Wednesday, 12 February 2025

साताऱ्यात साकारणार वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी (जलक्रीडा))

 साताऱ्यात साकारणार वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

 

मुंबई  दि. 11 : सातारा जिल्ह्यात जलपर्यटनासाठी भरपूर वाव आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटन विभागातर्फे जिल्ह्यात वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी लवकरात लवकर साकारण्याचा मानस असल्याची माहिती पर्यटनखनीकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

  मंत्रालयातील दालनात पर्यटन विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी पर्यटन विभागाचे संचालक बी. एन. पाटीलव्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशीअधीक्षक अभियंता बोरसे आणि इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

            दूरदृश्य प्रणाली (व्हीसी) द्वारे सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटीलउपवनसंरक्षक आदिती भारद्वाजजलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे तसेच इतर विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 राज्यातील सर्वात लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. त्यासोबतच त्यांना जल पर्यटनाचाही आनंद घेता यावा म्हणून सातारा जिल्ह्यात वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी साकारण्यासाठी काम सुरू करण्याच्या सूचना श्री. देसाई यांनी दिल्या. जिल्ह्यातील मुनावळेकोयना नगरहेळवाक आणि पापर्डे या ठिकाणी बोट क्लबचे काम सुरू आहे. त्यापैकी काही ठिकाणी बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. मात्र जल पर्यटन फक्त बोटिंगपुरते सीमित न राहता जलक्रीडा अकादमी झाल्यानंतर पर्यटकांना वेगळा अनुभव मिळेल. असा विश्वास श्री. देसाई यांनी व्यक्त केला. तसेच हा प्रकल्प साकारल्यानंतर स्थानिक तरुणांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध होईल या दृष्टीने काम करण्याचे सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तरुणांना प्रशिक्षणही देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. हा सर्व प्रकल्प सौरऊर्जेवर करण्याच्या विशेष सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

****

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांमध्ये समाजाच्या आणि देशाच्या विकासाची बिजे

 पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांमध्ये

समाजाच्या आणि देशाच्या विकासाची बिजे

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 11 : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्मिक मानव दर्शन तत्त्वज्ञान मांडले. यांच्या या विचारांमध्ये समाजाच्या आणि देशाच्या विकासाची आणि पर्यायाने मानवजातीच्या कल्याणाची बिजे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. धर्मवीर संभाजी महाराज सागरी किनारा मार्गावरील भुलाबाई देसाई मार्ग येथील चौकाचे पंडित दीनदयाळ उपाध्याय चौक नामकरण व लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

    पंडित दीनदयाळ यांनी आपले सर्व जीवन राष्ट्रकार्यासाठी व्यतीत केल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीआज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशातील गरीब जनतेच्या विकासासाठी करत असलेल्या कामांची प्रेरणा ही पंडित दीनदयाळ यांच्या विचारांची आहे. देशातील २५ कोटी जनतेला मागील दहा वर्षात दारिद्य्र रेषेच्या वर आणले आहे. शेवटच्या घटकापर्यंत घरपाणीवीजशौचालय यासह मूलभूत सुविधा पुरवण्यात येत आहेत. हाच विचार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडला होता. 'विकास भी और विरसात भी हा मंत्र प्रधानमंत्री मोदी यांनी दिला आहे. हा विचार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सर्वप्रथम मांडला होता. त्याच विचारांवर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन काम करत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

     मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीप्राचीन भारतीय जीवन पद्धतीमध्ये शाश्वत विकासाचा मार्ग असल्याचे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दाखवून दिले. जगात फक्त साम्यवाद आणि भांडवलशाही असे दोनच विचार होते त्यावेळी उपाध्याय यांनी एकात्मिक मानव दर्शन सारखा शाश्वत विकासाचा विचार मांडला. प्राचीन भारतीय जीवन पद्धतीमध्ये व्यक्ती समाजाशीसमाज राष्ट्रांशी आणि राष्ट्र विश्वाशी जोडलेले आहे. यामध्ये कोणताही विवाद नाही आणि त्यातूनच मानवजातीचा सर्वांगीण विकास करता येईल हे तत्त्वज्ञान या विचारांमध्ये आहे. समाजशेतीव्यापार यांचा विकासआंतरराष्ट्रीय धोरणपरराष्ट्र कूटनीतीयांचा एकत्रित विचार म्हणजे एकात्मिक मानव दर्शन होय. त्यांच्या ५७ व्या पुण्यतिथी निमित्त या चौकास पंडित दीनदयाळ उपाध्याय चौक असे नाव देण्यात आले आहे. त्यांचे विचार याठिकाणी कोरण्याचे काम, ही त्यांच्यासाठी खरी आदरांजली आहे.

              कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले कीपंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेला एकात्मिक विकासाचा विचार हा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी राज्य शासन काम करत आहे. विकासाच्या या प्रक्रियेत जनतेने आणि बुद्धिजीवी लोकांनी शासनासोबत यावे असे आवाहनही त्यांनी केले.

   मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आलेत्यानंतर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनावर आणि विचारांविषयी उभारण्यात आलेल्या शिल्पांची पाहणी त्यांनी केली.

कार्यक्रमास मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणीलोढा फाउंडेशनच्या अध्यक्ष मंजू लोढादीनदयाल रिसर्च इन्स्टिट्यूटचे अतुल जैननिखिल मुंडलेमनुभाई अगरवालपंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे भाचे विनोद शुक्लाभाची मधू शर्मा यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Tuesday, 11 February 2025

मेरा भारत महान,जय श्री छत्रपती शिवाजी महाराजा

 


पूर्वीच्या काळी लोक कांदा फोडूनच का खात असत ?*

 *पूर्वीच्या काळी, लोक कांदा फोडूनच का खात असत ?* 


तुम्ही स्वतःला कधी प्रश्न केला आहे का की आमच्या वडिलधाऱ्यांकडे सर्व साधने असूनही कांदा का खात असत, ते कापून का खात नाहीत? तर तिचे उत्तर खालीलप्रमाणे आहे....

गेल्या 5000 वर्षांपासून आणि आता जगभरात कांदा पिकवला जातो आणि खाल्ला जातो. कांदा चावल्याने इतर कोणत्याही पदार्थाची रासायनिक क्रिया जितक्या वेगाने होत नाही. कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते म्हणून रासायनिक प्रक्रियेचे शेवटचे उत्पादन म्हणजे सल्फ्यूरिक ऍसिड (H2SO4), हे ऍसिड एक्वा रेजीया नंतर आढळणारे सर्वात शक्तिशाली ऍसिड आहे जे सोने आणि प्लॅटिनम वगळता कोणत्याही धातूसह कार्य करते. त्याचा नाश करू शकतो. दुसरे म्हणजे, कांद्याच्या प्रत्येक थराच्या वर आणि खालच्या बाजूला एक जॅकल असते, जे निर्दोष असते. ती चावल्याने वेगळी केली जाते, चावल्यावर ती एकत्र कापली जाते. त्यामुळे कोणत्याही धातूने कांदा कापणे योग्य नाही. स्वत:ला मॉडर्न दिसण्यासाठी ते कापून नाही तर तोडून खावे. तुम्हीही भविष्यात असेच करा. हा गंधक असलेला पदार्थ गाठीच्या (कांदा) वरच्या थरांमध्ये सर्वात जास्त असतो आणि त्याचे मुळ मध्यभागी असते. कलेच्या मध्यभागी आढळणारे क्वेर्सेटिन (कांदा) खूप प्रभावी आहे

नेदरलँड्सच्या वागेनिंगेन युनिव्हर्सिटीच्या शोधानुसार, तरुणपणा टिकवून ठेवणारे अँटिऑक्सिडंट. आणि व्हिटॅमिन ई चा मुख्य स्त्रोत आहे. तसे, हा पदार्थ चहा आणि सफरचंदात आढळतो, परंतु आतड्याच्या मध्यभागी आढळणारा पदार्थ (कांदा) चहाच्या पदार्थापेक्षा दुप्पट आणि सफरचंदात आढळणाऱ्या समान पदार्थापेक्षा तिप्पट वेगाने पचतो. . 100 ग्रॅम नॉट्समध्ये (कांदा) 22.40 ते 51.82 मिलीग्राम असते. बर्न युनिव्हर्सिटी स्वित्झर्लंडने उंदरांना दररोज एक ग्रॅम कांदा दिला आणि त्यांची हाडे 17% मजबूत झाली. कांद्याचा मधला भाग पोटातील व्रण आणि हृदयाचे सर्व प्रकारचे आजार बरे करतो. गाठी (कांदा) आणि मधला भाग यावर संपूर्ण पुस्तक लिहिता येईल पण आजसाठी एवढेच.

तेव्हा मित्रांनो, कांदा कापून कोशिंबीर बनवून कधीही खाऊ नका. त्याला ठोसा मारणे, किंवा त्याला काहीतरी तोडणे, यामुळे तुम्हाला आरोग्य लाभ होईल आणि अश्रूही येणार नाहीत.

आमचे वडील कांदे तोडून किंवा थेट शेतातून हिरव्या पानांचे कांदे खाण्यासाठी आणि थेट न फोडता खात असत, जसे तुम्ही सफरचंद आणि पेरू खाता.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.*

डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे*

 *डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे*_


☑ डाव्या कुशीवर झोपल्यामुळे आपल्या हृदयावर दबाव जाणवत नसल्याने हृदय योग्य पद्धतीने काम करतं. यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.


☑ डाव्या कुशीवर झोपल्यामुळे शरीरातील विभिन्न अंग आणि मेंदूपर्यंत रक्तात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो. याने शरीराचे सर्व अंग निरोगी राहतात आणि चांगल्या प्रकारे कार्य करतात.


☑ डाव्या कुशीवर झोपल्यामुळे गर्भवती स्त्रियांसाठी डाव्या कुशीवर झोपणे योग्य आहे कारण याने गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होत नाही. याव्यतिरिक्त टाचा, हाता आणि पायांमध्ये सूज येण्याची समस्या दूर होते.


☑ डाव्या कुशीवर झोपल्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत होत असल्याने झोप पूर्ण होते. या स्थितीत झोपून उठल्यावर थकवा जाणवत नाही आणि पोटासंबंधी समस्याही दूर होतात.


☑ पचन क्रिया सुरळीत होते आणि पाचक प्रणालीवर अतिरिक्त दबाव येत नाही. डाव्या बाजूकडे झोपल्याने शरीरात जमा होत असलेले टॉक्सिन लसिका वाहिनी तंत्राद्वारे बाहेर पडतात.


☑ बद्धकोष्ठतेची तक्रार असलेल्यांनी डाव्या कुशीवर झोपायला हवे. आराम मिळेल. गुरुत्वाकर्षणामुळे अन्न लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात पद्धतशीर ढकलले जाते आणि सकाळी सहजपणे पोट स्वच्छ होतं.


☑ पोटातील ॲसिड वर न जाता खाली येतं, ज्याने ॲसिडिटी आणि छातीत जळजळणे अश्या समस्या दूर होतात.


*संकलन-* 

डॉ. प्रमोद ढेरे,


*माहिती आवडली असेल तर इतर ग्रुपवर शेअर करा 📲*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺




प्रदर्शन दि. ११ ते २३ फेब्रुवारी 2025





 प्रदर्शन   दि. ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान

सरस महालक्ष्मी या प्रदर्शनाला ११ ते २३ फेब्रुवारी,  या कालावधीत भेट देता येईल. या प्रदर्शनात अनेक प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तूहातमागावर तयार केलेले कपडेवुडन क्राफ्टबंजारा आर्टवारली आर्ट च्या वस्तू याशिवाय अनेक प्रकारच्या ज्वेलरीलहान मुलांसाठी लाकडी खेळणी व इतर राज्यातील दुर्मिळ वस्तूंची रेलचेल  आहे. या प्रदर्शनात एकूण ५०० पेक्षा जास्त स्टॉल लागले आहेतत्यापैकी ९० फुड स्टॉल आहेत.

ज्येष्ठ नागरिकांसाठी 'एल्डर लाईन १४५६७' हेल्पलाइन · मदतीसाठी टोल फ्री सेवा उपलब्ध pl शेअर जास्तीत जास्त लोकांना

 ज्येष्ठ नागरिकांसाठी 'एल्डर लाईन १४५६७हेल्पलाइन

·         मदतीसाठी टोल फ्री सेवा उपलब्ध

 

मुंबईदि. ११ : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी 'एल्डरलाईन - १४५६७ही राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाइन सुरू केली आहे.

राज्यात राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान (एनआयएसडी)सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागमहाराष्ट्र शासनसमाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाउंडेशनपुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येते.

    या हेल्पलाइन चे काम २६ जानेवारी१५ ऑगस्ट व २ ऑक्टोबर वगळता वर्षातील ३६२ दिवस आणि आठवड्याचे सर्व दिवस सकाळी ८ ते संध्याकाळी ८ पर्यंत चालते. याद्वारे आरोग्यविषयक जागरूकतावृद्धाश्रमडे केअर सेंटरपोषणसांस्कृतिककलाज्येष्ठांसंबंधी अनुकूल उत्पादनेआणि मनोरंजनाशी संबंधित माहिती पुरविण्यात येते.

   वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर कायदेविषयकमालमत्ताशेजारी आदींच्या अनुषंगाने वाद निराकरणआर्थिकनिवृत्तीवेतन संबंधित सल्ला आणि सरकारी योजनांच्या माहितीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात येते. चिंता निराकरणनातेसंबंध व्यवस्थापनमृत्यूशी संबंधित भीती निवारणवेळताणराग आदीच्या अनुषंगाने जीवन व्यवस्थापनमृत्युपत्र बनवण्याचे महत्त्व आदी मृत्यूपूर्वीचे दस्तऐवजीकरण आदी अनुषंगाने ही मदत करण्यात येते.

 यासंदर्भात राज्यभरातून जेष्ठ नागरिकांसाठी चार लाखाहून अधिक मदतीचे दूरध्वनी आले आहेत. त्यामध्ये जेष्ठ नागरिकांना प्रत्यक्षअप्रत्यक्षरित्या मदत हेल्पलाइनने केली आहे. तसेच तीस हजाराहून अधिक प्रकरणे क्षेत्रीय पातळीवर यशस्वीरित्या हाताळली आहेत.

Featured post

Lakshvedhi