Monday, 2 March 2026

चांदोली अभयारण्यातील ३२ गावांच्या पुनर्वसनासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव

 चांदोली अभयारण्यातील ३२ गावांच्या पुनर्वसनासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव

- वनमंत्री गणेश नाईक

 

मुंबईदि. २६ : चांदोली वन्यजीव अभयारण्य परिसरातील गावांच्या पुनर्वसनाबाबत शासन सकारात्मक असून याबाबत मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवला जाईलअसे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत अर्धा तास चर्चेला उत्तर देताना सांगितले.

सदस्य सत्यजित देशमुख यांनी चांदोली धरण परिक्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना नागरी सोयी सुविधा उपलब्ध न झाल्याबाबत उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना मंत्री गणेश नाईक बोलत होते.

प्रदूषणाच्या कारणांच्या प्रमाणात त्यांना दंड आकारण्यात आला असल्याचे त्यां

 पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, या परिसरातील उद्योगांबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबंधित उद्योगांना वेळोवेळी कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. प्रदूषणाच्या कारणांच्या प्रमाणात त्यांना दंड आकारण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद केले. तथापि केवळ दंडात्मक कारवाईने प्रश्न सुटणार नसल्याने दंडाची रक्कम वाढविण्याचाही विचार सुरू असल्याचे पर्यावरण मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले.


उद्योगांमध्ये ‘कंटीन्युअस एम्बियंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम’ (सीएएक्यूएमएस) आणि ‘ऑनलाइन कंटीन्युअस एमिशन मॉनिटरिंग सिस्टीम’ (ओसीईएमएस) बसविण्यात आल्याची माहिती देत, त्याद्वारे सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड आदींचे प्रमाण तपासले जात असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, रोजगार आणि सीएसआरमधून विकासकामे करण्याबाबत संबंधित विभागांशी समन्वय साधणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचे अहवाल व स्थानिक जनतेच्या तक्रारींतील तफावत दूर करण्यासाठी स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन तपास करणार असल्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.


०००००

राजुरा-चंद्रपूर परिसरातील प्रदूषण प्रकरणी पाहणी करणार; नियमांचे पालन न करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करणार

 राजुरा-चंद्रपूर परिसरातील प्रदूषण प्रकरणी पाहणी करणार;

नियमांचे पालन न करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करणार

- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

·         संबधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश

मुंबईदि. २६ : राजुरा-चंद्रपूर परिसरातील औद्योगिक प्रदूषणाच्या तक्रारींची गंभीर दखल घेत आपण स्वतः अधिवेशनानंतर या परिसराची प्रत्यक्ष पाहणी करूअसे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत सांगितले.

याप्रकरणी माहिती घेण्यासाठी पर्यावरण मंत्र्यांनी बोलावल्यानंतरही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आले नसल्याने हा सभागृहाचा अवमान असल्याचे सांगून तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांस निलंबित करण्याचे आदेश दिले.

सदस्य देवराव भोंगळे यांनी नांदाफाटा येथे असलेल्या सिमेंट कंपन्यांमुळे गडचांदूर येथे होत असलेल्या प्रदूषणाबाबत उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या.

होळी, धुलीवंदनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या शुभेच्छा

 होळीधुलीवंदनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या शुभेच्छा

 

मुंबई, दि.2: महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी होळी तसेच धुलीवंदनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

होलिकापूजन तसेच प्रेमस्नेह व बंधुभावाचे प्रतिक असलेला रंगोत्सव सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो व परस्परांमधील द्वेष भावना नष्ट करो या अशा शुभेच्छांसह राज्यपाल श्री. देवव्रत यांनी नागरीकांना होळी व रंगोत्सव साजरा करताना पर्यावरण रक्षणाबद्दल जागरुक राहण्याचे आवाहन आपल्या संदेशातून केले आहे.

 0000

शिक्षण, राजकारण, समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक दुवा निखळला

 शिक्षणराजकारणसमाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक दुवा निखळला

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ विचारवंतमाजी खासदारमाजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांना श्रद्धांजली

 

मुंबईदि. 2: विद्वत्तातत्वनिष्ठ आणि लोकाभिमुखता यांचा त्रिवेणी संगम असलेल्या माजी खासदार प्रा. डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या निधनामुळे शिक्षणराजकारण आणि समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक असा दुवा निखळला आहेअशा शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ विचारवंतमाजी खासदारमाजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतातप्रा. डॉ. वाघमारे यांचा इंग्रजी भाषा आणि साहित्यासह अर्थशास्त्रराज्यशास्त्राचा सखोल अभ्यास होता. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अध्यापन आणि प्रशासन या अंगाने मोठा ठसा उमटवला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही त्यांनी प्रभावी कार्य केले. विशेष म्हणजे त्यांनी लातूरचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्षपदही भुषविले. या काळात त्यांनी शहराच्या विकासासाठी लातूर व्हिजन म्हणून आराखडा तयार केला. शहरातील स्वच्छतापाणी पुरवठा तसेच नागरी सुविधांसाठी प्रयत्न केले. त्यामुळे लातूरला त्यावेळी संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानात प्रथम पुरस्कारदेखील मिळाला होता. राज्यसभा सदस्य म्हणूनही त्यांनी विविध संसदीय समितीवर काम केले. लातूरचे किल्लारी भूकंपशास्त्र संशोधन आणि नांदेड - किनवटच्या आदिवासी संशोधन आणि अभ्यास केंद्रांच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. त्यांना संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिवेशनात भारताच्या प्रतिनिधी मंडळाचा सदस्य म्हणून म्हणणे मांडण्याची संधी मिळाली होती. त्यांनी वैविध्यपूर्ण विषयांवर विपुल साहित्य निर्मिती केली. त्यांची ही ग्रंथसंपदा आपल्या सर्वांसाठी एक प्रकारचे संचित आहे.

ज्येष्ठ विचारवंत डॉ वाघमारे यांच्या निधनामुळे शिक्षणराजकारण आणि समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक असा दुवा निखळला आहे. ही सामाजिक क्षेत्राची हानी आहे. आपण वाघमारे कुटूबिंयाच्या दुःखात सहभागी असूनईश्वराने त्यांना हा आघात सहन करण्याची क्षमता द्यावी अशी प्रार्थना करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. वाघमारे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

होलीका देवी असली तरी तीची होळी करणारा हा अग्नी देव आहे, त्या देवास कोणाच्या मनात

 होलीका देवी असली तरी तीची  होळी करणारा हा अग्नी देव आहे, त्या देवास कोणाच्या मनात काय चालू आहे ते पक्क ठाऊक असतं. 


भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसणारी होलीका ही त्याची स्वत:ची आत्या होती पण कर्म वाईट असल्याने अग्नीचे वरदान सूद्धा तीला खाक होण्यापासून वाचवू शकले नाहि. कारण ईश्वराचा वरदहस्त डोक्यावर असलेला प्रल्हाद तीच्या मांडीवर होता. 


 त्या पवित्र अग्नी समोर मनात ऐक आणी बाहेर दूसर अस नाही चालंत , कारण आतलं वाईट जळण्यासाठी वाईट विचार धरून ठेवलेल्या त्या जिवाच्या शरीराला सूद्दा अग्नीचा दाह ऐक ना ऐक दिवस  पोहोचतोच. 


म्हणुनच आपण  आपल्या ईष्ट गुरूला मन पवित्र आणी स्वच्छ ठेऊन प्रामाणिक पणे शरण गेलो की गुरू आपल्याला परमेश्वराची भेट ही घडवतोच आणी गुरूला शरण गेलेल्या आणी गुरुचे अखंड नामस्मरण करणार्या या जीवात्म्यास पंचभहाभुतांचे सूद्धा भय नाही. 


"अग्ने नय सुपथा राये अस्मान् विश्वानि देव वयुनानि विद्वान्। युयोध्यस्मज्जुहुराणमेनो भूयिष्ठां ते नमउक्तिं विधेम ..."।।

                                    - ऋग्वेद 


"O Agni, help us to gain prosperity by leading us on the righteous path, you know all our thoughts and actions. Redeem us from all our sins and evil ways. We bow before you with gratitude."


 

हे अग्नि, आम्हाला धार्मिक मार्गावर घेऊन समृद्धी मिळविण्यास मदत कर, तू आमचे सर्व विचार आणि कृती जाणतोस. आमच्या सर्व पापांपासून आणि वाईट मार्गांपासून आम्हाला मुक्त कर. आम्ही कृतज्ञतेने तुझ्यापुढे नतमस्तक होतो."


ज्याचा शेवट गोड , ते सर्वच गोड. 

फाल्गुन शके १९४७ मधील वर्षातील या शेवटच्या सणाच्या दीवशी आपण आपल्या मनातील सर्व किल्मिष दुर करू आणी मानवी देहाचा शेवट करून आपल्याला या पंचमहाभुतात विलीन करणार्या अग्नी देवतेस शरण जाऊ.


॥ ॐ अग्नी देवताभ्यो नम: ॥ 



🔥पवित्र होळीच्या खुप खुप शुभेच्छा 🔥

समृद्धी महामार्गावरील सुरक्षित प्रवासासाठी मानांकनानुसार

 समृद्धी महामार्गावरील सुरक्षित प्रवासासाठी मानांकनानुसार सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. या महामार्गावर क्रॅश बॅरियर्सरबर स्ट्रिप्ससाईनबोर्ड आदी सुविधा बसविण्यात आल्या असल्याची माहिती राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.

महामार्गावर नियमित पोलीस पेट्रोलिंग तसेच ॲम्बुलन्स पेट्रोलिंग सुरू असून आपत्कालीन परिस्थितीसाठी स्वतंत्र ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय 21 क्यूआरव्ही (क्विक रिस्पॉन्स व्हेईकल) पथके कार्यान्वित असल्याचेही राज्यमंत्र्यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi