🤘टाईमपास गुरूजीः- सांगा मुलांनो, जगात सर्वात पवित्र खाद्य कोणते ?
?
बराच वेळ झाला, कोणीच उत्तर दिले नाही....
शेवटी बंड्या उठला आणि म्हणाला, "सर, मी सांगू ?"
गुरूजीः- सांग बरे !!
बंड्याः- *तंबाखु* ....
कोणत्याही *दिवशी* चालते,
*एकादशीला* चालते,
*द्वादशीला* चालते,
कोणत्याही *सणाला* चालते,
*अमावस्येला* चालते,
*पौर्णिमेला* चालते,
*सकाळी* चालते,
*रात्री* दोन वाजताही चालते,
*३६५ दिवस अहोरात्र*
चालते,
किती ही *पवित्र* वस्तू
आणि *कुणाचीही* चालते, शिवाशिव नाही,
*अंत्यसंस्काराच्या* वेळीही
चालते व *जन्मावेळीही* चालते. हिला खायला केंव्हाच बंधन
नाही,अगदी जगन्मान्य,
जातपात नाही, धर्म नाही,
चोळून खातात, मळून देतात,
चुना लावून खातात,
भाग्यवान वनस्पती आहे हो !!
पैशापेक्षा जास्त जपतात
आणि न विसरता खिशात
घेतात.
सगळे विसरतील पण *तंबाखु* विसरणार नाहीत.
समोरच्याला वेळ देणार नाही पण *तंबाखु* खाण्यासाठी कोपर्यात जाऊन मळणार.
अतिप्रिय खाद्य.
९०० रूपये किलो आहे हो ही !!
*काजूपेक्षा* महाग पण गरीबातला गरीब खातो.
काजू कधी खिशात ठेवतो का ?
नाही.
पण ही खिशातल्या आतल्या कप्प्यात राहते. अगदी *हृदयाला* कवटाळून असते.
नाही का ?
उद्या शाळेत बंड्याचा सत्कार समारंभ आहे !!! सर्वांनी या ....
😀😀😀😀
No comments:
Post a Comment