Wednesday, 29 December 2021

 'युनिकॉर्न' ! 

व्यावसायिक जगता मध्ये एक 'युनिकॉर्न' म्हणजे १ ते १० बिलियन अमेरिकन डॉलर्स मूल्य असलेला एक स्टार्टअप व्यवसाय. (एक बिलियन डॉलर्स म्हणजे आताच्या बाजार भावानुसार जवळपास साडे सात हजार कोटी रुपये.) एक युनिकॉर्न निर्माण होणे ही अत्यंत दुर्मिळ घटना मानली जाते. प्रचंड मेहनत, नवं कल्पना, व्यावसायिकता अशा अनेक गोष्टींचा संगम साधत तुटपुंज्या पाठबळावर सुरू झालेला एक छोटासा स्टार्टअप युनिकॉर्न मध्ये परावर्तित होतो. 

तर आज या युनिकॉर्न बद्दल सांगायचे कारण म्हणजे २०११ ते २०१४ या काळात जागतिक पातळीवरचे अर्थतज्ज्ञ आपले पंतप्रधान असले तरी दरवर्षी फक्त एक युनिकॉर्न भारतात निर्माण व्हायचा. परंतु २०१४ ला अर्थतज्ज्ञ गेले आणि एक तथाकथित कमी शिकलेला व्यक्ती भारताचा पंतप्रधान झाला. त्या कमी शिक्षित व्यक्तीने मेक इन इंडिया नामक संकल्पना प्रमोट केल्यावर जवळपास ५० हजार नवीन स्टार्टअप भारतात सुरू झाले. आणि २०१४ ते डिसेंबर २०२१ पर्यंत भारताने सर्व युरोपियन देशांना मागे टाकत आतापर्यंत एकूण ५४ युनिकॉर्न निर्माण केले आहेत. 

फक्त २०२१ या एका वर्षामध्येच भारताने कमीतकमी साडे सात हजार कोटी रुपये मूल्य असलेले ४० स्टार्टअप युनिकॉर्न निर्माण केले. यामध्ये BYJU अग्रक्रमावर असून फक्त BYJU चे बाजारमूल्य २१ बिलियन डॉलर्स म्हणजे दीड लाख कोटी रुपयांच्या वर आहे. या भारतीय स्टार्टअप व्यावसायिकांनी अंदाजे १५ लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेल्या कंपन्या व २० लाखाच्या वर नवीन रोजगार निर्माण केले आहेत. 

हे फक्त त्यांचे यश नाही तर हे तुमचे आमचे देखील यश आहे. चायनीज मालावर बहिष्कार टाका असे सुचवणारे व्हाट्सएप फॉरवर्ड करणाऱ्या सामान्य लोकांची खिल्ली उडवणारे अतिशहाणे आपण आपल्या आजूबाजूला पाहिले आहेत. पण २०२१ च्या दिवाळीत याच सामान्य लोकांनी चीनला ५० हजार कोटी रुपयांचा तडाखा दिला आहे. सद्य भारत सरकार भीम ऍप-भारत पे आदी ऍप वरून ऑनलाइन व्यवहार प्रमोट करते म्हणून मास्टर कार्ड सारख्या अमेरिकन कंपन्या त्यांच्या सरकारकडे रडत आहेत. पण फक्त परदेशीच नव्हे तर स्वतः अ दर्जाच्या सर्व सुविधा उपभोगत 'उद्योजक म्हणजे आपले शत्रू व गरिबी म्हणजे दागिना' असे बिंबवणाऱ्या समाजवादी,गांधीवादी, कम्युनिस्ट असलेल्या स्थानिक भोंदूबाबांपासून देखील आपल्याला सावध रहायचे आहे. 

भारताच्या पुढे चीन (३०१ युनिकॉर्न ) व अमेरिका (४८७ युनिकॉर्न) असून अंदाजे २०३० पर्यंत भारत या क्षेत्रात चीनला मागे टाकेल. परंतु २०३० पर्यंत कमीतकमी दहा हजार कोटी रुपये मूल्य असलेले ४०० नवीन उद्योजक व त्यापाठोपाठ लाखो रोजगार निर्माण व्हावेत म्हणून आपण देशी ऍप्स, देशी उत्पादनं, देशी सेवा उद्योग यांची खरेदी-विक्री व मौखिक जाहिरात करणे सुरूच ठेवायचे आहे. आपला पैसा आपल्या देशातील समविचारी लोकांच्या खिशातच जाईल याची काळजी आपणच घ्यायची आहे. 

तुषार दामगुडे

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi