Friday, 7 February 2025

आचार्य किशोर कुणाल यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाल्याची दु:खद बातमी नुकतीच वाचण्यात आली. मराठी माध्यमांनी ही बातमी सुद्धा दिलेली नाही. कारण आपल्याकडे श्री.किशोर कुणाल यांच्याबद्दल कोणाला फारशी माहिती नसावी. पण रामजन्मभूमीचा विषय ठोस पुराव्यांच्या आधारे न्यायालयातून सोडवला जाण्यामागे ज्या काही व्यक्तींचे परिश्रम कारणीभूत होते त्यात श्री.किशोर कुणाल यांचा समावेश करावा लागतो. मी 'अयोध्या' ह्या माझ्या ग्रंथाच्या लेखनासाठी अभ्यास करत असताना श्री.किशोर कुणाल यांचे साहित्य व कार्य माझ्या वाचनात आले. बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील (सध्याचा वैशाली जिल्हा) बरुराज नामक खेड्यात जन्मलेले श्री.किशोर कुणाल हे १९७२ साली IPS अधिकारी झाले. आपल्या पोलीस सेवेची सुरुवात त्यांनी गुजरात मधून केली. गुजरात राज्याचे पोलीस संचालक म्हणून काम केल्यानंतर त्यांची नेमणूक केंद्र सरकारमध्ये झाली होती. व्ही.पी.सिंग पंतप्रधान असताना त्यांनी १९९० साली केंद्रीय गृह मंत्रालयात ‘अयोध्या’ विषयासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण केला होता. श्री. किशोर कुणाल ह्यांची नेमणूक ह्या कक्षात Officer on Special Duty - OSD for Ayodhya ह्या मुद्दाम निर्माण केलेल्या पदावर केली गेली. रामजन्मभूमी विवादातील दोन्ही बाजूंना चर्चेसाठी एकत्र आणून त्यातून काही समजुतीचा तोडगा निघावा ह्यासाठी हा कक्ष काम करत होता. विशेषत: दोन्ही बाजूंनी समोरासमोर येऊन चर्चा करावी, आपापले पुरावे एकमेकांना द्यावेत यासाठी ह्या कक्षाने प्रयत्न केले. त्यातून समोर आलेल्या पुराव्यांचा तुलनात्मक अभ्यास करून सरकारच्या वतीने ते न्यायालयात मांडण्याचे कामही हा कक्ष करणार होता. हे किशोर कुणाल पोलीस सेवेतील आय.पी.एस. अधिकारी असले तरी संस्कृतचे विद्वान होते. त्यांनी संस्कृत मध्ये पी.एच.डी मिळवली होती. त्याही खेरीज अन्य काही भाषा त्यांना अवगत होत्या. त्यांचा इतिहासाचाही अभ्यास दांडगा होता. त्यांची ही पात्रता लक्षात घेऊनच त्यांची नेमणूक ह्या अत्यंत अवघड व संवेदनशील पदावर केली गेली होती. व्ही.पी. सिंगांच्या नंतर आलेल्या दोन्ही पंतप्रधानांनी - चंद्रशेखर व नरसिंह राव - कुणाल ह्यांना त्या पदावर कायम ठेवले होते. त्या पदावर काम करताना श्री. कुणाल ह्यांना दोन्ही बाजूंचे पुरावे पहाण्याची व तपासण्याची संधी मिळाली. ते काम त्यांनी अत्यंत मेहेनत घेऊन पार पाडले. श्री.किशोर कुणाल यांनी ह्या पदावर काम करताना प्रचंड मेहेनत घेऊन स्वत: संशोधन करून अनेक नवे साहित्यिक व महसुली पुरावे पुढे आणले. ह्या पुराव्यांमुळे रामजन्मभूमीवरील प्राचीन राम मंदिराचे अस्तित्व सिद्ध करायला मोठी मदत झाली. उच्च व सर्वोच्च न्यायालयासमोर देखील त्यातील अनेक मुद्दे मांडले गेले. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या अंतिम टप्प्यात बाबरी मस्जिद अॅक्शऩ कमिटीचे वकील राजीव धवन ह्यांनी नैराश्यापोटी जो नकाशा भर न्यायालयात फाडून टाकला होता तो नकाशाही कुणाल ह्यांनीच उघडकीला आणला होता. त्यावेळी दोन्ही बाजूंकडून उपलब्ध झालेले पुरावे आणि स्वत: संशोधन करून मिळवलेले साहित्य ह्यांच्या आधारे त्यांनी दोन ग्रंथ लिहिले आहेत. Ayodhya Revisited व Ayodhya : Beyond Adduced Evidence हे त्यांचे प्रत्येकी ७६० पृष्ठांचे दोन ग्रंथ म्हणजे अयोध्येच्या इतिहासावरील विविध प्रकारच्या संदर्भ व पुराव्यांचे उत्कृष्ट संग्रह आहेत. भारताच्या इतिहासाचे पुनर्लेखन करणाऱ्या अभ्यासकांसाठी हे दोन्ही ग्रंथ पुढील अनेक वर्षे संदर्घ ग्रंथ म्हणून उपयुक्त रहाणार आहेत. सरकारच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर श्री. किशोर कुणाल यांनी आपल्या मूळ गावात धर्म जागरण व प्रचाराचे काम सुरु केले ते आजतागायत सुरु आहे. त्यांच्या निधनामुळे भारतीय इतिहासाच्या वास्तव इतिहासाचा एक खंदा अभ्यासक काळाच्या पडद्याआड गेला आहे. आपल्या इतिहासाच्या वास्तव अभ्यासाला व पुनर्लेखनाला चालना मिळत असताना त्यांचे निधन झाले आहे, हा दुर्दैवाचा भाग आहे. पण त्यांनी करून ठेवलेले संशोधन कार्य पुढील अनेक पिढ्यांना उपयोगी पडणार आहे. श्री. किशोर कुणाल यांना विनम्र श्रद्धांजली. (माधवराव भांडारी यांची X वरील पोस्ट )

 आचार्य किशोर कुणाल यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाल्याची दु:खद बातमी नुकतीच वाचण्यात आली. मराठी माध्यमांनी ही बातमी सुद्धा दिलेली नाही. कारण आपल्याकडे श्री.किशोर कुणाल यांच्याबद्दल कोणाला फारशी माहिती नसावी. पण रामजन्मभूमीचा विषय ठोस पुराव्यांच्या आधारे न्यायालयातून सोडवला जाण्यामागे ज्या काही व्यक्तींचे परिश्रम कारणीभूत होते त्यात श्री.किशोर कुणाल यांचा समावेश करावा लागतो. मी 'अयोध्या' ह्या माझ्या ग्रंथाच्या लेखनासाठी अभ्यास करत असताना आचार्य किशोर कुणाल यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाल्याची दु:खद बातमी नुकतीच वाचण्यात आली. मराठी माध्यमांनी ही बातमी सुद्धा दिलेली नाही. कारण आपल्याकडे श्री.किशोर कुणाल यांच्याबद्दल कोणाला फारशी माहिती नसावी. पण रामजन्मभूमीचा विषय ठोस पुराव्यांच्या आधारे न्यायालयातून सोडवला जाण्यामागे ज्या काही व्यक्तींचे परिश्रम कारणीभूत होते त्यात श्री.किशोर कुणाल यांचा समावेश करावा लागतो. मी 'अयोध्या' ह्या माझ्या ग्रंथाच्या लेखनासाठी अभ्यास करत असताना श्री.किशोर कुणाल यांचे साहित्य व कार्य माझ्या वाचनात आले. 


बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील (सध्याचा वैशाली जिल्हा) बरुराज नामक खेड्यात जन्मलेले श्री.किशोर कुणाल हे १९७२ साली IPS अधिकारी झाले. आपल्या पोलीस सेवेची सुरुवात त्यांनी गुजरात मधून केली. गुजरात राज्याचे पोलीस संचालक म्हणून काम केल्यानंतर त्यांची नेमणूक केंद्र सरकारमध्ये झाली होती.


व्ही.पी.सिंग पंतप्रधान असताना त्यांनी १९९० साली केंद्रीय गृह मंत्रालयात ‘अयोध्या’ विषयासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण केला होता. श्री. किशोर कुणाल ह्यांची नेमणूक ह्या कक्षात Officer on Special Duty - OSD for Ayodhya ह्या मुद्दाम निर्माण केलेल्या पदावर केली गेली.


रामजन्मभूमी विवादातील दोन्ही बाजूंना चर्चेसाठी एकत्र आणून त्यातून काही समजुतीचा तोडगा निघावा ह्यासाठी हा कक्ष काम करत होता. विशेषत: दोन्ही बाजूंनी समोरासमोर येऊन चर्चा करावी, आपापले पुरावे एकमेकांना द्यावेत यासाठी ह्या कक्षाने प्रयत्न केले. त्यातून समोर आलेल्या पुराव्यांचा तुलनात्मक अभ्यास करून सरकारच्या वतीने ते न्यायालयात मांडण्याचे कामही हा कक्ष करणार होता.


हे किशोर कुणाल पोलीस सेवेतील आय.पी.एस. अधिकारी असले तरी संस्कृतचे विद्वान होते. त्यांनी संस्कृत मध्ये पी.एच.डी मिळवली होती. त्याही खेरीज अन्य काही भाषा त्यांना अवगत होत्या. त्यांचा इतिहासाचाही अभ्यास दांडगा होता. त्यांची ही पात्रता लक्षात घेऊनच त्यांची नेमणूक ह्या अत्यंत अवघड व संवेदनशील पदावर केली गेली होती. व्ही.पी. सिंगांच्या नंतर आलेल्या दोन्ही पंतप्रधानांनी - चंद्रशेखर व नरसिंह राव - कुणाल ह्यांना त्या पदावर कायम ठेवले होते.


त्या पदावर काम करताना श्री. कुणाल ह्यांना दोन्ही बाजूंचे पुरावे पहाण्याची व तपासण्याची संधी मिळाली. ते काम त्यांनी अत्यंत मेहेनत घेऊन पार पाडले.


श्री.किशोर कुणाल यांनी ह्या पदावर काम करताना प्रचंड मेहेनत घेऊन स्वत: संशोधन करून अनेक नवे साहित्यिक व महसुली पुरावे पुढे आणले. ह्या पुराव्यांमुळे रामजन्मभूमीवरील प्राचीन राम मंदिराचे अस्तित्व सिद्ध करायला मोठी मदत झाली. उच्च व सर्वोच्च न्यायालयासमोर देखील त्यातील अनेक मुद्दे मांडले गेले. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या अंतिम टप्प्यात बाबरी मस्जिद अॅक्शऩ कमिटीचे वकील राजीव धवन ह्यांनी नैराश्यापोटी जो नकाशा भर न्यायालयात फाडून टाकला होता तो नकाशाही कुणाल ह्यांनीच उघडकीला आणला होता.


त्यावेळी दोन्ही बाजूंकडून उपलब्ध झालेले पुरावे आणि स्वत: संशोधन करून मिळवलेले साहित्य ह्यांच्या आधारे त्यांनी दोन ग्रंथ लिहिले आहेत. Ayodhya Revisited व Ayodhya : Beyond Adduced Evidence हे त्यांचे प्रत्येकी ७६० पृष्ठांचे दोन ग्रंथ म्हणजे अयोध्येच्या इतिहासावरील विविध प्रकारच्या संदर्भ व पुराव्यांचे उत्कृष्ट संग्रह आहेत. भारताच्या इतिहासाचे पुनर्लेखन करणाऱ्या अभ्यासकांसाठी हे दोन्ही ग्रंथ पुढील अनेक वर्षे संदर्घ ग्रंथ म्हणून उपयुक्त रहाणार आहेत. सरकारच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर श्री. किशोर कुणाल यांनी आपल्या मूळ गावात धर्म जागरण व प्रचाराचे काम सुरु केले ते आजतागायत सुरु आहे.


त्यांच्या निधनामुळे भारतीय इतिहासाच्या वास्तव इतिहासाचा एक खंदा अभ्यासक काळाच्या पडद्याआड गेला आहे. आपल्या इतिहासाच्या वास्तव अभ्यासाला व पुनर्लेखनाला चालना मिळत असताना त्यांचे निधन झाले आहे, हा दुर्दैवाचा भाग आहे. पण त्यांनी करून ठेवलेले संशोधन कार्य पुढील अनेक पिढ्यांना उपयोगी पडणार आहे.


श्री. किशोर कुणाल यांना विनम्र श्रद्धांजली.


(माधवराव भांडारी यांची X वरील पोस्ट ) माझ्या वाचनात आले. 


बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील (सध्याचा वैशाली जिल्हा) बरुराज नामक खेड्यात जन्मलेले श्री.किशोर कुणाल हे १९७२ साली IPS अधिकारी झाले. आपल्या पोलीस सेवेची सुरुवात त्यांनी गुजरात मधून केली. गुजरात राज्याचे पोलीस संचालक म्हणून काम केल्यानंतर त्यांची नेमणूक केंद्र सरकारमध्ये झाली होती.


व्ही.पी.सिंग पंतप्रधान असताना त्यांनी १९९० साली केंद्रीय गृह मंत्रालयात ‘अयोध्या’ विषयासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण केला होता. श्री. किशोर कुणाल ह्यांची नेमणूक ह्या कक्षात Officer on Special Duty - OSD for Ayodhya ह्या मुद्दाम निर्माण केलेल्या पदावर केली गेली.


रामजन्मभूमी विवादातील दोन्ही बाजूंना चर्चेसाठी एकत्र आणून त्यातून काही समजुतीचा तोडगा निघावा ह्यासाठी हा कक्ष काम करत होता. विशेषत: दोन्ही बाजूंनी समोरासमोर येऊन चर्चा करावी, आपापले पुरावे एकमेकांना द्यावेत यासाठी ह्या कक्षाने प्रयत्न केले. त्यातून समोर आलेल्या पुराव्यांचा तुलनात्मक अभ्यास करून सरकारच्या वतीने ते  न्यायालयात मांडण्याचे कामही हा कक्ष करणार होता.


हे किशोर कुणाल पोलीस सेवेतील आय.पी.एस. अधिकारी असले तरी संस्कृतचे विद्वान होते. त्यांनी संस्कृत मध्ये पी.एच.डी मिळवली होती. त्याही खेरीज अन्य काही भाषा त्यांना अवगत होत्या. त्यांचा इतिहासाचाही अभ्यास दांडगा होता. त्यांची ही पात्रता लक्षात घेऊनच त्यांची नेमणूक ह्या अत्यंत अवघड व संवेदनशील पदावर केली गेली होती. व्ही.पी. सिंगांच्या नंतर आलेल्या दोन्ही पंतप्रधानांनी - चंद्रशेखर व नरसिंह राव - कुणाल ह्यांना त्या पदावर कायम ठेवले होते.


त्या पदावर काम करताना श्री. कुणाल ह्यांना दोन्ही बाजूंचे पुरावे पहाण्याची व तपासण्याची संधी मिळाली. ते काम त्यांनी अत्यंत मेहेनत घेऊन पार पाडले.


श्री.किशोर कुणाल यांनी ह्या पदावर काम करताना प्रचंड मेहेनत घेऊन स्वत: संशोधन करून अनेक नवे साहित्यिक व महसुली पुरावे पुढे आणले. ह्या पुराव्यांमुळे रामजन्मभूमीवरील प्राचीन राम मंदिराचे अस्तित्व सिद्ध करायला मोठी मदत झाली. उच्च व सर्वोच्च न्यायालयासमोर देखील त्यातील अनेक मुद्दे मांडले गेले. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या अंतिम टप्प्यात बाबरी मस्जिद अॅक्शऩ कमिटीचे वकील राजीव धवन ह्यांनी नैराश्यापोटी जो नकाशा भर न्यायालयात फाडून टाकला होता तो नकाशाही कुणाल ह्यांनीच उघडकीला आणला होता.


त्यावेळी दोन्ही बाजूंकडून उपलब्ध झालेले पुरावे आणि स्वत: संशोधन करून मिळवलेले साहित्य ह्यांच्या आधारे त्यांनी दोन ग्रंथ लिहिले आहेत. Ayodhya Revisited व Ayodhya : Beyond Adduced Evidence हे त्यांचे प्रत्येकी ७६० पृष्ठांचे दोन ग्रंथ म्हणजे अयोध्येच्या इतिहासावरील विविध प्रकारच्या संदर्भ व पुराव्यांचे उत्कृष्ट संग्रह आहेत. भारताच्या इतिहासाचे पुनर्लेखन करणाऱ्या अभ्यासकांसाठी हे दोन्ही ग्रंथ पुढील अनेक वर्षे संदर्घ ग्रंथ म्हणून उपयुक्त रहाणार आहेत. सरकारच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर श्री. किशोर कुणाल यांनी आपल्या मूळ गावात धर्म जागरण व प्रचाराचे काम सुरु केले ते आजतागायत सुरु आहे.


त्यांच्या निधनामुळे भारतीय इतिहासाच्या वास्तव इतिहासाचा एक खंदा अभ्यासक काळाच्या पडद्याआड गेला आहे. आपल्या इतिहासाच्या वास्तव अभ्यासाला व पुनर्लेखनाला चालना मिळत असताना त्यांचे निधन झाले आहे, हा दुर्दैवाचा भाग आहे. पण त्यांनी करून ठेवलेले संशोधन कार्य पुढील अनेक पिढ्यांना उपयोगी पडणार आहे.


श्री. किशोर कुणाल यांना विनम्र श्रद्धांजली.


(माधवराव भांडारी यांची X वरील पोस्ट )

देखो वर्दिध जरुरी है खेल जरुरी है, मेहेनत जरूरी है, कौम के लीये


 

महापारेषणमध्ये प्रकल्प तात्काळ मार्गी लावावेत -

 महापारेषणमध्ये प्रकल्प तात्काळ मार्गी लावावेत

-         ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 

मुंबई, दि. 6 : महापारेषणचे विविध प्रकल्प तात्काळ मार्गी लावण्याबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

फोर्ट येथील एम एस ई बी होल्डिंग कंपनी कार्यालय येथे आयोजित महापारेषण कंपनीच्या आढावा बैठकीत राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर बोलत होत्या.

यावेळी महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, संचालक सतीश चव्हाणअविनाश निंबाळकर, सुगत गमरेतृप्ती मुधोळकर यांच्यासह महापारेषण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर म्हणाल्याराज्यातील ऊर्जा क्षेत्र स्वयंपूर्ण करण्यासाठी सौर ऊर्जेवर विशेष भर देण्यात यावा. महापारेषणच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्यासाठीतक्रारींचे निराकरण वेळेत करण्यासाठी जिल्हा आणि विभाग स्तरावरील यंत्रणा सक्षम करण्याचे तसेच प्रकल्पांची कामे तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देशही राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (महापारेषण) च्या कामकाजातील विविध विषयांचा आढावा घेतला. महापारेषणच्या विविध प्रकल्पांची प्रगतीसौर ऊर्जा प्रकल्पांची अंमलबजावणीतसेच अर्थविषयक बाबींवरही चर्चा करण्यात आली.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मंत्री कार्यालयाचा अनुभव;

 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मंत्री कार्यालयाचा अनुभव;

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा उपक्रम

अभिरुप स्वरुपात राजवर्धन कारंडे यांनी सांभाळले कौशल्य विकास मंत्री पद

 

मुंबईदि. 6 : युवकांना काळानुरूप कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कौशल्य विकास विभाग काम करत आहे. कौशल्य विकास विभागामध्ये विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी प्रथमच दिली असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

 अभिरुप स्वरूपात कौशल्य विकास मंत्री म्हणून पदभार सांभाळलेल्या राजवर्धन कारंडे यांनी कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा यांचे आभार मानून नूतन मंत्रिमंडळाने कौशल्य विकास विभागाचे कामकाज जाणून घेतले.

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मंत्रालयातील आपल्या कार्यालयात भेटीसाठी आमंत्रित केले होते. शासनाची कार्यप्रणाली समजावी आणि मंत्रालयाचा अनुभव मिळावा हा या भेटीमागे उद्देश होता. या भेटीत कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा यांच्या मंत्रालयातील कार्यालयाचा कार्यभार एका तासासाठी या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभिरुप स्वरूपात सोपवण्यात आला.

यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क या उपक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमंधून निवडणुकीद्वारे प्रतिनिधी निवडले जातात आणि प्रतिनिधींचे शॅडो मंत्रिमंडळ स्थापन करण्यात येते. या विद्यार्थ्यांना शासकीय विभागांची माहितीत्यांच्या कार्याची पद्धत समजते आणि लोकोपयोगी योजनांची माहिती होते. नुसते शॅडो मंत्रिमंडळ नव्हे तर या उपक्रमातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात मंत्रालयात येऊन कामकाजाचाविभागांचा अगदी जवळून अनुभव घेता यावा यासाठी कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा यांनी या भेटीचे आयोजन केले होते. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा,आयुक्त नितीन पाटील,व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालया च्या संचालिका माधवी सरदेशमुख यासह यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कचे  मंत्रिमंडळ समृद्धी तुपे - मुख्यमंत्रीरिया खानोलकर - गृहमंत्री, पार्थ थोरवत, आर्यन दराडे - उपमुख्यमंत्रीपर्णवी धावरे - सभापती म्हणून उपस्थित होते.

यावेळी कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा म्हणाले "आजचे विद्यार्थी आपले उद्याचे नेते असूनत्यांना प्रशासनाच्या कार्यप्रणालीचा अनुभव देणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात आपल्या लोकशाहीला जपणारे हे प्रतिनिधी प्रशासनाच्या संपर्कात येतील तेव्हा नक्कीच त्यांना हा आपला अनुभव आठवेल. हा एक छोटा अनुभव असला तरीत्यांना त्यांच्या भविष्यातील नेतृत्वाच्या भूमिकेसाठी प्रेरित करणारा ठरू शकतो. अशा प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना थोडे नवीन शिकायला मिळते आणि ते आपले विचार अधिक सुस्पष्ट आणि विस्तृत करू शकतात.

अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी केंद्र शासनाच्या योजनाकौशल्य विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती त्याचप्रमाणे युवांना देण्यात येणारे विविध प्रशिक्षणविभागाचे कामकाज याची सविस्तर माहिती दिली.

*****



गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता महत्वाची

 गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी

पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता महत्वाची

मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे

 

मुंबईदि. : राज्यातील गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी या व्यवसायामध्ये पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता महत्वाची आहे. त्या दृष्टीने राज्याचे  मत्स्य धोरण तयार करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

   मंत्रालयात आज राज्यातील तलाव ठेक्यांचा आढावा घेण्यासाठी मंत्री श्री. राणे यांच्या उपस्थितीत बैठक  झाली. त्यावेळी ते बोलत होते.

तलावांच्या ठेके वाटपात शिस्त आणण्याच्या सूचना देऊन मंत्री श्री. राणे म्हणाले कीग्रामीण भागातील अर्थकारणास चालना देणे आणि ग्रामीण जनतेचे उत्पन्न वाढवणे हा तलावांचे ठेके देण्याचा उद्देश आहे. त्यामुळे मासेमारी करणाऱ्या संस्थांचा आर्थिक विकास होण्यासाठी मत्स्य उत्पादन वाढ महत्वाची आहे. यासाठी निविदा पद्धतीने ठेके वाटप झाले पाहिजे. या सर्व व्यवसायावर एक नियंत्रण हवे. त्यासाठी काही प्रमाणात शुल्क आकारण्यात यावे. राज्यात मत्स्य उत्पादन वाढीसाठी मोठी संधी आहे. मासेमारी हा राज्यातील एक मोठा व्यवसाय आहे. यासाठी तलाव ठेक्यांची संपूर्ण प्रक्रिया संगणकीय प्रणालीवर आणावी. या प्रणालीमध्ये सर्व माहिती उपलब्ध असावी. त्यामध्ये ठेका कोणत्या संस्थेला दिला. कधी दिला. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तलाव आहेत. याची सर्व माहिती असावीअशा सूचना मंत्री श्री. राणे यांनी दिल्या.

    मंत्री श्री. राणे म्हणाले कीराज्यात कोणकोणत्या संस्थांना कधी ठेके दिले आहेत. त्यांनी त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण केले आहे काकधी केले आहे? नूतनीकरण नियमितपणे झाले आहे काया विषयी सविस्तर माहिती पुढील आठवड्यात सादर करावी. विभागाने मत्स्य व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करावेत आहे, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीस महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय उद्योग विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक अनिता मेश्राममत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांच्यासह मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 दरम्यान मंत्री श्री. राणे यांनी रेडी बंदर विषयी आढावा घेतला. रेडी बंदर रेल्वे आणि चारपदरी महामार्ग याने जोडले जाणार आहे. त्यामुळे या बंदराच्या विकासास गती मिळणार असल्याचे मंत्री श्री राणे म्हणाले. तसेच या बंदर बाबत फेमेंतो कंपनीस येत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी सागरी महामंडळाने सहकार्य करावे अशा सूचना त्यांनी दिल्या.

            या बैठकीस महाराष्ट्र सागरी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी प्रदीपकॅप्टन प्रवीण खारासंजय उगुलमुगलेमहामंडळाचे प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीयेफेमेंतो कंपनीचे कॅप्टन करकरे आणि उन्मेष चव्हाण उपस्थित होते.

००००

सामाजिक बांधिलकी अखंड जपत रुग्णांना आरोग्यसेवा पुरवाव्यात




 सामाजिक बांधिलकी अखंड जपत रुग्णांना आरोग्यसेवा पुरवाव्यात

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोशी येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन

 

पुणेदि. ६ : तंत्रज्ञान खूप वेगाने वाढत आहे. तसेच धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आजारही वेगाने वाढताना दिसत आहेत. परंतु नवीन तंत्रज्ञानामुळे रुग्णाला दिलासा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जोपासण्याची परंपरा अखंड जपत वैद्यकीय क्षेत्रातील चांगल्या व अत्याधुनिक सुविधा देण्याचे काम पटवर्धन कुटुंब करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मोशी येथे धनश्री सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारजलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलआमदार महेश लांडगेअमित गोरखेअण्णा बनसोडेशंकर जगतापपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबेमनपा आयुक्त शेखर सिंह,  रुग्णालयाचे संस्थापक डॉ. राजीव पटवर्धनरवींद्र भुसारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेअलीकडच्या काळामध्ये आरोग्य सुविधा महागलेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने 'युनिव्हर्सल हेल्थकेअरसिस्टीम लागू केली आहे. महात्मा फुले जन आरोग्यच्या माध्यमातून मोठ्या रुग्णालयांमधून १ हजार ३०० सेवा मोफत देण्यात येतात. या माध्यमातून केंद्र शासनाच्या १ हजार ८०० सेवांचे पॅकेज राज्यातील जनतेला उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. धनश्री रुग्णालयानेही या सेवा दिल्यास गरजू रुग्णांना पैसे नसले तरी उपचार घेता येईल. शासन मुख्यमंत्री सहायता कक्ष व धर्मादाय सहायता कक्षाच्या माध्यमातून कोणत्याही पॅकेजमध्ये न बसणाऱ्या आजारांसाठी अर्थसहाय्य देते. या सेवाही रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांना मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या दोन्ही कक्षामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा या रुग्णालयामार्फत दिल्याने अत्याधुनिक सेवेचा लाभ गरजूंना मिळू शकेल असेही श्री. फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेसामाजिक बांधिलकीने पटवर्धन कुटुंब काम करत आहे. या रुग्णालयामध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा आहेत. वेगवेगळ्या सर्जरी तंत्रज्ञानामुळे सोप्या झाल्या आहेत. रोबोटीक सर्जरीमुळे दुसऱ्या कुठल्याही अवयवाला धोका पोहोचत नाही. या सर्व आधुनिक सुविधा देण्याचे काम रुग्णालय करीत आहे ही बाब अनुकरणीय आहे.  

उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार म्हणालेउत्तम आरोग्य सेवा सुदृढ समाजाचा पाया आहे. आरोग्य सेवा मजबूत असेल तर समाज प्रगती करु शकतो. आजच्या काळात केवळ मोठ्या शहरांमध्येच नव्हे तर ग्रामीण आणि निमशहरी भागातही उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधांची गरज भासत आहे.  धनश्री हॉस्पिटलने ही गरज ओळखून १०० खाटांचे आधुनिक रुग्णालय सुरु केले आहे. शासनही नेहमीच आरोग्य सेवेला प्राधान्य देत आहे. राज्य शासनाने ग्रामीण भागातही दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी विविध योजना आखलेल्या आहेत. धनश्री रुग्णालयासारख्या खाजगी संस्थांमुळे या सेवांना आधार मिळतो व सरकारच्या आरोग्य सेवांना बळकटी येते. वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सकारात्मक बदल होत आहेत. तंत्रज्ञानामुळे अनेक सुविधा व्यवहार्य होत आहेत. महाराष्ट्राने या क्षेत्रातही आघाडी घेतली आहे असे सांगून रुग्णालयात रुग्णाला उत्तम सुविधा मिळतीलअसा विश्वास श्री. पवार यांनी व्यक्त केला.

0000

Thursday, 6 February 2025

औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य

 औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशात औद्यागिक क्षेत्रात सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात

 

पुणेदि. ६ : औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य असूनदेशातील सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तळेगाव येथील हॅवमोर लोट्टे आईस्क्रीम उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी श्री.फडणवीस बोलत होते.

यावेळी कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवारजलसंपदा मंत्री (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटीलउद्योग मंत्री उदय सामंतआमदार सुनील शेळकेलोट्टे समूहाचे अध्यक्ष डोंग बीन शीनरिपब्लिक ऑफ कोरियाचे भारतातील राजदूत शेंग हो लीउद्योग विभागाचे सचिव पी अन्बलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासूमाजी आमदार बाळा भेगडेहॅवमोर आईस्क्रीम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कोमल आनंद आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेदावोस मधील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राचा दबदबा होता. अनेक गुंतवणुकीचे करार या ठिकाणी करण्यात आले. विविध उद्योजकांशी चर्चा करुनत्यांच्या समस्या जाणून घेत आहोतराज्यातील गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्न करीत आहोत. दोनच दिवसांपूर्वी मैत्री कक्षाचे नूतनीकरण करण्यात आले. या पोर्टलवर उद्योगासाठी आवश्यक असणारी सर्व व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे. ‘Ease of doing business’ या धोरणानुसार शासनाचे काम सुरू आहे.

आपल्याला लहानपणी आईस्क्रीम खूप आवडायचे. एक महिना आईस्क्रीम फॅक्टरी मध्ये राहायला जावे असे वाटायचेअसे सांगत या प्रकल्पाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री श्री.फडणवीस बालपणीच्या आठवणीत काही क्षण रमले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते लोट्टे आईस्क्रीम उत्पादन सुविधांचे उद्घाटन झाले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आईस्क्रीम प्रकल्पाची पाहणी केली.

 

 

समूहाचे अध्यक्ष डोंग बीन शीन म्हणालेलोट्टेच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असलेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन करताना आम्हाला अभिमान वाटतोभारत आमच्यासाठी एक महत्वाची बाजारपेठ आहेआणि आमच्या जागतिक कामकाजाचा अविभाज्य भाग आहे. हॅवमोरला भारतातील सर्वात लोकप्रिय आईस्क्रीम ब्रँड बनविण्याच्या उद्देशाने आम्ही पुण्यातील प्रकल्पामध्ये १६ प्रॉडक्शन लाईन्स सुरू करणार आहोत.

रिपब्लिकन ऑफ कोरियाचे भारतातील राजदूत शेंग हो ली यांनीही मनोगत व्यक्त केले. हा आईस्क्रीम प्रकल्प एकूण साठ हजार चौरस मीटर क्षेत्रात विस्तारलेला असूनया प्रकल्पात ५० दशलक्ष लिटर अशी प्रभावी वार्षिक उत्पादन क्षमता आहे. पुण्यातील या प्रकल्पाची रचना विशेष करुन तीव्र उन्हाळ्याच्या काळात आईस्क्रीमची मागणी पूर्ण करण्यासाठी करण्यात आली आहे. या प्लँटमध्ये नऊ प्रोडक्शन लाईन कार्यरत आहेत. हॅवमोर प्रकल्प आपल्या विकासाला पुढील तीन वर्षात अधिक गती देईल. पाचशे कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह हा ऐतिहासिक उत्पादन प्रकल्प पुढील दोन वर्षात हजार लोकांना रोजगार देईलज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल.

कार्यक्रमाला स्थानिक कोरीअन असोसिएशन समुदाय सदस्यलोट्टे इंडियाचे व्यवसाय सहकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi