Thursday, 29 July 2021

 पूरग्रस्तांसोबत भोजन घेत देवेंद्र फडणवीस यांनी जाणून घेतल्या व्यथा

 

मुंबई२८ जुलै

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सातारा जिल्ह्याचा दौरा केला. पूरग्रस्तांसोबत भोजन घेत त्यांनी सर्वांच्या व्यथा जाणून घेतल्या. आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्याचा प्रारंभ त्यांनी आज सातारा जिल्ह्यातून केला. मोरगिरी/आंबेघरशिद्रुकवाडीकोयनानगर तसेच हुंबरळी इत्यादी ठिकाणी त्यांनी भेटी देत स्थितीची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरअतुल भोसलेजयकुमार गोरेनरेंद्र पाटील हे यावेळी उपस्थित होते.

कराड येथून रवाना होण्यापूर्वी कोल्हापूरसांगलीसातारा या तीन पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी महाराष्ट्र भाजयुमोच्या वतीने मदतसामुग्री असलेल्या वाहनांना आज दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा झेंडा दाखवून रवाना केले. या मदतसामुग्रीत तयार अन्नधान्यसामुग्रीपाणीकपडे इत्यादींचा समावेश आहे. मोरगिरी/आंबेघर येथे पाऊस आणि पूर यामुळे संसार उघड्यावर पडलेले आहेत. तात्पुरत्या निवासी शिबिरांमध्ये त्यांना सद्या ठेवण्यात आले आहे. मोरणा विद्यालय मोरगिरी येथे या पूरग्रस्तांना भेटूनत्यांच्यासोबत भोजन करत त्यांच्या व्यथा देवेंद्र फडणवीस यांनी जाणून घेतल्या. आंबेघर येथे दरड कोसळण्याच्या घटनेत सुमारे १५ लोकांचे प्राण गेले. त्यांच्या कुटुंबियांचे फडणवीस यांनी सांत्वन केले आणि त्यांना मदतसामुग्रीचे वाटप सुद्धा केले.

याठिकाणी पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले कीआज याठिकाणी हे लोक शिबिरात राहत असले तरी त्यांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनावर लक्ष केंद्रीत करून ते तातडीने करावे लागेल. सुरक्षित जागा शोधून त्यांना नवीन घरे बांधून द्यावी लागतील. पुनर्वसन करताना त्यांच्याशी सल्लामसलत करावीअशी सूचनाही त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना केली. या नागरिकांना इतर मदतविविध स्त्रोतांमधून पोहोचते आहे. पण पुनर्वसन हेच प्राधान्य असले पाहिजे. यासाठी घरे आणि रोजगार असा साकल्याने विचार करावा लागेल. भविष्यात अशी दुर्घटना होऊ नयेयाची सुद्धा काळजी घेण्याची गरज आहेअसे ते म्हणाले.

यानंतर शिद्रुकवाडी येथे सुद्धा त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. घरशेतीचे नुकसानजनावरे वाहून गेली. त्यामुळे त्यांना आर्थिक सहाय्य तातडीने देण्याची गरज आहेअसे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. येथे सुद्धा त्यांनी मदतसामुग्री वितरित केली. त्यानंतर कोयनानगर येथे स्थलांतरित कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या व्यथा देवेंद्र फडणवीस यांनी ऐकून घेतल्या. कायमस्वरुपी पुनर्वसन हीच मागणी येथे आश्रयाला असलेल्या शिबिरातील नागरिकांनी केली. सुमारे १५० कुटुंबांचा हा प्रश्न आहे. त्यांना सातत्याने अडचणींना तोंड द्यावे लागते आहे. हे नागरिक म्हणतात कीकोणतेही संकट आले की महिनाभर मदत होते. पण पुन्हा समस्या आहे तशाच राहतात. सरदार सरोवर प्रकल्पाच्या धर्तीवर पुनर्वसन व्हावेही त्यांची मागणी आहे. आतातर दरडी कोसळण्यामुळे पुन्हा गावात जाण्याचा मार्गच शिल्लक उरलेला नाहीअसे गावकरी सांगतात. त्यामुळे तात्पुरते निवारे उभारणेत्यासाठी कोयनेचे क्वार्टर्स वापरण्यात यावेतअशा त्यांच्या मागण्या आहेत. हा प्रश्न सुटेपर्यंत आम्ही पाठपुरावा करीत राहूअसे त्यांनी आश्र्वस्त केले.

पाटण तालुक्यातील हुंबरळी येथे सुद्धा अतिवृष्टीग्रस्त भागात पाहणी केली. दरड कोसळण्याने येथे काही घरे उध्वस्त झाली आहेत. लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने मदत दिली पाहिजे. लोकांमध्ये दुःख आहेनिराशा आहे आणि त्यांना अपेक्षा सुद्धा आहेत. आता जागा निश्चित करून युद्धस्तरावर पुनर्वसनाचा विचार केला पाहिजेअसेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

*******

 पूरामुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधितांना

तातडीची मदत करणे सुरु

---

पंचनामे पूर्ण झाल्यानंतर वाढीव मदतीचा प्रस्ताव आणणार

 

            गेल्या काही दिवसांपासून राज्यात विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे नैसर्गिक आपत्ती आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी निर्देश दिल्याप्रमाणे तातडीची मदत म्हणून एसडीआरएफ (राज्य आपत्ती प्रतिसाद निधी) मधील निकषांप्रमाणे बाधितांना मदत सुरु करण्यात आली असून या संदर्भात आज राज्यमंत्रिमंडळासमोर मदत व पुनर्वसन विभागाने सादरीकरण केले.

            पूरग्रस्त भागातील बहुतांश ठिकाणी अद्याप पाणी ओसरले नसल्याने व बाधितांचे पंचनामे सुरु असल्याने पुढील पंधरा दिवसांत वाढीव मदतीबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीसमोर आणावा असे यावेळी ठरले.

            सध्या बाधित कुटुंबांना त्यांच्या घरातील साहित्यकपडेभांडी यांच्या नुकसानीसाठी एसडीआऱएफच्या निकषाप्रमाणे तत्काळ मदत करणे सुरु आहेअशी माहिती बैठकीत देण्यात आली.

-----०-----

Wednesday, 28 July 2021

 राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण

सदस्य पदावरुन राजकुमार ढाकणे यांना काढले

 

            मुंबईदि. 28 : राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण सदस्य पदावर राजकुमार भुजंगराव ढाकणे यांची नियुक्ती नागरी समाजातील मान्यवर व्यक्ती या वर्गात करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याबाबतचा अहवाल पोलीस महासंचालकांनी सादर केला.

            सदरील अहवालाचा विचार करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 22 प तसेच महाराष्ट्र जनरल क्लॉजेस ॲक्ट (1904 चा 1) च्या कलम 19 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार शासनाने त्यांना या पदावरुन काढून टाकले आहे. याबाबतची अधिसूचना गृहविभागाने निर्गमित केली आहे.

००००

 भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील

पदविका अभ्यासक्रमासासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. 28 : केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2021-22 या शैक्षणिक सत्राकरीता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्रासाठी प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रमधील विद्यार्थ्यांसाठी बरगढ (ओडिशा) मध्ये 13 व वेंकटगिरी करीता 2 जागा उपलब्ध आहेत. या जागेवर प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी प्रादेशिक उप आयुक्तवस्त्रोद्योगनागपूर / सोलापूर / मुंबई / औरंगाबाद यांचे मार्फत विहित नमुन्यात दि. 20 ऑगस्ट 2021 पर्यंत प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

            त्याअनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी याबाबतचे आपले अर्ज संबंधीत प्रादेशिक उप आयुक्तवस्त्रोद्योग यांच्याकडे सादर करावा. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या http.www.dirtexmah.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उप आयुक्तवस्त्रोद्योग यांच्या कार्यालयात देखील उपलब्ध आहेअसे वस्त्रोद्योग आयुक्त, महाराष्ट्र राज्य श्रीमती शीतल तेली - उगले यांनी कळविले आहे.

0000


 ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत 29 जुलै रोजी चिपळूण दौऱ्यावर;

वीज यंत्रणेच्या दुरुस्तीचा आढावा घेणार

 

            मुंबईदि. 28 : अतिवृष्टीमुळे महावितरण व महापारेषणच्या कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील वीज यंत्रणेचे अतोनात नुकसान झाले असून चिपळूण (जि. रत्नागिरी) येथील नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे दि. 29 जुलै रोजी या परिसराचा दौरा करणार आहेत.

            मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील १९२७ गावे व शहरातील ९ लाख ६० हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला असून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भर पावसात व पुरात साडेसहा लाख ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे. रात्रंदिवस युद्धपातळीवर दुरुस्तीचे कामे सुरू असून लवकरच उर्वरित भागाचा वीज पुरवठा सुरळीत होणार आहे.

            पावसामुळे प्रभावित क्षेत्रातील एकूण १४ हजार ७३७  रोहित्रे बंद पडली असताना ९ हजार २६२ रोहित्रे  सुरू करण्यात यश आले आहे. बंद झालेल्या ४७४ वीज वाहिन्यांपैकी आता २६८ वीज वाहिन्या चालू करण्यात आलेल्या आहेत. बंद पडलेल्या 67 वीज उपकेंद्रे व स्वीचिंग केंद्रापैकी ४४ केंद्रे ही पूर्ववत करण्यात यश मिळाले आहे. दोन अतिदाब उपकेंद्रापैकी एक उपकेंद्र आता चालू झाले आहे.

            चिपळूण येथे पुरामुळे नागरिकांचे तसेच महावितरण आणि महापारेषणच्या यंत्रणेचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक भागात तारांसह पोल जमीनदोस्त झाले. अशा परिस्थितीतही नदीला आलेल्या पुराचा धीरोदात्तपणे सामना करतडोंगरदऱ्यांतून अवजड पोलरोहित्रे व इतर अवजड सामग्री खांद्यावर वाहून नेऊन महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी बहुतांश भागाचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे. याबद्दल त्यांच्या कामगिरीचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

            डॉ. राऊत हे दौऱ्यात चिपळूण तालुक्यातील खेर्डीवशिष्ठी नदीपूल परिसर तसेच  मुरादपूर या प्रत्यक्ष काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन वीज कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार असून त्यांच्या अडचणीही जाणून घेणार आहे. तसेच प्रभावित क्षेत्रातील भागात दुरूस्तीसाठी त्वरित साहित्य व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी महावितरण व्यवस्थापनाला दिल्या आहेत. या दौऱ्यात ते पूरग्रस्त गरजवंताना जीवनावश्यक साहित्याचे वाटपही करणार आहेत. याशिवाय माध्यम प्रतिनिधींशीही संवाद साधणार आहेत.

 [28/07, 18:53] Baby: *सेवा-निवृत्ती शाप की वरदान!* 

    

*वाचा मात्र जरूर* 


*ह्रदय पिळवटून टाकणारी कथा !!*

*जगात सर्वात लक्ष न देण्याजोगा प्राणी म्हणजे रिटायर्ड माणूस!*


        ठरल्याप्रमाणे, म्हणजे अगदी सटवाईनं लिहून ठेवल्याप्रमाणे 58 व्या वर्षी तो रिटायर्ड झाला आणि त्याचं जगच बदललं.


        नोकरीत असतांना त्याची एक ठराविक दिनचर्या होती. सकाळी साडे नऊला तो घराबाहेर पडायचा. अत्यंत प्रामाणिकपणे ऑफिसच्या वेळांत नेमून दिलेलं काम आटपायचा. भाजी, किराणा सामान घेत, भेटलेल्या कुणाशी चर्चा करून रमत गमत घरी परतायला त्याला संध्याकाळचे सात वाजत आल्यावर जेवण, शतपावली वगैरे झालं की पलंगावर पडल्या बरोबर त्याचे डोळे मिटायला लागत. 


*ऑफिसात सगळा स्टाफ त्याच्या वर खुश असायचा. त्याचा हसरा चेहरा बघायची संवय झालेले त्याचे सहकारी त्याच्या रिटायर्डमेंटच्या सभारंभाला खूप हळहळले, पण सरकारी नियमांपुढे सर्वांचाच नाईलाज होता.*


एरवी त्याचे दिवसभराचे कार्यक्रम इतके साचेबध्द होते की ,सुटीच्या दिवशी घरांत त्याचा जीव घाबरायला लागायचा. दुपार खायला उठायची आणि करायला काहीच नाही म्हटल्यावर त्याचे पाय बायकोच्या हक्काच्या स्वैंपाकघराकडे वळायचे. मग ही बरणी उघड, तो डबा उचक, असे त्याचे उद्योग दुपारभर चालायचे. वामकुक्षी आटोपून बायको उठली की तिला विस्कटलेलं स्वैंपाकघर दिसे. आणि तिचा संताप होई. सुटीचा एक दिवसही हा माणूस घरांत नको, असं तिला वाटायला लागे. 


त्यालाही अपराध्यासारखं होत असे, जितके व्यवस्थित आपण ऑफिसात असतो., तेवढं घरी रहाणं जमत नाही ,ही खंत त्याला पुढील आठवडाभर त्रास देई.


रिटायर्ड झाल्यापासून तो कायम घरांतच असायचा. तिला मात्र याचा त्रास व्हायचा. तिच्या हौशीचे दिवस कधीच सारून गेले होते आणि जेंव्हा हौस करायची वेळ होती ,तेंव्हा हा सतत ऑफिसचं तुणतुणं वाजवायचा, हे ती विसरली नव्हती, किंबहुना तिच्या मनांत याचा सुप्तसा रागही असावा.


*गरजेपुरता पैसा घरांत येत असला की माणसांचं ओझं व्हायला लागतं.* वर्षानुवर्षाच्या त्याच्या संवयी तिला आता त्रासदायक होऊ लागल्या, त्याच्याबद्दलच्या तिच्या तक्रारी वाढू लागल्या. त्याने स्नान केल्यावर ओला टॉवेल पलंगावर फेकायची त्याला संवय होती, तो ऑफिसात जायचा तेंव्हा ती कर्तव्य म्हणून तो ओला टॉवेल उचलून धुवायला घेत असे ,पण आता त्याला ‘भरपूर वेळ असल्यानं असली कामं त्यानेच आपणहून करायला हवीत’ असा तिचा आग्रह होता.


*हा आग्रह त्याला मान्यही होता, मात्र तिने सूचना चांगल्या शब्दांत द्याव्या, असा त्याचा सूर होता. तिच्या स्वभावामुळे कदाचित, तिला त्याची ही गोड बोलण्याची अपेक्षा पूर्ण करणं जमत नव्हतं.*


तो रिटायर्ड होऊन आरामाचं आयुष्य जगतोय आणि आपल्याला मरेपर्यंत रिटायर्ड होता येणार नाही ,ही जाणीव तिला बोचत असावी. 


खरं तर तिचंही वय उताराला लागलं होतं आणि व्याप वाढत असल्याने तिची आता दमछाक होऊ लागली होती. मुलांची लग्न, *सुनेशी जमवून घेतांना होत असलेली तारांबळ,* तो घरीच असल्याने त्याचेकडे येणारी माणसं, आणि हे कमी का काय म्हणून चोवीस तास समोर वावरत असलेला, पण घरकामाला  काडीचा हातभार न लावणारा तीचा हा स्थितप्रज्ञ नवरा. 


तो समोर नसला की, त्याच्याबद्दलच्या असूयेनं आणि समोर असला की त्याचं तोंड बघूनच तिचं रक्त उसळायला लागायचं. तो पाणी प्यायला जरी स्वैंपाकघरात शिरला तरी ‘तू मुद्दाम माझ्या मध्ये मध्ये लुडबुड करतोस’ म्हणत ती त्याला झिडकारायची. 


*हळूहळू तिला तो डोळ्यासमोरही नकोसा होऊ लागला.* आणि त्या दिवशी ती प्रचंड चिडली. कारण काय होतं कुणालाच कळलं नाही, तिलाही. पण इतक्या दिवसांचा मनांत साचलेल्या रागाचा स्फोट झाला आणि तिने त्याच्यावर खूप आरडा ओरडा केला. त्याला अद्वा तद्वा बोलली, थेट त्याच्या आई वडिलांचा, बहीण भावांचा उद्धार केला. तो हादरला, पण रिअॅक्ट करण्याचा त्याचा स्वभाव नव्हता. तो तिला चिडायची कारणं विचारत राहिला. आणि ती प्रत्येक वेळी सांगत राहिली, *‘तू मला आता डोळ्यासमोर नकोस, बस्!*


त्याने ऐकलं आणि निराश होत विचारलं! *‘आयुष्याच्या या स्टेजवर आता मी कुठे जाऊ?’* तिला वाटलं हा चिडवतोय, ती मग आणखीनच चिडली. हातवारे करत किंचाळली! *‘कुठेही जा. मेलास तर फारच बरं होईल, माझी सुटका तरी होईल.’* हे ऐकून हा एकदमच शांत झाला. तश्याही परिस्थितीत म्हणाला, *‘ते माझ्या हातात नाही, पण तुझा शाप माझ्या आतपर्यंत पोहोचला. तू मात्र खूप जग, माझं उरलेलं आयुष्य तुला मिळू दे. शतायुषी हो!* 


हे असं वारंवार होऊ लागलं. अगदी चिमुटभर कारणा साठीही ती त्याला मरणाचा शाप द्यायची आणि मोबदल्यात तो तिला शतायुषी होण्याचा आशीर्वाद द्यायचा. 

तिच्या मनांत तसं काही नसायचं. त्याने खरंच त्यांच्या संसारातून, या जगातून कायमचं निघून जावं असं तिला वाटणं शक्यच नव्हतं. शेवटी तिनेही त्याचेबरोबर पस्तीस छत्तीस वर्ष संसार केला होता, त्याने बांधलेलं मंगळसूत्र तिने सन्मानाने मिरवलं होतं, वर्षानुवर्षे त्याचं आयुष्य वाढावं म्हणून वड पुजले होते, हरताळकेचे कडकडीत उपास घातले होते, त्याचा मृत्यू मागण्या इतकी ती खचितच दुष्ट नव्हती. 


पण तिच्यासमोरचा त्याचा सतत होणारा वावर जाणवला की तिची विचार शक्ती संपूर्णपणे नष्ट व्हायची, मेंदू अक्षरशः पेट घ्यायचा आणि तिच्या तोंडातून नको ते शब्द बाहेर पडायचे *आणि एक दिवस अचानकच तो गेला.* सकाळी उठून त्याने चहा घेतला, लांब फिरून आला आणि ‘थकवा वाटतोय’ म्हणत सोफ्यावर आडवा झाला तो उठलाच नाही.


घरांत धावपळ झाली, डॉक्टर आले, त्यांनी तपासलं आणि त्यांच्या प्रथेनुसार इंग्रजीत *‘सॉरी, ही इज नो मोअर’* सांगितलं. एकच हलकल्लोळ झाला.


तो मात्र त्याच्या स्वभावा प्रमाणेच एकदम शांत पहुडला होता. प्रत्येकजण त्याच्या वेदनारहित मृत्यूचा हेवा करीत होते. ‘Before Time असं मरण नको होतं ,असा प्रत्येकाचाच सूर होता.


तिच्यासाठी मात्र लोक खूपच हळहळले ‘आता कुठे सुखाचे दिवस आले होते, नवऱ्याचा पूर्णकाळ सहवास लाभला होता ,तर ही वेळ आली’ असे लोक म्हणत होते . आकाशाकडे बोट दाखवून, ‘त्याच्या इच्छेपुढे कुणाचं काय चालतयं का ?वगैरे बोलून तिचं औपचारिक सांत्वन करून लोक त्यांच्या निघून गेले. 


*आता ती एकटी राहिली. प्रेम, राग, विरोध, काळजी या मनातील भावना व्यक्त करायला हक्काचं कुणी उरलं नाही.* तसं मुलं, सुना लक्ष द्यायचे तिच्याकडे, पण त्यांना त्यांचाही संसार होता.


तिनं देवळं धुंडाळली, मित्र मैत्रिणी झाले, *काही काळ माहेरच्यांचं कौतुक झालं, मग मात्र सारेच आपोआप दूर झाले.*


असेच दिवस जाऊ लागले, महिने गेले, वर्षे सरली. मुलांनी थाटात तिचा पंच्याहत्तरावा वाढदिवस साजरा केला. *पण ‘सतत तुझंच कौतुक कसं  करायचं ?’ म्हणत मग त्यांनीही अंतर राखायला सुरुवात केली.*


नातू, नात लहान होते तोवर तिचे होते, मोठे झाल्यावर त्यांचं जग विस्तारलं, आजीचा पदरही न सोडणारी बाळं तिनं चारदा आवाज दिल्यानंतर एकदाच ‘काय आहे आजी?’ असं चिडक्या स्वरांत विचारू लागले. 

तिला हे त्रासदायक व्हायचं, नेमका तेंव्हाच, नवऱ्याशी केलेला व्यवहार आठवायचा, पण *‘काळाला मागे नेऊन चूक सुधारता येत नाही’* हे ठाऊक असल्याने, तिला नेमून दिलेल्या जागी पडलेला चेहरा घेऊन ती बसून रहायची. 


तिच्या वयाचा आकडा वरवर जात राहिला, कार्यक्षमता मात्र दर दिवसाला कमी होत गेली. आता मात्र ती प्रचंड थकली, हातपाय चालणं कठीण झालं, वेळ काढणं जड जाऊ लागलं. 'तुझी  उपयोगिता संपायला आलीय' याची जाणीव लोक आडून पाडून  तीला करून देऊ लागले आणि *नकळत ती मरणाची वाट बघायला लागली.*


एव्हाना पन्नाशी ओलांडलेले मुलगा आणि सूनही थकायला लागले होते. त्यांनाही त्यांचे जावई सुना आल्या होत्या आणि नवी सून तिच्याच सासूचं काही करेना, तिच्याकडून आजेसासू साठी काही अपेक्षा करणं तर फारच कठीण होतं. 


ती रोज आतल्या आत रडायची. ‘देवा, उचल मला’ म्हणून प्रार्थना करायची. *‘भोग भोगायला मला एकटीला अश्या परिस्थितीत सोडून तो सुखासुखी निघून गेला’* म्हणत मनातल्या मनांत त्याला दुषणं देत पडून रहायची. 


*फारसं आठवायचं नाही तिला काही आज काल. मात्र तिने दिलेले शाप आणि त्याने दिलेले आशीर्वाद, प्रयत्न करूनही तिच्या स्मृतीतून निघत नव्हते....!*


*‘मेलास तर फारच बरं होईल, माझी सुटका होईल.’ हा तिनं त्याला दिलेला शाप होता की आशीर्वाद होता! ‘तू मात्र खूप जग, शतायुषी हो,’ हा त्याने तिला दिलेला आशीर्वाद होता का शाप होता की आशीर्वाद ? हे मात्र तिला तिचंच कळत नव्हतं....*


*मित्रांनो!*

*आपलेही बरेच मित्र सेवेतून निवृत्त झाले आहेत व काही निवृत्ती'च्या उबंरठ्यावर आहेत. एकमेकांना खूप जीव लावा आणि उर्वरित आयुष्य सुखाने जगा.*


*सदरचा लेख कुणी लिहिला ,* *माहित नाही.*  


*मात्र लेखकाने लिहीलेले प्रसंग कुणाच्या तरी आयुष्यात घडून गेलेले असावेत, असे जरी ग्रहित धरले तरी देखील, सदरची घटना सहजासहजी  मान्य करावयास कुणाचेही मन तयार होणार नाही हे निश्चित. मात्र अशाही घटना कुणाच्या आयुष्यात सेवा निवृत्ती नंतर जर घडत असेल, तर हे फारच भयानक व ह्रदयद्रावक चित्र आहे.*


  *जगात सर्वात लक्ष न देण्याजोगा प्राणी म्हणजे रिटायर्ड माणूस"*--- 

        


*हा लेख  रिटायर्ड व्यक्तींनी जरुर जरुर वाचावा.*

[28/07, 18:54] Baby: तुमचा नवरा तुम्हाला आनंदी ठेवतो का ??? एका स्त्री चे अफलातून उत्तर !!!

एकदा एका वक्त्याने श्रोत्यांमधील एका महिलेला विचारले ,

” तुमचा नवरा,

तुम्हांला आनंदात ठेवतो का ? ”


तिच्या शेजारी बसलेल्या पतीच्या चेहऱ्यावर हसू उमटले . तो आत्मविश्वासाने पत्नीकडे बघू लागला . त्याला पूर्ण खात्री होती , की ती ” होच ” असंच म्हणेल . कारण तिने लग्न झाल्यापासून कधीच काहीही तक्रार केलेली नव्हती …. !!


पण त्याच्या बायकोने स्पष्ट आवाजात उत्तर दिलं , ” नाही ”

ती म्हणाली , ” माझा नवरा, नाही ठेवत मला आनंदात !! ”


वक्त्याने विचारले,

” म्हणजे काय, ते तुम्हाला बाहेर फिरायला, हॉटेलमध्ये जेवायला नाही नेत का ?… कधीतरी सरप्राईज, एखादी भेटवस्तू देऊन आनंदात, नाही ठेवत का ?


तिच्या पतीला हे अनपेक्षित होतं. कारण इतकी वर्षे, हे सर्व तो तर, कुवतीप्रमाणे आणि योग्य त्या त्या वेळी करत आला होता. त्याला कळजीने घाम फुटला.


तेवढ्यात त्याची पत्नी पुढे म्हणाली , ” मला माझ्या नवऱ्याने आनंदात ठेवले नाही , मी स्वत:च आनंदात राहते ….!! ”


” मी आनंदी असावं की नाही याच्याशी, त्याचा काहीच संबंध नाही . माझा आनंद पूर्णपणे माझ्यावरच अवलंबून आहे . ”


“कुठल्याही परिस्थितीत, आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी मी आनंदीच राहते . जर माझा आनंद, कुणा दुसऱ्यावर , एखाद्या वस्तूवर किंवा विशिष्ट परिस्थितीवर अवलंबून राहिला, तर ते माझ्यासाठीच कठीण होऊन बसेल .”


” कारण आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सतत बदलत असते .… !! माणसं , संबंध , आपलं शरीर , हवामान , आपले ऑफिसातले बॉस , सहकारी मित्र ,आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य .… !! ही यादी न संपणारी आहे .”


” त्यामुळे काहीही झालं तरी आपण आनंदी राहायचं हे मीच ठरवायला हवं ना …. ? माझ्याकडे खूप काही असलं काय किंवा काहीच नसलं काय , मी आनंदीच असते …. !! ”


” मला कुठे बाहेर जायला मिळालं काय किंवा घरात बसून राहावं लागलं काय , मी आनंदीच राहीन …. !! ”


मी श्रीमंत असले काय किंवा गरीब राहिले काय , मी आनंदीच असेन… !!”


आणि अजून एक, आम्ही दोघांनी प्रेमाने एकमेकांना स्वीकारलं आहे, त्यामुळे असले व्यवहार आम्ही कधीच आमच्यामधे नाही आणले. कारण जर का ह्यांनी बाहेर जेवायला नेले, फिरायला घेऊन गेले किंवा एखादा दागिना आणला, म्हणून जर का मी आनंदी होत असेल… तर हे काही ठिक नाही. हा शुद्ध एक जर-तरचा व्यवहार होईल. त्यात प्रेम नसेल. मी नेहमी आनंदी राहुन, त्यांना आनंदी ठेवणे हेच एका आदर्श पत्नीचे कर्तव्य आहे. असं केल्याने त्यांची कामातील उर्जा वाढेल, त्यांची प्रगती होईल आरोग्य उत्तम राहील, हे सर्व काही माझ्या आनंदी राहण्यावर अवलंबून असेल, तर मी का नाही आनंदी राहायचं…


माझं लग्न झालेलं असलं तरी लग्ना आधीही मी आनंदीच होते …. !!

कारण मी आनंदी आहे ती माझ्या स्वत:मुळे… !!”


” माझं जगणं दुसऱ्या कुणापेक्षा तरी जास्त चांगलं आहे, म्हणून मी आयुष्यावर प्रेम करते असं नाही , तर आनंदात राहायचं, हे मी स्वत:च ठरवलं असल्यामुळे मी आनंदी आहे …!! ”


” माझ्या आनंदाची संपूर्ण जबाबदारी मीच स्वतः वर घेतली असल्यामुळे माझ्याबरोबर जगणाऱ्या कुणालाही मला आनंदी ठेवण्याचं ओझं बाळगावं लागत नाही . त्यामुळे माझ्याशी बोलताना , वागताना त्यांना अतिशय मोकळेपणा जाणवतो …!! ”


आणि यामुळेच मी इतकी वर्ष आनंदात संसार करू शकले . तुमचा आनंद कधीही दुसऱ्या कुणाच्या हाती जाऊ देऊ नका …!! ”


वातावरण चांगलं नसलं तरी, आनंदी राहा … !! आजारी असलात तरी, आनंदी राहा . !! कठीण परिस्थितीत , पैसे नसले तरी, आनंदी राहा … !! कुणी तुम्हांला दुखावलं , कुणी तुमच्यावर प्रेम करत नसलं , अगदी तुम्ही किती मौल्यवान आहात हे ठरवू शकत नसलात , तरी आनंदी राहा … !!


तुम्ही स्त्री , पुरुष कुणीही , कितीही वयाचे असा … !! असाच विचार करायला हवा … !! नाही का …. ?


आनंदी राहा… आनंदात जगा …!!

[28/07, 19:09] Baby: .      🌀 *|| गंभीर बनू नका ||*🌀

♻️ फार गंभीर बनून जगू नका. हे विश्वकरोडों वर्षापासून आहे. कित्येक आले आणि गेले. कुणावाचून कुणाचे काही थांबत नाही. जे व्हायचे ते होत राहणार आहे. तुम्हाला विचारुन काही घडणार नाही.


♻️ या जगात आपले काहीच नसते, त्यामुळे काही गमावल्याचे दुःख करु नका. मी अमूक ,मी तमूक असा अंहकार बाळगू नका. सर्वांशी प्रेमाने रहा.


♻️धर्म, जात,तत्व , या गोष्टी माणसाने निर्माण केल्या आहेत, त्यामध्ये अडकून पडू नका..स्वतःचा भरवसा नसतांना इतरांना संपवण्याची भाषा बोलू नका.


♻️इतिहासातील कुरापती काढून वर्तमान खराब करु नका. त्यांचे जीवन ते जगले. तुम्ही तुमचे जीवन जगा व इतरांना जगू द्या.


♻️आता काळ बदलला आहे. आपली खरी गरज काय आहे,ओळखा! उगीच फालतू गोष्टीत नाक खुपसू नका.


♻️हजारों प्रकारचे संकट घोंघावत असतांना, क्षुल्लक गोष्टींने विचलित होऊ नका. जीवन गंमतीने जगा!


♻️जरा मोकळे पणाने हसा. इतरांनाही आनंदी करा. लक्षात ठेवा तुमच्या गंभीरपणाने कुणाचेही भले होणार नाही. साऱ्या जगाचा विचार करू नका. नसती चिंता करु नका.


♻️लहान सहान गोष्टींचा आनंद घ्या. सतत गंभीर बनू नका. इतरांशी मोकळेपणाने बोला. त्यामध्ये

कमीपणा मानू नका. तुम्ही स्वतः ला काही ही समजले तरी निसर्गाच्या पुढे तुम्ही फक्त एक जीव आहात.

कुणाचाही द्वेष करु नका. सूडबुद्धीने वागू नका.


♻️आपल्या अवतीभोवतीचे जग बघा. किती गंमत आहे चोहीकडे. मुंग्याची रांग बघा. पाखरांचे थवे बघा. बघा कावळ्याची स्वच्छता. खळखळणारा समुद्र तुमच्या सोबतीला आहे. त्याच्या उसळणाऱ्या लाटा तुम्हाला खुणावत आहेत.


♻️ जा उंच डोंगरावर! किती प्रेमाने तो डोंगर खांद्यावर खेळवतो. विचारा त्या कोकीळेला, इतकी सुंदर कशी गातेस?

विविध रंगाची फूले बघा. आयुष्यात विविध रंग भरा. एकसारखे जीवन जगू नका.


♻️नवी ठिकाणे, नवी माणसे यांच्याशी मैत्री करा. प्राण्यांशी संपर्क ठेवा, त्यांचे जगणे बघा. कटकटी कमी करा. अधिक आनंदी जगा! 


🌀आनंदाने..... जगण्यासाठी सर्वांना..... मनमोकळ्या 

*आभाळ भरुन शुभेच्छा!*.🌀                                                    

 🌹🙏 *🙏🌹

 जगविख्यात बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांना

क्रीडा मंत्री सुनील केदार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

 

            मुंबई, दि. 28 : बॅडमिंटनला राजमान्यता-लोकमान्यता मिळवून देणारे आणि बॅडमिंटनमध्ये 1956 मध्ये भारताला पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद मिळवून देणारेपदकांची शंभरी गाठलेल्या नंदू नाटेकर यांची खेळाप्रतीची निष्ठा-सर्वस्व भावना नेहमी स्मरणात राहील अशा शब्दात क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी जगविख्यात बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

            महाराष्ट्राचे सुपुत्र आणि बॅडमिंटन क्षेत्रात भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे अर्जुन पुरस्कार विजेते माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे भारतीय क्रीडाविश्वात वेगळे स्थान असूनत्यांचे यश कित्येक खेळाडूंना प्रेरणा देणारे आहे.

            माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांच्या निधनाने क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे.

            बहारदार खेळाबद्दल त्यांना सहा राष्ट्रीय पदके देखील मिळाली होती. त्यांनी वयाच्या 20 व्या वर्षी म्हणजेच 1953 मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले.

            त्यांनी आपल्या बहारदार खेळाने बॅटमिंनट रसिकांना आनंद दिला. 1980 आणि 1981 मध्ये दुहेरी पदक जिंकले. 1651 ते 1963 दरम्यान झालेल्या 16 एकेरी सामन्यांपैकी 12 आणि डबल्समध्ये 16 पैकी 8 त्यांनी जिंकले. थॉमस चषक स्पर्धेत ते भारतीय संघाचे सदस्य होते. नंदू नाटेकरांचे भारतीय क्रीडाविश्वात वेगळे स्थान असून त्यांचे यश कित्येक खेळाडूंना प्रेरणा देणारे आहे, अशा शब्दांत श्री.केदार यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

*****

Featured post

Lakshvedhi