Monday, 14 March 2022

 महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना मौखिक व लेखी संवाद कौशल्य शिकवण्यावर भर द्यावा' :

न्या. दीपांकर दत्ता.

            विधी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना मौखिक व लेखी संवाद कौशल्य शिकवण्यावर भर द्यावा. त्यांचेसाठी समूह चर्चा, वक्तृत्व स्पर्धा, चर्चासत्रे, अतिथी व्याख्याने, प्रकल्प व कार्यशाळांचे आयोजन करून त्यांच्या शिक्षणाच्या कक्षा रुंदवाव्या असे न्या. दत्ता यांनी सांगितले.  

            पाच वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाच्या पहिल्याच तुकडीत प्रवेश घेऊन मुख्य न्यायमूर्ती पदी नियुक्त होणारे आपण पहिले विधी पदवीधर ठरलो असे न्या. दीपंकर दत्ता यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. शिक्षणाला अंत नसतो; न्यायाधीश हा आयुष्यभर विद्यार्थी असतो कारण तो कायद्यांची व्याख्या व उकल विविध रूपाने शिकतच असतो असे न्या. दत्ता यांनी सांगितले.    

जीवनात मोठे झाले तरीही विद्यार्थ्यांनी आपले पाय जमिनीवर ठेवावे, चिकाटी व संयम बाळगावा तसेच त्याग व सेवा या गुणांचा अंगीकार करून राष्ट्रसेवा करावी असे आवाहन न्या. दत्ता यांनी केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ऍड. महेंद्र घेलानी यांनी संस्थेची माहिती दिली व अतिथींचा परिचय करून दिला. 


 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi