Thursday, 6 February 2025

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधितांच्या बँक खात्यावर 592 कोटी 34 लाख 90 हजाराची मदत डीबीटीद्वारे वर्ग

 नैसर्गिक आपत्तीमुळे बाधितांच्या बँक खात्यावर

592 कोटी 34 लाख 90 हजाराची मदत डीबीटीद्वारे वर्ग

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची माहिती

 

मुंबईदि. 6 :- अतिवृष्टीपूरअवेळी पाऊसदुष्काळवादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे  बाधित झालेल्या शेतकरी व अन्य घटकांना राज्य शासनाने वेळोवेळी शासन निकषानुसार मदत जाहीर केली होती. यातील 5 लाख 39 हजार 605 लाभार्थ्यांना 592 कोटी 34 लाख 90 हजार 530 रुपयांची मदत संबंधित लाभार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यावर मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आली आहेअशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

आधारसंलग्न बँक खात्यावर डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आलेल्या मदतीमध्ये  अतिवृष्टी/पूर सन 2022सन 2023सन 2024अवेळी पाऊस 2022-2023व 2023-2024अवेळी पाऊस/अतिवृष्टी 2023-2024दुष्काळ 2023 आणि जून 2019 मध्ये वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या लाभार्थींचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी व नागरिकांना शासनाकडून ही मदत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर वर्ग झाल्यामुळे या घटकांना दिलासा मिळेलअसा विश्वासही मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी व्यक्त केला.

मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितलेया मदतीमध्ये अमरावती विभागामध्ये 4 हजार 671 लाभार्थ्यांना 7 कोटी 40 लाख 29 हजार 820 रुपयांची मदत आधारसंलग्न बँक खात्यावर वर्ग केली आहे.  यात अकोला जिल्ह्यातील 363 लाभार्थ्यांना  51 लाख 96 हजार 942  रुपयेअमरावती जिल्ह्यातील  1 हजार 630 लाभार्थ्यांना  3 कोटी 61 लाख 81 हजार 886 रुपयेबुलढाणा जिल्ह्यातील 674 लाभार्थींना 1 कोटी 2 लाख 54 हजार 387 रुपयेवाशिम जिल्ह्यातील 401 लाभार्थींना 49 लाख 19 हजार 488 रुपये तर यवतमाळ जिल्ह्यातील 1 हजार 603 लाभार्थींना 1 कोटी 74 लाख 77 हजार 118 रुपयांची मदत वर्ग केली आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 4 लाख 83 हजार 883 लाभार्थींना 514 कोटी 85 लाख 23 हजार 260 रुपयांची मदत आधारसंलग्न बँक खात्यावर वर्ग केली आहे. यात बीड जिल्ह्यातील 1 लाख 15 हजार 910 लाभार्थींना 106 कोटी 12 लाख 77 हजार 422 रुपयेछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3 हजार 463 लाभार्थींना 2 कोटी 42 लाख 73 हजार 471 रुपये,  धाराशिव जिल्ह्यातील 27 हजार 307 लाभर्थ्यांना 36 कोटी 24 लाख  7 हजार 748 रुपये,  हिंगोली जिल्ह्यातील 56 हजार 81 लाभार्थीना 69 कोटी 71 लाख  979 रुपये,  जालना जिल्ह्यातील 8 हजार 245लाभार्थींना 10 कोटी 74 लाख 76 हजार 397 रुपयेलातूर जिल्ह्यातील 23 हजार 841 लाभार्थींना 21 कोटी 34 लाख 43 हजार 75 रुपयेनांदेड जिल्ह्यातील 2 लाख 33 हजार 242 लाभार्थींना 250 कोटी 28 लाख  1 हजार 952 रुपये आणि परभणी जिल्ह्यातील 15 हजार 794 लाभार्थींना 17 कोटी 97 लाख 42 हजार 217 रुपये बॅक खात्यावर डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आले आहेत.

कोकण विभागामध्ये 865 लाभार्थ्यांना 21 लाख 81 हजार 781 रुपयांची मदत आधारसंलग्न बँक खात्यावर वर्ग केली आहे. यामध्ये  रायगड जिल्ह्यातील  16 लाभार्थ्यांना  1 लाख 10 हजार 487 रुपये,  रत्नागिरी जिल्ह्यातील 3 लाभार्थ्यांना  8 हजार 600 रुपयेसिंधुदुर्ग जिल्ह्यातील  703 लाभार्थ्यांना 12 लाख 88 हजार 634 रुपयेठाणे जिल्ह्यातील एका लाभार्थीस 9 हजार रुपये,  पालघर जिल्ह्यातील 142 लाभार्थीना 7 लाख 65 हजार 60 रुपये बॅक खात्यावर डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आले आहेत.

नागपूर विभागात 20 हजार 898  लाभार्थींना  26 कोटी 43 लाख 10 हजार 864 रुपये बॅक खात्यावर डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आले आहेत. यामध्ये  भंडारा जिल्ह्यातील  176 लाभार्थीना 22 लाख            56 हजार 210 रुपयेचंद्रपूर जिल्ह्यातील 5 हजार 288 लाभार्थीना 4 कोटी 86 लाख 74 हजार 753 रुपयेगडचिरोली जिल्ह्यातील  6 हजार 752 लाभार्थ्यांना 8 कोटी 11 लाख 94 हजार 213 रुपयेगोंदिया जिल्ह्यातील 3 हजार 146 लाभार्थींना 4 कोटी 12 लाख 47 हजार 223 रुपयेनागपूर जिल्ह्यातील 3 हजार 874 लाभार्थींना 7 कोटी 40 लाख 30 हजार 676 रुपये तर वर्धा जिल्ह्यातील 1 हजार 662 लाभार्थ्यांच्या  बँक खात्यावर  1 कोटी 69 लाख 7 हजार 790 रुपये  डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आले आहेत.

नाशिक विभागात 1 हजार 909 लाभार्थ्यांना 2 कोटी 71 लाख 91 हजार 791 रुपयांची मदत आधारसंलग्न बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. यामध्ये  अहिल्यानगर जिल्ह्यात 228 लाभार्थींना 29 लाख 66 हजार 546 रुपयेधुळे जिल्ह्यातील 115 लाभार्थीना 13 लाख 61 हजार 437 रुपयेजळगाव जिल्ह्यातील 1 हजार 26 लाभार्थींना 1 कोटी 87 लाख 29 हजार 795 रुपयेनंदूरबार जिल्ह्यातील 8 लाभार्थींना 1 लाख 22 हजार 315 रुपये तर नाशिक जिल्ह्यातील 532 लाभार्थींना 40 लाख 11 हजार 699 रुपयांची मदत डीबीटीद्वारे वर्ग करण्यात अली आहे.

पुणे विभागात 27 हजार 379 लाभार्थींच्या  बँक खात्यावर 40 कोटी 72 लाख 53 हजार 13 रुपयांची मदत डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आली आहे. यात  कोल्हापूर जिल्ह्यातील 1 हजार 64 लाभार्थ्यांना  99 लाख     62 हजार 37 रुपयेपुणे जिल्ह्यातील  3 हजार 383 लाभार्थ्यांना 2 कोटी 32 लाख 45 हजार 952 रुपयेसांगली जिल्ह्यातील 1 हजार 787 लाभार्थ्यांना 1 कोटी 77 लाख 44 हजार 279 रुपये आणि सोलापूर जिल्ह्यातील 21 हजार 145 लाभर्थ्यांना 35 कोटी 63 लाख 745 रुपये रुपयांची मदत डीबीटीद्वारे आधारसंलग्न बँक खात्यावर वर्ग करण्यात आली.

0000

आयुष्य फार सुंदर आहे

 आयुष्य फार सुंदर  आहे 

खिशातून *५०* ची एक नोट जरी पडली तर *कावरा बावरा* अन् *बेचैन* होणारा *'माणूस'* आयुष्याची *५० वर्षे* उलटली तरी *परिवर्तन* येत नाही, *बिन्धास्तच* वागतो ! काय *दुर्दैव* आहे !!


 *स्मशानभूमीची* सुरक्षा तपासणी किती *कडक* आणि *मजबूत* असते, हे तर विचारूच नका साहेब! अहो, *पैसा* तर फार दूरची गोष्ट आहे, इथे *श्वासही* सोबत घेऊन जाऊ देत नाही! तुम्ही कीतीही *मोठे* किंवा तुमची *थेट वर पर्यंत ओळख* असली तरी!


 *काळाचा कावळा* *आयुष्याच्या माठावर* बसतो अन् *रात्रंदिवस* *वय पीतो!*

 *'माणूस समजतो: मी जगतोय!!* 


माणूस खाली बसून *पैसे* आणि *संपत्ती* मोजतो: *काल* किती होते आणि *आज* ते किती *वाढले* आहेत आणि *वरती* तो हसणारा *माणसाचे श्वास* मोजतो : *काल* किती *होते* आणि *आज* किती *उरले* आहेत !!


तर चला, *"उरलेले"* आयुष्य *"अवशेष"* बनण्यापूर्वी त्याला *"विशेष"* बनवूया!


 *"पासबुक"* आणि *"श्वास बुक"* , दोन्ही रिकामे असल्यास भरावे लागतात. *पासबुकात* *"रक्कम"* आणि *श्वास* बुकात *"सत्कर्म"* 


म्हणून


*`एकमेकांचा आदर करा. चुका विसरा. अहंकार टाळा.'* 

 *“आयुष्य आहे तो पर्यंत हसत हसत घालवा. रडून वा भांडून तरी काय साध्य होणार?”*


*जीवनाचे सार* 


*जीवन जगताना खरंतर कंडक्टरसारखं राहता आलं पाहिजे.*

*रोज वेगवेगळे प्रवासी सोबत आहेत,पण प्रत्यक्षात कोणीही आपलं नाही.*

*रोजचा प्रवास आहे पण प्रत्यक्षात आपल्याला कुठही जायचं नाही,*

*ज्यातून प्रवास करायचा ती बसही आपली नाही.* 

*बॅगेत असलेले पैसेही आपले नाहीत.*

*ड्यूटी संपल्यावर सारं काही सुपूर्त केलं की झालं.* 

*मित्रांनो जीवन सुंदर आहेच,फक्त आहे त्याचा मनमुराद आनंद घ्या काही घेऊन गेला नाहीत तरी सगळ्यांच्या मनात राहून जा हेच जीवन आहे.*


*_वाचण्यात आलेला सुंदर लेख_*🌹🌹

Nalsa -national free legal service


 

मोदीसाहेब आणि त्यांचा खडतर प्रवास 🌹💕.

 मोदीसाहेब आणि त्यांचा खडतर प्रवास 🌹💕.


बडोद्यात, आमच्याकडे धनंजय बेहरे नावाचे पौरोहित्य करणारे कोकणस्थ ब्राह्मण होते ते सत्यनारायणाची पूजा, गणेशोत्सव पूजा किंवा उदक शांती वगैरे करायला अनेक वर्षां पासून येतात. त्यांचे वडील, या क्षेत्रात एक नावाजलेली व्यक्ती आहेत आणि त्या शिवाय ते संघांचे खूप जुने आणि सन्माननीय कार्यकर्ता आहेत. मोदीजी त्यांच्या वडिलांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद घ्यायला नेहमीच त्यांच्याकडे येत असत. बेहेरे गुरुजींनी सांगितलेली एक गोष्ट आज मी इथे share करीत आहे.....



साधारण 35 वर्षांपूर्वी, नरेंद्र मोदी गुजरातमध्ये संघाचे एक साधे कार्यकर्ता होते. संघांचे ऑफिस झाडणे, पुसणे, स्वच्छ ठेवणे, पाणी भरून ठेवणे असली कामे करत आणि संघांचे लोकल काम करत. त्यांच्याकडे एक कपड्याची झोळी आणि जुनी सायकल होती. तेवढाच त्यांचा संसार होता.


एकदा रात्री 10.30 वाजता, बडोद्याला आमच्या गुरुजींच्या घरी ते आले. तेव्हा गुरुजी आणि त्यांचे वृद्ध वडीलच तेवढे घरात होते. त्यांची आई बाहेरगावी गेली होती. आल्याबरोबर मोदीजींनी आधी गुरुजींच्या वडिलांना वाकून नमस्कार केला. ते थकलेले दिसत होते, म्हणून त्यांना जेवले आहात का? असं विचारले, तर ते नाही म्हणाले. मग बेहेरे गुरुजी स्वयंपाकघरात गेले. तर फक्त्त 5/6 इडल्या होत्या. सांभार किंवा चटणी देखील नव्हती. म्हणून त्यांनी त्या इडल्या दह्यात कुस्करून त्यात पिठीसाखर घालून एका वाडग्यात घालून मोदीजींना खायला दिल्या. मोदीजींनी त्या संपवून टाकल्या. त्यांना प्रचंड भूक लागली असावी. बोलता बोलता मोदीजी म्हणाले, *गोधऱ्याला एक कार्यक्रम होता, तो आटोपून, ९० किमी सायकलवर ते बडोद्याला आले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना डभोईला जायचे होते, की जे 50 किमी दूर होते*. त्यांनी बेहेरे गुरुजीं सोबत बराच वेळ गप्पा केल्या. रात्री 12.30 ला झोपले. आणि पहाटे लवकर उठून आंघोळ आटोपून ते सायकल मारत डभोईला निघून गेले.

त्यांच्याकडे फक्त्त एक टॉवेल, आणि एक जोडी कपडे असे. बाकी काही नाही. जेवण असेच कोणी दिलं तर, नाहीतर उपाशी देखील झोपत. हे असं आयुष्य त्यांनी अनेक वर्षे घालवले, असं गुरुजी म्हणाले. 


गरिबी काय असते, हाल अपेष्टा काय असतात, मेहनत काय असते आणि ती कशी करायची, ती या कर्मयोग्याने अनुभवलेली आहे.


देशभक्त आणि संघाचे संस्कार असलेला, घाम गाळत आणि मेहनत करीत, धगधगत्या मुशीतून निघालेला, एक देशभक्त नेता आपल्याला पंतप्रधान म्हणून मिळाले आहेत, हे आपल्या देशा च भाग्य🙏🏻


. मोदीजी, योगीजी आपल्या कुटुंबाचा त्याग करून, फक्त्त आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी सतत रक्त आटवत आहेत, याची आपण कायम आठवण ठेवली पाहिजे आणि त्यांची कदर केली पाहिजे एवढीच विनंती.

🙏🏻🌹💕🤗🙏🏻🌹💕🤗

आदिवासी विकास मंत्र्यांच्या संकल्पनेतून ‘संवाद चिमुकल्यांशी अभियान'

 आदिवासी विकास मंत्र्यांच्या संकल्पनेतून

संवाद चिमुकल्यांशी अभियान'

आश्रमशाळेत आदिवासी विकास मंत्र्यांसह

अधिकारी करणार एक दिवसाचा मुक्काम

मुंबईदि.  : आदिवासी समाजाच्या शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने एक महत्वाचे अभियान राबवित आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील अडचणीत्यांच्या सुरक्षिततेची हमी आणि उपलब्ध सुविधांची गुणवत्ता याबाबत माहिती मिळवून सुधारणा करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या संकल्पनेतून संवाद चिमुकल्यांशी’ अभियानाची सुरूवात करण्यात येणार आहे. दि. 7 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यभरातील शासकीय आदिवासी आश्रमशाळा आणि वसतीगृहांमध्ये विशेष पाहणी आणि संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

मंत्री अशोक उईके म्हणाले कीआदिवासी विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात सुधारणा आणि त्यांच्याशी संवाद साधणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे. राज्यभरात एकूण 497 शासकीय आदिवासी आश्रमशाळा कार्यरत आहेतजिथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी अनेक योजनांची अंमलबजावणी केली जातेपरंतु शाळांतील सोयीसुविधांबाबत अनेकदा तक्रारी येत असतात. या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी व विद्यार्थ्यांची अडचण समजून घेण्यासाठीशाळेतील अधिकारीशिक्षक व कर्मचारी यांच्यातील संवाद आवश्यक आहे.

या अभियानाच्या माध्यमातून अधिकारी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या शालेय जीवनातील विविध अडचणी जाणून घेतील. या अंतर्गत शासकीय आदिवासी आश्रमशाळा आणि वसतीगृहात अधिकारी व कर्मचारी मुक्कामी राहून विद्यार्थ्यांसोबत चर्चा करतील. मुलींच्या आश्रमशाळेसाठी महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल.

या पाहणीत शाळेतील विविध सोयीसुविधांची तपासणी केली जाईल. यामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थितीशिक्षकांची माहितीअन्नधान्याचा दर्जास्वयंपाकाची व्यवस्थापिण्याचे पाणीशौचालयांची स्वच्छतामुलींसाठी स्वतंत्र स्नानगृह व शौचालयांची व्यवस्थाआणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सुनिश्चितता यावर विशेष लक्ष दिले जाईल.

शाळेतील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तपासली जाईलविशेषतः आर.ओ. फिल्टरची स्थितीगरम पाणी आणि पाणी साठवणुकीची पद्धत यावर देखरेख केली जाईल. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांची देखील तपासणी केली जाईलजसे की अन्नधान्याचा दर्जास्वच्छतेची पद्धत आणि जेवणाच्या गुणवत्तेची खात्री केली जाईल.

याशिवायशाळेतील इतर सुविधा जसे विद्यार्थ्यांना देण्यात येणारी गादीबेडशीटउशी आणि शाळेतील लाईटपंखेखिडक्याविद्युत फिटींग्ससीसीटीव्ही कॅमेरेअग्निशमन यंत्रे इत्यादी यांची पाहणी केली जाईल.

तसेचमुलींच्या वसतीगृहात असुरक्षिततेविषयी कोणत्याही तक्रारी तर नाहीतयाची काळजी घेतली जाईल. याशिवायमुलींच्या वसतीगृहात सॅनॅटरी नॅपकीन वेंडिंग मशीनधोक्याची सूचना देणारी प्रणाली कार्यान्वित आहे कायाची देखील तपासणी केली जाईल.

             अभियानाच्या दरम्यान अधिकाऱ्यांना काही मुद्द्यांवर स्वयंस्पष्ट अभिप्राय द्यायचा असेल. हे अभिप्राय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाची गुणवत्ताटेट्रा पॅक दूधनिवास व्यवस्थापिण्याच्या पाण्याची उपलब्धतावसतीगृह सुविधांची स्थितीविद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची स्थितीशिक्षकांचे अध्यापन कार्य आणि अभ्यासक्रम यावर आधारित असतील.

अशा उपक्रमांमुळे आदिवासी विद्यार्थ्यांना योग्य शालेय वातावरण आणि सुविधांचा लाभ मिळेल. शाळेतील अडचणी आणि तक्रारी वेळेवर सोडवून त्यांचा शालेय अनुभव सुधारला जाईल. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधल्यामुळे त्यांच्या भावना आणि अडचणी अधिक प्रभावीपणे समजून घेतल्या जातील. हे अभियान आदिवासी विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. याशिवायया प्रकारच्या निरीक्षणामुळे शासनाला अधिक स्पष्ट माहिती मिळेलज्यामुळे आगामी योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येईल.

000

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी

१५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबईदि. ६ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कारपद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कारसंत रविदास पुरस्कारशाहूफुलेआंबेडकर पारितोषिकडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या विविध पुरस्कारांसाठी दि. १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन, सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात आले आहे.

            इच्छुक स्वयंसेवी संस्था व व्यक्ती यांनी पुरस्कारासाठी त्यांचे विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्तसमाज कल्याण यांचेकडे दि. १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सर्व नमूद कागदपत्रांसह दाखल करावेत. अर्जाचा नमुना संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्तसमाज कल्याण यांचे कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या पुरस्काराची जाहिरात व अर्जाचा नमुना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्तसमाजकल्याण या कार्यालयाशी संपर्क साधावा.

अंगणवाडी भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे

 अंगणवाडी भरती प्रक्रियेत 

कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे

मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

 

मुंबईदि. 6 : महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडीत पर्यवेक्षकीय अधिकारीसंरक्षण अधिकारीअधीक्षक ही पदे भरण्यात येत आहे. भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने होणार असूनकोणत्याही आमिषाला बळी पडू नयेअसे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या 100 दिवस उद्दीष्टपूर्ती अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील  रिक्त पदांची भरती विभाग करीत आहे. परीक्षा केंद्रांवर जॅमर बसविण्यास येणार आहे. सरळसेवा व पदोन्नती प्रकारातील पद भरती प्रक्रिया संदर्भातही कार्यवाही सुरू आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी शासन यंत्रणा सज्ज असूनउमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

०००

Featured post

Lakshvedhi