Sunday, 2 November 2025

देशात 2202 कोटींची सर्वाधिक सोयाबीन खरेदी महाराष्ट्रात

 व्यवस्थापकीय संचालक डुबे पाटील यांनी महासंघाच्या वर्षभरातील कामाचा आढावा सादर केला. देशात 2202 कोटींची सर्वाधिक सोयाबीन खरेदी महाराष्ट्रात झाली असून याचा लाभ दोन लाख 56 हजार शेतकऱ्यांना झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. महासंघाची राज्यात 128 ठिकाणी मालमत्ता असून त्यांची क्षमता दोन लाख 80 हजार मे.टन असल्याचे ते म्हणाले. महासंघाने मागील वर्षात 101 कोटींचा निव्वळ नफा मिळविल्याचे त्यांनी सांगितले. महासंघाच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 51 लाख रुपयांचा निधी देण्यात आला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

 

मागील वर्षात राज्य शासन विभागांतर्गत सर्वोत्कृष्ट व्यवहार करणाऱ्या संस्थानाफेड खरेदी विभागांतर्गत सर्वोत्कृष्ट व्यवहार करणाऱ्या संस्थारासायनिक / भगीरथ खत सर्वोत्कृष्ट व्यवहार करणाऱ्या संस्था त्याचप्रमाणे 2024-25 मध्ये उत्कृष्ट कामकाज करणारे पणन महासंघाचे अधिकारी / कर्मचारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाची 67 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सर्व संस्थांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांचे आवाहन

 महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाची 67 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सर्व संस्थांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे

अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांचे आवाहन

           

मुंबईदि. ३१ : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यवसायवृद्धीसाठी प्रयत्न केले जात असून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सर्व संलग्न संस्थांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांनी केले.

 

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाची 67 वी वार्षिक सर्वसाधारण सभा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झाली. महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरेउपाध्यक्ष रोहित निकमव्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे पाटीलमहासंघाचे संचालकअधिकारी तसेच संलग्नित संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

दत्तात्रय पानसरे म्हणालेपीक खरेदीबाबत महासंघामार्फत नियमावली तयार केली जाणार आहे. शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी महासंघाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना नियमित प्रशिक्षण देण्यात यावेअशी सूचना करुन महासंघाची नवीन गोदामे बांधणेमालमत्ता सुरक्षित राखणे आणि त्यात वाढ करणेसंकेतस्थळ वापरामध्ये सुलभता आणणे यासाठी महासंघाने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर हे वर्ष सहकार वर्ष म्हणून घोषित केलेले असल्याने जास्तीत जास्त सहकारी संस्थांना खरेदीचे कामकाज देण्याबाबत पणन महासंघामार्फत राज्य शासनाला विनंती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री गुरु तेग बहादुर साहिब जी शहिदी समागमाच्या नियोजनासाठी गोव्यात २ नोव्हेंबर रोजी समन्वय बैठक

 श्री गुरु तेग बहादुर साहिब जी शहिदी समागमाच्या

नियोजनासाठी गोव्यात २ नोव्हेंबर रोजी समन्वय बैठक

 

मुंबई दि.३१ : श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागमाच्या पूर्वतयारीचा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून गोवा राज्यातील चिकालीम पंचायत कार्यालय सभागृह (वास्को) येथे गोरबंजारा दिवाळी महोत्सव व समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक रविवारदि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत होणार आहे.

बैठकीचे अध्यक्षस्थान बंजारा समाजाचे धर्मगुरु व महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य  श्री बाबुसिंग महाराज (राठोड) पोहरादेवी पिठाधीश्वर भूषविणार आहेत. या बैठकीत श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागमासाठी राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमाचे नियोजनसमन्वय आणि प्रचार आराखडा निश्चित करण्यात येणार आहे.

शहिदी समागमाचे प्रमुख कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत तसेच राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने नांदेडनागपूर आणि नवी मुंबई येथे आयोजित होणार असूननांदेड येथील मुख्य कार्यक्रमास  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीला महंत सुनीलजी महाराजमहंत जितेंद्रजी महाराजसरदार सेवालाल स्वामीजीमहंत गोपालजी महाराजरमेशजी महाराज आदी धर्मगुरु व संत उपस्थित राहणार आहेत. तरप्रमुख पाहुण्यांमध्ये गोवा राज्याचे मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंतश्री गुरुतेग बहादुर साहिब जी ३५० वा शहिदी समागम कार्यक्रम २०२५ महाराष्ट्र राज्य समिती राज्य समन्वयक श्री रामेश्वर नाईकधर्मरक्षक व बारा धाम निर्माते  किसनभाऊ राठोडराष्ट्रीय बंजारा परिषद अध्यक्ष  विलास राठोडप्रदेशाध्यक्ष  भिकनजी जाधवगोवा राज्य अध्यक्ष  सुरेश राजपूत तसेच उद्योजक  आनंद अंगाडी आदी  उपस्थित राहणार आहेत.

गुरुबंधुत्व दृढ करणेसमाजांमधील ऐक्य वृद्धिंगत करणे आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. शीखबंजारालबानामोहयालशिकलगार आणि सिंधी समाजातील बांधवांनी या महोत्सवात सहभागी व्हावेअसे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बेस्ट उपक्रमात नवीन इलेक्ट्रिक बसगाड्‌यांचे पर्व

 बेस्ट उपक्रमात नवीन इलेक्ट्रिक बसगाड्‌यांचे पर्व

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमा मार्फत एकूण 150 नवीन 12 मीटन लांबीच्या संपूर्णपणे इलेक्ट्रिक बसगाड्‌या प्रवर्तित होत आहेत. या बसगाड्या 'वेट लीजपद्धतीने चालविल्या जाणार असूनत्यामुळे मुंबईतील पर्यावरणपूरक आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे.

 150 इलेक्ट्रिक बसगाड्या मुंबईतील 21 मार्गावर चालविण्यात येणार आहेतज्यामध्ये 21 प्रभागांचा समावेश आहे. बसगाड्यांची गुणवत्ता नियंत्रण केंद्रा‌द्वारे नियमित देखरेख केली जाईल.

ही बससेवा अंधेरी (प.)जोगेश्वरी (प.)कुर्ला (पूर्व व पश्चिम)बांद्रा (प.)कांदिवली (प.) आणि बोरिवली (प.) या उपनगरी रेल्वे स्थानकांशी जोडली जाणार आहे.

या बसगाड्या मेट्रो लाईन क्र. 1,2A, 7 आणि 3 (अॅक्वा लाईन) या प्रमुख मेट्रो मार्गाशी जोडणी साधून मेट्रो प्रवाशांना अखंड शेवटच्या टप्प्यापर्यतची जोडणी उपलब्ध करून देतील.

ओशिवरा, गोरेगाव येथील आगारातील पर्यावरणस्नेही बसेसचे देखील लोकार्पण

 ओशिवरागोरेगाव येथील आगारातील पर्यावरणस्नेही बसेसचे देखील लोकार्पण

 कुलाबा आगारासह ओशिवरागोरेगाव येथील आगारातील पर्यावरणस्नेही बसेसचे  देखील लोकार्पण करण्यात आले.  यामुळे सुमारे 1.9 लाख मुंबईकर प्रवाशांना दररोज दर्जेदार प्रवास अनुभवता येईल.

मुख्यमंत्री यांच्या समवेत मान्यवरांनी क्रमांक 4068 वीर कोतवाल उद्यान कुर्ला नामफलकाच्या बस मध्ये बसून पाहणी केलीमाहिती घेतली व काही अंतर प्रवास केला.

पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बसमुळे प्रवासाचे नवीन पर्व

 पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बसमुळे प्रवासाचे नवीन पर्व--उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले कीमुंबईकरांसाठी  'बेस्ट'आणि लोकल रेल्वे हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. नागरिकांना चांगला प्रवास मिळावा यासाठी साडेतीन हजार कोटी रुपये निधी तरतूद केली आहे. एकेकाळी ट्राम व  बग्गी धावलेल्या मुंबई शहरातील रस्त्यांवर आता या पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बस धावणार आहेप्रवासाचे हे नवीन पर्व सुरू आहे. ताफ्यात समाविष्ट झालेल्यामध्ये नियमित लांब बसेसबरोबर मिडी बसेस देखील आहेत. ज्या वर्दळीच्या रस्त्यावर सहजगतीने मार्गक्रमण करतील.

मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक नागरिक येत असतात,  शहरातील सुविधा वाढविण्यासाठी लक्ष दिले जात आहे.

शासनाच्या कामाचा झपाटा मोठा असून शहराला कोस्टल रोडअटल सेतू मेट्रो यासह  काँक्रीट रस्तेपूल अशा जलद आणि उत्तम दळणवळण सुविधा देण्यात येत आहेत. असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

ते म्हणालेकर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेताना दिवाळीपूर्वीच बेस्ट कर्मचाऱ्यांना बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांइतका बोनस दिला आहे. शासन कर्मचाऱ्यांसाठी हिताचे काम करते असून मुंबईकरांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी सफाई कर्मचारी अविश्रांत काम करीत असतातते खरे मुंबईचे हिरो आहेत. या सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांचे भविष्य चांगले व्हावे यासाठी देखील निर्णय घेतले आहेत. त्यांच्या उच्च शिक्षणासाठी निधी उपलब्ध करणारी योजना लागू केली आहेअशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली

Saturday, 1 November 2025

पर्यावरणस्नेही बसेसमुळे मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासह पर्यावरणाचे रक्षण

 पर्यावरणस्नेही बसेसमुळे मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासह पर्यावरणाचे रक्षण

-- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'बेस्टच्या ताफ्यात पर्यावरणस्नेही १५० बस सामील

 1.9 लाख मुंबईकर प्रवाशांना दररोज मिळेल दर्जेदार प्रवासाचा अनुभव

मुंबईदिनांक 28 : ‘बेस्ट’च्या ताफ्यात भविष्यात 100 टक्के पर्यावरणस्नेही बसेस असणार आहेत त्यापैकी 150 बस देण्यात आल्या. मुंबईकरांच्या सुखकर प्रवासाची सोय करतानाच या नवीन पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बसेसमुळे पर्यावरणाचे देखील रक्षण होणार आहे. 'बेस्टही मुंबईची जीवनवाहिनी असून उपनगरीय लोकल रेल्वेमेट्रो ट्रेन यांना प्रवाशांशी जोडण्यासाठी बस सेवा महत्त्वाची आहे. या बसेसमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत होत आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

        बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (BEST)च्या कुलाबा येथील आगारात मुख्यमंत्री  फडणवीस यांचे हस्ते 150 नवीन इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरकौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढासांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलारमुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, 'बेस्ट'च्या महाव्यवस्थापक सोनिया सेठीअतिरिक्त महाव्यवस्थापक आर. आर. डुबल व ए.एस. राव मुख्य अभियंता राजन गंदेवारमुख्य वाहतूक व्यवस्थापक रमेश मडावी उपस्थित होते.

      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेपर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने 5 हजार बसेस घेण्याचा निर्णय पूर्वीच झाला आहे. त्या टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जात आहेत.  मुंबई वन ॲपच्या माध्यमातून सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी  'सिंगल तिकीट सिस्टीमआणण्यात आली आहे. प्रवासी भाड्याचे उत्पन्न  जास्त असेल तर बेस्ट आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. यासाठी हे उत्पन्न जास्तीत जास्त वाढविण्यासाठी काम केले जावेअधिक व्यावसायिक दृष्टिकोन आणला जावा. 'बेस्टसक्षमीकरणासाठी राज्य शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका तत्पर आहेचअसा आश्वासक दिलासा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला

Featured post

Lakshvedhi