Tuesday, 31 January 2023

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” गीताला महाराष्ट्र राज्यगीताचा दर्जा

 जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” गीताला महाराष्ट्र राज्यगीताचा दर्जा


            कविवर्य राजा निळकंठ बढे यांच्या “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीतामधील दोन चरणांचे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. हे गीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून अंगीकारण्यात येणार आहे. या राज्यगीतासाठी औचित्यपालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देखील तयार करण्यात आल्या आहेत. 


            महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर अद्यापपर्यंत शासनामार्फत राज्यगीत तयार करण्यात आले नाही अथवा अधिकृतपणे कोणत्याही गीतास राज्यगीताचा दर्जा देण्यात आला नाही. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून, राज्याचे अधिकृत राज्यगीत असावे यासाठी जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" या कविवर्य राजा नीळकंठ बढे यांच्या गीतामधील दोन चरणांचे गीत "महाराष्ट्राचे राज्यगीत" म्हणून स्वीकारण्यात आले आहे. हे राज्यगीत १.४१ मिनिट अवधीचे आहे.


महाराष्ट्राचे राज्यगीत असे आहे :-

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥


भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा


सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा


जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी

पोलादी मनगटे खेळती, खेळ जीव घेणी


दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला


दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा


जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥


राज्यगीत गायन, वादना संदर्भातील औचित्याचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे आहेत :-


• विचारार्थ राज्यगीत अंगीकारण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरीही, राष्ट्रगीताचा मान, सन्मान व प्रतिष्ठा सर्वोच्च राहील.


• शासनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमात सुरुवातीस राज्यगीताचे गायन वादन हे ध्वनीमुद्रीत आवृत्तीसोबत अथवा स्वतंत्रपणे करण्यात यावे.


• १ मे, महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत होताच राज्यगीत वाजविले / गायले जाईल.


• राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरु होण्यापूर्वी, परिपाठ / प्रतिज्ञा /प्रार्थना / राष्ट्रगीत यासोबत राज्यगीत वाजविले/गायले जाईल.


• राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, सर्व प्रकारच्या अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, खासगी आस्थापना तसेच सर्व नागरिकांना सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम इत्यादी मध्ये राज्यगीताचा योग्य तो सन्मान राखून ते वाजविण्यास / गाण्यास मुभा राहील.


• राज्यगीत सुरु असताना सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहावे व राज्य गीताचा सन्मान करावा. लहान बालके, गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती तसेच वृध्द व्यक्ती याना सावधान उभे राहण्यापासून सूट असेल.


• राष्ट्रगीताबाबतीत जसे तारतम्य बाळगण्यात येते तसेच ते राज्यगीताच्या बाबतीत सुध्दा बाळगण्यात यावे. हे गीत वाजविताना/ गाताना त्याचा योग्य तो सन्मान राखण्यात यावा.


• वाद्यसंगीतावर आधारीत या गीताची वाद्यधून पोलीस बँडमार्फत वाजविता येईल.


राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकामध्ये या राज्यगीताचा समावेश पुढील शैक्षणिक वर्षापासून करण्यात यावा.


• या राज्यगीताच्या प्रभावी प्रचार व प्रसिध्दीसाठी सर्व विभागांनी आपल्या अधिनस्त 

नीरा-देवघर प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता

 नीरा-देवघर प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता


देशातील पहिला कॅनाल जोड प्रकल्प साकारणार, केंद्राकडेही निधीसाठी प्रस्ताव


माढा लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अनेक निर्णय.

            मुंबई, दि. 31 : नीरा-देवघर प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पातून बंदिस्त जलवाहिनीतून पाणीपुरवठ्याचे नियोजन निश्चित यशस्वी होईल. उर्वरित निधीकरीता केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करण्यात येईल. यामुळे माळशिरस तालुक्यातील दुष्काळी 22 गावांना पाणी मिळणार आहे. याबरोबरच फलटण आणि माळशिरस तालुक्यातील सुमारे 24 हजार 520 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या सर्व कामांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


            लोकसभेच्या माढा मतदारसंघातील प्रलंबित उपसा सिंचन योजना, महावितरण कंपनीसंबंधित विविध कामे यासह विविध योजनांची आढावा बैठक आज उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शहाजी पाटील, जयकुमार गोरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले आदी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प दुष्काळी तालुक्यांसाठी महत्वपूर्ण आहे. त्यासाठी जागतिक बँक अर्थसहाय करणार आहे.

महाराष्ट्र मिलेट मिशनचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

 महाराष्ट्र मिलेट मिशनचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

महाराष्ट्र मिलेट मिशनसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद

शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी ‘मिलेट मिशन’ महत्वाचे पाऊल


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई, दि. 31 : राज्यातील पौष्ट‍िक तृणधान्य उत्पादन क्षेत्रवाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आणि त्या उत्पादनांना योग्य हमीभाव मिळेल, यासाठी राज्य शासन आग्रही आहे. त्यामुळे महाराष्ट्र मिलेट मिशनसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात या तृणधान्य प्रक्रिया उद्योगांना अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया, मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना, स्मार्ट प्रकल्प यांची सांगड घालून शेतकरी उत्पादक कंपन्यांना अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. जेणेकरून या पिकांचे उत्पादन आणि त्यांची विक्री यांची मूल्यसाखळी विकसित होईल आणि शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी हे मिशन महत्वाचे पाऊल ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


            मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे आज महाराष्ट्र मिलेट मिशनचा प्रारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. कृषी मंत्री अब्दुल सत्तार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार सर्वश्री भरत गोगावले, आशिष जयस्वाल, प्रकाश सुर्वे, अण्णा बनसोडे कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त सुनील चव्हाण आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. तृणधान्य पूजन आणि तृणधान्यापासून बनवलेला केक कापून या मिलेट मिशनचा प्रारंभ करण्यात आला.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, कृषी प्रधान म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कुटकी ही पीके घेतली जात होती, आजही ती घेण्यात येतात. या पिकांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्ट‍िक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे कऱण्याचा निर्णय घेतला आहे. कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.


            पिकांमध्ये विविधता आणण्याचे राज्य शासनाचे धोरण असून त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्याची हमी मिळेल, असा विश्वास व्यक्त करुन मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी या पिकांसाठी आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणे हे मोठे वरदान ठरणार आहे. एकप्रकारे हा शेतकऱ्यांचा सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


            या महाराष्ट्र मिलेट मिशनमुळे नवी पिढी जंकफूडकडून पारंपरिक तृणधान्याद्वारे बनविलेल्या पदार्थांकडे निश्चितपणे वळेल. शेतकऱ्यांच्या उत्पादनालाही चांगला भाव मिळेल. शासनस्तरावरुन या पिकांच्या क्षेत्रवाढीसाठी, उत्पादन वाढीसाठी या पिकांच्या किमान आधारभूत किंमतीतही राज्य शासनाने मोठी वाढ केली आहे. ज्वारीसाठी 73 टक्के, बाजरी साठी 65 टक्के आणि नाचणीसाठी 88 टक्के इतकी ही वाढ असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. 


            याशिवाय स्मार्ट या प्रकल्पांतर्गत सोलापूर येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट, हैदराबादच्या सहकार्याने “सेंटर ऑफ एक्सलन्स”ची स्थापना करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या सहा महिन्यात शेतकऱ्यांच्या हिताचे विविध निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली. धानासाठी हेक्टरी 15 हजार रुपयांचा बोनस, हिंगोलीत बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र, लिंबूवर्गीय फळपिकांसाठी चार सिट्रीस इस्टेटपैकी एक पैठण येथे स्थापन करण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार अभियान २.० आपण राबवित असून इतर राज्ये महाराष्ट्राचे अनुकरण करीत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            कृषी मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, या वर्षात व्यापक अशी योजना यासाठी बनवली आहे. पौष्टिक तृणधान्य उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. भरड धान्याला विविध पदार्थात वापर करून याचे महत्व वाढवण्याचा प्रयत्न आगामी काळात विविध उपक्रमांच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यासाठी मूल्यसाखळी विकसित करण्यात येईल, असे ते म्हणाले.


            प्रास्ताविक कृषी सचिव श्री. डवले यांनी केले. यावेळी त्यांनी तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांचे स्टॉल्स याठिकाणी लावल्याचे सांगितले.आभार कृषि आयुक्त श्री. चव्हाण यांनी मानले.


शेतकरी मासिक, महाराष्ट्र मिलेट मिशन पुस्तिका आणि


पोस्टरचे प्रकाशन आणि संकेतस्थळाचे अनावरण


            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते शेतकरी मासिक पौष्टीक तृणधान्य विशेषांक, महाराष्ट्र मिलेट मिशन पुस्तिका आणि महाराष्ट्र मिलेट मिशन पोस्टरचे प्रकाशन तसेच महाराष्ट्र मिलेट मिशन संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. शेतकरी मासिकात आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष -2023 च्या अनुषंगाने राज्यात पिकविण्यात येणाऱ्या मुख्य व लघु पौष्ट‍िक तृणधान्य पिकाच्या लागवड तंत्रज्ञान, प्रक्रिया, आहारातील महत्व व त्यांचा लोकांच्या आहारात वापर वाढ करण्याच्या अनुषंगाने माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र मिलेट मिशन अंतर्गत राबवावयाच्या विविध योजनांची माहिती पोस्टरमध्ये समाविष्ट आहे. याशिवाय, कृषी विभागाच्या वतीने राज्यस्तरापासून ते ग्रामपातळीपर्यंत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती संकेतस्थळाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली आहे.


पौष्टिक तृणधान्यामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकरी आणि कृषि उद्योजकांचा सत्कार


            यावेळी शेतीमध्ये पौष्टिक तृणधान्यामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकरी आणि कृषि उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सोनू बांगारा (माळ, जि. ठाणे), किसन मोढवे (मर्दी, जि. ठाणे), काकड्या लहांगे (उज्जेनी, जि. पालघर), आनंता धिंडा (सातरोंडे, जि. पालघर), जानू कामडी आणि पद्माकर वाख ((मुसई, जि. ठाणे), तानाजी यादव (गमेवाडी, जि. सातारा), होरुसिंग ठाकरे (बंधारा, जि. नंदुरबार), प्रकाश गायकवाड (पिसाळवाडी, जि. सातारा), बाजीराव चौरे (बाभूळणे, जि. नाशिक), निंगोजी कुंदेकर (शेवाळे, जि. कोल्हापूर), प्रमोद माळी (पिंपरखेड, जि.जळगाव), भामटा पाडवी ((खेडळे, जि.नंदुरबार), तात्यासाहेब फडतरे (समृद्धी ॲग्रो ग्रुप. राहाता, जि. अहमदनगर), महेश लोंढे (ॲग्रोझी ऑरगॅनिक भरडधान्य प्रक्रिया उद्योग, उरळीकांचन, जि. पुणे), शंतनू पाटील (मेलूप फू़डस, सोलापूर), श्रीमती नीलिमा जोरवार (संचालक, कळसूबाई शेतकरी उत्पादक कंपनी, नाशिक), महेंद्र छोरिया (यश इंटरप्रायजेस, नाशिक), प्रसाद औसरकर (शहापूर, जि. ठाणे) आणि बारवी ॲग्रो शेतकरी उत्पादक कंपनी (पाटगाव, जि. ठाणे) यांचा समावेश आहे.


विविध तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांचे स्टॉल्सवर खरेदीसाठी गर्दी


            आजच्या या कार्यक्रमावेळी प्रांगणात ज्वारी, बाजरी, नाचणी यासह विविध तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. मंत्रालयातील अधिकारी - कर्मचारी आणि मंत्रालयात विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांनी या पदार्थांची खरेदी केली.


            समृद्धी ॲग्रो, पुणे, कळसूबाई मिलेट फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, नाशिक. एमटीडीसी आणि दादर केटरिंग कॉलेज, सावित्रीबाई फुले आदर्श प्रभाग संघ, नाचणगाव, वर्धा. आदर्श स्वयंसहायता महिला समूह, ताम्हाणे, रत्नागिरी. एव्हीपी फूडस स्टफ, शहापूर. सान्वी कुकीज, ऐरोली. बारवी ॲग्रो, मुरबाड. अग्रणी शेतकरी उत्पादक गट, कवठेमहांकाळ.


            पवित्र अन्न प्रक्रिया गृहउद्योग, भिवंडी. जय भवानी महिला बचत गट, जव्हार. कृषी विभाग ठाणे अधिकारी- कर्मचारी महिला, कृषी विभाग भिवंडी, श्री गणेश महिला बचत गट, कर्जत. श्रीयाज फूडस पनवेल. हिरकणी प्रभाग संघ, आदर्श महिला प्रभाग संघ, पालघर. प्रगती लोकसंचलित साधन केंद्र, शहापूर. सुसी फूडस् रायगड. स्वयंसिद्धा महिला स्वयंसहायता समूह पनवेल. प्रेरणा स्वयंसहायता महिला समूह, खालापूर. रत्नाई महिला समूह, खालापूर, श्री वैभव इंडस्ट्रीज, जळगाव, ओम नमोशिवाय महिला समूह, साक्री, धुळे, मिलूप फूडस, बार्शी. यशस्व‍िनी ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी, बोरामणी, दक्षिण सोलापूर. शिवमुद्रा शेतकरी गट, मांडेदुर्ग, चंदगड, धनदाई महिला बचत गट, रोहा, रायगड आणि अरूणिका फूडस, धुळे यांचे स्टॉल्स याठिकाणी लावण्यात आले होते.

होमी भाभा विद्यापीठाच्या नवीन कार्यालयाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

 . होमी भाभा विद्यापीठाच्या नवीन कार्यालयाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

नाविन्यपूर्ण संकल्पना विद्यापीठाने राबवाव्यात


- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.

            मुंबई, दि. 30 : डॉ. होमी भाभा यांनी विज्ञानाच्या प्रगतीला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. अणुशक्ती या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. या महान व्यक्तीचे नाव या विद्यापीठाला दिले. या नावाप्रमाणे विद्यापीठाने नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून उत्कृष्ट विद्यापीठ म्हणून लौकिक होईल अशी शैक्षणिक वाटचाल करावी, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.


            डॉ.होमी भाभा राज्य समूह विद्यापीठाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश कामत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी होमी भाभा यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करून ई-लर्निंग स्टुडिओचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.


            राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, विद्यापीठामध्ये उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध कराव्यात. गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याबरोबरच विद्यार्थी अध्ययनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावी म्हणून प्रयत्न करावेत.


             उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, डॉ. होमी भाभा यांचे ऋण देशावर आहे. त्यांचे नाव या विद्यापीठाला देऊन महाराष्ट्रातील पहिले अभिमत विद्यापीठ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या विद्यापीठाच्या पायाभूत सुविधांसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. नवीन शैक्षणिक धोरणात अधिकाधिक अभिमत विद्यापीठाची संकल्पना मांडली असल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समित्या जाहीर

 राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समित्या जाहीर.


            मुंबई, दि. 30 : मुंबई विद्यापीठ तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुंच्या निवडीसाठी राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी स्वतंत्र निवड समित्या गठित केल्या आहेत.


            विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डी पी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठाची कुलगुरु निवड समिती गठित करण्यात आली आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकरिता कुलगुरु निवड समिती जाहीर करण्यात आली आहे. 


            आयआयटी वाराणसीचे संचालक प्रा. प्रमोदकुमार जैन, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये तसेच हैदराबाद येथील इंग्रजी व परकीय भाषा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सुरेशकुमार (यूजीसी प्रतिनिधी) हे मुंबई विद्यापीठ कुलगुरु निवड समितीचे अन्य सदस्य असतील.


            आयआयटी कानपुरचे संचालक डॉ. अभय करंदीकर, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर तसेच कर्नाटक राज्य महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. मीना चंदावरकर (यूजीसी प्रतिनिधी) हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समितीचे अन्य सदस्य असतील.


            मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचा कार्यकाळ दि. १० सप्टेंबर २०२२ रोजी सपंल्याने विद्यापीठाचे कुलगुरुपद रिक्त झाले होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. दिगंबर शिर्के यांच्याकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.  


            सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कार्यकाळ १८ मे २०२२ रोजी संपल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे यांच्याकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. 


००००


Governor constitutes Search Committees for selection of Mumbai, Pune Vice Chancellors


       Mumbai, 30th Jan : Maharashtra Governor and Chancellor of Universities in the State Bhagat Singh Koshyari has constituted separate Search Committees for the selection of vice chancellors to the University of Mumbai and the Savitribai Phule Pune University.


       The Search Committee for the selection of Mumbai University vice chancellor will be headed by the former UGC Chairman Dr. D. P. Singh while the Search panel for the selection of the vice chancellor of the Savitribai Phule Pune University will be headed by former AICTE chairman Dr Anil Sahasrabuddhe. 


       Prof. Pramod Kumar Jain, Director, Indian Institute of Technology, (BHU) Varanasi, Anand Limaye, Additional Chief Secretary (Home) and Prof. Suresh Kumar, Vice Chancellor of the English and Foreign Languages University Hyderabad (UGC nominee) will be the members of the Search Committee for the selection of Mumbai University Vice Chancellor.


       Dr. Abhay Karandikar, Director, IIT, Kanpur, Deepak Kapoor, Additional Chief Secretary, Irrigation Department and Dr. Meena R. Chandawarkar, Chief Advisor-Quality Assurance, BVV Sangha, Bagalkot and former Vice Chancellor of Karnataka State Women's University Vijaypura (UGC Nominee) have been named as the Members of the Search Committee for the selection of vice chancellor of the Savitribai Phule Pune University.


       The term of MU vice chancellor Suhas Pednekar ended on 10 September. Shivaji University Vice Chancellor Dr. Digambar Shirke has been holding the additional charge of the post of Mumbai Vice Chancellor.


       The term of Vice Chancellor Dr. Nitin Karmalkar ended on 18 May 2022. Dr. Karbhari Kale, Vice Chancellor of the Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere has been holding the additional charge of the post of SPPU Vice Chancellor.


००००

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघद्विवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण

 पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघद्विवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण

- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे.

            मुंबई, दि. ३० : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या दोन पदवीधर मतदार संघ आणि शिक्षक मतदार संघाच्या तीन अशा एकूण पाच मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज शांततेत मतदान झाल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.


            नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिक विभागात ४९.२८ टक्के, अमरावती विभागात ४९.६७ टक्के, औरंगाबाद विभागात ८६ टक्के, नागपूर विभागात ८६.२३ टक्के आणि कोकण विभागात ९१.०२ टक्के मतदान झाले. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार गुरूवार दिनांक २ फेब्रुवारी २०२३ ला मतमोजणी होणार आहे, अशी माहिती श्री.देशपांडे यांनी दिली.

भवताल मासिकाचा जानेवारी २०२३ चा अंक


 नमस्कार.

भवताल मासिकाचा जानेवारी २०२३ चा अंक आणि त्याचे कव्हर सोबत शेअर करत आहोत.


अंकाची वैशिष्ट्ये :

• एकाच साच्यातील विकास

• आदिवासींचा वाघ्या

• अभी पार्टी शुरू हुई है।

• अनोख्या इको-टूरची धमाल

आणि बरेच काही...


सोबत दिलेली लिंक आपल्या संपर्कात शेअर करून इतरांनीही भवताल मासिकासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करावे, ही विनंती.


नावनोंदणीसाठी लिंक:

https://bhavatal.com/connectus/masik-nondani

- संपादक, भवताल मासिक.

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


शासकीय कामकाज ‘मिशन मोडवर’ राबवावे

 शासकीय कामकाज ‘मिशन मोडवर’ राबवावे

                          - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

            मुंबई, दि. 31 : “प्रशिक्षणामुळे नवीन ज्ञानप्राप्ती होवून विषयाची उजळणी होते. प्रशिक्षण घेऊन जनतेच्या हितासाठी शासकीय कामकाजाला अधिक गती देऊन ‘मिशन मोडकर’ काम करावे”, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.


            डॉ.होमी भाभा राज्य समूह विद्यापीठ मुंबई, येथे नवनियुक्त विभागीय सहसंचालकांसाठी आयोजित केलेल्या एकदिवसीय प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.


            यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव प्रताप लुबाळ, अजित बाविस्कर उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. पाटील म्हणाले की, प्रशिक्षण हे व्यक्तिमत्वाच्या विकासाचे माध्यम असून सक्षम बनविण्याचे साधन आहे. नवीन विषय आत्मसात करण्यासाठी आणि त्याचे अचूक आकलन होण्यासाठी आणि योग्य अवलंबासाठी प्रशिक्षण महत्वाचे आहे. विभागीय सहसंचालक हे पद महाविद्यालय आणि शासन यांच्यामधील दुवा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून प्रशिक्षण घेऊन शासकीय कामकाजाला अधिक गती द्यावी.


            यावेळी नवनियुक्त विभागीय सहसंचालकांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

राज्य सेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ च्या परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा

 राज्य सेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा

निर्णय २०२५ च्या परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला विनंती.

            मुंबई, दि. ३१ : राज्य सेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ पर्यायांऐवजी वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे, या निर्णयामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता असून मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ च्या मुख्य परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली आहे.


            महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठविलेल्या पत्रात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, राज्य सेवा मुख्य परीक्षा ही वस्तुनिष्ठ पर्यायांवर आधारित परीक्षा घेतली जाते. या पद्धतीमध्ये बदल करुन जुन्या पद्धतीने म्हणजे वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. हा निर्णय लगेच, २०२३ पासून लागू केल्यास या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता असून त्यामुळे वर्णनात्मक पद्धतीने परीक्षेचा निर्णय २०२५ च्या मुख्य परीक्षेपर्यंत पुढे ढकलण्याची आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य करुन त्याप्रमाणे वर्णनात्मक परीक्षा पद्धतीचा निर्णय पुढे ढकलावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे केली असून आयोग यावर तातडीने निर्णय घेऊन राज्यातील लाखो तरुण-तरुणींना दिलासा देईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.


            महाराष्ट्र लोकसेवा आयोग अत्यंत कार्यक्षमतेने काम करीत असून गेल्या सात-आठ महिन्यांमध्ये आयोगाने नोकऱ्यांमधील अनुशेष कमी करण्याचे काम वेगाने केले आहे. शासकीय नोकऱ्यांमधील ७५ हजार रिक्त पदे भरण्याची तयारी पूर्ण झाली असून त्याचे नियोजनही झालेले आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे.


०००००


महाराष्ट्रातील संसद सदस्यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

 महाराष्ट्रातील संसद सदस्यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठकखासदार हे राज्याच्या विकासासाठीचे


देशाच्या सर्वोच्च सभागृहातील महाराष्ट्राचा बुलंद आवाज


सर्वांनी एकत्रीतपणे केंद्र शासनाकडे राज्याच्या प्रलंबित प्रस्तावांबाबत पाठपुरावा करावा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई, दि. 30 : संसद सदस्य हे राज्याच्या विकासासाठी झटणारे लोकप्रतिनिधी आहेत. आपले खासदार हे देशाच्या सर्वोच्च सभागृहातील महाराष्ट्राचा आवाज आहेत. हा आवाज जितका बुलंद तेवढ्या विकासाच्या योजना, निधी राज्यात येईल. त्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत पाठपुरावा करावा. सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारी यंत्रणा उभी करतानाच महाराष्ट्र सदनातील निवासी आयुक्तांनी केंद्रीय मंत्रालय व राज्यातील विविध विभाग यातील दुवा म्हणून काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.


            संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील संसद सदस्यांची बैठक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्यमंत्री भागवत कराड, कपिल पाटील, डॉ. भारती पवार, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्यातील संसद सदस्य यांच्यासह राज्य शासनाच्या विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.


            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्याच्या हिताचे, सर्व सामान्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारे प्रस्ताव केंद्र शासनाकडे असून त्यांना गती देण्यासाठी आपण एकदिलाने काम करू. त्यासाठी ही बैठक महत्वाची आहे. प्रलंबित प्रस्ताव, प्रश्नांबाबत पाठपुरावा करतानाच, राज्याच्या विकासासाठी आणखी नवे, अभिनव प्रकल्प, उपक्रम, योजना यांची मांडणी व्हावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.


            आजच्या बैठकीत खासदारांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्यांवर झालेल्या कार्यवाहीबाबत पाठपुरावा करण्यासाठी दोन महिन्यांनी पुन्हा एक बैठक घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            केंद्र शासनाकडून राज्याला आवश्यक तो निधी वेळेवर मिळावा यासाठी आवश्यक ती उपयोगिता प्रमाणपत्र मुदतीत पाठविण्यात यावीत. त्यामुळे मंत्रालयीन विविध विभागांच्या सचिवांनी याबाबत लक्ष घालावे आणि भविष्यात वेळीच उपयोगिता प्रमाणपत्र सादर केली जातील, याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


            केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला भरीव निधी मिळत असून नुकतेच राज्याच्या नगरविकास विभागाच्या १५ हजार कोटींच्या प्रस्तावाला पंतप्रधानांनी मंजुरी दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.


विविध आयुधांचा वापर करून खासदारांनी राज्याचे प्रलंबित प्रश्न मांडावेत - उपमुख्यमंत्री


            संसदेमध्ये विविध आयुधांचा वापर करून खासदारांनी राज्याचे प्रलंबित प्रस्ताव आणि प्रश्न मांडावेत, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी सांगितले. रेल्वे प्रकल्पांसाठी राज्य शासनाचा ५० टक्के निधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे श्री. फडणवीस यांनी जाहीर केले.


 


            सध्या केंद्राकडून १४०० कोटी रुपये मिळाले आहेत. सर्वांनी वेळेत उपयोगिता प्रमाणपत्र द्यावे. त्यामुळे केंद्र शासनाकडे असलेला निधी मिळण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.


            यावेळी खासदार सर्वश्री गजानन किर्तीकर, संजय मंडलिक, इम्तियाज जलील, धनंजय महाडिक, रामदास तडस, धैर्यशील माने, राजेंद्र गावित, डॉ. श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, श्रीरंग बारणे, पूनम महाजन, डॉ. प्रीतम मुंडे, नवनीत राणा, मनोज कोटक, संजय मंडलिक, प्रतापराव जाधव, डॉ. सुजय विखे पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, सुधाकर श्रृंगारे, गोपाळ शेट्टी, हेमंत गोडसे, डॉ. अमोल कोल्हे यांनी मनोगत व्यक्त केले.


 

कपूर से आश्चर्यजनक उपाय:*

 🍃🌾😊


*कपूर से आश्चर्यजनक उपाय:*


*शास्त्रों के अनुसार देवी-देवताओं के समक्ष कपूर जलानें से अक्षय पुण्य प्राप्त होता है।*


*अत: प्रतिदिन सुबह और शाम घर में संध्यावंदन के समय कपूर जरूर जलाएँ।*


*पितृदोष और कालसर्पदोष से मुक्ति हेतु:* 

*कपूर जलानें से देवदोष व पितृदोष का शमन होता है। अक्सर लोग शिकायत करते हैं कि, हमें शायद पितृदोष है या काल सर्पदोष है। दरअसल, यह राहु और केतु का प्रभाव मात्र है। इसको दूर करनें के लिय प्रतिदिन सुबह, शाम और रात्रि को तीन बार घी में भिगोया हुआ कपूर जलाएँ। घर के शौचालय और बाथरूप में कपूर की 2-2 टिकियां रख दें। बस इतना उपाय ही काफी है।*



*आकस्मिक घटनां या दुर्घटनां से बचावः* 

*आकस्मिक घटनां या दुर्घटनां का कारण राहु, केतु और शनि होते हैं। इसके अलावा हमारी तंद्रा और क्रोध भी दुर्घटनां का कारण बनते हैं। इसके लिए रात्रि में हनुमान चालीसा का पाठ करनें के बाद कपूर जलाएँ।*

*हालांकि, प्रतिदिन सुबह और शाम जिस घर में कपूर जलता रहता है उस घर में किसी भी प्रकार की आकस्मिक घटनां और दुर्घटनां नहीं होती। रात्रि में सोनें से पूर्व कपूर जलाकर सोनां तो और भी लाभदायक है।*

*सकारात्मक उर्जा और शां‍ति के लिए:*

*घर में यदि सकारात्मक उर्जा और शांति का निर्माण करनां है तो प्रतिदिन सुबह और शाम कपूर को घी में भिगोकर जलाएँ और संपूर्ण घर में उसकी खुशबू फैलाएँ। ऐसा करनें से घर की नकारात्मक उर्जा नष्ट हो जाएगी।*दु:स्वप्न नहीं आएंगे और घर में अमन शांति बनीं रहेगी।*

*वैज्ञानिक शोधों से यह भी ज्ञात हुआ है कि, इसकी सुगंध से जीवाणु, विषाणु आदि बीमारी फैलानें वाले जीव नष्ट हो जाते हैं जिससे वातावरण शुद्ध हो जाता है तथा बीमारी होनें का भय भी नहीं रहता।*



*अचानक धन प्राप्ति का उपाय:* 

*गुलाब के फूल में कपूर का टुकड़ा रखें। शाम के समय फूल में एक कपूर जला दें और फूल को देवी दुर्गा को चढ़ा दें। इससे आपको अचानक धन मिल सकता है।*

*यह कार्य आप कभी भी शुरू करके कम से कम 43 दिन तक करेंगे तो लाभ मिलेगा। यह कार्य नवरात्रि के दौरान करेंगे तो और भी ज्यादा असरकारक होगा।*


*वास्तु दोष मिटानें के लिए :*

*यदि घर के किसी स्थान पर वास्तु दोष निर्मित हो रहा है तो वहां एक कपूर की 2 टिकियां रख दें। जब वह टिकियां गलकर समाप्त हो जाए तब दूसरी दो टिकिया रख दें। इस तरह बदलते रहेंगे तो वास्तुदोष निर्मित नहीं होगा।*


*भाग्य चमकानें के लिए:*

*पानी में कपूर के तेल की कुछ बूंदों को डालकर नहाएँ। यह आपको तरोताजा तो रखेगा ही आपके भाग्य को भी चमकाएगा। यदि इस में कुछ बूंदें चमेली के तेल की भी डाल लेंगे तो इससे राहु, केतु और शनि का दोष नहीं रहेगा, लेकिन ऐसे सिर्फ शनिवार को ही करें।*


*पति-पत्नी के बीच तनाव को दूर करनें हेतु :

*रात को सोते समय पत्नी अपनें पति के तकिये में सिंदूर की एक पुड़िया और पति अपनी पत्नी के तकिये में कपूर की 2 टिकियां रख दें। प्रातः होते ही सिंदूर की पुड़िया घर से बाहर कहीं उचित स्थान पर फेंक दें तथा कपूर को निकाल कर शयन कक्ष में जला दें।*

*यदि ऐसा नहीं करनां चाहते हैं तो प्रतिदिन शयनकक्ष में कपूर जलाएँ और कपूर की 2 टिकियां शयनकक्ष के किसी कोनें में रख दें। जब वह टिकियां गलकर समाप्त हो जाए तो दूसरी रख दें।*


*धन-धान्य के लिए:* 

*रात्रि काल के समय रसोई समेटनें के बाद चांदी की कटोरी में लौंग तथा कपूर जला दिया करें। यह कार्य नित्य प्रतिदिन करेंगे तो धन-धान्य से आपका घर भरा रहेगा। धन की कभी कमी नहीं होगी।*


*विवाह बाधा हेतु :* 

*विवाह में आ रही बाधा को दूर करनां चाहते हैं तो यह उपाय बहुत ही कारगर है। 36 लौंग और 6 कपूर के टुकड़े लें, इसमें हल्दी और चावल मिलाकर इससे मां दुर्गा को आहुति दें।*


*मनचाही भूमि या भवन पानें के लिए :* 

*यह उपाय नवरात्रि के दिन करनें का है। सबसे पहले उस स्थान की थोड़ी-सी मिट्टी लाकर एक कांच की शीशी में उसे डालें। उसमें गंगा जल और कपूर डालकर उसे पूजा में जौ के ढेर पर स्थापित कर दें। नवरात्र भर उस शीशी के आगे नवार्ण मन्त्र "ऐं हीं क्लीं चामुण्डाय विच्चे" का पांच माला जप करें और जौ में रोज गंगा जल डालें। नवमी के दिन थोड़े से अंकुरित जौ निकाल लें और ले जाकर मनचाही जगह पे डाल दें। कांच की शीशी को छोड़कर शेष सामग्री को नदी में डाल दें। देवी की कृपा हुई तो आपको मनचाहा घर मिल जाएगा।*

*|('}_,*

*|(/\\, संकलन:--- संजय हिरे नाशिक*

*9850088804*

*7030506008*


*आपका,आपके परिवार का भविष्य, बच्चोंका करिअर,शिक्षण, नोकरी, धंदा ,विवाह, संतती ,दारू नशा, वास्तु दोष, निवारण करणे हेतू संपर्क कर सकते हो*

*985008884*

*7030506008*


      *‼️ राधे राधे ‼️*

आपल्या आई वडिलांना कधीच खाली मान घालायला लाऊ नका .-

 आपल्या आई वडिलांना कधीच खाली मान घालायला लाऊ नका .-प्रवीण किणे  


रत्‍नागिरी - गोदूताई जांभेकर विद्यालय ,रत्‍नागिरी मध्ये क्रांतीसागर प्रविण किणे यांनी आई, बाबा यांच्‍या स्‍पप्‍नांची राख करून आपल्‍या प्रेमाची कथा रचणाऱ्या तरूणासोबत लहान मुलांनाही आई वडीलांच्‍या कष्टाची जाणीव करून दिली. उसने पासणे घेवून आपले आईवडील आपल्‍याला

मोबाईल घेवून देतात त्‍यावर वॉलपेपर मात्र प्रेयसीचा असतो..आई बापाचं काय असा प्रश्न या मुलांना विचारला व त्‍यानंतर सलग अर्धा तास मुले हुसमसुन रडत होती...विषय थेट काळजाला भिडला होता. मुलांना आपल्या भावना अनावर झाल्या होत्या. आम्ही घरी जाऊन आई वडील यांना मिठी मारून नमस्कार करू असे वचन मुलांनी दिले.

           आज काल मोबाईल गॉसीप, प्रेमप्रकरणे व मोठी स्‍वप्‍ने पाहणे व साकार करणे अलिशय दुर्मिळ होत आहे..मुलांना आपण कोणत्‍या एसटीत बसलो आहेात हेच आपल्‍याला माहित नाही ..आपले ध्येय निश्चित करा...मुलांनी आपल्‍या शिक्षणासमोर आर्थिक अडचणी, शिक्षणाचे माध्यम, कौटुंबीक समस्‍या, आरोग्‍य अशा अनेक समस्‍या मांडल्‍या त्‍या साध्या सोप्या हसतमुख उदाहरणातून किणे सरांनी लिलया खोडून काढत 8 वर्षाच्‍या पदव्‍या बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्षे 3 महिन्‍यात पूर्ण केल्‍या हे सांगत, अब्‍दुल कलाम यांची परिस्‍थिती, हात पाय नसतानाही केवळतोंडाने चित्रे काढणारी नसरीमा हुजरूक कोल्‍हापूर या संस्‍थेतील मुले...उंची कमी असून जागतीक किर्ती मिळवलेला सचिन, अपघातात अपंगत्‍व येवूनही लाकडी पायावर नृत्‍य करून प्रसिध्द झालेली सुधा चंद्रन अशा अनेक उदाहरणाने मुलांच्‍या काळजाला हात घातला...शिवाय फेअर न लव्‍हली ने सुंदर होता आले असते तर संपुर्ण आफ्रिका गोरा झाला असता हे सांगून हास्‍याचे कारंजे उडवतानाच व्‍यक्‍तिमत्‍वाचे सोंदर्य हे आपल्‍या दिसण्यात नसुन आपल्‍या कतृत्‍वात असते हे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्‍या समोर अनेक नेते झुकतात...त्‍यामुळे दिसण्यापेक्षा असण्याला महत्‍व दया हे सांगत असतानाच अखेर मुळ पालकांच्‍या मनात असणाऱ्या व टंगळमंगळ करणाऱ्या मुलांच्‍या काळजालाच हात घातला...

             आई वडील आपल्‍यासाठी आयुष्य खर्ची घालून स्‍वतः कर्जबाजारी होतात...जर आपल्‍याला पळून जायचे असेल तर आपल्‍या आई वडीलांना विष घालून पळून जा हे सांगताच मुलींसोबत मुलांनीही हुंदके दयायला सुरवात केली आपल्‍यावर प्रेम करणारा मुलगा जर आपल्‍याला जिंकत असेल तर त्‍याला आईबापाला ही जिंकायला सांगा तरच तो मुलगा तुमच्‍या लायक आहे हे समजुन सांगतानाच दिड तास पींडर ऑफ सायलेन्‍स मधुन हसू व अश्रु यांचा संगम मुलांनी अनुभवला....शाळेच प्राचार्य चव्‍हाण संर यांनी पालक, विदयार्थ्याना अशा व्‍याख्यानाची गरज असुन मुलांच्या मध्ये परीवर्तन दिसत असल्‍याचे सांगीतले. मुख्याद्यापक चव्हाण सर यांनी दीड तास मुले चुळबुळ न करता शांतपणे ऐकतात हे आज पाहायला मिळाले...असे सांगून प्रविण .किणे यांचे आभार मानले व पुन्‍हा या सभागृहात पालकांनाही मार्गदर्शन करायला या असे निमंत्रण दिले. आईवडीलांच्‍या आठवणींची व्‍याकुळता व हसता हसता रडवणारे किणे सर अशा वातावरणात दीड तास आयुष्याचे परीवर्तन घडणारे संस्‍मरणीय ठरले.

जिंदगी

 *


जिवन गाणे

 












ज्वारीच्या भाकरीचे महत्व*

 *ज्वारीच्या भाकरीचे महत्व* 


“मी आहारातून गहू काढून टाकला आणि माझं वजन १४ किलोनी कमी झालं.” 


“माझा दमा इतका बरा झाला की, मी माझे दोन इन्हेलर्स काढून फेकून दिले.”


“गेली २० वर्षं अर्धशिशीमुळे माझं डोकं जे रोज दुखायचं, ते तीन दिवसांत दुखायचं बंद झालं.”


“माझ्या छातीतली जळजळ आता थांबली.”


“माझा इरिटेबल बाउल सिंड्रोम सुधारला, माझा अल्सरेटिव्ह कोलायटिस, माझा रुमटॉइड आर्थ्रायटिस, माझा मूड, माझी झोप…” वगैरे सुधारले...


गव्हामुळे तुमच्या रक्तातली साखर अत्यंत नाटकीय पद्धतीने वाढते. काही विदेशी संस्कृतींमधले लोक जे गहू खात नाहीत ते यामुळेच अधिक सडपातळ आणि निरोगी असतात. 


*जेवणात का खावी ज्वारीची भाकरी… ?*


ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. 


ज्वारीमध्ये असणाऱ्या अमायनो ऍसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने अन्नाचे सहज पचन होते. 


बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधीचा त्रास होत नाही.


तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते.


ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.


तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृदयरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे रक्तदाब (ब्लडप्रेशर) नियंत्रणात राहतो.


भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.


*ज्वारीचे फायदे*


1) ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते.


2) ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते.


3) ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात.


4) रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.


5) हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.


6) शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.


7) शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी.


8) महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे.


9) ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात.


10) शौचास साफ होण्यासाठी ज्वारी अतिशय उपयोगी आहे.


11) काविळीच्या आजारात पचायला हलक्या अन्नाची आवश्यकता असते. त्यामुळे काविळीच्या आजारामध्ये व नंतर वर्षभर ज्वारीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यास फायदेशीर ठरते.


*ज्वारीला दररोजच्या आहारात प्राधान्य द्या आणि गव्हाचा सणावाराला उपयोग करा.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2301397959870609&id=100000012811378

एक लसूण पाकळी, आरोग्यासाठी

 हा विडीओ जास्त प्रमाणात आपल्या नातेवाईका नां पाठवा


हळदीकुंकू समारंभ mahadpoladpur

 



Monday, 30 January 2023

तांत्रिक वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मितीवर भर द्यावा

 तांत्रिक वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मितीवर भर द्यावा

- वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील.

            मुंबई, दि. ३० : “तांत्रिक वस्त्रोद्योग निर्मिती क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर प्रमुख देश म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी तांत्रिक वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मितीवर अधिक भर द्यावा”, असे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.


             कापड उत्पादक असोसिएशन ऑफ इंडियाच्यावतीने गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर मध्ये आयोजित केलेल्या 76 व्या राष्ट्रीय वस्त्रोद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन वस्त्रोद्योग मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.


            वस्त्रोद्योग मंत्री श्री.पाटील म्हणाले की, वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी कापूस खरेदी ते कापड निर्मिती असे सर्वसमावेशक नवीन वस्त्रोद्योग धोरण राज्य शासन येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर करणार आहे. तसेच सहकारी सूत गिरण्यांना प्रति युनिट 3 रुपये प्रमाणे सवलतीस पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबईत वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.


            वस्त्रोद्योग मंत्री श्री.पाटील यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. तसेच उद्योजकांशी वस्त्रोद्योगातील अडचणी आणि उपाययोजना यावर सविस्तर चर्चा केली. याठिकाणी वेगवेगळ्या ब्रँडचे 937 स्टॉल लावण्यात आले आहेत.


            यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, कापड उत्पादक असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजेश मसंद, उपाध्यक्ष राजेश शाह, चेअरमन रोहित मुंजल सचिव संतोष कटारिया, वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्री. खरात संबंधित अधिकारी, उद्योजक उपस्थित होते.

राजधानीत हुतात्म्यांना आदरांजली.

 राजधानीत हुतात्म्यांना आदरांजली.

            नवी दिल्ली, 30 : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 2 मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून आज महाराष्ट्र सदनात तसेच महाराष्ट्र परिचय केंद्रात हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.


            कॉपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या हिरवळीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सदनाच्या व्यवस्थापक भागवंती मेश्राम यांच्यासह सदनातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.


महाराष्ट्र परिचय केंद्रात हुतात्म्यांना आदरांजली


            महाराष्ट्र परिचय केंद्रात हुतात्म्यांना मौन पाळून आदराजंली वाहण्यात आली. यावेळी प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह कार्यालयातील अधिकारी - कर्मचारी आणि अभ्यागत उपस्थित होते.            

महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर

 महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर

‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ चित्ररथ प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर झळकला


        नवी दिल्ली, ३० : 74 व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावरील पथसंचलनात महारष्ट्राच्यावतीने सादर करण्यात आलेल्या ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ या द्वितीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार जाहीर आज झाला आहे. उत्तराखंड राज्याला प्रथम क्रमांक, तर उत्तर प्रदेश राज्याला तिसरा क्रमांक जाहीर झाला.


            केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्यावतीने उत्कृष्ट चित्ररथाची निवड करण्यात आली असून मंगळवारी दुपारी निवड झालेल्या राज्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावर्षी चित्ररथाची संकल्पना ‘नारी शक्ती’ वर आधारित होती.


            महाराष्ट्राने ‘नारी शक्ती व साडे तीन शक्तिपीठा’चा महिमा चित्ररथाच्या माध्यमातून सादर केला होता. त्यात कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता ही तीन पूर्ण शक्तीपीठे, तर वणीची सप्तश्रृंगी या अर्ध्या शक्तिपीठांचे दर्शन पथसंचलनात उपस्थितांना घेता आले. या चित्ररथात संबळ वाजविणारे गोंधळी, पोतराज, हलगी वाजवून देवीची आराधना करणारा भक्त, असे भक्त‍िमय वातावरण कर्तव्यपथावर चित्ररथाच्या माध्यमातून दर्शविले गेले.


 चित्ररथाची संकल्पना, सांस्कृतिक कार्य संचालनालयाची होती. शुभ ॲड या संस्थेने चित्ररथाचे काम प्रत्यक्षात उतरविले होते. साडेतीन शक्तिपीठाची महिमा सांगणाऱ्या गीताला संगीत संगीतकार कौशल इनामदार यांनी दिले. तर, हे गीत प्राची गडकरी यांनी लिहिले आहे. यासह चित्ररथावर दिसणारे कलाकार हे विजनरी परफॉर्मिंग कला समूह, ठाणे येथील होते.

डॉ. होमी भाभा विद्यापीठाच्या नवीन कार्यालयाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

 डॉ. होमी भाभा विद्यापीठाच्या नवीन कार्यालयाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

नाविन्यपूर्ण संकल्पना विद्यापीठाने राबवाव्यात

- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.

            मुंबई, दि. 30 : डॉ. होमी भाभा यांनी विज्ञानाच्या प्रगतीला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. अणुशक्ती या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. या महान व्यक्तीचे नाव या विद्यापीठाला दिले. या नावाप्रमाणे विद्यापीठाने नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून उत्कृष्ट विद्यापीठ म्हणून लौकिक होईल अशी शैक्षणिक वाटचाल करावी, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.


            डॉ.होमी भाभा राज्य समूह विद्यापीठाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश कामत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी होमी भाभा यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करून ई-लर्निंग स्टुडिओचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.


            राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, विद्यापीठामध्ये उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध कराव्यात. गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याबरोबरच विद्यार्थी अध्ययनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावी म्हणून प्रयत्न करावेत.


             उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, डॉ. होमी भाभा यांचे ऋण देशावर आहे. त्यांचे नाव या विद्यापीठाला देऊन महाराष्ट्रातील पहिले अभिमत विद्यापीठ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या विद्यापीठाच्या पायाभूत सुविधांसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. नवीन शैक्षणिक धोरणात अधिकाधिक अभिमत विद्यापीठाची संकल्पना मांडली असल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.


०००

नवीन व्यापार धोरण बनवावे

 


  केंद्र व राज्यात स्वतंत्र व्यापार मंत्रालय निर्माण करून
नवीन व्यापार धोरण बनवावे - ललित गांधी

जीएसटी कररचना सुटसुटीत करण्याचीही मागणी

मुंबई ः देशातील व्यापार-उद्योगाला चालना मिळून भारतीय व्यापार्‍यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी केंद्र व राज्य दोन्ही स्तरांवर स्वतंत्र व्यापार मंत्रालय निर्माण करून देशांतर्गत व्यापाराचे नवीन धोरण तयार करण्याची मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’ चे अध्यक्ष ललित गांधी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
अर्थसंकल्पाकडून व्यापार-उद्योग क्षेत्राच्या अपेक्षासंबंधी आपली भुमिका मांडताना ललित गांधी यांनी जीएसटी करप्रणाली चा पाच वर्षाचा आढावा घेऊन यातील कीचकट प्रणाली दुरूस्त करावी, करांचे दर तर्कसंगत पध्दतीने कमी करावेत व व्यापारी-उद्योजकांना गुन्हेगार ठरविण्याच्या तरतुदी रद्द कराव्यात अशी मागणी केली.
अर्थसंकल्पापूर्वी बैठकीमध्ये केंद्र सरकारकडे महाराष्ट्र चेंबरने केलेल्या प्रमुख मागण्यामध्ये बांधकाम व्यवसायाला उद्योगाचा दर्जा व त्याचे प्रत्यक्ष लाभ द्यावेत, ई-कॉमर्स धोरण जाहीर करून त्यासाठी नियामक आयोग गठीत करावे, व्यापार क्षेत्राला कर्जपुरवठा सुलभ उपलब्ध व्हावा, व्यापारी विवाद व चेक बाउन्सच्या खटल्यांसाठी फास्टट्रॅक कोर्टांची स्थापना, संपूर्ण देशात एकच वीजेचा दर, उद्योगांना निर्यातीसाठी प्रोत्साहन योजना या मागण्यांसह, महाराष्ट्रातील पायाभुत सुविधांवर विशेष लक्ष देण्याची मागणी करून विमानसेवा, रेल्वेसेवांचा विस्तार, औद्योगिक वसाहतींच्या धर्तीवर शहरालगत व्यापार झोन ची निर्मिती, महाराष्ट्रातील जळगांव, नांदेड, लातूर, गोंदीया या परिपुर्ण विमानतळांवरून नियमित विमानसेवेबरोबर कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद विमानतळावर कार्गो टर्मिनल अमरावती, रत्नागिरी विमानतळांच्या कामाची सुरूवात कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाच्या कामासाठी निधि या प्रमुख मागण्या सादर केल्या आहेत.
उद्योजक व व्यापारी हे देशाच्या विकासाचे मुख्य घटक असल्याने केंद्र सरकारने त्यांना प्रतिष्ठा व संरक्षण देण्याचे धोरण स्विकारावे अशी आग्रही मागणी करून ललित गांधी यांनी आयकर दर सुध्दा अजून कमी करण्याची आग्रही भुमिका मांडली आहे.  

मेरा भारत ऐसा भी

 the pic shows

Vande Bharat train after reaching destination.


Really do we deserve luxury trains??


This is the character of our public! 


It is the educated who is behaving irresponsibly these days and it is left to the uneducated to clean the mess created by the educated. 


The same educated when they visit foreign countries behave totally differently. This shows the respect and love to their country and the environment.....Very sad to see this😔


This needs wide publicity.


लोकप्रिय चित्ररथ श्रेणीसाठी ''महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती”या चित्ररथास सर्वोत्कृष्ट पसंती नोंदविण्याचे आवाहन

 लोकप्रिय चित्ररथ श्रेणीसाठी ''महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती”या चित्ररथास सर्वोत्कृष्ट पसंती नोंदविण्याचे आवाहन.

        मुंबई, दि. 28 : यंदाच्या वर्षी “ महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” हा विषय चित्ररथाव्दारे महाराष्ट्राने दिल्ली येथील कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिमाखात सादर केला.


            यामध्ये महाराष्ट्रातील अध्यात्मिक शक्ती असलेल्या साडेतीन पिठाचा देखावा, महाराष्ट्राची अमूर्त लोककला आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिर शैली दाखविण्यात आली होती.


            चित्ररथाला दोन प्रकारचे पुरस्कार असून पहिल्या प्रकारचा पुरस्कार तज्ञ समितीच्या अहवालावरुन मिळेल तर दूसऱ्या प्रकारचा पुरस्कार लोकप्रिय चित्ररथ या सदराखाली लोकांनी ऑनलाईन मत (वोटिंग) नोंदविल्यानुसार मिळेल. त्यामुळे या लोकप्रिय चित्ररथ श्रेणीसाठी सर्वोत्कृष्ट पसंती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


            लोकप्रिय चित्ररथ श्रेणीसाठी सर्वोत्कृष्ट पसंती नोंदविण्याचे आवाहन :


            साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती या महाराष्ट्राच्या चित्ररथाला क्रमांक 1 च्या पसंतीसाठी आपल्या मोबाइल क्रमांकावरुन खालीलप्रमाणे मेसेज मंगळवार दि.31.1.2023 च्या रात्री 11.45 वाजेपर्यंत पाठवावा.


            MYGOVPOLL337011,12 हा SMS 7738299899 या मोबाईल क्रमांकावर पाठवावा.


            MYGOVPOLL (Space) 337011,12


किंवा


(आपणास खालील लिंकवर जावून “महाराष्ट्र” या नावासमोर आपले ऑनलाईन मत नोंदविता येईल: https://www.mygov.in/group-pool/vote-your-favorite-tableau-republic-day-2023/ )


            आपण वरीलप्रमाणे Online voting करावे व त्यानंतर आपल्या संपर्कातील सर्वांना असे करण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp Group), फेसबुक (FB), व इतर समाज माध्यमांव्दारे हा संदेश पुढे पाठवावा आणि महाराष्ट्राला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवून देण्यासाठी विनंती करावी.  


0000

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत

 महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत जे.एस.डब्ल्यू., बॅंक ऑफ बडोदा आणि पश्चिम रेल्वेला विविध गटांत विजेतेपद

            मुंबई, दि. 28 : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 26 व्या औद्योगिक व व्यावसायिक पुरुष कामगारांसाठी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आणि 21 वी महिलांसाठी राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धेत जे.एस.डब्ल्यू. संघाने ग्रामीण विभागात सलग चौथे जेतेपद पटकावले. बँक ऑफ बडोदाने शहरी विभागात तर पश्चिम रेल्वे महिला विभागात अजिंक्य ठरले.


            हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन सेनापती बापट मार्ग प्रभादेवी मुंबई येथे दिनांक 24 ते 27 जानेवारी 2023 या कालावधीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, कामगार विभागाचे उपसचिव दादासाहेब खताळ, कल्याण आयुक्त रविराज इळवे, ओएनजीसीचे महाप्रबंधक विवेक झिने, मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाहक विश्वास मोरे, सुप्रसिद्ध कबड्डीपटू रिशांक देवडिगा, स्पर्धा निरीक्षक सदानंद माजलकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.


            ग्रामीण विभागात जे.एस.डब्ल्यू.चा अदिल पाटील, महिला विभागात सोनाली शिंगटे, तर शहरी विभागात बँक ऑफ बडोदाचा प्रणव राणे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. विजेत्या संघाना कामगार कल्याण चषक आणि रोख 50 हजार रुपये पारितोषिक देऊन गौरविण्यात आले तर उपविजेत्या संघास चषक आणि रोख 35 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.


        ग्रामीण विभागाच्या अंतिम सामन्यात जे.एस.डब्ल्यू. ने क्रांती अग्रणीचा 37-36 असा निसटता पराभव केला. महिलांच्या अंतिम सामन्यात पश्चिम रेल्वेने बँक ऑफ बडोदाला 29-27 असे हरवले तर शहरी विभागात पुरुषांच्या अंतिम सामन्यात बँक ऑफ बडोदाने न्यू इंडिया इन्शुरन्सचा 37-24 असा पराभव केला.


00000

लाला लजपतराय वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव

 लाला लजपतराय वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव


"केवळ 'पंजाब केसरी' नव्हे; लाला लजपतराय 'हिंद केसरी'": राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

            मुंबई, दि. 28 : थोर स्वातंत्र्यसेनानी लाला लजपतराय यांचे कार्यक्षेत्र अविभाजित पंजाब असले तरीही त्यांचे जीवन कार्य व योगदान संपूर्ण देशासाठी होते. शिक्षण, आरोग्य, संस्कार व समाज जागरणासाठी समर्पित लाला लजपतराय केवळ 'पंजाब केसरी' नव्हते तर खऱ्या अर्थाने 'हिंद केसरी' होते. विद्यार्थी व युवकांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाज व देशासाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.


            लाला लजपतराय जयंती दिनाचे औचित्य साधून मुंबईतील लाला लजपतराय वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित लाला लजपतराय स्मृती सुवर्ण महोत्सवी व्याख्यान देताना राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते.


            लाला लजपतराय पारतंत्र्याच्या ज्या काळात जगले, त्या काळात युवकांनी उच्च शिक्षण स्वतःसाठी नाही तर समाज व देशासाठी घेतले. बाळ गंगाधर टिळक, बंगालचे बिपीनचंद्र पाल यांसह लाला लजपतराय या 'लाल बाल पाल' त्रयीनीं स्वातंत्र्य लढ्याला निश्चित अशी दिशा दिल्याचे राज्यपालांनी सांगितले.

            स्वातंत्र्य लढ्यासोबतच लजपतराय यांनी आर्य समाजाच्या माध्यमातून समाजातील जातीव्यवस्था, विषमता यांविरुद्ध लढा दिला तसेच अँग्लो वेदिक महाविद्यालये स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले. लजपतराय यांनी लोकसेवक मंडळ ही संस्था स्थापन करून जनतेची सेवा केली असे सांगून युवकांनी नोकरी, उद्योग, नवसंशोधन आदी सर्व गोष्टी कराव्या, परंतु त्यासोबतच समाजासाठी योगदान द्यावे असे राज्यपालांनी सांगितले .


       लाला लजपतराय स्मृती न्यासाचे अध्यक्ष डॉ. कमल गुप्ता यांनी महाविद्यालयाच्या पन्नास वर्षातील वाटचालीचा आढावा घेतला. महाविद्यालयाने 25 देशीविदेशी संस्थांशी सहकार्य करार केले असल्याचे त्यांनी प्रास्ताविकातून सांगितले. सुरुवातीला राज्यपालांनी लाला लजपतराय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण केले.

कार्यक्रमाला लाला लजपतराय स्मृती न्यासाचे विश्वस्त डॉ.सुनील गुप्ता, विनोद गुप्ता, नरेश गुप्ता, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.नीलम अरोरा, उपप्राचार्य डॉ. अरुण पुजारी तसेच महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


000000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्री क्षेत्र भंडारा डोंगराला भेट

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्री क्षेत्र भंडारा डोंगराला भेट.

भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहील .                                                                        -मुख्यमंत्री

पुणे, दि.29: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिरात सुरू असलेल्या माघ दशमी सोहळ्यात सहभाग घेतला. महाराष्ट्रातील तीर्थस्थाने भव्य दिव्य व्हावीत अशी सर्वांची भावना असून श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने श्री संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहील. मंदिर उभारण्याशी निगडीत अडचणी दूर केल्या जातील, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


            यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय शिरसाठ, भरत गोगावले, माजी मंत्री बाळा भेगडे, मंदिर समितीचे अध्यक्ष ह.भ.प.बाळासाहेब काशिद पाटील आदी उपस्थित होते.

संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला वंदन करायला आणि वारकऱ्यांना भेटायला आल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, संत तुकोबारायांच्या दर्शनासाठी भंडारा डोंगर येथे छत्रपती शिवाजी महाराज आले होते. अशा पावन भूमीत येण्याचे भाग्य आपल्याला मिळाले आहे. भंडारा डोंगर आगळ्यावेगळ्या ऊर्जेने भरला आहे. या परिसराचा विकास करताना या श्रद्धास्थानाचे पावित्र्य कायम राहिले पाहिजे. विकासकामे करताना वारकऱ्यांच्या श्रद्धेला ठेच लागू देणार नाही. त्यामुळेच रिंगरोडच्या मार्गातही बदल करण्यात आला. अयोध्येतील श्रीराम मंदिराप्रमाणे जगातील अतिशय भव्य मंदिर इथे उभे राहिल. श्रद्धा आणि तळमळ असल्यास अशी कामे उभी राहतात. श्री क्षेत्र भंडारा डोंगर परिसराचा चांगला विकास आराखडा तयार करावा, त्यासाठी शासनाचे सर्व सहकार्य राहील, असे श्री.शिंदे म्हणाले.

महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा लाभली आहे. वारकरी संप्रदायाच्या रुपाने समाजाला दिशा देणारी मोठी शक्ती महाराष्ट्रात आहे. आपले सण, उत्सव, परंपरा पुढे नेण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने केले आहे. ही परंपरा आपणही पुढे न्यायला हवी. वारकरी संप्रदायाने समाजप्रबोधनाचे महत्वाचे कार्य सातत्याने केले आहे. आध्यात्मिक विचाराने जीवन सफल होतं. आध्यात्मिक सोहळ्यातून अनेकांच्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल घडून जीवन सुखी, समृद्ध आणि संपन्न होत असते. उभारण्यात येणाऱ्या भव्य मंदिरापासून भक्ती, श्रद्धा, मांगल्याची भावना आणि प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            खासदार बारणे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. पालखी मार्गाचे काम आणि पंढरपूर विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी श्री संत तुकाराम महाराज मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिर उभारणीच्या कामाची पाहणी केली. श्री संत तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिरासाठी वारकरी दत्तात्रेय कराळे यांनी पाच लक्ष रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला.

प्रास्ताविकात श्री. काशिद पाटील यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे उभारण्यात येणाऱ्या श्री संत तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिराच्या कामाची माहिती दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले युवा महिला क्रिकेटपटूंचे अभिनंदन

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले युवा महिला क्रिकेटपटूंचे अभिनंदन

            मुंबई, दि. 29 : विश्वचषकावर आपले नाव कोरणाऱ्या 19 वर्षांखालील युवा महिला क्रिकेटपटूंचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. आगामी काळात क्रीडाविश्वात भारत आपला वेगळा ठसा उमटवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, भारताच्या युवा महिला क्रिकेटपटूंनी अतिशय उत्कृष्ट खेळ करत विश्वचषक पटकाविला. गेल्या काही वर्षात सर्वच क्रीडा प्रकारात आपले युवा खेळाडू उच्च दर्जाच्या खेळाचे प्रदर्शन करत असून आगामी काळात भारत क्रीडाविश्वात आणखी नाव कमावेल. युवा महिला क्रिकेटपटूंचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!

00000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत इंद्रायणी थडी जत्रेचा समारोप.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत इंद्रायणी थडी जत्रेचा समारोप.

जत्रोत्सवाच्या निमित्ताने अर्थव्यवस्थेला चालना मिळते आहे- मुख्यमंत्री.

            पुणे दि.२९: इंद्रायणी थडी जत्रेच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा अभिमान आणि नारीशक्तीचा सन्मान प्रदर्शित करण्यात आला असून जत्रोत्सवामुळे आर्थिक उलाढाल होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            भोसरी येथील गावजत्रा मैदान येथे शिवांजली सखी मंच आयोजित इंद्रायणी थडी जत्रेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, भरत गोगावले, संजय शिरसाठ, माजी मंत्री बाळा भेगडे आदी उपस्थित होते.

            इंद्रायणी थडी जत्रा भव्यदिव्य आणि हजारोंना एकाचवेळी आनंद देणारी जत्रा असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, भारताची संस्कृती, परंपरा पुढे नेणारा हा उपक्रम आहे. विविध वयोगटातील आणि क्षेत्रातील व्यक्तींसाठी भव्यदिव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. यानिमित्ताने एक हजार स्टॉल द्वारे 800 महिला बचत गटांना रोजगाराची संधी मिळाली आहे. महिला बचत गट आणि लहान व्यावसायिकांना अशा महोत्सवातून बाजारपेठ मिळते आणि त्यातून मोठे उद्योजक तयार होतात. म्हणून अशा महोत्सवाचे आयोजन ही काळाची गरज असल्याचे श्री.शिंदे म्हणाले. 

            सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे आणि राज्याची प्रगती करणारे सरकार आहे. म्हणूनच कोविडनंतर शासनाने निर्बंध हटविल्याने विविध उत्सव सुरू झाले आहेत. सर्वसामान्यांच्या आकांक्षांना न्याय देण्याचे कार्य सरकार करत आहे. सहा महिन्यात सर्व समाजघटकांसाठी निर्णय घेण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. उत्तम आयोजनाबाबत मुख्यमंत्र्यांनी आमदार लांडगे यांचे अभिनंदन केले. 

            आमदार लांडगे आणि विकास डोळस यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

00000



जिंदगी

 





थंड पाण्यात शिजणारा आसामचा बोका तांदूळ

 *थंड पाण्यात शिजणारा आसामचा बोका तांदूळ*


     भारत हा शेतीप्रधान देश आहे त्यातही तांदूळ हे मुख्य पीक आहे.महाराष्ट्राचा आंबेमोहोर,अजरा घनसाळ तांदूळ, कोकणातील लाल उकडा तांदूळ, उत्तर प्रदेशाचा कालानमक तांदूळ, बासमती तांदूळ,पश्चिम बंगालचा गोविंद भोग, तुलाईपंजी, मणिपूरचा चकहाओ,केरळचा हट्टा तांदूळ, पोक्कली तांदूळ,वायनाडचा गंधकसाला, जीराकसाला तसाच आसामचा करणी तांदूळ आणि बोका तांदूळ.हे सगळे भारतीय सरकार द्वारे GI (Geographical Identification) मानांकन प्राप्त तांदूळ आहेत.

      *हे जरी खरे असले तरी आसामच्या बोका तांदळाची गोष्ट काही औरच आहे आणि म्हणूनच त्यांचे वेगळेपण उठून दिसते.सर्वात प्रथम म्हणजे बोका तांदूळ शिजवण्यासाठी काहीही म़ेहनत लागत नाही.आग नाही,लाकडे नाही'उकळते पाणी नाही की गॅस सुध्दा लागत नाही.तर आसामचा हा सुवासिक असणारा जगप्रसिद्ध बोका तांदूळ चक्क साध्या थंड पाण्यात शिजतो.थंड पाण्यात साधारण एक तासभर ठेवला की खाण्यास भात तयार होतो.आहे की नाही जगावेगळी गंमत.तर असा हा जादुई बोका तांदूळ आहे.जगात मॅजिक राईस म्हणून ओळखला जातो*

     *आसामच्या बोका तांदळाची लागवड*

    आसाममध्ये खरीप हंगामात म्हणजे जून महिन्यात बोका भाताची पेरणी केली जाते, त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पीक तयार होते. बोका तांदूळ किंवा बोका चाळ आसामच्या डोंगराळ आदिवासी भागात घेतले जाते. या भातामध्ये 10.73% फायबर आणि 6.8% प्रोटीन असते. याशिवाय बोका तांदळात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात, जे वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.बोका तांदूळ शेतात पिकायला साधारण साडेचार ते पाच महिने लागतात. तोपर्यंत त्यांची फार काळजी घ्यावी लागते.

     बोका तांदूळ प्रामुख्याने आसाममध्ये डोंगराळ भागात पिकवला जातो. या भाताला इथली माती आणि हवामान यातून एक वेगळी चव आणि वेगळा सुगंध असतो. बोका तांदळाची लागवड आसाममधील कोक्राझार, बारपेटा, नलबारी, बक्सा, धुबरी, दररंग, कामरूप येथे केली जाते.

       *बोका तांदूळाचे एकरी उत्पादन*

    बोका तांदळाचे इतर तांदळाच्या तुलनेत एकरी उत्पादन तसे कमीच आहे.एक एकर जमिनीवर साधारण 8 ते 10 क्विंटल तांदूळ पिकतो.

    *बोका तांदळापासून बनणारे पदार्थ*

   बोका तांदूळ बोका चोले आणि ओरिझा सॅटिवा म्हणून देखील ओळखला जातो. आसाममधील बोका तांदळापासून जोलपान,पिठात राईस केक असे अनेक प्रकारचे पारंपारिक पदार्थ बनवले जातात.शिवाय बोका तांदूळ दही, गूळ, दूध, साखर किंवा इतर खाद्यपदार्थांसोबत दिला जातो.

     *बोका तांदूळाचा ऐतिहासिक संदर्भ*

      बोका तांदूळ हा अहोम सैनिक रेशन म्हणून वापरत असत. इतिहासाची पाने उलटली तर बोका तांदळाचा स्वतःचा एक सुवर्ण इतिहास आहे. या भाताने किती युद्धे जिंकायला मदत केली माहीत नाही. ही कथा 17 व्या शतकातील आहे.जेव्हा अहोम सैनिक मुघल सैन्यापासून देशाचे रक्षण करण्यासाठी बोका तांदूळ खात असत. हा तांदूळ रेशन म्हणून युद्धात नेण्यात आला, ज्याला शिजवण्याची गरज नव्हती कारण साध्या थंड पाण्यात तासभर टाकला की खायला भात तयार.हा बोका तांदूळ जगात फक्त भारतातील आसाम राज्यातील डोंगराळ भागातच तयार होतो.

     बोका तांदळाचा अनेक हजार वर्षांचा इतिहास आहे.जो थेट आसामशी संबंधित आहे. हेच कारण आहे की भारत सरकारने आसाममध्ये पिकवल्या जाणार्‍या या भाताला GI टॅग देखील दिला आहे. बोका तांदूळाची लागवड पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रायोगिक तत्त्वावर केली जात आहे.

      किसान टाकच्या ताज्या अहवालानुसार उत्तर प्रदेशातील शेतकरीही बोका तांदळाच्या लागवडीत खूप रस घेत आहेत. रायबरेली जिल्ह्यातील उंचाहार येथील शेतकरी रामगोपाल चंदेल यांनीही बोका भात पिकवून नवा विक्रम केला आहे.

    तर मित्रांनो फार शोध घेऊन आपल्या स्थानिक बाजारात जर कुठे आसामचा हा बोका तांदूळ मिळाला तर अवश्य आस्वाद घ्या.


*किशोर देसाई*

*ksdesai331139@yahoo.com*

Sunday, 29 January 2023

लोकशाहीचा खरा अर्थ फक्त यालाच कळला 👆जय

 लोकशाहीचा खरा अर्थ फक्त यालाच कळला 👆जय हिंद जय महाराष्ट्र .


कृषी महोत्सवातून पारंपरिक शेतीसह आधुनिक शेतीला पाठबळ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

 कृषी महोत्सवातून पारंपरिक शेतीसह आधुनिक शेतीला पाठबळ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि.29 : शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मागदर्शन मिळत आहे. याठिकाणी लावण्यात आलेल्या स्टॉलमुळे दुर्मिळ औषधी वनस्पतींची सर्वसामान्यांना माहिती मिळते आहे. या कृषी महोत्सवामुळे पारंपरिक शेतीसह आधुनिक शेतीला मोठे पाठबळ मिळत असून आपले शासन शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम करणारे शासन आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            नाशिक येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर श्री स्वामी समर्थ कृषी व अध्यात्मिक विकास मार्ग व श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चारिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित 'जागतिक कृषी महोत्सव, 2023' निमित्त महोत्सवाच्या चौथ्या दिवशी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

            यावेळी बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार सुहास कांदे, आमदार सीमा हिरे, आमदार संजय शिरसाट, श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख आण्णासाहेब मोरे, जिल्हाधिकारी गंगाधरन. डी. मनपा आयुक्त, डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे उपस्थित होते.

            याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आपले शासन सर्वसामान्य जनतेचे आहे. कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, समाजातील प्रत्येक घटकाचे हे शासन आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक निर्णय हा जनतेच्या कल्याणार्थ घेत आहोत. शेतीवर येणाऱ्या अतिवृष्टी, रोगराई आदी संकटांमध्ये देखील राज्य शासन आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहिले आहे. एन.डी.आर.एफ. च्या नियमांना डावलून यंदा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुप्पट मदत करण्यात आली आहे. शेतीचे जे नुकसान एन.डी.आर.एफ. च्या नियमात बसत नव्हते त्यावर योग्य निर्णय घेऊन शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. राज्यातील 6 लाख 90 हजार शेतकऱ्यांना तब्बल अडीच हजार कोटी रुपयांची मदत दिली आहे. याशिवाय शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न कसे घेता येईल, याबाबत प्रयत्नशील आहोत. ४५० महिला बचत गटांच्या माध्यमातून हजारो नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. राज्यातील जनता सुखी असली पाहिजे, हा राज्य व केंद्र सरकारचा अजेंडा आहे. गेल्या सहा महिन्यात राज्यात घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे विकासाला मोठी चालना मिळाली आहे. सर्वत्र सकारात्मक वातावरणाची निर्मिती झाली आहे.

            बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, समृद्धी महामार्ग हा 'गेम चेंजर' असा महामार्ग ठरणार आहे. या महामार्गामुळे शेतकऱ्यांचा शेतमाला अवघ्या काही तासात राज्यासह परदेशात पाठविणे अतिशय वेगवान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विकासाला अधिकाधिक चालना मिळाली आहे. याशिवाय नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट घेवून राज्यातील साखर उद्योगांच्या अडचणी सोडविण्याबाबत चर्चा केली आहे. लवकरच राज्यातील साखर उद्योगांच्या अडचणी देखील सोडविण्यात येणार आहेत. राज्याकडून केंद्राकडे जाणाऱ्या प्रत्येक प्रस्तावाला केंद्र सरकार तत्काळ मंजुरी देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र राज्यासाठी 2 लाख कोटी रुपयांची विशेष तरतूद केली असल्याचे याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कृषी महोत्सवाचे हे 12 वे वर्ष आहे. याठिकाणी अनेक राज्यातील नागरिक, शेतकरी येवून भेटी देत शेती संदर्भातील योग्य माहिती जाणून घेतात. केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, कृषी विभागातील तज्ज्ञ मंडळी, शेतकरी यासोबत जोडले गेले आहेत. या कृषी महोत्सवात असलेल्या सातत्यामुळे शेतकऱ्यांना मोठे पाठबळ मिळत आहे. आयोजकांनी समाजाप्रती असलेली बांधिलकी, आपुलकी व आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भूमिकेतून चालविलेला हा कृषी महोत्सव जगाच्या पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना उर्जा देतो. याठिकाणी लावण्यात आलेल्या 250 हून अधिक स्टॉलच्या माध्यमातून प्रगती शेतीसह गटशेती, योग्य बियाणे कसे निवडावे याबाबत शेतकऱ्यांना माहिती मिळाली आहे. श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे सुरु असलेल्या जागतिक कृषी महोत्सवात अनेक समाजपयोगी कार्यक्रम पार पडले आहे. या कृषी महोत्सवात गुरुमाऊलींनी 11 सामूहिक विवाह लावून दिले आहेत. तसेच सरपंच, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील 51 गावे श्री स्वामी समर्थ ट्रस्टने वर्षभरासाठी दत्तक घेतल्यामुळे या सर्वांचे पुण्य गुरुमाऊली मोरे यांच्या पदरी पडत असून ते देखील हे पुण्य कृषी महोत्सवातून जनतेपर्यंन्त पोहचवित आहेत. या जागतिक कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासाला अधिकाधिक बळ मिळत असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.

00000

Global “Agro-fest” providing support to modern agriculture

along with traditional farming                         - Chief Minister Mr Eknath Shinde

            Mumbai, January 29: “The farmers provide food to the people and they are guided by the Agriculture festivals. The stalls erected at the spot are also giving the information about the rare medicinal Herbs to the common people. This Agro festival is helping support modern agriculture along with traditional farming and our government is working with the farmers at the central point,” said chief minister Mr Eknath Shinde.


            He was speaking at the fourth day program of ‘Global agriculture Expo- 2023’ organized at the Dongre hostel ground in Nashik by Shri Swami Samarth Krushi wa Aadhyatmik Vikas Marg and Shri Swami Samarth Krushi Vikas wa Sanshodhan Charitable Trust.

            Minister for ports and mining and guardian minister of Nashik district Dadaji Bhuse, Member of Parliament Hemant Godse, MLA Babanrao Lonikar, MLA Subhash Kande, MLA Seema Hire, MLA Sanjay Shirsat, chief of the Shri Swami Samarth center Annasaheb More, district magistrate gangadharan D, commissioner of municipal corporation Dr Chandrakant Fulkundwar, commissioner of police Ankush Shinde and other dignitaries were present on the occasion.Speaking further, the chief minister said that his government is a ‘Government of common people’ and it belongs to laborers, peasants, students and each element of the society and hence all the decisions are taken in the interest of common people.


            Mr Shinde also said that the central government and the state government are standing firm with the common people during the hard times like the natural calamities including heavy rains, diseases outburst etc. He further said that flouting the guidelines laid down by the National Disaster Response Force (NDRF), the government has given double amount than that recommended by NDRF to those farmers who have suffered loss due to natural calamities. He said that the losses incurred by many farmers did not met the NDRF rules and so they were revised and assistance was provided to the farmers by the government.

            CM Mr Shinde said that his government has given the financial assistance of rupees six lakhs 90 thousand to the farmers as compensation. He also said that the government is striving to ensure that the farmers get more income. He also said that thousands of citizens were provided employment through 450 women Self Help Groups (SHG’s), adding that the state and the union government has given top priority to ensure that of the state are satisfied and happy. He said that the development got a boost due to the decisions taken by the state government in last six months and positive atmosphere has been created, everywhere.

Chief Minister Mr Eknath Shinde also said that the Balasaheb Thackeray Samruddhi highway is a ‘Game changer’ Expressway and due to this route, the agro product of farmers reaches to other parts of the nation and abroad with greater pace and this is giving a fillip to the development of farmers. He also said that deputy chief minister Mr Devendra Fadnavis recently met the Union Home Minister Mr Amit Shah and discussed about resolving the problems faced by the sugar industries in the state. He exuded confidence that in near future, all the problems before the sugar industries will be resolved.

            Mr Shinde said that all the proposals that are sent to the union government by the state government are given instant approval. He also said that Prime Minister Mr Narendra Modi has made a special provision of rupees two lakh crore for Maharashtra.

The Chief Minister said that this is 12th year of Agriculture- Expo and people from various states, farmers and other stake holders visit here and get updated about the suitable modern information related to Agro world. He said that the Union Ministers, the ministers of state, experts from the agriculture field are connected with the farmers due to this festival. He also said that the consistency of the Agro Exhibition has supported the farmers a lot.


            The Chief Minister also said that the organizers of this festival have organized the Agro-fest out of commitment towards farmers and the feeling of returning something to the society and this is providing energy to the farmers. More than 250 stalls are erected at this Expo which exhibits group farming, information about how to select best seeds according to the farmland and other important information. Various programs for social welfare were organized during this world Agriculture festival organized by Shri Swami Samarth Kendra. 11 mass marriages were solemnized during this Expo by the GuruMavali. Similarly, Sarpanch, Gram Sevaks and 51 villages from Nashik district had been adopted by Shri Swami Samarth Trust and the virtue of Guru Mauli More is being trickled down to the common people through the Agricultural Festival. The farmers are strengthened more and more because of such Global agriculture festival.


 

कृषि महोत्सव से पारंपरिक खेती समेत आधुनिक खेती को भी हो रही मदद


कृषि महोत्सव से पारंपरिक खेती समेत आधुनिक खेती को भी हो रही मदद

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

               मुंबई, दि.29 : किसान यह हमारा अन्नदाता है। कृषि महोत्सव के माध्यम से किसानों को योग्य मागदर्शन मिल रहा है। यहाँ पर लगाये गए स्टॉल की वजह से दुलर्भ औषधी वनस्पतियों की जानकारी आम लोगों को मिल रही है एवं इस कृषि महोत्सव की वजह से पारंपरिक खेती समेत आधुनिक खेती को भी बड़ी मदद मिल रही है और हमारी सरकार किसानों को केंद्रस्थान पर रखते हुए काम करनेवाली सरकार है, यह प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने किया. 


          नाशिक स्थित डोंगरे वसतिगृह मैदान पर श्री स्वामी समर्थ कृषि व अध्यात्मिक विकास मार्ग व श्री स्वामी समर्थ कृषि विकास व संशोधन चैरिटेबल ट्रस्ट की ओर से आयोजित 'जागतिक कृषि महोत्सव, 2023' के अवसर पर इस महोत्सव के चौथे दिन आयोजित कार्यक्रम में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोल रहे थे।        


          इस कार्यक्रम में बंदरगाह व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिले के पालकमंत्री दादाजी भुसे, सांसद हेमंत गोडसे, विधायक बबनराव लोणीकर, विधायक सुहास कांदे, विधायक सीमा हिरे, विधायक संजय शिरसाट, श्री स्वामी समर्थ केंद्र के प्रमुख आण्णासाहेब मोरे, जिलाधिकारी गंगाधरन. डी. मनपा आयुक्त, डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार, पुलिस आयुक्त अंकुश शिंदे उपस्थित थे।


          कार्यक्रम में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि हमारी सरकार यह आम लोगों की सरकार है। मजदुर, विद्यार्थी, समाज के प्रत्येक वर्ग की यह सरकार है। इसलिए हम प्रत्येक निर्णय भी जनता के कल्याणार्थ ही ले रहे है। खेती पर आनेवाले भारी बारिश, रोगराई आदि संकट की घडी में राज्य सरकार और केंद्र सरकार किसानों के साथ खड़े रहे है। एन.डी.आर.एफ. के नियमों को दरकिनार करते हुए इस साल क्षतिग्रस्त किसानों को दोगुनी मदद की गई है। खेती का जो नुकसान एन.डी.आर.एफ. के नियमों में नहीं आता था, उस पर भी योग्य निर्णय लेकर किसानों को सरकार ने मदद की है।


उन्होने बताया कि राज्य के 6 लाख 90 हजार किसानों को तक़रीबन ढ़ाई हजार करोड़ रुपये की मदद दी है। किसान अच्छे उत्पन्न किस तरह से ले सकेंगे, इस सन्दर्भ में भी हम प्रयासरत है। साथ ही 450 महिला बचत गुटों के माध्यम से हजारों नागरिकों को रोजगार उपलब्ध कराया गया है। राज्य की जनता सुखी होनी चाहिए, यहीं राज्य व केंद्र सरकार का अजेंडा है। पिछले छह महीने में राज्य में लिए गए निर्णयों की वजह से विकास को अच्छी गति मिली है, जिससे सर्वत्र सकारात्मक वातावरण का निर्माण हुआ है।


          बाळासाहेब ठाकरे समृद्धि महामार्ग को लेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि समृद्धि महामार्ग यह 'गेम चेंजर' के रूप में महामार्ग साबित होगा। इस महामार्ग की वजह से किसानों के लिए खेतमाल कुछेक ही घंटे में राज्य समेत विदेशों में भी भेजना आसान होने के साथ-साथ गतिशील हुआ है। जिससे किसानों के विकास को अधिकाधिक गति मिली है। हाल ही में केंद्रीय गृहमंत्री अमित शहा की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के साथ भेट लेकर राज्य के शुगर उद्योगों की समस्याओं का निराकरण करने को लेकर चर्चा की है, जल्द ही राज्य के शुगर उद्योगों की समस्याओं का भी निराकरण किया जायेगा। राज्य की ओर से केंद्र की ओर से जानेवाला प्रत्येक प्रस्ताव को केंद्र सरकार की ओर से तत्काल मंजुरी दी जा रही है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने महाराष्ट्र राज्य के लिए 2 लाख करोड़ रुपये का विशेष प्रावधान भी किये जाने की बात मुख्यमंत्री श्री. शिंदे ने इस दौरान कहीं।   


           मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि कृषि महोत्सव का यह 12 वां वर्ष है। यहाँ पर अनेक राज्य के नागरिक, किसान आकर भेट देते हुए कृषि के संदर्भ की योग्य जानकारी लेते है। केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, कृषि विभाग की विशेषज्ञ, किसान के साथ जुड़े है। इस कृषि महोत्सव में रहीं निरंतरता से किसानों को बड़ी मदद मिल रही है। आयोजकों ने समाज के प्रति सामाजिक सरोकार को और समाज के प्रति जिम्मेदारी की भूमिका से चलाया गया यह कृषि महोत्सव विश्व के अन्नदाता रहें किसानों में उर्जा भर देता है। यहाँ पर लगाए गए 250 से अधिक स्टॉल के माध्यम से प्रगत कृषि समेत गटखेती, योग्य बीज का चयन कैसे किया जाये, इन सभी की जानकारी किसानों को मिली है। श्री स्वामी समर्थ केंद्र की ओर से जारी जागतिक कृषि महोत्सव में अनेक समाजपयोगी कार्यक्रम संपन्न हुए है। इस कृषि महोत्सव में गुरुमाऊलीं ने 11 सामूहिक विवाह संपन्न करवाए है। साथ ही सरपंच, ग्रामसेवक के माध्यम से नाशिक जिले के 51 गावे श्री स्वामी समर्थ ट्रस्ट ने सालभर के लिए दत्तक लेने की वजह से इन सभी का पुण्य गुरुमाऊली मोरे के तक़दीर में मिल रहा है और यह भी पुण्य कृषि महोत्सव से जनता तक पहुंचाया जा रहा है। इस जागतिक कृषि महोत्सव के माध्यम से किसानों के विकास को अधिकाधिक ताकद भी मिल रही है।


00000


 


 



मौनात अर्थ सारे


 

लाला लजपतराय वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव

 लाला लजपतराय वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव


"केवळ 'पंजाब केसरी' नव्हे; लाला लजपतराय 'हिंद केसरी'": राज्यपाल भगतसिंह कोश्यार.

            मुंबई, दि. 28 : थोर स्वातंत्र्यसेनानी लाला लजपतराय यांचे कार्यक्षेत्र अविभाजित पंजाब असले तरीही त्यांचे जीवन कार्य व योगदान संपूर्ण देशासाठी होते. शिक्षण, आरोग्य, संस्कार व समाज जागरणासाठी समर्पित लाला लजपतराय केवळ 'पंजाब केसरी' नव्हते तर खऱ्या अर्थाने 'हिंद केसरी' होते. विद्यार्थी व युवकांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाज व देशासाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.


            लाला लजपतराय जयंती दिनाचे औचित्य साधून मुंबईतील लाला लजपतराय वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित लाला लजपतराय स्मृती सुवर्ण महोत्सवी व्याख्यान देताना राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते.


            लाला लजपतराय पारतंत्र्याच्या ज्या काळात जगले, त्या काळात युवकांनी उच्च शिक्षण स्वतःसाठी नाही तर समाज व देशासाठी घेतले. बाळ गंगाधर टिळक, बंगालचे बिपीनचंद्र पाल यांसह लाला लजपतराय या 'लाल बाल पाल' त्रयीनीं स्वातंत्र्य लढ्याला निश्चित अशी दिशा दिल्याचे राज्यपालांनी सांगितले.

            स्वातंत्र्य लढ्यासोबतच लजपतराय यांनी आर्य समाजाच्या माध्यमातून समाजातील जातीव्यवस्था, विषमता यांविरुद्ध लढा दिला तसेच अँग्लो वेदिक महाविद्यालये स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले. लजपतराय यांनी लोकसेवक मंडळ ही संस्था स्थापन करून जनतेची सेवा केली असे सांगून युवकांनी नोकरी, उद्योग, नवसंशोधन आदी सर्व गोष्टी कराव्या, परंतु त्यासोबतच समाजासाठी योगदान द्यावे असे राज्यपालांनी सांगितले .


       लाला लजपतराय स्मृती न्यासाचे अध्यक्ष डॉ. कमल गुप्ता यांनी महाविद्यालयाच्या पन्नास वर्षातील वाटचालीचा आढावा घेतला. महाविद्यालयाने 25 देशीविदेशी संस्थांशी सहकार्य करार केले असल्याचे त्यांनी प्रास्ताविकातून सांगितले. सुरुवातीला राज्यपालांनी लाला लजपतराय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण केले.

कार्यक्रमाला लाला लजपतराय स्मृती न्यासाचे विश्वस्त डॉ.सुनील गुप्ता, विनोद गुप्ता, नरेश गुप्ता, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.नीलम अरोरा, उपप्राचार्य डॉ. अरुण पुजारी तसेच महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


000

Maharashtra Governor Koshyari presides Golden Jubilee of Lala Lajpatrai College in Mumbai


Describes Lajpatrai as the 'Lion of India'

जुहू येथे रोजगार मेळाव्यात 572 नोकरी इच्छुक उमेदवारांचा सहभाग

 जुहू येथे रोजगार मेळाव्यात 572 नोकरी इच्छुक उमेदवारांचा सहभाग

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मेळाव्याचा शुभारंभ.

            मुंबई, दि. 28 : मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत आज जुहू येथील विद्यानिधी हायस्कूल प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 572 नोकरी इच्छुक उमेदवारांनी सहभाग घेतला. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या मेळाव्याचे उद्घाटन केले. 


            मेळाव्यात 43 कंपन्या, उद्योग तथा आस्थापनांनी सहभाग घेत त्यांच्याकडील 9 हजार 161 रिक्त जागा नोकरीसाठी उपलब्ध करून दिल्या. कॉसमॉस इंटिग्रेटेड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन ग्रुप ऑफ कंपनी, जीएस जॉब सोल्युशन, एस टेक्नॉलॉजी, डुआर्ज एच आर सर्व्हिसेस, हिंदू रोजगार डॉट कॉम, अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, स्मार्टस्टार्ट जॉब सोल्युशन्स, कोटक महिंद्रा, रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्शुरन्स, आयसीआयसीआय बँक, कल्पवृक्ष, एलआयसी ऑफ इंडिया, आदित्य बिर्ला कॅपिटल आदी कंपन्यांनी आज या मेळाव्यात सहभाग घेत त्यांच्याकडील रिक्त जागा नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी उपलब्ध केल्या. आज मेळाव्यामध्ये साधारण 304 उमेदवारांची प्राथमिक निवड विविध कंपन्यांनी केली, तर पंधरा उमेदवारांची नोकरीसाठी अंतिम निवड करण्यात आली. उर्वरित उमेदवारांची निवडप्रक्रिया पुढील काही दिवस सुरू राहील. राज्य शासनाच्या विविध आर्थिक विकास मंडळांनी मेळाव्यात सहभाग घेत त्यांच्याकडील रोजगार आणि स्वयंरोजगाराविषयी विविध कर्ज योजनांची माहिती उमेदवारांना दिली.


5 लाख रोजगार देण्याचे उद्दीष्ट – मंत्री मंगलप्रभात लोढा


            मंत्री श्री. लोढा यावेळी म्हणाले की, कौशल्य विकास विभागाने तरुणांना कौशल्य विकासाबरोबरच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. राज्य शासनाने 75 हजार सरकारी नोकऱ्या देण्याचा निर्धार केला आहे, त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाद्वारे विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात 5 लाख रोजगार देण्यात येतील. युवक-युवतींना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीची नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम प्रभावीपणे राबवेल. राज्यभरात 300 रोजगार मेळावे घेण्याचे नियोजित आहे, असे त्यांनी सांगितले.


            मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी आमदार अमित साटम, नागालँडचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य, विद्यानिधी शाळेचे कार्याध्यक्ष संजीव मंत्री, उपाध्यक्ष रमेशभाई मेहता, मेळाव्याचे समन्वयक प्रदीप दुर्गे, आशिष वाजपेयी, मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्र.वा. खंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.


 


००००

लोकप्रिय चित्ररथ श्रेणीसाठी ''महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती”या चित्ररथास सर्वोत्कृष्ट पसंती नोंदविण्याचे आवाहन

 लोकप्रिय चित्ररथ श्रेणीसाठी ''महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती”या चित्ररथास सर्वोत्कृष्ट पसंती नोंदविण्याचे आवाहन.

        मुंबई, दि. 28 : यंदाच्या वर्षी “ महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” हा विषय चित्ररथाव्दारे महाराष्ट्राने दिल्ली येथील कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिमाखात सादर केला.


            यामध्ये महाराष्ट्रातील अध्यात्मिक शक्ती असलेल्या साडेतीन पिठाचा देखावा, महाराष्ट्राची अमूर्त लोककला आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिर शैली दाखविण्यात आली होती.


            चित्ररथाला दोन प्रकारचे पुरस्कार असून पहिल्या प्रकारचा पुरस्कार तज्ञ समितीच्या अहवालावरुन मिळेल तर दूसऱ्या प्रकारचा पुरस्कार लोकप्रिय चित्ररथ या सदराखाली लोकांनी ऑनलाईन मत (वोटिंग) नोंदविल्यानुसार मिळेल. त्यामुळे या लोकप्रिय चित्ररथ श्रेणीसाठी सर्वोत्कृष्ट पसंती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


            लोकप्रिय चित्ररथ श्रेणीसाठी सर्वोत्कृष्ट पसंती नोंदविण्याचे आवाहन :


            साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती या महाराष्ट्राच्या चित्ररथाला क्रमांक 1 च्या पसंतीसाठी आपल्या मोबाइल क्रमांकावरुन खालीलप्रमाणे मेसेज मंगळवार दि.31.1.2023 च्या रात्री 11.45 वाजेपर्यंत पाठवावा.


            MYGOVPOLL337011,12 हा SMS 7738299899 या मोबाईल क्रमांकावर पाठवावा.


            MYGOVPOLL (Space) 337011,12


किंवा


(आपणास खालील लिंकवर जावून “महाराष्ट्र” या नावासमोर आपले ऑनलाईन मत नोंदविता येईल: https://www.mygov.in/group-pool/vote-your-favorite-tableau-republic-day-2023/ )


            आपण वरीलप्रमाणे Online voting करावे व त्यानंतर आपल्या संपर्कातील सर्वांना असे करण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp Group), फेसबुक (FB), व इतर समाज माध्यमांव्दारे हा संदेश पुढे पाठवावा आणि महाराष्ट्राला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवून देण्यासाठी विनंती करावी.  


0000


 

खेड्यामध्ये घर कौलारू

 एक साधं मातीच्या भिंतींना शेणाने सारवलेलं कौलारू घर , उन्हाळ्यात थंड अन् हिवाळ्यात उबदार , हवेशीर भरपूर उजेड येणारं , मोकळं , पैस , अनावश्यक वस्तूंची दाटी नसलेलं....


दोन चुलींचं स्वयंपाक घर , फळ्यांवर मोजकी पितळेची चकचकीत लहान मोठी भांडी आणि भिंतीला टेकवून ठेवलेल्या धान्याच्या कोठ्या....


स्वयंपाकघराला लागून जवळच एक ताज्या फुलांनी सजवलेलं , नाजूक पितळेच्या समईतील तेजस्वी ज्योतीने प्रकाशित झालेलं , उदाच्या सुगंधाने घर व्यापून टाकलेलं छानसं प्रसन्न देवघर ..


बाजूच्या खोलीत रजया अंथरून ठेवलेल्या दोन खाटा , भिंतींवर दोन चार खुंट्यांवर अडकवलेले मोजके कपडे , खाली कडेला दोन एक लोखंडी पेट्या बस एवढंच


मागे आडाची गोड्या पाण्याची विहीर , तिच्या आजूबाजूला पपई केळीची झाडे , साचलेल्या सांडपाण्यात फोफावलेला हिरव्या गार मोठ्या पानांचा अळू , मागे भरलेली कणसे डोलत असलेलं ज्वारीचं शेत....


घराच्या उजव्या बाजूला दहा फुटावर जनावरांचा कौलारू गोठा , रोज ताजा हिरवागार चारा खाऊन सुधृढ धष्टपुष्ट असलेल्या गायी म्हशींनी व्यापलेला , त्या मागे मोठ्या आंब्याच्या शेकडो झाडांची दाट हिरवीगार आमराई ...


डाव्या बाजूला बैलं मोकळी करून ठेवलेल्या बैल गाड्या , नांगरं आणि शेतीची इतर अवजारं , त्या मागे पेरु ची बाग , घराजवळच मांडवांवर चढवलेली काकड्या , कार्ली , दुधी नी लदबदलेली वेली , परिसरात अधे मधे चिचं , लिंबू , बोरं , आवळा अशा विविध फळांची झाडे...


घरासमोर वाळलेला चारा कौलारू छतावर पसरवलेली प्रशस्त हवेशीर पडवी ज्यात फक्त बसाय उठायला दोन चार खाटां अन् भिंती शेजारी थंडगार पाण्याचा काळया मातीचा माठ ....


बस , हीच काय ती प्रॉपर्टी ...


सकाळी सूर्योदयापूर्वी ताजे तवाने होऊन उठायचं की एका पाठोपाठ एक कामे सुरु...


गोठ्याची स्वच्छता , जनावरांची देखभाल , दूध संकलन झालं की समोरच्या पडवीत बसून नाश्ता...


नाश्ता म्हणजे काय , गूळ शेंगदाणे , ऋतू नुसार चुलीवर भाजलेले सोलाणे , हुरडा , वाटाणे , दही , भरीत , काकडी पेरु , त्यावर चुलीवर ताजं तापवलेल वाडगं भर दूध


सूर्य डोक्यावर येई पर्यंत शेतात किंवा मळ्यात कष्टाचं काम , आल्यावर चुलीवरचं ताजं जेवण कांदा भाकरी भरीत पिठल्याचं , मग थोडी वामकुक्षी की पुन्हा काम , सुर्यास्ताला कामं आटपून पडवीत येऊन निवांत हवेशीर बसायचं , फलाहार करायचा , पुन्हा हलका फेरफटका मारुन येऊन जेवायचं अन् लवकरच झोपायचं ..!


 जीव थकलेला , छान झोप लागते स्वस्थ ..!


सकाळी उठले की पुन्हा रूटीन सुरू...


एवढं सरळ साधं सोपं छान आयुष्य , ताजं स्वतः पिकवलेलं उच्य प्रतीचं पौष्टिक अन्न खाऊन , छान शुद्ध हवेत आरोग्याला पोषक अस हे सुखी जीवन


दगदग , टेन्शन , धावपळ , पळापळ , खाण्या पिण्याची हेळसांड , तब्येतीच्या तक्रारी ह्या पासून दूर...


ते सगळं आपण शहरी लोकांनी ओढवून घेतले आहे विनाकारण आपल्या अंगावर आपल्या नाही त्या गरजा वाढवून


त्या पूर्ण करता करता सुख शांती गमावून बसलो आहोत आपण , तब्येतीची वाट लावून बसलो आहोत आपण ..!


सरळ साधं आयुष्य गुंतागुंतीचं करुन बसलो आहोत आपण


स्पर्धा , अहंकार , क्रोध , द्वेष , मत्सर , हाव ह्या सगळ्यांना हृदयात कायमची जागा देऊन बसलो आहोत आपण


ह्यातून परतीचा सोपा मार्ग एकच , आपल्या गरजा कमी करण्याचा जो गमावून बसलो आहोत आपण...


आयुष्य होतं निवांत जगण्यासाठी जे धकाध


कीचं करून बसलो आहोत आपण....

Featured post

Lakshvedhi