्ती विभाग स्थापन करण्याचा मानस असल्याचे डॉ. राऊत म्हणाले.

            कोकणात वारंवार नैसर्गिक संकटे येत असल्याने तेथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे कायमस्वरूपी तळ निर्माण करण्यासाठी पंतप्रधान यांना विनंती करण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करणार असल्याचे डॉ. राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

            रत्नागिरी जिल्ह्यात दि. 22 जुलै रोजी झालेल्या  ढगफुटी व अतिवृष्टीमुळे मुख्यत: चिपळूणखेडसंगमेश्वर आणि राजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये नद्यांना पूर आल्याने महावितरण व महापारेषणच्या यंत्रणांचे अतोनात नुकसान झाले आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी डॉ. नितीन राऊत यांनी चिपळूण तालुक्याला भेट दिली. यावेळी त्यांनी पुरामुळे नादुरुस्त झालेल्या ग्राहकांचे मीटर त्वरित बदलून देण्याचे निर्देश महावितरणला दिले.

            चिपळूण येथे पुरामुळे नागरिकांचे तसेच महावितरण आणि महापारेषणच्या यंत्रणेचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक भागात तारांसह पोल जमीनदोस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत नदीला आलेल्या पुराचा सामना करतडोंगर दऱ्यांतून अवजड पोलरोहित्रे व इतर अवजड सामग्री खांद्यावर वाहून नेऊन महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी बहुतांश भागाचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे. त्यांच्या या कामगिरीचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी प्रत्यक्ष भेटीत कौतुक केले.

            या दौऱ्यात चिपळूण तालुक्यातील खेर्डीवशिष्ठी नदीपूल परिसर तसेच मुरादपूर येथे सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी वीज कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. तसेच प्रभावित क्षेत्रातील भागात दुरूस्तीसाठी त्वरित साहित्य व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी महावितरण व्यवस्थापनाला दिल्या आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटपही करण्यात आले.

            मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील 1 हजार 942 गावे व शहरातील 9 लाख 60 हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला असून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भर पावसात व पुरात  7 लाख 53 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे. रात्रंदिवस युद्धपातळीवर दुरुस्तीचे कामे सुरू असून लवकरच उर्वरित भागाचा वीज पुरवठा सुरळीत होणार आहे.

            पावसामुळे प्रभावित क्षेत्रातील एकूण 1 हजार 617 गावांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. 14 हजार 737  रोहित्रे बंद पडली असताना 11 हजार 368 रोहित्रे  सुरू करण्यात यश आले आहे. बंद झालेल्या 489 वीज वाहिन्यांपैकी आता 404 वीज वाहिन्या चालू करण्यात आलेल्या आहेत. बंद पडलेल्या 67  वीज उपकेंद्रे व स्वीचिंग केंद्रापैकी 56 केंद्रे ही पूर्ववत करण्यात यश मिळाले आहे. दोन अतिदाब उपकेंद्रापैकी एक उपकेंद्र आता चालू झालेले आहे.

            ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांच्या दौऱ्यात महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमेमहावितरण रत्नागिरी परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकरऊर्जामंत्री यांचे सल्लागार उत्तम झालटेमहापारेषणचे कराड परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल कोलपकोयना जलविद्युत प्रकल्पाचे प्रभारी मुख्य अभियंता राजेश कोलप व महापारेषणच्या अधीक्षक अभियंता शिल्पा कुंभार हे उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi